विद्यार्थी कौटुंबिक जीवन
मूल्यवर्धन हा एक चांगला संस्कारक्षम विषय आहे. भावी पिढी सुसंस्कारमय करून आपले राष्ट्र प्रगत करणे हाच याचा आशय आहे. पणती जपून ठेवा, अंधार फार झाला. पणती म्हणजे मूल्यवर्धनच्या माध्यमातून समाजात प्रकाश पसरवायचा आहे.
विद्यार्थी जीवन
दैनंदिन जीवनात बदल दिसून येतो.
-दुर्गादास चौधरी
विद्यार्थी कौटुंबिक जीवन
-दुर्गादास चौधरी
अध्यापनाला दिशा मिळाली
“मोकळे करूया आकाश तोडून सर्व भिंती.. बालपण कोंडले आहे..” या उक्तीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उपक्रमांचे मोकळे आकाश उपलब्ध करून देणारा कार्यक्रम म्हणजे मूल्यवर्धन.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना जे काही हवे आहे, ते देणे एवढेच शिक्षकाचे काम नाही; तर खऱ्या शिक्षकाचे काम आहे की, त्याने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण केली पाहिजे. हेच कार्य करण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रम दिपस्तंभाची भूमिका निभावत आहे. जळगाव तालुक्यात हा कार्यक्रम राबविला गेला, तेव्हा एक प्रेरक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. प्रत्यक्ष वर्गात हे विविधता पूर्ण उपक्रम राबविताना खुपच छान अनुभव आले.
एक अनुभव म्हणजे माझ्या चौथीच्या वर्गात आरती नावाची विद्यार्थिनी आहे. ती गतिमंद या प्रवर्गात समाविष्ट आहे. आधी वर्गात अभ्यासक्रमविषयक उपक्रम घेताना ती लक्ष देत नसे. तिला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मी खूप उपक्रम राबविले. परंतु ती इतर विद्यार्थ्यांमध्ये मिसळत नसे. तिच्या पालकांचा तिला सामान्य मुलांसोबतच शिकवण्याचा आग्रह होता. ‘मूल्ये ही शिकविली जात नाहीत, तर रुजवली जातात.’ मूल्यवर्धन उपक्रमातील विश्वासामुळे मी माझ्या शिकवण्याच्या पद्धतीत सुधारणा केली. कार्यशाळेतील कौशल्य, तंत्रे यांची सांगड अध्यापनास दिली. अभ्यासक्रमातील तोच घटक नाविन्याची साथ मिळाल्याने आकलनास सुलभ झाला. या अध्यापनातील बदलाचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे आरतीला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत झाली. मूल्यवर्धन उपक्रमातील सहयोगी खेळ खेळताना सुरुवातीला पास म्हणणारी आरती नंतर स्वतःहून काही उत्तरे देऊ लागली. तिचा उत्साह पाहून इतर विद्यार्थी तिला मदत करू लागले. मूल्यवर्धन उपक्रमातील बोधपर गोष्टीमध्ये ती रमू लागली. आता वर्गातील सर्व विद्यार्थी गटकार्य करत असताना एकमेकांना मदत करतात. एकत्र येऊन कामे करतात. स्वतःचे मत निर्भयपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या अध्यापनाला एक नवी दिशा मिळाली आहे. याचे सर्व श्रेय मूल्यवर्धन कार्यक्रमास आहे. “प्रत्येक दिवशी वर्गाला नवीन शिक्षक देणे शक्य नाही, परंतु एक शिक्षक दररोज एका नव्या रूपाने मुलांसमोर उभा राहू शकतो.” हीच नावीन्यतेची संस्काररूपी शिदोरी शिक्षकांना देण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व मूल्यवर्धन उपक्रमाचे खूप खूप धन्यवाद.
-सुवर्णा पाटील
अध्यापनाला दिशा मिळाली
-सुवर्णा पाटील
मुले झाली बोलकी
आदिवासी भागातील विद्यार्थी हे अबोल हळवे आणि लाजरे बुजरे असतात, पण मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे त्यांच्यात एक आत्मविश्वास निर्माण झाला आणि ते अभिव्यक्त करायला शिकले.
मूल्यवर्धन कार्यक्रम आयोजित केल्याने बालकांना आपले विचार व भावना अभिव्यक्त करण्याचे स्वातंत्र्य मिळाले. त्यांना आपल्या क्षमतांची जाणीव झाली. आपण कोणते कार्य करू शकतो हे त्यांना समजले. मुले आदर करायला शिकली. त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. काय योग्य व अयोग्य आहे हे समजण्यास मदत झाली. विद्यार्थी स्वयंशिस्त झाले. आपला गृहपाठ स्वतः नियमित करू लागले. परिसर व गाव स्वच्छ ठेवणे, वृक्षांची निगा राखणे, आरोग्याची काळजी घेणे व नियमित स्वच्छता करणे यासारखी कामे न सांगता करू लागले. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे बालक स्वतःला ओळखणे शिकले, तसेच निर्भयपणे आपले विचार मांडणे, मोठ्यांचा आदर करणे, इतरांना मदत करणे, कामाची लाज न ठेवणे, जबाबदारी स्वीकारणे शिकले. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत झाली. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम एक नवसंजीवनी ठरणार यात शंका नाही.
-महेश पाटील
मुले झाली बोलकी
-महेश पाटील
एकमेकांचा आदर करणे
मुले एकमेकांचा आदर करताना दिसले.
माझ्या वर्गात एक हुमेरा नावाची मुलगी आहे. तिला रागाने काहीही करण्यास सांगितले तर ती काम कधीच करायची नाही. परंतु मूल्यवर्धन तासिकेला जेव्हा पासून मी सुरुवात केली, तेव्हापासून ती कामे करु लागली.
-मो.जफर इक़्बाल शेख
एकमेकांचा आदर करणे
-मो.जफर इक़्बाल शेख
मी आणि मूल्यवर्धन
मी आणि मूल्यवर्धन पुस्तिका
गेल्या वर्षभरापासून मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या चोपडा तालुक्यात राबवला जात आहे. सुरुवातीला काहींनी या कार्यक्रमाकडे नेहमीप्रमाणे नकारात्मक दृष्टिकोणातून पाहिले. जेव्हा आम्ही याचे प्रशिक्षण घेतले, तेव्हा या कार्यक्रमाची रुपरेषा आणि फलित लक्षात आले. मी प्रत्यक्ष जेव्हा मूल्यवर्धन पुस्तिकेचा माझ्या वर्गात वापर केला, तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये होणारे बदल मी अनुभवायला मिळाले. वर्ग, शाळा, घर याठिकाणी आपण कसे वागावे हे विद्यार्थी चर्चेच्या माध्यमातून सांगू लागले. आपल्या जबाबदाऱ्या, क्षमता यांची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिल्यानंतर विद्यार्थी जबाबदारीने वागायला लागले. प्रत्येक गोष्टीला शिस्तीची जोड मिळाली तर सर्व कसे सुरळीत पार पडते. सर्वांना सर्व संधी समान मिळू शकते, याचा प्रत्यय वर्गात आला. रागावर नियंत्रण कसे मिळवावे? रागाचे दुष्परिणाम काय होतात, याची जाणीव करुन देणाऱ्या गोष्टी सांगितल्यामुळे विद्यार्थ्यांची चिडचिड कमी व्हायला मदत झाली. आपण तयार केलेले नियम आपण मोडायचे नाही, हा नियम सर्वांनी पाळायचा हे बंधन घातले. मूल्यवर्धन पुस्तिका म्हणजे मूल्यांची खाणच. विद्यार्थीरुपी बिजाला मूल्यवर्धन हे पौष्टिक खतच जणू. खेळताना, रस्त्याने चालताना, प्रवासात जर आपण नियम पाळले तर होणारे अपघात आपण टाळू शकतो, ही सवय लहानपणापासूनच लागली तर भविष्यातील अपघातांना आळा बसेल, हे काम मूल्यवर्धन पुस्तिकेने चोख केले आहे. देशाचे भावी नागरिक, सशक्त पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षक करत असतात. यासाठी आरोग्यदायी चांगल्या सवयी मुलांना लागणे महत्त्वपूर्ण आहे. आरोग्य चांगले तर सर्वच गोष्टी चांगल्या होणार, यात शंकाच नाही. चांगल्या-वाईटाची जाण विद्यार्थ्यांना करुन देण्यासाठी मूल्यवर्धन पुस्तिकेची मोलाची मदत होते. घरी, वर्गात, शाळेत, समाजात आपले वर्तन चांगले असावे. कारण सभ्य माणसांचा आदर सर्वजण करतात, ही जाणीव मुलांना करुन देण्यासाठी सभ्य-असभ्य वर्तन यातील फरक समजावून सांगता आला. आपली शाळा, वर्ग, घर, समाजातील लोक यांच्याशी आपले मैत्रीपूर्ण संबंध असणे का गरजेचे आहे, हे समजविण्यासाठी उपक्रम पुस्तिकेचा फारच उपयोग झाला. सर्वांशी प्रेमाने वागणारे लोक सर्वांनाच आवडतात, हे मुलांना समजले. इतरांच्या भावनांचा योग्य तो आदर आपण राखला पाहिजे, हे मुलांनी प्रत्यक्ष कृतीतून अनुभवले. आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानलेच पाहिजेत, जेणेकरुन समोरच्या व्यक्तिची आपल्याविषयी प्रेमाची, आदराची भावना निर्माण होते. आपणही प्रत्येकाच्या मदतीला धावून गेलेच पाहिजे. कुठल्याही अपेक्षेविना हे संस्कार याचे सारे श्रेय मूल्यवर्धनलाच. धन्यवाद. एक छोटासा शब्द आहे, परंतु तो मोठमोठ्या लोकांची मने क्षणात जिंकण्याची ताकद ठेवतो. मूल्यवर्धन पुस्तिकेने मला माझ्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांची शिदोरी जणू उपलब्ध करुन दिली. ही शिदोरी माझे विद्यार्थी भविष्यातदेखील चांगल्याप्रकारे सांभाळतील आणि आपल्या पुढच्या पिढीला मूल्यांसह सोपवतील, यात शंकाच नाही. या पुस्तिकेतील एकूण एक उपक्रम म्हणजे संस्कारांची मालिकाच. माझ्यातदेखील विद्यार्थ्यांप्रमाणे सकारात्मक बदल झाले. रागावर नियंत्रण मिळविले. विद्यार्थ्यांच्या क्षमतांची ओळख झाली. त्यानुसार वागणूक देता येऊ लागली. वर्गाचे केलेले नियम सर्वांसाठी बंधनकारक असतात. ते शिक्षकांनीदेखील पाळायचेच असतात, हा विचार पक्का झाला. मूल्यवर्धन पुस्तिकेने माझ्या विद्यार्थ्यांना भरभरुन संस्कार दिले, मूल्यांची पेरणी केली. या पुस्तिकेतील उपक्रम मुलांसोबत मलादेखील समृद्ध करत आहे.
-सोनाली साळुंखे
मी आणि मूल्यवर्धन
-सोनाली साळुंखे
मूल्यवर्धन- एक शिस्तीची चळवळ
मूल्यवर्धन कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून मला स्वतःला स्वयंशिस्त लागली.
आमच्या जळगांव जिल्हा परिषदेने मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात मी कार्यरत असलेल्या जि. प. शाळा शिरसोली प्र. न. येथून केली. जिल्हयातील पहिला प्रेरक होण्याचा मान श्री. राजेंद्र पाटील व माझे मार्गदर्शक केंद्रप्रमुख श्री. डी. एन. ठाकूर असा आम्हां दोघांस मिळाला. आमच्या शाळेत कार्यक्रम राबविताना विद्यार्थ्यांसोबत उपक्रम पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक, कुटुंब यांची सांगड घालताना तो शिक्षकाचे अनुकरण करतो, हे अनेक उदाहरणांतून दिसून आले. जसे शिक्षक कपडे स्वच्छ असावे सर्व विद्यार्थ्यांना सांगतात, नियमित नखे व केस कापावेत तसेच वर्गात येताना आपले बुट, चप्पल दरवाजाच्या बाहेर रांगेत काढावेत, याप्रमाणे विद्यार्थी स्वतः शिस्त पाळताना शिक्षकांचेही निरीक्षण करू लागले. वर्गात चुकून शिक्षक व पालक बुट, चप्पल घालून आले तर त्यांना ते आठवण करून देऊ लागले. आधी पादत्राणे वर्गाच्या बाहेर काढा, मगच वर्गात या. हे सर्व मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या विविध उपक्रमामुळे शक्य झाले असे वाटते. बालगोपाळांच्या सुचनेमुळे माझ्यातही स्वयंशिस्त रूजली, असे मला सांगावेसे वाटते.
-पाटील पंडित
मूल्यवर्धन- एक शिस्तीची चळवळ
-पाटील पंडित
विद्यार्थ्यांमध्ये बदल
मूल्यवर्धन शाळेत राबविल्यावर मला जाणवलेले बदल.
मूल्यवर्धनचे धडे गिरवल्यावर माझ्यात खूप बदल झाल्याचे जाणवते. आधी खूप संताप यायचा. पण आता खूप शांत शांत वाटते. आता मी इतरांच्या समस्या समजून घेत आहे.
-मोहमद चांद
विद्यार्थ्यांमध्ये बदल
-मोहमद चांद
प्रामाणिकपणा
देशाचे भवितव्य नवीन येणाऱ्या प्रामाणिक पिढीवर अवलंबून.
चालू शैक्षणिक वर्षातील नवीन जि. प. शाळा धानोरे बु. येथील अनुभव मला आपणांसमोर मांडावयाचे आहेत. परिपाठात मूल्यवर्धन उपक्रमाविषयी अनेक मुलांना बोलते केले. त्यापैकी एका मुलाने आपल्या वडिलांच्या व्यसनाधिनतेमुळे सर्व कुटुंबाला कसा त्रास होतो, हे सांगताना मूल्यवर्धनमध्ये शिकलेले व्यसनाधिनतेचे दुष्पपरिणाम वडिलांना नेहमी पटवून देऊन व्यसनापासून परावृत्त केले. एके दिवशी गावातील एक प्रतिष्ठीत व्यक्ती शाळेत कामानिमित्त आली असता, त्यांचे पैशांचे पाकीट शाळेच्या आवारात पडले. शाळेतील सौरव नामक विद्यार्थ्यांने ते माझ्याकडे आणून दिले. मी चौकशी केली असता, शाळेत आलेल्या त्या व्यक्तिचे पाकीट त्याच विद्यार्थ्याला परत करावयास सांगितले. त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्या व्यक्तिने सहज प्रश्न केला, अरे तू मला हे का परत केले? त्यावर त्याने उत्तर दिले, माझ्या शिक्षकांनी मला कोणाचीही वस्तू घेऊ नये, ती त्यांना परत करावी, असे शिकविले आहे. मूल्यवर्धन उपक्रमातील अनेकविध खेळांतून मुलांमध्ये सांघिक व एकोप्याची भावना पहावयास मिळते. पाचवीच्या उपक्रम पुस्तिकेतील दैनंदिन वेळापत्रकाचे पालन, माझ्या क्षमता, वर्गनियम, T.V. पाहण्याच्या सवयी या उपक्रमांतून अनेक सकारात्मक बदल पहावयास मिळाले. अनेक विद्यार्थी आपल्या जवळ नसलेली वस्तू मित्रांकडून घेऊन प्रामाणिकपणे परत करतात. उपक्रम पुस्तिकेतील कौटुंबिक माहितीच्या मदतीने अनेक मुले आई, वडिलांना कामात मदत करतात. त्यांचा नियमित आदर करतात. आई, वडिलांशी व गुरुजनांशी खरे बोलण्याचे, दिलेले काम पूर्ण करण्याचे कसब मुले दाखवितात. हा सर्व बदल पाहून पालक शिक्षकांना याचे रहस्य विचारतात त्या वेळेस त्यांना सांगताना आनंद वाटतो की, हे सर्व मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेतील उपक्रम व मूल्यांमुळेच होत आहे.
नवीन पिढीला तंत्रज्ञान युगाकडे घेऊन जाण्यासाठी आज मूल्यांची खूप गरज आहे. विद्यार्थी, शिक्षक व समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या मित्रांचा आदर करतात, तेव्हा मूल्यवर्धन किती उपयोगाचे आहे हे समजते. प्रत्येकाने आपल्या कामात प्रामाणिक राहिले तर निश्चितच भारत देशमूल्यांवर आधारीत सुसंस्कृत देश बनेल यात शंका नाही.
-पाटील पंडित
प्रामाणिकपणा
-पाटील पंडित
शाळा आणि मूल्यवर्धन
शालेय सांस्कृतिक व विविध उपक्रमांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमाचे योगदान अतिशय मोलाचे आहे.
माझ्या एक वर्षाच्या काळात जि. प. शाळा बोरनार येथे मुख्याध्यापक पदाचा कारभार सांभाळताना मूल्यवर्धन उपक्रमांची मला वेळोवेळी मदत झाली. जसे शालेय परिपाठापासून शालेय स्वच्छता, वर्ग व्यवस्थापन, शालेय कामकाज हाताळताना मूल्यवर्धनची वेळोवेळी मला मदत मिळाली. शिक्षक व पालकांशी संपर्क साधताना कार्यक्रमातील सकारात्मक दृष्टीकोन नेहमी उपयोगी पडला. शालेय परिपाठात विद्यार्थ्यांसमोर अनेक सकारात्मक उपक्रम ठेवताना स्वच्छता, वृक्षसंवर्धन, शालेय परिसर आपल्यासाठी कसा सकारात्मक असतो, हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविता आला. गोष्टी स्वरूपात नातेसंबंध, गीतांच्या माध्यमातून तसेच खेळांतून मूल्यवर्धन तळागाळातील विद्यार्थ्यापर्यत पोहोचविता आले, याचा मला सार्थ अभिमान आहे.
शालेय व्यवस्थापन समितीत वेळोवेळी चर्चा करताना ग्रामीण भागातील पालकांनी मूल्यवर्धन उपक्रमांची पुस्तके व उपक्रम पाहून शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमात मान्यवरांसमोर शांतता संकेत देताना शिक्षक विद्यार्थ्यांवर न ओरडता कसे शांत करतात, हे पाहून गावकरी व पाहुण्यांनाही अप्रुप वाटले. हे मूल्यवर्धनाचे मोठे फलित आहे असे मला वाटते.
-पंडित पाटील
शाळा आणि मूल्यवर्धन
-पंडित पाटील
अविस्मरणीय अनुभव
मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना खूप छान अनुभव आले. आनंदातून शिक्षण घेऊन मूल्य रुजविणारा हा एक खरोखर चांगला कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आहे. आजच्या काळाची गरजही आहे.
माणूस अनुभवातून शिकतो आणि समजतो, तसचं काहीसं माझंही झालयं! एक शिक्षिका म्हणून मी देखील अनुभवातूनच समजले. विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण कसे द्यायचे हा याआधी प्रश्नच पडला होता. फक्त परिपाठातून गोष्टी सांगून मूल्ये रुजविता येत नाहीत, तर ती कृतीतून अनुभवातून रुजतात. मूल्ये शिकवायची नसतात, तर ती रुजवायची असतात.
माझ्या आठवणीतला एक अविस्मरणीय अनुभव.
जेव्हा माझ्या जिल्हा परिषद केंद्रशाळा विदगाव, ता. जळगाव येथील माझ्या चौथीच्या वर्गाचे पालक मला भेटून म्हणाले, मॅडम तुम्ही विद्यार्थ्यांना असे काय सांगितले की, ते रोज सकाळी उठून आमच्या आणि घरातील सर्व वडिलधाऱ्या मंडळींच्या पाया पडून नमस्कार करतात, त्यांनी सांगितलेली कामे ऐकतात, शेजाऱ्यांचे देखील काम करून मदत करतात. उलट उत्तर देणे देखील काही विद्यार्थ्यांचे बंद झाले आहे. मग मी पालकांना मूल्यवर्धन कार्यक्रमाविषयी घेतलेल्या पहिल्या सभेची आठवण करून दिली. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा तेव्हापासूनचा हा सकारात्मक बदल घडवून आला आहे.
माझ्या वर्गातील प्रणव प्रभाकर कोळी हा विद्यार्थी खूप हुशार, पण घरी मात्र आई, वडिलांनी सांगितलेले ऐकायचा नाही. पालक जेव्हा जेव्हा मला भेटायचे तेव्हा सांगायचे, मॅडम प्रणव आमचं मुळीच ऐकत नाही. मग मी मूल्यवर्धन तासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांबरोबर स्वतः श्रमदानाचे काम केले आणि त्यांना श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर मला मात्र प्रणवमध्ये सकारात्मक वर्तनबदल झालेला दिसून आला. श्रमदानाच्या कामामध्ये प्रणव सर्वात प्रथम हिरीरीने भाग घेणारा विद्यार्थी आढळला. एके दिवशी तर त्याचे पालक मला भेटायला आले आणि म्हणाले, “मॅडम आमच्या प्रणवमध्ये खूप बदल दिसून आला. पालकांचे हे म्हणणे ऐकून मला खूप आनंद वाटला. प्रणवमध्ये झालेल्या सकारात्मक वर्तनबदलाने मला मात्र अध्ययन-अध्यापनात खूप फायदा झाला. विद्यार्थी शाळेत रमू लागले. आनंदाने अभ्यास करू लागले. खरोखर हे सारं काही शक्य झालं मूल्यवर्धन कार्यक्रम आणि त्यातील उपक्रम व आनंददायी खेळांमुळे.
-ज्योती राणे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल झाले
-ज्योती राणे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल झाले
मूल्यवर्धन उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये मोठे बदल झाले.
मूल्यवर्धन उपक्रमातून विद्यार्थ्यांना आरोग्याबद्दलच्या चांगल्या व वाईट सवयीची ओळख झाली. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सहकार्य, प्रामाणिकपणा, आदर व या सारख्या गुणांची रुजवणूक झाली.
-मोमीन अब्दुल लतीफ
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल झाले
-मोमीन अब्दुल लतीफ
मूल्यवर्धन व शालेय बदल
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कारमूल्ये रूजावीत यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम जि. प. शाळांमध्ये राबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक, शालेय वातावरण यामध्ये बराच सकारात्मक बदल झाला आहे. मूल्यवर्धनाचे छोटेसे रोप आज वटवृक्ष होत आहे.
आजच्या व पुढील पिढीला सुखासमाधानाने जगायचे असेल तर संस्कारक्षम बालके घडली पाहिजे, यासाठी मुलांच्या मनात चांगली मूल्ये रुजायला हवीत. हेच शांतिलाल फाउंडेशनने हेरले व मूल्यवर्धन कार्यक्रमाचीअंमलबजावणी केली. असं म्हणतात की दिशा बदलली की, दशा बदलते. हेच कार्य मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रमातून केले आहे. शाळेत एखादा घटक विद्यार्थ्यांना समजून घेणे कठीण होत असेल, तर शिक्षक आपापसात चर्चा करून मूल्यवर्धन कार्यक्रमाची मदत घेऊन सोडवत आहेत. शालेय वातावरण आनंददायी व स्वयंशिस्तिचे झाले आहे. सहयोगी खेळांतून विद्यार्थी आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. त्यांच्या बोलण्यातून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मदत होत आहे.
-भरत सूर्यवंशी
मूल्यवर्धन व शालेय बदल
-भरत सूर्यवंशी
विद्यार्थ्यांमध्ये मोठे बदल झाले
विद्यार्थ्यांमध्ये मोठे बदल झाले. माझ्या वर्गात मुले व मुली बेशिस्त होते. मूल्यवर्धन कार्यक्रम आयोजित करण्याचे कार्य मी सुरु केले. विद्यार्थ्यांना आंनद झाला. सर्व मुले, मुली सहभाग घेतात.
-सलमा कौसर गफूर
विद्यार्थ्यांमध्ये मोठे बदल झाले
-सलमा कौसर गफूर
मूल्यवर्धनातून विद्यार्थ्यांची जडणघडण
मी दोन वर्षांपासून माझ्या शाळेत मूल्यवर्धन हा उपक्रम घेत आहे. त्यावरून मला लक्षात आले की, मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये सकारात्मक बदल झालेले दिसून येतात. सहयोगी खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये मदतीची भावना, एकतेची भावना निर्माण होते. मूल्यवर्धनमधील विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव मिळतो.
मूल्यवर्धन हा साचेबद्ध उपक्रम असल्याने शिक्षकांना विद्यार्थ्यांमध्ये मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी एक विशिष्ट दिशा व मार्गदर्शन मिळते. मूल्यवर्धन हा देखील नियोजनात्मक कार्यक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठया प्रमाणात सकारात्मक बदल दिसून येतात. माझ्या शाळेतील चौथीमधील विद्यार्थिनी पुनम मोहन कोळी ही अभ्यास, शालेय परीपाठ, कवायत, व्यायाम या कोणत्याही उपक्रमात सहभागी होत नसे. परंतु इतर विद्यार्थ्यांचे बघून तीदेखील सहयोगी खेळांमध्ये सहभाग घेऊ लागली. ठराविक वेळेनंतर ती हळूहळू शालेय परिपाठ, व्यायाम, कवायत यात सहभागी होऊ लागली. हळूहळू मूल्यवर्धनातून गाणी, गोष्टी, चांगल्या सवयी यातूनच ती अभ्यासाकडे लक्ष देऊ लागली. अशा प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपलेपणा निर्माण होऊ लागला. वर्गनियमांमुळे विद्यार्थ्यांना वर्गासोबतच शालेय परिसरही स्वच्छ ठेवण्याची सवय लागली. शांतता संकेतातून शिक्षकांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रीत करण्यास मदत होते. आतापर्यंत आपल्या शालेय अभ्यासक्रमातूनच मूल्यांची रुजवणूक विद्यार्थ्यांमध्ये केली जात होती. परंतु, मूल्यवर्धनामुळे मूल्य रूजवण्यासाठी अधिक मदत होऊ लागली.
-भाग्यश्री महाजन
मूल्यवर्धनातून विद्यार्थ्यांची जडणघडण
-भाग्यश्री महाजन
मूल्यवर्धन काळाची गरज
आजच्या धावपळीच्या युगात तंत्रविज्ञान आणि भौतिकशास्त्र यांचा विकास व त्यांनी केलेली अभूतपूर्व प्रगती डोळे दिपवणारी आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर आधुनिकीकरण झाले. माहिती संक्रमण अधिक वेगाने होत आहे. मानवाची विलक्षण प्रगती झाली. भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर असताना, मानवाच्या सुखसाधनात भर पडली, पण तरीही सकाळी उठल्यावर वृत्तपत्र दर्शन घेताच कुठेतरी समाजातील विघातक चित्रण वाचताना डोळ्यासमोर उभं राहतं, तेव्हा वाटतं … “जगण्यातील जगणंच हरवलंय, वागण्यातील शहाणपण हरवलंय.”
बुद्धीचा विकास झाला, पण मनाचा विकास झाला नाही. सुसंस्काराचा अभाव वाटायला लागला आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण होत आहे. चित्रपटातून दाखविल्या जाणाऱ्या विकृतींनी समाजात स्थान मिळविल्याचे निदर्शनात येते. यामुळेच असे वाटते की, नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेही तितकेच आवश्यक आहे. हेच पाऊल शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने उचलले आहे. खरं तर देशातील रोजच्या घडामोडी बघता, आज संस्कारांची गरज मुथ्था फाउंडेशनने ओळखली आणि अगदी आखीव-रेखीव, सकारात्मक बदल घडवणारा असा एक आदर्श कार्यक्रम महाराष्ट्रातील शिक्षकांपर्यंत पोहोचविला. शिक्षक म्हणून हा कार्यक्रम राबविताना खरोखर विद्यार्थ्यांमध्ये इतका सकारात्मक वर्तनबदल आढळला की, पालकही भेटून आपल्या पाल्यांमध्ये झालेल्या सकारात्मक वर्तन बदलाचे वर्णन कथन करू लागले. अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सहज सोपी आणि आनंददायी होऊ लागली. खरोखर शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे खूपखूप आभार.
आपल्या देशाचा तरुण हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक व नैतिकदृष्ट्या समर्थ व संपन्न असला पाहिजे. चांगली माणसे आयात करता येत नाहीत, ती घडवावी लागतात. म्हणून घडलेल्या तरुणांशिवाय सांप्रत या देशाला तरुणोपाय नाही. यासाठी लहानपणापासूनच मुलांना आपल्या संस्कृतीचे योग्य मार्गदर्शन केले, तर निश्चितच ही परिस्थिती बदलू शकते. विघातक परिणाम थांबविण्यासाठी भारतीय मूल्यांचा प्रसार करणे गरजेचे आहे. आपल्या देशाने कितीही प्रगती केली तरी ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोटच लावतात. म्हणूनच आज मूल्यशिक्षण देण्याची गरज आहे.
बऱ्याचवेळा मी व माझे सहकारी शिक्षिका भगिनींमध्ये चर्चा व्हायची की, आज पुस्तकी ज्ञानापेक्षा मूल्य शिक्षणाची नितांत गरज आहे. मूल्यशिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश झाला. राष्ट्रीय अभ्यासक्रम 2010 या अभ्यासक्रमातून घटनात्मक मूल्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू लागली. त्याचे पडसादही उमटायला लागले. परंतु मुळातच मूल्यशिक्षण हे शिकवावे लागत नाही, तर ती मूल्ये रुजवावी लागतात. मुल्यांच्या जोपासनेसाठी तातडीने आरंभ करण्यासाठी कार्यशील व्हायचे तर लहानपणीच हे मूल्यसंस्कार मुलांवर शिक्षणातून घडवयास हवेत. हे शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने जाणले.
गुण आहे उपजतच म्हणतात त्याला मूल्य !
परंतु त्यास पोषक असे वाढीस लावणारे कौशल्य !
शांतिलाल मुथ्था यांनी हेच ओळखले तरतम्य !
म्हणून राबविला कार्यक्रम मूल्यवर्धनाचा शासनमान्य!
मूल्यवर्धनने विविध उपक्रमांचे आयोजन मूल्य रुजविण्यासाठी केले. मूल्यवर्धन कार्यक्रमाची वाटचाल व विस्तार स्पष्ट केला.
मूल्ये शिकवली जात नाहीत, तशीच ती लादताही येत नाहीत. मुक्त वातावरणातून मुले मूल्ये शोषून घेत असतात. मात्र त्यासाठी विदयार्थ्यांना नियोजनबद्ध संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. समजाला पोषक असणारी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजतील. मूल्यवर्धन कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत सातत्याने, विविध उपक्रमांद्वारे यशस्वीपणे पोहोचविण्याचा एक यशस्वी कार्यक्रम होय. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने तयार केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा गाभा म्हणजे भारतीय राज्यघटनेतील मूल्ये यांची उत्कृष्टपणे सांगड घालण्यात आली आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार इयत्ता पहिलीपासूनच प्रयत्न केला आहे. बालस्नेही, आनंददायी आणि भीतीमुक्त वातावरणात मूल्ये रुजावीत. याच प्रयत्नांना पूरक असा बदल नव्या मूल्यवर्धन कार्यक्रमातून ज्ञानरचनावादी अध्ययन पद्धतीचा उपयोग करून मुले मुल्यांशी जवळीक साधतात. हा कार्यक्रम विद्यार्थीकेंद्रित असून यातून जोडीचर्चा, गटचर्चा, सहयोगी खेळ यातून मूल्ये आत्मसात करतात. याचा प्रभावी परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये होणारा सकारात्मक वर्तन बदल. त्यांच्यातील कलागुणांना संधी मिळून नेतृत्व करण्यास स्वतःहून मुले, मुली तयार होत आहेत, नेतृत्व स्वीकारत आहे. बोलण्यात धीटपणा, सहकार्य, चिकाटी, संघभावना, आपुलकी इ गुणांचा विकास मूल्यांसोबत होत आहे.
माझी प्रत्येक कृती योग्य व इतरांच्या हितासाठी व्हावी ही भावना रुजत आहे. यात शिक्षकांची भूमिका मूल्यवर्धन रुजविणारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षेपेक्षाही लवकर सकारात्मक वर्तन बदल घडून येत आहेत, याचा आम्हा शिक्षकांनाही आनंद होत आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन राज्यपातळी, जिल्हास्तर, तालुकास्तर वरून वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन करीत आहे. कार्यक्रमाची नियोजनबद्धता असल्याने कार्यक्रम राबविताना अधिक आनंद होत असून विद्यार्थ्यांना पुरविलेल्या उपक्रमपुस्तिका अधिक आकर्षून घेणाऱ्या आहेत. त्यामुळे मूल्यवर्धन केंद्र असणारा विद्यार्थी रममाण होत आहे. शेवटी म्हणावेसे वाटते,
माणसाने आपले व्यक्तिमत्व वृंदावन करावे,
आपल्या वाणीला बनवावी प्रार्थना,
माणूस नितीमूल्यांचा सुगंध व्हावा,
तेव्हाच देश बनेल सक्षम !
नागरिक बनेल आदर्श, सुसंस्कारित.
मग यासाठी आपण सारे मूल्यवर्धन कार्यक्रम राबवूया
आदर्श भारत घडवूया
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूया आदर्श नागरिक घडवूया.
-ज्योती राणे
मूल्यवर्धन काळाची गरज
-ज्योती राणे
मुलांमध्ये रुजली मूल्ये
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे माझ्या विद्यार्थांमध्ये अपेक्षित बदल झालेला जाणवला. एका असहाय्य वृध्दास न सांगता मदत केली.
माझी शाळा आहे बहादरपूरला. जळगाव जिल्ह्यात व पारोळा तालुक्यातील गाव तसं छोटं, टुमदार आणि संस्कारक्षम. या गावातच भारतातील दुसरे श्री. बद्रिनाथाचे मंदिर आहे. ते आहे ९५ वर्षे जुने. असे गाव माझी कर्मभूमी आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमासाठी माझी प्रेरक म्हणून निवड झाली, म्हणून स्वतःला धन्य समजतो. मूल्यवर्धन समजून घेतले आणि शाळेत उपक्रम घ्यायला सुरुवात केली. वर्गनियमापासून शांतता संकेत, विविध अध्यापन पद्धती, चर्चा इ. सर्व वर्गात राबवायला सुरुवात केली. शांतता संकेताची परिणामकारकता लगेच दिसून आली. आता वर्गात गोंधळ वाटल्यास मुलेच शांतता संकेत देतात व मलाही हात वर करायला भाग पाडतात. विविध उपक्रम घेतल्यानंतर त्याची निष्पत्ती दिसून आली, तेव्हा मी खरंच धन्य झालो, भरून पावलो.
त्याचं झालं असं, उन्हाळ्याचे दिवस होते. गावातीलच एक वृध्द शाळेकडे फेरफटका मारायला आले होते. अजूनही येतात. त्यादिवशी त्यांची काठी हातातून सुटली. ते वृद्ध खाली पडले. हे बाहेर पाणी प्यायला आलेल्या मुलांनी पाहिले. त्यांनी पळत जाऊन त्या वृद्धाला उभे करण्याचा प्रयत्न केला, पण ते शक्य झाले नाही. तोपर्यंत एकाने पाणी आणून त्यांना पाजले. काठी त्यांच्या हातात देऊ लागले. मी काही कामानिमित्त बाहेर आलो होतो. रस्त्यावर या मुलांना पाहिले. म्हटलं ही मुले काय करत आहेत ? तर या मुलांचे मदतीचे काम सुरू होते. ते दृश्य पाहून माझे डोळे पाणावले. मन भरून आले. मला त्यांचा फोटो काढायचा मोह आवरता आला नाही. मी पण मुलांसोबत मदत केली. त्या वृद्धास घरी सोडले. मला कोणी विचारले, मूल्यवर्धन म्हणजे काय? तर अशा प्रकारचा वर्तन बदल म्हणजेच मूल्यवर्धन असेच मी सांगेन.
-सुनील चौधरी
मुलांमध्ये रुजली मूल्ये
-सुनील चौधरी
मूल्यवर्धनमुळे परिवर्तन
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये बदल
मूल्यवर्धन पुस्तकांमुळे मुलांमध्ये खूप परिवर्तन आणि बदल झालेला आहे. नवीन उपक्रम शाळेत घेण्यात येतात. त्यामुळे मुलांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यात नवीन शिकण्याची उमेद निर्माण झालेली आहे.
-रिझवान खान
मूल्यवर्धनमुळे परिवर्तन
-रिझवान खान
एकमेकांचा आदर करणे
मुले एकमेकांचा आदर करताना दिसले.
माझ्या वर्गात एक हुमेरा नावाची मुलगी आहे. तिला रागाने काहीही करण्यास सांगितले तर ती काम कधीच करायची नाही. परंतु मूल्यवर्धन तासिकेला जेव्हा पासून मी सुरुवात केली, तेव्हापासून ती कामे करु लागली.
-मो.जफर इक़्बाल शेख
एकमेकांचा आदर करणे
-मो.जफर इक़्बाल शेख
विद्यार्थ्यांची स्वत:हून एकमेकांची मदत करणे
विद्यार्थ्यांमध्ये स्वत:हून एकमेकांची मदत करण्याचे प्रमाण वाढले.
विद्यार्थी एकमेकांची मदत करू लागले.
शिवीगाळ काढणे बंद झाले.
वर्गात शिस्त निर्माण झाली
-नझिम शेख
विद्यार्थ्यांची स्वत:हून एकमेकांची मदत करणे
-नझिम शेख
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन.
मुले मूल्यवर्धनच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवतात. गट म्हणून वाचन केल्याने त्यांच्या गटातील उपक्रमांमध्ये बोलण्याची क्षमता वाढते. आत्मविश्वास वाढल्याने आत्मज्ञान वाढते. शिकण्याची आणि शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वारस्य निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि अध्यापन प्रक्रियेस वेग आला.
-खान खुर्शीद अहमद
मी आणि मूल्यवर्धन
-खान खुर्शीद अहमद
लहान गोष्टींमधून मूल्ये
लहान गोष्टींमधून मूल्ये रुजविता येतात.
मुलांच्या आवडीची चित्रे, गोष्टी, गाणी आहेत.
आदर, बंधुभाव, सहकार्य यात वाढ होत आहे.
-रविंद्र विनायक पाटील
लहान गोष्टींमधून मूल्ये
-रविंद्र विनायक पाटील
विद्यार्थी कृतीतून शिक्षण घेतात
विद्यार्थी कृतीतून अध्ययन करीत असल्याने आनंददायी शिक्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. तसेच एकमेकांना समजून मदत करतात व आनंद घेतात.
उपक्रम छान आहे. त्यामुळे कृतीतून अध्ययन-अध्यापन केले जाते.
-कैलास पवार
विद्यार्थी कृतीतून शिक्षण घेतात
-कैलास पवार
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
विद्यार्थी कृतीतून अध्ययन करीत असल्याने आनंददायी शिक्षणाचा आनंद घेतात.
विद्यार्थी स्वत: कृतीतून शिकत असल्याने शिक्षण आनंददायी व उत्साहपूर्ण अध्ययन करतात. त्यामुळे त्यांना शाळेची आवड निर्माण झाली. परिणामी उपस्थिती वाढली.
-रिझवान खान
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-रिझवान खान
मूल्यवर्धन टप्याटप्याने घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये वर्तनबदल दिसतो
विद्यार्थ्यांनी चर्चा करुन स्वतः स्वयंशिस्तीचे नियम तयार केले. तेच कार्डशीट लिहून वर वर्गात दर्शनी भागात लावले. शांततेसाठी खुण सांगितली. त्याप्रमाणे बदल दिसला.
भाषेचा अडथळा : आमच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी 70% असल्याने भाषेची देवाणघेवाण संथ गतीने होते. त्यासाठी विद्यार्थी स्वयंशिस्त, नियमावली तयार करताना हा मुद्दा मांडण्यात आला. त्यात सर्वांना विश्वास देऊन आपल्या भाषेचा सदैव स्वीकार हे तत्त्व अंगीकारारून पण मराठी शाळा, मराठीत अभ्यासक्रम ही जाण ठेवून सर्वांनी मराठीत एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करुया असे ठरले. त्यानुसार जो हा नियम मोडेल, त्या विद्यार्थ्यांला येत असलेला पाढा बोलून दाखविल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढचा पाढा म्हणून दाखवावा असे ठरले. आनंदी खेळ खेळत पाढे पाठांतरासाठी प्रेरणा दिली.
-वाल्मीक अहिरे
मूल्यवर्धन टप्याटप्याने घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये वर्तनबदल दिसतो
-वाल्मीक अहिरे
गटागटाने एकत्रित पद्धतीने संघटित होऊन मूल्य जोपासणे
मूल्यवर्धन या कार्यक्रमात मूल्यशिक्षणाचे तत्त्व, हेतू तर साध्य करता येतातच, पण त्या सोबत दैनंदिन मूल्ये आत्मसात करण्यासाठी मुलांच्या प्रत्येक वयोगटाचा कल निश्चित करून त्यांच्यात प्रात्यक्षिक क्षमतांचा विकास केला जातो. त्याविषयी आलेले प्रत्यक्ष अनुभव.
मला आलेला अनुभव.
विद्यार्थी आणि त्यांच्या वर्गशिक्षिका. इयत्ता तिसरी. (उ. प्रा. मठगव्हाण शाळा)
सकाळी व्हिजीटच्या वेळी शाळेत परिपाठ घेत होते. प्रत्येक कृती तंतोतंत घेत असताना मूल्यवर्धनसाठी दिलेल्या वेळेत आठ मूल्ये यातील (इतरांविषयी आस्था बाळगणे) हा उपक्रम त्यांनी प्रभावीपणे सादर केला.
त्यानंतर मी जवळच गंगापूरी शाळेत गेलो. त्याठिकाणी वर्गशिक्षक श्री. धर्मा आर. पाटील.
उपस्थित दिसले. सर्व विद्यार्थी उत्साही दिसून आले. मी त्यांना आपण एखादा उपक्रम
सादर करू या अशी विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी विद्यार्थ्यांना मैदानावर नेऊन ‘मी माझ्या क्षमता’ याविभागावर विविध विद्यार्थी स्वत: कसे बोलतील यावर विविध उपक्रम, चर्चा आमच्यासमोर सहज घडवून आणल्या.
यात विद्यार्थी स्वत: बोलके झाले. एकमेकांची ओळख करून घेताना, चुणचुणीतपणे दिसून
आली. यानंतर तीन वाजता पूर्ववत मठगव्हाण शाळेत अचानक आलो असता (श्रीमती
भाग्यश्री मॅडम यांच्या उपस्थितीत) असताना मूल्यवर्धन प्रेरक मनिषा मॅडम वर्गावर त्यांच्या
अध्यापन करीत होत्या. आम्ही प्रवेशकरताच मॅडम त्वरित वर्गाबाहेर आल्या. आम्ही त्यांना
सांगितले, ताई आज आपण मूल्यवर्धन कार्यक्रमातील काही कृतीयुक्त उपक्रम घेऊ.
ताईंनी त्वरित विद्यार्थ्यांना मैदानावर गटाने उभे करून त्यांच्या जोड्या तयार केल्या. एकेका जोडीला प्रश्न दिला गेला. विचारलेला प्रश्न सर्व जोड्यांना समजला. विद्यार्थ्यांना प्रश्नावर विचार करण्यास वाव दिला. मग प्रत्येकाने आपले विचार जोडीदारास सांगितले. त्यात आम्ही स्वत: फिरत होतो. सर्व जोड्यांची चर्चा पूर्ण झाल्यावर झालेली चर्चा वर्गासमोर सादर केली.
हे सर्व दृश्य पाहतांना मनाला खूपच प्रसन्न वाटत होते. पण एक आश्चर्याचा धक्काच बसला की, आज खरे तर मनिषा मॅडम ह्या आजारी होत्या. पण त्यांनी आम्हाला समजू दिले नाही. हेच उत्तम शिक्षकाचे खरे सूत्र. संघटित झाल्याने कोणते मूल्य, संस्कार अंगी बाणले जातात याचेच उत्तम हे उदाहरण होय. त्यानंतर आम्ही मॅडमचेही कौतुक केले आणि सर्व मुलांना शाबासकी दिली.
-सुरेश भास्कर पाठक.
गटागटाने एकत्रित पद्धतीने संघटित होऊन मूल्य जोपासणे
-सुरेश भास्कर पाठक.
शिस्तप्रिय, संस्कारक्षम व निर्णयक्षम विद्यार्थी बनण्यास उपयुक्त मूल्यवर्धन
माझ्या चौथीच्या वर्गात मागीलवर्षी मूल्यवर्धन उपक्रम मी राबवला. त्यानंतर अतिशय सकारात्मक बदल विद्यार्थ्यांमध्ये झालेले मला दिसले.
मूल्यवर्धन उपक्रमातील पहिल्या घटकापासून खऱ्या अर्थाने विद्यार्थीबदल मला दिसला. वर्गनियम त्यांनीच बनवले होते. तसे वागायला लागले. उदा.
1) सर्वांनी बूट बाहेरच काढावेत, अभ्यास नियमित पूर्ण करावा, वर्गअध्यापनात शांतता राखावी ही शिस्त त्यांच्यात रूजली.
2) काही मुले घरी मोठ्या व्यक्तिंना उलट बोलायची. या उपक्रमातील कृतींनंतर त्या मुलांमध्ये बदल झाले. ते उध्दटपणे बोलणारे आदराने बोलू लागले, अशा प्रतिक्रिया त्यांच्या घरातून आल्या.
3) त्यांच्यात निर्णयक्षमता आली. आमच्या वर्गातील बंद घडयाळ सुरू करण्यासाठी त्यांनी परस्पर चर्चा करून, पैसे जमवून सेल आणला व घडयाळ सुरु केले. मला खूप आनंद झाला. मूल्यवर्धन या कार्यक्रमापासून सर्व मुले प्रत्येक कृतीत, स्पर्धेत भाग घेतात, वाचनाची आवड वाढली. असे सकारात्मक बदल निश्चित दिसतील, अशी मला खात्री वाटते. यावर्षी पाचवीसाठी पुस्तके आल्याने मी व माझी मुले खूप आनंदी आहोत. हा उपक्रम आमच्यापर्यंत पोहचविल्याबद्दल मी मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र शासन यांची खूपखूप आभार.
-मनिषा पाटील
शिस्तप्रिय, संस्कारक्षम व निर्णयक्षम विद्यार्थी बनण्यास उपयुक्त मूल्यवर्धन
-मनिषा पाटील
मूल्यवर्धन उपक्रम हा जिवनातील अविभाज्य घटक
मूल्यशिक्षणासोबत मुलांमध्ये प्रात्यक्षिक तसेच आठही मूल्यांची क्षमता व कृतीशीलता उतरविणे.
एकदा मूल्यशिक्षण प्रशिक्षणाच्या प्रथम टप्प्यानंतर जि. प. उच्च प्रा.शाळा मठगव्हाण शाळेत भेट देण्यासाठी गेलो. इयत्ता तिसरीच्या वर्गात प्रवेश केला. अगदी मनाला हर्ष झाला, कारण विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त अभिवादन केले. श्रीमती मनिषा मॅडम यांना सांगितले की, आपण मूल्यवर्धन कार्यक्रमातील सहयोगी अध्ययन उपक्रम (अध्ययन पध्दती) घेऊया. मॅडमने एका क्षणाचाही विचार न करता मुलांना मैदानावर एकत्र आणून जोड्या तयार केल्या. प्रत्येक जोडीसाठी एकेक प्रश्न दिला. सर्व जोड्यांना दिलेले प्रश्न समजले. प्रश्नांवर चर्चा सुरू झाली. विद्यार्थी रममाण झाले. Think-Write-pair-Share नुसार चर्चा सुरू झाली. पण नंतर इतर शिक्षकवृन्दांमार्फत समजले, की श्रीमती मनिषा मॅडम या आजारी आहेत. फारच आश्चर्य वाटले की, अशा परिस्थितीत त्यांनी सदर अध्ययन पध्दतीद्वारे मुलांना फारच बोलके, उत्साही, तयार केले. नंतर मनाला फारच समाधान झाले.
-सुरेश पाठक
मूल्यवर्धन उपक्रम हा जिवनातील अविभाज्य घटक
-सुरेश पाठक
भाषा व शारीरिक शिक्षण
मूल्यवर्धनद्वारे मुलांना लोकशाही प्रक्रियेतील हक्क व कर्तव्य प्रात्यक्षिक पद्धतीने समजावून दिले.
विद्यार्थी या प्रक्रियेत आनंदाने सहभागी होतात. प्रात्यक्षिकातून अध्ययनाचा खरा आनंद घेतात.
-रवींद्र चिंतामण लाळगे (केंद्रप्रमुख आडगांव)
भाषा व शारीरिक शिक्षण
-रवींद्र चिंतामण लाळगे (केंद्रप्रमुख आडगांव)
मुलांच्या अंगी मूल्य रुजवणे अधिक सोयीस्कर झाले
मूल्यवर्धन या प्रशिक्षणामुळे दैनंदिन अध्ययन-अध्यापन प्रक्रियेद्वारे मुलांच्या अंगी मूल्य रुजवणे अधिक सोयीस्कर झाले असून, सदर प्रशिक्षणाचा माझ्या प्राथमिक शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मला खूपच फायदा झाला आहे. सरळ, साध्या व सोप्या प्रसंगातून मूल्यांची रुजवण करताना मुलांना व शिक्षकांनाही एक वेगळा असा अनुभव येतो.
-भूषण दगडू पाटील
मुलांच्या अंगी मूल्य रुजवणे अधिक सोयीस्कर झाले
-भूषण दगडू पाटील
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन हा एक चांगला संस्कारक्षम विषय आहे. भावी पिढी सुसंस्कारमय करून आपले राष्ट्र प्रगत करणे हाच याचा आशय आहे. पणती जपून ठेवा, अंधार फार झाला. पणती म्हणजे मूल्यवर्धनच्या माध्यमातून समाजात प्रकाश पसरवायचा आहे.
आजच्या युगात मूल्यवर्धन ही संकल्पना शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी प्रत्यक्षात आणली, हे म्हणजे अंधारात उजेडासाठी पणती जपणेच आहे. एक उत्तम संस्कारक्षम राष्ट्र घडविण्यासाठी मूल्यवर्धनची खूप गरज आहे. कारण, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकेल. मी जेव्हा मूल्यवर्धन ही संकल्पना समजून घेतली व ती प्रत्यक्षात माझ्या शाळेत, वर्गात राबवली तेव्हा मला माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांमधे खूप बदल जाणवला. माझे विद्यार्थी मूल्यवर्धनातील सर्वच उपक्रम, खेळ, सहयोगी अध्ययन पध्दती यात अतिशय उत्साहाने भाग घेतात. काही घरी राहणारे विद्यार्थी मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे शाळेत रोज उपस्थित राहू लागले. विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल झाला. मॅडम, आजपण आपण विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेतील उपक्रम घेऊ. चित्र रंगवूया का? मॅडम, घ्याल ना.. असे मोठ्या आनंदाने म्हणतात. विशेष म्हणजे माझे खोडकर विद्यार्थी वर्गनियमांचे पालन करायाला लागले आहेत. तसेच सकारात्मक शिक्षाही घेण्यास नम्र होऊ लागले आहेत. चप्पल रांगेत काढणे, शाळेत वेळेवर येणे, सर्वांशी नम्रतेने वागणे, चोरी न करणे, स्वावलंबन असे अनेक गुण माझ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आले ते मूल्यवर्धनमुळेच.
मी दोन – तीन तालुक्यांना एक प्रेरक म्हणून माझ्या शिक्षक बांधवांना मूल्यवर्धनचे मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष कृतीतून उपक्रम करून घेतले. त्यावेळी मला मनातून असे जाणवले की, जणू काही मी नामवंत शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचीच एक कर्मचारी आहे. माझ्या जीवनाला एक नवी दिशा, एक आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन मिळून चांगली कलाटणी मिळाली आहे. आम्हांला ज्यांनी मूल्यवर्धनची संकल्पना स्पष्ट केली, ते तर सदगुरुसमान आहेत. त्यांनी आम्हांला भरभरून ज्ञान दिले. एक संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सक्षम केले. माझ्या वर्गातील एक विद्यार्थी नेहमी मुलांच्या वस्तूंची चोरी करायचा. मी मूल्यवर्धनमधील विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेचा आधार घेऊन, चोरी केल्याने कसे आपले नाव खराब होते व नुकसान होते याची जाणीव करून दिली. त्या विद्यार्थ्यांमध्ये लक्षणीय बदल झाला. आजच्या समाजातील अपप्रवृत्तींचे चित्र केवळ विद्यार्थीच बदलवू शकतील, ते मूल्यवर्धनच्या माध्यमातून. म्हणून आज मूल्यवर्धन या विषयाला अभ्यासक्रमात पाच अतिरिक्त गुण देण्यात यावेत, असे मला वाटते. या अनुषंगाने तरी शिक्षक व विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन या संवेदनशील विषयाचे मूल्य जपता येईल. शेवटी मी म्हणेन,
सर्व मूल्ये रुजवूनी मल्यवर्धनचे,
खेळ उपक्रम घेवूया
संस्कार मूल्यांची जोड देवूनी
भावी पिढी घडवुया
-सौ. मोनिका विजय चौधरी (जि.प. प्रा. विद्यामंदिर, वडली., ता. जि. जळगाव)
मी आणि मूल्यवर्धन
-सौ. मोनिका विजय चौधरी (जि.प. प्रा. विद्यामंदिर, वडली., ता. जि. जळगाव)
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झालेले शिक्षकांमधील बदल
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, मूल्य रूजावीत यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनासुद्धा होत आहे.अध्यापन अधिक सोपे व मनोरंजक होण्यासाठी व विद्यार्थ्यांना विचारप्रवर्तक बनवण्यासाठी शिक्षकांना मूल्यवर्धन कार्यक्रम उपयोग होत आहे.
अध्ययन-अध्यापन अधिक दर्जेदार व्हावे यासाठी शिक्षक एकमेकांशी हितगुज करीत आहेत. दैनंदिन जीवनातील सोपे घटक असल्याने शिक्षकांना अध्ययन अध्यापन प्रकिया सोपी करता येते. यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे आभारी आहोत.
-भारत काशिनाथ सूर्यवंशी
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झालेले शिक्षकांमधील बदल
-भारत काशिनाथ सूर्यवंशी
मूल्यवर्धन : स्तुत्य कार्यक्रम
मूल्यवर्धन हा स्तुत्य कार्यक्रम आहे. भावी आदर्श नागरिक घडविण्यात याचा खूप खूप उपयोग होईल.
मूल्यवर्धन उपक्रम राबविल्यामुळे माझे विद्यार्थी हे शांत व संयमी, समंजस झाले आहेत. पूर्वी शाळेतील साफसफाई करण्यात दुर्लक्ष करीत असत, पण आता या उपक्रमांतर्गत असलेल्या खेळ, गाणी, गोष्टी यांच्या माध्यमातून सकारात्मक बदल होऊन स्वत: उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. स्वच्छ व नीटनेटके राहात आहेत, याचा मला खूप आनंद होत आहे. तसेच अनेक मूल्यांची पाठ्यपुस्तकातील धडे व कविता यांच्याशी सांगड घालून मी मूल्य रूजवण्याचा प्रयत्न करीत आहे.
पहिलीच्या विद्यार्थ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असून त्यात वाढ निश्चित होईल, या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत आहे. यासाठीच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे मनापासून आभारी आहे. एक नम्र विनंती करते की हा मूल्यवर्धन कार्यक्रम SCERT च्या अंतर्गत हा विषय शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावा, जेणेकरून आदर्श भावी नागरिक निर्माण होऊन सुखी, संपन्न समाज व देश निर्माण होईल.
-अलका आनंद पाटील
मूल्यवर्धन : स्तुत्य कार्यक्रम
-अलका आनंद पाटील
मूल्यवर्धन उपक्रमाचे फायदे
मूल्यवर्धन उपक्रमाचे फायदे
मूल्यवर्धन उपक्रम शाळेत घेतल्याने विद्यार्थ्यांना नवनवीन अनुभव घेता आले. तसेच खूप आनंदाने आणि उत्साहाने त्यांनी उपक्रम पूर्ण केले. पुस्तिकेतील सर्व आशय प्रात्यक्षिक आधारीत असल्याने उपयोगी आहेत.
-पूनम देविदास सोनवणे
मूल्यवर्धन उपक्रमाचे फायदे
-पूनम देविदास सोनवणे
मूल्यवर्धन ही छान संकल्पना
मूल्यवर्धन माझे अनुभव
मूल्यवर्धन ही खरंच खूप छान संकल्पना आहे. काळाची गरज आहे. आपल्या उपक्रमातून सहज, सोप्या पद्धतीने मूल्यशिक्षण देणे शक्य आहे.
-भगवान एकनाथ पाटील
मूल्यवर्धन ही छान संकल्पना
-भगवान एकनाथ पाटील
मी आणि मूल्यवर्धन
आमच्या अमळनेर तालुक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी मागील वर्षी सन 2018 -19 या शैक्षणिक वर्षांपासून सुरूवात झाली. एका वर्षात मूल्यवर्धनचे विविध उपक्रम घेतले. त्यातून विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक व इष्ट बदल घडून आले. त्याचा फायदा या देशाचे सुसंस्कृत भावी नागरिक घडण्यासाठी नक्कीच उपयोग होईल. हा उपक्रम माझ्या शाळेत, वर्गात राबवताना मला जे चांगलेच अनुभव आले, ते या ठिकाणी सांगणार आहे.
मूल्यवर्धन प्रशिक्षण घेण्याआधी असे वाटायचे की, एवढे चार दिवसांच्या (प्रेरक म्हणून प्रशिक्षण) प्रशिक्षणात काय शिकवले जाणार ? आपण तर विविध विषयांतील पाठांतून मुलांना मूल्ये शिकवत असतोच ! पण एकेक दिवस प्रशिक्षण पुढे जात असताना विद्यार्थ्यांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही घटनात्मक मूल्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजविण्यासाठी अनेकविध उपक्रम, खेळ, घटना, यांचा अंतर्भाव मोठ्या कल्पकतेने केलेला दिसून आला. म्हणून प्रशिक्षणाचे चार दिवस कुठे भुर्रकन निघून गेले ते कळलेसुद्धा नाही.
प्रशिक्षण घेत असताना आतापर्यंत आपले पाल्य व विद्यार्थ्यांबाबत कशा चुका झाल्या ते लक्षात आले, म्हणून हे ट्रेनिंग स्वतःच्या खाजगी जीवनासाठीही उपयोगी आहे, हे क्षणात कळून चुकले. तसेच भारत देशाचे आदर्श व सुसंस्कृत भावी नागरिक घडण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाची नक्कीच मदत होईल.
माझ्या वर्गातील एक अतिशय गंभीर व विचार करण्यासारखा अनुभव या ठिकाणी मी आपल्याला सांगणार आहे. सध्याच्या पिढीतील मुलांना प्रत्येक गोष्ट सहज मिळाल्यामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे, मुले चिडचिडी झालेली आहेत.
माझ्या वर्गातील चेतन नावाचा मुलगा केवळ त्याचे वर्गातील मुलाशी मध्यान्ह भोजन सुट्टीत किरकोळ भांडण झाले, म्हणून तो शेतातील विहिरीत जीवच द्यायला निघाला. ते आम्हा शिक्षकांना माहीत पडल्यावर तात्काळ आम्ही त्याला विहिरीजवळून पकडून आणले. त्याला प्रेमाने विचारपूस केली आणि त्याला समजावून सांगितले की, एवढा राग येणे बरे नव्हे. पण तरीसुद्धा त्याच्या रागावर नियंत्रण राहत नव्हते. पुढे योगायोगायने मूल्यवर्धन उपक्रम आमच्या शाळेत सुरू झाला. उपक्रम पुस्तिकेत एका गोष्टीवर उपक्रम होता की, राजाची अंगठी हरवते. पण राजाला वाटते माझी अंगठी कोणी तरी चोरांनी चोरून नेली. त्याला वाटते सुरक्षा रक्षकांनी व्यवस्थित लक्ष दिले नाही म्हणून चोरी झाली. राजाचे रागावर नियंत्रण न राहिल्यामुळे तो सुरक्षारक्षकावर रागावतो. त्याला कामावरून काढून टाकतो. अंघोळ करताना स्नानगृहात काढून ठेवलेली अंगठी सापडल्यावर राजालाच स्वतःची लाज वाटते. पुढे राजा रागावर नियंत्रण करेन, असे राणीला आश्वासन देतो. हा गोष्टीरुप उपक्रम घेतला. त्यानंतर चेतनचे मुलांशी भांडण झाले, तरी मुलांचा किंवा शिक्षकांचा, आई, वडिलांचा राग आला तरी, सुरुवातीला एकदम तीव्र प्रतिक्रिया देणारा चेतन स्वतःच्या रागावर नियंत्रण करायला लागला.
आम्ही विद्यार्थ्यांकडून काही वर्गनियम तयार केले आहेत. त्यात एक नियम आहे की चपला, बुट वर्गाबाहेर व रांगेत काढणे. जर मी (शिक्षक) किंवा मुले जर चुकून चप्पल घालून वर्गात आलो तर सर्व मुले “… ने नियम मोडला , … ने नियम मोडला’ असे म्हणतात व गाणे म्हणणे, गोष्ट सांगणे किंवा इतर सकारात्मक शिक्षा होते. सर्व मुलांना अगदी रांगेत चप्पल काढायची सवय लागली. खरं प्रामाणिकपणे सांगायचे म्हटले, तर नियम सर्वात जास्तवेळा मी मोडतो. कारण लहानपणापासून सवय नाही. पण मुले मात्र चुकतच नाहीत. शांतता संकेत, वर्गातील नियम यांमुळे वर्गात नेहमी मस्ती करणारी मुले आपल्या शिक्षकांना त्रास होईल किंवा आपला अभ्यास होणार नाही, म्हणून शांत बसायला लागली. मूल्यवर्धन उपक्रमात अनेक उपक्रम, कृती, खेळ ,गाणी, सहयोगी खेळ, गोष्टी, चित्र काढणे इ. मुलांना आवडणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळे मुले ‘सर, मूल्यवर्धन तास घ्या ना!’ असे आवर्जून सांगतात. अशाप्रकारे एकंदरीत मूल्यवर्धन उपक्रमाने माझ्या शाळेतील मुलांमध्ये अनेक सकारात्मक व विधायक बदल घडायला लागले. शालेय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी व आजची बालके ही उद्याचे भावी नागरिक म्हणून या उपक्रमाने सुसंस्कारित होण्यास नक्कीच मदत होईल.
-ज्ञानेश्वर बापू मोरे
मी आणि मूल्यवर्धन
-ज्ञानेश्वर बापू मोरे
मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण झाली
माझ्या शाळेतील उपक्रम.
मी आणि मूल्यवर्धन तासिकेमुळे मुलांना शाळेची आवड निर्माण झाली. तसेच खरे बोलणे, मोठयांचा आदर, सभाधीटपणा, नम्रता इ. मूल्ये रुजण्यास मदत झाली.
-सोनाली रावसाहेब पाटील
मुलांमध्ये शाळेची आवड निर्माण झाली
-सोनाली रावसाहेब पाटील
मी आणि मूल्यवर्धन
विद्यार्थ्यांना शिस्त लागली. स्वयंअध्ययन करण्याची चांगली सवय लागली.
विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कविता गाणी कृतीयुक्त म्हणतात.
-कल्पना अनिल चव्हाण
मी आणि मूल्यवर्धन
-कल्पना अनिल चव्हाण
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन कार्यक्रम खूप छान आहे.
विद्यार्थ्यांना सवयी चांगल्या लागल्यात.
-अनिता मुरलीधर पाटील
मी आणि मूल्यवर्धन
-अनिता मुरलीधर पाटील
मूल्यवर्धन
चांगल्या सवयी मुलांमध्ये रुजविण्यासाठी पुस्कामधील चित्रांतील प्रसंगानुसार बदल कसा होतो व त्याचा फायदा आपल्याला कसा होतो हे विद्यार्थ्यांच्या राहणीमानानुसार व वागण्यानुसार कळतो.
मूल्यवर्धन पुस्तकातील सर्वच घटक अतिशय सुंदरतेने घेतलेले आहेत. त्यात नाविन्यता आहे. त्यामुले विद्यार्थ्यांच्या वागण्यात बोलण्यात फरक जाणवत आहे. मूल्य रुजविण्यात मदत होत आहे.
-मुरलीधर वामन साळुंखे
मूल्यवर्धन
-मुरलीधर वामन साळुंखे
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन.
मुले मूल्यवर्धनच्या माध्यमातून आत्मविश्वास वाढवतात. गट म्हणून वाचन केल्याने त्यांच्या गटातील उपक्रमांमध्ये बोलण्याची क्षमता वाढते. आत्मविश्वास वाढल्याने आत्मज्ञान वाढते. शिकण्याची आणि शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये स्वारस्य निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि अध्यापन प्रक्रियेस वेग आला.
-खान खुर्शीद अहमद
मी आणि मूल्यवर्धन
-खान खुर्शीद अहमद
शांतता संकेत
मूल्यवर्धन कार्यक्रमातील शांतता संकेत खूपच उपयुक्त आहे.
आमची शाळा ग्रामीण भागातील असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना शिस्त लावणे अवघड कार्य होते. परंतु मूल्यवर्धन कार्यक्रमातील शांतता संकेतामुळे जास्त मेहनत न घेता विद्यार्थी अतिशय शांत होऊन आमच्या सूचनांकडे लक्ष देऊन ऐकू लागले.
-नितीन सुभाषराव पवार
शांतता संकेत
-नितीन सुभाषराव पवार
मी आणि मूल्यवर्धन
विद्यार्थांना समाजात कसे वागावे याचे चांगले ज्ञान मिळत आहे..
मूल्यवर्धन उपक्रम घेताना खूप मजा येते. यातून विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्यांची जाणीव होण्यास मदत होत आहे. पुस्तकातले विविध प्रसंग विद्यार्थ्यांना जीवनात उपयोग पडणारे आहेत.
-संदिप हुकूमचंद पाटील
मी आणि मूल्यवर्धन
-संदिप हुकूमचंद पाटील
मूल्यवर्धन और मेरा अनुभव
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन की तरफ से चलाया जाने वाला मूल्यवर्धन ये एक बहोत अच्छा प्रोग्राम है. जब से ये प्रोग्राम हमारी स्कूल मे हम ले रहे है तब से विद्यार्थीयो मे बहुत से बदलाव हो रहे है.
जैसे, खेल खेल मे कुच्छ सिखना, स्वच्छता मे रुची, एक दुसरे से कुछ अच्छा करने की कोशीश, हम भारतीय होने के नाते हमारे देश के तहत हमारी जिम्मेदारी ऐसे बहोत से बदलाव लाने में ये प्रोग्राम बहोत अच्छा है.
मूल्यवर्धन में जो भी उपक्रम किये जाते है, बच्चे उसे शोक और दिलचस्पी से करते है. आप ने मेरे अनुभव साजा करने को कहा, मै मूल्यवर्धन का आभारी हू.
-सगीर शाह शब्बीर शाह
मूल्यवर्धन और मेरा अनुभव
-सगीर शाह शब्बीर शाह