मूल्यवर्धनमधून मूल्यांची रुजवणूक
मूल्यवर्धन हे नाव सुरूवातीला ऐकले तेव्हा मनात असे प्रश्न निर्माण झाले की, आपण यापूर्वी मुलांमध्ये मूल्ये रुजवत नव्हतो का? मग त्यासाठी हा वेगळा कार्यक्रम का? पण जेव्हा मूल्यवर्धनचे प्रशिक्षण झाले तेव्हा ख-या अर्थाने मला समजले की, मूल्यवर्धनमध्ये वेगळे असे आहे आणि या कार्यक्रमाची शाळेमध्ये खूप आवश्यकता आहे.
मूल्यवर्धनच्या उपक्रमातून विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेऊ लागले. ज्ञानरचनावादावर आधारित बालस्नेही, विद्यार्थीकेंद्रीत शिक्षण पद्धतीचा वापर होऊ लागला. त्यामुळे मुले आनंदाने सर्व उपक्रमांत सहभागी होऊ लागली. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःविषयीची जाणीव अधिक समृद्ध झाली. त्यामुळे ते स्वतंत्रपणे विचार करू लागले. स्वतःचे निर्णय स्वतः जबाबदारीने घेण्याची क्षमता निर्माण झाली, ते समाजातील विविधता ओळखू लागले. त्यांचा आदर करू लागले. त्यांच्यामध्ये भावनिक कौशल्ये वाढण्यास मदत होऊन ते बोलके झाले. मुलांना सकारात्मक शिस्त लावण्यासाठी मूल्यवर्धनची खूप मदत झाली. शाळेमध्ये उपस्थिती टिकून राहू लागली.
-जयश्री गायकर
मूल्यवर्धनमधून मूल्यांची रुजवणूक
-जयश्री गायकर
मूल्यवर्धन आणि माझी शाळा
मूल्यवर्धनमुळे भारताचा नागरिक घडण्यास मदत झाली.
मूल्यवर्धन या कार्यक्रमामुळे माझ्या विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त लागली. विद्यार्थी स्वतःहून नियमांचे पालन करू लागले. शाळेबरोबरच मुले घरीही जबाबदारीने वागू लागली. माझ्या शाळेतील एक विद्यार्थिनी दुर्गा ही कातकरीवाडीत राहात होती. ती इतर मुलांबरोबर बोलत नव्हती आणि खेळतही नव्हती, पण मूल्यवर्धन हा कार्यक्रम चालू झाल्यापासून ती इतरांमध्ये मिसळू लागली. इतर मुलेसुध्दा तिला आपुलकीने जवळ करू लागली.
-रमेश निमसे
मूल्यवर्धन आणि माझी शाळा
-रमेश निमसे
सहकार्य भावना
जेव्हा आपला सहकारी मित्र अडचणीत असतो तेव्हा त्यांना जमेल तशी मदत करून ती अडचण सोडवण्यासाठी प्रयत्न करणे.
आमच्या शाळेत इतर राज्यांतून कामानिमित्त आलेल्या पालकांच्या मुलांची संख्या जास्त आहे. शाळा मराठी माध्यमाची असल्यामुळे त्या मुलांना काही गोष्टी, सूचना समजायला कठीण जायच्या. मराठी भाषिक मुले त्यांच्यासोबत फारसं बोलायची नाहीत, पण जेव्हापासून मूल्यवर्धन सुरू झाले, तेव्हापासून मुलांमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले. अडचण येऊ लागली की, शक्य होईल तशी मुले एकमेकांना मदत करू लागली. अभ्यासातही एकमेकांना मदत करु लागले. आजारी मित्र-मैत्रीणीला सुखरूप घरी पोहचवू लागली. वर्गात शिक्षक नसताना वर्ग सांभाळू लागली.
-नूतन हरड
सहकार्य भावना
-नूतन हरड
मूल्यवर्धन – एक सकारात्मक प्रकल्प
मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल माझ्या सहकारी शिक्षकांकडून बरेच काही ऐकले होते. जेव्हा प्रत्यक्षात मी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले, तेव्हा मला समजले की, आतापर्यंत आपण विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रूजावीत यासाठी फक्त कथा, प्रसंग सांगायचो. काही दिवसांनी मुले ते विसरून गेलेली असायची, पण मूल्यवर्धन उपक्रमांतून ती मूल्ये प्रत्यक्ष मुलांना अनुभवायला दिली जातात. त्यामुळे ती विद्यार्थ्यांमध्ये चिरकाल टिकून राहतात.
विद्यार्थ्यांना न रागवता नियमांचे पालन करण्यास सोपे झाले. त्यांच्यामध्ये असलेले सुप्त गुण मूल्यवर्धन तासिकेमध्ये घेतलेल्या उपक्रमांमुळे विकसित झाले. विद्यार्थ्यांना गोष्ट सांगण्याची व ऐकण्याची आवड निर्माण झाली. काही विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण होऊन त्यांनी स्वत:हून चित्रे काढून त्यांचे प्रदर्शन भरविले. शाळेचे, वर्गांचे नियम, घरातील नियम विद्यार्थ्यांनी स्वीकारले व त्याप्रमाणे वागू लागले. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली. मुले स्वत: बोलू लागली. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून आला. आनंददायी पध्दतीने व विविध उपक्रमांतून आवश्यक ती मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यास उपक्रम पुस्तिकेतून खूप चांगले मार्गदर्शन मिळाले. मूल्यवर्धन कार्यक्रम शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत असल्याने कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण यातील उपक्रमांशी ते सांगड घालणारे वाटतात.
-संध्या पवार
मूल्यवर्धन – एक सकारात्मक प्रकल्प
-संध्या पवार
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांतील बदल
मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये ‘मी आणि माझे मत’ हा उपक्रम घेतला असता विद्यार्थी, पालक व शिक्षक यांची एकमेकांशी अतिशय चांगल्या प्रकारे अनुभवांची देवाण-घेवाण झाली.
विद्यार्थ्यांना गटकार्य दिले.
गट क्र. १ : तुम्हांला आईचा कधी राग येतो का? तेव्हा तुम्ही काय करता?
गट क्र. २ : तुम्हांला बाबांचा राग केव्हा येतो का? तेव्हा तुम्ही काय करता?
गट क्र. ३ : तुम्हांला शिक्षकांचा राग कधी येतो का? तेव्हा तुम्ही काय करता?
(साहित्य – माईक / स्पिकर) प्रत्येक विद्यार्थांने आपले मत व्यक्त केले असता, शिक्षक, पालक व आई यांच्या वर्तनात बदल झाला.
-अतुल निंबाळकर
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांतील बदल
-अतुल निंबाळकर
विद्यार्थी नियमित शाळेत येऊ लागले
जे विद्यार्थी शाळेत नेहमी अनुपस्थित राहात होते, ते आता रोज शाळेत येऊ लागले.
इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी भाग्यश्री ही अगोदर फार वेळा अनुपस्थित राहात होती. ती आता मूल्यवर्धन उपक्रमामुळे दररोज शाळेत यायला लागली. इतर विद्यार्थ्यांनादेखील शाळेत यायला प्रोत्साहित करू लागली.
-सुनंदा आहेर
विद्यार्थी नियमित शाळेत येऊ लागले
-सुनंदा आहेर
विद्यार्थ्यांना मदत कशी करावी ते समजले
विद्यार्थी एकमेकांना मदत करू लागले.
माझ्या वर्गातील काही विद्यार्थी एकमेकांना मदत करत नसत. त्यानंतर मूल्यवर्धन कार्यक्रमाची आमच्या तालुक्यात सुरुवात झाली आणि आमच्या शाळेतदेखील सुरुवात झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल झाले. ते एकमेकांना मदत करू लागले.
-प्रतिभा पाटील
विद्यार्थ्यांना मदत कशी करावी ते समजले
-प्रतिभा पाटील
पॉझिटिव्हिटी वाढणे
कोणत्याही घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहता येऊ लागले.
‘उंदराची टोपी’ ही गोष्ट शिकविताना पूर्वीच्या गोष्टीमध्ये उंदीर सर्वांना त्रास देतो व चिडवतो अशी गोष्ट होती. मूल्यवर्धन पुस्तिकेमध्ये हीच गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडलेली आहे. ही गोष्ट वाचल्यानंतर या गोष्टीला वेगळा शेवट असू शकतो हे लक्षात आले. मूल्यवर्धन पुस्तिकेमधील गोष्टीतील उंदीर सर्वांशी अतिशय नम्रतेने बोलतो हा गुण मुलांसाठी अतिशय उपयुक्त ठरला.
-सविता नवले
पॉझिटिव्हिटी वाढणे
-सविता नवले
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे
साधे, सोपे आणि मुलांना आवडतील असे विविध खेळ मूल्यवर्धन पुस्तिकेच्या मदतीने वर्गात घेणे.
वर्गात उपक्रम घेतल्यामुळे मुलांमध्ये धीटपणा आला. जी मुले लाजरीबुजरी होती, ती न घाबरता प्रत्येक खेळात, उपक्रमात, वर्गातील कोणत्याही कामात आनंदाने भाग घेऊ लागली. शाळेत उपक्रम घेतले जातात तेव्हा ही मुले धीटपणे बोलू लागली. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोलाची मदत झाली.
-वर्षा कदम
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे
-वर्षा कदम
विद्यार्थी स्वच्छतेबद्दल जागरूक झाले
विद्यार्थी शाळेत स्वच्छता ठेऊ लागले. इतर मुलांनाही तसे करण्यास सांगू लागले.
माझ्या वर्गात मूल्यवर्धन उपक्रम मागील वर्षी सुरू झाले. त्यानंतर माझ्या इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुले घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतात, त्याप्रमाणे वर्ग व शाळादेखील स्वच्छ ठेऊ लागले. मी त्याबद्दल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र सरकारची आभारी आहे. त्यांनी एवढा चांगला उपक्रम शाळेमध्ये सुरू केला त्याबद्दल धन्यवाद.
-कुसुम भांगले
विद्यार्थी स्वच्छतेबद्दल जागरूक झाले
-कुसुम भांगले
मूल्यवर्धन उपक्रम
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने संपूर्ण महाराष्ट्रात मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे. आमच्या शाळेत सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात हा कार्यक्रम सुरु झाला. जसेजसे उपक्रम घेत गेलो, तसेतसे विद्यार्थ्यांमध्ये अनेक बदल घडून येताना दिसले.
मूल्यवर्धन उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या जीवनात ख-या पध्दतीने आमुलाग्र क्रांती झाली असे मला वाटते. कारण आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण शिकवित नव्हतो असे नाही, परंतु या उपक्रमांतून घटनेतील मूल्यांची प्रत्यक्ष अनुभुती विद्यार्थ्यांना मिळायला लागली. भारताचे सुजाण आणि संवेदनशील नागरिक बनण्यास या उपक्रमाची निश्चित मदत होणार आहे.
संपूर्ण मूल्यवर्धन उपक्रम विद्यार्थीकेंद्रीत, बालस्नेही पध्दतीने घेतले जातात. म्हणून ते विद्यार्थ्यांना खूप आवडतात. मुले स्वतःहून वेगवेगळ्या कामांची जबाबदारी घेऊ लागले आहेत. वर्गामध्ये एकामेकांमध्ये सहकारीवृत्ती निर्माण होत आहे. शाळेच्या पटामध्येही वाढ होत आहे. विद्यार्थी शाळेमध्ये होत असलेल्या उपक्रमाबद्दल घरी जाऊन पालकांशी चर्चा करू लागले आहेत. यामुळे पालकांनाही शाळेमध्ये काहीतरी नवीन शिकवले जाते याची माहिती होते.
-सुनील भालेराव
मूल्यवर्धन उपक्रम
-सुनील भालेराव
मूल्यवर्धनमुळे झाला मुलांमध्ये बदल
मूल्यवर्धन खूप छान संस्कारक्षम कार्यक्रम आहे. ती एक काळाची गरज आहे.
मी अर्चना फिगडे. गेल्या एक वर्षापासून मूल्यवर्धन उपक्रम माझ्या शाळेत घेत आहे. उपक्रमाला सुरुवात केल्यापासून मुलांमध्ये काही प्रमाणात बदल जाणवत आहेत. मुले चांगल्या-वाईट सवयी कोणत्या तसेच इतरांच्या भावना ओळखून वागायला लागली आहेत. आशा खूप काही चांगल्या सवयी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहेत. इतर विषयाच्या अध्यापन व अतिरिक्त कामामुळे वेळ कमी मिळतो, तरीही मी उपक्रम घेऊन मुलामध्ये मिसळून गेली आहे. एक मुलगा शाळेत अस्वच्छ येत होता. कितीही सांगितले तरीही तो तसाच येत होता. परंतु मूल्यवर्धनमधील ‘माझ्या चांगल्या /वाईट सवयी’ या उपक्रमामुळे तो कसा येतो व बाकीची मुले कसे येतात हे त्याला स्वतःला विचारले, तो दुसऱ्या दिवसापासून शाळेत स्वच्छ येऊ लागला. माझा वेळ कुठे जास्त जातो, याचे मी स्वतः परीक्षण केले व मीदेखील बदलून गेले. मूल्यवर्धन फक्त मुलांसाठी नसून सर्व मानवाला जीवन जगत असताना उपयोगी पडणारे आहे.
-अलका फेगडे
मूल्यवर्धनमुळे झाला मुलांमध्ये बदल
-अलका फेगडे
मूल्यवर्धन : काळाचीच नव्हे तर माणसाची गरज
मी शरद धर्माजी कांबळे. सहायक शिक्षक, जि. प. शाळा आनंदनगर, केंद्र- कसारा, ता. शहापूर, जि.ठाणे मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी माझे अनुभवकथन करीत आहे.
मूल्यवर्धन कार्यशाळेत आणि ती पूर्ण केल्यांनतर मूल्यवर्धन कार्यक्रमाबाबत जे काही पूर्वग्रहदूषित मत होते ते दूर झाले. हा कार्यक्रम आपल्या दैनंदिन अध्यापनात स्वतःला आणि विद्यार्थ्यांना पूरक, सहाय्यकारक आणि एकूण त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपकारक असल्याचे लक्षात आले. विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही आनंद आणि उत्साह वाटेल असे उपक्रम घेणे हे खरोखर आनंददायी होते. स्वतःची ओळख, माझे छंद, माझे मित्र, माझे मतदान, आपले कुटुंबीय, शेजारी इत्यादी यातून मुले व्यक्त होऊ लागली. त्यांना आपल्या परिसराची ओळख व भान स्पष्ट होत जाते. शांतता संकेत, आरोग्याच्या सवयी, आपल्या जबाबदाऱ्या अशा उपक्रमांतून शिस्त, चांगल्या सवयी, आपली कर्तव्ये अशा अनेक बाबी मुले अनौपचारिकरित्या शिकतात. टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करणे मुलांना आवडू लागले आहे. सहयोगी खेळात मुले अधिक आनंदाने रमत असल्याचे दिसून आले. उपक्रमांत नियोजन आणि सातत्य ठेवले तर मूल्यवर्धन निश्चित परिणामकारक सिद्ध होईल याची खात्री वाटते.
शिक्षणाचे अंतिम ध्येय सुशिक्षित होण्याबरोबरच सुसंस्कारी, जबाबदार व्यक्ती तसेच समाज व राष्ट्रासाठी एक सुजाण व जबाबदार नागरिक घडवणे असे आहे. यात मूल्यवर्धन निश्चितच पथदर्शी आहे.
-शरद कांबळे
मूल्यवर्धन : काळाचीच नव्हे तर माणसाची गरज
-शरद कांबळे
जुळले मुलांशी अतूट नाते
मी केंद्रप्रमुख म्हणून 18 वर्षे कार्यरत आहे. टेम्भूर्ली या केंद्रात आज मला 10 वर्ष झाली आहेत. मात्र गेल्या 3-4 वर्षांपासून मी माझ्या केंद्रातील विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये खूप सकारात्मक बदल अनुभवत आहे. ही किमया आहे मूल्यवर्धन या कार्यक्रमाची. मूल्यवर्धन केवळ कार्यक्रमच नाही तर तो एक जीवनपथ झाला आहे असेच मला वाटत आहे.
सन 2016-17 मध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या प्रशिक्षणासाठी अचानक फोन आला. नकारात्मक दृष्टिकोन घेऊन मी व आमच्या कातकरीवाडीचे शिक्षक श्री. नितीन हरणे प्रशिक्षणास मुथ्था फाउंडेशन वाघोली येथे गेलो. पण एक छोट्या घटनेने आम्हांला बदलवून टाकले. आम्ही हॉलमध्ये जेवण करण्याच्या लाईनमध्ये उभे होतो. त्या दिवशी श्री. शांतिलाल मुथ्था साहेब आमच्याबरोबर लाईनमध्ये उभे राहिले. सर्व लोकांनी त्यांना पुढे जाऊन ताट घेण्याचा आग्रह केला, परंतु त्यांनी नम्रपणे नकार देत मीच मूल्य विसरलो तर मी मूल्यवर्धन कार्यक्रम कसा राबवू शकतो? असे उत्तर दिले. एवढा मोठा माणूस, त्यांना त्यांच्या केबिनमध्ये कोणीही जेवण नेऊन दिले असते. पण कथनी व करनी वेगळी नसलेल्या या अवलियाच्या या छोट्या कृतीने आम्हांला धडा घालून दिला. मी व श्री हरणेसर एकमेकांकडे बघत राहिलो व ठरवले मूल्यवर्धन कार्यक्रम उत्कृष्टरित्या राबवायचा.
प्रशिक्षण घेऊन आल्यावर जिल्हा परिषद शाळा कातकरीवाडी येथे उपक्रमास सुरवात केली. श्री हिलमसर म्हणजे कलाकार माणूस. त्यांच्या कलेचा उपयोग आम्ही करून घेतला. गाणी, गोष्टी, सहयोगी खेळ मुलांना आवडू लागले. मीही भेटीमध्ये मूल्यवर्धन तासिका घेऊ लागलो. उपक्रम पुस्तिका व हलक्या फुलक्या उपक्रमांतून मुलांमध्ये मी रमू लागलो. के. पी. साहेब-विद्यार्थी अंतर कमी झाले. इतके कमी की मुले मांडी-खांद्यावर खेळू लागली. नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, नेतृत्त्व, सभाधीटपणा, स्वच्छतेचे गुण, सहकार्यवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये दिसू लागली. दोन्ही शिक्षक मनापासून काम करत होते. आम्हांला वेळोवेळी साथ दिली ती मुथ्था फाउंडेशनच्या शिलेदारांनी. श्री. मुसळेसर, श्री. वणवेसर व आता श्री. शिंदेसर यांनी वेळोवेळी शाळेत येऊन प्रेरकाची सकारात्मक भूमिका निभावली. कुठल्याही चुका न दाखवता स्वतः तासिका घेऊन मार्गदर्शन केले. पुण्याहून श्री. बाळासाहेब, श्री. अमित, श्री. सोनवणे यांनी नेहमी मित्रत्त्वाच्या नात्याने प्रोत्साहन दिले. कुठलेही प्रशिक्षण असो, वेळोवेळी सहकार्य केले. आमच्या विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल खूप सुखावह असा होता. दरम्यान आम्ही डिजिटल वर्गाप्रमाणे एक मूल्यवर्धन वर्ग तयार केला. श्री. हरणेसर व श्री. हिलमसर यांनी पालक सहभाग व शाळा व्यवस्थापन समितीला या उपक्रमात सहभागी करून एक उत्कृष्ट वर्गाची रचना केली आहे. बाह्य मूल्यमापन होणार असा निरोप आला. ते करणार होते शिक्षण क्षेत्रात मोठे नाव असलेले व शिक्षणतज्ञ श्री. रमेश पानसेसर व मुथ्था फाउंडेशनचे सीइओ श्री. वेंकटसर. कसे होणार? मनात अनाहूत भिती होती. पण आम्ही घेतलेले उपक्रम व आमच्या चिमुकल्यांवर आमचा ठाम विश्वास होता. मा. श्री. पानसेसर व वेंकटसर यांनी भेट दिली व सर्व उपक्रम स्वतः मुलांमध्ये बसून अनुभवले. त्यांनी आमच्या टीमचे व शाळा व्यवस्थापन समितीचे खूप कौतुक केले. सरांनी सर्व केंद्रातील शिक्षकांना प्रेरणादायी मार्गदर्शनही केले. ही आमच्या सर्वांसाठी एक पर्वणी होती. शाळेतील उत्कृष्ट उपक्रमांचे फोटो मग मूल्यवर्धन उपक्रमाच्या पोस्टर वर छापले गेले. मूल्यवर्धन प्रशिक्षण पुस्तिकेच्या मुखपृष्ठ व उपक्रम पुस्तिकेच्या मलपृष्ठातून आमची वाडीवरील शाळा महाराष्ट्राला परिचित झाली. श्री. नितीन हरणेसर मूल्यवर्धन प्रेरक म्हणून सर्व जिल्ह्यात परिचित तर झालेच, पण संपूर्ण महाराष्ट्रभर सुलभक म्हणून काम केले. आमच्यासाठी तो दिवस अतिशय आनंददायी होता. ज्या दिवशी श्री. शांतिलाल मुथ्थासाहेब यांनी या उपक्रमानिमित्त आमच्या केंद्राला भेट दिली व स्वतः कातकरीवाडी शाळेवर येऊन मूल्यवर्धन वर्ग संकल्पना पाहून आमच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. हे आमच्यासाठी स्वप्न होते व ते सत्यात आम्ही अनुभवत होतो.
पुढच्या वर्षी 2017-18 केंद्रातील सर्व शिक्षकांनी प्रेरक प्रशिक्षण घेऊन मूल्यवर्धन उपक्रम आनंदाने आपापल्या शाळेत राबवले. मी भेटीच्या वेळी स्वतः छोटेछोटे उपक्रम घेतल्याने विद्यार्थी जवळ आले. एक अतूट नाते मूल्यवर्धनमुळे तयार होऊ लागले. आज मुले शाळेतील मॅडम यांना सांगतात, “मॅडम तुम्ही रजा घ्या व के. पी. सरांना शाळेवर पाठवा” इथंपर्यंत ते घट्ट झाले आहे. पालकांनाही हा उपक्रम आपलासा वाटू लागला होता. विद्यार्थ्यांबाबत ते माझ्याशी सकारात्मक चर्चा करू लागले. उपक्रमांचे स्वातंत्र्य शिक्षकांना दिल्यामुळे तेही मूल्यवर्धनकडे उपक्रम म्हणून न पाहाता जीवन परिवर्तनाचे साधन म्हणून पाहू लागले आहेत. सर्व शिक्षकांनी उल्लेखनीय काम केले. विविध उपक्रमांचे छायाचित्रीकरण करून आज ती चित्रफीत महाराष्ट्रातील शाळाशाळांमधून दाखवली जात आहे. हे आमच्या शिक्षकांनी केलेल्या कार्याचे फलित आहे. त्याचे सर्व श्रेय हे त्या शिक्षकांचे आहे हे मला नम्रपणे नमूद करावेसे वाटते.
मूल्यवर्धन उपक्रमातून आपण आपल्या क्षमता ओळखायला शिकतो,जाणीवा निर्माण होतात, समाजाप्रती कर्तव्य कळते आणि कौशल्य विकास होतो. माझ्यामध्ये या कार्यक्रमातून अमुलाग्र बदल मी या 3-4 वर्षांत अनुभवत आहे. सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांसाठी विविध स्वयंसेवी संस्थेसाठी काम करून एक वेगळा आनंद घेत आहे, धन्यवाद मूल्यवर्धन.
माणसाने आनंद घ्यावा आणि इतरांना आनंदी करावे हेच तर मूल्यवर्धनचे गमक आहे. सुजाण नागरिक व पर्यायाने सशक्त समाज घडविण्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचा हातभार लागतो आहे, याचा सार्थ अभिमान आहे.
तालुक्यात उपक्रम राबविण्यात येत आहेत आणि आता जिल्हाभर व्याप्ती होत आहे. आमच्यावर मोठी जबाबदारी आहे याची जाणीव आहे. ती निश्चितपणे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू. समस्या आहेत पण समस्यांवर मात करण्याची शिकवण मूल्यवर्धनेच दिली आहे. येणारी पिढी ही मूल्यवर्धित घडवायची असेल तर मूल्यवर्धन कार्यक्रमास पर्याय नाही हे आम्ही जाणले आहे. जे मूल्यवर्धनच्या आश्रयाला येतील, त्यांना ही याची जाणीव निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात मूल्यवर्धन कोणत्याही भाषा, प्रांत, धर्म, जाती यांच्याही पलीकडे जाऊन एक शालेय उपक्रम न राहता एक समग्र समाजातील जीवन परिवर्तनाचे अग्रणी माध्यम होणार यात तिळमात्र शंका नाही.
-श्री महेंद्र धिमते (केंद्रप्रमुख टेम्भूर्ली, ता. शहापूर, जि. ठाणे)
जुळले मुलांशी अतूट नाते
-श्री महेंद्र धिमते (केंद्रप्रमुख टेम्भूर्ली, ता. शहापूर, जि. ठाणे)
विद्यार्थ्यांना स्वतःची कामे करण्याबद्ल समज निर्माण झाली व दुसऱ्यांनाही मदत करतात
मोठ्या माणसांना, आजोबा-आजींना मदत करावी ही त्यांच्या मनात भावना निर्माण झाली.
पालकांकडून माहिती मिळाली की मुलांमध्ये दुसऱ्यांना मदत करण्याची भावना जागृत झाली.
-सुनंदा चव्हाण
विद्यार्थ्यांना स्वतःची कामे करण्याबद्ल समज निर्माण झाली व दुसऱ्यांनाही मदत करतात
-सुनंदा चव्हाण
मूल्यवर्धनमधून परस्पर सहकार्य
सन २०१९-१९ मध्ये आमच्या शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मुलांमध्ये खेळातून, गोष्टींतून, कृतीयुक्त गाण्यांतून नकळतपणे मूल्ये रूजवणूक करण्यास मदत झाली. सहयोगी खेळांमधून मुलांमध्ये परस्पर सहकार्य दिसू लागले. मुलेही आवडीने या खेळांमध्ये सहभागी होऊ लागली. चित्र रंगविणे यासारख्या कृतीही मुलांना खूप आवडतात.
-वैशाली भागवत
मूल्यवर्धनमधून परस्पर सहकार्य
-वैशाली भागवत
मूल्यवर्धन उपक्रमांतून मूल्यशिक्षण
मूल्यवर्धन उपक्रमांच्या नियमित अंमलबजावणीतून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त व नेतृत्त्वगुण विकसित करण्यात मोलाची मदत झाली आहे.
मूल्यवर्धन उपक्रम नियमितपणे शाळेत राबविल्याने स्वयंशिस्त पाळण्यासाठी आवश्यक असणारी सकारात्मक मानसिकता निर्माण होत आहे. कोणत्याही प्रकारे दबावतंत्राचा वापर न करता खेळ व उपक्रमांद्वारे, स्वतः नियम तयार करून त्यांचे पालन विद्यार्थी करत आहेत. प्रत्यक्ष हुबेहूब मतदान प्रक्रियेतून शालेय मंत्रिमंडळ निवड, सहशालेय उपक्रमांचे नियोजन व सूत्रसंचालनाची संधी देणे, परिपाठ नियोजन, स्वच्छता, वक्तृत्व स्पर्धा तसेच शालेय अभ्यासक्रमाचे दृढीकरण करण्यासाठी प्रश्नमंजुषा अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून नेतृत्त्व करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहे. त्यामुळे जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन भविष्यात सुजाण नागरिक म्हणून आजचे विद्यार्थी लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणून समर्थपणे उभे राहण्यास सक्षम ठरतील असा विश्वास वाटतो.
-सुधीर पाटोळे
मूल्यवर्धन उपक्रमांतून मूल्यशिक्षण
-सुधीर पाटोळे
स्वतःतील बदल
मूल्यवर्धनने माझ्यात व मुलांमध्ये झालेले बदल.
‘संस्काराची शिदोरी, मूल्यवर्धनने करू तयारी’ असेच काहीसे झाले आहे. काही वर्षांपूर्वी आदिवासी भागातील शहापूर तालुक्यातील खेडे असलेले टेम्भूर्ली हे गाव. या गावातील शाळेत मूल्यवर्धन हे नाव कानावर पडले. पहिल्यांदाच ऐकले तेव्हा काही विशेष वाटलेच नाही. मग केंद्रस्तरावर मूल्यवर्धन ट्रेनिंग सुरू झाले. आमचे मास्टर ट्रेनर केंद्रप्रमुख धिमतेसर आणि हरणेसर होते. ट्रेनिंग तरी काय तर छानछान गाणी, गोष्टी, खेळ व वेगवेगळे उपक्रम. वा!!! काय काय मज्जा त्या ट्रेनिंगला…!!! परत एकदा कुठेतरी आपण आपले बालपण जगतोय असं जाणवलं. मग आपल्यासोबत असलेली ही चिमुरडी यांनीही असचं हसतखेळत शिक्षण घ्यावं असं जाणवलं. तो प्रवास सुरू झाला.
अरे ! खरचं किती छानछान गोष्टीरूप जीवनाचे धडे शिकविले मूल्यवर्धनच्या उपक्रमांनी! आपल्या चिमुरड्यांना जवळ घेताघेता आपणा स्वतःमध्येही कधी बदल जाणवतो हेही कळत नाही. एकेदिवशी वर्गात गेले तर वर्ग खूप अस्वच्छ वाटला. खूप सारा राग आलेला होता, पण मूल्यवर्धनमुळे दाखवता आला नाही असे म्हणण्यापेक्षा तो कुठेतरी पळून गेला. बाळांनो, कचरा उचला असं मी म्हटलंच नाही. स्वतः मुलांसमोर जाऊन कागदाचे १-२ कपटे उचलले. मुलांनी माझे निरीक्षण केले. तशी सगळी मुले माझ्यासोबत वर्गातील कचरा उचलू लागली. काही क्षणांत वर्ग चकाचक झाला. मग काय? हे सगळं नकळतपणे घडलं. तीच ही मूल्यवर्धनची जादू.
असाच काहीसा दुसरा अनुभव. इयत्ता चौथीत शिकणारा वैभव भगवान घायवट नावाचा मुलगा वर्गात नेहमी अस्वच्छ यायचा. त्याच्या जवळ कोणी बसायचे नाही हे मला जाणवत होते. मग काय करायचे? कारण कळले की, त्याची काळजी व तयारी करण्यासाठी आई-वडील नव्हते. आठवीत शिकणारी बहीण त्याची काळजी घ्यायची, पण तिलाही तिच्या शिक्षणामुळे फारसे लक्ष देता येत नव्हते. मग उपक्रमात त्याचे उदाहरण देऊन मुलांना त्याच्यासाठी काय करता येईल असे विचारले. मुलांनीच बरेच मार्ग सुचविले. त्यांनी स्वतः पैसे जमा करून पहिला त्याला एक टूथब्रश आणून दिला. त्यालाही स्वतःला खूप छान वाटले की, आपण आता नियमितपणे चांगले यायचे. आता त्याच्याजवळ मुले बसू लागली. खरंतर ही गोष्ट खूप साधी पण खूप मोलाची होती. नकळतपणे त्यांनीच गुंता सोडविला. त्या सर्वांवरच्या चेहऱ्यावरील आनंद खरा मूल्यवर्धनचा होता. जसा मुलांमध्ये नकळतपणे काही बदल झाले तसे माझ्या घरातही मी मूल्यवर्धन आणले. घरात काही नियम चालू केले. मुलांसमोर मोबाईल बघायचा नाही. आहे त्या वस्तू जागेवर ठेवायच्या. असे खूप सारे अनुभव मूल्यवर्धन देऊन गेला आणि मनात रुजून राहिला. असाच हा काहीसा स्वतःला परिपूर्ण बनवणारा व नकळतपणे संस्काराची शिदोरी देणारा मूल्यवर्धन हा कार्यक्रम खरंच लाजबाब आहे.
-स्वतःतील बदल
स्वतःतील बदल
-मनीषा कोरडे
परिवतनरूपी संजीवनी
शिक्षणातून संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास साधला जावा, अशी महात्माजींची धारणा होती. शिक्षण म्हणजे माणूस घडविणे होय. शिस्त ही स्वयं शिस्त हवी असे त्यांचे मत होते. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आज मूल्यवर्धन कार्यक्रमातून हेच कार्य विद्यार्थ्यांमध्ये उतरवत आहे. मूल्यवर्धन उपक्रमात विद्यार्थी प्रत्येक्ष स्वयं सहभाग घेऊन स्वयं अध्ययन करतात. या कार्यक्रमामुळे मुलांना स्वतःच्या जबाबदारीची, शिस्तीची, स्वच्छतेची जाणीव होते. विद्यार्थी निर्भीडपणे शाळा परिसरात वावरतात, बोलतात, आपल्या समस्या मांडतात, स्वतः निर्णय घेतात. अशी शिदोरी घेऊन आपला विद्यार्थी बाहेर पडून देशाच्या प्रगतीत मोलाची भर घालेल. ही ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य शांतिलाल मुथ्था फाउंडेशन करीत आहे.
मागच्या वर्षी दुसऱ्या टप्प्यात केंद्रस्तरावर मी मूल्यवर्धन प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणात घटनेतील मूल्यांशी संबंधित आठ मूल्यवर्धन मूल्यांची ओळख झाली. प्रशिक्षणातून हे समजले की, ही मूल्ये वर्गस्तरावर उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये रुजवायची आहेत. त्यानुसार मी माझ्या वर्गात उपक्रम घेण्यास सुरुवात केली. वर्गवार दिलेल्या उपक्रम पुस्तिकेतील कृतिगीते, गोष्टी, खेळ यात मुले स्वयंस्फुर्त सहभागी झाली. अभ्यासात मागे असणारे विद्यार्थीदेखील चर्चेत सहभाग घेऊ लागले. कृतियुक्त गीतांमधील ‘मैत्रीचे गाणे’ मुलांना इतके भावले की, मुले मधल्या सुट्टीत आपला खाऊ वाटून खाऊ लागले. गोष्टी ऐकून मुले प्रसंगावर विचार, चर्चा करून विविधांगी अध्ययन अनुभव घेऊ लागली. इयत्ता पहिलीत थेट प्रवेश घेतलेल्या बापूने ‘तीन माकडे’ गोष्ट ऐकून शिक्षा कोणाला व्हावी ते सांगितले. इतकी मुले त्या उपक्रमांशी समरस होतात. जर एखाद्या धडयावरील प्रश्नाचे उत्तर सांगायला जी मुले तयार नसतात, तीही या उपक्रमामुळे बोलकी होतात. एकप्रकारे संजीवनी देण्याचे कार्य मूल्यवर्धन उपक्रम करतात.
‘मी नियम पाळणार’ या उपक्रमात मुलांनी पाटीवर स्वतः एकेक नियम तयार केला. त्यात ‘मी खरं बोलणार’ ते ‘मी शिव्या देणार नाही’ असे नियम तयार झाले. त्यातील काही वर्गाच्या भिंतीवर नावासहित लावण्यात आले. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे मुलांमध्ये सकारत्मक बदल होतात. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. यासाठी मला मदत झाली ती ‘झुझू’ची. मी माझ्या मुलीची बाहुली वर्गात आणली. मुलांना तिची ओळख ‘मी झुझू, तुमच्याकडे पाहुणी आले, सर्वांनी माझं ऐकायचं.’ अशी ओळख करून दिली. मुलांना ती खूप आवडली. शाळेत न बसणारी इयत्ता पहिलीची प्रज्ञा झुझूच्या ओढीने वर्गात येऊ लागली. कारण झुझू मुलींच्या घरी एक दिवस पाहुणी म्हणून जात असे. इतरांशी काहीच न बोलणारी प्रज्ञा झूझूच्या आवाजात मुलांना सूचना देऊ लागली. उदा. पाढा म्हणा इत्यादी. अशाप्रकारे मुलांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण झाली. थोडक्यात काय तर मुलांना शाळा आवडू लागलीआहे. त्यांच्यात आत्मविश्वास वाढला आहे. स्वतःच्या जबाबदारीची जाणीव त्यांना करून देण्याचे कार्य या उपक्रमांमुळे शक्य झाले. प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळते. वर्गवातावरण तयार होऊन मुलांमध्ये आत्मविश्वास या उपक्रमांनी निर्माण करून खऱ्या अर्थाने माझा वर्ग जिवंत केला आहे.
-मनिषा चौधरी
परिवतनरूपी संजीवनी
-मनिषा चौधरी
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झाला बदल
मूल्यवर्धन उपक्रम ही काळाची गरज आहे हे निश्चितच मान्य करावे लागेल. एक शिक्षक म्हणून मी हे म्हणेन की, मूल्यशिक्षण आम्ही आधीही परिपाठ, सहशालेय उपक्रम इत्यादींच्या माध्यमातून राबवित होतो, मूल्यवर्धनमुळे जाणीवपूर्वक याकडे बघितले जाते. राज्यघटनेतील मूल्यांवर आधारित मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच खूप मदत होईल असा आत्मविश्वास वाटतो.
राज्यघटनेतील मूल्यांवर आधारित, शालेय अभ्यासक्रमाशी निगडित, आनंददायी, विद्यार्थीकेंद्रीत, बालस्नेही, विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा शालेय शिक्षणामध्ये समावेश केल्याबद्दल सर्वप्रथम मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे यांचे तसेच सदर प्रशिक्षणासाठी प्रेरक म्हणून मला संधी दिल्याबद्दल केंद्रप्रमुख श्री. सांबरेसर यांचे आभार व्यक्त करते. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये मी जि. प. शाळा आंबिवली येथे कार्यरत होते. मूल्यवर्धनचे उपक्रम राबवित असताना मला अनेक सकारात्मक अनुभव आले. काही अनुभव नमूद करत आहे.
माझ्या वर्गात एक फार खोडकर मुलगा होता. प्राण्यांना त्रास देणे, फुलपाखरू पकडून त्याला दोरा बांधणे असे उद्योग तो करत असे. परंतु ‘योग्य-अयोग्य वर्तन’ हा उपक्रम वर्गात घेतल्यानंतर त्याला स्वतःची चूक लक्षात आली. त्याचे वर्तन बदलले. सहकारी विद्यार्थ्यांनी त्याच्यातील बदलाबाबत वर्गात सांगितले.
मला दुसरा आलेला अनुभव म्हणजे वर्गात मी नेहमी मुलांना तुम्ही घरी कोणकोणती कामे करता याबद्दल विचारायचे. कामाची यादी त्यांनी सांगितली तर ही बायकांची कामे, ती मुलींची कामे आहेत अशी उत्तरे मिळायची. पण ‘घरची कामे’ हा उपक्रम घेतल्यानंतर मुलांनी घरातील छोट्याछोट्या कामात आईला मदत करायचे आश्वासन दिले. आई आपल्यासाठी घेत असलेल्या कष्टांची त्यांना जाणीव झाली. कोणतेही काम मुले किंवा मुली असा भेद न करता आम्ही करू असे मुलांनी आश्वासन दिले. या सर्वांची फलनिष्पत्ती म्हणजे पालकांनी वेळोवेळी माझी भेट झाल्यावर, मिटिंगच्या वेळी अथवा जाणीवपूर्वक भेट घेऊन मुलांमध्ये झालेल्या बदलाबाबत समाधान व आंनद व्यक्त केला. एकीकडे परिक्षेतील गुणांची वाढत चाललेली टक्केवारी तर दुसरीकडे नैतिक मूल्यांची होत असलेली घसरण पाहता ‘मूल्यवर्धन ही काळाची गरज’ हे निश्चितच मान्य करावे लागेल.
-भारती आंबेकर
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये झाला बदल
-भारती आंबेकर
स्वत:च्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला
रागावर नियंत्रण कसे ठेवावे त्याबद्दल मुलांना समजले.
अगोदर मी थोड्याथोड्या गोष्टींवर खूप राग व्यक्त करायची. पण जेव्हापासून आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू झाला, तेव्हापासून मी रागावर आवर कसा घालायचा याबद्दल शिकले.
-जयश्री राजपूत
स्वत:च्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला
-जयश्री राजपूत
मूल्यवर्धन
इयत्ता तिसरीच्या वर्गात कुटुंबाचे झाड हा उपक्रम घेत असताना आलेला अनुभव.
माझे नाव सौ वैजयंती संजय पडवळ, जिल्हा परिषद शाळा काजळविहीर, केंद्र- खातिवली, तालुका- शहापूर, जिल्हा ठाणे.
मूल्यवर्धन उपक्रम तासिका वर्गात घेत असताना ब-याच वेळा असे जाणवले की, विद्यार्थ्यांमध्ये खूप सकारात्मक बदल झालेले आहेत. कारण काही महिन्यांपूर्वी मी इयत्ता तिसरीच्या वर्गात ‘कुटुंबाचे झाड’ हा उपक्रम घेत असताना आपल्या कुटुंबाचे झाड मी मुलांना वहीवर काढण्यास सांगितले. मला असे आढळले की, आईच्या माहेरच्या लोकांचे नाव ब-याच मुलांनी लिहिलेलेच नव्हते. मग मी एका मोठ्या कागदावर अगोदरच काढून ठेवलेले चित्र दाखवले. दीप्ती यशवंत निचिते या मुलीने मला प्रश्न विचारला की, आईचे नातेवाईक आपल्या गावात, आपल्या घरात राहत नाहीत. मग त्यांचे नाव का लिहायचे कुटुंबाच्या झाडावर? मला त्या मुलीचा प्रश्न खूप आवडला. कारण ती शंका इतर अनेक मुलांचीही होती. मग मी सर्वांना व्यवस्थित समजावून दिले. म्हणजेच वयोमानानुसार विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न योग्यच आहेत. पण त्या प्रश्नांची उत्तरे वेळीच समजली तर मूल्ये चांगल्याप्रकारे रूजली जातील असे मला वाटते. मूल्यवर्धन या उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले, सकारात्मक बदल घडत आहेत हे नक्की.
-वैजंता संजय पडवळ
मूल्यवर्धन
-वैजंता संजय पडवळ
मूल्यवर्धन और हम
मूल्यवर्धन दरअसल विद्यार्थीओ में मूल्य शिक्षा के सुधारणा और विद्यार्थी विकसन करणे का एक अहं जरिया हैं.
मूल्यवर्धन के जरिये से मूल्य शिक्षा को पहली से ही विद्यार्थीओ में शुरुआत करणे की कोशिश करते हैं. मूल्यवर्धन एक्टीविटी बेस हो तो विद्यार्थी आखिर तक बोर नही होते. मूल्यवर्धन विद्यार्थीकेन्द्री शिक्षा है. मूल्यवर्धन विद्यार्थीओं की व्यक्तित्त्व विकसित करता है. जिम्मेदारी का एहसास, वक्त की पाबंदी, बच्चो में रोजाना स्कूल आना और पढाई से दिलचस्पी पैदा हुई.
-शाकेरा मोमीन
मूल्यवर्धन और हम
-शाकेरा मोमीन
मूल्यवर्धन रुळले उर्दू शाळेत
शाळेने मूल्यवर्धनमुळे शिक्षणाची नव्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे. त्यामुळे एक नवे वातावरण निर्माण झाले आहे.
मूल्यवर्धनमुळे शाळेतील मुलांचे मन शिक्षणामध्ये रमू लागले आहे. शिक्षणाकडे आकर्षित होऊ लागले. विद्यार्थी आपल्या मनातील भावना स्पष्टपणे एक दुसऱ्यांशी मोकळेपणाने मांडतात. शाळेतील विद्यार्थी भीतीमुक्तपणे वर्गात राबतात.
-गझला काझी
मूल्यवर्धन रुळले उर्दू शाळेत
-गझला काझी
वर्गनियम
वर्गाचे नियम लागू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये बरेच बदल दिसून आले.
१) विद्यार्थी शाळेत वेळेवर येत आहेत.
२) सर्व विद्यार्थी एकत्र राहत आहेत.
३) विद्यार्थी एकमेकांना मदत करतात.
४) वर्गखोली आणि वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेत आहेत.
५) विद्यार्थी उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेत आहेत.
६) या उपक्रमांच्या परिणामामुळे विद्यार्थी शिक्षणामध्ये रस घेत आहेत आणि सर्वकाही आत्मविश्वासाने करीत आहेत.
७) विद्यार्थी दररोज वर्गात येत आहेत.
८) सर्व विद्यार्थी एकत्र जेवण करीत आहेत.
९) पाणी वाया घालवू नका ही सूचना दिल्यानंतर विद्यार्थी पाणी वाया घालवत नाहीत.
१०) जेवण करण्यापूर्वी आणि नंतर हात धुण्याची सवय लागली आहे.
-जावेद खान
वर्गनियम
-जावेद खान
जबाबदारीची जाणीव होणे व योग्य निर्णय घेणे
विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक आरोग्याबरोबरच सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेची जाणीव होण्यासाठी हा एक वेगळा कार्यक्रम म्हणजे जणू एक पाऊल स्वच्छतेकडे.
शाळेतील आवारात असणा-या मुला-मुलींचे शौचालय स्वच्छ कसे ठेवता येईल यासाठी रोज ज्या वर्गाचा परिपाठ असेल त्या वर्गाने ते स्वच्छ करावे असा नियम केला. परंतु विद्यार्थी तयार होईनात. मग रोज दोन शिक्षक स्वतः झाडू हातात धरून स्वच्छता करू लागले. त्याचा परिणाम असा झाला की, विद्यार्थ्यांना लाज वाटली. आपण केले नाही तर शिक्षक स्वतः ते कार्य करतात. आपली जबाबदारी असूनदेखील आपण ते करीत नाही याची खंत वाटली. अर्थातच जबाबदारीची जाणीव झाली व आनंदाने विद्यार्थी ते काम करू लागले. अगदी पाणी वाहून आणणे इथपर्यंत. आरोग्य चांगले राहण्यासाठी स्वच्छता ही हवीच. आता रोज एक वर्ग आपले काम अगदी चोख पार पाडतो.
-समिधा औटे
जबाबदारीची जाणीव होणे व योग्य निर्णय घेणे
-समिधा औटे
नाही थांबायचे, फक्त जिंकायचे !
मी राजश्री शालीग्राम बडगुजर ( जि. प. शाळा गोपाळपाडा) मूल्यवर्धन या कार्यक्रमांतर्गत मी अनेक उपक्रम राबविले आहेत. त्यापैकी मला आलेले अनुभव.
मी आज एका वेगळ्या सहयोगी खेळाबद्दलचा माझा अनुभव सांगू इच्छिते. जि. प. शाळा बेडीसगाव येथे मी ‘नाही थांबायचं, फक्त जिंकायचं !’ असा एक अनोखा सहयोगी खेळ घेतला. त्या खेळात 5-6 विद्यार्थ्यांचे चार गट केले. त्या प्रत्येक गटाला आवश्यकतेनुसार रद्दी वर्तमानपत्र, कात्री व गम हे साहित्य देऊन पुढीलप्रमाणे स्पष्ट सूचना दिल्या.
प्रत्येक गटाने वर्तमान पेपरच्या पट्टया कापायच्या व त्या एकमेकांमध्ये गोलगोल अडकवून साखळी तयार करायची. ज्या गटाची साखळी लांब असेल, तो गट विजयी होईल. हे ऐकल्यावर ज्यांना कात्रीचा वापर चांगला करता येत होता, त्यांनी वर्तमानपत्राच्या पट्टया कापायला सुरुवात केली. बाकीच्या मुलांनी साखळी तयार करायला सुरुवात केली. त्यानंतर बरोबर एक मिनिटांने कात्रीचा वापर करणा-या मुलांचे हात बांधण्यात आले व साखळी चिटकविणा-या मुलांचे डोळे बांधण्यात आले.
आपला गट जिंकायला हवा या इर्शेने कात्री पकडायला त्रास होत होता, तरीही पट्टया कापत होते व डोळे बांधल्यामुळे काहीही दिसत नव्हते तरीही ते चाचपडत साखळी चिटकवित होते. त्यावेळेस मात्र एकमेकांना मदत करणे, बोलून मार्गदर्शन करणे या ह्या क्रिया घडत होत्या. त्यानंतर 5 मिनिटांनी कात्रीचा वापर करणा-यांचे हात सोडण्यात आले व डोळे बंद असणा-यांचे डोळे सोडण्यात आले. मग ज्या गटाने साखळी लांब केली होती, त्या गटाला विजयी घोषित करण्यात आले व त्यांचे कौतुकही करण्यात आले. त्यानंतर तुम्हांला काय अनुभव आला? हात बांधल्यावर कसे वाटले? डोळे बांधल्यावर कसे वाटले? यावर चर्चा झाली. यावर त्यांनीच निष्कर्ष काढला की, आम्हांला जिंकायचे होते. आम्ही आमचे हात, डोळे बांधले होते तरीही काम करीत राहिलो. आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. त्याचप्रमाणे आम्हांला आमच्या आयुष्यात काही मिळवायचं असेल तर मार्गात कितीही अडथळे असले तरीही आम्ही प्रयत्न सोडणार नाहीत. फक्त जिंकायचं नाही थांबायचं.
-राजश्री शालीग्राम बडगुजर (जि. प. शाळा गोपाळापाडा, केंद्र-अजनुप, ता. शहापूर, जि. ठाणे)
नाही थांबायचे, फक्त जिंकायचे !
-राजश्री शालीग्राम बडगुजर (जि. प. शाळा गोपाळापाडा, केंद्र-अजनुप, ता. शहापूर, जि. ठाणे)
मूल्यांतून जीवनाचे संवर्धन अर्थात मूल्यसंवर्धन
संस्कार म्हणजे शिस्त. संस्कार म्हणजे विनम्र भाव. संस्कार म्हणजे थोरामोठ्यांचा आदर. संस्कार म्हणजे माणुसकी. संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. मनाची अवस्था आहे. स्व-पासून सुरु होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोहचवू शकतो.
संस्कार म्हणजे शिस्त. संस्कार म्हणजे विनम्र भाव. संस्कार म्हणजे थोरामोठ्यांचा आदर. संस्कार म्हणजे माणुसकी. संस्कार ही एक मनाची परिभाषा आहे. मनाची अवस्था आहे. स्व-पासून सुरु होणारा संस्कार कुटुंबाला, समाजाला, राष्ट्राला आदर्शाप्रत पोहचवू शकतो. मूल्य संस्कार ही एक दृश्य अशी संकल्पना आहे. ती एखाद्या व्यक्तीच्या उक्ती आणि कृतीतून व्यक्त होत असते. बालवयात होणारे संस्कार हे अधिक परिणामकारक असून ते आईवडील व शिक्षक यांच्याकडून होत असतात. मानवाच्या अनुकरणप्रियता या गुणामुळेच संस्कारप्रसार होत असतो. संस्काराच्या पाय-या चढतचढतच माणूस आदर्शापर्यंत पोहचू शकतो. वस्तुतः संस्काराचे दोन प्रमुख प्रकार आहेत. एक म्हणजे कौटुंबिक संस्कार आणि दुसरे सामाजिक संस्कार. मुल जन्माला येते तेव्हा सर्वप्रथम घर हेच त्याचे विश्व असते. घरातील माणसे हीच त्याची आदर्श असतात. कुटुंबियांच्या आपापसातील वागण्याचा चांगला-वाईट ठसा मुलांच्या मनावर कोवळ्या वयातच उमटला जातो. मूल जेव्हा घराचा उंबरठा ओलांडू लागते, तेव्हा शेजारी व शाळेत जाऊ लागते. गुरूजन, शिक्षक हे त्याच्यासाठी आदर्शच असतात. परंतु आजच्या काळात आईवडील दोघेही करियरप्रेमी झालेले आहेत. संस्कार करायला घरात आजी आजोबा असतातच असे नाही. संस्काराची गरज तर असतेच असते. यावर उपाय म्हणून संस्कारकेंद्र बनतात. पैसे देऊन मुलांकरिता संस्कार विकत घेतले जातात.
२१ व्या शतकात माणूस बदलत चालला आहे. आपल्या रूढी, परंपरा, चालीरिती आता आधुनिक होत चालल्या आहेत. माणसाने प्रगती केली परंतु संस्कार, शिकवणी मात्र मागे पडल्या. एकीकडे पाश्चात्यांचे अंधानुकरण होत असताना मात्र आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळा एकमेव संस्कारांचे केंद्र उरल्या आहेत. भविष्यासासाठी संस्कारक्षम व सुशिक्षित नागरिक बनविण्याचे पवित्र कार्य जिल्हा परिषदेच्या शाळा करत आहेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे शहापूर तालुक्यातील जि. प. शाळा कातकरीवाडी, टेंभूर्ली, ता. शहापूर, जि. ठाणे ही शाळा ‘मूल्यवर्धन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांमध्ये विविध मूल्ये रूजविण्याचे कार्य करीत आहे. या शाळेतील कृतीशील शिक्षक श्री. नितीन विनायक हरणे हे केंद्रप्रमुख श्री महेंद्र धिमते यांच्या मार्गदर्शनाने व उपशिक्षक श्री. दामू हिलम यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करीत आहेत. मूल्यवर्धन हा एक बहुउद्देशीय कार्यक्रम आहे. मूल्यवर्धन हा कार्यक्रम भारतीय संविधानाच्या न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या चार मूल्यांवर आधारलेला आहे. हा कार्यक्रम इयत्ता पाहिली ते तिसरीच्या वर्गासाठी राबविण्यात येत आहे. सर्व वर्गांसाठी ‘मी व माझ्या क्षमता’, ‘माझ्या जबाबदाऱ्या’ ‘माझे नातेसंबंध’, आणि ‘आपले जग’ या विभागांमध्ये उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. या विभागानुसार मुलांकरिता साहित्य, चर्चा, संवाद, कृती असे नाविन्य पूर्ण उपक्रमांची रचना इथे आहे. कातकारीवाडी, टेंभूर्ली शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी हे अदिवासी समाजाचे आहेत. या मुलांच्या पालकांना उपजीविका करण्यासाठी सतत स्थलांतरित व्हावे लागते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मुलांकडे द्यायला पुरेसा वेळ नसतो. मुलांना सुशिक्षित करण्याबरोबरच संस्कारक्षम बनविण्याचे काम या शाळेतील शिक्षक करीत आहेत. म्हणून म्हणतात ‘शिक्षक हे बालकाचे दुसरे पालकच असतात’ यात तिळमात्र शंका नाही. मुलांमध्ये झालेले बदल पाहून येथील पालक शिक्षकांचे कौतुक करतात. उन्हातान्हात बागडणारी, बेशिस्तपणे वागणारी, उद्धटपणे बोलणारी मुलेच जबाबदारीने व नम्रपणे वागताना पाहून पालक आंनद व्यक्त करतात. आपल्या समाजात आईला मम्मी व आजीला आई म्हणणारी मुले आज आईला आई म्हणूनच ओळखू लागली आहेत. तुझ्या आईचं नाव काय? असं विचारल्यावर आजीचे नाव सांगणारी ही मुले होती. मुलांमध्ये झालेला बदल हा वर्तनबदल नसून वृत्तीतील बदल आहे. कारण शिक्षणशास्र असे सांगते की, वर्तनबदल हा तात्पुरता असतो तर वृत्तीतील बदल हा कायमस्वरूपी असतो.
-संतोष एस. सोनवणे, विषय सहायक (गणित), प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
मूल्यांतून जीवनाचे संवर्धन अर्थात मूल्यसंवर्धन
-संतोष एस. सोनवणे, विषय सहायक (गणित), प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई
.