नवचैत्यन्य निर्माण करणारे उपक्रम
या उपक्रमामध्ये असलेली ‘कागदी नाव’ बनविण्यासाठी मी मुलांना घोटिव कागद आणून दिले. त्यांना प्रथम या कागदाचा उपयोग कसा करावा हे मी सांगितले. त्यानंतर मुलांनी अतिशय सुंदररित्या घोटिव कागद कापून ते चित्रावर चिकटविले. यातून मला खूप काही अनुभव आले.
सर्वांत अगोदर सांगावेसे वाटते की, मूल्यवर्धन पुस्तिका ही वरदान ठरली आहे. कारण रिकाम्या वेळेत मुले अतिशय आनंदात ही पुस्तिका वाचतात व त्यातील विविध उपक्रम सोडवत असतात. या घोटिव कागदामुळे मुलांना रंग ओळखता येतात, त्यांचे आकार ओळखता येतात. जी मुले वर्गात बोलत नव्हती, ती मुले बोलायला लागली. माझ्या वर्गाची पटसंख्या आहे त्यापैकी 100% उपस्थिती दिसू लागली. मी रोज मूल्यवर्धन पुस्तिकेचा 1 तास वर्गात घेत असतो. मुले आवडीने या पुस्तिकेचा अभ्यास करू लागली, वाचू लागली. त्यामुळे मला असे वाटते की, या पुस्तिकेमुळे मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
-चंद्रशेखर वाडिले