विद्यार्थी उपक्रमांत रमू लागले
जेव्हा मूल्यवर्धन प्रशिक्षण पूर्ण झाले तेव्हापासून आम्ही मूल्यवर्धन उपक्रम शाळेत घेण्यास सुरुवात केली.
मूल्यवर्धनचे उपक्रम घेतल्यामुळे माझ्या शाळेतील मुले शाळेत रमू लागली. मधल्या सुट्टीत शाळेतून काही मुले घरी जात होती. ते घरच्यांना शेतीच्या कामात मदत करण्यासाठी जात असत. आता शाळा सुटेपर्यंत शाळेत उपस्थित असतात. त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली आहे.
-पंडित दुधवाड
विद्यार्थी उपक्रमांत रमू लागले
-पंडित दुधवाड
मूल्यवर्धनमुळे मुलांची उपस्थिती वाढली
मूल्यवर्धनमुळे मुलांची उपस्थिती वाढली व मुळे रोज शाळेत येऊ लागली.
मी या शाळेची मुख्याध्यापिका कुसभागे आहे. जेव्हा मी या शाळेत आले, तेव्हा मुले गुरुजींचा आदर करत नव्हती. मात्र जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम आम्ही मुलांसोबत घ्यायला लागलो, तेव्हापासून मुले आता सर्वांचा आदर करत आहेत. मूल्यवर्धनमधील शांतता संकेताचा छान उपयोग करत आहेत. जेव्हा आम्हांला काही सूचना मुलांना सांगायच्या असतील तेव्हा मुले शांत होतात. आम्ही हात वर करून शांतता संकेत देतो तेव्हा मुले शांत होतात व आमच्याकडे लक्ष्य देतात. आम्ही मुलांना शांत बसण्यासाठी नाही तर मुलांचे लक्ष्य आमच्याकडे वेधून घेण्यासाठी शांतता संकेत देतो. मुलांना जी सूचना द्यायची ती देतो. ही खूप उत्तम पद्धती आहे.
मूल्यवर्धनमधील सहयोगी अध्ययन पद्धतींचा आम्हांला खूप फायदा झाला आहे. मुलांना जोडीत, गटात बसायला खूप आवडते. मुले एकमेकांच्या सहकार्याने शिकतात. जी मुले कमी गतीने शिकतात ती गटात दुसऱ्या मुलांच्या सहकार्याने लवकर शिकतात. जी मुले वर्गात बोलत नाहीत, ती या पद्धतीमध्ये बोलतात. गटात बोलायला लाजत नाहीत.
मुलांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत बदल झाला आहे. येथे वडारी समाज जास्त प्रमाणात आहे. मूल्यवर्धनमध्ये बरेच उपक्रम असे आहेत त्यामध्ये मुलांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले आहे. मुलांमध्ये आता स्वच्छता हळूहळू दिसू लागली आहे. मूल्यवर्धन ही खूप मोठी संजीवनी आहे. असेच पुढे मूल्यवर्धन चालू राहावे ही अपेक्षा.
-श्यामल कुसभागे
मूल्यवर्धनमुळे मुलांची उपस्थिती वाढली
-श्यामल कुसभागे
मूल्यवर्धन उपक्रमांमुळे झालेले चांगले बदल
देवणी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 65 शाळा आहेत. या शाळांमध्ये इयत्ता पाहिली ते पाचवीपर्यंत मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात असून इयत्ता पाहिली ते चौथीच्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
जेव्हा आम्ही शाळाभेट करतो, तेव्हा शिक्षक खूप छान अनुभव सांगतात. मुलांमध्ये शिस्त वाढत चालली आहे. पूर्वी मुलांची संख्या कमी होती. त्यांच्यामध्ये शिस्त कमी प्रमाणात दिसत असे. जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु झाला तेव्हापासून बऱ्याच मुलांमध्ये चांगला बदल झालेला दिसून येत आहे. पूर्वी मुले आई, वडील, भाऊ, बहिण यांचा आदर करत नव्हती, पण आता मुले त्यांचा आदर करू लागली आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे, त्यांचे दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करणे, उदा. वर्गातील एखाद्या मुलाकडे पेन नसेल तर त्याला कोणी पेन देते. पूर्वी ही भावना मुलांमध्ये दिसत नव्हती. कारण मुलांना वाटायचे, माझा पेन मी दुसऱ्याला का देऊ? त्याने माझा पेन परत नाही दिला तर? पण आता मुले एकमेकांना सहकार्य करतात. कारण मूल्यवर्धनचा चांगला प्रभाव मुलांवर पडताना दिसत आहे.
मी जेव्हा शाळाभेट करण्यासाठी जातो तेव्हा पाहतो की, वर्गामध्ये शिक्षक मूल्यवर्धनचा शांतता संकेत देतात तेव्हा वर्गातील आवाज काही सेकंदामध्ये बंद होतो व मुले शिक्षकांकडे लक्ष देतात. दुपारच्या सत्रामध्ये शिक्षक मूल्यवर्धन उपक्रम घेतात तेव्हा उपक्रम घेण्यापूर्वी एक मूल्यवर्धनचा सहयोगी खेळ घेतात. त्यामध्ये सर्व मुले एकमेकांच्या सहकार्याने तो खेळ अतिशय आनंदी वातावरणात खेळतात. दुपारची पठारावस्था दूर होते आणि मुले खूप आनंदी वातावरणात मूल्यवर्धनचा उपक्रम सादर करतात.
जेव्हा शिक्षक मुलांमध्ये मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती शिक्षकांमध्येही रुजतात. आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा आपण तसे वागणे महत्त्वाचे आहे असा विचार शिक्षक करतात. मूल्यवर्धनचे वर्गनियम बनवलेले असतात तेव्हा त्यामध्ये काही नियम असे असतात की रोज वेळेवर शाळेत यावे. शिक्षक स्वत: वेळेवर शाळेत येतात. चप्पल वर्गाबाहेर काढावी, वर्ग स्वच्छ ठेवावा, सर्वांचा आदर करावा. यामुळे मुले व शिक्षक यांच्यामध्येही मूल्ये रुजण्यास मदत होत असते.
आजच्या काळात मूल्ये रुजविण्याची खूप गरज आहे. स्वतंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये मूल्यवर्धनमधून अतिशय उत्तम प्रकारे आपण रूजवू शकतो.
नवनाथ दहिफळे हे मूल्यवर्धन समन्वयक असताना त्यांनी केलेले कार्य हे खूप मोलाचे ठरले. त्यांनी देवणी तालुक्यात शाळाभेटी देऊन शिक्षक व विद्यार्थी यांच्यात समन्वय घडवून आणला. उपक्रमांविषयी गोडी निर्माण केली. तसेच संध्या सावंत यांचे कार्य खूप मोलाचे ठरले. कार्यशाळा घेतली तेव्हा सर्व मूल्यवर्धन प्रेरकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी सोपेसोपे उपक्रम घेऊन त्यांनी प्रेरणा दिली. स्वतःची ओळख मूल्यवर्धन उपक्रमातून करुन दिली.
आमचे प्रेरणा स्थान गटशिक्षणाधिकारी आदरनिय उज्जलकुमार कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या मार्ग वापरून सर्वांना खेळीमेळीच्या वातावरणात वेळोवेळी प्रेरणा दिली. केंद्रप्रमुख मोरे, साबने, येलमटे, वाडिकर व येलमटे यांनी वेळोवेळी सहकार्य केले. तसेच आमचा गटसाधनकेंद्राचा सर्व स्टाफ यांनीही सहकार्य केले. आज रोजी मूल्यवर्धन म्हणजे गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास असे संबोधले जाते. मुकुंद दहीफळे, जिल्हा समन्वयक व प्राचार्य चौरे साहेब यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करुन शाळाभेटी देऊन उणीवा, त्रुटी यांचे निराकरण केले. देवणी तालुका मूल्यवर्धन उपक्रमयुक्त झाला. देवणी मूल्यवर्धनमुळे चैतन्यमय झाली.
-घाटे बी. जी. (विषयसाधन व्यक्ती)
मूल्यवर्धन उपक्रमांमुळे झालेले चांगले बदल
-घाटे बी. जी. (विषयसाधन व्यक्ती)
मुलांमध्ये स्वच्छतेबाबतची जागृती झाली
आमच्या शाळेतील मुले आधी स्वच्छतेबाबत जास्त फारशी जागरूक नव्हती. मात्र आता त्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळू लागले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळगाव येथे आधी स्वच्छता ही दिसून येत नव्हती. पण आता मूल्यवर्धनची अंमलबजावणी केल्यापासून मुलांमध्ये थोडा बदल झाला आहे. मुले दररोज शाळेत वेळेवर येतात. आपले वर्ग स्वच्छ करतात. त्यांना स्वची जाणीव झाली आहे. वर्ग आपला आहे त्याचप्रमाणे सगळी शाळा आपली आहे ही भावना त्यांच्यामध्ये दिसायला लागली.
-संतोष भंडारे
मुलांमध्ये स्वच्छतेबाबतची जागृती झाली
-संतोष भंडारे
मुलांमध्ये झालेले बदल
मुले रोज शाळेत येऊ लागली.
मुळे दररोज शाळेत येऊ लागली. सर्व मुलांची १००% उपस्थिती असते. सर्व मुले एकमेकांशी मैत्रीच्या नात्याने वागतात. वर्गात एकमेकांना मदत करतात. यामध्ये सर्वात मोठा वाटा मूल्यवर्धनचा आहे. मूल्यवर्धनमध्ये खूप छान उपक्रम आहेत. संस्कार हे आपल्याला फक्त मूल्यवर्धनमधून मिळू शकतात. मूल्यवर्धनचे खेळ मुलांना खूप आवडतात. वर्गामध्ये वाढदिवस साजरा करतात, परिपाठात सहभागी होतात. एक-दुसऱ्याला मदत करतात. मोठ्या माणसांचा, गुरूंचा आदर करतात. वेळेवर नखे, केस कापतात. स्वच्छतागृहाचा वापर करतात. स्वच्छ अंघोळ करतात हे सर्व बदल केवळ मूल्यवर्धनमुळे झाले आहेत. शाळा सुटली तरी मुले घरी जात नाहीत, एवढी आवड शाळेशी, शिक्षकांशी निर्माण झाली आहे. हे सर्व परिवर्तन मूल्यवर्धनमुळे झाले आहे.
-संतोष भंडारे
मुलांमध्ये झालेले बदल
-संतोष भंडारे
मुले शाळेची काळजी घेऊ लागली
मुले शाळेत येतात व शाळेला मनापासून जपतात.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुजुरुगवाडी, ता. निलंगा, जि. लातूर या शाळेत मूल्यवर्धन शिकवायला एक वर्षापासून सुरुवात झाली आणि मुलांना मूल्यवर्धित करण्यासाठी आम्ही काम चालू केले. मुलेही मूल्यवर्धनच्या तासाला खूप आनंदाने सहभाग घ्यायची. जर आम्ही एखाद्या दिवशी मूल्यवर्धनचा तास घेतला नाही, तर मुले स्वत: आम्हांला म्हणायची, “सर, मूल्यवर्धनचा तास घ्या.” यात छान गाणी, गोष्टी, खेळ, चित्रे आहेत. मुलांचा कंटाळा पटकन दूर होतो आणि सगळी मुले पटकन यात मिसळून जातात. रोज खेळ खेळून झाल्यावर हातपाय धुवून वर्गात येतात. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण झाली आहे. रोज शाळेत येताना कपडे धुतलेले घालून येतात आणि रोज अंघोळ करतात हा एक मोठा बदल मूल्यवर्धनमुळे झालेला दिसून येतो.
-दत्तात्रय पोतदार
मुले शाळेची काळजी घेऊ लागली
-दत्तात्रय पोतदार
मूल्यवर्धन पुस्तिकांनी विद्यार्थी व शिक्षक या दोघांमध्येही बदल घडवून आणले
मी तीन दिवसांचे मूल्यवर्धनचे प्रशिक्षण चांगल्याप्रकारे पूर्ण केले आहे. हे प्रशिक्षण अगदी आनंदी वातावरणात होते. अशा प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. समाजात चांगले वातावरण तयार होते. विद्यार्थ्यांना वर्गात मूल्यशिक्षण दिले तर विद्यार्थ्यांत परिवर्तन होते.
-पंडित दुधवाड
मूल्यवर्धन पुस्तिकांनी विद्यार्थी व शिक्षक या दोघांमध्येही बदल घडवून आणले
-पंडित दुधवाड
विषय साधन व्यक्ती
मी सन 2016-17 पासून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग अंतर्गत मूल्यवर्धन उपक्रम माझ्या गटात सुरू केला आहे. लोकशाहीची मूल्ये- स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही शाळा स्तरापासून रुजविण्यासाठी मूल्यवर्धनचा खूप फायदा झाला आहे. मला समजलेले मूल्यवर्धन खालीलप्रमाणे –
- लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी
- आदर्श
-दोईजोडे सचिन सुभाषराव
विषय साधन व्यक्ती
-दोईजोडे सचिन सुभाषराव
अनुभव कथन
‘मुलांचे बालवय हे संस्कारक्षम असते आणि या वयात झालेले संस्कार चिरकाल टिकतात’ असे म्हणतात. याचा प्रत्यक्ष अनुभव मला माझ्या वर्गात मूल्यवर्धन उपक्रम ‘आपण झाडे कशी वाचवू शकतो?’ हा घटक शिकविताना आला. मी माझ्या विद्यार्थ्यांना झाडांचे महत्त्व त्यांच्या बालसुलभ मनाला समजेल अशा सोप्या शब्दांत सांगितले. माझ्या वर्गात माझा स्वतःचाही मुलगा तेजस होताच! मी वर्गात सांगितले, “झाडे लावली म्हणजे पाऊस नक्की पडतो.” हे वाक्य त्याच्या कोऱ्या मनावर कायमचे कोरले गेले.
घरी आल्यावर तेजसने बहिणीला सोबत घेऊन तळ्यावरुन सायकलवर तब्बल दोन दिवस काळी माती आणून घेतली. घर तळ्याकाठी माळावरच असल्याने भरपूर मोकळी जागा होती. त्यात त्यांनी जमेल तसे खड्डे खोदले आणि मिळतील ती रोपे लावली, पण काही विघ्नसंतोषी मुलांनी आम्ही शाळेत गेलो की ती रोपे उपटून स्वतःच्या घरी न्यायचा चंगच बांधला. हे पाहून एके दिवशी तेजस हताश झाला. खूप रडला. म्हणाला, “आई, बघ ना ! मी आणि दिदी कुठून कुठून रोपे जमवतो, लावतो, पाणी घालतो आणि ही शेजारची मुले ठेवतच नाहीत!” तेव्हा त्याला समजावण्याचा मी बराच प्रयत्न केला. त्याला म्हणाले, “अरे बाळ, त्यांच्याही घरी ते लावणारच आहेत. खूप छान होईल ना ! सारा उजाड माळरान हिरवागार होईल आणि भरपूर पाऊस पडेल.” तेव्हा तो नाराजीनेच ‘हो’ म्हणाला.
यावर आम्ही दुसऱ्यावर्षी एक नामी युक्ती शोधून काढली. मार्च-एप्रिलमध्येच विद्यार्थ्यांकडून गुलमोहराच्या बिया, चिंचोके, बेलफळे आणून घेतली. घरी तेजस आणि तृप्तीने काळी माती जमविली. मी प्लास्टिकच्या पिशव्या जमविल्या आणि आम्ही त्यात बिया टाकून, पाणी घालून भरपूर रोपे बनविली. काही फुलांची कलमंही तयार केली आणि जून-जुलैमध्ये पाऊस पडताच दररोज दहा रोपे घराबाहेर ठेवून आम्ही शाळेत जावू लागलो. गंमत अशी की, आम्ही घरी येईपर्यंत ती कोणीतरी नेतच असे. पुन्हा दुसऱ्या दिवशी असेच होई . कोणी ना कोणी रस्त्याने जाताना ती रोपे हमखास उचलून नेलेली असायची.
आम्हांला याचा मनस्वी खूप आनंद झाला! कारण “झाडे लावा, झाडे जगवा” असे कितीही नारे दिले, उपक्रम घेतले तरी जे साध्य होत नव्हते. ते आपसूकच होत गेले. माळावर आणि मनातही हिरवाईचे कोंब फुटू लागले. आता हाच उपक्रम आम्ही आमच्या शाळेतही राबवायचा ठरवला आहे.
-श्रीमती भारत किशनराव कांबळे (जि. प. प्रा. शाळा, बुधोडा, ता. औसा, जि. लातूर)
अनुभव कथन
-श्रीमती भारत किशनराव कांबळे (जि. प. प्रा. शाळा, बुधोडा, ता. औसा, जि. लातूर)