मूल्यवर्धन- एक पाऊल परिपक्वतेकडे
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे, हा मूल्यवर्धनचा जो उद्देश आहे, तो नक्कीच शालेय स्तरावरील उपक्रमांमधून साध्य होत असल्याचे दिसत आहे.
‘लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असते’ असे आपण म्हणतो. कुंभार जसा चिखलापासून मातीचा गोळा तयार करतो व चाकावर ठेवून त्याला पाहिजे तसा आकार देतो, त्याप्रमाणे शिक्षकसुद्धा कुंभाराची भूमिका पार पाडत असतात. लहान मुलांची आकलन क्षमता खूप असते. ते ज्या गोष्टींचे आकलन करतात, त्या सर्व गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवल्या जातात. त्याचे परिणाम त्यांच्या वागणुकीतूनही स्पष्ट होतात. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्री. शांतिलाल मुथ्था यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मूल्यवर्धनचे बीज रोवले आहे. या बीजामुळे संपूर्ण देशात शैक्षणिक क्रांती होईल असा विश्वास आहे. महाराष्ट्र सरकारने हा कार्यक्रम स्वीकारला असून, जिल्हा परिषद शाळांमध्ये याची प्रभावी अंमलबजावणी चालू आहे.
शाळेमध्ये आपण अध्यापन करत असताना किंवा मैदानावर मुलांचे खेळ घेत असताना अनेक मूल्यांची नकळत शिकवण आपण मुलांना देत असतो. इयत्ता पहिली ते चौथीच्या उपक्रम पुस्तिकेचा जर आपण विचार केला, तर सुरुवातीला ठिपके जोडून चित्र तयार करण्यापासून ते पशू, पक्षी, प्राणी, घरातील नियम, सहकार्याची भावना, ताणाचे व्यवस्थापन, प्रामाणिकपणा, आदर, अनादर, रिकाम्या वेळेचा सदुपयोग इत्यादी अनेक उपक्रमांमधून मूल्यांचा विकास होत आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून वयोगटाला गरजेनुरूप उपक्रमांचा समावेश केला आहे. भाषा, गणित यांसारख्या विषयांचे अध्ययन करत असताना विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटू नये, यासाठी उपक्रम पुस्तिकांचा वापर आपण करू शकतो. कारण त्यातील उपक्रम हे मनोरंजनात्मक आहेत, त्याचबरोबर ते प्रेरणादायीसुद्धा आहेत.
राज्यघटनेतील मूल्ये शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत आणि हेच विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक व्हावेत हा उद्देश नक्कीच सफल होणार असे वाटते.
-नितीन गाडे
मूल्यवर्धन- एक पाऊल परिपक्वतेकडे
-नितीन गाडे
मूल्यवर्धन : मानवता संवर्धन (कविता)
शिक्षणाचा संस्काराशी मेळ असल्याशिवाय ते अर्थपूर्ण होणार नाही. भारताला संस्कृतीचा अमूल्य वारसा लाभला आहे, परंतु काळाच्या ओघात प्रगतीच्या नावाखाली नैतिकतेचा ऱ्हास होत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमातून ही उणीव खात्रीशीर भरून काढता येणार आहे. घटनात्मक मूल्यांशी संगती साधून गाणी, गोष्टी, उपक्रम यांतून हसतखेळत शिक्षण देण्याचा मूल्यवर्धन हा अजोड प्रयोग आहे. तेच खालील कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मानवता संवर्धन (कविता)
करावया मानवता संवर्धन
मार्ग सर्वोत्तम ‘मूल्यवर्धन’
स्वहितासवे साध्य विश्वहीत
ज्ञानास नीती मूल्याचे कोंदण
नैतिकतेची कमाल मोडतोड
शिक्षणास नाही संस्काराची जोड
मूल्याधिष्ठीत झालेय ज्ञानदान
मूल्याशी होतेय भद्र तडजोड
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता
घटनामूल्ये यातून रूजता
संस्काराचा अजोड ठसा
समृद्धीने नटवितो भारता
कृती उपक्रमात सहयोगी खेळ
हसतखेळत संस्काराशी मेळ
शरीर मन नि बुद्धीचा विकास
ज्ञानदानातून घडे सेवा निर्भेळ
बहुत झाले शिकून शिकवून
आता त्याजसवे जगूया
सर्वोत्तम जीवनानंदासाठी
मूल्यवर्धन चराचरी रूजवूया
-श्री. सोमनाथ मधुकर पाटील
मूल्यवर्धन : मानवता संवर्धन (कविता)
-श्री. सोमनाथ मधुकर पाटील
स्वयंशिस्त
इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलांमध्ये मध्यान्ह भोजन घेताना स्वयंशिस्त लावण्याकरिता उपक्रम राबविला.
सदर वर्गातील मुलांमध्ये मध्यान्ह भोजन करताना शिस्तीचे प्रमाण कमी होते. याकरिता मुलांकडून काही नियम बनवून घेतले व ते नियमितपणे राबविले. विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल दिसून येत आहेत.
-गौरीशंकर नारायणे
स्वयंशिस्त
-गौरीशंकर नारायणे
मूल्यवर्धन प्रेरक म्हणून अनुभव
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा शाळेतील अनुभव, साधने, प्रेरक जबाबदारी, वर्ग उपक्रम, शिक्षकांना संदेश-
मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रेरक म्हणून अंमलबजावणी करताना अनेक चांगले अनुभव आले. विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजविण्यासाठी याचा निश्चित उपयोग झाला. विद्यार्थी आपल्या क्षमता ओळखू लागले. आपण समाजात वावरत असताना कशा पद्धतीने आपली कृती असली पाहिजे, याची समज आपोआप त्यांना व्हायला लागली. नातेसंबंध जपताना, कुटुंबात वागताना कसे रहावे याचे ज्ञान मुलांना व्हायला लागले. फक्त वर्गच नव्हे तर मैदानातही तासिका असल्याने त्यांना आनंद होऊ लागला. आपण कसे वागावे याचे नियम विद्यार्थ्यांनी स्वत:च बनविले. त्यामुळे शिस्त निर्माण झाली. जोडीचर्चा, सहयोगी खेळ, वर्तुळचर्चा यामुळे विद्यार्थी एकमेकांचे विचार समजून घेऊ लागले. इतरांच्या मताचा आदर करण्याची भावना वाढीस लागली. त्यातून त्यांच्या स्वभावातही बदल झाला. मूल्यवर्धन साहित्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक बदल घडविण्यास मदत झाली. यातून कोणतीच शंका मनात राहात नाही. उपक्रम कसा राबवावा, साध्य होणारी उद्दिष्टे याची माहिती समजली. शिक्षक-विद्यार्थी आंतरक्रिया तसेच दोघांमधील संवाद वाढीस लागले. या साधनाने विद्यार्थी व शिक्षक यांना एक प्रकारची दिशाच मिळाल्याचे दिसून आले.
खरेतर तालुकास्तरीय प्रेरक म्हणून प्रशिक्षण पूर्ण झाल्यामुळे एक नवा विषय आपण विद्यार्थ्यांना देतो, हा आनंद मनाला झाला. प्रथम दोन महिने स्वत:च्या शाळेत याची अंमलबजावणी केली. त्याचे अनुभव केंद्रस्तरावर प्रशिक्षण देण्याच्या कामी आले. यातून कृतियुक्त, आनंददायी शिक्षण देण्याची व शिकण्याची प्रेरणा मिळाली. एखादे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे रुजविले जाईल, याची कल्पना अनुभवातून आली. इतर शिक्षकांनी त्यांचा वापर कसा करावा याचीही माहिती प्रेरक या नात्याने त्यांना देऊ शकलो. वर्गामध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविताना प्रथम वर्गनियम बनविले. त्यानंतर शांतता संकेताचा वापर कसा करायचा, हे समजावून सांगितले. जेव्हा मी तास घ्यायला लागलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की यात काहीतरी नवीन शिकण्यास नक्कीच मिळेल. विद्यार्थ्यांनाही आपण काहीतरी नवीन शिकतोय याची अनुभूती आली. या सर्व कारणांणी मी हा कार्यक्रम अगदी यशस्वीरितीने पूर्ण करु शकलो, याचा मनस्वी आनंद वाटला. महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधवांना मी एवढेच सांगू इच्छितो की, मूल्यवर्धन हा कार्यक्रम आपल्या इतर विषयासारखाच असून आपला तो अविभाज्य घटक आहे असे त्याकडे बघा. तो कसा यशस्वी होईल असे बघा. असे केल्यास, मला खात्री आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक मूल सुसंस्कृत नागरिक म्हणून उदयास येऊन हे राष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकांना विनंती आहे की, विद्यार्थ्यांमध्ये तर निश्चितच बदल होईल, त्याबरोबर आपल्यातही सकारात्मक भावना निर्माण होण्यास मदत होईल. यासाठी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी यात मनापासून योगदान द्यावे ही विनंती. शेवटी मी धन्यवाद देऊ इच्छितो की, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने या कार्यक्रमाची निर्मिती करुन आम्हा शिक्षकांना एक चांगला नागरिक घडविण्यास प्रोत्साहित केले. असेच नवनवीन उपक्रम राबविले तर नवभारत निर्मीतीसाठी आम्ही नक्कीच आपल्या सोबत असू अशी खात्री सर्वांच्या वतीने देतो.
-श्री प्रतापसिंह नाशिकराव मोहिते
मूल्यवर्धन प्रेरक म्हणून अनुभव
-श्री प्रतापसिंह नाशिकराव मोहिते
विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारचा बदल
शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांमधील सकारात्मक बदल होय.
आमची मनपा मुलांची शाळा क्र.29 सोलापूर आहे. माझ्याकडे गेल्यावर्षी इयत्ता चौथीचा वर्ग होता. मूल्यवर्धन उपक्रम गेल्यावर्षी सुरू झाला. त्यातील उपक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांना चांगले वागणे, बोलण्याचे धडे मिळाले. तसेच व्यावहार ज्ञानही मिळाले. विद्यार्थी मूल्यवर्धन तासिकेची वाट पाहत असतात. सर्व उपक्रम शाळेत करतात, तसेच घरी जाऊनही पालकांना योग्य ते मार्गदर्शन करतात. यामुळे पालकांना मूल्यांची जाणीव होते. त्यामुळे हा कार्यक्रम निश्चितच समाजभिमुक आहे यात शंकाच नाही. महत्त्वाचे म्हणजे मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाल्यापासून विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाणपण वाढले आहे. ‘हसा, खेळा, पण शिस्त पाळा’ हा सुविचार आपण मुलांना सांगतो. मुलांचा तोंडपाठही असतो. मात्र हसणे, खेळणे त्यासोबत महत्त्वाचे शिस्तपालन याचेही शिक्षण मूल्यवर्धन कार्यक्रमात आहे. त्यामुळे मूल्यवर्धन कार्यक्रमाचा अधिक वापर होणे गरजेचे आहे. मूल्यवर्धनबाबत मला असे सुचवायचे आहे की, यासाठी शासनाने अधिकृतपणे वेळापत्रकामध्ये तासिकेची सोय करावी, जेणेकरून त्या तासिका वापरता येतील व चांगल्याप्रकारे मूल्यांचा विकास करता येईल.
-गणेश धनवटे
विद्यार्थ्यांमध्ये सर्व प्रकारचा बदल
-गणेश धनवटे
मूल्य रुजवणूक
आज मूल्य ही काळाची गरज आहे. ती लहानापासून रुजवणे गरजेचे आहे. मूल्ये ही आपल्या वर्तनातून दिसून येतात. आपले वर्तन कसे आहे यावरून आपली मूल्ये समजून येतात. मूल्य म्हणजे एक प्रकारे आपली संस्कृतीच होय. मूल्यवरून आपली संस्कृती दिसून येते.
आपली भूमी ही संतांची भूमी आहे. आपली संस्कृतीही जगात आदर्श आहे. ती सगळी आपल्या मूल्यांवर टिकून आहे. मूल्ये ही शिकवायची नसतात, तर ती रुजवली जातात. या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये मूल्ये रुजवण्यास खूप मदत झाली. शाळेत स्वयंशिस्त या उपक्रमांमुळे लागली. मुले व शिक्षक यात बराच बदल झाला. मूल्ये आपणांस माहीत असतात, पण आपण कोठेतरी आपण काळाच्या ओघात दुर्लक्ष करतो. त्यामुळे अशा कार्यक्रमामुळे आपण परत मूल्यांकडे वळतो. म्हणजेच आपणास यामुळे आपल्या संस्कृतीची ओळख होते. हे फक्त मूल्यांसाठीच नाही तर यामुळे मुलांना आपली संस्कृतीची जाणीव होत आहे. मुले स्वतः सर्व नियम पाळत आहेत. शाळेतील वातवरण एकदम शिस्तप्रिय झाले आहे.
-दयानंद सपाटे
मूल्य रुजवणूक
-दयानंद सपाटे
असे झाले परिवर्तन..
अशी शाळा, असे विद्यार्थी..
आताच्या आधुनिक युगात ज्ञानाची मोठ्याप्रमाणात भर पडत आहे. त्या प्रमाणात मूल्यांची भर मात्र पडताना मुळीच दिसत नाही. याची उणीव जाणवणारी संख्याही खूप कमी आहे. एकूणच चंद्रावर राहायला चाललेला माणूस, पण माणूसपण हरवत चाललाय, असं म्हणायला हरकत नाही. किल्लारी भूकंपातील असंख्य मुलांना मदतीचा हात देऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे या सर्व गोष्टी बोलायला सोप्या वाटतात, पण हे ज्यांनी करून दाखवलं त्यांनीच ओळखलं की, माणसात माणूसपण टिकविण्यासाठी गरज आहे ती मूल्य रुजविण्याची. हे फार मोठं काम मुथ्था फाउंडेशन करत असताना, आमचाही खारीचा वाटा आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.
पालकांचे अनुभव : बाबा तुम्ही जेवायला बसलात हात धुतले ना? बाहेरून आलात, फ्रेश झालात का? अहो, बाबा, पाहुण्यांना तुम्ही नमस्कारपण नाही केलात. कशाला भांडता, त्यांचं म्हणणं समजून तरी घ्या. आपलं वागणं कुणालाही त्रासदायक नसावं. या आणि अशा अनेक वाक्यांचा पालकांना चांगलाच अनुभव आला. या सर्व गोष्टी स्वतः पालकांनी पालकसभेत सांगितल्या. एक शिक्षक या नात्याने मुलांमध्ये झालेला बदलही प्रकर्षाने जाणवला. दैनंदिन जीवनात कशाप्रकारे वर्तन असावे येथपासून ते समोरच्याशी कसे बोलावे या सर्व बाबतीत बदल दिसून आला.
आता मुलं खोटं बोलत नाहीत. आपली चूक कबूल करतात. मदतीची भावना असते. हे सर्व बदल पाहून शिक्षकांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य येते. याचे सर्व श्रेय अर्थातच ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रमाला जाते.
-सागर पाटील
असे झाले परिवर्तन..
-सागर पाटील
स्वयंशिस्त
इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलांमध्ये मध्यान्ह भोजन घेताना स्वयंशिस्त लावण्याकरिता उपक्रम राबविला.
सदर वर्गातील मुलांमध्ये मध्यान्ह भोजन करताना शिस्तीचे प्रमाण कमी होते. याकरिता मुलांकडून काही नियम बनवून घेतले व ते नियमितपणे राबविले. विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल दिसून येत आहेत.
-गौरीशंकर नारायणे
स्वयंशिस्त
-गौरीशंकर नारायणे
संस्कारक्षम वर्ग, संस्कारक्षम विद्यार्थी
मूल्यवर्धन अंतर्गत वर्षभरात जे उपक्रम राबविले, त्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल जाणवला. विद्यार्थ्यांच्या वागणुकीत लक्षणीय बदल जाणवला.
सन 2018-19 वर्षांपासून मूल्यवर्धन कार्यक्रमास सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. वर्षभर वर्गामध्ये, विद्यार्थ्यांमध्ये संस्कारक्षम उपक्रम कसे घेण्यात यावेत, या संदर्भात उत्तम पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात सांगितल्याप्रमाणे वर्षभर मूल्यवर्धनाचे उपक्रम वर्गस्तरावर राबविण्यात आले. उपक्रम राबविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तिका देण्यात आली. पुस्तिकेतील आशय, मांडणी अतिशय रंजक व अवधान केंद्रित करणारी आहे. विद्यार्थ्यांना पुस्तिकेतील उपक्रम अतिशय आवडले. मूल्यवर्धन तासिकेला विद्यार्थी आवडीने सहभागी होत होते. उपक्रमांतून शिकवलेली मूल्ये हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये रुजत होते. मुले लहान व मोठ्यांशी आदराने वागू लागली. योग्य-अयोग्य गोष्टीमध्ये मुले स्वतःहूनच फरक समजू लागली. चांगल्या गोष्टी आत्मसात करू लागली. अपेक्षित मूल्ये हळूहळू मुलांमध्ये रुजू लागली. मुलांमध्ये झालेले बदल पालकांनाही जाणवू लागले. पालकही मुलांमध्ये झालेले बदल सांगू लागले. मुलांमधील बदलाविषयी सांगताना पालकांच्या चेहरीवरील आनंद पाहण्यासारखा होता. पालक सांगू लागले की, मुले घरामध्ये कशा पद्धतीने वागत होती आणि आता कशी वागत आहेत. दैनंदिन अध्यापनात मूलशिक्षण अतिशय रंजकतेने शिकायला मिळत असल्याने दैनंदिन उपस्थितीही वाढण्यास मदत झाली. मुले दररोज शाळेत येऊ लागली. मुलांप्रमाणेच शिक्षकही मूल्यवर्धन तासिकेला रस घेत होते. आशयाची मांडणी अतिशय व्यवस्थितपणे केलेली असल्याने उपक्रमांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास मदत झाली. विद्यार्थी घरातच नाही, तर शाळेतदेखील मोठ्या मुलांना ताई व दादा म्हणून बोलावू लागले. मूल्ये व्यवस्थित रुजल्याने इतर विषयांतील अभिरुचीदेखील वाढण्यास मदत झाली. मुले इतर विषयांचा अभ्यासदेखील आवडीने करू लागली. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल अनुभवण्यास मिळाले.
-रियाज नदाफ
संस्कारक्षम वर्ग, संस्कारक्षम विद्यार्थी
-रियाज नदाफ
रुजली मूल्ये, वाढली मुले
विद्यार्थ्यांमध्ये वक्तशीरपणा, सर्वधर्म समभाव, सेवाभावीवृत्ती इत्यादी मूल्ये रुजली.
आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व मोठेपणी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी उत्तम नागरिक बनण्यासाठी या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा खूप उपयोग झाला. इयत्ता पाहिली पासूनच न्याय, समता, स्वतंत्र, बंधुता, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना इत्यादी भारतीय संविधानातील मूल्ये मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बाल वयातच रुजल्यामुळे भारताचे सशक्त नागरिक होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे मुलांच्या भावविश्वालाच हात घालणारा हा कार्यक्रम आहे. शिक्षणातील नवीन उपक्रमांमुळे विद्यार्थांमध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला. यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्येही एक वेगळ्याच आनंदाची अनुभूती होत आहे. शांतता संकेताचा उपयोग केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रित होऊ लागले. या मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौध्दिक, शारीरिक, भावनिक विकास वाढण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे कलाकौशल्य, चित्रे काढणे, गाणे म्हणणे, अभिनय करणे, खेळणे इत्यादी गोष्टी शिकण्यास मदत झाली. या कार्यक्रमामुळे ज्ञानरचनावादावर आधारित बालस्नेही, विद्यार्थीकेंद्री, आनंददायी शिक्षण होण्यास मदत झाली. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शालेय अभ्यासक्रमाशी निगडित विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यास मदत झाली. या कार्यक्रमामुळे ‘समग्र शाळा दृष्टिकोन’ अंगिकरून मूल्ये रुजू लागली. त्याचप्रमाणे विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनतील. त्यांच्यामध्ये संविधानातील मूल्ये व त्या संबंधित कौशल्ये विकसित करण्याची संधी देण्यात आली आहे. या कार्यक्रमामुळे सुशिक्षित नागरिकांबरोबरच सुसंस्कृत नागरिक घडविण्यास मदत होत आहे. मूल्ये शिकविली जात नाही, तर ती नियोजित उपक्रमांतून आनंददायी पद्धतीने रुजविली जातात. उदा. आमच्या शाळेतील विद्यार्थी कृष्णा हा अतिशय खोडकर मुलगा होता. त्याचे शाळेत वेळेवर न येणे व शालेय नियमांचे न पालन करणे, सतत विद्यार्थ्यांशी भांडणे, जोरजोरात ओरडणे, अर्वाच्च्य शिवीगाळ करणे इत्यादी अवगुण होते. या उपक्रमामुळे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल घडून शिस्त प्रिय, अभ्यासू, नियमितपणा, स्वच्छ येणे, शांतपणे अभ्यास करणे, इतरांना मदत करणे इत्यादी चांगली मूल्ये रुजली. त्यामुळे पालकांचा शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये ‘रुजली मूल्ये व वाढली मुले’ असे म्हणावे वाटते.
-विजयालक्ष्मी हिमगीरे
रुजली मूल्ये, वाढली मुले
-विजयालक्ष्मी हिमगीरे
मूल्यवर्धन आणि वर्तनबदल
आज आपल्याला पैशाने श्रीमंत असलेली अनेक लोक भेटतील, पण मूल्याने श्रीमंत खूप कमी. कमी म्हणजे बोटावर मोजण्याइतके म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण नेहमी सोशल मिडियामध्ये अपघाताचे वृत्त, फोटो बघतो. त्यांना मदत करणारे हात खूप कमी असतात. याला कारण म्हणजे दिवसेंदिवस मूल्यांचा होत जाणारा –हास. यासारखी अनेक उदाहरणे देता येतील. हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून मुथ्था फाऊंडेशन तर्फे राबविला गेलेला हा कार्यक्रम मुलांमध्ये मूल्यवर्धन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो यात तिळमात्र शंका नाही.
शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रम खरोखर स्तुतीस पात्र आहे. मी सदर कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेतले व आमच्या शाळेतील इतर शिक्षकांनाही दिले. त्यानंतरच माझ्या शाळेत सदर कार्यक्रम राबवण्यात आला. त्यासाठी इयत्ता पाहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकेही उपलब्ध झाली. हा उपक्रम आम्ही आठवड्यातून तीन दिवस, शेवटच्या तासिकेत घेतला. मूल्यवर्धन पुस्तिकेत मुलांसाठी थोर विचारवंत, व्यक्ती, शास्त्रज्ञ यांच्या गोष्टी, खेळ, कृती, कृतियुक्त गाणी, यासोबतच अभ्याससुध्दा आहे. शिवाय शिक्षक पुस्तिकेत अध्यापन कसे करावे, खेळ कसे घ्यावे याचे योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे शिकविणे खूप सोपे व सोयिस्कर झाले. माझ्या शाळेतील मुलांना याचा खूप फायदा झाला किंवा त्यांनी करून घेतला असे म्हणता येईल. मूल्यवर्धनच्या कृती, खेळ, गाणी यामुळे मुलांमध्ये न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता इ. मूल्ये चांगल्याप्रकारे रुजली असे मला वाटते. कारण यामुळेच विद्यार्थी स्वतःचे मत निर्भिडपणे मांडू शकतात. खरं-खोटं यातील फरक जाणतात. एकमेकांशी प्रेमाने वागतात, बोलतात. हे सर्व फलित मूल्यवर्धन कार्यक्रमाचे आहे, असे मला वाटते.
-उमेश युवनाती
मूल्यवर्धन आणि वर्तनबदल
-उमेश युवनाती
विद्यार्थ्यांच्या वर्तनात झाला सकारात्मक बदल
विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल झाला.
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अमुलाग्र बदल घडून आला. आधी एकमेकांशी भांडण, मारामारी, इतर मुलांना चिडविणे, चेष्टा करणे, शिवीगाळ करणे इत्यादी गोष्टी वर्गात सर्रासपणे घडत होत्या. मूल्यवर्धन पुस्तकातील उपक्रम वर्गात राबविल्याने मुलांना स्वतःची जाणीव झाली. इतरांना मान दिला तर आपल्याला मान मिळतो, या गोष्टी हळूहळू समजू लागल्या. वरील गोष्टींना आपोआपच आळा बसला. आता मुले इतर विद्यार्थ्यांशी आदराने बोलत आहेत. शिक्षक वर्गात नसतील तरीही मुले स्वयंशिस्तीने अभ्यास करतात. मिळून मिसळून राहतात. थोडक्यात हा कार्यक्रम अतिशय परिणामकारक असून मला व माझ्या वर्गातील सर्व मुलांना खूपखूप फायदा झाला.
-एम.डी. अझर पंजेवाले
विद्यार्थ्यांच्या वर्तनात झाला सकारात्मक बदल
-एम.डी. अझर पंजेवाले
मूल्यवर्धन ही संस्काराची शिदोरी
संस्काराशिवाय केलेले शिक्षण म्हणजे आत्मा नसलेले शरीर, संस्काराशिवाय असणारे शिक्षण म्हणजे मूर्तीशिवाय असणारे मंदिर. हे संस्कार करण्याची जबाबदारी येते ती शिक्षकांवर. सध्याच्या काळात प्रत्येकजण संगणक युगात सोशल मिडियात गुंतून राहिलेला आहे. कोणालाही एकमेकांशी संवाद नको आहे. या अशा व्यस्त काळात व्यक्तीला पैसा या पलीकडे दुसरे काहीच दिसत नाही. लहानापासून मोठ्यापर्यंत नीतिमूल्य संस्कार, एकमेकांना मदत करणे यासारख्या गोष्टी समाजामधून नाहीशा होऊ पाहत आहेत. त्यामुळे चांगल्या सवयी, चांगले संस्कार, नीतिमूल्ये, न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य मूल्यवर्धनच्या माध्यमातून रुजवू शकतो.
विद्यावाचस्पती यांच्या मते ‘शिकणे, शिक्षण घेणे ही प्रक्रिया आनंददायी असावी.’ कधीकाळी ती तशीच होती. त्यामुळे पाल्यांच्या सुप्तगुणांना वाव देत त्याला आकार दिला जात होता. आज मात्र प्रचलित शिक्षण व्यवस्थेत ‘सब घोडे बारा टक्के’ या न्यायाने वर्गातील वेगवेगळ्या मानसिक, बौद्धिक स्तरातील विद्यार्थ्यांना एकाच पद्धतीने शिकवले जाते .एक प्रकारची स्पर्धा चालू आहे. गुणपत्रिका हे त्यांचे अंतिम लक्ष्य असते. जास्तीत जास्त गुण मिळविणारा विद्यार्थी आपला पाल्य असावा, अशी पालकांची इच्छा असते. त्यासाठी ते पाल्याला स्पर्धेत धावायला लावतात. सुजाण नागरिक बनवणे पालक-शिक्षक-विद्यार्थी या तिघांच्या समन्वयातून, सकारात्मक कृतीतून शिक्षण आनंददायी होऊ शकते. हे आनंददायी शिक्षण देण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य शासन व मुथ्था फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन या कार्यक्रमातून करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रत्येक गोष्ट मुलांनी कृतियुक्त, गटागटात, तणावरहित, सहकार्याची भावना जोपासून करावयाची असते. तसेच जी मुले पुढे येण्यास घाबरतात, ती मुलेसुद्धा चांगल्यारितीने संवाद साधतात. मुलांमध्ये संभाषण होते. मुलांनी प्रत्येक काम कृतियुक्त केल्यामुळे चिरकाल स्मरणात राहते. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये पर्यावरणाविषयी आवड निर्माण झाली आहे. असाच एक माझ्या वर्गातील अनुभव मी या ठिकाणी शेअर करते.
स्नेहल नावाची एक मुलगी होती. दररोज स्वतः डबा, पाणी बॉटल शाळेत घेऊन यायची. शाळा सुटल्यानंतर बॉटलमधील पाणी टाकून द्यायची. मला वाटले पाणी कुठे टाकते आहे ते पाहावे. मी पाहिले तर ती वर्गासमोर असणाऱ्या एका कुंडीतील रोपासाठी पाणी ओतत होती. एवढ्यावरच ती थांबले नाही. तिने वर्गातील इतर सर्व मुलामुलींना त्यांच्या बॉटलमधील शिल्लक पाणी झाडांना ओतण्यासाठी सांगितले. मी हे दुरून पाहत होते. त्यावेळेस माझ्या मनात येऊन गेले की, मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये इतका बदल होत आहे. मुलांना झाडांमुळे होणारे फायदे, महत्त्व समजू लागले होते.
मूल्यवर्धनमधील एक घटक वर्गनियम हे स्वतः मुलांनी तयार केलेले होते. वर्गातील मुलांमध्ये कमालीची शिस्त वाढली आहे. तसेच वर्गातील प्रत्येक मूल वर्गात असलेला कचरा उचलून कचरापेटी टाकते. शाळेत वेळेवर, स्वच्छ, नीटनेटके येते. मूल्यवर्धनमुळे मुलांना एकमेकांच्या कुटुंबाविषयी माहिती होऊ लागली. आपापसात आपुलकीची भावना वाढीस लागली. मुलांमध्ये लहान-मोठ्यांविषयी आदराची भावना निर्माण झाली. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकच नव्हे तर शाळेत असणाऱ्या शिपायांना, इतर मुलांनासुद्धा ते आदराने हाक मारतात. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे भावनिक, बौद्धिक, मानसिक विकास होण्यास खूप मदत झाली आहे. हा चांगला कार्यक्रम असून अभ्यासक्रमात कायमचा राहावा असे मला वाटते.
-संध्या वीर
मूल्यवर्धन ही संस्काराची शिदोरी
-संध्या वीर
कळी उमलली
न्याय, समता, बंधुता, स्वातंत्रय ही मूल्ये बालमनावर रूजवून बालकांचा आंतरिक व बाह्य विकास करता येतो. बालकांतील सुप्त गुणांना वाव मिळतो. बालक आपले मत मांडू शकतात. ते उपक्रमांतून लाजाळूपणा विसरून स्वत:ला कसे सिद्ध करतात. मी अनूभवलेल्या या घटनेतून हे पाहा. (इयत्ता चौथी)
माझ्या वर्गातील विद्यार्थी चि. अरबाज खुर्शीद तांबोळी हा खूपच अबोल, शांत व लाजाळू. अभ्यासात मात्र तो खूपच हुशार. मराठीचे वाचन अस्खलितपणे करणारा मुलगा. दिलेली उदाहरणे अचूक व पटपट सोडविणारा हा विद्यार्थी आतून मात्र दबला गेलेला मी पाहिला. कितीही प्रयत्न केले तरी व्यर्थ ठरत चालले होते. दररोज तो घरातून शाळेकडे निघताना बोटे मोजत, पुटपुटत यायचा. तो बोटे मोजत भांडी घासणे, झाडू मारणे, फरश्या पुसणे यांची यादी पाठ करायचा. वर्गातही तो सदा तणावतच दिसायचा. पालकांना बोलावून घेऊन त्याबाबत विचारले असता, त्याच्या आईने सांगितले की, मी दररोज सकाळीच 9.00 वाजता कामाला जाते व सायंकाळी 7.00 वाजता परत येते. त्यामुळे घरातील निम्मी कामे त्यालाच करावी लागतीत. कधीकधी तर तो रात्रीसुद्धा झोपेत कामाच्या बाबतीतच बडबडतो. काही होत नाही हो, असे सांगून पालक निघून गेले. याचवेळी मूल्यवर्धन उपक्रम राबविण्यास सुरूवात झाली. मंदिरात जागा मोठी असल्याने मी तिथे मूल्यवर्धनचे तास घेत असे. त्यावेळी त्याला मी विचारले की, तू प्रत्येक गोष्टीला का घाबरतोस? तणावात का ऱाहतोस? तो रडू लागला व म्हणाला, “मी घरी ही सगळी कामे करतो हे माझ्या वर्गातील मित्रांना कळले तर ते मला चिडवतील म्हणून मी नेहमी तणावात असतो, घाबरत असतो.” मूल्यवर्धनच्या साहाय्याने त्याची भीती घालवून, लाजाळूपणा दूर करून, त्याचे सुप्तगुण प्रकट करण्यास मी सुरुवात केली. मूल्यवर्धनमधील ताणतणावाचे समायोजन, कामाचे वेळापत्रक, माझेकुटुंब, शेजारी मित्र, माझ्यातील गुण चांगल्या गुणांभोवती गोल करा, यशाचे रहस्य यांसारख्या अनेक उपक्रमांतून त्याला समजले की, कोणत्याही कामाचा तणाव घेऊ नये. कामाचे वेळापत्रक बनवावे. सर्वांशी बोललेच पाहिजे. मित्रांजवळ मन हलके करावे, कोणतेही काम करताना लाजू नये. आता तोच अरबाज तांबोळी सर्वांशी बोलतो आहे. खेळतो आहे. बिलकूल तणावात दिसत नाही. पालकही म्हणत आहेत की, तो आता रात्री बडबडत नाही. हे सर्व शक्य झाले ते फक्त मूल्यवर्धनमुळेच.
-दुर्गादेवी सिधाम
कळी उमलली
-दुर्गादेवी सिधाम
शिक्षण आणि मूल्यवर्धन
विद्यार्थी वर्तनात बदल झाले.
माझ्या वर्गात मूल्यवर्धन उपक्रम राबविताना अनेक अनुभव आले. मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शांतता संकेत, शिस्तबद्धता ही मूल्ये रुजविली गेली. या वर्गनियमांमुळे संपूर्ण वर्गाला शिस्त लागली. यामुळे महत्त्वपूर्ण बाबी मुलांमध्ये प्रसन्नपणे व शांत वातावरणात सांगितल्या जाऊ लागल्या. मूल्यवर्धन माझ्या वर्गासाठी खूप उपयोगी ठरले.
-अमीरुन्निसा नाडेघर
शिक्षण आणि मूल्यवर्धन
-अमीरुन्निसा नाडेघर
मी आणि मूल्यवर्धन
संस्काराशिवाय केलेले शिक्षण म्हणजे आत्मा नसलेले शरीर, मूर्ती नसलेले मंदीर होय. संस्कार पेरण्याची जबाबदारी येते ती शिक्षकांवरच. लहानपणीच मुलांमध्ये संस्कार रूजले पाहिजेत. यासाठी मूल्यवर्धनची गरज आहे.
पूर्वीची शिक्षण पद्धती ही घोकंपट्टीवर आधारीत होती, परंतु आता आनंददायी पद्धतीचा वापर शिक्षण पद्धतीत होत आहे. म्हणजेच हसतखेळत शिक्षण दिले जाते. यामध्ये मुलांच्या आवडीला वाव दिला जातो. मुलांना कृतीतून शिक्षण दिले जाते. मूल्यवर्धनमध्ये मुलांनी प्रत्येक गोष्ट कृतीमधून व गटात करायची आहे. यामुळे मुलांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते. मुलांना कृती करायला फार आवडते. कृती केल्यामुळे ती त्यांच्या स्मरणात राहते. मूल्यवर्धनमुळे मुले समोर येऊन बोलू लागतात. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्व गुणाला वाव मिळतो. नियमाचे पालन करण्याची प्रेरणा मुलांना मिळते. कोणती गोष्ट योग्य व कोणती गोष्ट अयोग्य याची समज येते. स्वच्छतेच्या सवयीची माहिती चित्रांतून मिळते. खेळाचे महत्त्व समजते. वडीलधाऱ्या माणसांचा आदर करायला लागतात. मुलांना श्रमाचे महत्त्व कळते. प्राणीमात्रांवर दया करावी हे मूल्य त्यांच्यामध्ये रूजवले जाते. मुले न घाबरता वेगवेगळ्या गोष्टी समोर येऊन सांगतात. त्यांचे तात्पर्यही सांगतात. त्यामुळे सभाधीटपणा वाढतो. अशाप्रकारे मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये चांगल्या गोष्टीची रूजवणूक होते असे मला वाटते. म्हणून मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका मुलांसाठी महत्त्वाची ठरते.
-ज्योती साळुंखे
मी आणि मूल्यवर्धन
-ज्योती साळुंखे
शिक्षण आणि मूल्यवर्धन
विद्यार्थी वर्तनात बदल झाले.
शालेय शिक्षण घेण्याची फक्त गरजेचेच नाही तर मुलांमध्ये मूल्ये रुजविणे आवश्यक आहे. ही संकल्पना मूल्यवर्धनमार्फत पूर्ण होते. इयत्ता पहिलीपासून मुलांमध्ये मूल होण्याचा हा उत्तम मार्ग आहे. जीवन जगण्याची कला मूल्यवर्धनमुळे पूर्ण होते. आमच्या वर्गात मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला. खेळामार्फत मुलांच्या बुद्धीला चालना मिळाली. त्यामुळे मुलांना वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यांची उत्तरे विद्यार्थी देतात. त्यामध्ये पूर्ण वर्गाचा सहभाग मिळतो.
-अमीरुन्निसा नाडेघर
शिक्षण आणि मूल्यवर्धन
-अमीरुन्निसा नाडेघर
मूल्यवर्धन व नैतिक मूल्ये
प्रत्येक व्यक्ती ही संस्काराने व विचाराने मोठी होणे गरजेचे असते. पूर्वीच्याकाळी घरात आजी-आजोबा यांच्याकडून अनेक थोरामोठ्यांच्या गोष्टी कळत असत. त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होत असत. परंतु सध्याच्या काळात आई, वडील नोकरीसाठी बाहेर जात असल्यामुळे तसेच मोठ्या व्यक्तींचा सहवास नसल्यामुळे मुलांवर संस्कार होत नाहीत. म्हणून मूल्यवर्धनची गरज आहे. मूल्यवर्धनमधून मुलांमध्ये आदराने वागणे, सहकार्य करणे, खरे बोलणे अशा अनेक गुणांची जोपासना होते.
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची जाणीव, आपल्यामधील क्षमता, स्वतःच्या जबाबदाऱ्या कळू लागल्या. आपले कुटुंब, मित्र, नातेसंबंध इत्यादी गोष्टींबद्दल जवळीक निर्माण झाली. माझे वर्गमित्र या उपक्रमांतर्गत ही मुले घरी एकत्र बसून अभ्यास करायला लागली. त्यामुळे आपापसात स्पर्धा न राहता एकमेकांना मदत करायला लागली. माझे मत या उपक्रमामध्ये मुले स्वतःचे मत विचारपूर्वक स्वतंत्रपणे मांडू लागली. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी वर्ग मंत्रिमंडळ निवडीसाठी लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पाडली. खूपच पारदर्शक निवडणुकीचा अनुभव स्वतः विद्यार्थ्यांना आला. त्यामुळे योग्य जागेवर योग्य विद्यार्थ्यांला निवडून दिले. मूल्यवर्धनच्या अशा अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. मूल्यवर्धनमधील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, आज्ञाधारकपणा इत्यादी गुण वाढीस लागले आहेत. प्रत्येक मूल स्वच्छ, नीटनेटकेपणाने शाळेत वेळेवर येऊ लागले. या उपक्रमांमुळे मुलांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रुजवण्यास फार मोलाचे योगदान मिळाले. सहयोगी खेळांतून मुलांमध्ये सहकार्यवृत्ती आणि आपुलकी वाढली आहे. गटागटांमध्ये कृती करताना विद्यार्थी आनंदी आणि तणावमुक्त दिसतात. मूल्यवर्धनातून मुलांना वर्गनियम, चांगल्या सवयी, सुरक्षिततेचे नियम, आपली कर्तव्ये इत्यादी गोष्टींची माहिती मिळाली आहे. अशाप्रकारे मूल्यवर्धन उपक्रमातून आमच्या शाळेतील मुलांच्या जीवनाला एक नवी कलाटणी मिळत असून आम्ही आमच्या शाळेतील मुलांमध्ये मूल्यांचे रोपण चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत.
-अश्विनी जवळगे
मूल्यवर्धन व नैतिक मूल्ये
-अश्विनी जवळगे
मूल्यवधर्न आणि मुले
मूल्यवर्धन हा एक खूप चांगला कार्यक्रम आहे . यामुऴे खूप चांगले बदल मुलांच्या वर्तनात घडले आहेत.
हा एक खूप चांगला कार्यक्रम आहे. यामुळे मुलामध्ये स्वत:चे मत मांडण्याचे कौशल्य निर्माण झाले. स्वत:ला शांत ठेवणे, स्वत:च्या आवडी-निवडी व्यक्त करणे, एखादे काम करताना आधी नियोजन करणे, स्वत:ची बलस्थाने ओळखणे या बाबी आत्मसात झाल्या. विद्यार्थी स्वत: गोष्ट सांगू लागले. स्वत: चित्रे काढूऩ रंगवू लागले. घरातून शाळेत आणलेला वस्तूची काऴजी चांगली घेऊ लागले. शाळेतील सोई-सुविधांचा चांगला वापर करू लागले. शाळेतील, वर्गातील, मैदानावरील नियमांचे पालन करू लागले. हात धुणे, दात घासणे या आरोग्यदायी सवयी पाऴू लागले. धोकादायक परिस्थिती कशी टाळवी याची माहिती घेऊ लागले. विविध सद्गगुण त्याच्यात निर्माण झाले. मुलांचे खरे बोलण्याचे प्रमाण वाढले. शाळेतील व घरातील कर्तव्याची जाणीव त्यांना झाली. समवयस्कांशी भांडण मिटविण्यासाठी योग्य मार्ग ते निवडू लागले. इतरांच्या भावना ओळखून सर्वांचा आदर ते करू लागले. पाणी काटकसरीने वापरू लागले. झाडांचे महत्त्व ओळखू लागले. अशा प्रकारे म.न.पा. सेमी इंग्लिश स्कूल, विडीघरकूल, सोलापूर शाळेत मूल्यर्वधन उपक्रमांमुऴे छान बदल घडले.
-मीनाक्षी गुळवे
मूल्यवधर्न आणि मुले
-मीनाक्षी गुळवे
शिक्षण आणि मूल्यवर्धन
विद्यार्थी वर्तनात बदल झाले.
मूल्यवर्धन प्रशिक्षण झाल्यानंतर जेव्हा आम्ही आमच्या वर्गात मूल्य रुजविण्याचे उपक्रम घेऊ लागलो तेव्हा उपस्थिती वाढू लागली. जोडीचर्चा, गटचर्चा यामुळे अबोल विद्यार्थी बोलू लागले. या कार्यक्रमासाठी ज्या पुस्तिका मिळाल्या आहेत, त्या खूप छान आहेत. पुस्तिकांमध्ये दिलेली चित्रे खूप प्रभावी व आकर्षक आहेत. त्यामुळे मुलांमध्ये उत्साह निर्माण होतो. विद्यार्थ्यांत हे सर्व बदल मूल्यवर्धन उपक्रममुळे झाले.
-शगुफ्ता प्रवीण प्यारे
शिक्षण आणि मूल्यवर्धन
-शगुफ्ता प्रवीण प्यारे
शिक्षण आणि मूल्यवर्धन
विद्यार्थी वर्तनात बदल
माझ्या वर्गात मूल्यवर्धन उपक्रम राबविताना अनेक अनुभव आले. शांतता संकेत, वर्गनियंत्रण राहते. आपल्या महत्त्वपूर्ण बाबी प्रसन्न शांत वातावरणात सांगितल्या जातात. वर्गनियमांमुळे संपूर्ण वर्गाला शिस्त लागली. सहयोगी खेळांमुळे संघभावना, नेतृत्व, सहकार्य या गुणांची जोपासना झाली.
-शफिक अहमद खान
शिक्षण आणि मूल्यवर्धन
-शफिक अहमद खान
मै और मूल्यवर्धन
विद्यार्थी और मूल्यवर्धन
मूल्यवर्धन से स्कूल के पत में इजाफा हुआ. मूल्यवर्धन विद्यार्थीओ के गुणवत्ता में इजाफा हुआ. विद्यार्थीओ के बर्ताव में तब्दिली हुई. मूल्यवर्धन से उसूल की तब्दिली, टाईम की पाबंदी आयी. पालक में भी जागरुकता हुई. अच्छी आदत पैदा हुई. विद्यार्थी में हस्तेखेलते शिक्षण देना असान हुआ.
-शफिक शेख
मै और मूल्यवर्धन
-शफिक शेख
संस्कार काळाची गरज
“मना घडवी संस्कार” खरंच या काव्यपंक्ती किती छान आहेत. जर आपल्याला मनाला घडवायचे असेल तर, त्याला संस्कारच पाहिजेत. पूर्वीच्याकाळी आपल्याला वेगळे असे संस्कार करावे लागत नव्हते. एकत्र कुटुंबपद्धती होती. घरात आजी-आजोबा, काका-काकू, ताई-दादा व आत्या असे सर्वजण चालतेबोलते संस्काराचे माहेरघर असायचे. मुलांवर आजी-आजोबा गोष्टींच्या माध्यमातून संस्कार करायचे, पण काळ बदलला. एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालली आहे. याच वेळी आपल्याला खरी गरज लागते ती मूल्यांची, त्याच्या रुजवणूकीची. हेच काम शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या मूल्यवर्धन या उपक्रमांतून साध्य झाल्याचे दिसते.
मूल्यवर्धन उपक्रमांची मांडणी अतिशय छान आहे. याची पाच विभागात विभागणी केली आहे. पहिला विभाग म्हणजे ‘स्व’ची ओळख करून देणारा आहे. मी आणि माझ्या क्षमता. यामुळे मुलांमध्ये स्वतःविषयीची ओळख व त्यांना त्यांच्या क्षमता समजण्यास मदत होते. मुलांचा आत्मविश्वास वाढतो. दुसऱ्या विभागात माझ्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत याची जाणीव निर्माण होते. तिसऱ्या विभागात माझे नातेसंबंध यांची माहिती होते. मी व माझे जग याची ओळख करून देणारा चौथा विभाग आहे. सर्वात शेवटी सहयोगी खेळ यातून विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. एकमेकांना मदत करणे या गोष्टी वाढीस लागतात. या सर्वांच्या माध्यमातून आपण मुलांवर संस्कारच तर करत असतो. माझ्या वर्गाच्या बाबतीत मुलांमध्ये एकमेकांना मदत करणे ही गोष्ट वाढीस लागण्याचे मला दिसून आले. उदाहरणार्थ, एखाद्या मुलाकडे लिहिण्यासाठी पेन्सिल नसेल तर वर्गातील जेवढ्या मुलांकडे अधिकची पेन्सिली असतील ते सर्वजण त्याला द्यायला उत्साहाने तयार होतात. मला वाटते हीच तर मूल्यांची रुजवणूक आहे. तसेच एखाद्या मुलाने डबा आणला नसेल तर सर्वजण मिळून आपल्या डब्यातील खाऊ वाटून खातात. घरी जाताना आपल्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाणी शिल्लक असेल तर वर्गासमोरील कुंडीतील झाडांना घालतात. पाणी जपून वापरतात. स्वच्छतेचेही महत्त्व मुलांना पटू लागले आहे. विद्यार्थी वैयक्तिक स्वच्छ राहतातच, पण त्याचबरोबर विद्यार्थी आपला वर्ग, शाळा, शाळेचा परिसरही स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. वर्गातील कचरा कचऱ्याच्या डब्यातच टाकतात. मला वाटते, एकमेकांना मदत करणे, पाण्याचा वापर जपून करणे, स्वच्छतेचे महत्त्व समजणे या सर्व गोष्टी मूल्यवर्धन उपक्रमांतून शिकवल्या जातात. यातून संस्कार केले होतात. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मूळ उद्देश हाच आहे असे मला वाटते.
मूल्यवर्धन उपक्रमाचा तास असला की मुले अगदी उत्साही असतात. त्यांना मॅडम काहीतरी नवीन नवीन गोष्टी सांगणार आहेत याची उत्सुकता असते. मुलांना उपक्रम खूप आवडतात. यातच याचे श्रेय आहे असे मला वाटते.
-रंजना गायकवाड
संस्कार काळाची गरज
-रंजना गायकवाड
शिक्षण आणि मूल्यवर्धन
विद्यार्थी वर्तनात बदल झाले.
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदारी, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावे म्हणून घटनेतील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी मुलांना संधी देणे हा उद्देश ठेवून मूल्ये मुलांमध्ये रुजविणे गरजेचे आहे. पहिली ते चौथीमधील विद्यार्थ्यांना शिक्षक उपक्रम पुस्तके विद्यार्थी उपक्रम पुस्तकांमधून आनंदमय वातावरणात मूल्यवर्धन आधारे ज्ञान, संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर झाले. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे आमच्या शाळेत अनेक अनुभव आले. शांतता संकेत, वर्गनियंत्रण, गटकार्य प्रसन्न व आनंदमय वातावरणात होऊ लागले. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये सहयोगी भावना, नेतृत्त्व, सहकार्य या गुणांची जोपासना झाली. विद्यार्थी बोलू लागले. निर्णयक्षमता वाढली. स्वतःचे मत मांडण्याचे प्रयत्न करू लागले. माझ्या शाळेसाठी मूल्यवर्धन हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरला.
-अमीरुन्निसा नाडेघर
शिक्षण आणि मूल्यवर्धन
-अमीरुन्निसा नाडेघर
बरताव में तब्दीली
रोजाना विद्यार्थी स्कूल आते है.
पहले हमारे स्कूल के बच्चे स्कूल रोज नही आते थे. उनका स्कूल से लगाव कम था. आपस में हमेशा झगडे करते थे. लेकिन जब से मूल्यवर्धन की ट्रेनिंग हुयी उस के बाद जो उपक्रम हम स्कूल में ले रहे है उसकी वजह से हमारे बच्चे अब रोजाना स्कूल आ रहे है और अब वो ज्यादा आपस में झगडा भी नही करते.
-रेहाना पठाण
बरताव में तब्दीली
-रेहाना पठाण
मूल्य रुजवणूक
आज मूल्य ही काळाची गरज आहे. ती लहानापासून रुजवणे गरजेचे आहे. मूल्ये ही आपल्या वर्तनातून दिसून येतात. आपले वर्तन कसे आहे यावरून आपली मूल्ये समजून येतात. मूल्य म्हणजे एक प्रकारे आपली संस्कृतीच होय. मूल्यवरून आपली संस्कृती दिसून येते.
आपली भूमी ही संतांची भूमी आहे. आपली संस्कृतीही जगात आदर्श आहे. ती सगळी आपल्या मूल्यांवर टिकून आहे. मूल्ये ही शिकवायची नसतात, तर ती रुजवली जातात. या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये मूल्ये रुजवण्यास खूप मदत झाली. शाळेत स्वयंशिस्त या उपक्रमांमुळे लागली. मुले व शिक्षक यात बराच बदल झाला. मूल्ये आपणांस माहीत असतात, पण आपण कोठेतरी आपण काळाच्या ओघात दुर्लक्ष करतो. त्यामुळे अशा कार्यक्रमामुळे आपण परत मूल्यांकडे वळतो. म्हणजेच आपणास यामुळे आपल्या संस्कृतीची ओळख होते. हे फक्त मूल्यांसाठीच नाही तर यामुळे मुलांना आपली संस्कृतीची जाणीव होत आहे. मुले स्वतः सर्व नियम पाळत आहेत. शाळेतील वातवरण एकदम शिस्तप्रिय झाले आहे.
-दयानंद सपाटे
मूल्य रुजवणूक
-दयानंद सपाटे
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांच्या वर्तनात झाला बदल!
मी माझ्या वर्गात मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला. त्यामुळे मुलांच्या वर्तनात सुधारणा दिसून आली.
मी माझ्या वर्गात मूल्यवर्धन कार्यक्रम नियमितपणे राबवला. त्यामुळे मुलांच्या वर्तनात हळूहळू बदल दिसून आला. पूर्वी मुले एकमेकांना शिव्या देत असत. एकमेकांशी उद्धटपणे बोलत. मोठयांचा आदर करत नसत. मुलांच्या या वर्तनात सुधारणा दिसून आली. मुले एकमेकांशी आदराने वागू लागली. मोठयांचा आदर करू लागली. वर्गाचे नियम स्वतः तयार करु लागली. एवढेच नाही तर त्या नियमांचे पालनही करु लागली. मूल्यवर्धन अभ्यासक्रमात विविध उपक्रम व छान गोष्टी असल्याने मुलांना त्यात गोडी वाटू लागली.
-राहुल नवले
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांच्या वर्तनात झाला बदल!
-राहुल नवले
मी आणि मूल्यवर्धन
मी श्रीमती चंदाराणी दामोदर खूने लऊळ येथे शिक्षिका आहे. मी ज्यावेळी मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतले, त्यावेळी प्रशिक्षणामध्ये वेगळेपणा जाणवला. मूल्यवर्धनमध्ये त्या-त्या वयाच्या मुलांचा विचार करून सहज, सोपे, चित्रांतून, खेळांतून, गाण्यांतून, गोष्टींतून मुलांना विचार करायला भाग पाडले. चांगले काय? वाईट काय? यासारख्या इतर अनेक गोष्टी मुलांना समजू लागल्या, वर्गनियम, शाळेचे नियम बनविल्याने शिक्षकांवरील ताण कमी झाला. मुले कमी श्रमात मूल्ये समजू लागली आणि तशी वागू लागली. मी इयत्ता दुसरीमध्ये गेल्यावर्षी मूल्यवर्धनचे सर्व उपक्रम घेतले. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले की, जी मुलं शाळेत बोलायला घाबरत होती, ती मोकळेपणाने बोलू लागली. कोणत्याही विषयावर प्रश्न विचारू लागली. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले अंतर कमी झाले. मी शिक्षक न राहता विद्यार्थी झाले आणि विद्यार्थी शिक्षक बनले. मुलांना स्वयंशिस्त लागली. समाजामध्ये कसे वागावे याचे ज्ञान मुलांना मिळाले. पाठ्यपुस्तक शिकवताना मूल्ये असतात, परंतु मूल्यवर्धन पुस्तिकेमध्ये आवर्जून मूल्ये विचारात घेतली आहेत. त्यामुळे मुलांकडे वैयक्तिक मूल्ये कोणती आहेत? कोणती वाढवावी लागतील? हे समजून त्याप्रमाणे कृतीमधून त्यांना शिकवणे सोपे जाते.
सर्वच वर्गांच्या विद्यार्थी उपक्रम पुस्तिका अतिशय आकर्षक असून विद्यार्थी उपक्रम पुस्तिका मुले आनंदाने व मनापासून सोडवितात. दररोज हा तास घेण्यात यावा अशी मागणी करतात. मलासुद्धा हा विषय शिकवायला अतिशय आवडतो. मी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे आभार मानते, की त्यांनी आजच्या युगाचा विचार करून हे पुस्तक बनवले.
मूल्य रुजवणे ही काळाची गरज आहे. जर बालपणीच ही मूल्ये मुलांमध्ये रुजली तर भविष्यामध्ये अनेक गैरप्रकार थांबतील अशी मला खात्री आहे. माझी सर्व शिक्षक बांधवांना अशी विनंती आहे की, पाठ्यपुस्तकातील एखादा घटक शिकवायचा राहिला, तर तो मुलगा इतरांकडून शिकेल. मूल्यवर्धन तासिका प्रत्येकाने घ्यायला हवीच आहे. भारतीय संस्कृतीचे जतन होण्यासाठी, टिकण्यासाठी, मुलांवर संस्कार होण्यासाठी मूल्यवर्धन ही काळाची गरज आहे.
गेल्यावर्षी मी इयत्ता दुसरीच्या वर्गाला शिकवित होते. त्यावेळी माझ्या वर्गामधील शाहिस्ता राजू बागवान ही मुलगी शाळेत यायला घाबरत होती. जेव्हा मी मूल्यवर्धन प्रशिक्षण घेऊन वर्गात उपक्रम घेण्यास सुरुवात केली, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की तिला हा तास खूप आवडत आहे. ती या तासाला अतिशय आनंदाने, मन लावून बोलत आहे. प्रत्येक गोष्टीत भाग घेत आहे. त्या दिवसापासून ती दररोज शाळेत येऊ लागली. अभ्यासही करू लागली. तिच्या मनात शाळेबद्दल गोडी निर्माण झाली.
दुसरी गोष्ट म्हणजे ‘माझे मत’ या उपक्रमातर्गत मी मुलांचे मतदान घेतले. विषय होता मूल्यवर्धन तास आवडतो का? सर्वच मुलांनी आवडतो यासाठी मतदान केले आणि दररोज तास घ्यावा अशी मागणी केली. उपक्रम पुस्तिकेमध्ये जे उपक्रम राबवले आहेत ते अतिशय सुंदर आणि विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देणारे आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडणारे प्रश्न असल्याने मुले वर्गात चर्चा करतात आणि प्रत्येक गोष्टीवर आपले मत व्यक्त करतात. मला असं वाटतं की अध्ययन निष्पत्ती विद्यार्थ्यांमध्ये जर रुजवायची असेल तर मूल्यवर्धन तास घ्यावाच लागेल. हे माझं वैयक्तिक मत आहे, कारण मी माझा अनुभव सांगत आहे. ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष उपक्रम घेतो, त्याच वेळेस आपणाला मूल्यवर्धनचे महत्त्व लक्षात येते. रिकाम्या वेळेतील उपक्रम मुलांना अतिशय आवडतात. त्यामुळे मुले चित्र काढू लागली. विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेमध्ये वेगवेगळे व्यवसाय, कृती, कागदकाम, गाणी, चित्रकला हे विषय असल्याने मुलांना हसतखेळत होतात व मूल्ये रुजविली जातात.
माझ्या वर्गात ओम राजे नलावडे हा विद्यार्थी अतिशय खोडकर व चंचल होता. तो घरी खूपच त्रास देत असतो, असे पालकांनी सांगितले. मूल्यवर्धन तासिका वर्गात घेतल्यानंतर त्या मुलाला विचार करायची सवय लागली. चांगले काय, वाईट काय याबद्दल तो सांगू लागला. त्याचे वागणे बदलले हे पालकांनी सांगितले. अनेक पालकांनी मुलांना स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लागल्या असे सांगितले. मी पुन्हा एकदा शांतिलाल मुथ्था यांचे मनापासून आभार मानते, कारण हा विषय योग्य वेळेस त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिला आणि तो मुलांच्या दृष्टिकोनातून किती महत्त्वाचा आहे हे समजून तो प्रत्येक इयत्तेला लागू केला.
प्रत्येक मूल हे भावी पिढीचे प्रतिनिधी आहे. त्यामुळे त्यांच्यात संस्कार होण्यासाठी मूल्यवर्धन अत्यंत महत्त्वाचा व आवश्यक कार्यक्रम आहे असे मला वाटते.
-चंदाराणी खुने
मी आणि मूल्यवर्धन
-चंदाराणी खुने
मूल्यवर्धन
मूल्यवर्धन पुस्तिका.
मूल्यवर्धन हा छान कार्यक्रम आहे. मूल्यांच्या आधारे वर्गस्तरावर मूल्यांची रुजवणूक छान प्रकारे होते. विद्यार्थ्यांना सर्व माहिती व्यवस्थित समजते. वेगवेगळे उपक्रम घेताना मुळे लक्ष्यपूर्वक ऐकतात आणि आत्मसात करून घेतात.
माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना उपक्रम खूप छान समजले आहेत. मुळे लक्ष्यपूर्वक व आनंदाने माहिती समजून घेतात.
– धनाजी माणिक जाधव
मूल्यवर्धन
– धनाजी माणिक जाधव
संस्कारक्षम विद्यार्थी
आजच्या युगामध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे खरेच काळाची गरज बनली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मूल्यवर्धनचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याबरोबर विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. प्राथमिक स्तरावर भाषा शिकणे व शिकवणे यासंबंधीचे महत्त्व सांगितले आहे. मूल्यवर्धन पुस्तकाचा वापर करून विद्यार्थी सहजपणे, कल्पकतेने, प्रभावीपणे आणि व्यवस्थितपणे लेखन करू शकतील. श्रवण, भाषण, संभाषण, वाचन, लेखन या प्रक्रियांमध्ये विद्यार्थींची प्रगती करण्यासाठी मूल्यवर्धन खूप उपयुक्त ठरेल. विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कौशल्यांची मोठ्या प्रमाणात असमानता दिसून येते. ही असमानता दूर करण्यासाठी मूलभूत शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी मूल्यवर्धन पुस्तक उपयुक्त ठरू शकते. सदर पुस्तकाच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविता येणे शक्य आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण, व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे आवश्यक आहे.
-अप्पासाहेब कांबळे
संस्कारक्षम विद्यार्थी
-अप्पासाहेब कांबळे
मूल्यवर्धनमुळे बदल
आजच्या या संगणकाच्या युगामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप वाढले आहे. प्रत्येक कुटुंबाला शिक्षणाचे महत्त्व समजले आहे. शिक्षणामुळे लोक साक्षर झाले, पण मुलांमध्ये जे संस्कार झाले पाहिजे ते शिक्षणाद्वारे होत नाहीत. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये बरेच असे बदल दिसून आले.
मूल्यवर्धनमध्ये मुलांना गोष्टींद्वारे, विविध उपक्रमांद्वारे आपण त्यांच्यामध्ये बरेच असे बदल करू शकतो. असे बदल झाले पण आहेत. उदा.
१. स्वच्छता: मुलांनी वैयक्तिक स्वच्छतेबरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यासाठी आपण आपल्या बाकाखाली पडलेला कचरा स्वच्छ केला पाहिजे. वर्ग स्वच्छ करावा आणि कचरा कचरापेटीतच टाकावा याची जाणीव झाली.
२. सहकार्यवृत्ती : यासाठी एकमेकांना मदत करावी. उदा.पेन, पेन्सील, रबर
३. बोधकथा : बोधकथेद्वारे एकमेकांना मदत करावी, दुसऱ्याची मदत सतत घेऊ नये याची जाणीव झाली.
४. आदरभाव : आपल्यापेक्षा मोठ्या माणसांशी नम्रतेने बोलावे, वागावे याची जाणीव झाली.
५. श्रमप्रतिष्ठा : हे मूल्य मुलांमध्ये रुजविण्यासाठी परिसरातील पडलेला कचरा काढला. आपला परिसर स्वच्छ ठेवला. झाडांना पाणी घालणे, स्वच्छ हात धुणे, जेवण झाल्यानंतर परिसर स्वच्छ करणे या बाबी दिसून आल्या.
छोट्याछोट्या गोष्टी आपल्या जीवनात महत्त्वाच्या आहेत. ते विद्यार्थ्यांना सांगणे फार गरजेचे आहे. ही शिस्त जर मुलांमध्ये रुजविली तर मुले संस्कारक्षम होतील. हे त्यांच्या भविष्यासाठी फार उपयोगी होईल. असा नागरिक समाजाला फार उपयोगी आहे. आपल्या देशात तंटे, जातीयवाद, उच्च-नीच, भाषावाद होणार नाही. मूल्यवर्धनमुळे खूप चांगले मुलांमध्ये झाले आहेत. मुलांसाठी फार उपयोगी उपक्रम आहेत.
-मुमताज नायकवडी
मूल्यवर्धनमुळे बदल
-मुमताज नायकवडी
मी आणि मूल्यवर्धन
शालेय विद्यार्थी चांगले नागरिक, जबाबदार व संवेदनशील बनण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाला निगडित असा हा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या कृतीला व विचारशक्तीला वाव मिळाला.
भारत सर्वतोपरी अतिशय सुंदर देश आहे. भारतासारख्या सुसंकृत देशातसुद्धा जेव्हा आजच्या पिढीचा विचार करावा तेव्हा खूप वेळा असं भासायच की, येणाऱ्या काळात मुलांना इतर क्लासेसबरोबर मूल्यसंस्कारांचे क्लास लावावे लागतील. ज्या गोष्टी आपसूक, अनुभवातून सहृदयतेने स्वतःहुन करायच्या ना, त्या गोष्टी आवर्जून, अट्टाहासाने आणि कदाचित रट्टा मारून करून घ्याव्या लागतील. जेव्हा मला मूल्यवर्धनच्या ट्रेनिंगमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली, तेव्हा ही पोकळी अक्षरशः भरून काढता येईल, तेही मी स्वतः करू शकेन याची जाणीव झाली. एक शिक्षिका म्हणून ‘मी आहे उद्याच्या भारताची शिल्पकार’ असे म्हणून घ्यायला जो किंचितसा परंतु होता, तो नक्कीच गळून गेला.
मूल्यवर्धन हा कार्यक्रम इतका छान आखला आहे की, अगदी छोट्याछोट्या गोष्टींतून, उपक्रमांतून मुलांच्या विचारांना योग्य ती दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमांतून बऱ्याच वेळा इतक्या छान व अनपेक्षित कल्पना आणि उत्तरे येतात की कदाचित मोठ्या व्यक्तीसुद्धा इतका सुंदर विचार करू शकणार नाही इतका छान विचार ही पहिली, दुसरीची मुले करतात. ते पाहून शिक्षकांना जे समाधान मिळतं ना, त्याचे वर्णन शब्दांत करणे तर केवळ अशक्यच. या उपक्रमांचे खूप छान वैशिष्ट्य म्हणजे, “मूल्ये शिकविली जात नाहीत तर ती रुजविली जातात.” शाळेत पाण्याचा नळ चालू आहे. पाणी वाया जातंय, हे येणारी-जाणारी मुलं पाहतात. थोडसं पुढं जातात आणि मग परत मागे येऊन नळ बंद करतात. याचाच अर्थ मला तरी असा वाटतो की, मूल्ये रुजविली गेली कारण मुलाने पुढे जाताना पाहिले, विचार केला आणि मग योग्य कृती केली. म्हणजेच Not well trained but well educated. होय ना !
माझा एक अनुभव सर्वांशी शेअर करते. कारण यासाठी मी खूप प्रभावित झाले, ते माझ्या विद्यार्थ्यांकडून. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेत एक छोटी गोष्ट आहे. तिघे मित्र चोरी करायला जातात. तिघेही सहभागी होतात, पण कमी अधिक प्रमाणात. मग सर्वप्रथम आणि सर्वाधिक शिक्षेस पात्र कोण? हा प्रश्न मुलांना विचारला. मुलांनी इतकी छान कल्पना व छान उत्तर मुलांकडून मिळाला की, तेव्हा मला खरंच मूल्यवर्धन उपक्रमाचे सार्थक झाले असे वाटले. So thanks to Maharashtra government and of course honorable Shantilal Mutta sir.
-श्रीम. प्रतिभा कालिदास लगदिवे
मी आणि मूल्यवर्धन
-श्रीम. प्रतिभा कालिदास लगदिवे
मूल्यवर्धनमुळे मूल्यांची जोपासना
मूल्यवर्धनमुळे मूल्यांची जोपासना होते.
सर्व प्रथम मी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनची आभारी आहे. त्यांनी काळाची गरज जाणून मूल्यवर्धन शिक्षणाची संधी प्राप्त करुन दिली. मूल्यवर्धनमुळे आमच्या शाळेतील मुलांमध्ये चांगले बदल झाले. मुले आपल्या घरीसुध्दा या मूल्यांची जोपासना करीत आहेत अशी पालकांनी ग्वाही दिली आहे. शाळेतदेखील ते एकमेकांशी न भांडता मिळूनमिसळून अभ्यास करीत आहेत. मोठ्यांचा आदर करण्याचीवृत्ती त्यांच्यात वाढलेली आहे. त्यांच्या दिनचर्येमध्ये चांगले झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेकडे पाहण्याचा त्यांचा आणि पालकांचा दृष्टिकोन बदललेला आहे. अर्थात मूल्यवर्धन शिक्षणासाठी केलेल्या सर्व प्रयत्न यशस्वी होत आहे, असे म्हणण्यास काही हरकत नाही.
-उझ्मा जागीरदार
मूल्यवर्धनमुळे मूल्यांची जोपासना
-उझ्मा जागीरदार
मूल्यशिक्षण- काळाची गरज
शिक्षणाच्या शासन निर्धारित अभ्यासक्रम आणि नियोजन यांच्या चौकटीत काम करत असताना समाजिकतेचे भान ठेवून, समाज उन्नतीसाठी आणि विद्यार्थ्यांचा नैतिक विकास करून भारतीय संस्कृती जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने तयार केलेला कार्यक्रम म्हणजे मूल्यवर्धन होय.
मूल्य! तसं पाहिलं तर हा उच्चरण्यासाठी खूपच कमी वेळ लागतो, आणि त्याहीपेक्षा कमी वेळ त्याचा अर्थ लावण्यासाठी जातो. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन्ना’ या उक्तीप्रमाणे प्रत्येकजण वेगळा अर्थ लावतो. कोणी म्हणेल संस्कार म्हणजे मूल्य, तर कोणी चांगली वागणूक म्हणजे मूल्य, तर कोण म्हणेल सतप्रवृत्ती म्हणजे मूल्य, कोण काहीही म्हणलं तरी ते सत्य आहे कारण ‘मूल्य’ ही खूप व्यापक संकल्पना आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी जी संकल्पना आणली, त्यात मूल्यवर्धनचा सरळ सोपा अर्थ आहे. मूल्यांमध्ये वृद्धी करणे, ती जोपासणे आणि त्यांची रुजवणूक करणे. इतरांविषयी आस्था हे मूल्यवर्धनचे एक मूल्य आहे. ते बंधुता या लोकशाही मूल्याशी संबंधित आहे. या आस्थेच्या परिघात फक्त मानवी समाजच नाही तर संपूर्ण पर्यावरण आणि सजीव सृष्टीचा समावेश होतो. त्याचप्रमाणे चिकित्सक आणि सर्जनशील विचार हे मूल्यवर्धनचे एक महत्त्वाचे मूल्य आहे. ते मुलांना स्वातंत्र्य व न्याय या लोकशाही मूल्यांकडे घेऊन जाते. मूल्यवर्धनच्या उपक्रमातून मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्याची व ते व्यक्त करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मुले बोलकी होतात.
शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना मूल्यांच्या उपयोगितेची जाणीव करून देणे, त्यातून सुजाण नागरिक बनवणे हेसुद्धा शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमातून ते सहज साध्य होणार आहे. आज आपण वर्तमानपत्र उघडले की बातमी दिसते ती अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांची. खून, चोरी, बलात्कार, वाईट व्यसने या सर्वांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी झालेली दिसतात. ही मुले विकृतींना बळी पडताना दिसत आहेत. सामाजिक स्तरावर दिवसेंदिवस वाढत चाललेली अनैतिकता हा एक सामाजिक भूकंप आहे. त्याचे दुष्परिणाम भयानक असून शाळांमधून दिले जाणारे मूल्यशिक्षण हाच त्यावरील उपाय आहे. मूल्यशिक्षण ही मुख्यतः काळाची गरज आहे आणि अध्ययन-अध्यापनातून ते सहजपणे साध्य करता येईल. इयत्ता पाहिली ते बारावीपर्यंत आपण १० मूल्ये प्रातिनिधिक मानली असली तरी सदाचाराचे वळण लावण्याचा उद्देश लक्षात घेता मूल्यविचार मर्यादित राहू शकत नाही. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणकाच्या अति आहारी जाऊन समाजाची नैतिकता ढासळत चालली आहे. त्यासाठीच खरेतर मूल्यशिक्षणाची खऱ्या अर्थाने गरज आहे. प्रत्येक शिक्षक शाळेच्या आणि मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून मूल्यांची रुजवणूक करू शकेल, एवढीच आशा.
-ज्ञानेश्वर सुभाष घुगे
मूल्यशिक्षण- काळाची गरज
-ज्ञानेश्वर सुभाष घुगे
मुलांमधील स्वच्छता दिसून आली
गत वर्ष 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये आंबे याठिकाणी मूल्यवर्धन हा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला. त्यामुळे आमच्या शाळेमध्ये पुढील बदल घडून आले.
या कार्यक्रमामुळे मुले शिस्तीत वागू लागली. मुलांच्या अंगी स्वच्छतेचे नियम भिनले. ते स्वच्छपणे वागू लागले. त्याचप्रमाणे मोठ्या माणसांच्या आज्ञा पाळू लागले. शाळेत वेळेवर येऊ लागले. मूल्यवर्धन उपक्रम राबवत असताना आम्ही सुरुवातीला वर्गनियम बनविले. हे वर्गनियम बनविल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक शिस्त रुजून गेली. तसेच याचा फायदा आम्हांला वर्षभर झाला. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सकारात्मक शिस्त म्हणून आम्ही आजसुद्धा वेळोवेळी शांतता संकेताचा वापर करतो.
-अंकुश नामदे
मुलांमधील स्वच्छता दिसून आली
-अंकुश नामदे
सर्व
मूल्यवर्धन कार्यक्रम सन- 2018-19
मी श्री. विठ्ठल लक्ष्मण ढोणे (उपशिक्षक)या पदावर काम करत असताना सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये मूल्यवर्धन हा कार्यक्रम माझ्यासाठी नवीनच होता. माझ्या तालुक्यातून प्रत्येक केंद्रांतून दोन शिक्षकांची मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी निवड केली. त्यामध्ये माझे नाव होते.
प्रशिक्षण घेऊन जेव्हा मी शाळेत आलो, तेव्हा प्रथम मला माझ्यामध्येही बदल झाल्याचे जाणवले. मार्गदर्शक पुस्तकांनुसार सुरुवातीस वर्गनियमाचा तक्ता वर्गात लावला. हे सर्व नियम मुलांकडून बनवून घेतले.
मुले वर्गनियमांचे पालन करू लगली. त्यामुळे वर्गात शांतता राहू लागली. मूल्यवर्धन पुस्तिका मिळाल्यानंतर रिकाम्या वेळात मुले त्यातील चित्रे रंगवू लागली, गाणी गाऊ लागली, गोष्टी वाचू लागली. वेगवेगळ्या उपक्रमांच्या सरावामुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्तनबदल झाल्याचे दिसून आले. वर्गात तसेच घरीही शिस्त दिसू लागली. वेगवेगळ्या उपक्रमांतून मुले आनंद घेऊ लागली. सदर कार्यक्रम राबवित असताना मला तालुका समन्वयक श्री. सहदेव चव्हाण सर व बी. आर सी. विषयशिक्षक श्री. शरद पवार सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
– विठ्ठल लक्ष्मण ढोणे
सर्व
-विठ्ठल लक्ष्मण ढोणे
प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता
मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता मुलांमध्ये प्राप्त झाली. हे प्रशिक्षण सर्वांसाठी उपयुक्त आहे.
आमच्या शाळेच्या मैदानात पाणी पिण्यासाठी एक हापसा आहे. त्या हापश्यावर वस्तीवरील गावकरीही पाणी भरण्यासाठी येतात. एक दिवस हापश्याजवळ पन्नास रुपयांची एक नोट पडलेली दुसरीतील श्रेयाने पाहिली. तिने ती नोट माझ्याकडे आणून दिली. ती नोट शाळेतील कोणाचीच नाही हे समजले. त्यानंतर शाळेतील एका मुलाने ती नोट वस्तीवरील एका गृहस्थाची आहे हे सांगितले. ती नोट त्या गृहस्थाला देऊन टाकली. दुसऱ्या दिवशी परिपाठात श्रेयाला एक पेन बक्षीस म्हणून दिला आणि तिचं कौतुक केलं
-धावणे जयश्री हरिदास
प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता
-धावणे जयश्री हरिदास
मूल्यवर्धनमुळे मुले चांगले गुण जोपासू लागली .
शाळेतील सर्व विद्यार्थी त्यांच्या मोठेपणी जबाबदार नागरिक घडावेत व सर्व मूल्य जोपासना करण्यात पारंगत व्हावेत.
मूल्यवर्धनमुळे मुलांना उत्साही व आनंदी वातावरणाचा सहवास लाभला. त्याचप्रमाणे ह्या तासाला मुले लक्षपूर्वक अभ्यासाचा आनंद घेतात. योग्य-अयोग्य आणि कोणत्या गोष्टी चांगल्या व कोणत्या गोष्टी वाईट याविषयी एकमेकांना समजावतात. मुलांमध्ये आत्मविश्वास आणि कृती करण्यात खूप मजा वाटते. त्यामुळे चांगला दृष्टीकोन अंगीकारून मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आनंददायी पद्धतीने मूल्ये रुजविली जातात.
-मीना सन्मुख
मूल्यवर्धनमुळे मुले चांगले गुण जोपासू लागली
-मीना सन्मुख
मूल्यवर्धन उपक्रम आणि मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास व त्यांच्यात झालेले बदल नमूद करीत आहे.
मी जबीन बागवान. जि. प. उर्दू प्राथ. शाळा कारंबा, केंद्र- नानज, तालुका- उत्तर सोलापूर. माझ्याकडे इयत्ता पहिली व दुसरीचा वर्ग आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम मी गेल्या वर्षापासून माझ्या वर्गात राबवित आहे. हा कार्यक्रम राबवित असताना मला जाणवले की माझ्या या छोट्या विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल होत आहेत. चित्र रेखाटताना त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे. त्यांच्यात भावनिक बदल झाला आहे. ते एकमेकांना मदत करतात. आपल्या वस्तू, साहित्य वाटून घेतात. एकमेकांच्या गरजा पूर्ण करतात. वर्गाचे नियम पळताना जबाबदारीने वागतात. रंग भरताना स्वतः निर्णय घेतात. चांगले, वाईट हे त्यांना शिकवताही कळायला लागले आहे. खेळांतून माझ्या वर्गात एक सुंदर भारताचे जबाबदार, भावनिक नागरिक तयार होत आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमाद्वारे आपण आपल्या देशाला वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारे, भावनिक व मानसिक विकास झालेले, सर्वांगीण विकास झालेले नागरिक देऊ शकतो.
-जबीन बानू बागवान
मूल्यवर्धन उपक्रम आणि मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास
-जबीन बानू बागवान
विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
महाराष्ट्र शासन आणि मुथ्या फांउडेशन यांच्यावतीने मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या शाळेत सुरु असून चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये वर्तनबदल घडून आलेले दिसत आहेत. आठवड्यातून तीन दिवस मूल्यवर्धन तासिका घेतल्या जातात. उपक्रम पुस्तिकेच्या माध्यमातून विविध मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात आहेत. त्याचाच विद्यार्थ्यांमध्ये झालेला वर्तनबदल खालील घटनेवरून सांगू इच्छितो.
दरवर्षी आषाढी वारीनिमित्त वारकरी संप्रदायाच्या दिंडीबरोबर अनेक लोक पंढरपूरला जातात. तसे पाच जुलै दोन हजार एकोणीस रोजी मुक्ताबाईंच्या पालखीसोबत जळगाव, राहूरी, नगर येथील दिंडया मांगी येथे आल्या होत्या. प्रत्येक वारक-याची सोय गावातील प्रत्येक घरात केली जाते. मुक्काम शाळेत असतो. त्या दिवशी श्री. अंत्रे चंद्रकांत यादव मु. पो. सोनगाव, ता. राहुरी, जि. अहमदनगर हे वारकरी जिल्हा परिषद शाळेत त्यांच्या दिंडीची सोय होईल का या विचाराने विचारण्यासाठी आले होते. परंतु गर्दी पाहून परत माघारी जाताना शाळेच्या गेटजवळ त्यांची पैसे असलेली प्लास्टिकची पिशवी पडली. त्यांना समजले नाही. ते निघून गेले. इयत्ता तिसरीतील विद्यार्थी साहील आजिनाथ नरसाळे या विद्यार्थ्यांस ती सापडली. त्याला मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका श्रीम. सुवर्णा भागवतराव महामुनी यांनी वर्गात विद्यार्थ्यांवर रूजवलेली मूल्ये, अनुभव याचे साहिल नरसाळे याने अनुकरण केले आणि सापडलेली दीड हजार रुपये असलेली पिशवी शाळेतील शिक्षक श्री. हिरामण कौले यांचेकडे जमा केली. हा हा म्हणता वारकऱ्यांना बातमी समजली. तेवढ्यात वारकरी श्री. अंत्रे पैसे हुडकत होते, त्यांनी शाळेत येऊन चौकशी केली. श्री. कौले सरांनी खात्री केली आणि पैसे देऊन टाकले. घाईमध्ये अंत्रे निघून गेले. कारण वारी पहिलीच पुढे गेली होती. नंतर करकंब येथे दिंडी मुक्कामी गेली असता तेथे एका महिलेची चोरी झाली. चोर पळून गेला. जवळचे सर्व पैसे गेल्याने त्या महिलेला खूप त्रास सहन करावा लागला. शेवटी दया येऊन त्या महिलेला काही लोकांनी सहकार्य केले.
अंत्रे यांनी हा अनुभव पाहिला आणि माघारी गावी गेल्यानंतर त्यांनी विद्यार्थी साहिल नरसाळे, वर्गशिक्षिका महामुनी सुवर्णा, श्री. कौले हिरामण, इतर सर्व शिक्षक , मुख्याध्यापक संतोष पोतदार यांचे अभिनंदन केले. साहील नरसाळे याला दोनशे रुपये बक्षीस पोस्टाने पाठवले तसेच विद्यार्थ्यांवर चांगले चांगले संस्कार राबवित असल्यामुळे पांडूरंगाच्या रुपाने विद्यार्थ्याने पैसे परत केल्यामुळे माझी पंढरपूरची वारी आनंदात झाली. शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या. परिपाठाच्यावेळी साहिलच्या प्रामाणिकपणाचे बक्षीस श्री. कौले सरांचे हस्ते देऊन त्याचा सत्कार करण्यात आला व वर्गशिक्षिका सुवर्णा महामुनी यांचा श्रीम. वैशाली पवार व श्रीम. आशा देमुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. तात्यासाहेब बागल यांनीही अभिनंदन केले. अशाप्रकारे मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे व तालुका समन्वयक गाडेकर यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी वर्तनबदल घडून येण्यास मदत होत आहे .
-श्री संतोष पांडूरंग पोतदार
विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा.
-श्री संतोष पांडूरंग पोतदार
कळस यशस्वीतेचा.
समता, बंधुता, सहकार्य, जिद्द, चिकाटी अशा अनेक गुणांचा विकास साधणाऱ्या कथा, कविता, उपक्रम, खेळ राबविताना मला अनेक अविस्मरणीय अनुभव आले. ही सर्व मूल्ये विद्यार्थ्यांना हिऱ्यांप्रमाणे अष्टपैलू, चमकदार करतील आणि समाज व राष्ट्राच्या घडणीमध्ये, कोंदणामध्ये नक्कीच सर्वोच्च स्थान मिळवतील.
मूल्यवर्धन पुस्तकातील प्रत्येक उपक्रम राबवताना एक गोष्ट खात्रीने घडत होती ती म्हणजे विद्यार्थ्यांमधील सक्रियता आणि सकारात्मकता. एकेक सकारात्मक विचार विद्यार्थ्यांच्या मनात प्रवेश करताना नकारात्मक विचार बाहेर पडत होता. त्यामुळे जो विद्यार्थी पूर्वी जसा होता, तसा आता नाही. जो विद्यार्थी आता माझ्यासमोर आहे, तो फक्त आणि फक्त सकारात्मक विचार करणारा आणि सक्रियता अंगी असणाराच आहे. हेच या मूल्यवर्धन उपक्रमाचे फलित आहे. माझ्या विद्यार्थ्यांना हेही चांगले जाणवले आहे की, काहीतरी चांगले प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. संधीची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतः नवनवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. कारण वाट पाहणारे तेवढेच मिळवू शकतात जेवढे प्रयत्नशील व्यक्तीने सोडून दिलेले असते.
वेगवेगळ्या कथांमध्ये असणाऱ्या यशस्वी व्यक्तीरेखांचा अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना हे चांगलंच पटलं आहे की, महानता ही कोणतेही महान कार्य केल्यामुळे मिळत नाही तर कार्यातील सातत्याने मिळते. दररोजच्या मिळणाऱ्या छोट्याछोट्या यशामुळेच यशाचा डोंगर रचला जातो. असा डोंगर सहजतेने, सुंदरतेने कोणाच्याही नजरेस पडतो. म्हणजे विद्यार्थ्यांना हेही समजले की, आपण सक्रीयता ठेवली, जिद्द ठेवली आणि सकारात्मक पावले उचलली तर एक ना एक दिवस आपण तेथे पोहोचतोच, जेथे आपण जाण्यासाठी नेहमी प्रयत्न करत होतो. ‘मार्ग शोधा’ या उपक्रमातूनसुद्धा मुलांमध्ये विविध जीवन कौशल्यांची रुजवण होईल असं मार्गदर्शन करत गेले. ध्येय गाठण्यासाठी मार्ग शोधताना कितीही अडथळे आले तर जिद्द, चिकाटी, विचारपूर्वक अचूक निर्णयक्षमता या मूल्यांची रुजवण करणे सोपे होऊन गेले. ध्येय गाठताना अर्ध्या रस्त्यातून माघार घ्यायची नसते, कारण माघारी फिरतानासुद्धा अर्धा रस्ता पार करावाच लागतो. त्यापेक्षा पुढे चालत राहणे केव्हाही चांगले हे त्यांना आपोआपच उमगले. मूल्यवर्धन उपक्रम पुस्तकातील अशा छोट्याछोट्या उपक्रमांत सहभागी झाल्यामुळे भविष्यकाळात यशस्वीतेचा कळस गाठणे या पिढीला नक्कीच सोपं जाणार आहे, ही काळ्या दगडावरची रेघ.
-रुपाली बिडवे
कळस यशस्वीतेचा.
-रुपाली बिडवे
सामाजिक जबाबदारी
सामाजिक जबाबदारी हे मूल्य कसे आवश्यक आहे, त्यासाठी वर्तन कसे ठेवायला पाहिजे, त्याबदद्ल माझे अनुभव पुढीलप्रमाणे आहेत.
मनुष्य हा सामाजिक प्राणी असल्याने जीवन शांत व स्वस्थ जगण्यासाठी मुलांना सामाजिक जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हे कृतीतून शिकविले. मूल्यवर्धनमुळे मुले स्वतःची क्षमता ओळखू लागले. पर्यावरण वाचविणे ही सामाजिक जबाबदारी आहे. त्यासाठी विविध उपक्रमांद्वIरे झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश मुलांना दिला. त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व त्यांना कळून आले. सार्वजनिक स्वच्छता ही सामाजिक जबाबदारी मुलांना प्रत्यक्ष स्वच्छता मोहीम राबवून त्याचे महत्त्व सांगावे लागले. त्यामुळे मुलांना स्वच्छतेची सवय लागली. रस्त्यावर चालताना सामाजिक जबाबदारी काय? याचे प्रात्यक्षिक कृतियुक्त, खेळाद्वारे दिले. त्यामुळे वाहतुकीचे नियम मुलांच्या क्षात आले. या सर्व बाबी मुलांना मूल्यवर्धनमुळे समजल्या. .
– हरिदास जालिंदर अवचर
सामाजिक जबाबदारी
-हरिदास जालिंदर अवचर
स्वप्नातली शाळा
स्वप्नातली शाळा
सर्व प्रथम मी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची आभारी आहे, की त्यांनी मूल्यवर्धन वेगळ्या स्वरुपात सुरू केले. मूल्यवर्धनमुळे आमच्या शाळेत चांगले, नवीन बदल झाले. मुले मूल्यांची जोपासना करीत आहेत. शाळेत वेळेवर येत आहेत. सर्व विद्यार्थी परिपाठाला उपस्थित असतात. स्वच्छ गणवेश घालून शाळेत येत आहेत. विद्यार्थी स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष देत आहेत. आपली जबाबदारी चांगल्यारितीने पार पाडत आहेत. चांगल्या सवयी त्यांच्यात रूजल्या आहेत. समाजात मोठ्यांचा आदर, लहानांवर प्रेम करण्याची वृत्ती त्यांच्यात आली आहे. मूल्यवर्धन पुस्तकातील कविता आणि गोष्टी आवडीने वाचतात. ऐकलेल्या गोष्टी लक्षात घेऊन त्याप्रमाणे वागतात. एकूणच सांगायचे म्हटले तर मुलांमध्ये व शाळेत चांगले बदल घडवून आणल्याबद्दल मी मुथ्था फाउंडेशनचे परत एकदा आभार मानते.
-तस्लीमबानू शेख
स्वप्नातली शाळा
-तस्लीमबानू शेख
मूल्यवर्धन एक प्रेरणादायी कार्यक्रम .
शालेय शिक्षणातून माणसाच्या जीवनाला आकार यावा, अशी सार्थ अपेक्षा आहे. म्हणून शालेय शिक्षणाच्या क्षणाक्षणातून विद्यार्थ्यांत संस्कार होणे अभिप्रेत आहे. ज्याप्रमाणे इतिहासाच्या पानापानांतून राष्ट्रभक्तीचे संस्कार, भाषा विषयातून अभिव्यक्ती आणि गणितातून व्यवहारी वृत्तीचा संस्कार होतो, त्याप्रमाणे मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजावी, यासाठी शाळा प्रयत्न करीत असतात. विद्यार्थ्यांत घटनात्मक मूल्ये रुजावीत आणि देशाचे जबाबदार नागरिक व्हावेत हा मूल्यवर्धन कार्यक्रमाचा हेतू शालेय अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
शिक्षण आणि संस्कार दोन्हीही मानवी जीवनातील अत्यावश्यक गोष्टी आहेत. संस्कार जीवनाची पायाभरणी मजबूत करतात व शिक्षणामुळे मानवी जीवनाची उत्तुंग इमारत उभी राहणे शक्य होते. जीवनाची गाडी सार्थकतेच्या दिशेने जायची असेल, तर तिला शिक्षण आणि संस्कार या दोन्ही चाकांची गरज आहे. शिक्षण आणि संस्कार या दोन्हींची सांगड मूल्यवर्धन कार्यक्रमात दिसून येते. घटनात्मक मूल्यांचा विकास हे आपल्या अभ्यासक्रमाचे मूलभूत उद्दिष्ट आहे. याच मूल्यांचा विचार करून पुण्यातील शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मूल्यवर्धन कार्यक्रम विकसित केला आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी मान्यता दिली. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुप्तगुण आणि कला वास करीत असतात. या सुप्तगुणांना, त्यांच्या अंगी असणाऱ्या कलांना जर व्यासपीठ मिळवून दिले तर व्यक्तीचा व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो. शिक्षणाने व प्रशिक्षणाने हा विकास साध्य होतो, याचीच प्रचिती मला मूल्यवर्धन प्रेरक कार्यशाळेत आली. प्रेरक म्हणून प्रशिक्षण घेताना नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी, उपक्रमांविषयी माहिती मिळाली. प्रेरक म्हणून आनंदाने जबाबदारी स्वीकारली.
एखादी जबाबदारी स्वीकारली की मागे हटायचे नाही. स्वतः जवळच्या सर्व क्षमता वापरून खूप चांगल्या पद्धतीने केंद्रस्तरीय प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही प्रेरकांनी केला. केंद्रस्तरीय प्रशिक्षण ई -लर्निंगच्या माध्यमातून दिल्याने सर्व प्रशिक्षणार्थ्यांना हे प्रशिक्षण आनंददायी वाटले. मूल्यवर्धन प्रशिक्षणामध्ये विविध उपक्रमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकासास आवश्यक सर्व घटकांचा समावेश असल्याने प्रशिक्षणार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ज्याप्रमाणे अंधाऱ्या रात्री काजव्याने वाट दाखवावी, इंद्रधनुच्या सप्तरंगांनी सृष्टी बहरावी अशाच प्रकारे मूल्यवर्धन प्रशिक्षणातून नवनवीन उपक्रमांचा ज्ञानाचा मार्ग मिळाला, याचीच प्रचिती सर्वांना आली. मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेत जे उपक्रम दिले आहेत, त्या उपक्रमांमुळे मुलांची बोधात्मक आणि भाषिक कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमाशी पूरक उपक्रमांचा समावेश असल्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळेल. मूल्यवर्धन उपक्रम घेण्यासाठी सहयोगी अध्ययन पद्धतीचा वापर केल्याने विद्यार्थी विचार प्रवृत्त होऊन त्यांच्यामध्ये जीवनकौशल्य विकसित होण्यास मदत होईल. म्हणून मूल्यवर्धन पुस्तके शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना खूप उपयुक्त आहेत. या साहित्यामुळे मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होईल. शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यामुळे विद्यार्थ्यांनी शांतता संकेतचा वापर करून शाळेची शिस्त चांगल्या प्रकारे राखण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी कोणतेही काम जबाबदारीने करतात. मूल्यवर्धन उपक्रमांतून विद्यार्थ्यांनी नवनवीन गोष्टी आत्मसात केल्या. विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढली. विद्यार्थ्यांना मूल्य शिकवली जात नाहीत तर ती नियोजित उपक्रमातून आनंदही पद्धतीने रुजवली जातात, हा मूल्यवर्धनचा हेतू साध्य होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांचा उपक्रमांमध्ये सहभाग वाढला. सर्व विद्यार्थी स्पष्टपणे आपले विचार व्यक्त करू लागले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त आहे असे मला वाटते.
मूल्यवर्धन वर्गउपक्रम प्रत्येक व्यक्तीच्या पातळीनुसार निवडलेले आहेत. पाठ्यक्रमाच्या अध्ययन निष्पत्तींशी निगडीत अध्ययन निष्पत्ती आहेत. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शिक्षक व विद्यार्थी उपक्रम पुस्तिका तयार केल्या आहेत. यांच्या साह्याने वर्ग स्तरावरील उपक्रम आयोजित करण्यासाठी कला, कार्यानुभव तासिकेतून तीन तासिका निवडल्या. त्याचप्रमाणे उपक्रम सातत्याने चालू ठेवण्यासाठी अभ्यासक्रमासंबंधित उपक्रम त्या-त्या घटकांच्या अध्यापनाच्या वेळी घेण्याचे नियोजन केले. यामुळे अभ्यासक्रमाची उद्दिष्टे साध्य झालीच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली. विद्यार्थी सर्वगुणसंपन्न व्हावेत, यासाठी शाळास्तरावर शिक्षक प्रयत्न करीत असतात. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे या प्रयत्नांना बळकटी मिळेल. या उपक्रमांतून सर्वांचीच सृजनशीलता जागृत होईल, असे मला वाटते.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, मूल्यवर्धन आहे प्रवास सुंदर. नवनवीन उपक्रमांचा, संस्काराचा, संस्कृतीचा, ज्ञानाचा अन् विज्ञानाचा.
-श्रीमती स्वाती विठ्ठल राजगुरू
मूल्यवर्धन एक प्रेरणादायी कार्यक्रम
-श्रीमती स्वाती विठ्ठल राजगुरू
वर्तनात बदल
शाळेत नियमित स्वच्छ गणवेशांत वेळेवर हजर राहतात. मित्रांबरोबर आपुलकीने वागतात. वर्गात शिक्षकांच्या सांगण्याप्रमाणे वागतात. वर्गमित्र-मैत्रिणी यांना मदत करतात.
एकंदरीत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची शिस्त लागली आणि त्यांच्या वर्तनात बदल झालेले दिसून आले.
-महासिद्ध घाले
वर्तनात बदल
-महासिद्ध घाले
भरारी
मी सुषमा अरविंद काळे शाळा हिवरवाडी विद्यार्थ्यांमधील बदल सांगणार आहे.
माझ्याकडे पाचवीचा वर्ग आहे. मूल्यवर्धनमध्ये जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक मुलांनी बनावे आणि त्यांच्यामध्ये मूल्ये रुजवावीत यासाठी खूप छान सांगितले आहे. लहानपणी त्यांना सांगितले तरच बदल होतो. माझ्या विद्यार्थ्यांनी स्वतः वर्गनियम बनवले आणि त्याचे काटेकोरपणे पालन करतात.
माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे,
भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश,
कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश,
कितीही दुःख वाटलं तरी, चेहऱ्यावर असावेत हास्य तरंग,
कितीही समस्या आल्या तरी, ध्येय रहावो अभंग
खूप दिवसांपासून वाटतं, असं एकदातरी जगून पाहावं,
अपयशाला रोज हिणवतं यशाला जिंकत जावं.
-सुषमा काळे
भरारी
-सुषमा काळे
मूल्यवर्धन काळाची गरज
आजचा विद्यार्थी उद्याचा आदर्श नागरिक
आजचा विद्यार्थी उद्याचा आदर्श नागरिक घडवायचा असेल, तर शिक्षणाच्या प्राथमिक स्तरापासूनच सर्व विषयांच्या अभ्यासाबरोबरच ‘मूल्यवर्धन ‘संबंधित शिक्षण व उपक्रम यांची अत्यंत आवश्यकता आहे. गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पाहिली ते पाचवीच्या वर्गांना मूल्यवर्धन पुस्तिका व उपक्रम पुस्तिका मोलाचं कार्य करीत आहेत. कारण सध्या समाजात ज्या वाईट घटना, दुष्ट प्रवृत्ती वाढत आहेत. त्याचे संपूर्ण उच्चाटन करावयाचे असेल तर लहान मुलांना विद्यार्थीदशेपासून योग्य ते संस्कार घडवावे लागतील. ‘Necessity is the mother of invention’ गरज ही शोधाची जननी आहे. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासक्रमामधून विविध मूल्यांचे संवर्धन करत आहेतच, शिवाय मूल्यवर्धनमधील उपक्रमांतून त्यांच्या कार्याला अधिक गती मिळाली आहे. तसेच नियोजनबद्ध उपक्रमांमुळे हसतखेळत आनंददायी पद्धतीने भारताच्या संविधानातील मूल्यांची जोपासना विद्यार्थ्यांमध्ये बालपणापासून होऊ लागली आहे.
केवळ बौद्धिक भरारी घेणे म्हणजे शिक्षण नव्हे तर वेगवेगळ्या प्रवृत्ती व भावना यांना योग्य असे सुसंस्कृत वळण लावणे म्हणजे शिक्षण. शिक्षणातून केवळ लेखन, वाचन करता येणारा विद्यार्थी घडवावयाचा नसून ‘सुंदर माणूस’ निर्माण करावयाचा आहे. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे सम्यक दर्शन घडवावयाचे आहे. यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्नशील असावे. “उद्यमेन हि सिध्यनती, कार्यांणि न मनोरथे; ! न हि सुप्तस्य सिंहस्य , प्रविशांति मुखे मृग: || उद्योग केल्यानेच कार्य सिद्धीस जातात, केवळ मनोरथ केल्याने नाही. जसे झोपलेल्या सिंहाच्या तोंडात पशू आपणहून प्रवेश करत नसतात. तसेच विद्यार्थ्यांवरसुद्धा उत्तमोत्तम संस्कार आपोआप घडत नसतात. ते घडवावे लागतात. भविष्यातील जबाबदार, संवेदनशील, कर्तबगार नागरिक घडवायचे असतील तर ही मोलाची कामगिरी शिक्षकांनाच पार पाडावी लागेल. विद्यार्थ्यांमध्ये कनवाळूपणा, कृतज्ञता, सहकार्यवृत्ती, सद्विचार, प्रामाणिकपणा, सदसद विवेकबुद्धी, नीटनेटकेपणा, कामसुवृत्ती निर्माण करावयाची आहे. मूल्यवर्धनच्या उपक्रमामधून उत्कृष्ट गुणांची निर्मिती करावयाची आहे. त्यासाठी शिक्षकांनाच अधिक मेहनत घ्यावी लागेल. ‘मेहनत का फल मीठा होता है l’ त्यांच्या या कार्याला निश्चितच यश मिळेल. हे महत्त्वपूर्ण कार्य
शिक्षकांशिवाय इतर कोणीच परिणामकारकपणे करू शकणार नाही. देशाचे भावी शिल्पकार वर्गावर्गातूनच घडत असतात, याची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या, उदात्त सवयी निर्माण करावयाच्या आहेत. उदाहरणार्थ, वर्गात विद्यार्थी त्यांची मते, विचार स्पष्टपणे मांडतात. न घाबरता आत्मविश्वासाने बोलतात. वेळप्रसंगी रागावर नियंत्रण ठेवून शांत राहण्याचा प्रयत्न करतात. स्वतःचे काम स्वतः, व्यवस्थितपणे व वेळेवर पूर्ण करतात. स्वतःच्या सर्व वस्तूंची योग्यप्रकारे काळजी घेतात. शाळेचे नियम आनंदाने पाळतात. सर्वांचा आदर राखतात. मित्रांना मदत करतात. भांडणे टाळून मैत्रीला महत्त्व देतात. असे अनेकविध चांगले गुण विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे कार्य शिक्षकच करू शकतात.
सुसंस्कारित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान यातच शिक्षकांचे सौंदर्य आहे. भपक्यात नाही तर साधेपणात आहे. आपले विचार, वर्तन, कामातील कौशल्य यातूनच शिक्षकांचे सौंदर्य दिसून येते. शिक्षकांमधील हेच चांगले गुण विद्यार्थ्यांमध्ये उतरणार आहेत. ‘Conscience is God’s presence in man.’ ‘सदसद विवेकबुद्धी म्हणजेच परमेश्वराचे माणसातील आस्तित्व, असेच विवेकशील विद्यार्थी आजच्या प्राथमिक शिक्षणातून घडत आहेत. चांगले संस्कार व मूल्ये यातूनच विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल होणार आहे. पर्यायाने भारताचे भावी नागरिक हे एक जबाबदार, संवेदनशील घटक असतील यात शंकाच नाही.
-श्रीम. वाघमारे शहाबाई महादेव
मूल्यवर्धन काळाची गरज
-श्रीम. वाघमारे शहाबाई महादेव
मूल्यवर्धनातून मूल्यांची रूजवणूक
मूल्यवर्धन हा कार्यक्रम पहिली ते पाचवीच्या वर्गासाठी सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतून लहान मुलांमध्ये शालेय वयात चांगल्या सवयी रूजाव्यात, या उद्देशाने हा कार्यक्रम कल्पतरूप्रमाणे शिक्षकांना मार्गदर्शक ठरत आहे, जेणेकरुन भारताचे भावी नागरिक संस्कारीत तयार होत आहेत..
मूल्यवर्धनातून मुलांमध्ये एकमेकांशी कसे वागावे? कसे बोलावे? वर्गनियम पालन, शांतता संकेत, शिस्त कशी पाळावी याचा अनुभव पुस्तकांतील थोर व्यक्ती यांचे जीवनप्रसंग, विविध समस्या, नैतिकमूल्ये यांची जाणीव होऊ लागली. शिक्षकांना मूल्यवर्धन एका उत्तम मार्गदर्शकाचे काम करत आहे. तसेच या उपक्रमामुळे वर्गातील उपस्थित वाढण्यास मदत होत आहे. वर्गाची गुणवत्ता वाढीसाठी उत्तम प्रकारे मदत होत आहे. एकंदरीत हा उपक्रम कल्पतरूप्रमाणे आहे.
-एस.एल. हिंगमारे
मूल्यवर्धनातून मूल्यांची रूजवणूक
-एस.एल. हिंगमारे
वर्तनात बदल
शाळेत नियमित स्वच्छ गणवेशांत वेळेवर हजर राहतात. मित्रांबरोबर आपुलकीने वागतात. वर्गात शिक्षकांच्या सांगण्याप्रमाणे वागतात. वर्गमित्र-मैत्रिणी यांना मदत करतात.
एकंदरीत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारची शिस्त लागली आणि त्यांच्या वर्तनात बदल झालेले दिसून आले.
-महासिद्ध घाले
वर्तनात बदल
-महासिद्ध घाले
भरारी
मी सुषमा अरविंद काळे शाळा हिवरवाडी विद्यार्थ्यांमधील बदल सांगणार आहे.
माझ्याकडे पाचवीचा वर्ग आहे. मूल्यवर्धनमध्ये जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक मुलांनी बनावे आणि त्यांच्यामध्ये मूल्ये रुजवावीत यासाठी खूप छान सांगितले आहे. लहानपणी त्यांना सांगितले तरच बदल होतो. माझ्या विद्यार्थ्यांनी स्वतः वर्गनियम बनवले आणि त्याचे काटेकोरपणे पालन करतात.
माझ्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे,
भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश,
कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश,
कितीही दुःख वाटलं तरी, चेहऱ्यावर असावेत हास्य तरंग,
कितीही समस्या आल्या तरी, ध्येय रहावो अभंग
खूप दिवसांपासून वाटतं, असं एकदातरी जगून पाहावं,
अपयशाला रोज हिणवतं यशाला जिंकत जावं.
-सुषमा काळे
भरारी
-सुषमा काळे
विदयार्थ्यांमधील बदल
विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले बदल झाले आहेत.
मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या शाळेत राबविण्यात आला, त्याबद्दल प्रथमत: मी आभारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागली. विद्यार्थ्यांनी शाळेतील नियम स्वतः तयार केल्यामुळे ते स्वतः त्याचे पालन करतात. वर्गनियम तयार केल्यामुळे वर्गात शिस्त लागली. आजदेखील मी व माझे विद्यार्थी वर्गात चप्पल घालत नाहीत. मी विद्यार्थ्यांजवळ मांडी घालून बसतो. त्यामुळे त्यांना मी जवळचा वाटतो. विद्यार्थी सर्वांशी आदराने बोलतात. मदत करतात, मित्रांसोबत बोलायला लागले आहेत. एकटा बसणारा मुलगा आज सर्वांसोबत मन मोकळेपणाने बोलत आहे. वर्गातील भांडणे कमी झाली आहेत. अभ्यास आवडीने करत आहेत. सर्व विद्यार्थी सर्वांना सोबत घेऊन खेळतात, जेवतात, अभ्यास करतात. .
शांतता संकेतामुळे विद्यार्थी काहीही न बोलता शांत बसतात. अध्यापन करताना अडचणी येत नाहीत. मूल्यवर्धन संजीवनी ठरलेले आहे. विदयार्थ्यांमध्ये मूल्ये रूजत आहेत. विद्यार्थी स्वतः अभ्यास करत आहेत. आपल्या पालकांचे ऐकत आहेत. सामाजिक बांधिलकी त्यांना समजत आहे.
-विशाल मदने
विदयार्थ्यांमधील बदल
-विशाल मदने
मी आणि मूल्यवर्धन
विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीच्या जबाबदाऱ्या समजण्यासाठी मुलांना नियोजित संधी उपलब्ध करून दिल्या. त्यातून चांगल्या वाईट-सवयी, स्त्री-पुरुष समानता, आदर, आपली मते याद्वारे आपल्या क्षमता, आपली नाती, आपल्या भोवतीचे जग याविषयीची माहिती कृती, खेळ, गोष्टी यातून दिली गेली.
-संध्या ज्ञानेश्वर काळे
मी आणि मूल्यवर्धन
-संध्या ज्ञानेश्वर काळे
मूल्यवर्धन : नवीन दृष्टिकोन
लहान वयापासूनच मुलांमध्ये योग्य ते बदल घडावेत, विद्यार्थी एक चांगला नागरिक बनण्यासाठी अभ्यासक्रमाला अनुसरून मूल्यवर्धन हा एक चांगला कार्यक्रम आहे.
दररोज मुले शाळेत येतात, ते ज्ञान व कौशल्य मिळवण्यासाठी, आपले जगणे समृद्ध करण्यासाठी तसेच आपल्यामधील क्षमतांचा विकास करण्यासाठी. मुलांच्या या क्षमतांचा अधिक विकास व्हावा व मुले स्वावलंबी व्हावीत यासाठी शालेय शिक्षणात मूल्यवर्धन कार्यक्रम खूप उपयुक्त आहे. भारतीय संविधानातील मुल्ये विद्यार्थ्यांमध्ये वयानुसार व आकलनानुसार रुजावी म्हणून मुलांच्या अगदी लहान वयापासूनच म्हणजे इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजावीत यासाठी हा कार्यक्रम आखण्यात आला. विद्यार्थ्यांना शाळेत तसेच वर्गामध्ये उपदेश व धाक या ऐवजी जोडीचर्चा, गटचर्चा, कृतीखेळ, सहयोगी कृती, अभिवृत्ती व कौशल्य विकसित व्हावीत यासाठी उपक्रम, कृतिगीते यांद्वारे सहजपणे मूल्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जातो. या कार्यक्रमाचा मुख्य हेतू साध्य करून शिक्षण हे बालकेंद्री, विद्यार्थीकेंद्री व आनंददायी व्हावे हा हेतू आहे.
मूल्यवर्धन शिक्षण हे शालेय शिक्षणातील परिवर्तनाची नांदी ठरत आहे. शिक्षा नाही, धाक नाही. यामुळे विद्यार्थी सर्व कृतीमध्ये आनंदाने सहभागी होतात. खेळ, गाणी, गोष्टी, कृतियुक्त गीते याद्वारे शिक्षण सहज व सोपे होत आहे. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही या कृतीमध्ये सहभागी होत आहेत. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या कृतीमध्ये अगदी समरस होऊन जातात. मुलांच्या भावविश्वाला हात घालणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांमध्ये पालकांनाही सहभागी करून घेण्यात आलेले आहे. आरोग्यविषयक समस्या, स्वच्छताविषयक समस्या, जाणीव जागृती इत्यादी कार्यक्रमांतून पालकांचा सहभाग घेतला जातो.
विविध उपक्रमांद्वारे पालकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सहज सुलभ व रोचक झाला आहे. या नवीन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्येदेखील उत्साह निर्माण झालेला आहे. सामाजिक मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे, तो थांबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणामध्ये उजळलेली मूल्ये व त्यांची जाणीव विद्यार्थ्यांना झाली तर पुढे समाजामध्ये सुजाण नागरिक घडण्यास अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामार्फत घेण्यात येणारा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असा आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचा खूप फायदा विद्यार्थ्यांना होत आहे.
-श्रीम. गजाला सि. शेख – रजनी राऊळ
मूल्यवर्धन : नवीन दृष्टिकोन
-श्रीम. गजाला सि. शेख – रजनी राऊळ
तू चांगला आहे
मुलांना त्यांचे अवगुण न सांगता चांगल्या गुणांची स्तुती करणे यामुळे त्यांच्यामध्ये खूप बदल झाले.
शाळेत काही मुले खूप खोडकर असतात. सतत खोड्या करत असतात. त्यांच्यामुळे सगळी मुले आणि शिक्षक त्रस्त असतात. अशा मुलांना सगळेजण नापसंत करतात. मीसुद्धा त्यातलीच एक. मीसुद्धा अशा मुलांना नेहमी वाईट समजत असे. त्यांच्याशी प्रेमाने वागत नसे. अशा मुलांना मी नेहमी त्यांच्या चुका दाखवत असे. एवढं सांगूनसुद्धा कधीच त्यांच्यात सुधारणा झाली नाही.
मूल्यवर्धनच्या ट्रेनिंगनंतर मी प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली बघायला सुरुवात केली. मला असे जाणवले की, मुले वाईट नाहीत, त्यांची परिस्थिती वाईट आहे. अशा खोडकर मुलांचे मी समुपदेशन करायला सुरुवात केली. त्या मुलांना अशी जाणीव करून दिली की, ते चांगले आहेत. त्या मुलांमध्ये विश्वास वाढला. कोणीतरी आपल्याला चांगलं म्हणते याचे त्यांना बरे वाटले. ते हळूहळू बदलू लागले. त्यांनी खोड्या करायचे कमी केले. मूल्यवर्धनमधून मला एक शिकायला मिळाले की, प्रत्येक वेळेस माणूस वाईट नसतो. त्याची परिस्थिती वाईट असते. म्हणून आम्हांला माणसाची परिस्थिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे. प्रत्येक मूल हे चांगलेच असते. वाईट असते ती तिची फक्त परिस्थिती. मी मुलांना वाईट न सांगता, त्यांना तू चांगला आहे असं सांगत असते व त्यांच्यामध्ये अमूलाग्र बदल होत आहेत.
अशाप्रकारे फक्त मुलांमध्येच नाही तर माझ्या मध्येसुद्धा बदल झाला. मी आता प्रत्येकाकडे पॉझिटिव्हली बघते आणि निगेटिव्हिटी माझ्यामधून कमी झाली आहे. मूल्यवर्धनद्वारे माझ्यामध्ये व माझ्या मुलांमध्ये हे बदल झाले. आजही खोडकर मुले खूप कमी खोड्या करत आहेत. ते दुसऱ्यांना मदत करतात. दुसऱ्यांना कमीत कमी त्रास देतात. आज आपल्या समाजाला अशाच मूल्यांची गरज आहे आणि हे काम शांतिलाल मुथ्था संस्था खूप चांगल्या रितीने करत आहे.
-झन्नत कौसर सय्यद
तू चांगला आहे
-झन्नत कौसर सय्यद
मूल्यवर्धन आणि मी
शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रुजविण्यासाठी पुण्यातील शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मूल्यवर्धन कार्यक्रम विकसित केला. यास महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या प्राधिकरण पुणे यांनीही मान्यता दिली. “our children are the future of our nation.” विद्यार्थी हे भविष्यात चांगले नागरिक हवेत यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आहे. शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार संवेदनशील नागरिक बनावे हाच मूल्यवर्धनचा हेतू उद्देश आहे. हाताची पाचही बोटे सारखी नसतात. प्रत्येक विषयामध्ये प्रत्येक मूल वेगळे कमी-जास्त हुशार असू शकते. त्यांच्या अंगी असणाऱ्या कलांचा विकास करण्याची मूल्यवर्धन प्रशिक्षण घेताना आम्हालाही प्रेरणा मिळाली. ज्याप्रमाणे कुंभाराने मातीच्या मडक्याला आकार द्यावा त्याचप्रमाणे शिक्षकांना मूल्यवर्धनचा मार्ग मिळाला.
मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेतील उपक्रमांची विभागणी पाच गटात केलेली असून त्यांची काठिण्यपातळी विचारात घेऊन केल्यामुळे एखादा उपक्रम एकाच वेळी सर्वच मुले पूर्ण करू शकत नाहीत. अशावेळी आम्ही यांचा उपक्रम पूर्ण झाला आहे त्यांना अधिक विचार करून ठेवा असे सांगतो.
शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल झाला. विद्यार्थ्यांना मूल्य शिकवली जात नाही तर ती नियोजित उपक्रमातून आनंददायी पद्धतीने रुजवली जातात.
वर्गामध्ये उपक्रम राबवण्यासाठी आठवड्यातील तीन तासिका घेतल्या. संबंधित उपक्रम त्या घटकाच्या अध्यापनाच्या वेळी घेण्याचे नियोजन केले. विद्यार्थ्यांना एकमेकांच्या आवडीनिवडी समजल्या. कुटुंबाबद्दल शेजारी, गाव, शाळा, शाळेचे महत्त्व, आपले ध्येय, मदत करणे, स्वतःमधील गुण, स्वतःचे मत मांडू लागले. जीवनात शिक्षण व संस्कार या दोन्हीची गरज आहे. त्यामुळे मुलांचा विकास झाला.
-विद्याराणी मारकड
मूल्यवर्धन आणि मी
-विद्याराणी मारकड
मूल्यवर्धन शिक्षण
शिक्षणाच्या माध्यमातून मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे हेच या कार्यक्रमाचे ध्येय आहे. मूल्यवर्धन म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील सुधारणेची नवी दिशा आहे.
आपल्या देशामध्ये पारंपारिक शिक्षण पद्धती बदलून घोकंपट्टी घडवणारी पिढी आजच्या युगात ज्ञानपूर्ण पण सामाजिक भान व नैतिक मूल्यापासून दुरावत आहे. अशा परिस्थितीत मूल्यांचे शिक्षण देणारी मूल्यवर्धन अभ्यासपूर्ण शिक्षण पद्धती उपयुक्त ठरली. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या मते आजच्या पिढीत शिक्षणासोबत मूल्यांची रुजवणूकही तितकीच महत्त्वाचे आहे. लहान वयात मुलांच्या शंका आणि चिकित्सेला वाव मिळावा यासाठी शिक्षकांनीही प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे मुलांचे व्यक्तिमत्व घडवताना प्रशिक्षणाचा चांगला उपयोग करून घ्यावा.
मूल्यवर्धनमधून शिक्षक-पालक-बालक यांच्यातील आणि समाजाचा संपर्क वाढविणे यासाठी पोषक आहे. मुलांना खेळातून, कृतीतून शिक्षण देणारी ही एक उत्तम शिक्षण पद्धती आहे. धाडसी विद्यार्थी, समाजाची जाण असणारा, स्वतःच्या कौटुंबिक, सामाजिक कर्तव्याचे भान राखणारा, आदर्श विद्यार्थी मूल्यवर्धन शिक्षण प्रणालीतून घडत आहेत. या उपक्रमातून अनेक उत्तम नेतृत्व घडतील.
मूल्यांचे महत्त्व पहिल्या काळातही तितकेच होते, त्यानुसार मुलांना शिक्षण दिले जाई. चांगली मूल्ये मुलांमध्ये असतील आणि रुजली तरच संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. मुलांमध्ये मदतीची, आपुलकीची भावना, सहकार्याची वृत्ती वाढेल आणि त्यातील एकोपा टिकून राहील. या उपक्रमातून मुले बोलकी झाली असून ते त्यांचे घरगुती अनुभव शिक्षकांशी व सहकाऱ्यांशी बोलतात. एकमेकांचा आदर करणे, तिरस्कार न करणे, प्रेमभाव, समजूतदारपणा या भावना वाढत आहेत. या उपक्रमातून मुलांच्या समस्येपर्यंत पोहोचता आले. मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजवली गेली पाहिजेत, म्हणून मुथ्था फाउंडेशनने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांचा यात समावेश केला आहे. लहान वयाच्या मुलांमध्ये ही मूल्ये रुजविणे गरजेचे आहे. या हेतूने हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. लोकशाहीविषयी जागृती, खेळ व कृतींतून शिक्षण यामुळे मुलांना याचा भावी आयुष्यात एक चांगला मार्ग मिळेल. ही मुले उद्याची भावी पिढी घडविणार आहेत. शहरात सगळे आपापल्या विश्वात मग्न असतात त्यामुळे येथील मुलांना या कार्यक्रमाचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला. त्यांच्यात व त्यांच्या वर्तणुकीत चांगला बदल होत आहेत. मुले ही भविष्यात चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडतील. यामुळे संपूर्ण देशात चांगला बदल होईल. या उपक्रमातुन मुले ही सुजाण नागरिक व्हावीत, त्यांच्यामध्ये घटनात्मक मूल्ये रुजावीत, म्हणून अशा मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे या प्रयत्नांना बळकटी येईल. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल.
-रजनी राऊळ
मूल्यवर्धन शिक्षण
-रजनी राऊळ
विद्यार्थी बदलतोय
मूल्यवर्धन कार्यक्रमाचे फलित
शिक्षक म्हणून मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याच्या प्रथम मूल्यवर्धनबाबत नवीन जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. केंद्रस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नेमके मूल्यवर्धन काय आहे हे अगदी सोप्या भाषेत स्पष्ट झाले. शाळेत गेल्यावर विद्यार्थी बदल लगेच जाणवू लागला. शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार,संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत,मूल्यांची रुजवणूक त्यांच्यात व्हावी विविध कौशल्य त्याला प्राप्त व्हावीत यासाठी मूल्यवर्धनचा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरला. इयत्ता पहिली पासूनच मुलांमध्ये मूल्ये रुजली तर भविष्यातील एक सुसंस्कृत नागरिक घडण्यास नक्कीच याद्वारे मदत होईल. मुलांनी समाजात कसे वागावे, कसे रहावे हे मूल्यवर्धनच्या कृती राबविल्यामुळे कळायला लागले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये जिज्ञासावृत्ती निर्माण होण्यास मदत झाली. त्यांना चांगल्या व वाईट सवयी कोणत्या हे कळाले. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो याची जाणीव झाली.
आम्हा सर्व शिक्षकांना या पुस्तिकेच्या माध्यमातून मुल्ये रुजविण्यात यश मिळाले यातून उद्याचा भारत निश्चितपणे चांगल्यारितीने आकार घेऊ शकतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते.
आज आहोत आपण शून्य
जाणून घेवूया मूल्यवर्धन पुस्तकाचे मूल्य
शाळेत जावूया शिकूया
पुस्तिकेतून नवनिर्मिती करुया
मूल्याने जीवन यशस्वी करुया
उद्याचा भारत घडवूया,
उद्याचा भारत घडवूया.
-श्रीम. माधुरी रामदास भोरे
विद्यार्थी बदलतोय
-श्रीम. माधुरी रामदास भोरे
मूल्यवर्धन
शालेय स्तरावर आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय नाविण्यपूर्ण तर आहेच, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाढविणारा आणि विविध मूल्ये आनंददायी पद्धतीने रुजविणारा स्तुत्य असा आहे.
शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत, विद्यार्थ्यांची प्रगती साधणारा कार्यक्रम शाळेत राबवित असताना अतिशय आवश्यक असणारी मूल्ये छोट्याछोट्या कृतींतून विद्यार्थी आत्मसात करुन घेतात. या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार तसेच कर्तबगार नागरिक होण्याची वाटचाल शाळास्तर वरुन होत आहे, असे वाटते. वर्गातील शिस्तीपासून ते जबाबदार समाजघटक बनविण्याचे प्रशिक्षणच यातून दिले जात आहे, असे वाटते.
-अ. सु. भालेकर
मूल्यवर्धन
-अ. सु. भालेकर
मूल्यवर्धनमुळे माझ्यात झालेले बदल
मूल्यशिक्षण म्हणजे सुसंस्कृत नागरी जीवनासाठी योग्य ठरणारे, मानवी व्यवहाराचे, आदर्श जीवनाच्या दृष्टीने नियमन करणारी जी जीवनमूल्ये आहेत त्यांचे संस्कार म्हणजे शिक्षण होय. मूल्यशिक्षण देण्याचे काम करत असताना शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामार्फत सुरू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मला खूप फायदा झाला.
मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि त्यासाठी मला प्रेरक म्हणून निवडले गेले. प्रेरक म्हणून काम करताना मला मूल्यवर्धन कार्यक्रमाची पूर्ण ओळख करून घेणे गरजेचे होते. यासाठी मी सर्व मूल्यवर्धन उपक्रमांचा अभ्यास केला. त्यावेळी असे जाणवले की, या उपक्रमांचा मलाही निश्चित फायदा होईल. त्यादृष्टीने मी माझ्यात बदल घडवण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने मी माझ्यात यात काही बदल झाले. सुरुवातीला मलाही माझ्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्यास खूप राग येत होता. तो राग कसा व्यक्त करायचा हेही लवकर लक्षात येत नव्हते. मी तो राग कोणताही विचार न करता पटकन व्यक्त करत होतो. परंतु मी आणि माझ्या क्षमता या विभागातील उपक्रम लक्षात घेतले व त्यातील गर्भितार्थ जाणून मी माझ्या रागावर नियंत्रण करण्यासाठी संयम बाळगणे, विचार करून कृती करणे या कृतीद्वारे राग शांत करू लागलो. मूल्यवर्धनमधील विविध उपक्रमांद्वारे मलाही माझ्या जबाबदा-या काय असतील याची जाणीव होऊ लागली. मी माझ्यासाठी काही नियम बनविले. यात मी दिवसभरात घरातील काही कामात कुटुंबीयांना मदत करणारच असे ठरविले. मी कोणतीही लाज न बाळगता घर स्वच्छ करणे, अंगण स्वच्छ करणे यासारखी कामे मन लावून करू लागलो. एकटे राहण्याच्या सवयीमुळे होणारे नुकसान यापासून मी परावृत्त होऊन नवनवीन मित्र जोडू लागलो. त्यामुळे माझी नवनवीन विचारांशी मैत्री होऊ लागली. ‘मी हेच माझे जग’ असे म्हणून वावरत होतो, परंतु केवळ मी हेच माझे जग नसून सर्व परिसर, परिसरातील वस्तू हे माझे जग आहे, याची जाणीव मला झाली. मूल्यवर्धनमधील विविध सहयोगी खेळ घेत असताना मला व्यायामाची गोडी लागली. मी दररोज व्यायाम करू लागलो. आजही मी दररोज व्यायाम करत आहे. मूल्यवर्धन या कार्यक्रमामुळे माझ्या अंगी असणाऱ्या व काही मलाच बाधक ठरणाऱ्या गोष्टींपासून मी परावृत्त झालो. माझ्या व्यक्ती विकासामध्ये निश्चितच छान सुधारणा झाली.
-श्री. प्रेमचंद फुलचंद हातागळे (जि. प. प्रा. शा. शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर)
मूल्यवर्धनमुळे माझ्यात झालेले बदल
-श्री. प्रेमचंद फुलचंद हातागळे (जि. प. प्रा. शा. शिरभावी, ता. सांगोला, जि. सोलापूर)
मूल्यवर्धन शिक्षणाचे फलित
मूल्यवर्धन कार्यक्रमाचे यश
मूल्यवर्धन कार्यक्रम मागील वर्षापासून शाळेत सुरू झाला. विद्यार्थी उपक्रम पुस्तिका अतिशय छान असून त्यात रंग भरणे, टप्प्याने चित्र काढणे आदि उपक्रम खूप चांगले आहेत. काही मुलं शाळेत नेहमी गैरहजर असायची. त्यांना शाळेत येण्याची आवड निर्माण झाली.
-विजय मुंढे (जि. प. प्रा. शाळा पाटीलवस्ती, ता. पंढरपूर )
मूल्यवर्धन शिक्षणाचे फलित
-विजय मुंढे (जि. प. प्रा. शाळा पाटीलवस्ती, ता. पंढरपूर )
मूल्यवर्धन काळाची गरज
मी एक प्राथमिक शिक्षिका आहे. काही दिवसांपूर्वी एक प्रसंग पाहण्यात आला. एक सेवानिवृत्त शिक्षिका गाडीवरून पडल्या आणि आम्ही सर्वजण मदतीसाठी गेलो. त्यांना औषधपाणी करून चहा दिला. तेवढ्यात त्यांची दोन्ही मुले त्या ठिकाणी आली आणि बाईंना घेऊन जाऊ लागली. मुलांना धावत आलेलं पाहून आम्हांला व त्या बाईंनाही खूप आनंद झाला, पण थोड्याच वेळात तो ओसरला. ते दोघेही आईला अद्वातद्वा बोलू लागले व त्यांना घरी घेऊन गेले. तेव्हा समजले किती दोन्ही मुले स्वतंत्र राहतात व आई एकटीच लांब राहते आणि तिला जेवणासाठी खानावळीचा डब्बा द्यावा लागतो. हे सर्व पाहून मनात विचार आले की समाजातील मूल्ये कुठेतरी नाहीशी झालेली आहेत. आताही मूल्ये कशी रुजवायची असा विचार चालू होता, त्याच वेळेस आम्हांला मूल्यवर्धनचे प्रशिक्षण सुरू झाले आणि ते प्रशिक्षण घेतल्यानंतर मला असे जाणवले की, या प्रशिक्षणाची समाजाला नितांत गरज आहे. मला एक नवीनच दिशा मिळाली व मी हे उपक्रम मनापासून राबविण्याचे ठरविले.
सर्वप्रथम शाळेत गेल्यानंतर मी मूल्यवर्धन कार्यक्रमास सुरुवात केली आणि वर्गामध्ये एक वर्गनियम तक्ता बनवला. मी आणि माझे विद्यार्थी आम्ही सर्वांनी मिळून तो तक्ता बनवला. तक्ता बनवत असतानाच विद्यार्थ्यांना खूप आनंद होत होता. आता आपणच आपले नियम तयार करणार या गोष्टीचा त्यांना फार आनंद वाटत होता. त्यानंतर मला पहिला अनुभव असा आला की, माझा वर्ग पूर्वीपेक्षा जास्त स्वच्छ दिसू लागला. वर्गातील मुलांची भांडणे कमी झाली आणि मुलांच्या चपला वगैरे वर्गाबाहेर रांगेत दिसू लागल्या. विद्यार्थी पूर्ण गणवेशात शाळेत दिसू लागले आणि हे सर्व अगदी न सांगता. त्यांना कोणीही सांगितले नाही, तरी ते स्वतःच्या मनाने हे सर्व नियम पाळू लागले. कारण हे सर्वनियम त्यांनी स्वतः बनवलेले होते. त्यामुळे ते न विसरता ते नियम पाळू लागले. वर्गाला छान शिस्त लागली. त्यानंतर शांतता संकेत हा नियम आम्ही सुरू केला. शांतता संकेत पाळल्यामुळे मुलांचा वर्गातील गोंधळ खूपच कमी झाला आणि या गोष्टीचा मला अध्यापनामध्ये खूप फायदा झाला. शिकवत असताना मुलांमध्ये चर्चा जर सुरु झाली किंवा मुले लक्ष देत नसतील तर हात वर करून शांतता संकेत दिला की लगेच ते सर्व मुलं शिकवण्याकडे अध्यापनाकडे लक्ष देत होते. या गोष्टीचा मला अध्यापनामध्ये खूप उपयोग झाला.
इयत्ता तिसरीच्या मूल्यवर्धन पुस्तिकेतील विविध पाठांमधून उदाहरणार्थ, खरा मित्र-मैत्रिण कोण? हे विद्यार्थ्यांना समजू लागले. विद्यार्थी एकमेकांना मदतसुद्धा करू लागले. आपल्या मित्राची-मैत्रिणीची काळजीसुद्धा घेऊ लागले. त्यानंतर कुटुंबवृक्ष हा जो पाठ मूल्यवर्धन पुस्तिकेमध्ये दिलेला आहे, त्यातून विद्यार्थी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेऊ लागले. एक गोष्ट मला बऱ्याच पालकांनी येऊन सांगितली की, मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाल्यापासून आमची मुले सांगितलेले ऐकतात. तसेच उलट बोलत नाहीत. हा एक मुलांमधील चांगला बदल मला पालकांनी येऊन सांगितला. विद्यार्थ्यांनी परिसरामध्ये खूप झाडे लावली व ती आपली मानून जपलीसुद्धा. तसेच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांनी रद्दी कागदापासून विविध वस्तू, पिशव्या बनविल्या. विद्यार्थी आता पुस्तकांची, वह्यांची पाने फाडत नाहीत, तर जपतात, जपून वापरतात. कारण त्यांना ते कागद कसे तयार झाले हे या पुस्तकांमधून समजले. एक कागद तयार होण्यासाठी कितीतरी झाडांना आपला प्राण द्यावा लागतो, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले तेव्हापासून त्यांनी कागद वाया घालवणं बंद केलं. हा एक महत्त्वाचा बदल झालेला मला मुलांमध्ये दिसून आला. हे सर्व बदल घडत होतेच, परंतु एक अगदी वेगळाच अनुभव मला आला, तो म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधन हा सण आला. रक्षाबंधनानिमित्त आपण आपल्या देशाच्या सैनिकांना राख्या पाठवायच्या का ? असे मुलांनी मला विचारले. या कार्यक्रमाचे फलित झाले, असे मला वाटले. आम्ही सर्वांनी मिळून सैनिकांना राख्या पाठवल्या. परंतु काही मुलींनी तर सैनिकांना पत्रदेखील लिहिले. हे सर्व पाहून आम्हा शिक्षकांना, मुख्याध्यापकांना कृतार्थ झाल्यासारखे वाटले. अशाप्रकारे मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मला खूपच चांगला अनुभव आला. शेवटी असे म्हणावेसे वाटते की, ‘शिक्षण म्हणजे फक्त वही-पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे व भावनेला माणुसकीकडे नेणारा मार्ग होय.’
-श्रीमती सुषमा तानाजी केवडकर . न .प. शाळा नंबर. ४.करमाळा. जिल्हा -सोलापूर
मूल्यवर्धन काळाची गरज
-श्रीमती सुषमा तानाजी केवडकर . न .प. शाळा नंबर. ४.करमाळा. जिल्हा -सोलापूर
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. मुले आपापले मत चांगल्या प्रकारे व्यक्त करतात.
मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. नैतिक मूल्ये मुलांमध्ये रुजतात.
आजच्या आधुनिक युगात प्रत्येकजण जीवनाच्या शर्यतीत प्रथम येण्यासाठी धडपडत आहे. यात शिक्षण हे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहे. आज प्रत्येकजण झटपट पैसा कसा मिळवावा, या विचारात आहे. यामुळे माणुसकी कोठेच शिल्लक राहिली नाही, असे भासते. आजकालची मुलं शिक्षण तर घेत आहेत, पण अपल्या परिवाराशी चांगले व्यवहार करीत नाहीत. मित्रांशी चांगला व्यवहार करीत नसतील तर शिक्षणाचा काय उपयोग? अशा परिस्थितीत मूल्यवर्धन हे मूल्यांची ज्योत बनून आले आहे. मूल्यवर्धन हे चांगले विद्यार्थीच नव्हे तर चांगले माणूस घडविण्याचे मोलाचे कार्य करीत आहे. मूल्यवर्धनमुळे मुलांना आपले मनोगत व्यक्त करण्याची तसेच जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळते.
मुलांना टीमवर्कमुळे समाजात कसे वागावे, आपले विचार दुसऱ्यांना कसे पटवून देता येईल हे सहज अवगत होते. मुले शिक्षणासोबतच खेळातून, गाण्यातून देशाबद्दल, सर्वधर्म समभाव, आपुलकी, गोर-गरीबांवर प्रेम व्यक्त करण्याचे कौशल्य आज मूल्यवर्धनमुळे सोपे झाले आहे, असे म्हणणे वावगे होणार नाही.
आज शिक्षणामुळे स्री-पुरुष समानतेचे धडे हे लहानपणापासूनच मनात रूजत आहे. मूल्यवर्धनमुळे मुलांना स्वतःबद्दल, स्वतःच्या कौशल्याबद्दल जाणीव होते. मुलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो. शिक्षक हे मुलांमध्ये रमून त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चांगले बदल घडवून समाजात वावरण्यास नेतात, हेच खरे मूल्यवर्धन होय. मूल्यवर्धनमुळे मुलांबरोबरच शिक्षकांच्या जीवनावरही चांगले परिणाम दिसून येतात.
-अस्मा बिराजदार
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. मुले आपापले मत चांगल्या प्रकारे व्यक्त करतात.
-अस्मा बिराजदार
मुलांमध्ये आपली जबाबदारी स्वीकारण्याची व चूक कबूल करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
मुलांमध्ये आपली जबाबदारी स्वीकारण्याची व चूक कबूल करण्याची क्षमता निर्माण झाली आहे.
मूल्यवर्धन शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाची माहिती देणे नव्हे, तर समाजाच्या गरजा लक्षात घेऊन दिलेले शिक्षण आहे. मुले स्वतःहून शिकण्यास समर्थ होतील, अशा प्रकारचे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे. समाजामध्ये एक व्यक्ती म्हणून आत्मविश्वासाने व आत्मसन्मानाने जीवन जगण्याची कला त्यांच्यामध्ये रुजवयाची आहे. मूल्यवर्धन शिक्षणामुळे मुलांमध्ये आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची व आपली चूक कबूल करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. मूल्यशिक्षणामुळे मुलांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, संवेदनशीलता, सर्वधर्म एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, वक्तशीरपणा, स्त्री-पुरुष समानता, नीटनेटकेपणा, सौजन्यशीलता, राष्ट्रभक्ती ही सर्व मूल्ये रुजत आहेत.
-मलेका तांबोळी
मूल्यवर्धन शिक्षणामुळे मुलांमध्ये सर्वधर्म एकात्मता, श्रमप्रतिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्री-पुरुष समानता, नीटनेटकेपणा ही सर्व मूल्ये रुजत आहेत.
-मलेका तांबोळी
मुले शाळेत, खेळात आनंदाने नैतिकमूल्य अवगत करतात. मोठ्यांचा आदर करतात. नेहेमी खरे बोलतात.
एकमेकांसोबत मिळून राहतात. वेळेवर काम पूर्ण करतात. एकमेकांना मदत करतात.
मूल्यवर्धन हा शब्द फक्त शब्द नसून यात खूप सारे अर्थ समाविष्ट आहेत. मूल्यवर्धन म्हणजे मुलांमध्ये नैतिक मूल्य रुजविणे. आपल्या जीवनात नैतिक मूल्यांचे खूप महत्त्व आहे. मुलांना आपल्या जीवनात खूप वेगवेगळे अनुभव येतात. नैतिक मूल्यांचा विकास आपल्या जन्मापासून सुरू होतो. मूल जेव्हा लहान असते त्याला विविध प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. केलेल्या चुकांबद्दल सांगितले जाते. मुलांना मोठे होऊन आपल्या देशाचा विकास करायचा आहे. आजची मुले भावी पिढीचे सज्जन नागरिक होणार. त्यांना आपली जबाबदारी, आपल्या देशाची जबाबदारी पूर्ण करायची आहे.
मूल्यवर्धनमुळे मुलं शाळेत, खेळात विविध प्रकारचे नैतिक वर्तन आपल्या सवयीमध्ये समाविष्ट करीत आहेत. जसे मोठयांचा आदर, चुकांना सुधारणे, नेहमी खरं बोलणे, वेळेवर शाळेत येणे, स्वच्छ राहणे, आपल्या देशावर प्रेम करणे, एकमेकांसोबत मिळून राहणे, वेळेवर काम पूर्ण करणे इत्यादी. प्रत्येक वर्गाला वेगवेगळे उपक्रम असल्याने मुलांमध्ये खूप परिवर्तन झाले आहे.
– शेख टी .ए.
मुले शाळेत, खेळात आनंदाने नैतिकमूल्य अवगत करतात. मोठ्यांचा आदर करतात. नेहेमी खरे बोलतात.
– शेख टी .ए.
मूल्यवर्धन शिक्षणाची धरु कास, मुलांचा साधेल संपूर्ण विकास
समाजाच्या गरजा लक्षात घेऊन दिलेले शिक्षण समाज विकासास, पर्यायाने देशाच्या विकासास पात्र ठरते. शिक्षण म्हणजे फक्त विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयाची माहिती देणे नव्हे, तर तो स्वतः शिकण्यास समर्थ होईल, अशा प्रकारची कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून विकसित करणे अपेक्षित आहे. ही अपेक्षा मूल्यवर्धन कार्यक्रमातून पूर्ण होताना दिसते आहे. विद्यार्थ्यांना भावी काळात देशाची सामाजिक, राजकीय, आर्थिक घटकांमध्ये सुव्यवस्था राखण्यास प्रभावी भूमिका पार पाडायची आहे. तसेच एक व्यक्ती म्हणून आत्मविश्वासाने जीवनाला सामोरे जाण्याची दृष्टी व आत्मसन्मानाने जीवन जगण्याची कला त्यांच्यामध्ये रुजवायची आहे. मूल्याधिष्ठित जीवन जगण्यासाठी लोकशाहीबद्दल प्रेम, सर्वधर्म-सहिष्णुता, वैज्ञानिक दृष्टिकोन, पर्यावरण रक्षण, समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या मूल्यांची रुजवण करण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम उत्तम आहे. मूल्यवर्धनमध्ये समाविष्ट मूल्याधिष्ठित उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे देशाचा जबाबदार नागरिक तयार होईल. त्याला हक्कांबरोबरच कर्तव्याचीही जाण असेल.
भारताचे भविष्य शाळांच्या वर्गखोल्यांमधून आकार घेत आहे. त्याला सुयोग्य आकार देण्याचे काम मूल्यवर्धन करीत आहे. निव्वळ श्रवण, वाचन किंवा निरीक्षण याहीपेक्षा शिक्षण अनुभवातून होते. मूल्यवर्धनच्या शिक्षक, विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांमध्ये अनुभवांवर अधिक भर दिला आहे. मुलांनी कृती करावी, गोष्टीवर चर्चा करावी, स्वअनुभव कथन करावे, चिंतन करावे. यामुळे मुलांमध्ये योग्य प्रकारे मूल्यांची रुजवणूक होते, हे मूल्यवर्धन कार्यक्रमातून गेले वर्षभर पहावयास मिळाले आहे. भारत देशाचे जबाबदार, काळजी घेणारे, नवनिर्मिती करणारे नागरिक तयार होतील. स्वतःमध्ये अपेक्षित बदल घडवून विद्यार्थी देशाचा आधारस्तंभ नक्कीच घडतील यात तिळमात्र शंका नाही. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय योग्य आणि उत्कृष्ट आहे.
विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विविध अंगांनी बहरत असल्याचे चित्र आता आपल्या निरीक्षणाच्या कॅमेऱ्यात टिपत आहे. मुलांची शिकण्याची धडपड, बोलणे, विचार व्यक्त करणे, लिहिणे कल्पना चातुर्य, चिकित्सक तसेच सर्जनशील विचार या साऱ्यांचा पडताळा घेण्याची सोय मूल्यवर्धन कार्यक्रमात आहे. मूल्यांची रुजवणुक व जीवन कौशल्यांचा विकास कसा सहजतेने साधता येतो, याचा प्रत्यय स्वतःच घेण्याची संधी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने दिली आहे. कृतीवर आधारित जास्तीत जास्त अनुभवांचे प्रयोजन मूल्यवर्धनमध्ये असल्याने लोकशाही मूल्यांची रुजवणुक प्रभावीपणे होत असल्याचा अनुभव येतो आहे. माझ्याकडे गेल्यावर्षी चौथीचा वर्ग होता. विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतील बरेचसे घटक घेतले. मुलांची कृतिपुस्तिका भरून घेतली. अतिशय सुंदर प्रतिसाद मिळाला. त्या पुस्तिकेतील घटकांचा बारकाईने विचार केला की, सर्वच मूल्यांची रुजवणूक करण्याच्या दृष्टीने प्रभावी रचना केली आहे असे लक्षात येते. शिक्षक उपक्रम पुस्तिकेतील समाविष्ट घटक ‘मी आणि माझ्या क्षमता’ , ‘माझ्या जबाबदाऱ्या’, ‘माझे नातेसंबंध’, ‘मी आणि आपले जग’ या घटकांतर्गत कृती पुस्तिकेत मनोरंजक गोष्टी आणि त्यातून मूल्यांची रुजवणूक खूपच सहज सोप्या पद्धतीने, जास्तीत जास्त मूल्ये रुजवण्याच्या दृष्टीने विचार केला आहे.
मूल्यवर्धनचा आणखी एक हेतू म्हणजे शिक्षक-विद्यार्थी-पालक यांचा एकमेकांशी सुसंवाद घडवून आणणे व मुलांचा सर्वांगीण विकास साधणे, विविध कला, कौशल्ये, ताणतणावाचे व्यवस्थापन साधने, योग्य दिशेने वाटचाल करुन समस्या निराकरण करणे, सहकार्य करणे, सहयोगी अध्ययन, जोडीने, गटात व समुहात काम करणे, जेणेकरून मुलांमधील भीती घालवणे व धीटपणा वाढवणे हा आहे. शिक्षण हक्क कायद्यातील सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचाही यात केला विचार आहे. अभ्यासक्रम निष्पत्ती, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि मूल्यवर्धन यांची उद्दिष्टे सारखीच आहेत. मूल्यवर्धनमध्ये भाषा, कला, समाजशास्त्र यांच्याशी निगडीत उपक्रम, अध्ययन निष्पत्ती आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम आपल्या अभ्यासक्रमाशी निगडीत तर आहेच, शिवाय त्यातील घटकांतून, उपक्रमांतून, अध्ययन अनुभवातून, कृतीतून मुलांमध्ये सध्याच्या काळाला अनुसरून अपेक्षित वर्तनबदल घडून आणण्याची क्षमता या कार्यक्रमात आहे. मुलाला स्वजाणीवेबरोबरच इतरांचीही चांगली ओळख होते. चांगल्या सवयी लागतात. जसे- स्वयंशिस्त, नियमाचे पालन, संवेदनशीलता वाढते. नातेसंबंधच नाही तर शेजारी, मित्रमैत्रिणी या नात्यांनाही योग्य न्याय देण्यास शिकतो.
मूल्यवर्धन उपक्रम पान ते पान (page to page) घेतले की नक्कीच मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धीक, सामाजिक, भावनिक विकास होताना जाणवला आणि तो बदल खरोखरच आजच्या युगात अत्यंत महत्त्वाचा आहे. मूल्यवर्धन आपणाला एक उत्तम नागरिकच नाही तर आनंदी जगण्याची कला प्रदान करतोय. चांगला सुजाण नागरिक देशाला बहाल करतोय. सध्या येऊ घातलेली NAS, DAS, SLS परीक्षा तसेच अध्ययन स्तर, अध्ययन निष्पत्ती याची उद्दिष्टे जवळजवळ मूल्यवर्धनातही समाविष्ट आहेतच. म्हणजे सद्यस्थितीला धरुनच मूल्यवर्धन कार्यक्रम आहे आणि तो तसाच सातत्याने चालू रहावा, असे वाटते.
-वंदना सलवदे वाघमारे, सहशिक्षिका, (जि. प. शाळा अकोले (मं), ता. द. सोलापूर)
मूल्यवर्धन शिक्षणाची धरु कास, मुलांचा साधेल संपूर्ण विकास
-वंदना सलवदे वाघमारे, सहशिक्षिका, (जि. प. शाळा अकोले (मं), ता. द. सोलापूर)
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चार लोकशाही मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमाद्वारे वाढ होण्यास अतिशय उपयुक्त अशी पुस्तिका आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या तासिका हव्याहव्याशा वाटतात.
अनेक उपक्रम या पुस्तिकेतील असल्याने सर्वच विद्यार्थ्यांना ही पुस्तिका अतिशय आवडत होती. उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवण करणे अतिशय सोपे झाले. थोरांचा आदर राखणे, चांगल्या सवयी-वाईट सवयी, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, देशभक्ती, राष्ट्रप्रेम इ. गुणांची विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले.
-प्रशांत होवाळ
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चार लोकशाही मूल्यांची विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रमाद्वारे वाढ होण्यास अतिशय उपयुक्त अशी पुस्तिका आहे. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या तासिका हव्याहव्याशा वाटतात.
-प्रशांत होवाळ