मूल्यवर्धन आणि माझे विद्यार्थी
मूल्यवर्धन कार्यक्रम राबविल्यामुळे मुलांमध्ये स्वंयशिस्त, संवेदनशीलता, सर्जनशीलता इ. गुण वाढीस लागले आहेत. त्यांना शाळेविषयी आवड निर्माण झाली आहे. मूल्यवर्धन मुलांच्या आवडीचा विषय झाला आहे.
वर्गात गोंधळ चालू झाला की, “मुलांनो गप्प बसा, बोलू नका…” अशी आपल्या वर्गात दिवसातून कितीतरी वेळा ऐकू येणारी ही वाक्ये. मुलांचं बोलणं म्हणजे आपल्याला कटकट वाटते. शिकविताना ती अडचण वाटते. कधीकधी तर आपली चिडचिडही होते. मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतल्यानंतर वर्गव्यवस्थापन कसे करावे हे मी जाणले आहे. शांतता संकेतामुळे वर्गातील गोंधळ कमी झाला. शांतता संकेत दिल्याबरोबर मुले शांत बसू लागली व माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकू लागली. न बोलताही शिस्त निर्माण झाली.
वर्गनियम बनविताना तर खूपच मजा आली. मुलांच्या सहभागाने ते बनविण्यात आल्यामुळे मुले कटाक्षाने पाळू लागली. आपोआपच वर्गात नवचैतन्य निर्माण झाले. मुलांचा सर्वांगिण विकास व्हायचा असेल तर, एकमेकांशी बोलणे खूप महत्त्वाचे आहे. विचारांची देवाण-घेवाण होणे आवश्यक आहे. सहयोगी अध्ययन पद्धतीमुळे मुले आपले विचार मनमोकळेपणाने मांडू लागली. सर्वच विषय शिकविताना या पद्धतीचा उपयोग झाला. यामुळे मुले एकमेकांच्या मदतीने शिकतात. माहितीची देवाण-घेवाण करतात, कल्पना सुचवितात. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे माझ्या वर्गातील मुलांमध्ये सकारात्मक बदल झाला आहे. पूर्वी भांडणारी मुले एकमेकांशी चर्चा करत आहेत. गरज पडेल तेव्हा ते मदत करतात, इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात. मुलांना जर संधी दिली तर मुले खूप चांगल्याप्रकारे बोलतात, आपले विचार मांडतात, याची प्रचिती मला आली आहे.
आमच्या शाळेत श्री. निलेश शिरभाऊ सर, तालुका समन्वयक वाशिम यांनी भेट दिली असता, मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्याशी संवाद साधला. मला तर नवलच वाटले. मूल्यवर्धन पुस्तिकेतील प्रत्येक उपक्रम नाविण्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुलांना त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या यांची जाणीव निर्माण झाली आहे. आता ते स्वतःची कामे स्वतः करतात. आई, वडिलांना कामांत मदत करतात. त्यांना नातेसंबंधाची ओळख झाली आहे. नातेसंबंध का जोपासावे लागतात, हे त्यांना कळले आहे. सहयोगी खेळांमुळे मुलांमध्ये आनंदनिर्मिती होण्यास मदत झाली. एकमेकांना सामावून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित झाली. सहकार्याची भावना वाढीस लागली. आता मुले मोकळेपणाने प्रश्न विचारतात. आत्मविश्वासाने पुढे येतात, आपले विचार मांडतात. माझ्यामध्ये आणि मुलांमध्ये आता मित्रत्वाचे नाते निर्माण झाले आहे. म्हणतात ना.. ‘मूल्ये ही शिकवावी लागत नाहीत, तर रूजवावी लागतात.’ या उपक्रमांमुळे आपसूकच ती मुलांमध्ये रुजत गेली. हसतखेळत शिकताना मूल्यवर्धन विषय मुलांच्या आवडीचा विषय झाला. शाळेत चालू असलेला हा कार्यक्रम विद्यार्थी नोंदीद्वारे पालकांपर्यंत पोहचला.पालकांच्याही खूप छान प्रतिक्रिया आल्या. काही पालकांनी तर मी चांगल्याप्रकारे शिकवित आहे, याबद्दल माझे आभार मानले. या सर्व अनुभवावरून मला एवढेच वाटते की, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केला आहे. यामुळे पुढील भावी पिढी ही संस्कारमय घडेल, देशाच्या विकासास हातभार लावेल, याबाबत शंका नाही.
-आरती गंगावणे
मूल्यवर्धन आणि माझे विद्यार्थी
-आरती गंगावणे
माझी जबाबदारी
मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना आपली जबाबदारी समजायला लागली आहे. संस्कारमूल्ये आपोआप रूजत आहेत. योग्य-अयोग्य समजायला लागले आहे. चुकीचे की बरोबर ते विद्यार्थी सांगत आहेत. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागल्या आहेत. स्वच्छता अंगी रूजत आहे. शाळेविषयी, शिक्षकांविषयी आदरभाव वाढला आहे.
मूल्यवर्धन हा विषय जितका महत्त्वाचा आहे, तितकाच फायद्याचासुद्धा आहे. आज प्रत्येक शाळेमध्ये मूल्य रूजविण्याचे काम प्रत्येक शिक्षक करीत आहे. विद्यार्थ्यांमध्ये त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येत आहे. बालवयातच योग्य ते संस्कार रूजविण्याची खरी गरज आहे.
मूल्ये रूजवावी लागतात. एखाद्या विद्यार्थ्याने चोरी केली तर त्याला ‘चोरी करू नको’ म्हणून सांगत बसण्यापेक्षा चोरी करणे योग्य की अयोग्य हे समजून सांगायला हवे. त्याचप्रमाणे मूल्यवर्धनमुळे शिक्षकांनासुध्दा एक दिशा मिळाली आहे. प्रत्येक इयत्तेचे वेगवेगळे उपक्रम एकाच पुस्तिकेत आढळून येतात. नवनवीन गोष्टी वाचून त्यावर सकारात्मक विचार करायला लावणारे प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य विचार करण्याची सवय लागते.
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदा-या समजू लागल्या आहेत. मतदान करणे ही एक जबाबदारी आहे. ते समजून देण्यासाठी वर्गस्तरावर वर्ग मंत्रीमंडळ निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी मोठ्या माणसांचे मतदान कसे असते, हे समजण्यासाठी शाळेत प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. त्यात मंत्रिमंडळासाठी इच्छूक उमेदवारांची नावे फळ्यावर लिहिण्यात आली. जसे- वर्गमंत्री, स्वच्छतामंत्री, शिक्षणमंत्री, शिस्तमंत्री, आरोग्यमंत्री, पर्यावरण मंत्री इ. पदासाठी अर्ज मागवण्यात आले. संपूर्ण वर्गासमोर निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेद्वारांची नावे लिहिण्यात आली. मतदान करण्यासाठी वर्गखोलीचे नियोजन करून, मतपेटी तयार करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थी रांगेत येऊन, बोटाला शाई लावण्याच्या टेबलजवळ येऊन थांबे. बोटाला शाई लावल्यानंतर पुढच्या टेबलावर एक उंच रिकामे खोके उमेदवाराच्या नावासमोर टिकमार्क करण्यासाठी ठेवले होते. तिथे टिकमार्क करून, चिठ्ठीची घडी घालून मतदान पेटीमध्ये चिठ्ठी टाकायची, असे करत करत संपूर्ण वर्गाचे मतदान झाल्यावर इतर विद्यार्थ्यांची मदत घेऊन निवडणूक पार पडली. इयत्ता चौथीचे विद्यार्थी मतमोजणी करत. त्यांचे मत फळ्यावरील नावासमोर लिहीत असत. संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर ज्याला सर्वात जास्त मते पडली तो वर्गप्रमुख झाला.
दोन उमेद्वारांमधून चुरशीचा सामना करत ज्याला जास्त मते, त्याची मंत्रीपदासाठी निवड ही प्रक्रिया खूप पारदर्शक पद्धतीने पार पडली. मतदान प्रक्रिया प्रत्यक्ष राबविल्यामुळे लोकशाही पद्धतीने कसे मतदान करतात, याची कल्पना विद्यार्थ्यांना आली. विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण झाली. नागरिकशास्त्र व माझ्या जबाबदाऱ्या यांची ओळख नव्याने झाली.
‘नियम पाळूया… शाळेचे नियम’ या इयत्ता पहिलीच्या मूल्यवर्धन पुस्तिकेतील गीतामधून शाळेचे व शिस्तीचे नियम विद्यार्थ्यांमध्ये रूजले आहेत. हे गीत परिपाठाच्या वेळी दररोज घेत असल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झालेला दिसून येत आहे. पूर्वी कोणाचा वाढदिवस असला की, कितीही सांगून चॉकलेटचे कागद शाळेच्या मैदानात पडलेले दिसत होते. आता या गीतामुळे एकही कागद मैदानावर दिसत नाही. एकही विद्यार्थी शाळेच्या गणवेशाशिवाय येत नाही.
‘वर्ग आपुला स्वच्छ ठेवूया,
घालूनी गणवेश शाळेत येवूया
मित्राच्या सोबत मैत्री टिकवूया
नियम पाळू या आपण नियम पाळूया
शाळेचे सारे आपण नियम पाळूया
या ओळींमुळे शाळा स्वच्छ, दप्तर स्वच्छ राहायला लागले. जे काम हजार वेळा सांगून होत नव्हते, ते फक्त या गीतामुळे सोपे झाले. ‘आपला वर्ग स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी माझी आहे’ ही भावना विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली गेली. मूल्य आपोआपच विद्यार्थ्यांमध्ये रूजली गेली आहेत.
-कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे
माझी जबाबदारी
-कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे
मूल्यवर्धन : एक गरज
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हनून संविधानातील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे, या हेतून सुरु केलेला मूल्यवर्धन कार्यक्रम प्रेरणादायी व उत्साहवर्धक आहे.
शालेय विद्यार्थ्यांना भविष्यात जबाबदार नागरिक बनण्यासाठी मूल्यांची रुजवण करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने मूल्यवर्धन हा कार्यक्रम शाळा स्तरावर अतिशय महत्त्वाचा धागा बनला आहे. या कार्यक्रमातून मुलांमध्ये ‘स्व’ची जाणीव वाढीस लागली आहे. कुटुंबातील नातेसंबंधाची जाणीव होत आहे. स्वतःपासून सुरुवात करून आपली कर्तव्ये याविषयी मुले अधिक बोलकी होत आहेत. शाळेत शिस्तीचे नियम पाळत आहेत. एकूणच मूल्यवर्धन पुस्तिकेतून भारताचा जबाबदार नागरिक आपण घडवत आहोत, याचाही आम्हांला सार्थ अभिमान वाटत आहे. या कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी मी कटिबद्ध आहे.
-दिपक गोविंदराव जायभाये
मूल्यवर्धन : एक गरज
-दिपक गोविंदराव जायभाये
हे सर्व मूल्यवर्धनमुळे घडले
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी संपूर्ण महाराष्ट्रात मूल्यवर्धन कार्यक्रमाची सन 2018-19 मध्ये अमंलबजावणी सुरु केली. त्यामध्ये वाशिम जिल्ह्याची निवड झाली, हे माझ्यासाठी काही नवीन शिकण्याची एक संधी होती.
माझी शाळा जि. प. उच्च प्राथमिक शाळा आसोला (खुर्द) ही ग्रामीण भागात असल्यामुळे, तसेच मोठ्या प्रमाणात पालकांची शिक्षणाविषयी अनास्था, त्यांचा अशिक्षितपणा यामुळे वर्गात अनेक अडचणी होत्या. विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त नसणे, वर्गात शिव्या देणे, मारामारी, भांडणे करणे, वर्गात गैरहजर राहणे अशा अनेक समस्या होत्या. अशा समस्यांचे डोंगर माझ्या पुढे उभे होते. मात्र मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर सर्वप्रथम वर्गात विद्यार्थ्यांच्या सहमतीने वर्गनियम व शांतता संकेत यांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे विद्यार्थी नियमांचे काटेकोरपणे पालन करू लागले. त्यामुळे वर्गात शांतता, स्वयंशिस्त लावण्यास मूल्यवर्धन कार्यक्रमाची खूपच मदत झाली. वर्गाचे चित्रच बदलले, विद्यार्थ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यामुळे मुलांच्या वाईट सवयी बदलल्या. ती मुले आजही नियमांचे पालन करताना दिसतात. कधीकधी मलाच प्रश्न पडतो की, वर्गात खोड्या, भांडणे, मारामाऱ्या करणारे बेशिस्त विद्यार्थी आज अगदी शिस्तीत कसे वागतात? हीच ती मुले आहेत का?
मूल्यवर्धन अंतर्गत ‘मी आणि माझ्या क्षमता’ या विभागातील ‘स्वातंत्र्य’ हे घटनात्मक मूल्य रुजविण्यासाठी व त्यांच्यात ‘स्वजाणीवा निर्माण करण्यासाठी वर्गात प्रत्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातून वर्गमंत्रिमंडळ’ निवडले. विद्यार्थ्यांनी वर्गात स्वतः प्रत्यक्ष आपल्या मतदानाचा हक्क बजावून मंत्रिमंडळाची निवड केली. अभ्यासमंत्री, आरोग्यमंत्री, सफाईमंत्री, मुख्यमंत्री हे सर्व विद्यार्थी स्वतः जबाबदारीने वर्गात वागायला लागले. आपापसात छोट्या कारणांसाठी होणारी भांडणे थांबली. विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद सुरू झाला. वर्गनियंत्रण उत्कृष्ट झाले. हे सगळे घडले ते मूल्यवर्धन कार्यक्रमामुळेच!
-रामेश्वर बेहरे
हे सर्व मूल्यवर्धनमुळे घडले
-रामेश्वर बेहरे
विद्यार्थी कृतिशील बनले
शाळेत खूप विद्यार्थी आहेत. प्रत्येकांचा स्वभाव वेगवेगळा आहे. कोणी शांत, कोणी चंचल, कोणी शाळेत उनाडक्या करणारे. अशा चंचल मुलांना, अध्ययनात गुंतवून ठेवण्यास, कृतिशील बनविण्यास मूल्यवर्धित शिक्षण फार उपयोगी पडते.
‘व्यक्ती तितक्या प्रवृत्ती’असे म्हणतात. ही गोष्ट मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलांनाही लागू पडते. प्रत्येकवेळी प्रत्येक मुलाचे अभ्यासात मन रमेलच असे नाही. खासकरून इयत्ता पहिलीतील मुले तर अगदी नवीन वातावरणात आलेली असतात. नवीन परिसर, नवीन शिक्षक, नवीन मित्र अशा वातावरणात विद्यार्थी रमला नाही तर? त्यांच्या मनात शिक्षकांविषयी भीती निर्माण झाली तर? असे प्रश्न मनाला भेडसावतात. ते शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मुले अभ्यासात रममाण व्हावीत. यासाठी मूल्यवर्धित अभ्यासक्रम फार उपयोगी ठरतो. मूल्यवर्धित उपक्रमातील पूरक खेळांत मुले रमली की, हळूहळू इतर मुलांमध्येही रमतात. त्यांची चांगली मैत्री होते. शिक्षकांविषयीची भीती नष्ट होत जाते. मुलांना खेळात रमताना इतरांची मते जाणून घेण्याची सवय नकळत लागते. इतरांचा आदर करण्यास लागतात. रंगकम, योगासने, छोटेछोटे खेळ, शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा उपक्रम अशा विविध कामांत मुले रमली की, मग वर्ग कसा शांत झालेला दिसतो. मुले खेळून दमली की, गोंधळ न करता आपण दिलेली अध्ययन अनुभव आत्मसात करतात. यातूनच त्यांना वर्गात शांत बसण्याची सवय लगते. मुलांना गाणी, गोष्टी, परिसरातील व्यावसायिक व्यक्तींच्या नक्कल करणे हे मुलांना फार आवडते. याचा आधार घेऊन इयत्ता पहिलीतील मुलांना ‘मी आणि माझे मित्र’, इयत्ता तिसरीतील ‘वासाची किंमत’ असे कितीतरी अध्ययन अनुभव सहज आत्मसात करण्यास मदत होते. वेगवेगळ्या लोकांच्या स्वभावाचे दर्शन घडवून आणता येते. सध्याची शिक्षकांच्या संख्यांची अवस्था फारच वाईट आहे. प्रत्येक शिक्षकाला दोन वर्ग शिकवावेच लागतात. हे करत असताना मूल्यवर्धित शिक्षणातून दिलेले संस्कार मुलांना शांत व कृतिशील बनविण्यास फार उपयोगी पडतात याचा अनुभव स्वतः घेतला आहे.
-अमरपाल पाढेण
विद्यार्थी कृतिशील बनले
-अमरपाल पाढेण
विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला आहे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यांच्यात एकीची भावना निर्माण झाली असून इतरांना मदत करण्याची भावना निर्माण झाली आहे. शाळा व स्वत:बद्दलचे स्वच्छतेचे नियम पाळू लागले आहेत.
-भीमराव चव्हाण
विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण झाला आहे
-भीमराव चव्हाण
मुलांमधील बदल
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्याकडून राबविण्यात येत असलेला मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेसाठी अत्यंत चांगला आहे. मुलांमध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत.
मूल्यवर्धन हा कार्यक्रम सुरु केल्यापासून मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहेत. या कार्यक्रमामुळे मुले हसतखेळत शिकत आहेत. मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होत आहे. मुले स्वतःहून चित्रवर्णन करतात. त्यांच्या विचारशक्तीला चालना मिळत आहे. समाजपयोगी मूल्ये आत्मसात करताना आढळतात. मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण होत आहे. सारांश रूपाने असे सांगता येईल की, मूल्यवर्धन हा कार्यक्रम मुले, शाळा, शिक्षक, समाज यांच्यासाठी उपयुक्त कार्यक्रम आहे.
-विलास गाडगे
मुलांमधील बदल
-विलास गाडगे
मूल्यवर्धन काळाची गरज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सार्सी या ठिकाणी मूल्यवर्धन उपक्रम सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात आम्ही प्रत्यक्षपणे राबविला असता, आम्हांला आलेले अनुभवकथन करीत आहोत. मूल्यशिक्षण उपक्रम अप्रत्यक्षपणे आपण आजपर्यंत राबवित आलेलो आहोत, परंतु शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने त्याला प्रत्यक्ष पुस्तकरुपी आकार देऊन उपक्रमांमध्ये नेमकेपणा आणला आहे. वर्गात प्रत्यक्ष कृतिपुस्तिकांचा उपयोग केल्यामुळे अध्यापनात नेमकेपणा आला आहे. पाठ्यक्रमाची सांगड घातल्यामुळे अध्यापन सरस होऊ लागले, बालस्नेही होऊ लागले. विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल दिसू लागले आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमातील कृतियुक्त, मनोरंजनात्मक खेळांमुळे विद्यार्थ्यांना फार आनंद मिळत असून, त्यांचा शाळेतील उत्साह वाढत आहे. मुलांना शाळेविषयी गोडी निर्माण झाली आहे. त्यांना शाळेत येण्यास आनंद वाटू लागला आहे. एवढेच नव्हे तर, खेळातील नियम विद्यार्थी स्वतः तयार करतात. वर्गनियमांमुळे त्यांच्यात स्वयंशिस्त निर्माण झाली आहे. विद्यार्थी उपस्थिती वाढली. रिकाम्या वेळेत करावयाच्या उपक्रमांमध्ये विद्यार्थी रममाण होत आहेत.
शाळेत अनेक सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे. त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास वाढीस लागला आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत आम्ही आमच्या स्तरावर काही वेगळे उपक्रम राबविले आहेत. जसे की, बाल आनंद मेळावा, क्षेत्रभेट इ. याला विद्यार्थी व पालकांचा भरभरून सहभाग आम्हांला मिळाला. ते मूल्यवर्धन उपक्रमामुळेच शक्य झाले. आमच्या असे निदर्शनास आले की, शाळेतील काही मुले शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना आपल्या पाण्याच्या बॉटलमधील उरलेले पाणी ते शाळेच्या परिसरामधील झाडांना घालत आहेत. म्हणजेच त्यांच्यात पाण्याच्या महत्त्वाची जाणीव निर्माण झालेली आहे. असाही एक अनुभव आला की, काही विद्यार्थी सकाळी शाळेला येत असताना आपल्या आई-वडिलांना नमस्कार करून ते शाळेला येऊ लागले आहेत, असे पालक आम्हांला येऊन सांगतात. ते म्हणतात, “मूल्यवर्धनमुळे आमच्या मुलांमध्ये बदल झालेला आहे.” खरोखरच मूल्यवर्धन सुरु केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्यघटनेतील मूल्ये रुजण्यास अप्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे. हा कार्यक्रम जर असाच शाळास्तरावर सुरू राहिला, तर देशाला जबाबदार, शिस्तप्रिय आणि नियमांची जाण असलेले सुजाण नागरिक मिळतील.
-विलास सोनटक्के
मूल्यवर्धन काळाची गरज
-विलास सोनटक्के
गुणवान सर्वत्र पुज्यते
मूल्य ही शिकवावी लागत नाहीत, तर ती रुजवावी लागतात. जगात शांती निर्माण करणारी एकच भूमी ती म्हणजे भारत भूमी. माणसात संस्काराची मूल्ये रूजविण्याचे महान कार्य आईच करू शकते. म्हणूनच आपल्या देशाला आपण भारतमाता म्हणतो.
महापुरुषांचे प्रयत्न : ज्या ज्या वेळी मानवाचे पतन झाले, त्या त्या वेळी महापुरुषांनी आपल्या जीवनाचा आदर्श पुढे ठेऊन माणसाला जीवन जगण्याची दिशा देऊन समाजात एक आदर्श उभा केला. माणसाची खरी किंमत ही धनाने होत नाही, तर त्याच्यात असणाऱ्या मूल्यावरून होते, संस्काराने होते.
निसर्गाचा नियम : उदय विकास आणि अस्त हा निसर्गाचा नियम आहे आणि तो मानवालासुद्धा लागू पडतो. एकेकाळी या भूमीतील माणूस मूल्यांच्या बाबतीत उच्च शिखरावर होता. आज मात्र तो मूल्यांचा खजिना हरवून बसला. या बिघडलेल्या परिस्थितीवर बोलणारे खूप आहेत, परंतु प्रत्यक्ष कृती केली ती शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने. त्यांनी काळाची पावले ओळखली आणि हा कृतिकार्यक्रम दिला. त्यांनी ओळखले की, शिक्षकच समाज घडवू शकतात. आडात असेल तरच पोहऱ्यात येईल. मी जर मूल्ये माझ्यात रुजविली, तर त्याचे प्रत्यक्ष वर्धन माझ्या विद्यार्थ्यांमध्ये घडवू शकतो. मूल्यवर्धन कार्यक्रमाने माझ्यात वैयक्तिकरित्या खूप बदल झाला आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा शाळेतील विद्यार्थ्यांना झाला आणि होताना दिसत आहे. हेच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे फलित आहे.
-उमेश गहुले
गुणवान सर्वत्र पुज्यते
-उमेश गहुले
मूल्यवर्धन काळाची गरज
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सार्सी या ठिकाणी मूल्यवर्धन कार्यक्रम सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात आम्ही प्रत्यक्षपणे राबविला असता, आम्हांला आलेले अनुभव कथन करीत आहे. मूल्यशिक्षण अप्रत्यक्षपणे आपण आजपर्यंत करीत आलेलो आहोत, परंतु शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने त्याला प्रत्यक्ष पुस्तक रुपी आकार देऊन उपक्रमांमध्ये नेमकेपणा आणला आहे. वर्गात प्रत्यक्ष कृतिपुस्तिकेचा उपयोग केल्यामुळे अध्यापनात नेमकेपणा आला आहे. पाठ्यक्रमाची सांगड घातल्यामुळे अध्यापन सरस होऊ लागले, बालस्नेही होऊ लागले. विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल दिसू लागले आहेत.
मूल्यवर्धन उपक्रमातील कृतियुक्त, मनोरंजनात्मक खेळांमुळे विद्यार्थ्यांना फार आनंद मिळत असून, त्यांचा शाळेतील उत्साह वाढत आहे. मुलांना शाळेविषयी गोडी लागली आहे. त्यांना शाळेत येण्यास आनंद वाटू लागला आहे. एवढेच नव्हे तर खेळातील नियम विद्यार्थी स्वतः तयार करतात. वर्गनियमांमुळे त्यांच्यात स्वयंशिस्त निर्माण झाली आहे. विद्यार्थी उपस्थिती वाढली. रिकाम्या वेळेत करावयाच्या उपक्रमामुळे विद्यार्थी रममाण झाले आहेत. शाळेत अनेक सहशालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे. तसेच त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास वाढीस लागला आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत आम्ही आमच्या स्तरावर काही वेगळे उपक्रम राबविले आहेत. जसे की, बाल आनंद मेळावा, क्षेत्रभेट. याला विद्यार्थी व पालकांचा भरभरून सहभाग आम्हांला मिळाला तो मूल्यवर्धन उपक्रमामुळेच. तसेच आमच्या असे निदर्शनास आले की, शाळेतील काही मुले शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना आपल्या पाण्याच्या बॉटलमधील उरलेले पाणी ते शाळेच्या परिसरामधील झाडांना घालत आहेत. म्हणजेच त्यांना पाण्याचे महत्त्व समजले आहे. काही विद्यार्थी सकाळी शाळेला येत असताना आपल्या आई-वडिलांना नमस्कार करून ते शाळेला येऊ येतात असे काही पालक आम्हांला येऊन सांगतात. ते म्हणतात, मूल्यवर्धनमुळे आमच्या मुलांमध्ये बदल झालेला आहे. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये राज्यघटनेतील मूल्ये रुजण्यास अप्रत्यक्षपणे सुरुवात झालेली आहे. हा कार्यक्रम जर असाच शाळास्तरावर सुरू राहिला, तर देशाला जबाबदार, शिस्तप्रिय आणि नियमांची जाण असलेला सुजाण नागरिक बनविण्यास मूल्यवर्धन नक्कीच उपयोगी पडेल.
-ज्ञानदेव लोडम
मूल्यवर्धन काळाची गरज
-ज्ञानदेव लोडम
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये झालेला बदल
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये झालेला बदल
मूल्यवर्धन कार्यक्रमाला आमच्या मंगरूळ पीर तालुक्यात सन 2018-19 पासून सुरुवात झाली. सर्वप्रथम आमच्या शाळेतून एक प्रेरक अशा पद्धतीने केंद्रातून दोन प्रेरक निवडून त्यांना तालुकास्तरावर चार दिवशीय प्रशिक्षण देऊन आपल्या स्वतः शाळेवर दोन महिने सराव करण्यासाठी वेळ दिला. आमच्या तालुका समन्वयक यांनी दोन महिने सराव करून प्रत्यक्ष वर्गनिरीक्षण केले. त्यानंतर केंद्रातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व शिक्षकांना दोन टप्प्यांमध्ये तीन-तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर पहिली ते चौथीच्या प्रत्येक वर्गावर प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांनी प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. काही दिवसानंतर आम्हांला त्यामध्ये काही बदल दिसून आला. सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गात वर्गनियम, अपेक्षाचे झाड भिंतीला चिकटवले. विद्यार्थ्यांकडून बनवून घेतलेल्या वर्गनियमांमुळे 5 ते 20 दिवसांनंतर आम्हांला खूप चांगल्या प्रकारे बदल झाले असे आढळून आले. त्यानंतर आम्ही मूल्यवर्धन कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये कशापद्धतीने रुजत आहे, हे बघितले. त्यांच्यामध्ये झालेले बदल आम्हांला इतर विषयातही खूप फायद्याचे ठरले. यामुळे विद्यार्थी मोठ्या व लहान व्यक्तींशी आदराने वागू लागले. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली. सर्व विद्यार्थी गणवेशात वेळेवर शाळेत येऊ लागले. शाळेत आल्यानंतर सर्व विद्यार्थी एकमेकांना मदत करत होते. लहान-मोठ्यांचा आदर करत होते. आम्ही त्यांना आपल्या घरातील सर्व व्यक्तींशी कशा पद्धतीने वागावे ते सांगितले. त्यामुळे ते विद्यार्थी आपल्या घरी आपल्या पालकांना शाळेत मूल्यवर्धन विषयात कायकाय शिकवितात हे घरी आल्यानंतर सांगत होते. आम्हांला मूल्यवर्धन या विषयाचा खूप फायदा झाला.
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत उपक्रम वाढविल्यामुळे आमचे सर्व शिक्षक व विद्यार्थी खूष आहेत. कारण गेल्यावर्षी चौथीपर्यंत ते असल्यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला नाही. यावर्षी आम्ही त्याचा फायदा खूप चांगल्या प्रकारे करून घेऊ. मूल्यवर्धनविषयी आम्हांला आमच्या ऑफिसद्वारे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले जाते. त्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्याची अंमलबजावणी करीत असतो. तालुका समन्वयक हे आमच्या शाळेला वेळोवेळी भेटी देऊन वर्गनिरीक्षण करतात. ते योग्य असे मार्गदर्शन करतात. त्यामुळे आम्ही उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवित आहोत.
-मोहन गांजारे
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये झालेला बदल
-मोहन गांजारे
स्वतःचे महत्त्व
मी संध्या पिंजरकर, जि. प. प्राथ. शाळा इचोरी येथे वर्ग पहिला व दुसरा शिकविते. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण झाली. मुले या तासिकेसाठी खूप उत्सुक असतात. त्यांना त्यामध्ये नावीन्य वाटते.
मूल्यवर्धन पुस्तिकेमधील सगळेच उपक्रम मला व माझ्या विद्यार्थ्यांना खूप आवडतात. आम्ही वर्गनियम, आनंदी, दुःखी, रागीट चेहरे, भाजी-पोळीचा संवाद, माझे मत असे अनेक उपक्रम अगदी उत्साहाने घेतले. यामुळे मुले नाट्यीकरण करण्यास शिकली. त्यांचा आत्मविश्वास वाढला. माझे मत हा भाग तर मुलांना फारच आवडला. कारण मी या उपक्रमात निवडणुकीप्रमाणे वातावरण निर्मिती केली होती. काही मुलांना मतदान अधिकारी केले. काहीजण मतदार झाले. कागदावर मत देऊन ती चिठ्ठी मतपेटीमध्ये टाकली. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद मला दिसला. त्यांना स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार मिळाला. मुले तर मला तो उपक्रम परत घेण्यासाठी वारंवार म्हणू लागली. मी त्याची पूर्ण व्हिडिओ क्लिप तयार केली. खरंच ध्येयाचा ध्यास असला की कामाचा त्रास वाटत नाही. त्याप्रमाणे मुलांचा आनंद, उत्साह, आत्मविश्वास वाढविणे आणि तेही हसतखेळत हेच मूल्यवर्धनचे खरे प्रयोजन आहे, असे मला वाटते.
-संध्या पिंजरकर
स्वतःचे महत्त्व
-संध्या पिंजरकर
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या बदलांविषयी माहिती सविस्तरपणे सांगत आहे.
पंचायत समिती मंगरूळपीर, विषय साधनव्यक्ती श्री. प्रकाश धनवलकर तालुका मंगरूळपीर मूल्यवर्धन नोडल अधिकारी म्हणून माझी निवड डीआयइसीपीडी वाशिम येथून सन 2018 साली करण्यात आली. त्यानंतर तालुकास्तरावर कशा पद्धतीने मूल्यवर्धनचे काम करायचे यासाठी आम्हांला प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून मी आणि मूल्यवर्धन तालुका समन्वयक मिळून दोन शिक्षकांची प्रेरक म्हणून निवड केली. त्यानंतर तालुकास्तरावर त्यांना चार दिवसीय प्रशिक्षण देऊन दोन महिने आपल्या शाळेवर प्रात्यक्षिक स्वरुपात राबविण्यात सांगितले. त्यांचे वर्गनिरीक्षण करण्यासाठी तालुका समन्वयक आणि मी वेळोवेळी भेटी दिल्या. भेटी दिल्यानंतर आम्हांला विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल थोड्याफार प्रमाणात दिसून आला. त्यानंतर सर्व शिक्षकांचे केंद्रस्तरीय प्रशिक्षण लावण्यात आले व त्यांना तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपापल्या शाळेमध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारसी येथे मला आलेला अनुभव थोडक्यात स्पष्ट करीत आहे.
या शाळेवर असलेले श्री. सोनटक्के सर यांची प्रेरक म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे खूप काही बदल घडवून आणले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने वागावे, मोठ्यांचा आदर कसा करावा, एकमेकांशी कशा पद्धतीने रहावे, वडिलधाऱ्या माणसांचा आदर का करावा, बनविलेले वर्गनियम विद्यार्थ्यांमध्ये काय बदल घडवून आणू शकतात ते मला त्या शाळेमध्ये पाहायला मिळाले. खरोखर या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन रुजलेले दिसून आले. त्या शाळेमधील विशेष बाब म्हणजे सर्व शिक्षक ‘मूल्यवर्धन काळाची गरज आहे’ असे सांगत होते.
आमचं भाग्य की, आम्हांला मूल्यवर्धन उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजविता येतात. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांच्या टीमचे आम्ही खूप खूप आभार मानतो. मूल्यवर्धनमुळे जी मूल्ये लोप पावत चालली होती, ती मूल्ये विद्यार्थ्यांना बालवयात जर मिळाली, तर तो विद्यार्थी भविष्यात सुजाण नागरिक घडू शकतो, हे आम्हांला यामधून दिसून आले. विशेष बाब म्हणजे यावर्षी मूल्यवर्धन पुढचे पाऊल यासाठी आमच्या मंगरूळपीर तालुक्याची निवड करण्यात आली असून त्यासाठी चार केंद्रांची निवड करण्यात आली. त्यासाठी एक तालुका समन्वय यांची निवड करण्यात आली आहे. मूल्यवर्धन हा उपक्रम वर्गापुरता नसून तो सगळ्यांसाठी आहे. मी स्वतः पुणे येथे दोन वेळा तसेच नागपूर येथे आयोजित विभागीय प्रशिक्षणाला उपस्थित होतो. त्यामुळे मला यामध्ये अधिक प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली.
-प्रकाश धनवलकर
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-प्रकाश धनवलकर
मुलांमधील मैत्रीत वाढ
मुलांमध्ये सतत वाद भांडणं होतं होती. एकमेकांना शिव्यासुद्धा ते द्यायचे, पण मूल्यवर्धन उपक्रम सुरु झाला, तेव्हापासून त्यांच्या वागण्यात अमुलाग्र बदल झाला.
सुरुवातीला काही दिवस मुलांचे एकमेकांसोबत वागणे बघितल्यावर मला मोठा प्रश्न पडला की, या मुलांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, सहकार्याची भावना कशी वाढविता येईल. मी ऑक्टोबर 2018 मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण पूर्ण केले आणि या प्रशिक्षणातच मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. प्रशिक्षणानंतर सर्वप्रथम अनौपचारिक गोष्टींच्या माध्यमातून मी सुरुवात केली. प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली. त्यानंतर आपला परिचय, आपल्या मित्राचा परिचय, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचा परिचय, माझ्या मित्रांमध्ये असणाऱ्या काही चांगल्या गोष्टी इत्यादी उपक्रम आठवड्यानुसार घेत गेलो. त्यामुळे मुलांना एकमेकांबद्दल आदर, प्रेम निर्माण झाले. मुले आपल्या मित्रांना समजून घेऊ लागली. शिव्या देणे, घाणेरडे बोलणे आपोआप कमी होत होत आज पूर्ण बंद झाले.
-सचिन खूपसे
मुलांमधील मैत्रीत वाढ
-सचिन खूपसे
शाळेमधील झालेले बदल
शाळेमधील झालेले बदल याविषयी यशोगाथा खालीलप्रमाणे-
माझ्या वर्गातील तसेच शाळेतील बदल याबद्दल मला आलेले अनुभव कथन करीत आहे. आमच्या मंगरूपीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मूल्यवर्धनची अंमलबजावणी 2018 पासून करण्यास सुरुवात झाली. माझी शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे.
मला आलेले अनुभव : माझं प्रशिक्षण 2018 ला झालेले आहे. त्यानंतर आम्ही आमच्या वर्गावर मूल्यवर्धन कशा पद्धतीने राबवावेत यासाठी या प्रशिक्षणामध्ये योग्यप्रकारे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शाळेत आल्यावर वर्गामध्ये वर्गनियम, शांतता संकेत यांचा वापर करण्यास सुरुवात केली. कालांतराने 15 ते 20 दिवसांनी आम्हांला मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल दिसण्यास सुरुवात झाली.
आम्ही वर्गनियम तसेच शांतता संकेत यांचा वापर संपूर्ण शाळेमध्ये करण्यास सुरुवात केली. परिपाठ घेत असताना शांतता संकेताचा वापर करणे व त्याचा विद्यार्थ्यांनी योग्यवेळी वापर करणे सुरू केले. परिपाठाच्या वेळी काही विद्यार्थ्यांची बडबड सुरु झाली की, आपण न सांगताही विद्यार्थी शांतता संकेताचा वापर करताना दिसले. जेवण करताना शांतता संकेतचा वापर करताना दिसले. विशेष बाब म्हणजे आम्हांला विद्यार्थ्यांना वैयक्तिकपणे जे सांगावे लागत होते, ते आम्ही शांतता संकेताचा वापर करून विद्यार्थ्यांना सांगण्यास सुरुवात केली. त्याचा आम्हांला खरोखरच फायदा झाला.
आवश्यक तेव्हा तालुका समन्वयक यांचे मार्गदर्शन घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या शाळेतील एका प्रेरकाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आम्हांला वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळत होते. आम्ही त्याचा पूर्णपणे फायदा करून घेतला. यावर्षी आमच्या केंद्रामध्ये नव्याने सुरू झालेल्या ‘समग्र शाळा दृष्टिकोन’ यासाठी आमच्या केंद्राची निवड झाली, ही आमच्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आम्ही मूल्यवर्धन राबवित होतो, त्याच पद्धतीने ‘समग्र शाळा दृष्टीकोन’ हा कार्यक्रम राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आम्हांला आमचे अनुभवकथन करण्यासाठी संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप आभार.
-संतोष मुळे
शाळेमधील झालेले बदल
-संतोष मुळे
स्वतःचे महत्त्व
मी संध्या पिंजरकर, जि. प. प्राथ. शाळा इचोरी येथे वर्ग पहिला व दुसरा शिकविते. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण झाली. मुले या तासिकेसाठी खूप उत्सुक असतात. त्यांना त्यामध्ये नावीन्य वाटते.
मूल्यवर्धन पुस्तिकेमधील सगळेच उपक्रम मला व माझ्या विद्यार्थ्यांना खूप आवडतात. आम्ही वर्गनियम, आनंदी, दुःखी, रागीट चेहरे, भाजी-पोळीचा संवाद, माझे मत असे अनेक उपक्रम अगदी उत्साहाने घेतले. यामुळे मुले नाट्यीकरण करण्यास शिकली. त्यांचा आत्मविश्वास वाढला. माझे मत हा भाग तर मुलांना फारच आवडला. कारण मी या उपक्रमात निवडणुकीप्रमाणे वातावरण निर्मिती केली होती. काही मुलांना मतदान अधिकारी केले. काहीजण मतदार झाले. कागदावर मत देऊन ती चिठ्ठी मतपेटीमध्ये टाकली. मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आंनद मला दिसला. त्यांना स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार मिळाला. मुले तर मला तो उपक्रम परत घेण्यासाठी वारंवार म्हणू लागली. मी त्याची पूर्ण व्हिडिओ क्लिप तयार केली. खरंच ध्येयाचा ध्यास असला की कामाचा त्रास वाटत नाही. त्याप्रमाणे मुलांचा आनंद, उत्साह, आत्मविश्वास वाढविणे आणि तेही हसतखेळत हेच मूल्यवर्धनचे खरे प्रयोजन आहे, असे मला वाटते.
-संध्या पिंजरकर
स्वतःचे महत्त्व
-संध्या पिंजरकर
शाळेमधील झालेले बदल
शाळेमधील झालेले बदल याविषयी यशोगाथा खालीलप्रमाणे-
माझ्या वर्गातील तसेच शाळेतील बदल याबद्दल मला आलेले अनुभव कथन करीत आहे. आमच्या मंगरूपीर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मूल्यवर्धनची अंमलबजावणी 2018 पासून करण्यास सुरुवात झाली. माझी शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा आहे.
मला आलेले अनुभव : माझं प्रशिक्षण 2018 ला झालेले आहे. त्यानंतर आम्ही आमच्या वर्गावर मूल्यवर्धन कशा पद्धतीने राबवावेत यासाठी या प्रशिक्षणामध्ये योग्यप्रकारे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शाळेत आल्यावर वर्गामध्ये वर्गनियम, शांतता संकेत यांचा वापर करण्यास सुरुवात केली. कालांतराने 15 ते 20 दिवसांनी आम्हांला मुलांमध्ये बऱ्याच प्रमाणात बदल दिसण्यास सुरुवात झाली.
आम्ही वर्गनियम तसेच शांतता संकेत यांचा वापर संपूर्ण शाळेमध्ये करण्यास सुरुवात केली. परिपाठ घेत असताना शांतता संकेताचा वापर करणे व त्याचा विद्यार्थ्यांनी योग्यवेळी वापर करणे सुरू केले. परिपाठाच्या वेळी काही विद्यार्थ्यांची बडबड सुरु झाली की, आपण न सांगताही विद्यार्थी शांतता संकेताचा वापर करताना दिसले. जेवण करताना शांतता संकेतचा वापर करताना दिसले. विशेष बाब म्हणजे आम्हांला विद्यार्थ्यांना वैयक्तिकपणे जे सांगावे लागत होते, ते आम्ही शांतता संकेताचा वापर करून विद्यार्थ्यांना सांगण्यास सुरुवात केली. त्याचा आम्हांला खरोखरच फायदा झाला.
आवश्यक तेव्हा तालुका समन्वयक यांचे मार्गदर्शन घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे आमच्या शाळेतील एका प्रेरकाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आम्हांला वेळोवेळी त्यांचे मार्गदर्शन मिळत होते. आम्ही त्याचा पूर्णपणे फायदा करून घेतला. यावर्षी आमच्या केंद्रामध्ये नव्याने सुरू झालेल्या ‘समग्र शाळा दृष्टिकोन’ यासाठी आमच्या केंद्राची निवड झाली, ही आमच्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. ज्या पद्धतीने आम्ही मूल्यवर्धन राबवित होतो, त्याच पद्धतीने ‘समग्र शाळा दृष्टीकोन’ हा कार्यक्रम राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. आम्हांला आमचे अनुभवकथन करण्यासाठी संधी मिळाली, त्याबद्दल खूप खूप आभार.
-संतोष मुळे
शाळेमधील झालेले बदल
-संतोष मुळे
मुलांमधील मैत्रीत वाढ
मुलांमध्ये सतत वाद भांडणं होतं होती. एकमेकांना शिव्यासुद्धा ते द्यायचे, पण मूल्यवर्धन उपक्रम सुरु झाला, तेव्हापासून त्यांच्या वागण्यात अमुलाग्र बदल झाला.
सुरुवातीला काही दिवस मुलांचे एकमेकांसोबत वागणे बघितल्यावर मला मोठा प्रश्न पडला की, या मुलांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम, सहकार्याची भावना कशी वाढविता येईल. मी ऑक्टोबर 2018 मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण पूर्ण केले आणि या प्रशिक्षणातच मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. प्रशिक्षणानंतर सर्वप्रथम अनौपचारिक गोष्टींच्या माध्यमातून मी सुरुवात केली. प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली. त्यानंतर आपला परिचय, आपल्या मित्राचा परिचय, त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचा परिचय, माझ्या मित्रांमध्ये असणाऱ्या काही चांगल्या गोष्टी इत्यादी उपक्रम आठवड्यानुसार घेत गेलो. त्यामुळे मुलांना एकमेकांबद्दल आदर, प्रेम निर्माण झाले. मुले आपल्या मित्रांना समजून घेऊ लागली. शिव्या देणे, घाणेरडे बोलणे आपोआप कमी होत होत आज पूर्ण बंद झाले.
-सचिन खूपसे
मुलांमधील मैत्रीत वाढ
-सचिन खूपसे
विद्यार्थ्यांमधील बदल
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल याविषयी माझे मनोगत.
परिषद जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोराळा खुर्द केंद्र कोठारी पंचायत समिती मंगरूळपीर जिल्हा वाशिम माझी निवड प्रेरक म्हणून 2018 साली करण्यात आली. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेरक म्हणून आलो, तेव्हा वाटले की, यात काय नवीन? हे तर आपण आपल्या शाळेत, दैनंदिन जीवनामध्ये नैतिक मूल्यांचा समावेश करत असतो. जसं प्रशिक्षण पुढे जात होतं, तसा फरक लक्षात यायला लागला. मुलांच्या आवडीनुसार आणि सहशालेय खेळानुसार पटायला लागले. प्रशिक्षण घेतल्यानंतर आमच्या शाळेवर आम्ही प्रत्यक्ष दोन महिने सराव केला. तो करत असताना आमचे वर्गनिरीक्षण करण्यासाठी तालुका समन्वयकांच्या वेळोवेळी भेटी होत होत्या. आमच्या झालेल्या चुका तासिका झाल्यानंतर ते आम्हांला वैयक्तिक सांगत होते. त्यानंतर आम्ही त्या चुका दुरुस्त करून उपक्रम घेण्यास सुरुवात केली.
कालांतराने आम्ही केंद्रावरील शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर आमच्या संपूर्ण तालुक्यातील शाळांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली. नाविन्यपूर्ण गोष्टी म्हणजे वर्गनियम बनविणे, अपक्षांचे झाड बनविणे, शांतता संकेताचा वापर करण्यास सुरुवात केली. त्या पद्धतीनेच विद्यार्थीही नियमांचे पालन, शांतता संकेताचा वापर करण्यास सुरुवात करू लागले. यामधून आम्हांला खरोखरच मदत होण्यास सुरुवात झाली. संविधानातील मूल्ये लोप पावत चालली होती, ती मुलांमध्ये रूजण्यास मदत झाली. मूल्ये ही शिकविली जात नाहीत, तर ती रुजविली जातात हे आम्हांला मूल्यवर्धनमधून शिकण्यास व रुजविण्यास मदत झाली.
यावर्षीसुद्धा आम्ही उपक्रम राबवित आहोत. विशेष बाब म्हणजे आमच्या तालुक्यात यावर्षी ‘समग्र शाळा दृष्टिकोन’ हा मूल्यवर्धनचे पुढचे पाऊल म्हणून राबविला जात आहे, ही आमची भाग्याची बाब आहे. आम्ही केलेले कार्य पूर्ण होताना आम्हांला दिसत आहे. ज्या पद्धतीने आम्ही हा कार्यक्रम राबविला, त्याच पद्धतीने समग्र शाळा दृष्टिकोन हाही कार्यक्रम राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. मुथ्था सरांचे आभार मानावेसे वाटतात. कारण जी मूल्ये लोप पावत चालली होती, ती विद्यार्थ्यांमध्ये प्राथमिक जीवनामध्ये कशी रुजविता येतील, त्यासाठी त्यांनी मूल्यवर्धन हा कार्यक्रम सुरू केला. त्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व त्यांच्या सर्व टीमचे खूप खूप आभार.
-सुखदेव धनकर
विद्यार्थ्यांमधील बदल
-सुखदेव धनकर
विद्यार्थ्यांमधील बदल
मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल झाले आहेत. शालेय अध्ययन-अध्यापन कार्य आता खेळीमेळीच्या वातावरणात होत आहे. शिक्षणासोबतच संस्काराने परिपूर्ण अशी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवताना आनंद होत आहे. माझ्या शाळेत हा उपक्रम राबवताना झालेले परिवर्तन मी सविस्तरपणे मांडत आहे.
मूल्यवर्धन प्रक्रियेअंतर्गत 2018 साली माझी प्रेरक म्हणून निवड झाली. मूल्यवर्धन कार्यक्रम मला फारच आवडला. ज्यावर संपूर्ण समाजाचा पाया अवलंबून आहे अशी महत्त्वपूर्ण नैतिक मूल्ये समाजात रुजणे अतिशय आवश्यक आहे. ती रुजविण्यासाठी सर्वांगीण पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळे समाजाचे अधःपतन होणार नाही. विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. म्हणून शालेय स्तरावर मूल्यवर्धन उपक्रमाची नितांत गरज दिसून येते. कुटुंबातून मुलांना संस्कार देण्याचे कार्य आता कमी प्रमाणावर दिसून येते. त्यामुळे शालेय परिसरात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षकांवर अवलंबून आहे.
अशा परिस्थितीत हा मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा दिसून येतो. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी प्रेरकांच्या भूमिकेतून आलो, तेव्हा मनात अनेक शंका होत्या. मात्र प्रशिक्षण घेतल्यानंतर या कार्यक्रमाचे महत्त्व समजले. या प्रशिक्षणात शांतता संकेत समजून घेतला, नियमाचे महत्त्व समजले. मुले स्वतःचे नियम स्वतः तयार करू लागले. शालेय वातावरण बदलले. अध्ययन-अध्यापन प्रभावी आणि निकोप होऊ लागले. मुलांमध्ये हसतखेळत मूल्ये रुजविली जाऊ लागली. माझ्या शाळेतील मुले आता प्रभावीपणे शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबतच संस्कारांचे सिंचन होत आहे. शालेय परिसर आणि वातावरण वेगाने बदलत आहे. पालकांचा सहभाग वाढत आहे. मला अध्यापन करताना आनंद वाटत आहे. मुलांमध्ये राष्ट्रीय मूल्यांची जोपासना होत आहे. मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे दृष्टी बदलली आहे. मुलांना शालेय परिसरात वावरताना भीती राहिली नाही. मुलांना माझ्याशी संवाद साधताना आनंद वाटतो. मलाही शैक्षणिक कार्य करताना आता आनंद वाटत आहे.
-अनिल धोटे
विद्यार्थ्यांमधील बदल
-अनिल धोटे
विद्यार्थ्यांमधील बदल
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल याबद्दल माझे वैयक्तिक मत खालीलप्रमाणे-
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दाभा, केंद्र दाभा. माझी निवड प्रेरक म्हणून केंद्रामधून 2018 ला करण्यात आली. आतापर्यंत राबविलेल्या कार्यक्रमांपैकी मूल्यवर्धन सर्वोत्कृष्ट कार्यक्रम असावा, असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण मूल्यवर्धन आल्यापासून मी स्वतःमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदलाची नोंद घेत आहे. विद्यार्थ्यांना त्यांची जबाबदारी व कर्तव्ये यांची जाणीव झाली. त्यामध्ये झालेले बदल खालीलप्रमाणे
आपले काम वेळेवर करणे, कामाचे नियोजन करणे, काम करताना लागणाऱ्या साहित्यांचे नियोजन करणे, नीटनेटकेपणाने काम करणे, इतरांना सहकार्य करणे. मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना मी जेव्हा पाचवीमधील ‘माझे दैनंदिन वेळापत्रक’ हा उपक्रम घेतला, त्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थी वागतात की नाही, याची जेव्हा घरी जाऊन शहानिशा केली, तेव्हा त्यांच्या पालकांनी मला सांगितले की, माझा मुलगा आता त्याने तयार केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उठतो, अभ्यास करतो, जेवण करतो, खेळतो. त्याच्यामध्ये सहकार्याची भावना वाढत आहे. तुम्ही राबवित असलेल्या कार्यक्रम खरंच खूप चांगला आहे. हे ऐकून मला खूप समाधान वाटले. मूल्यवर्धन कार्यक्रम जर निरंतर चालू राहिला, तर शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये अधिक सकारात्मक बदल नक्कीच घडेल.
-अनिल खाडे
विद्यार्थ्यांमधील बदल
-अनिल खाडे
मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल मनोगत
मी तीन दिवसीय मूल्यवर्धन प्रशिक्षण २०१८ मध्ये पूर्ण केले होते. त्यामुळे मला प्रेरणा मिळाली. शाळेत उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचे सर्वप्रथम नियोजन केले. त्याप्रमाणे सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन तासिकेत विभागणी केली. सन २०१८ मध्ये माझ्याकडे दुसरी व चौथी हे दोन वर्ग होते. मी इतर विषयांसोबत मूल्यवर्धन उपक्रमाची सांगड घालून व विद्यार्थी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून सर्वप्रथम वर्गनियम विद्यार्थी सहभातून करून घेतले. विद्यार्थी त्या नियमाचे काटेकोर पालन करत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणले. उपक्रमातील गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभाग घेत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला.
जोडीचर्चा, गटचर्चा, खेळ या उपक्रमांमुळे विद्यार्थी मूल्यवर्धन तासिकेत आवडीने सहभाग घेत होते. खेळामुळे शिक्षकांबद्दलची भीती नाहीशी झाली होती. सर्व विद्यार्थी उत्तरे देऊ लागले. माझे नातेसंबंध, माझी ओळख विद्यार्थी सांगू लागले. काही विद्यार्थी इंग्रजीतून ओळख सांगत होते.
विद्यार्थी उपक्रम पुस्तकेतून उपक्रम घेण्याचा उत्साह वाढू लागला. आता सर्व विद्यार्थी बोलू लागले. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थी नीटनेटके राहू लागले. विद्यार्थी -विद्यार्थी सहकार्य भावना निर्माण झाली आहे.
मूल्यवर्धन उपक्रम मुलांना खूप खूप आवडत आहेत. सर्व विद्यार्थी गोष्टी सांगून त्या गोष्टीचे स्पष्टीकरण करत आहेत. वर्ष २०१९ मध्ये हा उपक्रम माझ्या शाळेमध्ये राबविण्यात येत आहे. माझ्या शाळेला श्री .ब्राम्हण सरांनी भेट दिली असता, सर्व विद्यार्थांचा उपक्रमातील सहभाग पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थी मागील वर्षामध्ये कायकाय शिकले ते कथन केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे सरांनी अभिनंदन केले. इयत्ता तिसरीचे विद्यार्थी परिपाठ सादरीकरण करतात. परिपाठात ४ ते ५ मुलांनी मराठी, हिंदीमध्ये गोष्टी सांगितल्या. सर्व मुले न घाबरता सहज परिपाठ सादर करीत होते.
मी तीन दिवसीय मूल्यवर्धन प्रशिक्षण २०१८ मध्ये पूर्ण केले होते त्यामुळे मला प्रेरणा मिळाली. शाळेत उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमाचे सर्वप्रथम नियोजन केले त्या नियोजना प्रमाणे, सोमवार , मंगळवार, व बुधवार या तीन तासिकेत विभागणी केली, सन २०१८ मध्ये माझ्याकडे दुसरी व चौथी हे दोन वर्ग होते, आणि मी इतर विषयासोबत मूल्यवर्धन उपक्रमाची सांगड घालून व विद्यार्थी सहभाग घेवून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून सर्व प्रथम वर्गनियम विद्यार्थी सहभागातून तयार केले. विद्यार्थी त्या नियमांचे काटेकोर पालन करत होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यामध्ये बदल घडवून आणले आणि उपक्रमात गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभाग घेत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला. जोडी पद्धत, गटचर्चा, खेळ या उपक्रमामुळे विद्यार्थी मूल्यवर्धन तासिकेत आवडीने सहभाग घेत होते. खेळामुळे शिक्षकांबद्दलची भीती नाहीशी झाली. सर्व विद्यार्थी उत्तरे देऊन प्रतिसाद देत होते.
माझे नातेसंबंध, माझी ओळख विद्यार्थी सांगू लागले. काही विद्यार्थी इंग्रजीतून माझी ओळख सांगत होते. विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतून उपक्रम घेण्याचा उत्साह वाढू लागला. आता सर्व विद्यार्थी बोलू लागले. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थी नीटनेटके राहू लागले. विद्यार्थी -विद्यार्थी सहकार्य भावना निर्माण झाली. मूल्यवर्धन उपक्रम मुलांना खूप खूप आवडला आहे. सर्व विद्यार्थी गोष्टी सांगून त्या गोष्टीचे स्पष्टीकरण करीत आहेत. आता वर्ष २०१९ मध्ये हा उपक्रम माझ्या शाळेमध्ये राबविण्यात येत आहे. माझ्या शाळेला श्री. ब्राम्हण सरांनी भेट दिली असता सर्व विद्यार्थ्यांचा उपक्रमातील सहभाग पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी मागील वर्षामध्ये कायकाय शिकले ते कथन केल्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे सरांनी अभिनंदन केले. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी परिपाठाचे सादरीकरण केले. परिपाठात ४-५ मुलांनी मराठी, हिंदीमध्ये गोष्टी सांगितल्या. सर्व मुले न घाबरता सहज परिपाठ सादर करीत होती
-श्री गुलाब धुमासिंग जाधव
मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल मनोगत
-श्री गुलाब धुमासिंग जाधव
शाळेमधील झालेले बदल याविषयी माझे मनोगत
शाळेमधील झालेल्या बदलांविषयी मला आलेले अनुभव-
मूल्यवर्धनची अंमलबजावणी मंगरूळपीर, जिल्हा वाशिम येथे सन 2018 पासून सुरु झाली आहे. आमच्या शाळेमध्ये मूल्यवर्धनची अंमलबजावणी प्रेरक निवडण्यापासून सुरु झाली. जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कोठारी, केंद्रशाळा कोठारी. आमच्या येथील निवड झालेले प्रेरक श्री. उमेश गहूले यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी आमच्या शाळेमध्ये दोन महिने योग्य पद्धतीने मूल्यवर्धन राबविण्यास सुरुवात केली. आमच्या शाळेमध्ये सर्वप्रथम त्यांना मूल्यवर्धनची माहिती मिळाली. त्यांनी आमच्याशी प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतले व आपल्याला मूल्यवर्धन आपल्या शाळेमध्ये कसे राबवायचे आहे, याबद्दल चर्चा केली. त्यानंतर आम्ही सर्व शिक्षकांच्या बैठका बोलावून मूल्यवर्धन संपूर्ण शाळेमध्ये कशा पद्धतीने राबवता येईल, यासाठी प्रयत्न सुरु केले.
प्रेरक गहूले सर यांनी मूल्यवर्धन हा एक अतिशय प्रभावी असा कार्यक्रम आहे, ज्यामधून आपण विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवू शकतो असे सांगितले. त्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये मूल्य कसे रुजवता येईल यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर इतर शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. त्यांनी आपापल्या वर्गात वर्गनियम लावले व विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात बदल दिसण्यास सुरुवात झाली. काही दिवसांनंतर विद्यार्थी नियमांचे पालन करताना दिसले. शांतता संकेताचा वापर प्रभावीपणे सुरू झाला. संपूर्ण शाळेत आम्ही याचा वापर करण्यास सुरुवात केली. यामुळे आम्हांला मूल्ये रुजविण्यास सगळ्यात चांगले साधन म्हणून मूल्यवर्धनची मदत झाली. आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये योग्य त्या पद्धतीने आठवड्याच्या तीन तासिका राबविण्यास सुरुवात केली आहे. तसेच वेळापत्रकातही नोंदी केल्या. त्यामुळे आम्ही योग्य पद्धतीने उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.
यावर्षी मूल्यवर्धन पुढचे पाऊल यासाठी आमच्या केंद्राची निवड झाली. या प्रशिक्षणासाठी विभागीय ठिकाणी नागपूरला मी स्वतः गेलो होतो. प्रशिक्षण पूर्णपणे पार पाडले व वर्षभरात आपल्याला कशा पद्धतीने कायकाय करायचे आहे, यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळाले. समग्र शाळा दृष्टिकोन आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी लोप पावत चाललेली मूल्ये विद्यार्थ्यांच्या प्राथमिक जीवनामध्ये रुजण्यासाठी खूप खूप मदत केली. त्यामुळे आम्ही मुथ्था सरांचे खूप खूप आभार मानतो. असेच यापुढेही प्रयत्न सुरु ठेवू.
-सिद्धार्थ खिराडे
शाळेमधील झालेले बदल याविषयी माझे मनोगत
-सिद्धार्थ खिराडे
.