मूल्यवर्धन शिक्षणाची यशस्विता
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि विद्या प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रभर जि. प. प्राथ. शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला जात आहे. शिक्षक, पालक, विद्यार्थी अशा सर्व स्तरातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे. एक सकारात्मक बदलाकडे प्राथमिक शिक्षणाची वाटचाल होताना दिसून येत आहे. प्राथमिक शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षण हक्क कायदा 2009, भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक मूल्ये, अध्ययन निष्पत्ती या सर्वांशी सुसंगत कार्यक्रम म्हणजे मूल्यवर्धन होय. मूल्ये ही शिकवावी लागत नाहीत, तर ती रुजविली जातात हा संबोध या कार्यक्रमातून शिक्षक व पालकांना मिळाला. राष्ट्राची भावी पिढी जबाबदार, संवेदनशील व राष्ट्रभक्त घडवायची असेल तर मूल्यशिक्षणाशिवाय पर्याय नाही. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन कार्यक्रमाचा पुढीलप्रमाणे फायदा दिसून झाला.
1) विद्यार्थीप्रिय उपक्रम :- वर्गनियम, शांतता संकेत, जोडीचर्चा, सामुदायिक वर्तुळ, सकारात्मक शिस्त, नातेसंबंध, आनंददायी खेळ, सहयोगी अध्ययन, या उपक्रमांतून विविध मूल्ये विद्यार्थ्यांत रुजविता आली. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहरत गेले. मुले मुक्तपणे अभिव्यक्त होऊ लागली.
2) संस्कारक्षम प्रेरणादायी गाणी गोष्टी:- आपण सारे बहीण-भाऊ, आनंदाने मजेत राहू या सारख्या अर्थपूर्ण गीताने विद्यार्थ्यांमध्ये बंधुभावाची जाणीव निर्माण झाली. वर्गात, शाळेत एकमेकांविषयी आदर भाव प्रेम वाढीस लागला. प्रेरणादायी गोष्टी मुलांना वाचायला मिळाल्या.
3) शिक्षकप्रिय उपक्रम:- मूल्यवर्धन प्रशिक्षणातून शिक्षकांनी हा कार्यक्रम छान समजून घेतला. त्याची अंमलबजावणी वर्गात केली. उपक्रम राबविण्याबाबत कुठलेही दडपण, भीती, परीक्षा, तपासणी नसल्याने शिक्षकांनी आनंदाने सर्व उपक्रम आपल्या वर्गात यशस्वीपणे राबविले.
4) उपलब्ध अध्ययन सामग्री :- शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि विद्या प्राधिकरण पुणे यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थी उपक्रम पुस्तिका व शिक्षकांना शिक्षक उपक्रम पुस्तिका पुरविण्यात आल्या. याचा वापर उपक्रम घेताना झाला. शैक्षणिक साहित्य मुलांना खूप आवडले.
5) घटनात्मक मुल्ये :- न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही घटनात्मक मूल्ये डोळ्यासमोर ठेवून त्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वर्गात वागणूक देता आली. शिक्षकांना व विद्यार्थ्यांना या घटनात्मक मूल्यांमुळे छान अभिव्यक्त होता आले.
6) शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत :- विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या विचाराला, कल्पकतेला चालना मिळावी यासाठी रिकाम्या वेळात करावयाच्या कृतीमध्ये अभ्यासक्रमाशी संबंधित कृती दिल्या आहेत. त्या सर्व कृती विद्यार्थी आवडीने सोडवितात. एकंदरीत प्राथमिक शिक्षणक्षेत्रात सर्वांना हवा असणारा आमूलाग्र बदल घडविण्यासाठी मूल्यशिक्षणाची उल्लेखनीय मदत झाली आहे . त्यासाठी मी विद्या प्राधिकरण आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
-गोविंद गायकी
मूल्यवर्धन शिक्षणाची यशस्विता
-गोविंद गायकी
मूल्यवर्धन एक संस्कारमय जीवन
मूल्यवर्धन हा कार्यक्रम अतिशय चांगला असून त्याचा परिणाम मुलांमध्ये होत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांच्या सहकार्याने गेल्या चार वर्षापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु आहे. त्याच्या प्रगतीचा आलेख हा वाढत आहे. आज सर्वच माध्यमांच्या शाळेत हा कार्यक्रम राबविला जात आहे. आमचे शिक्षक बंधू अगदी मनापासून आनंदमय वातावरणात शिकवीत असून त्याचा फायदा मुलांना खूप चांगल्या प्रकारे झाला. मुले स्वतः शिकू लागली आहेत. त्यांच्यात चांगल्या सवयी लागल्या असून मूल्यवर्धनातील उपक्रमात ते स्वतः सहभागी होतात.
या उपक्रमातून त्यांच्यातील न्यूनगंडाची भावना नष्ट झाली असून खूप चांगल्या प्रकारे न भिता उपक्रमात सहभागी होतात. आपण समाजाचे घटक आहोत याची भावना त्यांच्यात दृढ झाली असून शाळेचे नियम, वर्गाचे नियम, चांगले मित्र कोण, चांगल्या, वाईट सवयी कोणत्या या सर्व बाबी म्हणजे मूल्यवर्धनातून झालेला संस्कार.
आणखी एक चांगला परिणाम म्हणजे मुलांमध्ये प्रामाणिकपणा या गुणाची वाढ झाली असून सहकार्याची भावना वाढीस लागली आहे. मुले स्वतःच्या क्षमता ओळखू लागले असून न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांची जोपासना करू लागली आहेत. मूल्यवर्धनमुळे मुले संस्कारक्षम झाली असून मुलांमध्ये विविध बदल घडून येत आहेत. सांगायचे झाल्यास, मुले नियमित शाळेत येतात. एकमेकांना गोष्टी सांगतात. भेदाभेद न करता मोकळ्या मनाने खेळात सहभागी होतात. मोठ्यांशी कसे बोलावे याचाही चांगला परिणाम मुलांमध्ये दिसून येत आहे.
थोडक्यात सांगायचे म्हणजे मूल्यवर्धन म्हणजे एक संस्कारमय केंद्र होय. भारताचा भावी नागरिक कसा असावा हे या मुलांमध्ये आम्हा शिक्षकांना मूल्यवर्धनाच्या उपक्रमातून दिसून येत आहे.
-सुनील शंकर चौधरी
मूल्यवर्धन एक संस्कारमय जीवन
-सुनील शंकर चौधरी
विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले बदल
विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले बदल-.
मूल्यवर्धनमुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये फार बदल झालेले आहेत. विद्यार्थी वर्गामध्ये गोंधळ न करता शांतपणे काम करीत आहेत. त्यांची बोलण्याची क्षमता वाढली आहे. आता ते चप्पल, बूट वर्गाच्या बाहेर काढत आहेत. या अगोदर असे होते की फक्त काही विद्यार्थी वर्गाच्या बाहेर रांगेत चप्पल, बूट काढायचे. आता वर्गनियम तयार झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी चप्पल, बूट वर्गाबाहेर काढत आहेत. विद्यार्थी एकमेकांचा आदर करायला लागले. विचार करायला लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. उदा. एक चौथीचा विद्यार्थी असा होता की तो सगळ्यांच्या खोड्या करायचा. एकेदिवशी मूल्यवर्धनच्या तासिकेमध्ये शिक्षकांनी त्याला सांगितलं की आपल्या वर्गनियमांमध्ये असे आहे की, आपण सर्वांचा आदर करायचा. ही गोष्ट मागच्या वर्षाची आहे. जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या शाळेत सुरु झाला त्याच्या 1 महिन्यानंतरची. तेव्हापासून शिक्षकांनी त्याच्यावर विशेष लक्ष ठेवले. आता तो विद्यार्थी वर्गाचा सर्वांचा आदर करणारा विद्यार्थी आहे. हे मूल्यवर्धनमुळे त्याच्यात झालेला मोठा बदल आहे.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व बौद्धिक बदल झाले. त्यांच्या अंगी सत्य बोलण्याची हिंमत वाढली. हजेरीचे प्रमाण वाढले. विद्यार्थी स्वच्छ राहू लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. एकमेकांचा आदर करू लागले. पालकांशी संवाद साधू लागले. शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले.
-शेख इम्रान शेख मो. इसहाक
विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले बदल
-शेख इम्रान शेख मो. इसहाक
विद्यार्थ्यांमधील बदल
विद्यार्थ्यांमधील बदल
विद्यार्थ्यांमध्ये सहकार्यवृत्ती वाढली. समानतेची भावना निर्माण झाली. आत्मविश्वास वाढला. एकात्मता, कार्य करण्याची जिद्द, निर्माण झाली. विद्यार्थी प्रेमळ बनले. विद्यार्थ्यांमधील सुसंस्कृतपणा, उत्साह वाढला. चांगल्या सवयी लागल्या. विद्यार्थी वेळेचे पालन करू लागले. ते आपले मत व्यक्त करू लागले. आई-वडिलांच्या कामात मदत करू लागले. विद्यार्थी हसतखेळत शिकतात. खेळात नियमांचे पालन करतात. खेळातून आनंददायी शिक्षण घेतात. एकमेकांचा आदर करतात.
विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागृती निर्माण झाली. विद्यार्थी मोठ्या माणसांचा आदर करतात. शिक्षणाबद्दल गोडी निर्माण झाली आहे. खोटे बोलण्याचे दुष्परिणाम होतात, याची जाणीव झाली.
-निजामुद्दीन काझी
विद्यार्थ्यांमधील बदल
-निजामुद्दीन काझी
मूल्यवर्धन प्राथमिक शाळांसाठी वरदान
खरोखर मूल्यांचे वर्धन करणारा मूल्यवर्धन कार्यक्रम प्राथमिक शाळांसाठी वरदान ठरत आहे, यात तिळमात्र शंका नाही. मुलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मूल्ये रुजवायला सुरुवात झालेली आहे. खूप मोठ्या प्रमाणात मूल्ये मुलांमध्ये रुजत आहे¬त. प्रसंग मांडत बसलो तर खूप मोठा निबंध तयार होईल, पण इथे केवळ दोन प्रसंग मांडतो.
१) माझ्या वर्गातील मुलगी तिला आई नाही, वडील पुणे येथे काम करतात. ती तिच्या आजीसोबत खेड्यातच राहते. गुरुपौर्णिमेनिमित्त तिने माझ्यासाठी गिफ्ट बनविले. ते माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठे गिफ्ट ठरले. विशेष म्हणजे तिच्या खाऊच्या पैशातून बनविलेले ते गिफ्ट माझ्यासाठी सर्वात मूल्यवान ठरले. गुरुंविषयी असणारा आदर आम्ही राबवत असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे ते मला फलित वाटले.
२) मुलांमध्ये आपोआप सर्व घटकांविषयी आपुलकी कशी निर्माण होत आहे हेच कळत नाही. माझ्या वर्गातील लकी नावाच्या विद्यार्थ्याने त्याच्या मित्राचा म्हणजेच रोहीतचा वाढदिवस चक्क रोपटे देऊन केला. एवढे मोठे वर्तनबदल माझ्या विद्यार्थ्यांत पाहून मी अचंबित झालेलो आहे. आजपर्यंतच्या कुठल्याही कार्यक्रमाने विद्यार्थ्यांत एवढे मोठे वर्तनबदल मी अनुभवले नव्हते. ते मात्र मूल्यवर्धन कार्यक्रमाने झाल्यासारखे वाटते. या कार्यक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण स्वप्नातही विचार करणार नाही ते बदल इथे अनुभवायास मिळत आहेत. या कार्यक्रमाची आखणी करणाऱ्यास माझा सलाम. एक सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी मूल्यवर्धनने उचललेले पाऊल अवर्णनीय आहे. वरील सर्व वर्तन बदल इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांत अनुभवायास मिळाले. मूल्यवर्धन कार्यक्रमाचे फायदे अतुलनीय आहेत, पण माझ्यासारखा शिक्षक ते शब्दरुपात मांडण्यास कमी पडत आहे हे मात्र खरे आहे.
-सुनील शंकर चौधरी
मूल्यवर्धन प्राथमिक शाळांसाठी वरदान
-सुनील शंकर चौधरी
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात
मूल्यवर्धन उपक्रम क्रमबद्ध पद्धतीने राबविल्यास मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात. याविषयीचा माझ्या वर्गातील एक छोटासा अनुभव.
माझ्याकडे मागील वर्षी दुसरीचा वर्ग होता. माझी शाळा ही बिबखेड तांडा आहे. मागील वर्षी माझी बदली झाली. मी या शाळेत रुजू झालो तेव्हा खूप निराशा होती. मुले शाळेकडे पाठ फिरवत होती. आता मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवायचे, पण मुले शाळेत थांबत नाहीत. मी ठरवले की, मुले आकर्षित करायची. मी सरळ मूल्यवर्धन पुस्तिकेतील सहयोगी खेळ घेण्याचे ठरवले. सुरुवातीला काही मजेदार खेळ घेतले. उदा. राजा ओळखा, वर्गात शिकवताना जोडीचर्चा, गटचर्चा, सामुदायिक वर्तुळ आवश्यकतेनुसार वापरले. मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांना आवड निर्माण झाली. आता शिस्तबद्ध पद्धतीने उपक्रम घेणे आवश्यक होते. स्थानिक परिस्थिती ही एक खूप मोठी समस्या होती. मग मी सहज विचार केला की, मुलांमध्ये संस्कार रूजले तरच ते शिक्षण पूर्ण करू शकतील. मी क्रमबद्ध पद्धतीने उपक्रम घेणे सुरू केले. मूल्ये ही कृती व स्वानुभवातून चांगली रुजतात. म्हणून सर्वांना संधी देत गेलो. मला फायदा असा झाला की, यावर्षी इयत्ता तिसरीमध्ये मुलांना शाळेत बोलवायचे काम पडले नाही. याबाबतीत पालकांचा सकारात्मक प्रतिसाद कानावर पडला. मलाही बरं वाटलं. . . !
मागील वर्षी पुस्तकवाटप करताना मी मुलांशी पुस्तकाबद्दल बरंच बोललो होतो. पुस्तक हा माझा सर्वात लाडका मित्र आहे. ते सदैव आपल्याला ज्ञान देते. पुस्तकाला कपडे घालुया हा एक छोटासा उपक्रम राबवला होता. या वर्षी २६ जूनला पुस्तकवाटप करताना मला एक आश्चर्यकारक अनुभव आला. पुस्तक वाटत असतानाच एका मुलाकडून चुकीने एक पान फाटले. तेव्हा आर्यन राठोड नावाचा एक मुलगा जोरात म्हणाला, “अरे यार ! त्याला जखम झाली आता. तो आपला मित्र नाही का? पहा सर.” मला सांगा इतरांबद्दल आस्था हे मूल्य आर्यनने घेतले का नाही? आणि अशीच न कळत आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता मूल्ये हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये रूजवायची आहेत. मी तर शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा सदैव आभारी आहे. त्यांच्यामुळे प्रकाशाकडे जाण्याचा एक सुंदर मार्ग मिळाला. हे कार्य मनापासून करीत राहिल्यास एक दिवस आपला मूल्यवर्धित भारत बनल्याशिवाय राहणार नाही, असे मला वाटते.
-गजानन पांचाळ
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात
-गजानन पांचाळ
माझ्यात व विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले बदल
माझ्यात व विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले बदल-
मागील वर्षापासून आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये अनेक बदल झालेले आहेत. उदा. एका मुलाचे पेन शाळेत हरवले होते. ते पेन दुसऱ्या विद्यार्थ्याला सापडले. ते त्याला परत दिले. त्याला विचारले असता त्याने सांगितले, आमच्या वर्ग नियमात आहे की कोणतीही वस्तु सापडली की ज्याची त्याला परत करायची.
-आरिफ सय्यद
माझ्यात व विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले बदल
-आरिफ सय्यद
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांच्या आचरणात होतो अविस्मरणीय बदल
मूल्यवर्धन कार्यक्रम प्रेरक या नात्याने शाळेत राबवित असताना विद्यार्थ्यांमध्ये भरपूर मूल्याधिष्ठित बदल होताना दिसून आले. मात्र एक बदल असाही असेल याबाबत मीसुद्धा अनभिज्ञ होतो. हा बदल पाहून मीसुद्धा खूप भावूक झालो होतो. तो प्रसंग आज मी आपल्यासमोर मांडत आहे.
मित्रानो, शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये आणि त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे हा मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मूळ उद्देश हृदयात ठेऊन मी जि. प. म. उ. प्रा. शाळा गंधारी केंद्र, टिटवी, तालुका लोणार, जि. बुलडाणा येथे मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात केली. अगदी सुरुवातीला आपल्या इतर पुस्तकांबरोबर आणखी एक पुस्तक शिकविण्याचे आपले ओझे विनाकारण वाढले, बाकी काही नाही, असा समज झाला. मात्र प्रेरक या नात्याने मूल्यवर्धन आढावा घ्यावा लागतो, म्हणून मी उपक्रम सुरू केले. अगदी अल्पावधीत मुले स्वतःहून “सर, हे पुस्तक शिकवा, ही गोष्ट घ्या, हा खेळ घ्या” असा आग्रह करायला लागली. आता मला निश्चितपणे समजले होते की, मूल्यवर्धनमुळे मुले आनंदी, बोलकी झाली आणि दररोज शाळेत यायला लागली आहेत. हाच या कार्यक्रमाचा आपल्यासाठी सर्वांत मोठा फायदा आहे.
वरील सकारात्मक बदलामुळे मी रोज उपक्रम घेत असताना मला मुलांमधील एक असा भावनिक बदल जाणवला, तो मी आज तुमच्यासमोर व्यक्त करत आहे.
मित्रानो, हा प्रसंग आहे दिनांक २९/०७/२०१९ वार सोमवारचा. सध्या सुरू असलेल्या विशेष पूरक पोषण आहार वाटप करण्यासाठी आमचे मुख्याध्यापक श्री. सुरेश मुंगसेसर यांनी खजूर आणले होते. मी वर्गात गेल्याबरोबर मुले माझ्या हातातील खजूर पाहून आनंदित झाली. मी सर्वांना शांतता संकेत देऊन खजूर वाटप करण्यात व्यस्त झालो. थोड्याचवेळात माझे खजूर वाटप झाल्यानंतर माझ्याकडे यश जाधव, पवन केंद्रे, ओम, कृष्णा, विवेक आणि नयन ही मुले एकेक खजूर हातात घेऊन पुढे आली आणि “सर आम्ही खजूर घेऊन वणेशच्या घरी देऊन येऊ का ? जाऊ द्या ना सर !” अशी विनवणी करू लागली. मी का म्हटल्याबरोबर त्यांनी मी घेतलेल्या ‘माझे वर्गमित्र’ या मूल्यवर्धन उपक्रमाची आठवण करून देत, सर, वणेशला सायकल वरून पडल्यामुळे पायाला लागले आहे. आणि तुम्हीच तर आम्हांला मित्राची काळजी घ्यावी, मदत करावी हे सांगितले आहे, असे सांगत मला भावुक केले.
मित्रांनो, ज्या मुलाच्या घरी ही मुले जाणार होती, तो माझ्या इयत्ता दुसरीच्या वर्गातील वणेश उत्तम आंधळे नावाचा मुलगा आहे. सायकल खेळत असताना या मुलाच्या पायाला जखम झाली होती आणि या दिवशी तो शाळेत हजर नव्हता. म्हणून ही मुले त्यासाठी खजूर घेऊन जाण्याची विनंती करत होती. हा प्रसंग पाहून मी चकित झालो होतो. घरी स्वतःचे एक चॉकलेटसुद्धा आपल्या भावाला न देणारी मुले आज त्यांना दिलेल्या खाऊमधून शिल्लक ठेवलेला खाऊ मित्राच्या घरी घेऊन जाण्यासाठी पुढे उभी होती. मी त्यांना जवळ बोलवले आणि सर्वांना त्यांच्याकडील खजूर खाऊन घ्यायला सांगून दुसरे खजूर दिले आणि वणेशच्या घरी जाण्यास परवानगी दिली.
ती मुले रिमझिम पावसात पळतच जाऊन वणेशला खजूर देऊन परत आली. मी सर्व मुलांना ‘माझे वर्गमित्र’ या उपक्रमाचीआठवण करून दिली. यामधून मी मुलांना मूल्यवर्धनमधील इतरांबद्दल आस्था आणि आपुलकी हे मूल्य कसे जोपासावे, हे निश्चित रुजविले होते, याची प्रत्यक्ष अनुभूती मला या प्रसंगावरून मिळाली. हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे.
-गोविंद राठोड
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांच्या आचरणात होतो अविस्मरणीय बदल
-गोविंद राठोड
मी आणि मूल्यवर्धन
संकल्पपूर्ती समारोहाच्या निमित्ताने स्वानुभव कथन.
‘Mulyavardhan is a value education programme to help children imbibe Democratic values, attitudes and skills in an enabling school climate.’
मूल्यवर्धन या अतिशय दर्जेदार कार्यक्रमाशी जोडले गेले असता मला आलेले अनुभव केवळ शब्दातीत आहेत. मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रूजावीत आणि ते देशाचे जबाबदार नागरिक व्हावेत, हा मूल्यवर्धन कार्यक्रमाचा हेतू आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत व वर्गात राबवित असताना या हेतूची यशस्वी सुरुवात मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा परिचय होण्यापूर्वी मी माझ्या वर्गात पारंपरिक पद्धतीने अध्यापन करीत असे, परंतु मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतल्यानंतर वर्गात विविध उपक्रमांचे आयोजन करताना या कार्यक्रमातील विद्यार्थीकेंद्रित आणि समग्र शाळा कार्यपद्धतीमुळे माझ्या वर्गातील अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया बदलली. विविध मूल्यवर्धन उपक्रम वर्गात घेत असताना मी अनुभवले की, विद्यार्थी चर्चेतून अभिव्यक्त होतात. आपल्या वर्गमित्रांचा दृष्टिकोन समजून घेतात. बऱ्याचशा उपक्रमात गाणी, कवितांचा समावेश केला आहे. यांतून मुलांमध्ये संघभावना वाढीस लागते. पुष्कळशा मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये मुलांना मोकळेपणाने स्वतःच्या शब्दांत व्यक्त होता आल्याने त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण राहत नाही. यामुळे त्यांची बोधात्मक व भाषिक कौशल्ये विकसित होतात. थोडक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थी म्हणजे चैतन्याने खळाळणारे निर्झर झाले आहेत, असेच म्हणावे लागेल. आपापसातील मैत्री, प्रेम, सहकार्य वाढीस लागून वर्गातील व पर्यायाने शाळेतील वातावरण उत्साही आणि निकोप बनले आहे. गतवर्षापर्यंत अतिशय बंडखोर म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी होऊन सामान्य वर्तन करु लागले आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांबरोबरच माझ्या स्वतःच्या वागण्यात, बोलण्यात व विचार करण्याच्या पद्धतीतसुद्धा सकारात्मक बदल होऊन माझे सहकाऱ्यांसोबत तसेच विद्यार्थ्यांसोबत दृढसंबंध प्रस्थापित झाले आहेत. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीतून माझ्या विद्यार्थ्यांची स्वतःविषयी जाणीव अधिक समृद्ध होईल. त्यामुळे ते स्वतंत्रपणे विचार करतील. जबाबदारीने निर्णय घेतील तसेच स्वतःचे समतोल व्यक्तिमत्त्व घडवतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. सरतेशेवटी या अप्रतिम कार्याचे प्रणेते मा. श्री. शांतिलाल मुथ्था व मुथ्था फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार व पुढील वाटचालीस आभाळभर शुभेच्छा.
-सौ. स्वाती सुनील तांबेकर
मी आणि मूल्यवर्धन
-सौ. स्वाती सुनील तांबेकर
ऊर्जा सकारात्मकतेची
बीज अंकुरे, अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत
जसे रुजावे बियाणे, माळरानी खडकात
या ओळींप्रमाणे आपल्या शाळेतील मुलांना संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे संस्कार शालेय जीवनातील पहिल्या पायरीपासून रुजवावेत यासाठी मी राबविले. मा. श्री. शांतिलालजी मुथ्था यांच्या प्रेरणेने मूल्यवर्धन सुरु झाले.
मूल्यवर्धन म्हणजे शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्या संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा नवनवीन संधी सातत्याने देणे. मूल्यवर्धनने सांगितलेल्या नवनवीन कल्पना मी सतत राबवित आहे. या बाबतीत मला आलेला अनुभव आपणास कथन करताना मला विशेष आनंद होत आहे.
ही गोष्ट आहे एका दिव्यांग मुलीची. माझ्या वर्गात रोहिणी नावाची मूकबधिर मुलगी आहे. मूल्यवर्धन राबविण्यापूर्वी शाळेतील सर्व मुले तिला ‘मुकी’ याच नावाने हाका मारायचे. मी मूल्यवर्धनमधील कोणाचीही टिंगल टवाळी करू नये, हा उपक्रम घेतला. तेव्हा आपण जर रोहिणीच्या जागी असतो तर आपल्याला कसे वाटले असते? अशी कल्पना मुलांना करायला लावली. त्यांना आपले अनुभव सांगायला लावले. मुलांनाही असे चिडवणे आवडले नसते, असे त्यांनी कथन केल्यावर ‘ऊर्जा सकारात्मकतेची’ हा अनुभव मला आला. मुलांना स्वतःची चूक समजली. तेव्हापासून मुले तिला ‘रोहिणी’ म्हणून आवाज देतात. आता तिच्यामधील बंडखोर वृत्ती संपली. तिच्यातही सकारात्मक ऊर्जा जाणवायला लागली. आता वर्गातील सर्व सहयोगी खेळ, गटचर्चा, गाणी किंवा पाढेवाचन, चित्रवर्णन, अशा सर्व उपक्रमांत रोहिणी आत्मविश्वासाने सहभागी होते. इतर मुलीही तिला आपल्यात सहजतेने सामावून घेतात. हे निश्चितच मूल्यवर्धनचे यश आहे.
मुलांसोबतच माझ्यातील सकारात्मक उर्जेने नव्याने भरारी घेतली. प्रत्येक गोष्टीतील मूल्य विद्यार्थीदशेतच कळाले तरच विद्यार्थ्यांचे रूपांतर कर्तबगार नागरिकांमध्ये होईल. आमचे प्रेरणास्थान आदरणीय श्री. शांतिलालजी मुथ्था यांचे व त्यांनी सुरू केलेल्या मूल्यवर्धन हा क अत्यंत समाजहित जोपासणारा उपक्रम राबविल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
-मानसी नाईक
ऊर्जा सकारात्मकतेची
-मानसी नाईक
मूल्यवर्धन एक नवसंजीवनी
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनवावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्यासबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे हा उद्देश ठेवून मूल्यवर्धन कार्यक्रमाचा उदय झाला.
सन 2009 पासून महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यापासून सुरू झालेला प्रवास आज संपूर्ण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये सुरु आहे. याचे श्रेय शांतिलाल मुथ्था फाउंडेशनला व विद्या परिषदेला जात आहे.
बालकांवर संस्कार करण्याचे केंद्र म्हणजे शाळा. या शाळेमध्ये इयत्ता पहिली ते चौथी आणि यावर्षी पाचवीमधील विद्यार्थ्यांना आनंदमयी वातावरणात मूल्यवर्धनद्वारे विद्यार्थी मनावर ज्ञानसंस्कार केले जाणार आहेत. माझ्या शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना अनेक चांगले अनुभव आले. शांतता संकेत हा उपक्रम तर एवढा प्रभावी ठरला की, हात वर केल्याबरोबर संपूर्ण वर्गनियंत्रण राहते व आपल्या महत्त्वपूर्ण बाबी प्रसन्न वातावरणात सांगितल्या जातात. वर्गनियमांमुळे संपूर्ण वर्गाला स्वयंशिस्त लागली. सहयोगी खेळांमुळे संघभावना, नेतृत्त्व, सहकार्य या गुणांची जोपासना झाली. पहिली ते चौथीबरोबरच सगळी शाळा मूल्यवर्धनमय झाली. मूल्यवर्धन प्रेरक ही अनमोल संधी मला मिळाली. त्या संधीचे मी सोने करीत तालुक्यातील 50 शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्यामुळे अनुभवाची व कृतीची देवाणघेवाण झाली. मूल्यवर्धनचे उपक्रम राबविण्यासाठी मी वेळापत्रक तयार करून पुस्तिकेचा सखोल अभ्यास केला. शाळा पातळीवर उपक्रम यशस्वी राबविले. या उपक्रमामुळे मुले शाळेत रेंगाळत राहिली, बोलती झाली, रमायला लागली. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढली. विद्यार्थी सहभागी व्हायला लागली. अध्यापनात आनंद वाटला. मूल्यवर्धनमुळे मुले प्रश्न विचारायला लागली. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळाली. स्वअभिव्यक्ती वाढली. स्वमताचा आदर झाला आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा आत्मविश्वास वाढला. मला अनुभव कथन करण्याची संधी मिळाली त्याबद्दल सहभागी घटकांचे मनस्वी आभार व्यक्त करतो.
-संदीप सुरेश इंगळे
मूल्यवर्धन एक नवसंजीवनी
-संदीप सुरेश इंगळे
चांगले आणि वाईट
‘चांगले आणि वाईट’ तसे बघायला गेले तर दोन्ही शब्द हे प्रत्येकाच्या नित्य परिचयाचे. ऐकायला व बोलायला अतिशय सहज, साधे व सोपे वाटणारे, पण दैनंदिन जीवन जगत असताना तितकेच विसरले जाणारे. जेव्हा आपल्याच जवळची कुणीतरी व्यक्ती या शब्दांची आठवण आपल्याला करून देते, तेव्हा त्याचा खरा अर्थ आपल्याला उमगू लागतो. जीवनात हळू का होईना पण बदल घडू लागतो. अशीच काहीशी परिस्थिती जि. प. शाळा, खापरखेड लाड ता. लोणार, जि. बुलडाणा येथे माझ्या अनुभवास आली.
मुले म्हटले की ‘निरागसता’ ओघाने आलीच. ही छोटी बालके कुतूहलापोटी जेव्हा निरागसपणे प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देता देता चांगल्या चांगल्यांची भंबेरी उडाल्याचे आपल्याला माहिती आहे. तसेच अनपेक्षित प्रश्न विचारून मोठ्यांना गोंधळात टाकणारीही मुले अनुभवास येतात. असाच मी तिसरीचा ‘माझे शेजारी’ हा उपक्रम वर्गात घेत असताना मुला़ंना प्रश्न विचारला, तुमच्या शेजारी कोण राहतात? त्यावर ऋतिका शिवाजी लाड या मुलीने चटकन उत्तर दिले, अ. ब. क. नावाचे काका आमच्या शेजारी राहतात. त्यावर मी प्रतिप्रश्न केला, ते काय काम करतात? त्यावर मुलीने सरळ उत्तर दिले, ते दारू पितात. मी स्तब्ध झालो, क्षणभर गोंधळलो. काय बोलावं मला सुचले नाही. तेवढ्यात पाहिलीचा यशवीर नावाचा विद्यार्थी म्हणाला, हा सर, आमचे बाबा (आजोबा) डोळे लावून दारू पितात आणि लगेच त्याने नक्कल करून दाखवली. मला मुलांच्या निरीक्षण शक्तीचे कौतुक वाटले. आपण ज्यांना लहान समजून गृहीत धरतो, त्यांचे चिमुकले डोळे सगळे काही कॅमे-याप्रमाणे अचूक टिपत असतात, याची मला त्या दिवशी प्रकर्षाने जाणीव झाली. त्याचबरोबर एक प्रश्न उपस्थित झाला की, मला यासाठी काही करता येईल का? त्यावर विचाराअंती मी तंबाखू, विडी, सिगारेट आणि दारू याचे दुष्परिणाम मुलांना समजावून सांगायचे ठरवले. यु-ट्युबवरील धुम्रपानाचे दुष्परिणाम सांगणारे व्हिडीओ मुलांना दाखविले. त्यानंतर मुलांच्या प्रतिक्रिया या चकीत करणा-या होत्या. बहुतेक मुलांच्या चेह-यावर चिंतेच्या रेषा दिसत होत्या. म्हणून मी त्यांना विचारले, काय झाले? त्यावर त्यांनी विचारले, सर आमच्या बाबालापण असेच होईल का? कुणी पप्पांची, कुणी काकांची तर कुणी शेजा-यांची चिंता करताना दिसत होते. यावर मी त्यांना सांगितले की, मुलांनो लगेच नाही, पण नेहमी असेच सुरू राहिले, तर नक्की त्यांनाही असेच आजार होणार. मुले शांतपणे ऐकत होती. मी पुढे म्हणालो, पण मुलांनो, तुम्ही त्यांना यापासून वाचवू शकता. मुलांचा चेहरा लगेच खुलला. चेह-यावर आश्चर्यमिश्रित प्रश्न मला स्पष्ट दिसत होता. या ठिकाणी आपल्यातही काही क्षमता आहे. तिचा वापर करून आपण हे सगळं थांबवू शकतो, ही जाणीव मुलांना होत होती. मी पुढे त्यांना कायकाय करता येईल, हे समजावून सांगितले. आपण काय चांगले आणि काय वाईट हे अगोदर विचार करून ठरविले पाहिजे आणि चांगले ते स्वीकारले पाहिजे असे समजावले. तेव्हा मुलांनी अनेक चांगल्या आणि वाईट सवयींचा पाढा वाचायला सुरूवात केली. तो दिवस संपला.
दुस-या दिवशी शाळेत गेलो. रस्त्याने भेटणारे नेहमीचे पालक नियमित नमस्कार करणारे आज अचानक नमस्कार बंद. मी समजलो, ते घाईत असावेत. पुढे एक माझ्याच वयाचे पालक मला भेटले. नमस्कार चमत्कार झाला. त्यांनी लगेच प्रश्न विचारला, सर शाळेत काय सुरू आहे? मी म्हणालो, काही नाही नेहमीचंच आपलं. मला त्यांच्या प्रश्नाचा रोख समजला नाही. त्यांनी हसतच विषय छेडला. म्हणाले, नाही सहज विचारलं, कारण काल संध्याकाळपासून मुलीनं हट्ट धरला आहे की, गुटखा खाऊ नका. त्यानं माणूस मरतो, म्हणून विचारलं, तर तिने शाळेतली सगळी हकीकत सांगितली. हे ऐकताच सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. मूल्यवर्धनविषयी मी पालकांना पूर्ण कल्पना दिली आणि घडलेल्या प्रकारावर पालकांचेही मत मागितले. त्यावर पालकांचे मत होते की, सर चांगले आणि वाईट यातील खरा फरक मला आता समजायला लागला, जेव्हा माझी मुलगी मला समजावून सांगायला लागली. यावर पुढे त्यांनी सांगितले की, मुलीच्या भितीने मी ज्या ठिकाणी पाच वेळा गुटखा खायचो, ते प्रमाण माझे एकाच दिवसात दोनवर आले. ते ऐकून मला मनोमन खूप बरे वाटले. मनोमन हाही विचार आला की चांगले, वाईट समजते सर्वांना, पण आचरणात आणतो कोण? त्यासाठी मूल्ये माहीत असून उपयोग नाही, तर ती रूजली पाहिजेत. यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम खूप गरजेचा आहे, असे माझे प्रमाणिक मत आहे.
-जानराव काठोळे
चांगले आणि वाईट
-जानराव काठोळे
सकारात्मक बदल
इयत्ता दुसरीमधील विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले सकारात्मक बदल
वेणी येथे मागील वर्षी माझी बदली झाल्यानंतर लगेच मला मूल्यवर्धन प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले. सुरूवातीला मला हे कंटाळवाणेच वाटत होते. या तीन दिवसाच्या प्रशिक्षणामुळे मला मात्र जाणीव झाली की, आजच्या मोबाईलच्या जगात मूल्यवर्धनची अत्यंत आवश्यकता आहे. या कार्यक्रमाचे प्रशिक्षण घेऊन जेव्हा मी शाळा पातळीवर गेलो, तेव्हा मला सर्वप्रथम वर्गाचे नियम करावेसे वाटले. मी माझ्या वर्गातील मुलांना विचारले की, आपण आपल्या वर्गाचे वर्गनियम करूया. तेव्हा एवढा प्रतिसाद मिळाला नाही. परंतु नंतर हळूहळू जेव्हा आम्ही वर्गात मूल्यवर्धन उपक्रम घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर विद्यार्थांमध्ये नकळत मला बदल आणि तेही सकारात्मक बदल दिसू लागले. जसे प्रश्नांची उत्तरे देताना एकाच वेळी सर्वजण न बोलता एक मुलगी एक उत्तर तर दुसऱ्या वेळी मुलगा असे चित्र दिसू लागले. मुले आपले बूट व चप्पल वर्गाच्या बाहेर रांगेत ठेवू लागली. खेळांमध्ये सर्वच मुली व मुले भाग घेऊन आनंदाने खेळू लागले. यापूर्वी असे मला दिसत नव्हते.
हे सकारात्मक बदल मूल्यवर्धन तासिकेमुळे व त्यातील उपक्रमांमुळे झाले.
माझे शाळेतील इतर सहकारीसुद्धा नियमित उपक्रम घेतात. त्यामुळे आमच्या शाळेचे वातावरण बऱ्याच प्रमाणात चेंज झाले. माझी एक विनंती आहे की, मूल्यवर्धन कार्यक्रम प्राथमिक स्तरापासून पासून तर १२ वीपर्यंत असणे खूप गरजेचे आहे. तसेच या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा प्रशिक्षण व्हावे, म्हणजे यातील बारकावे आम्ही समजून घेऊ.
-राजेश देशमुख
सकारात्मक बदल
-राजेश देशमुख
अध्यापन करताना आलेले अनुभव
मी पाचवीसाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतले व स्वतःमध्ये झालेले बदल अनुभवले.
अनुभव असे आले की, अध्यापन करताना पाठ आणि मूल्यवर्धन पुस्तिका यातील उपक्रम हे पूरक वाटले. अध्यापनही हे रंजक होते आहे असे अनुभव आले. सर्व विषय आणि त्यामध्ये मूल्यवर्धन पुस्तिकेतील उपक्रम यांची जुळवाजुळव केली व पाठ शिकविले. त्यामुळे असा अनुभव आला की, मूल्यवर्धनमधील मूल्ये म्हणजे वेगळे काहीही नसून तो पाठाचाच एक भाग आहे. तो वेगळा न शिकवता पाठातच समाविष्ट करून शिकवले जाते व ते सोईस्करसुद्धा वाटते.
-आनंद वाडे
अध्यापन करताना आलेले अनुभव
-आनंद वाडे
मुलांमधील बदल
मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाल्यापासून आतापर्यंत मुलांमध्ये झालेले बदल.
मूल्यवर्धन तासिका सुरू झाल्या तेव्हा पासून विद्यार्थ्यांमध्ये फार बदल दिसत आहेत. उदा. स्वच्छतेविषयी बदल, नियोजनाविषयी बदल, एकमेकांशी प्रेमाने वागणे, वेळचे पालन करणे. तसेच खेळकर वातावरणात तासिका होत असल्यामुळे विद्यार्थी आनंदित आहेत.
-समीर अहमद काझी
मुलांमधील बदल
-समीर अहमद काझी
होय, मी बदललो
मूल्यवर्धनच्या माध्यमातून माझ्यात झालेला बदल-
होय, मी बदललो आहे. एक बदल सकारात्मक विचारसरणी घेऊन नव्या प्रवासाला निघालो आहे. दोन वर्षांपासून नवीन पद्धती, नवीन विचारधारेची रुजवणूक करण्यासाठी. माझ्या नोकरीला जवळपास 20 वर्ष झाली. मी आधीही चांगल्याप्रकारे नोकरी केली, यात शंका नाही. म्हणतात ना, चांगलं कर, चांगलं होईल! अगदी तसंच झालं बघा. दोन वर्षांपूर्वी माझी बदली मोताळा तालुक्यातील तळणी या गावातील शाळेत झाली. अभिमानाने सांगावेसे वाटते, त्या गावातूनच माझ्यामध्ये मूल्यवर्धनचे बीज अधिक प्रखरतेने रोवले गेले. कारण आमच्या जिल्ह्याची मूल्यवर्धनची सुरुवात याच शाळेतून झाली. शांतिलाल मुथ्थाजी आणि त्यांची सर्व टीम आमच्या तळणी गावात येऊन गेली. एक नवी उभारी मिळाली. आदर, प्रेमभावना, त्याग काय असतो ते मी शांतिलाल मुथ्थाजी यांच्याकडूनच शिकलो आणि प्रेरित झालो आणि वाटचाल सुरू झाली माझी आणि मूल्यवर्धनची. मास्टर ट्रेनरच झालो मूल्यवर्धनचा. छान वाटते या कार्यक्रमात येऊन. स्वतःहून जबाबदारी घ्यायला शिकलो, एकमेकांना चांगल्या भावनेने जोडायला शिकलो, प्रत्येकाशी आदराने बोलायला शिकलो. कोणी लहान असो की मोठा, मूल्यवर्धनच्या मनोरंजक खेळांमधून नकळत मूल्यांची रुजवणूक करायला शिकलो. मूल्ये अगोदर होतीच, पण त्याची सांगड घालून मुलांच्या गळी उतरावयाला शिकलो. एक सकारात्मक ऊर्जा घेऊन आनंदी राहू लागलो. पुढे याच ट्रेनिंगने मला फार चांगली माणसांशी जोडण्याची संधी मिळाली. जिवलग मित्रच म्हणा की. या मित्रांसोबत माझा मूल्यवर्धनचा प्रवास अधिकच आनंददायी झाला. माझ्या जीवनाच्या सर्वच पातळयांवर मूल्यवर्धनची प्रेरणा आहे. आता बदली धोरणानुसार माझी शाळा बदलली आहे. येथेसुद्धा तेवढ्याच उत्साहात माझं मूल्यवर्धनचे काम सुरू आहे. माझ्यात खूप सारे चांगले बदल झाले ते मूल्यवर्धनमुळे. खरचं एक प्रेरणादायक वाट दाखवल्या बद्दल शांतिलालजी मुथ्था साहेबांचे आभार.
-रविकुमार आघाव
होय, मी बदललो
-रविकुमार आघाव
विद्यार्थ्यांयामध्ये झालेले बदल
माझ्यात व विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धनमुळे झालेले बदल-
जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु झाला, तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व बौद्धिक बदल घडून आले. ते खरे बोलू लागले. त्यांचे हजेरीचे प्रमाण वाढले. स्वच्छ राहू लागले. एकमेकांचा आदर करू लागले. विजय, पराजय पचविण्याची क्षमता वाढली. पालकांशी संवाद साधू लागले. शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले.
-झैनुलाबेदिन अहमद
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-झैनुलाबेदिन अहमद
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु झाला, तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व बौद्धिक बदल घडून आले. ते खरे बोलू लागले. त्यांचे हजेरीचे प्रमाण वाढले. स्वच्छ राहू लागले. एकमेकांचा आदर करू लागले. विजय, पराजय पचविण्याची क्षमता वाढली. पालकांशी संवाद साधू लागले. शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आम्ही जेव्हापासून शाळेमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविणे सुरु केले, तेव्हापासून विद्यार्थी त्यांची इच्छा इतरांसमोर व्यक्त करू लागले. त्यांना स्वतःची जाणीव होत आहे. ते नेहमी शाळेचे नियम, वर्गनियम पाळू लागले. विद्यार्थी गटामध्ये चर्चा करून आपापल्या भावना प्रकट करू लागले. त्यांच्या अंगी अनेक गुण आले. ते स्वछता पाळू लागले. त्यांच्याअंगी आत्मविश्वास आला. घरात ते एकमेकांशी मिळून मिसळून राहू लागले. विद्यार्थ्यांचा जिद्दीपणा कमी झाला. आई, वडिलांसोबत व घराच्या प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वागू लागले. विद्यार्थी पालकांच्या भावना समजू लागले. घरच्यांना बाजारातून एखादी वस्तू त्यांनी आणायला सांगितली आणि ती आणली गेली नाही, तर ते अगोदर चिडचिड करायचे. आता मूल्यवर्धन उपक्रमामुळे हा चिडचिडेपणा थोडा फार कमी झाला आहे. अगोदर कोणत्याही खेळामध्ये माझा क्रमांक अगोदर आला पाहिजे अशी इच्छा होती. परंतु या शिक्षणामध्ये गटामध्ये खेळ घेऊन विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तीमध्ये बदल आला आहे.
-अफसर शेख
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-अफसर शेख
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
विद्यार्थी स्वछता पाळू लागले. त्यांच्याअंगी आत्मविश्वास आला. घरात ते एकमेकांशी मिळून मिसळून राहू लागले. जिद्दीपणा कमी झाला. आई, वडिलांसोबत व घराच्या प्रत्येक व्यक्ती सोबत आदराने वागू लागले. विद्यार्थी पालकांच्या भावना समजू लागले. घरच्यांना बाजारातून एखादी वस्तू त्यांनी आणायला सांगितली आणि ती आणली गेली नाही, तर ते अगोदर चिडचिड करायचे. आता मूल्यवर्धन उपक्रमामुळे हा चिडचिडेपणा थोडा फार कमी झाला आहे. अगोदर कोणत्याही खेळामध्ये माझा क्रमांक अगोदर आला पाहिजे अशी इच्छा होती. परंतु या शिक्षणामध्ये गटामध्ये खेळ घेऊन विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तीमध्ये बदल झाला आहे. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. एकमेकांचा आदर करू लागले. पालकांशी संवाद साधू लागले.
जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु झाला, तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व बौद्धिक बदल घडून आले. ते खरे बोलू लागले. त्यांचे हजेरीचे प्रमाण वाढले. स्वच्छ राहू लागले. शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध झाले. आम्ही जेव्हापासून शाळेमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविणे सुरु केले, तेव्हापासून विद्यार्थी त्यांची इच्छा इतरांसमोर व्यक्त करू लागले. त्यांना स्वतःची जाणीव होत आहे. ते नेहमी शाळेचे नियम, वर्गनियम पाळू लागले. विद्यार्थी गटामध्ये चर्चा करून आपापल्या भावना प्रकट करू लागले. त्यांच्या अंगी अनेक गुण आले.
-वासिम अहमद देशमुख
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-वासिम अहमद देशमुख
मूल्यवर्धनमुळे शाळेमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धनमुळे शाळेमध्ये झालेले बदल-
आमच्या शाळेत मागील वर्षापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु आहे. मूल्यवर्धनमुळे आमच्या शाळेत खालीलप्रमाणे बदल झालेले आहे.
1. विद्यार्थी स्वतः आपली जबाबदारी घेत आहे.
2. शिक्षक, मुख्याध्यापकसुद्धा वर्गात किंवा कार्यालयात जाताना चप्पल, बूट बाहेर काढतात.
3. विद्यार्थी एकमेकांशी आदराने वागत आहेत.
3. शिक्षक व विद्यार्थ्यांचे चांगले संबंध तयार झाले.
4. विद्यार्थी गटामध्ये राहू लागले व एकमेकांच्या भावना ओळखू लागले.
5. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांना हसतेखेळते वातावरण मिळू लागले.
6. विद्यार्थी वर्गनियम पाळू लागले.
7. विद्यार्थ्यांमध्ये बोलायची क्षमता वाढली.
8. दुसऱ्यांच्या समोर आपली ओळख निर्माण करू लागले.
9. पालकांसोबत त्यांचे संबंध चांगले झाले.
10. आम्हीसुद्धा विद्यार्थ्यांसोबत प्रेमाने वागू लागलो.
11. आमच्यामध्ये नियोजनाची क्षमता वाढली.
12. विद्यार्थी त्यांची कामे नियोजनाप्रमाणे करू लागले.
13. विद्यार्थी शाळेचे काम करायला लागले.
14. वेळेचा उपयोग कसा करायचा हे शिक्षक विद्यार्थी दोघांनाही कळाले.
15. दोघेही स्वछता पाळू लागले.
असे अनेक बदल आमच्या शाळेत झालेले आहेत. त्यापैकी काही लिहिले आहे.
-सय्यद इरफान सय्यद इस्माईल
मूल्यवर्धनमुळे शाळेमध्ये झालेले बदल
-सय्यद इरफान सय्यद इस्माईल
विद्यार्थ्यांमधील बदल
मूल्यवर्धनमुळे झालेले विद्यार्थ्यांमधील बदल-
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये अनेक गुण विकसित होत आहेत. विद्यार्थी सर्वात आगोदर वर्ग नियमांच्या मदतीने आपले कार्य करीत आहेत. उदा. वर्गात स्वच्छता ठेवणे, चप्पल बूट वर्गाच्या बाहेर काढणे, एकमेकांचा आदर करणे इत्यादी.
या व्यतिरिक्त आणखी बदल त्यांच्यामध्ये झालेले आहेत. त्यामुळे त्यांना भविष्यात चांगला नागरिक घडवण्यासाठी मदत होत आहे. एकदा शाळेत संस्कृतिक कार्यक्रम होता. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी सांगितले. महत्त्वाची गोष्ट अशी की, त्यामध्ये असे विद्यार्थी सहभागी झाले, जे वर्गात नेहमी काहीही बोलत नसत. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले, “जेव्हा मूल्यवर्धनच्या तासिकेमध्ये आम्हांला आमचे शिक्षक समोर बोलावून काहीतरी बोलायला लावतात त्यामुळे आमच्यामध्ये सर्वांच्यासमोर येऊन काही बोलणे किंवा करण्यात आता भीती वाटत नाही.
मूल्यवर्धनामुळे विद्यार्थी पालकांचाही आदर करायला शिकले. पालक शाळेत येऊन सांगतात की, तुम्ही ज्या गोष्टी त्यांना सांगत आहात त्यांचा ते घरीही उपयोग करतात. मूल्यवर्धनमुळे शिक्षक, पालक, विद्यार्थी या सर्वांचे संबंध चांगले झाले आहेत. एक नवी दिशा शिक्षणक्षेत्राला मिळाली आहे.
-नूर शेख
विद्यार्थ्यांमधील बदल
-नूर शेख
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल-
शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आम्ही जेव्हापासून शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु केला तेव्हापासून त्यांची इच्छा दुसऱ्यांच्या समोर मांडू लागले. त्यांना स्वतःची जाणीव होत आहे. ते नेहमी शाळेचे वर्गनियम पाळू लागले. विद्यार्थी गटामध्ये राहू लागले. गटचर्चा करून आपापल्या भावना प्रकट करू लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. त्यांच्या अंगी अनेक गुण आले. ते स्वछता पाळू लागले. त्यांच्याअंगी आत्मविश्वास आला. घरात ते एकमेकांशी मिळून मिसळून राहू लागले. विद्यार्थ्यांचा जिद्दीपणा कमी झाला. आई-वडील यांच्यासोबत व घराच्या प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वागू लागले. विद्यार्थी पालकांच्या भावना समजू लागले.
बाजारातून एखादी वस्तू जर त्यांनी घरच्यांना आणायला सांगितली आणि ती आणली गेली नाही तर ते आगोदर चिडचिड करायचे. परंतु आता हा चिडचिडेपणा थोडाफार कमी झाला आहे. या शिक्षणाअगोदर कोणत्याही खेळामधी माझा क्रमांक आगोदर आला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. परंतु गटामध्ये खेळ घेऊन विद्यार्थ्यांच्या इच्छाशक्तीमध्ये बदल झाला.
जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु झाला, तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व बौद्धिक बदल घडून आले. ते खरे बोलू लागले. त्यांचे हजेरीचे प्रमाण वाढले. स्वच्छ राहू लागले. एकमेकांचा आदर करू लागले. विजय, पराजय पचविण्याची क्षमता वाढली. पालकांशी संवाद साधू लागले.
-एजाज खान
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-एजाज खान
मूल्यवर्धन : एक अनुभव
शासनाची तेरा कोटी वृक्ष लागवड योजना, मूल्यवर्धन विद्यार्थी उपक्रम पुस्तिका इयत्ता पाचवीतील उपक्रम ‘दशलक्ष झाडे लावणारा मुलगा’ आणि गावातील भीषण पाणीटंचाई यांची योग्य सांगड घालून उपक्रम घेतला. परिणामी प्रत्येक विद्यार्थ्यांनी झाड लावले.
इयत्ता पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या समोर दशलक्ष झाडे लावणारा मुलगा हा उपक्रम सादर केला. उपक्रमांतर्गत जोडीचर्चा, गटचर्चा केली. वृक्षतोडीचे दुष्परिणाम त्यांना समजले. परिणामी सातवीतील विद्यार्थ्यांनी घराबाहेर, शेतात झाडे लावण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांना चिंच, आवळा, करंज यासारखी काही झाडे शाळेतून उपलब्ध करुन दिली. काही झाडे त्यांनी स्वतः मिळवली व वृक्षलागवड केली व पालकांच्या मदतीने त्यांचे संवर्धन करत आहेत. मुले दररोज झाडांकडे पाहतात व शाळेत आल्यानंतर आनंदाने सांगतात सर आमच्या झाडांना पागोर (नवीन पालवी) फुटली.
-मुरलीधर पांडुरंग शिंदे
मूल्यवर्धन : एक अनुभव
-मुरलीधर पांडुरंग शिंदे
माझे विद्यार्थी
माझ्या तेरा-चौदा वर्षांच्या सेवेमध्ये या चिमुकल्यांसोबत अनेक कल्पनेच्या बाहेरचे अनुभव आले. परंतु सध्या माझ्या चौथीच्या वर्गामध्ये आसलेला आकाश अशोक शिंदे आणि शंकर रोहिदास तनपूरे या दोन मुलांच्या बाबतीतले अनुभव मला याठिकाणी सांगायचे आहेत.
तालुक्यापासून १५ किमी. दूर व बहुतांश आदिवासी समाजाचे विद्यार्थी असलेली माझी शाळा. पुस्तकी ज्ञान थोडे बाजूला ठेवू, परंतु शिक्षणासाठी प्रेरित करणे हिच एक कसरत. आई, वडिलांचे अज्ञान, गरिबी , व्यसनाधिनता यातच मुलांचे वारंवार आजारपण , पालकांचे स्थलांतर अशा एक नाही अनेक समस्या यांच्या पाचवीला पुजलेल्या. अशाच दोन कुटुंबांतील विद्यार्थी आकाश आणि शंकर. शाळेची गोडी नाही, वही, पेनचा मेळ नाही. शारीरिक कमकुवतपणा. सांगताना मन संकोचते. परंतु माझे हे दोन्हीही विद्यार्थी कधीकधी वर्गामध्ये गाढ झोपी जातात. इतर विद्यार्थ्यांनी ठरवले की, आपण काहीही करुन त्यांना सोबत घेऊन चालायचे आहे. मग या दोघानांही माया व प्रेमाच्या बाबतीत थोडे झुकते माप देणे चालू केले. त्यांच्याशी वागण्यात मी स्वतःहून बदल केले.
आज कोणतीही ताकद त्यांना शाळेपासून दूर नेऊ शकत नाही. आकाशचे घर शाळेच्या गेटपाशी. तो दररोज मला गेट बंद करण्यासाठी मदत करायचा. आम्ही दोघे सर्वांत शेवटी घरी जायचो. एके दिवशी माझ्या चुकीने रस्त्याच्या कडेला पडलेल्या दगडाच्या ढिगावर माझी गाडी गेल्याने मला थोडे खरचटले. मी लगेच निघून गेलो. हे सर्व आकाशने पाहिले. मी गेल्यानंतर ज्यांच्या दारात तो ढिग पडला होता, त्यांच्याशी तुमच्या दगडांमुळे माझे सर पडले म्हणून भांडू लागला.
शंकरला तर मी इयत्ता तिसरीमध्ये वयानुरुप दाखल केले. आई-वडील वर्षभर परजिल्ह्यात कामासाठी जातात. परंतु शाळेची गोडी लागल्याने शंकर आजीजवळ घरी राहतो. त्याला शाळेचा एवढा लळा लागला की, तो एकही दिवस घरी राहत नाही. या चिमुरड्यांच्या चेहऱ्यावरील खळखळता आनंद पाहिला की, जीवनामध्ये काहीतरी मिळवल्याचे समाधान मिळते. पोटची पोरेही आपल्यावर एवढे प्रेम करत नाहीत, एवढे प्रेम ही मुलं आपल्यावर करतात. शंकर भविष्यात कुठे असेल, हे आज निश्चित सांगता येत नाही, परंतु तो एक संस्कारित विद्यार्थी नक्कीच असेल.
-मनोहर एकनाथ मुंढे
माझे विद्यार्थी
-मनोहर एकनाथ मुंढे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल.
मूल्यवर्धन तासिका सुरू झाल्या तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये फार बदल दिसत आहेत. उदा. स्वच्छतेविषयी बदल, नियोजनाविषयी बदल, एकमेकांशी प्रेमाने वागणे, वेळचे पालन करणे. खेळीमेळीच्या वातावरणात तासिका होत असल्यामुळे विद्यार्थी आनंदित आहेत. त्यांचे शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध तयार झाले. आम्ही जेव्हापासून शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु केला तेव्हापासून त्यांची इच्छा दुसऱ्यांच्या समोर मांडू लागले. त्यांना स्वतःची जाणीव होत आहे. ते नेहमी शाळेचे नियम, वर्गनियम पाळू लागले. विद्यार्थी गटामध्ये राहू लागले. गटचर्चा करून आपापल्या भावना प्रकट करू लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. त्यांच्या अंगी अनेक गुण आले. ते स्वच्छता पाळू लागले. त्यांचा आत्मविश्वास वाढला. घरात ते एकमेकांशी मिळून मिसळून राहू लागले. त्यांचा जिद्दीपणा कमी झाला.
-रफीक खान
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-रफीक खान
उपक्रमशील प्रेरक
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या घटनात्मक मूल्यांवर आधारित प्रभावी उपक्रम शाळास्तरावर राबविला जावा.
न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या घटनात्मक मूल्यावर आधारित प्रभावी उपक्रम शाळास्तरावर राबविला जावा, असे मनोमन वाटत असताना जुलै 2018 मध्ये पुण्यातील शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने व महाराष्ट्र राज्य शासनाने विकसित केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या प्रशिक्षणासाठी माझी निवड केली. प्रेरक म्हणून प्रशिक्षण घेत असताना आजवरच्या प्रशिक्षणापेक्षा बरेच काही नवीन शिकायला मिळाले. प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्या तिसरीच्या वर्गात उपक्रम घ्यायला सुरुवात केली आणि काय जादू ! मूलांच्या वर्तनात आमूलाग्र बदल दिसून आले.
माझ्या वर्गात मूल्यवर्धन उपक्रम राबविताना अनेक अनुभव आले. शांतता संकेत हा उपक्रम तर एवढा प्रभावी ठरला की, हात वर केल्यावर संपूर्ण वर्गनियंत्रण होते. आपल्या महत्त्वपूर्ण बाबी प्रसन्न व शांत वातावरणात सांगितल्या जातात. वर्गनियमामुळे संपूर्ण वर्गाला स्वयंशिस्त लागली. सहयोगी खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्व, सहकार्य या गुणांची जोपासना झाली. या साठी मूल्यवर्धनची तीन पुस्तके अतिशय उपयुक्त ठरली.
मूल्यवर्धन प्रेरक ही मला मिळालेली अनमोल संधी होती. या संधीचे सोने करीत 42 शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण चांगल्या प्रकारे दिले. अनुभवाची व कृतीची देवाणघेवाण झाली. मूल्यवर्धनचे उपक्रम सातत्याने राबविण्यासाठी मी वेळापत्रक तयार केले. आठवड्याला तीन तासिका मूल्यवर्धनला दिल्या. उपक्रम पुस्तिकेचा सखोल अभ्यास करून कृतियुक्त सहभाग घेऊन विद्यार्थी उपक्रम घेतले. त्यामुळे विद्यार्थी उपस्थिती वाढली.
-सोहराब पटेल
उपक्रमशील प्रेरक
-सोहराब पटेल
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
विद्यार्थी स्वच्छ राहू लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. एकमेकांचा आदर करू लागले. पालकांशी संवाद साधू लागले. जेव्हापासून मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु झाला, तेव्हापासून त्यांच्यामध्ये सामाजिक व बौद्धिक विकास झाला. त्यांच्या अंगी सत्य बोलण्याचे धाडस वाढले. हजेरीचेप्रमाण वाढले.
मागील वर्षापासून आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाल्यापासून विद्यार्थ्यांमध्ये अनेक बदल झालेले आहेत. उदा. एका मुलाचे पेन शाळेत हरवले होते. ते पेन दुसऱ्या विद्यार्थ्याला सापडले. ते त्याला परत दिले. त्याला विचारले असता त्याने सांगितले, आमच्या वर्ग नियमात आहे की कोणतीही वस्तु सापडली की ज्याची त्याला परत करायची.
मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रूजत आहेत. या कार्यक्रमामुळे विद्यार्थी देशाचे जबाबदार नागरिक होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्यांच्या आदर करणे, मानवी प्रतिष्ठेचा आदर , शिस्त, स्वायत्ता, जबाबदारी, नीटनेटकेपणा, चिकित्सक आणि सर्जनशील विचार, आज्ञाधारकपणा, विविधतेचा सन्मान, सुसंवाद नातेसंबंध, वक्तशीरपणा, इतरांबदल आस्था, सक्रिय योगदान या गोष्टी निर्माण झाल्या.
-फहीम शेख
विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-फहीम शेख
मूल्यवर्धनुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धनुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे आमच्या शाळेत मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये फार बदल जाणवतात. आम्ही असे होतो की चप्पल, बुट बाहेर न काढता वर्गात जायचो. आता मूल्यवर्धनुळे सर्व विद्यार्थी आणि आम्ही चप्पल, बुट वर्गाबाहेर काढत आहोत.
मूल्यवर्धन तासिका सुरू झाल्या तेव्हापासून विद्यार्थ्यांमध्ये फार बदल दिसत आहेत. उदा. स्वच्छतेविषयी बदल, नियोजनाविषयी बदल, एकमेकांशी प्रेमाने वागणे, वेळचे पालन करणे. खेळीमेळीच्या वातावरणात तासिका होत असल्यामुळे विद्यार्थी आनंदित आहेत. त्यांचे शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध तयार झाले. आम्ही जेव्हापासून शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु केला तेव्हापासून त्यांची इच्छा दुसऱ्यांच्या समोर मांडू लागले. त्यांना स्वतःची जाणीव होत आहे. ते नेहमी शाळेचे नियम, वर्गनियम पाळू लागले. विद्यार्थी गटामध्ये राहू लागले. गटचर्चा करून आपापल्या भावना प्रकट करू लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. त्यांच्या अंगी अनेक गुण आले. ते स्वच्छता पाळू लागले. त्यांचा आत्मविश्वास वाढला. घरात ते एकमेकांशी मिळून मिसळून राहू लागले. त्यांचा जिद्दीपणा कमी झाला.
-शमीम अहमद शेख
मूल्यवर्धनुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-शमीम अहमद शेख
संकल्पपूर्ती कार्यक्रम
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झालेला बदल.
मागील वर्षांपासून मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या शाळेत राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थांच्या, शिक्षकांच्या तसेच पालकांच्या वर्तनात सकारात्मकता आली. विद्यार्थांनी विविध उपक्रमांचा भरपूर आस्वाद घेतला. या कार्यक्रमामुळे शालेय पुस्तकात असणाऱ्या उणिवा भरून आल्या.
-असिफ शेख
संकल्पपूर्ती कार्यक्रम
-असिफ शेख
मूल्यवर्धनसंबंधी माझा अनुभव
मूल्यवर्धनमधून मुलांच्या वर्तनात बदल
मागील वर्षापासून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी मूल्यवर्धन हा स्तुत्य कार्यक्रम मुलांसाठी हाती घेतला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या वर्तनात निश्चित बदल झाला आहे. माझ्या शाळेत दररोज मूल्यवर्धनचे उपक्रम आणि सहयोगी खेळ घेतो. सहयोगी खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये उत्साही आणि आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून माझ्या वर्गात मुलांच्या उपस्थितीत चांगली वाढ झाली आहे. सर दररोज वर्गात नावीन्यपूर्ण व आनंददायी खेळ घेतात, म्हणून मुले आवर्जून उपस्थित राहात आहेत. सहयोगी खेळात मुले स्वयंपूर्ण आणि उत्साहाने सहभाग घेत आहे.
माझ्या वर्गातील मुलांना उपक्रम पुस्तिकेतील चांगल्या आणि वाईट सवयींविषयी माहिती सांगितली. वैयक्तिक स्वच्छता आणि परिसर स्वच्छतेचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले. त्याचा परिणाम म्हणजे आता मुले दररोज नीटनीटके आणि स्वच्छ गणवेशात शाळेत येतात. शाळेच्या परिसरात कुठेही काडीकचरा व घाण दिसल्यास मुले स्वतः कचरा उचलून टाकतात. सहयोगी खेळाच्या माध्यमातून मुलांमध्ये सहकार्य, संघभावना, स्त्री- पुरूष हा भेदभाव दूर होऊन एकीची भावना वाढीस लागली आहे. मुले एकमेकांना मदत करू लागली आहेत. चांगल्या व वाईट गोष्टींचा फरक मुलांना कळू लागला आहे.
-श्री. नागेश रमेश वारे
मूल्यवर्धनसंबंधी माझा अनुभव
-श्री. नागेश रमेश वारे
अनुभव कथन
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी तयार केलेला ‘मूल्यवर्धन’हा कार्यक्रम मुलांमध्ये मूल्य रुजविण्यासाठी अतिशय उपयुक्त असा कार्यक्रम आहे. सुरुवातीला जेव्हा माझे प्रेरक म्हणून प्रशिक्षण लागले, तेव्हा प्रशिक्षणास जाताना थोडी निराशा होती. पण प्रशिक्षणात असलेले वेगळेपण व वेगळ्याप्रकारचे प्रशिक्षण असल्यामुळे त्यामध्ये आवड निर्माण झाली. मूल्यवर्धन हा कार्यक्रम मुलांमध्ये लोकशाहीची मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने व नियोजनबद्ध संधी मिळवून देणारा आहे. आजच्या काळामध्ये या कार्यक्रमाची मुलांच्या जडण घडणीमध्ये फार गरज आहे, हे प्रशिक्षणाअंती मला जाणवले.
प्रशिक्षणानंतर मी जेव्हा शाळेमध्ये गेलो व मी माझा वर्ग इयत्ता पहिलीमध्ये कार्यक्रमाची सुरुवात वर्गनियम बनविण्यापासून केली. त्या पहिल्याच तासिकेमध्ये मला मुलांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी स्वतःहून बोलते होऊ लागले.
मूल्यवर्धन कार्यक्रमाची मांडणी प्रथम स्वतःकडून केल्याने इयत्ता पाहिलीचे सुरुवातीचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या स्वतःचे घर, नातेसंबंध, आवडीनिवडी याविषयीचे असल्याने मुलांना स्वतःविषयी माहिती सांगण्यात मजा येऊन ती सांगू लागली. माझे घर, माझे कुटुंब, माझी शाळा अशा परिचित घटकांविषयी माहिती सांगून घर, कुटुंब व शाळा याविषयी त्यांना ज्ञात असलेली सर्व माहिती मुले सांगू लागली.
तसेच मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये असलेले शांततेचे संकेत, जोडीचर्चा, गटचर्चा, सामुदायिक वर्तुळ अशा सहयोगी अध्ययन पद्धतीने मुले एकमेकांच्या सहकार्याने चांगले वाईट असे शिकू लागले व त्यावर चर्चा करु लागले. यामुळे मुलांची उत्सुकता वाढली. मुले अनुभवातून, कृतीतून शिकत होती. त्यामुळे ती आनंदाने शिकू लागली.
अशाप्रकारे मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांची हजेरी वाढली. मुले बोलती झाली व सांगितल्याप्रमाणे वर्तन करू लागली. मूल्यवर्धन या कार्यक्रमाचा झालेला फायदा निश्चितच मुलांच्या जडणघडणीमध्ये आपल्याला दिसून येईल.
-यादव नारायण डोळे
अनुभव कथन
-यादव नारायण डोळे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
आमच्या शाळेमध्ये मूल्यवर्धनुळे फार मोठे बदल विद्यार्थी व शिक्षकांमध्ये झालेले आहेत. पहिले सर्व विद्यार्थी वेगवेगळे राहायचे, परंतु आता गटचर्चा किंवा समूहामध्ये चर्चा होत आहे. विद्यार्थी आता चप्पल, बूट वर्गाच्या बाहेर काढत आहेत. शिक्षकांचा व पालकांचा आदर करीत आहेत. वर्ग नियमामुळे विद्यार्थी नियम पाळायला शिकले. शिक्षकांसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले.
आम्ही जेव्हापासून शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु केला तेव्हापासून त्यांची इच्छा दुसऱ्यांच्या समोर मांडू लागले. त्यांना स्वतःची जाणीव होत आहे. ते नेहमी शाळेचे नियम पाळू लागले. विद्यार्थी गटामध्ये राहू लागले. गटचर्चा करून आपापल्या भावना प्रकट करू लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. त्यांच्या अंगी अनेक गुण आले. ते स्वच्छता पाळू लागले. त्यांच्या अंगी आत्मविश्वास आला. घरात ते एकमेकांबरोबर मिळून मिसळून राहू लागले. विद्यार्थ्यांचा जिद्दीपणा कमी झाला. आई, वडील यांच्याबरोबरच घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत आदराने वागू लागले. पालकांच्या भावना समजू लागले.
बाजारातून एखादी वस्तू त्यांनी घरच्यांना आणायला सांगितली आणि ती आणली गेली नाही, तर ते अगोदर चिडचिड करायचे. परंतु आता हा चिडचिडेपणा थोडा फार कमी झाला आहे. या अगोदर कोणत्याही खेळामध्ये माझा क्रमांक पहिला आला पाहिजे अशी इच्छा होती. गटामध्ये खेळ घेतल्याने विद्यार्थ्यांची इच्छाशक्तीमध्ये बदल आला आहे. मूल्यवर्धन हा एकमात्र असा प्रोग्राम आहे जो फक्त आणि फक्त मूल्यांवर आधारित आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम सुरु आहे.
-मोहमद असिफ कुरेशी
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-मोहमद असिफ कुरेशी
मी आणि मूल्यवर्धन
मी आणि मूल्यशिक्षण
असे म्हटले जाते की, माणूस शिक्षणाने सुशिक्षित होतो, अधिक व्यवहारी होतो, बहुश्रुतही होतो. परंतु तो संस्कारी किंवा सुसंकृत होतोच असे नाही. नाहीतर बरेच उच्चशिक्षित वा शिकून मोठ्या पदावर गेलेले लोक देशहिताचा व्यापक विचार न करता पायाजवळ पाहण्याचा स्वार्थी विचार करताना दिसले नसते. त्यासाठी गरज असते वागणुकीचे धडे देण्याची! आणि तेही जोर जबरदस्तीने नाही; तर अगदी बेमालूमपणे.
. . . आणि हे काम संस्कारक्षम अशा बालवयातच होणे गरजेचे आहे. शाळा हे काम अविरतपणे करत असते. कारण जाणीवपूर्वक बालमनावर झालेले हेच संस्कार त्यांच्या पुढील व्यक्तिमत्त्वाचा पाया घालतात.
मुथ्था फाउंडेशनच्या वतीने व खास पुढाकाराने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमाद्वारे त्याला गती मिळाली. ठळकपणे दिशा मिळाली.
मला साधारणपणे सन २००० मध्ये पहिलीला जोडून तिसरीची जोड घालून जोडवर्ग मिळाला. वर्ग खोल्या कमी पडत असल्याने एक वर्ग बाहेरच्या व्हरांड्यात बसवून दोन्ही वर्गाचे काम सुरळीत पार पाडण्याची कसरत सुरू होती. अशात बाहेरच्या वर्गातील मुलांना दुरूनच बघणारी भिल्ल समाजाची आपले आर्थिक आणि शैक्षणिक दारिद्र्यपण दाखवणारी मुले ज्यांना बोलवू जाता घाबरून दूर पळणारी! एकदा त्यांच्या घरीच जायचं ठरवलं. ते राहत त्या झोपडपट्टीत गेलो, तर काय अवस्था! पाहून थक्कच झालो! दिवसाढवळ्या उजेडी सर्रास दारूविक्री चाललेली. तेथेच मद्यपी मद्यपान करीत बसलेले. अश्लील संभाषणे, व कमालीची अस्वच्छता; दुर्गंधी! अशा वातावरणातील शिक्षणाचा गंध नसलेली माणसे ती! परंतु शाळेचे आकर्षण वाटणारी ती मुले!! त्यांना शाळेत नेण्यासाठी मी आलो होतो.
मला बघताच ती मुले जरा दूर पळाली. मी त्यांना चॉकलेट-गोळ्यांचे आमिष दाखवून व गोड बोलून जवळ बोलावले.
(संभाषण)
मी: का पळतात तिकडे?
एकजण: गुरुजी ते तुम्हाले भिते. हाना त्येह्यले.
मी: अहो का मारायचे त्यांना? लेकरं आहेत ते! त्यांना काय कळतं? या वयात त्यांना शाळेत पाठवले पाहिजे तुम्ही.
त्यांची आई: जा रे पोराहो शाळत. गुरजी न्यायले आले तुमाले. . . . गुरुजी उचलतंगडी करून न्या त्याह्यले.
मी: नाही रे बाळाहो! घाबरू नका. तुम्हाला शाळेत यायला आवडेल का ?
मुले: आमाले कपडे नाहीत गुरजी.
मी: तुम्हाला ड्रेस देतो.
मुले: पाटी दप्तरबी नाही.
मी: तेपण देतो. पण तुम्ही दररोज अंघोळ करून शाळेत यायला पाहिजे.
मुले: हा यु आमी उद्यापसून.
मी: नक्की?
मुले: हा नक्की !
‘ठीक आहे’ म्हणून मी उद्याची वाट पाहत शाळेकडे वळलो. . .
दुसऱ्या दिवशी ती दोन मुले लाजत बुजत शाळेत आली. शाळेत त्यांचे स्वागत करण्यात आले. सर्वांशी त्यांची ओळख करून दिली. त्यांच्याशी खूप-खूप गप्पा गोष्टी केल्याने ते लवकरच शाळेत रममाण झाले. त्यांना शाळेतील गाणी आपली कहाणी वाटू लागली. त्यांना शाळा आपली वाटू लागली. गुरुजी आपले वाटू लागले. त्यांना आवश्यक साहित्य पाटी, पुस्तक, पेन्सिल, दफ्तर व ड्रेसही मिळाल्याने खूप आनंद वाटू लागला. त्यांना शाळेचा लळा लागला होता. शिक्षणाच्या प्रवाहात आले होते ते!
दुसऱ्या वर्षी माझी बदली झाली. दोन वर्षांनी मी स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी मुलांना घेऊन तालुक्याला आलो असताना जुन्या शाळेतील तेच विद्यार्थी भेटले.
सोबत आलेल्या शिक्षकांनी विचारले, ओळखले का सर याला? हा तुमचा विद्यार्थी. .. स्कॉलरशिपच्या परीक्षेला आला आज!
वाटले, हेच का ते दगड-गोटे मारणारी? घाणेरड्या शिव्या देणारी? गावभर हिंडणारी मुले? अशा मुलांना आज ही गरुड झेप घेताना पाहून कृतार्थतेचा भाव माझ्या मनात तर कृतज्ञतेचा भाव त्याच्या डोळ्यात तरळून गेलेला मी अनुभवला!
पुढे तो प्रसंग पुन्हा-पुन्हा डोळ्यांसमोर येत गेला आणि आज मूल्यवर्धनच्या निमित्ताने शब्दबध्द झाला!!
-संजय लक्ष्मण सोनुने
मी आणि मूल्यवर्धन
-संजय लक्ष्मण सोनुने
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मागील वर्षांपासून आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु आहे. या कार्यक्रमामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये फार चांगले गुण वाढीस लागले. विद्यार्थी आता क्षमतेनुसार आपले मत स्पष्टपणे मांडत आहेत. जेव्हापासून वर्गनियम वर्गात लावले, तेव्हापासून विद्यार्थी त्यानुसारच कार्य करीत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची उत्सुकता वाढली आहे. ते तासिकेची वाट बघतात. ते आता गटामध्ये राहू लागलेत. एकमेकांशी चांगले संबंध निर्माण झालेले आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांचे चांगले संबंध निर्माण झालेले आहेत..
विद्यार्थी हजेरी वाढली आहे. पहिले विद्यार्थी घरी हट्ट करीत होते, त्यात आता बदल झालेला आहे. आम्ही जेव्हापासून शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु केला तेव्हापासून त्यांची इच्छा दुसऱ्यांच्या समोर मांडू लागले. त्यांना स्वतःची जाणीव होत आहे. ते नेहमी शाळेचे नियम, वर्गनियम पाळू लागले. विद्यार्थी गटामध्ये राहू लागले. गटचर्चा करून आपापल्या भावना प्रकट करू लागले. त्यांच्यामध्ये बोलण्याची क्षमता वाढली. त्यांच्या अंगी अनेक गुण आले. ते स्वच्छता पाळू लागले. आत्मविश्वास वाढला. घरात ते एकमेकांशी मिळून मिसळून राहू लागले. जिद्दीपणा कमी झाला.
-सोहिल सय्यद
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-सोहिल सय्यद
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
मूल्यवर्धन हा एकमात्र असा कार्यक्रम आहे जो फक्त आणि फक्त मूल्यांवर आधारित आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शाळेत तो सुरु आहे. यामुळे अनेक बदल झालेले आहेत. मागील वर्षांपासून आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये बदल दिलेले आहेत. विद्यार्थी आता आपले मत स्पष्टपणे मांडत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी उत्सुकता वाढली आहे. ते तासिकेची वाट बघतात. ते आता गटामध्ये राहू लागलेत. एकमेकांशी चांगले संबंध निर्माण झालेले आहेत. शिक्षक-विद्यार्थ्यांचे चांगले संबंध निर्माण झालेले आहेत. विद्यार्थी हजेरी वाढली आहे.
-खलील शेख
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-खलील शेख
मूल्यांची कृतीतून रुजवणूक
शिक्षणातून मन संस्कारित झाले पाहिजे. हात कार्यक्षम बनले पाहिजेत. मन, मेंदू, मनगट सतत कार्यक्षम ठेवून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून संशोधन करून स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करून कर्मयोगी बनवणारे शिक्षण म्हणजे मूल्यवर्धन. .
प्रत्येकामध्ये सुप्त शक्ती आहे. मूर्तिकाराला दगड बघितल्याबरोबर त्यात त्याला मूर्ती दिसते. आपणाला तो फक्त निर्जीव दगड दिसतो.
जशी दृष्टी तशी सृष्टी
शिक्षकाकडे त्याप्रमाणे दृष्टी असल्यास विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण, कला, कौशल्ये आणि चांगल्या सवयी शोधून त्यांना प्रेरणा देऊन आपण त्या विद्यार्थ्यांना सामर्थ्यशाली भारताचे नागरिक बनवू शकतो, हे आम्हांला मूल्यवर्धनमधून कळले व आता आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत.
आपल्यामध्ये असलेल्या सुप्त शक्तीचा, बुद्धीचा योग्य विकास परिश्रमाशिवाय होत नाही. म्हणून सुप्तगुण असून चालत नाही. त्या गुणांच्या विकासासाठी सतत परिश्रम केले तरच प्रगती होते. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांनी शाळेत, वर्गात स्वतःहून ठरविलेले नियम व शिस्त मुले घरीसुद्धा राबवू लागले. जेव्हाचे काम तेव्हा करणे, खोटे न बोलणे, जर चूक झाली तर त्याच वेळी मोठया मनाने माफी मागणे असे बदल दिसू लागले. ज्याचे जे पूर्ण नाव आहे त्याला त्याच पूर्ण नावाने हाक मारू लागले आहेत. त्यामुळे आदराची भावना निर्माण झाली.
न सांगता, खाली पडलेली वस्तू किंवा न विचारता कोणाची वस्तू उचलून घेणे म्हणजे चोरी हे फक्त उपक्रमामधून व ज्ञानगोष्टीमधून कळले ते मूल्यवर्धनमुळे. आदरणीय शांतिलाल मुथ्था यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. कारण सध्या पैसा, धन व संपत्ती खूप आहे, पण माणसातला माणूस हरवला आहे. माणुसकी लोप पावत आहे. त्यामुळे राक्षसी वृत्ती वाढत आहे. आज जगाला शांति-अहिंसा व मूल्यांची गरज आहे. ती शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हांला मिळत आहे. त्याचे प्रेरक बनण्याचा आम्हांला मान व संधी मिळाली याचे आम्ही भाग्य समजतो.
आजोबा आजींची सेवा करतांना घरातील व्यक्तींनी शाळेचे व मूल्यवर्धनचे आभार मानले.
माझ्या शाळेत एकदा साप निघाला. शाळेतील श्री. जाधव सर काठी घेऊन त्याला मारण्यासाठी निघाले. विद्यार्थ्यांनी त्यांना रोखले. लगेच मुले म्हणू लागले, सर आपली शाळा ही मूल्यवर्धन शाळा आहे. त्यालासुद्धा जीव आहे. त्यालासुद्धा आपल्यासारखे जगावेसे वाटते. आपण सर्पमित्राला बोलावूया आणि आम्ही चिखलीवरून सर्पमित्र यांना फोन करून बोलावले. सर्व विद्यार्थ्यांनी जवळून निरीक्षण केले. हा सर्व बदल मूल्यवर्धनमुळेच घडला.
जीवन जगण्याची कला ही खऱ्या अर्थाने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमुळे मिळत आहे. मी पुनश्च त्यांचे आभार मानतो व त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा करतो.
-सतीश जगदीशचंद्र बेलोकर
मूल्यांची कृतीतून रुजवणूक
-सतीश जगदीशचंद्र बेलोकर
मूल्यवर्धनच्या वाटेवर पहिले पाऊल
मूल्यवर्धन नेमका अर्थ : मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजायला हवीत. तसेच भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडायला हवेत या उद्देशाने शाळांसाठी मूल्यवर्धनचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या उद्देशाने सर्व शाळांमधून हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रेरक म्हणून शिक्षकांची निवड करण्यात आली. ते सौभाग्य मला मिळाले व तेथूनच हा प्रवास सुरु झाला.
मूल्यवर्धन प्रशिक्षण शब्द ऐकताच सुरुवातीला थोडे आश्चर्य वाटले कारण आपण शालेय जीवनापासून पाठयपुस्तकांच्या माध्यमातून मूल्य शिक्षणाचे धडे गिरवीत आलो. मग आज वेगळी गरज काय? या प्रश्नाचे उत्तर हळूहळू कार्यक्रमाला सुरुवात झाल्यावर लक्षात यायला लागले. मूल्यवर्धन या शब्दाचा अर्थ व व्याप्ती लक्षात यायला लागली. इयत्ता पहिली ते चौथी उपक्रमाचे नियोजन हाताळताना लक्षात आले की, ‘शुध्द बिजापोटी, फळे रसाळ गोमटी.’ सुरुवातीलाच जर शिक्षणाचे बीज योग्यप्रकारे रुजले गेले तरच खऱ्या फळाची गोडी मिळेल. तसेच उपक्रमाची इयत्तानुसार वाढणारी व्याप्ती पाहता लक्षात आले की, मूल्यांची जबरदस्ती न करता रुजवण करावयाची आहे. मूल्ये ही आपल्या संविधानातील मुल्यांवर आधारित आहेत. सुजाण नागरिक घडविणे हाच मूळ आधार आहे. हेच उदि्दष्ट डोळयासमोर ठेऊन प्रशिक्षणानंतर उपक्रम राबविण्यास सुरुवात झाली.
सुरुवातीला प्रेरक म्हणून आपल्या वर्गापुरताच कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट होते, परंतु छोटी शाळा असल्यामुळे 1 ते 4 च्या वर्गांना समाविष्ट करणे योग्य वाटले म्हणून मी सर्व वर्गांना समाविष्ट केले. सुरुवात वर्गनियमाने व शांतता संकेताने झाली. वर्गनियम त्यांनी बनविले म्हणून पालनही ते योग्य प्रकारे करु लागले. काही दिवस त्यांना नियमाची आठवण करुन दयावी लागली, हे ही खरे पण लोकशाहीची सुरुवात येथूनच झाली.
पुढे आठवडयातून तीन तासिका घ्यावयाच्या असल्यामुळे सुरुवातीला खेळाच्या तासात 4. 00 ते 4. 30 दरम्यान तासिका घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुलांना उपक्रम चांगले व आनंददायी वाटल्यामुळे मुले उपक्रम व सहयोगी खेळात खूप उत्सुकता दाखवायला लागले. त्यामुळे मध्यान्हभोजनानंतर जो वेळ असतो त्यावेळात ही तासिका सुरु झाली. यात अबोल मुले ही बोलकी व्हायला लागली.
त्यानंतर हळूहळू मुलांमध्ये, त्यांच्या वर्तनात बदल जाणवू लागला शाळेला सुरुवात झाल्यापासून मुलांच्या वर्तनाचे निरीक्षण केल्यास जाणवले की, मुले शाळेत वेळेवर उपस्थित राहतात. सोबत ऐकमेकांना घेऊन घेणे, परिसर स्वच्छ ठेवणे, माझा वर्ग मीच स्वच्छ केला पाहिजे ही चुरस मुलांमध्ये दिसायला लागली. तसेच शाळेत न येणाऱ्या मुलांना बोलावून आणणे, न आल्यास त्यांच्या अडचणी सांगणे, मनमाकळेपणाने घरच्या गोष्टी, गमती सांगणे, गावात घडलेल्या गोष्टी मोकळेपणाने सांगणे, या गोष्टी घडू लागल्या.
स्वच्छतेबरोबर त्यांच्या एकमेकांसोबतच्या वर्तनात बदल दिसून आला. गटकार्य करीत असताना त्यांच्यात होणारे वाद, भांडणे कमी झाले. इतरांना आपणहून मदत करणे, चूक झाल्यास प्रामाणिकपणे कबुल करणे, एखादी वस्तु सापडल्यास वर्गशिक्षकांकडे देणे या गोष्टी घडू लागल्या. यातच खूप समाधान वाटले.
याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना स्वत:ची ओळख झाली. त्यांच्या आवडी-निवडी, त्यांच्यातील सुप्तगुण हळूहळू बाहेर यायला लागले. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढला. बदलीनंतर अपरिचित मुलांशी जवळीकता निर्माण व्हायला लागली. महत्त्वाचे म्हणजे माझ्या वर्गातील खोडकर मुलांच्या तक्रारी न सांगता त्यांना अभ्यासात मदत करणारी संख्या वाढली.
विद्यार्थ्यांबरोबर आम्हा शिक्षकांना ही मूल्यवर्धन कार्यक्रमाचा फायदा झाला. कारण मूल्ये रुजविण्यासाठी रुजविणाऱ्यात सुध्दा मूल्ये विकसित व्हायला हवीत. कारण म्हणतात ना “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” मुले अनुकरणाने, निरीक्षणाने शिकतात. माझ्या बाबतीत म्हणायचे तर संयम आणि सहनशीलता या दोन गुणांचा अधिक विकास झाला. एखाद्या मुलाला आलेच पाहिजे या शब्दातील ‘च’ या अक्षराचा अट्टाहास न करता मुलांच्या गतीने शिकवावे हे लक्षात आले.
या उपक्रमाची यशस्वीता मला सुरुवातीला नाही पण एका महिन्यानंतर दिसायला लागली, ती छोटयाछोटया बदलातून. तेच मला या चिमुकल्यांकडून अपेक्षित होते. सुरुवातीला जी मुले काम सांगितल्यावर एकमेकांकडे पाहत होती, ती आज वर्ग उघडण्यापासून ते स्वच्छता व जाताना वर्ग बंद करणे, खिडक्या लावणे ही कामे करतात, यातच खरे समाधान आहे.
या सर्व यशस्वीतेचे श्रेय मुथ्था फाउंडेशला जाते. सर्वांचे आभार की, प्राथमिक स्तरावर अशा प्रकारची काळाची गरज असलेला कार्यक्रम राबविण्याचा निश्चय केला व पायाभरणी एक सुंदर व मनोरंजनात्मक पध्दतीने आमच्या हातात दिली. यातच आमचे सौभाग्य ही दिशा अशीच पुढे चालवत ठेवू.
-शीला बाजीराव कोल्हे
मूल्यवर्धनच्या वाटेवर पहिले पाऊल
-शीला बाजीराव कोल्हे
मूल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
आमच्या शाळेमध्ये मूल्यवर्धनुळे फार मोठे बदल विद्यार्थी व शिक्षकांमध्ये झालेले आहेत. पहिले असे होते की, सर्व विद्यार्थी वेगवेगळे राहायचे. आता गटचर्चा, जोडीचर्चा किंवा समूहामध्ये चर्चा होत आहेत.
विद्यार्थी आता चप्पल, बूट वर्गाबाहेर काढत आहेत. विद्यार्थी शिक्षकांचा, पालकांचा आदर करीत आहेत. एकमेकांसोबत आदराने वागत आहेत. वर्गनियमामुळे विद्यार्थी नियम पाळायला शिकलेत.
-मो. मोझम बशीर मो. नईमोददीन
मूल्यवर्धनामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-मो. मोझम बशीर मो. नईमोददीन
मूल्यर्वधनमुळे झालेला बदल
मूल्यर्वधनमुळे झालेला बदल थोडक्यात विशद केलेला आहे.
मूल्यवर्धन:- भावी सुजाण नागरिक घडवण्याची गुरुकिल्ली
“गुरुजी, मुलांवर कोणती जादू केली, की ज्यामुळे मुले एवढी शहाणी झालीत!” एका पालकाची प्रतिक्रिया ऐकली आणि मूल्यवर्धन सार्थक झाल्याची खात्री पटली.
भाग्यश्री जी शाळेत येण्यापेक्षा लहान भावाला सांभाळण्यासाठी नेहमीच घरी असायची, ती नियमित शाळेत यायला लागली; नेहमी तोंडात शिव्या असणारा आशिष आता शिव्या देत नसल्याची पालकांची प्रतिक्रिया बरंच काही सांगून जाते. वर्गात मुले स्वतःचे नियम तयार करून त्याचे पालन करू लागली. मुलांमध्ये स्वयंशिस्त दिसू लागली. मुले ‘शांतता संकेत’ पाळू लागली. शाळेची घंटा न वाजवताच मुले शाळेत येताना पाहून आम्हांलाही खूप आनंद मिळतोय. शिक्षकांविषयीची भीती कमी झाल्यामुळे मुले प्रश्न विचारू लागली. मुले घरची सांगितलेली काम असतील, शाळेतील शिस्त असेल, मोठ्यांशी आदराने बोलणे असेल सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने करायला लागली. त्यामुळे पालकांना मुलांच्या वागण्यातील बदल स्पष्टपणे जाणवायला लागले. कसे वागायचे? याचे नियम स्वतःच बनवून शाळेतील मुले त्याचे पालन करायला लागली. बोलायला संकोच करणारी मुले विविध उपक्रमात भाग घेऊ लागली, बोलू लागली; याचे खरे श्रेय शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धनला जाते. स्वतःच्या अधिकाराची आणि सोबत सामाजिक जबाबदारीची जाणीव मुलांमध्ये मूल्यवर्धनमुळे रुजायला मदत झाली. संविधानातील मूल्यांशी मूल्यवर्धनमधील मूल्यांची सांगड घातल्यामुळे संविधानातील मूल्ये आपसूकच मुलांमध्ये रुजायला हातभार लागला. वृक्षारोपणाचे महत्त्व मुलांना समजले, स्वतः वृक्षारोपण करून स्वतःच्या झाडाचे संरक्षण, संवर्धन मुले आनंदाने करू लागली. सोबतच दुसऱ्याच्या झाडांनासुद्धा पाणी घालायला शिकली. मूल्यवर्धनमुळे हे शक्य झालं.
मुलांना केंद्रबिंदू मानून ज्ञानरचनावादावर आधारित बालस्नेही, आनंददायी शिक्षण पद्धतीचा वापर केल्यामुळे शिक्षण आनंददायी झाले. मूल्ये ही शिकवण्याची बाब नसून ती विविध उपक्रमांमधून मुलांमध्ये रुजवता येऊ शकते; हे मूल्यवर्धमधून समजले. एकंदरीत काय तर, मुलांच्या सर्वांगीण विकासासोबत, भारताचा एक सुजाण, जबाबदार, संवेदनशील नागरिक घडविण्याची गुरुकिल्ली म्हणजे शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आयोजित मूल्यवर्धन प्रकल्प होय.
-सुरेश नारायण तायडे
मूल्यर्वधनमुळे झालेला बदल
-सुरेश नारायण तायडे
मूल्यवर्धन – एक नवसंजीवनी
दिवसागणिक वाढत जातं वय
तसंच वाढत जातं वार्धक्याचं भय
पण तोच माणूस देऊ शकतो जीवनाला आकार
ज्यानं कायम जपला आहे आपल्यातला संस्कार
माणूस घडविण्यासाठी आवश्यक आहे असे एक प्रभावी माध्यम
ते सिद्ध करू शकते फक्त मूल्यवर्धन. . . . !
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन प्रस्तुत मूल्यवर्धन हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांपासून ते तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहचणे किती गरजेचे आहे, हे मला तेव्हा कळाले जेव्हा मी स्वतः मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मूल्यवर्धन प्रेरक म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. असं म्हणतात की, Charity begins at home. चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी याचा प्रत्यय मला त्यावेळी आला. आज मी 35 वर्षे वयाचा आहे. ज्या काळात मी किंवा माझ्या वयाचे सर्वजण शिकलो, घडलो तो काळ, ती परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. त्या काळात आमच्याकडे मोबाईल नव्हताच. शिवाय शालेय साहित्यापासून ते वैयक्तिक आवडीनिवडीपर्यंत कोणतीही गोष्ट असो, मग ती मिळण्यासाठी आम्हांला खूप प्रतिक्षा करावी लागायची. आज मात्र ती परिस्थिती राहिली नाही. मागितले ते सहज मिळते. ही घातक सवय आज पालकांनी मुलांना लावली आहे, ज्यामुळे मुले आज नकार किंवा अपयश पचवू शकत नाहीत. मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला दिसत आहेत.
‘जबाबदारी स्वीकारणे, स्वची जाणीव, संस्कार, स्वायत्तता अशा अनेक मूल्यांचा आज ऱ्हास होत आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलणे गरजेचे वाटत होते. म्हणूनच मूल्यवर्धन हा विषय एक नवसंजीवनीच्या रूपाने समोर आला. मूल्यवर्धनची परिणामकारकता इतकी शक्तीशाली आहे की, नक्कीच आपली भावी पिढी ही लोकशाहीचे एक सुजाण, जबाबदार, कर्तबगार नागरिक म्हणून घडतील यात अजिबात शंका नाही.
मी माझ्या शाळेत मूल्यवर्धन उपक्रम राबविल्यानंतर माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेले बदल
1) विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली.
2) विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.
3) ते जबाबदारी स्वीकारू लागले.
4) सहकार्यवृत्ती वाढीस लागली.
5) भेदभाव न करता सर्वांशी मिळूनमिसळून राहू लागले.
6) स्वतः च्या भावना, विचार, मत स्पष्टपणे व्यक्त करू लागले.
7) सर्जनशीलता विचारातून प्रकट होऊ लागली.
8) इतरांचा आदर करू लागली.
9 )प्रामाणिकपणा कृतीतून स्पष्ट दिसू लागला.
10) विविध मूल्ये नकळत सहजतेने त्यांच्या वर्तनातून, कृतीतून स्पष्टपणे दिसू लागली.
11) पाल्यांमध्ये झालेला बदल पाहून पालकही भारावून गेले.
असे अनेक बदल, चांगल्या सवयी, संस्कारक्षम तथा बोधपर उपक्रमाच्या माध्यमातून मूल्यवर्धनने सत्यात उतरविल्या.
मूल्यवर्धनने प्रेरित होऊन शालेय विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक बांधवांमध्येदेखील संवेदनशील बदल झालेले दिसून आले. असा हा मूल्यवर्धन विषय मानवी जीवनासाठी अत्यंत गरजेचा असून तो भावी पिढीसाठी एक नवसंजीवनी ठरेल, हे त्याच्या परिणामकारकतेवरून लक्षात येते.
-गजानन विष्णुराव राखोंडे
मूल्यवर्धन – एक नवसंजीवनी
-गजानन विष्णुराव राखोंडे
मी आणि मूल्यवर्धन अनुभव
मूल्यवर्धन उपक्रम माझ्या शाळेत राबवत असताना मला आलेले अनुभव अतिशय सकारात्मक असून या उपक्रमातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यासोबत या उपक्रमातील इतर मूल्यांचा अतिशय प्रभावी असर होणार आहे असे मला वाटते.
मी आणि मूल्यवर्धन
आधुनिक युग हे जीवघेण्या स्पर्धेचे युग असून भौतिकवाद प्रचंड फोफावलेला या समाजात आपल्याला दिसून येतो. मूल्यवर्धन हा कार्यक्रम नव्यानेच सुरु झाला, तेव्हा माझ्या मनात सर्वप्रथम हा प्रश्न आला की, स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी शिक्षणामध्ये मूल्यवर्धन या कार्यक्रमाची गरज आताच का भासली? मी जेव्हा प्रशिक्षणाला गेलो तेव्हा तेथील तज्ञांना हा प्रश्न मी प्रथम विचारला आणि त्यांनी मला या प्रश्नांचे उत्तर आपणास मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर शेवटच्या दिवशी मिळेल असे सांगितले. मी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मला मूल्यवर्धन कार्यक्रमाची आवश्यकता का आहे, याचे उत्तर मिळाले.
ते असे की, मागील काही काळात तंत्रज्ञानात प्रचंड क्रांती झाली. मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, इंटरनेट ही स़ाधने नव्या पिढीच्या हाती आली. एका क्लिकवर संपूर्ण जग त्यांच्या जणू हातात सामावले. मात्र यात चांगले काय वाईट काय याची जाण नव्या पिढीला राहिली नाही. वाईटाच्या मागेच ही शाळेतील मुले आकर्षित झालेली आज दिसत आहेत. आई , वडील, बहिण, भाऊ, परिवार, आप्त, शेजारी, मित्र यामधील नाते संबंधात दुरावा निर्माण झाला. या सर्व मूल्यांचा होत असलेला ऱ्ह।स थांबवण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची निश्चितच विविध उपक्रमांच्या माध्यमातून जि. प. प्राथमिक शाळांतून मदत होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुढील मूल्ये मला माझ्या शाळेत रुजलेली दिसून आली.
या उपक्रमातून माझ्या शाळेतील मुलांमध्ये स्वची जाणीव निर्माण झाली. सुरुवातीला काहीही न बोलणारी लाजरी बुजरी मुले आता स्वतःविषयी, शाळेविषयी, कुटुंबाविषयी, आवडीनिवडी, छंद याबद्दल मनमोकळी बोलू लागली. स्वतःच्या समस्या सांगू लागली. इतरांच्याही ऐकू लागली. स्वतःच्या अविवेकी वर्तनाची त्यांना जाणीव होऊ लागली.
स्वतःच्या जबाबदारीची जाणीव त्यांना झाली. म्हणजे चपला, जोडे ती आता रांगेत वर्गाच्याबाहेर काढू लागली. शालेय परिसरातील काडीकचरा आपण न सांगता उचलून कचरापेटीतच टाकू लागली. नियमित अंघोळ, स्वच्छ धुतलेले कपडे, वैयक्तिक स्वच्छता, दुपारी जेवणाआधी साबणाने शाळेत हात धूऊ लागली. शाळेत न येण्याचे खरे कारण आता सांगू लागली. खरे बोलण्याचे महत्त्व त्यांना कळाले.
वाढदिवसाला प्रत्येक मुलाला आम्ही रोप भेट देतो. यातून पर्यावरणाविषयी जागृती होत आहे. सहयोगी खेळातून खेळतांना आपला मित्र, मैत्रीण खाली पडली किंवा जखमी झाली तर इतर मुले त्यांना धरुन मदत करतात.
मूल्यवर्धन उपक्रमातून सहयोगी खेळ, गटात चर्चा, आपले अनुभव सांगणे, गाणी गोष्टी, मूक अभिनय, चित्रे काढणे, मुक्त हस्तकला या उपक्रमातून सांघिक भावना, स्वअभिव्यक्ती विकास, मुक्तपणे व्यक्त होणे, या मूल्यांची रुजवणूक मुलांमध्ये झालेली दिसून आली.
शांतता संकेत हा उपक्रम आमच्या वर्गात फार प्रभावी झाल्याचा मला अनुभव आला. मी हात वर केला म्हणजे मुले त्यांची करत असलेली कृती थांबवून माझ्या सुचनेकडे लक्ष देतात मला त्यांना इकडे लक्ष द्या, असे म्हणायची गरज पडत नाही.
एकंदरीत मूल्यवर्धन कार्यक्रमातील विविध उपक्रमांतून मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव, स्व अभिव्यक्ति विकास, इतरांना मदत करणे, आपल्या वर्तनात सुधारणा करणे, यासारख्या मूल्यांची रुजवणूक मी करु शकलो, याचे मला समाधान वाटते.
मूल्यवर्धन कार्यक्रमातून शिक्षक-विद्यार्थी संबंध अधिक जवळीकतेचे व मित्रत्त्वाचे तयार झाले. मुलांना शाळेची अधिक आवड निर्माण झाली. हे माझ्या अनुभवातून या कार्यक्रमाचे फलित आहे, असे मला वाटते.
-विजय तुकाराम बावस्कर
मी आणि मूल्यवर्धन अनुभव
-विजय तुकाराम बावस्कर
आम्ही बदललो
शिक्षक म्हणतात, मूल्यवर्धनमुळे आम्ही बदललो.
आमच्या शाळेत मूल्यवर्धनचे विविध उपक्रम राबवताना आम्हांला विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल झालेले दिसले.
माझ्या वर्गातील इयत्ता तिसरीमधील प्रिया नावाची मुलगी हुशार पण अबोल. मूल्यवर्धन उपक्रम खेळ, गाणी, विचार प्रवर्तक प्रश्न यामुळे ती वर्गात बोलू लागली, स्वतःचे मत ठामपणे मांडू लागली. तिच्यामध्ये झालेला हा बदल पाहून इतर मुलीसुद्धा ज्या कमी बोलायच्या, त्यापण बोलू लागल्या. त्यामुळे वर्गातील वातावरणात नवीनच चैतन्य निर्माण झाले.
मागील वर्षी गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळ काल्याचा कार्यक्रम घ्यावा अशी शाळेतील सर्वांची इच्छा होती. सर्वांनी मुख्याध्यापिका मॅडमजवळ आग्रहाची विनंती केली. कार्यक्रमाचा दिवस ठरला. संपूर्ण शाळेतील मुलांच्या आनंदाला जणू उधाण आले होते. मुले रंगीबेरंगी कपडे घालून शाळेत आली. काही मुले कृष्ण बनून आले. मुलीसुद्धा सुंदर फ्रॉक घालून आल्या तर कोणी राधेचे वेश परिधान करून आल्या. शाळेत जणू रंगीत फुलपाखरेच इकडून तिकडे फिरत होती. फुलांनी सजवलेले मडके दहीहंडी म्हणून वर टांगले होते. त्यात दही भरले होते. मुलींचा घोळका गोलात उभा राहून गरबा खेळू लागला. टिपऱ्या व संगीताच्या तालावर मुलींनी ठेका धरला. शाळेतील छोटी मुले मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रम बघू लागली. आम्ही सर्व शिक्षकही मुलांकडे कौतुकभरल्या नजरेने बघत होतो. मुले-मुली टिपऱ्या खेळून थकले. इयत्ता पाचवी ते सातवीच्या मुलांनी मनोरा करायला सुरुवात केली. माझ्या वर्गातील इयत्ता तिसरीमधील मोहन अतिशय धीट मुलगा. तो कृष्ण बनून आला होता. घरची परिस्थिती अतिशय गरिबीची असून त्याच्या आईने आहे त्या वस्तू जमवून त्यास सजवले होते. त्याचे वजन कमी असल्यामुळे आम्ही त्याला दहीहंडी फोडण्यात सर्वात वरती चढविले. त्याने बासरीने मडके फोडले आणि त्याचा पाय घसरला. तो इतक्या उंचीवरून खाली पडणार म्हणून मी धावत जाऊन त्याला पकडले. पण मडक्याचा एक मोठा तुकडा माझ्या ओठावर लागला. त्या मुलास खाली ठेवून मला अचानक जोरदार लागल्यामुळे मी ओठ घट्ट पकडले. सगळी मुले हिरमुसली व माझ्याभोवती गोळा झाली. माझ्या सहकारी भगिनींनी मला खाली बसवले आणि कोणीतरी पटकन पाणी घेऊन आले. ओठ सुजला होता, डोळ्यातून अश्रू येऊ लागले.
मोहनने ते सर्व पाहिले व तो मुलांची गर्दी बाजूला करून माझ्याकडे येऊ लागला. माझ्यासमोर आला व कान पकडून पटापट उठाबशा काढून लागला व तोंडाने म्हणू लागला, “सॉरी मॅडम, माझ्यामुळेच तुम्हाला लागले. सॉरी मॅडम.” ते छोटेसे बाळकृष्णाचे रूपडे माझ्यापुढे क्षमा मागत होते. ते सर्व पाहून मी एका क्षणात माझे दुःख विसरले व त्यास मायेने पोटाशी पकडले. (सुखावले मन प्रेमे पाझरती लोचन) माझ्या डोळ्यात आसू व ओठांवर हासू अशी अवस्था झाली. मला हासताना बघून एका क्षणात सर्व मुले आनंदली. माझ्यामुळे मुलांच्या आनंदावर विरजन पडायला नको म्हणून मी पटकन उठून मुलांना शाळेत बनवलेला गोपाळकाल्याचा प्रसाद वाटू लागले. या घटनेमुळे छोटा मोहन इतका चांगला वागू शकतो, याचे मला आश्चर्य वाटले. जी गोष्ट मोठ्या माणसांना समजणार नाही, ती त्याने एका चुटकीसरशी केली होती. स्वतःच्या आई-वडिलांप्रमाणे शिक्षकांच्याही मनात त्याने आपले स्थान निर्माण केले होते. याचे सर्व श्रेय मूल्यवर्धन उपक्रमांना जाते. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील प्रेम वाढीस लागते.
आज मोबाईल, टीव्हीचा अतिरेकी वापर प्रत्येक घरात होत असताना प्रत्येक पालकास हीच काळजी असते. माझ्या मुलाचं काय होणार? मुलगा अभ्यास करत नाही इथपासून तो बिघडत चालला आहे अशा तक्रारीचा सूर पालकांचा असतो. अशा निराश पालकांसाठी विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेच्या शेवटी असणारा हितगुज पालकांसाठी हा भाग जर प्रत्येक पालकाने वाचला तर, त्यांना कळेल की, आपल्या पाल्याशी कसे वागावे.
१. इतर मुलांशी तुलना करू नये.
२. मुलांचे काही चुकलेच तर त्यास कठोर शिक्षा न करता चांगल्या वाईटाची जाणीव करून द्यावी.
३. आपले पाल्य हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, त्याच्याशी सुसंवादाने एक घट्ट नाते असावे.
मूल्यवर्धनच्या उपक्रम पुस्तिकेमुळे आमच्या शाळेचे स्वरूप बदलले आहे.
नवा जन्म देणारी, नवे वळण देणारी, नवी अस्मिता देणारी शाळा मातेला आवडते, देवी सरस्वतीला आवडते.
शाळा कोणासाठी. . . . . . . ? समाजासाठी
शिक्षण कशासाठी. . . . . . . ? विकासासाठी
शिक्षक-पालक कोणासाठी. . . . . . . . ? विद्यार्थ्यांसाठी
विद्यार्थी कशासाठी. . . . . ? ज्ञानार्जनासाठी
ज्ञान कशासाठी. . . . ? सेवेसाठी
मस्तक झुकावं ते. . . . . . . . . . . . . . . . . कर्तृत्वापुढे
मान लवावी ती. . . . . . . . . . . . . . . . . . त्यागापुढे
पूजा करावी ती. . . . . . . . . . . . . . . . . . . राष्ट्रनिष्ठेची श्रमनिष्ठेची सेवाभावाची.
-अनुराधा संजय सोनुने
आम्ही बदललो
-अनुराधा संजय सोनुने
मूल्यवर्धन : एक अनुभव
मूल्यवर्धन : आदर्श समाजाची पायाभरणी
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनद्वारा जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामधून मुलांमध्ये आमुलाग्र बदल होत असल्याचे दिसून येत आहे. इयत्ता पहिली ते पाचवीमधील विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये विविध उपक्रमाद्वारा रुजविण्यात येत असलेली मूल्ये चिरकाल टिकणारी असून यातूनच नजिकच्या आदर्श समाजाची पायाभरणी होत असल्याचे निश्चित आहे.
आजच्या विभक्त कुटुंबपद्धतीने कुटुंबातील सूर हरवले व त्यामुळे समाजातील सूर हरवले आहेत. कौटुंबिक संस्काराचा अभाव झाला परिणामी सामाजिक संस्काराचाही अभाव निर्माण झाला. अशा या कठीण प्रसंगी मुल्यांच्या या मातृभूमित मुल्यांचे पिक अमाप यावे यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून आदर्श समाजनिर्मीतीसाठी महत्त्वाचे बिजारोपण केले आहे .
मूल्यवर्धन कार्यक्रमात शिक्षक उपक्रम पुस्तिका, विद्यार्थी उपक्रम पुस्तिका, प्रभावी प्रशिक्षण यांच्या समन्वयाने कार्यक्रम राबविण्यात शिक्षकांना योग्य दिशा मिळाली. विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेमध्ये समाविष्ट उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ झालेली आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता यासह अनेक मूल्यांची रुजवणूक होत आहे.
वर्गअध्यापन करताना काही मुले आत्मविश्वासाच्या अभावामुळे शिक्षण प्रक्रियेत पूर्णतः सहभागी होत नसत. परंतु विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेमध्ये अंतर्भूत असलेल्या उपक्रमांधून अशा मुलांची अध्ययनाची भीती नाहीशी झाली. ही मुले इतर मुलांमध्ये मिसळू लागली. शिक्षकांशी संवाद साधू लागली.
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीनंतर मुलांमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले. मुले आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन पुढे चालू लागली आहेत.
आपल्या गावाजवळून नदी झुळझुळ वाहत होती. तिचे पाणी निर्मळ होते ही एक आख्यायिका झालेली आहे. ती आख्यायिका जिवंत करण्याचे काम मूल्यवर्धन करीत आहे.
-मुरलीधर पांडुरंग शिंदे
मूल्यवर्धन : एक अनुभव
-मुरलीधर पांडुरंग शिंदे
महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांमधून मूल्यशिक्षणाचा प्रभावी कार्यक्रम म्हणजे मूल्यवर्धन
महाराष्ट्रामध्ये एक लाखपेक्षा जास्त प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये इयता पहिली ते पाचवीपर्यंत 65 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हेच विद्यार्थी उद्या आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करणारे नागरिक बनणार आहेत. भारतीय संविधानाने आदर्श नागरिक निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले आहे. न्याय, स्वतंत्र, समता, बंधूता या मूल्यांची जोपासना करणारा नागरिक घडविणे हे शालेय शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-निलेश अशोक शिंदे
महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांमधून मूल्यशिक्षणाचा प्रभावी कार्यक्रम म्हणजे मूल्यवर्धन
-निलेश अशोक शिंदे
मूल्यवर्धन उपक्रम ठरला माझ्या वर्गासाठी संजीवनी
जे का रंजले गांजले,
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा
या उक्तीप्रमाणे गावातील महाराष्ट्र पोलीस सुनील भाऊ सरकटे यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेत पाणी बॉटल वाटप करण्यात आले. या प्रसंगाला अनुसरून माझ्या वर्गात घडलेला एक अमुलाग्र बदल व मूल्यवर्धनचा अविष्कार खालील प्रमाणे व्यक्त करतो.
मूल्यवर्धन उपक्रम हा माझ्या वर्गासाठी अमृत संजीवनी असा ठरला असून वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाणी बॉटल वाटप करण्यात आले. परंतु आदेश संदीप पवार हा विद्यार्थी आजारी असल्यामुळे तो त्या दिवशी शाळेत येऊ शकला नाही. सर्व विद्यार्थ्यांना पाणी बॉटल मिळाल्यानंतर. आदेशला ही बॉटल भेटली नाही म्हणून वैभव माझ्याकडे आला. व मला म्हणाला सर आदेश बिमार आहे त्याला पाणी बॉटलची गरज आहे त्याला पण एक पाणी बॉटल दिली पाहिजे . तुम्हीच म्हटले होते ना सर आपण एकमेकांना मदत केली पाहिजेत. आदेशला मदतीची गरज आहे. मी म्हटलं अरे पाणी बॉटल तर साऱ्या संपल्या लगेच तो म्हणाले माझ्याकडे नवीन पाणी बॉटल आहे. मला या पाणी बॉटल ची गरज नाही. मी माझी पाणी बॉटल त्याला देऊ का मी म्हटलं काही हरकत नाही. लगेच तो त्याची पाणी बॉटल घेऊन घरी गेला व त्याला ती पाणी बॉटल दिली. ते बघितल्यावर मला खूप आनंद वाटला. खरच वाटलं की मूल्यवर्धनमुळे या विद्यार्थ्यांच्या बालमनावर अविष्कार करून गेला. मी त्या विद्यार्थ्यांचे सर्वांसमोर स्वागत केलं व इतरांबद्दल आस्था काय असते, याची प्रचिती जणू साक्षात झाली. म्हणून मूल्यवर्धन उपक्रमाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. पुन्हा एकदा या उपक्रमात आम्हांला सामील करून घेतल्याबद्दल धन्यवाद
-मोहमद असिफ कुरेशी
मूल्यवर्धन उपक्रम ठरला माझ्या वर्गासाठी संजीवनी
-मोहमद असिफ कुरेशी
मूल्यवर्धन उपक्रमामुळे झालेले बदल व रुजलेले मूल्य
सन 2018-19 मध्ये जि. प. म. उच्च प्रा. शाळा मांडणी येथे इयत्ता तिसरी चे खालील मूल्यवर्धन उपक्रम घेण्यात आले.
उपक्रमांचे नाव-
1) मी कोण? 2) आपले कुटुंबिय 3) शांतता संकेत 4) वर्गनियम 5) कुटुंबवृक्ष 6) झाडे वाचवा झाडे जगवा 7) माझी शाळा 8) झाडांचे उपयोग इत्यादी उपक्रम घेण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व उपक्रम हे हसतखेळत व आनंददायी पद्धतीने घेण्यात आले.
उपक्रमाच्या कार्यवाहीनंतर शालेय वातावरणात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वात, त्यांच्या वर्तनात, शालेय शैक्षणिक प्रगतीत झालेले बदल, परिणाम व रुजलेली मूल्ये पुढीलप्रमाणे –
.
उपक्रम कार्यवाही -उपक्रमामुळे झालेले बदल व रुजलेले मूल्य
उपक्रम क्र. 1) मी कोण?
झालेले बदल, परिणाम व रुजलेली मूल्ये –
1) सर्व मुलांना एकमेकांची ओळख झाली.
2) लाजाळू मुलांचा आत्मविश्वास वाढला.
3) एकमेकांबद्दल आपुलकी व प्रेम वाढले.
4) संघभावना वाढीस लागली.
उपक्रम क्र. 2)आपले कुटुंबिय –
झालेले बदल व परिणाम –
1) सर्व विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबातील व मित्रांच्या कुटुंबाबद्दल ओळख झाली.
2) कुटुंबप्रेम वाढीस लागले.
3) कुटुंबातील व्यक्तींबद्दल आदरयुक्त भावना निर्माण झाली.
4) एकता व संघभावना या मूल्यांची रूजवणूक झाली.
5) सामाजिक एकोपा वाढण्यास मदत झाली.
उपक्रम क्र. 3) शांतता संकेत-
झालेले बदल व परिणाम –
1) अवधान टिकण्यास मदत झाली.
2) निरिक्षण क्षमता वाढली.
3) वर्गातील भांडणे कमी झाली.
4) संघभावना वाढीस लागली.
5) सहकार्य या मूल्यांची रूजवणूक झाली.
6) वर्गातील प्रगती उंचावण्यास मदत झाली.
उपक्रम क्र. 4) कुटुंबवृक्ष –
झालेले बदल व परिणाम –
1) निसर्गाबद्दल प्रेम वाढले.
2) वृक्षाप्रमाणे कुटुंबाच्यासुद्धा शाखा असतात हे समजले.
3) कुटुंबातील सर्व व्यक्तींबद्दल ओळख झाली.
4) कुटुंबातील व्यक्तींबद्दल आदर व प्रेम
रूजलेली मूल्य-
1) निसर्गप्रेम 2) कुटुंबप्रेम 3) कुटुंबाबद्दल आदर 4) सामाजिक एकोपा 5) जबाबदारीची जाणीव
या प्रमाणे अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुलांमध्ये विविध मूल्यांची रूजवणूक करण्यात आली.
-डी. पी. तारे
मूल्यवर्धन उपक्रमामुळे झालेले बदल व रुजलेले मूल्य
-डी. पी. तारे