जेथे कर माझे जुळती
मानवी जीवनातील अरिष्ट टाळावयाचे असेल तर, मानवाच्या कल्याणासाठी आजवर निर्माण व विकसित झालेल्या मानवी मूल्यांचा सर्व समाजामध्ये आणि व्यक्ती-व्यक्तीमध्ये परिपोष होण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून मूल्य रुजवणे काळाची गरज आहे. आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याचे क्रांतिकारी कार्य करणाऱ्या या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे कार्य अतुलनीय आहे. शिक्षणातून अपेक्षित व्यक्तिमत्त्व विकासाबरोबर, चारित्र्यवान विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे व त्यामुळे प्राप्त परिस्थितीत विद्यार्थ्यांना मूल्यर्वधन उपक्रम जाणीवपूर्वक देणे आवश्यक आहे. त्यातून मूल्य रुजवणूक अनौपचारिक वातावरणात विद्यार्थ्यांना विविध कृतिशील उपक्रम आयोजित करून देता येईल.
मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमांची व्यवस्थित आखणी करून बालकांमध्ये अगदी बालवयातच मूल्य रुजविणे म्हणजे एक संस्कारक्षम, नितीमूल्य जोपासणारी, स्वविषयक, समाजविषयक, राष्ट्रविषयक आणि वर्तमान संस्कृतीविषयक जाणीव असलेली पिढी निर्माण करणे होय. समाजामध्ये भावाभावांचे वैमनस्य, जातियवादाची तेढ, आई, वडील यांचा अनादर वाढत चाललेला असल्यामुळे बालकांत मूल्यवर्धन करणे काळाची गरज आहे.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन स्वत: पुढाकार घेऊन मूल्यर्वधन हा अतिशय चांगला कार्यक्रम बालकांसाठी राबवित असल्यामुळे अगदी बालवयातच बालके संस्कारक्षम घडत आहेत. हे स्वतः विविध शाळांना भेटी देताना मी अनुभवले आहे. बालवय हे अतिशय संस्कारक्षम असते. या वयात जे संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवले जातील, ते संस्कार विद्यार्थी आयुष्यभर विसरणार नाहीत.
एक केंद्रप्रमुख म्हणून मला अनेक शाळांमध्ये जावे लागते. वर्गात भेटी द्याव्या लागतात. मी मागील सत्रात मार्च २०१९ ला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथ शाळा परसोडी येथे इयत्ता तिसऱ्या वर्गाला भेट दिली. वर्गात गेल्यानंतर वर्गातील सर्व मुले/मुली मला अभिवादन करण्यासाठी उभी राहिली व ‘गुड आफ्टरनून’ म्हणाली’ मी पण विद्यार्थ्यांना ‘गुड आफ्टरनून प्लीज सिट डाऊन’ असे म्हणालो. एक – दोन मिनिटे झाली, पण विद्यार्थी उभेच. मी पुन्हा हातांनी इशारा करुन ‘सिट डाउन’ म्हटले. तेव्हा वर्गनायक मला म्हणाला, सर आमच्या सरांच्या सुचनेनुसार विद्यार्थ्यांनी वर्गात कसे रहायचे, इतरांसोबत कसे वागायचे याचे काही नियम तयार करुन वर्गात लावलेली आहेत. ते आपण कृपया वाचावे. मी आनंदाने ते वर्गात लावलेले नियम वाचायला सुरुवात केली. पहिलाच नियम लिहिलेला होता, अधिकारी, शिक्षक व विद्यार्थी यांनी चप्पल, बूट वर्गाबाहेर काढूनच वर्गात प्रवेश करावा. माझी चूक माझ्या लक्षात आली. मी वर्गाबाहेर आलो. वर्गाबाहेर विद्यार्थ्यांच्या चप्पल, बूट एका रांगेत व्यवस्थित ठेवलेले मला दिसले. मी पण माझी पायातील चप्पल काढली. व्यवस्थित रांगेत ठेवून वर्गात पुन्हा प्रवेश केला. विद्यार्थ्यांनी मला ‘Thank You Sir’ म्हटलं व शांतपणे खाली बसले.
हे सर्व इयत्ता तिसऱ्या वर्गातील मुले, वयानं सात-आठ वर्षांची, पण मूल्यर्वधन शिक्षणामुळे, त्यांच्यातील एकोपा, सामंजस्य, सभाधिटपणा पाहून मूल्यवर्धनमुळे मुले सुसंस्कृत, सुस्वभावी होतात, याची जाणीव मला झाली. म्हणूनच मला म्हणावंस वाटते की, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेने मूल्यवर्धनचे बीज विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात लावलेले आहे. त्याचा अल्पावधीत वटवृक्ष होणार व आपली भावी पिढी उपक्रमशील, नितीमूल्य जोपासणारी, शांतीप्रिय, समाजशील, चारित्र्यवान होणार. हे सर्व घडवून आणणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनला माझा सलाम.
-घनश्याम कापगते
जेथे कर माझे जुळती
-घनश्याम कापगते
मूल्यवर्धन उपक्रम और बच्चो का विकास
हम जानते है कि, मानव को जीने के लिए संस्कार का होना जरूरी हैं। इसलिए मुथ्था फाउंडेशन की यह एक अच्छी पहल है ।
मनुष्य के जीवन में अनेक समस्याएं है। मनुष्य समाज में रहता हैं, एक समाजशील प्राणी है। समाज में समस्याओं का समाधान ढूंढने का हर व्यक्ति प्रयास कर रहा है। समाधान पाने के लिए व्यक्ति विविध प्रकार के उपाय करता हैं, किन्तु असफलसा नजर आता दिखाई देता हैं। मनुष्य जीवन में आंनेवाली हर मुश्किलों का सामना व्यक्ति स्वयं के साथ-साथ उनका परिवार भी करता है, इनमें उनके बच्चे भी सम्मिलित होते हैं ।
मनुष्य समाज में विचरण करते समय आजु-बाजु के वातावरण का उनके साथ -साथ उनके बच्चों पर भी प्रभाव पड़ता हैं। वातावरण के अच्छे -बुरे प्रभाव से उनके बर्ताव परभी असर पड़ते जाता हैं, खासकर बच्चों के दैनंदिन व्यवहार में बदलाव दिखाई देने लगता है। इसी बदलाव के कारण उन्हें अच्छे एवं कुशल तथा सन्मार्ग पर चलने के लिए प्रेरित करना अति आवश्यक हैं। इसलिए मुथ्था फाउंडेशन की ओर से चलाए जानेवाले मूल्यवर्धन उपक्रम अंतर्गत पाठशालाओके माध्यम से उन्हें मूल्यवर्धित करने के प्रयास है। उन प्रयासो के माध्यम से अनेक प्रकार की गतिविधियां का आधार लेकर हमें वर्तनबदल कर सकते है।
बालको के स्कूली शिक्षा के साथ साथ सामाजिक बंधुता, सहानुभूति एवं अन्य सामाजिक बातों का ज्ञान होना अनिवार्य है। बच्चों के भावी जीवन के लिए मूल्यवर्धन के माध्यम से उन्हें प्रेरणा मिले, उनमें नया जीवन जीने के लिए प्रेरक हो । मूल्यवर्धन के माध्यम से समाज में एक नवीनतम छबि निर्माण हो सके ताकी नवीनतम भारत निर्माण में सहायक हो। आजकल हम देखते है कि बालकों में जो व्यक्ति हित, समाज हित में नही है, उन बातों का असर जल्द होते दिखाई देता है। दिनबदिन बालकों की आदतें तथा रहन सहन बदलते जा रही है, इनमेंसे प्रमुख कारण यह है कि भौतिक चीजों का बहुत ज्यादा प्रमाण में उपयोग किया जाना। तथा उन का इस्तेमाल बहुतही तेजीसे हावी होता जा रहा है। आज दुनिया विज्ञान के कारण इतनी करीब आ गयी कि मानवमूल्यों को समझना बालकों के लिए मुश्किलसा होते दिखाई देने लगा है।उदाहरण के तौरपर लिया जाय तो मोबाईल फोन का उपयोग, आज मॉ भी अपने बच्चे को सुलाने के लिए मोबाईल का वापर करते दिखाई देती है, यह बात लिखा पढा इंसान भी समझता है किन्तु प्रत्यक्ष कृति में नहीं है। मोबाईल के वापर से दुनिया तो नजदीक आ गयी किन्तु आपसी संवाद कम हो गया है। बच्चों की आदते भी मोबाईल के कारण बिगड़ते नजर आ रही है। बच्चों का कौटुंबिक वार्तालाप सुझबुझ आदि की कमी दिखाई देने लगी हैं। आधुनिकता का उपयोग होनाही चाहिए लेकिन मानवमूल्य के साथ , , , , , , , । बालको में मानवमूल्य को बीजारोपण करने का कार्य विविध उपक्रम द्वारा मूल्यवर्धन के माध्यम से यह सुनहरा मौका हमारे पास है। और इस कार्य को पूर्ण करने के लिए मूल्यवर्धन के उपक्रम हमारे साथ है।
इस उपक्रम से निश्चित ही वर्तनबदल होगा, एवम बालक अपना जीवन समाज उपयोग के लिए तथा स्वंय के लिए करेंगे। विज्ञान को मानवमूल्य से जोड़कर बालको का जीवन उज्वल एवं प्रकाशित बनाने के लिए हम प्रयासरत है, प्रयासरत रहेंगे यही मंगलकामना करते है।
-भीमराव बंसोड़
मूल्यवर्धन उपक्रम और बच्चो का विकास
-भीमराव बंसोड़
विद्यार्थ्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल
या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या आचरणात अनुकूल बदल करण्यासाठी मूल्यवर्धनची खूप मदत झाली. विद्यार्थ्यांच्या अंगी चांगल्या सवयी रूजविण्यास अतिशय उपयुक्त ठरत आहे.
विद्यार्थी आधी शाळेतील मोठ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावाने हाक मारत होते. ही गोष्ट आमच्या लक्षात आली, तेव्हा मूल्यवर्धंन उपक्रमाच्या मदतीने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले, काही दिवस अडचण आली, नंतर मात्र सकारात्मक परिणाम जाणवायला लागले.
लहान विद्यार्थी मोठ्या विद्यार्थ्यांना भाऊ, ताई म्हणू लागले आणि त्यांचा आदर करु लागले. परिसरातील मोठ्यांचासुध्दा आदर करतात. मूल्यवर्धन उपक्रमाद्वारे एकमेकांविषयी आदर निर्माण झाला. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागल्या. ते शिस्तीचे पालन स्वयंप्रेरणेने करतात. सगळे विद्यार्थी सोबत जेवण करतात, जेवताना शिस्त पाळतात. गोंधळ करत नाहीत. प्रत्येक विद्यार्थी आपल्या गणवेशाची निगा राखतो. रुमालाचा नियमित उपयोग करतात. मूल्यांची माहिती, महत्त्व घरात, समाजात सांगतात. कचराकुंडीचा वापर नियमित करण्याविषयी जागृती निर्माण करतात.
-वसंत शिंदे
विद्यार्थ्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल
-वसंत शिंदे
मूल्यवर्धन
मूल्यवर्धन हा उपक्रम शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी आयोजित केला आहे. हा उपक्रम मूल्यांवर आधारित आहे.
मूल्यवर्धन या विषयाची संकल्पना स्पष्ट करीत असताना मला लिहावेसे वाटते की, मूल्यवर्धन हा शांतिलाल मुथ्था यांनी आयोजित केलेला अभ्यासक्रम आहे. हा उपक्रम आनंददायी, बालककेंद्रित आहे. बालमनाला आकर्षित करणारा उपक्रम आहे. हा उपक्रम एकंदरीत 2005 चा राष्ट्रीय आराखडा, 2009 चा शिक्षण हक्क कायदा आणि 2012 चा प्राथमिक अभ्यासक्रम यावर आधारित आहे. या उपक्रमात संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या चार मुलभूत मूल्यांचा विचार केलेला आहे. विद्यार्थीकेंद्रित अभ्यासक्रमात आपण विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवून ती चिरकाल टिकतात, बालक मूल्ये अनौपचारिकरित्या शिकतात. सहजच ग्रहण करतात. या उपक्रमात गाणी, गोष्टी, कथा यांचा विचार करून आनंददायी पद्धतीने ती कशी शिकतील यांचा विचार केला गेला आहे. उपक्रमाची रचना मनोरंजक आहे. नियोजित अभ्यासक्रम हा गाणी, गोष्टी कथा, सहयोगी खेळ यावर आधारित आहे.
-मंदा राऊत
मूल्यवर्धन
-मंदा राऊत
मूल्यवर्धन का प्रभाव
मूल्यवर्धन बालको के सर्वांगीण विकास का महत्त्वपूर्ण भाग है ।
मूल्यवर्धन कार्यक्रम का उद्देश शालेय बालकों मे भारतीय संविधान के मूल्यों को आत्मसात करना है, जिससे अच्छे लोकतांत्रिक नागरिक बन सके । मूल्यवर्धन गतिविधि के पहले बालकों के व्यवहार में बहोत कमिया थी । वह इस कार्यक्रम के बाद बदल गई है, जैसे कक्षा में अपने सहपाठियों से मिलकर रहना, अभ्यास में, खेल में मदद करना । उसी प्रकार शालेय परिसर की सफाई गट बनाकर करना, गुरुजीयों का आदर करना गृहकार्य समय पर करना व जाँच करवाना । साथ ही साथ अपने परिवार, समाज, गाँव की जानकारी और वृक्ष संवर्धन बालक ठीक से करते है ।
-सियालाल उपर्डे
मूल्यवर्धन का प्रभाव
-सियालाल उपर्डे
एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ
मूल्याधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठी आजचा विद्यार्थी मूल्यवर्धित असणे आवश्यक आहे. त्यामुळे निर्माण होणारा समाज ज्ञानप्राप्त, कौशल्यप्राप्त, स्वावलंबी आणि सामाजिकदृष्ट्या सर्वसमावेशक असा होईल. त्यासाठी शिक्षण हे मूल्यपूरक करून व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीचे बीज म्हणजे शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा मूल्यवर्धन अभ्यासक्रम होय.
देशाचे जबाबदार नागरिक जर कुठे घडत असतील तर ते ठिकाण म्हणजे प्राथमिक शाळा होय. या ठिकाणी बालके अगदी स्वच्छ मनाने येतात. स्वच्छ मनावर जसे संस्कार केले तसे ते चिरकाल टिकून राहतात. या बाबी लक्षात घेऊनच शांतिलाल मुथ्था फाउंडेशन स्वतः पुढाकार घेऊन मूल्यवर्धन हा बहुमूल्य कार्यक्रम राबवित आहे.
जि. प. वरिष्ठ प्राथ. शाळा डोंगरगाव/ख. येथे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यात जोडीने, गटाने व सामूहिक या विविध प्रकारे उपक्रम घेतले जातात. त्यामुळे मुलांमध्ये आपसात आत्मियता वाढीस लागल्याचे लक्षात आले. त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त विकसित झाल्याचे जाणवत आहे. शिस्तीचा विचार केला तर त्यांनी स्वतःला शिस्तबद्ध ठेवण्याची जाणीव सर्वांना झाल्याचे दिसते. त्याचप्रमाणे शाळेत ज्ञान घेत असताना ते ज्ञान कौशल्यप्राप्तीसाठी तसेच जगणे समृद्ध करण्यासाठी व स्वावलंबी होण्यासाठी आहे; हे विद्यार्थ्यांच्या वागणुकीतून लक्षात येते.
इयत्ता सहावीचा एक विद्यार्थी क्रिश नंदकिशोर राणे हा दिव्यांग आहे. त्याला शासनामार्फत सायकल मिळाली आहे. शाळेतील मुले त्याच्याशी त्याच्या गतीने खेळतात व ये जा करतात. त्याची काळजी घेतात, त्याला हवं नको ते आनंदाने करतात.
एकदा त्याच्या सायकलचे चाक खराब झाले असता तो शाळेत कसा येणार, या विचाराने मुले त्याच्या घरी गेली. त्याचे दप्तर एकाने घेतले, दुसऱ्याने त्याला समोर होऊन माझ्या खांद्यावर हात ठेव म्हणाला. ज्याप्रमाणे तो सायकल पकडतो त्याप्रमाणे मुलाच्या खांद्यावर हात ठेवले व त्याला शाळेत घेऊन आले. हे बघून त्यांच्यातील बंधुता, एकात्मतेची भावना वाढीस आल्याचे जाणवले. हे सर्व गुण मूल्यसंवर्धन शिक्षणामुळे. त्यांच्यातील एकोपा सामंजस्य पाहून मूल्यवर्धनमुळे मुले सुसंस्कृत सुस्वभावी होतात याची जाणीव या प्रसंगामुळे मला झाली. म्हणूनच मला म्हणावसे वाटते की, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेने मूल्यवर्धनचे बीज विद्यार्थ्यांच्या अंतःकरणात पेरलेले आहे. त्याचा अल्पावधीतच वटवृक्ष होणार. हे सर्व घडवून आणणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनला माझा सलाम.
-रजनी मेश्राम
एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ
-रजनी मेश्राम
अच्छे और बुरे व्यवहार का ज्ञान
अच्छे और बुरे व्यवहार के बारे में चित्र देखकर माहिती बताना है.
ये लडकी महातरम का हात पकड के उसको रस्ता पार करने के लिए मदत कर रही है, इस में से ये स्पष्ट हो रहा की, मदत करना ये मूल्य दिख रहा है. आई घर में काम कर रही है, ये देखकर लडका आई को घर काम मे मदत कर रहा है. ये देखकर ऐसा लगता है कि, मदत ये मूल्य दिख रहा हैं. लडका गाय को चारा खिला रहा है. इस में से ऐसा अर्थ निकलता है कि, प्राणी मात्रों के बारे में प्रेम ये मूल्य दिख रहा है. इस चित्र में लडकी महातरम को खडे होने के लिए मदत कर रही है. इस में सहकार्य कि भावना ये मूल्य दिख रहा है. इस चित्र में लडके और लडकिया एक के पिछे एक रांग मे चल रहे है. इस से ऐसा स्पष्ट हो रहा है की शिस्त ये मूल्य दिख रहा है और स्त्री पुरुष समानता ये मूल्य दिख रहा है.
-प्रदीप दहिवळे
अच्छे और बुरे व्यवहार का ज्ञान
-प्रदीप दहिवळे
मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाची आमच्या शाळेद्वारे अंमलबजावणी करण्यात आली. त्याची फलश्रुती खालीलप्रमाणे.
आपण शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवून विद्यार्थी घडवित असतो. त्यातच भर म्हणून महाराष्ट्र शासनाने सन २०१७-१८ पासून शाळांमध्ये जो मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे ठरविले, त्याचे बरेच अनुकूल परिणाम शाळेमध्ये दिसून येत आहेत. तसे पाहिले तर आपण यापूर्वी सुद्धा शाळेमध्ये मूल्यवर्धन करीत आलो आहोत, परंतु मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी आता करण्यात येत आहे असे वाटते. परकीय संस्कृतीच्या भूलथापांना बळी पडल्यासारखा आज समाज बऱ्याच अडचणींचा सामना करीत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाद्वारे आपल्या भारतीय संस्कृतीला पुनरुज्जीवन मिळाले असे वाटते.
शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल लक्षात घेतले तेव्हा असे दिसले की, सतत गैरहजर राहणारे विद्यार्थी शाळेत नियमित यायला लागले आहेत. विद्यार्थ्यांना स्वच्छ राहण्याविषयीची जाणीव वाढीस लागली आहे. विविध कृतींद्वारे अभ्यास करण्यासाठी रुची निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना इतरांना मदत करण्याची सवय लागली. ’चला पुस्तके सांभाळू’ या उपक्रमाद्वारे विद्यार्थी पुस्तकांचे जतन करू लागली आहेत. ‘खेळांतून मूल्यवर्धन’ याद्वारे बंधुभाव, धर्मनिरपेक्षता इ. मूल्ये रुजविण्यास मदत होत आहे. मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे शालेय शिस्तीचे पालन करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागत आहे. लहान वर्गांतील विद्यार्थ्यांमधील भांडणे कमी होत आहेत. मुलांमध्ये इतरांशी चर्चा करण्याचा आत्मविश्वास वाढत आहे.
सन २०१८-१९ मध्ये पहिलीचे विद्यार्थी वर्गातून वारंवार बाहेर जायचे आणि आपल्या बहीण, भावंडांच्या वर्गात बसायचे, त्यांना स्वतःच्या वर्गात बसण्याची आवड मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे निर्माण झाली. इयत्ता चौथीमधील विद्यार्थी आत्मविश्वासाने परिपाठ सादर करू लागले. मुले स्वयंप्रेरणेने वर्गात स्वच्छता ठेऊ लागली. तिसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना वर्गातील वस्तू योग्य ठिकाणी ठेवण्याची सवय लागली. शिक्षक वर्गाबाहेर गेल्यास दुसरीचे विद्यार्थी वर्गात वाचन, अभ्यास करू लागले. विद्यार्थी खेळण्यामध्ये गुंतू लागले. चित्रकलेच्या माध्यमातून विविध संकल्पना समजू लागल्या आहेत. अशाप्रकारे मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्ये रुजविण्यास तसेच चांगला नागरिक घडविण्यास मदत होत आहे.
-चित्रलेखा ठाकरे
मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल
-चित्रलेखा ठाकरे
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये चांगली मूल्ये रुजायला हवीत. भविष्यात त्यांच्यामधून चांगले नागरिक तयार व्हावेत. याच उद्देशाने प्राथमिक शाळांमध्ये मूल्यवर्धनाचा कार्यक्रम मागील वर्षांपासून राबविण्यात आला.
मूल्यवर्धन कार्यक्रम वर्षभर राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये विविध बदल झाल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थी मोठ्यांचा आदर करू लागले. शाळेत नियमित व वेळेवर परिपाठापूर्वी हजर राहू लागले. शिस्तीचे पालन करु लागले. प्रार्थनेच्यावेळी रांगा करून शिस्तीत उभे राहू लागले. रांगेत आपल्या वर्गात जाऊ लागले. शालेय परिसराची स्वच्छता करू लागले. इतरांना मदत करू लागले.
विद्यार्थ्यांनी स्वतः नियम तयार केले आहेत व त्यानुसार त्या नियमांचे पालन करू लागले. नीटनेटक्या, स्वच्छ गणवेशात शाळेत येऊ लागले. चपला, बूट वर्गाबाहेर रांगेत ठेवू लागले. जेवण करतेवेळी शांत व शिस्तीत बसायला लागले. कचरा गोळा करताना ओला कचरा व सुका कचरा यातील फरक समजू लागले. नळ चालू असेल तर तो बंद करायला लागले. त्यांना पाणी बचतीचे महत्त्व कळाले. इतरांनाही मार्गदर्शन करु लागले. वर्गाच्या परिसरात झाडे लावून त्यांचे संगोपन व काळजी घेऊ लागले.
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडून आला. शिक्षक वर्गात नसताना मुले आपला अभ्यास करू लागली. स्पर्धेत भाग घेऊ लागली. उदाः चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समुहगायन स्पर्धा. मूल्यवर्धनच्या तासाला सहयोगी खेळ खेळू लागली. सहयोगी खेळामुळे त्यांना सहयोगाचे महत्त्व कळले. इतरांबरोबर खेळ खेळण्याचा आनंद मिळू लागला. आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. गटागटात वर्गात बसून अभ्यास करु लागली. गटचर्चा करू लागली. प्रामाणिकपणाची जाणीव झाली. चांगली सवय, वाईट सवय यातला फरक जाणू लागली. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल झाले. विद्यार्थी शांतता संकेत समजू लागले. उपक्रमामुळे भूमिका व अभिनय करू लागले. उपलब्ध साहित्याचा वापर करून विविध वस्तू बनवू लागले.
-निर्मला पटले
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
-निर्मला पटले
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शैक्षणिक वातावरणात झालेला आमुलाग्र बदल
शैक्षणिक क्षेत्रात माणूस कितीही पुढे जात असला, तरी आजच्या युगात केवळ शैक्षणिक ज्ञान असून चालत नाही. त्याबरोबरच व्यवहारिक ज्ञानाचीसुद्धा गरज आहे. आजची चिमुकली मुले ही उद्याची पिढी आहे. शैक्षणिक क्षेत्रात जरी आपल्याला प्रगती दिसत असली, तरी तरूण पिढी भरकटत चालली आहे. याकरिता शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सुरू केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शैक्षणिक वातावरणात खालीलप्रमाणे बदल दिसून येत आहेत.
माझी शाळा ही इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत आहे. या शाळेत एकूण 178 मुली शिक्षण घेत आहेत. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सुरू केलेला मूल्यवर्धन कार्यक्रम या पिढीला दिशा दाखविण्याचे कार्य करीत आहे. या कार्यक्रमामुळे शाळेतील मुलींमध्ये महत्त्वाचे अमुलाग्र बदल दिसून येत आहेत.
विद्यार्थिनी दररोज वेळेवर येऊन स्वतःच शाळेचे आवार स्वच्छ ठेवत आहेत. प्रत्येकाला वाटून दिलेल्या कामानुसार सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पाडत आहेत. त्यामुळे शाळेत वातावरण शांत व प्रसन्न राहते. त्याचबरोबर विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाणात वाढ झालेली आहे.
मूल्यवर्धन विषयाच्या अध्ययन-अध्यापनामुळे मुली प्रत्येक बाबींमध्ये स्वतःच्या इच्छेने, उत्साहाने सहभागी होऊ लागल्या आहेत. स्वतंत्रपणे विचार करायला लागल्या आहेत. इतरांशी आदरपूर्वक वागू लागल्या आहेत. दिलेली जबाबदारी मनापासून पार पाडत आहेत. त्यांना स्वतःची जबाबदारी समजू लागली आहे. नियमांचे पालन करायला लागल्या आहेत. स्वतः नियम तयार करीत आहेत व त्यांचे पालनसुद्धा करीत आहेत. त्यामुळे मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण राहत नाही.
वक्तशीरपणा, शिस्त, निटनेटकेपणा या गोष्टी विद्यार्थ्यांमध्ये चांगल्याच रूजलेल्या आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जवळीक निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील विविध गुण, त्यांच्या अंगी असलेली विविध कौशल्ये ओळखण्यासाठी सुद्धा मोठी मदत होत आहे. एकमेकांना असणाऱ्या समस्या आणि अडचणींचे निवारण होऊ लागले आहे.
सर्वजण एकमेकांना समजून घेऊन सहकार्य करीत आहेत. विद्यार्थी-शिक्षक आंतरक्रिया करताना कोणताही संकोच किंवा भिती न ठेवता मनमोकळेपणाने आंतरक्रिया घडून येत आहेत. विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामध्ये विचार विनिमय होऊ लागले आहेत. पालकसुद्धा आपले कर्तव्य जाणून घेऊन विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी सुसंवाद साधू लागले आहेत. मूल्यवर्धनातील अनेक बाबी अशा आहेत की नकळतपणे सर्व विषयात त्यांचा समावेश झालेला आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढला आहे. स्वतः चे विचार स्वतःच्या शब्दात मांडत आहेत. आपल्या मित्रमैत्रिणींना सहकार्य करीत आहेत. समाजात वावरताना आपली जबाबदारी समजून वागत आहेत. या सारखे अनेक अमुलाग्र बदल दिसून येत आहेत आणि यात सर्वात मोठा वाटा मूल्यवर्धनचा आहे असे माझे मत आहे.
-जयश्री शिरसाट
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शैक्षणिक वातावरणात झालेला आमुलाग्र बदल
-जयश्री शिरसाट
मी शिस्तप्रिय झालो
आमच्या शाळेत मूल्यवर्धन हा विषय नव्याने घेण्यात आलेला आहे. त्यामुळे माझ्या मध्ये बराच बदल झाला आहे.
मी माझा स्वतः चा अनुभव कथन करीत आहे. पूर्वी मी सकाळी 9 वाजेपर्यंत झोपून राहायचो. परंतु मूल्यवर्धन तासिकेत सरांनी सकाळी उठण्याचे फायदे सांगितल्यामुळे मी आता सकाळी 6 वाजता उठून सर्व क्रिया करून प्रथम व्यायाम करतो मग ध्यान करून दिवसाची सुरुवात करतो. त्यामुळे माझ्या वागण्यात खूप बदल झाला आहे. असे मला सर्वजण म्हणतात.
-रमेश माचाडे
मी शिस्तप्रिय झालो
-रमेश माचाडे
बदल माझ्या विद्यार्थ्यांमधील
विद्यार्थ्यांमधील मूल्यांचा हळूहळू ऱ्हास होत आहे. त्यांच्यात मूल्यांच्या रुजवणूकीसाठी मूल्यवर्धन हा उपक्रम खूपच उपयोगी ठरला.
विद्यार्थ्यांमध्ये चांगले गुण व कौशल्ये यावेत आणि शालेय विद्यार्थी भविष्यात उत्तम नागरिक बनावेत म्हणून विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मुल्ये रुजायला हवीत. मूल्यवर्धन या कार्यक्रमातून खूप छानपणे हा बदल विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य, न्याय या चार मूल्यांची ओळख करून देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, इतरांना मदत करणे, इतरांचा आदर करणे, यासारखा बदल घडून आला.
-चिंतामण ठाकुर
बदल माझ्या विद्यार्थ्यांमधील
-चिंतामण ठाकुर
मूल्यवर्धन काळाची गरज
पहिली ते चौथी या वर्गांसाठी मूल्यवर्धन खूप प्रभावी उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना भावी सुजाण व समृध्द नागरिक घडविण्यासाठी मोलाचे काम हे उपक्रम करतात. आडकुटोला शाळेत शिस्तप्रिय विद्यार्थी घडवण्यात मूल्यवर्धनचा मोलाचा वाटा आहे.
माझी शाळा ४ वर्गाची आहे. एकूण १८ विद्यार्थी आहेत. विद्यार्थी शिस्तप्रिय व अभ्यासू होण्यात मूल्यवर्धनचा सिंहाचा वाटा आहे. सहयोगी खेळातून आनंददायी शिक्षण घेतात. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व जलद प्रगत महाराष्ट्र या उपक्रमाची सांगड घातल्याने विद्यार्थी प्रगत होण्यास मदत झाली. विद्यार्थी स्वयंअध्ययन करायला लागले. २०१८ ला मी बदली होऊन आडकुट़ोला शाळेत आलो. मुलांना शिस्त नव्हती. मूल्यवर्धन वर्ग घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थी आनंदायी पध्दतीने शिकू लागले. प्रगत झाले. नियमाचे पालन, दररोजचा अभ्यास करणे, मोठ्यांचा आदर, भांडण न करणे, मदत करणे इत्यादी गुण त्यांच्यामध्ये वृद्धिंगत झाले.
-हरिराम येळणे
मूल्यवर्धन काळाची गरज
-हरिराम येळणे
मूल्यवर्धन
शाळेत मूल्यवर्धन अंमलबजावणी करताना आलेले अनुभव
शांतिलाल मुथ्या फाउंडेशनने मूल्यवर्धन हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला. सुरुवातीला जेव्हा आम्ही प्रशिक्षण घेण्यासाठी आलो, तेव्हा वाटलं ह्यात काय नवीन? हे तर आपण आपल्या शाळेत नैतिक मूल्याचा तासिकेला घेत असतो. पण जसंजसं प्रशिक्षण पुढे जात होतं, तसतसा प्रशिक्षणातील फरक लक्षात यायला लागला. मुलांच्या आवडीनुसार विविध उपक्रम आणि सहशालेय खेळाचे महत्त्व पटायला लागले.
प्रार्थनेसाठी जमलेल्या मुलांना ‘शांत बसा’ म्हणता म्हणता घसा बसायचा, तिथे केवळ शांतता संकेत वापरून सगळं वातावरण शांत करायला तोंडातून ब्र काढण्याची गरज नाही हे या उपक्रमातून समजले. मुलांची पेन्सिल, खोडरबर, पुस्तके अव्यवस्थित असायची. ती आता स्वच्छ राहायला लागली. ते स्वयंशिस्त, स्वावलंबन, मोठयांचा आदर करायला शिकले. आपल्यापासून सुरुवात करून नंतर कुटुंब, परिसर, देश, विश्व याविषयी नितीमूल्ये आत्मसात करणे ह्या सगळ्या गोष्टी मूल्यवर्धन उपक्रमातून मुलांच्या मनावर ठसवल्या गेल्या.
मोठया माणसांना आपल्या शेजारच्यांची नावे विचारली, तर सांगता येणार नाही. मात्र मूल्यवर्धनच्या उपक्रमांमुळे मुले आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्वांची नावे पटकन सांगू लागली. ज्यामुळे एकमेकांशी संपर्क साधून त्यांच्यात एक सौहार्दपूर्ण नाते निर्माण झाले. आवाज दिल्यानंतर सुध्दा न थांबणारी मुले आता शेजाऱ्या पाजाऱ्यांची छोटीछोटी कामे करु लागली. झालेला बदल लोकांच्या लक्षात यायला लागला. त्यामुळे पालक शिक्षकांकडे चौकशी करु लागले. शिक्षक-पालक संपर्क वाढायला सुध्दा मूल्यवर्धनची खूप मदत झाली. कालपर्यंत शाळेचे तोंड न पाहणारे विद्यार्थी आनंदाने शाळेत येऊ लागले व रमू लागले. इतर विद्यार्थ्यांसोबत मिसळून राहू लागले. त्यांची शिक्षकांबद्दलची भिती निघाली. त्यामुळे अध्ययन-अध्यापन निकोप होऊ लागले. हसत खेळत शिक्षणाचा आनंद मुले घेऊ लागली.
-संजय बावनकर
मूल्यवर्धन
-संजय बावनकर
परिवर्तन
भविष्य में छात्र उत्तमोत्तम नागरिक बने इसलिए छात्रों में घटनात्मक मूल्य रूझान हेतू मूल्यवर्धन उपक्रम जरूरी है मूल्यवर्धन उपक्रम लेने के बाद छात्रों में हुए कुछ परिवर्तन का जिक्र मै यहा कर रही हू.
मूल्यवर्धन ट्रेनिंग लेकर मै पाठशाला आई और उपक्रम पुस्तिका से एक एक उपक्रम लेने के बाद छात्रों में मुझे परिवर्तन दिखाई दिया छात्रों में बड़ो का आदर करना, इमानदारी, सत्यकथन करना दूसरे की मदद करना आदी बदलाव दिखाई देने लगे. स्वयं की क्षमता को छात्र पहचानने लगे कक्षा में कक्षाके नियम बनाते समय उन्हें क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए ये स्वयं ही बताने लगे. सामूहिक खेल में शामिल हों के परस्पर सहायता करने लगे कक्षा के गूमसूम रहनेवाले छात्र भी उपक्रम में शामिल हों के सामने आने लगे चित्र में रंग भरने की तो जैसे छात्रों में रेस ही लगती हैं मू्ल्यवर्धन कार्य क्रम से छात्रों में घटनात्मक मूल्य अपने आप जीवन में शामिल हों रहे हैं मूल्य वर्धन उपक्रम जरूरी है अन्यथा ऩई पीढी के बच्चे शिक्षा में तो आगे बढ़ते रहेंगे परंतु जीवन से मूल्यों का पतन हो जाएगा.
-मंजुषा पानतावणे
परिवर्तन
-मंजुषा पानतावणे
विद्यार्थी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन कार्यक्रम हा सर्व घटकांसाठी उपयुक्त असा कार्यक्रम आहे. विद्यार्थी, शिक्षक, समाज यामध्ये उपयुक्त बदल घडवून आणून योग्य दिशा देण्याचे कार्य हा कार्यक्रम करीत असतो.
मूल्यवर्धन कार्यक्रम शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आयोजित उपयुक्त असा कार्यक्रम आहे. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात तसेच सामाजिक वातावरणात अमुलाग्र बदल घडवून आणता येतो. मूल हे सर्वप्रथम घरच्या वातावरणाशी जोडलेले असते. नंतर ते सामाजिक वातावरणाशी जोडले जाते. नंतर ते शालेय वातावरणात वावरते. त्याला तिथे चांगला उभा रहा, नीट बसा, खरे बोला, स्वच्छता ठेवा इत्यादी तोंडी सूचना दिल्या जातात. ते त्या सुचनांकडे हवं तेवढे लक्ष देत नाही.
त्याला या सर्व बाबी अंगिकारण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतील. म्हणून या सर्व गोष्टी योग्यरितीने घडून याव्यात यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध बदल घडवून आणले.
विद्यार्थी आपली जबाबदारी जाणतात. वडीलधा-या माणसांचा मान ठेवतात. खरे बोलतात. शालेय शिस्तीचे पालन करतात. शालेय परिसरात एखादी वस्तू सापडली की, ती आपल्याकडे न ठेवता कार्यालयात शिक्षकांकडे जमा करतात. सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करतात. इत्यादी अमुलाग्र बदल या मूल्यवर्धन शिक्षणाने घडवून आणले.
मूल्यवर्धन शिक्षणाने शालेय विद्यार्थी एकमेकांसोबत गटचर्चा घडवून, सहयोगी भावनेने मदत करतात. आपले मत व्यक्त करतात. जोडीचर्चेद्वारे एकमेकांचे मित्र बनतात. या सर्व पोषक वातावरणातून मूल घडत जाते. यासाठी त्याला मूल्यवर्धनसारखे रसायन पाजणे आवश्यक असते.
मूल्यवर्धन शिक्षण शालेय जीवनात आवश्यक शिक्षण आहे. शालेय विद्यार्थी हा एक चांगला नागरिक बनावा, त्याने योग्य आपले ध्येय गाठावे, त्याने आकाशात उत्तुंग अशी यशस्वी भरारी घ्यावी या सर्व बाबी मूल्यवर्धन शिक्षणानेच शक्य आहे.
कार्यक्रम मूल्यवर्धन घडवी विद्यार्थ्यात योग्य वर्तन,
देई उंच उंच भरारी करण्या समृद्ध अपुले जीवन
अशाप्रकारे मूल्यवर्धन शिक्षण हे आपल्या सामाजिक जीवनात एक आशेचा किरण आहे की, ज्याची ज्योत ही सदैव तेवत राहो.
-श्री. अरविंद रमेश कोटरंगे
विद्यार्थी आणि मूल्यवर्धन
-श्री. अरविंद रमेश कोटरंगे
मूल्यवर्धन म्हणजे शिस्त
मूल्यवर्धनाचे धडे व इष्ट असे बदल
मी माझ्या शाळेत सत्राच्या आरंभापासूनच मूल्यवर्धनचे धडे गिरवायला सुरूवात केली. तेव्हापासून विद्यार्थ्यांना या विषयात गोडी व रूची वाटायला लागली. माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी मूल्यवर्धनची प्रार्थना खास तालावर म्हणतात, तेव्हा ऐकणाऱ्याचे मन आनंदून जाते. मूल्यवर्धनचे धडे दिले, तेव्हापासून विद्यार्थ्यांचा वर्गातील गोंधळ कमी झाल्याचे अनुभवतो आहोत. विद्यार्थी शिस्तीने वागताना, चालताना व व्यवहार करताना दिसत आहेत. शाळेत एकमेकांना सहकार्य करताना दिसत आहेत.
एके दिवशी बाजूच्या एका छोट्याशा आंगणवाडीतील मुलीने शी केली तेव्हा चौथीतील लीना नावाच्या मुलीने घेऊन तिला घरी पोहोचती केले. मानसी नावाच्या मुलीने कसलीही किळस न करता तिची चप्पल हातात घेऊन तिला घरी पोहोचती केले. यावरून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असा बदल बघून मन आनंदाने भरून येते, व केलेल्या श्रमाचे साजेसं अस फळ मिळाले असे आत्मिक समाधान मिळते.
मूल्यवर्धनची संकल्पना व विचारसरणी अगदी सोपी व व्यवहारमय असूनही आतापर्यंत आपण त्याकडे दुर्लक्ष करायचो.
राष्ट्राची भावी पिढी शिस्तप्रिय व आदर्श बनण्यासाठी फार मोलाचे योगदान मिळणार आहे.
-श्री. एस. जे. बिसेन
मूल्यवर्धन म्हणजे शिस्त
-श्री. एस. जे. बिसेन
मूल्यवर्धनमुळे जाणवतो मुलांमध्ये बदल
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थी वर्तनबदल झाले.
१) शाळेतील मुले एकमेकांचा परिचय करुन देतात. २) शाळेतील सर्व मुले स्वतःचा पत्ता सांगतात. ३) मुले प्राण्यांची, पक्ष्यांची नावे सांगतात. ४) शालेय परिसरात सापडलेली वस्तू शिक्षकांकडे परत करतात. ५) वर्गाबाहेर चपला रांगेत लावून ठेवतात. ६) वर्गात शांतता पाळतात. ७) नेहमी खरे बोलताना दिसतात. ८) मुले नीटनेटके राहतात. ९) मुले टाकाऊ वस्तूंपासून पुनर्रचना करतात. १०) शालेय परिसरात स्वच्छता राखतात. ११) आदरभाव बाळगताना दिसतात. १२) वेळेवर शाळेत येतात. १३) मुले एकमेकांना मदत करतात. १४) मुले समाज कल्याणासाठी कार्य करतात. १५) नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा व्यक्त करतात.
-भोजराज राऊत
मूल्यवर्धन म्हणजे शिस्त
-भोजराज राऊत
मी आणि मूल्यवर्धन
शालेय वेळेत अभ्यासक्रमातून नैतिक मूल्य रुजविणे.
आजचे बालक उद्याचे देशाचे जबाबदार आधार स्तंभ आहेत. त्यामुळे बालकांमध्ये घटनात्मक मूल्ये शाळेच्या वयात रुजायला हवीत, या उद्देशाने मूल्यवर्धन कार्यक्रम विकसित केला आहे. माझ्या अनुभवातून मूल्यवर्धनचा उद्देश शालेय अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. माझ्या शाळेतील पालकांची नेहमी समस्या असायची की, माझा मुलगा खोडकर आहे, कोणतेही काम ऐकत नाही, चिडचिड करतो. मूल्यवर्धन उपक्रम सुरू केल्यानंतर पालकांची भेट घेतली असता मुलांमध्ये सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसले. हे ऐकून आनंद झाला म्हणजे मुलांमध्ये विशेष बदल घडून आले, आनंददायी पद्धतीने वर्गात, शालेय मैदानात, गाणे, खेळ, गप्पा यांच्या माध्यमातून, मुले हसतखेळत सहभागी होतात. अशाप्रकारे मूल्य रुजविली जातात.
-सुशीला भुरे
मी आणि मूल्यवर्धन
-सुशीला भुरे
शिक्षणाचे अविभाज्य अंग- मूल्यवर्धन
माझ्यामध्ये मूल्यवर्धनाने झालेले बदल या अनुभव लेखनातून व्यक्त करीत आहे.
मी सर्वप्रथम प्रेरक झालो तेव्हापासून वाईट सवयी व चांगल्या सवयी, परिसर स्वच्छता व मोठ्यांचा आदर याबाबत नेहमीच विचार येत होते. व्यवस्थापन समितीची सभा घेतली व मूल्यवर्धन वर्गाला सुरुवात केली. वर्गनियम बनवले ते विद्यार्थ्यांच्या सहकार्याने. नियम तर बनवले पण गुरूजी या नात्याने मलाही पाळावे लागले. याचा फायदा हा झाला की, चप्पल, जोडे वर्गाच्या बाहेर काढतोय. तंबाखू-गुटखा बंद झाला. उपक्रमांमुळे स्वत:मध्येही बदल झाल्याचे समाधान झाले. वेळेवर येणे, वेळेवर जाणे, आनंददायी पध्दतीने शिकवणे. विद्यार्थी मित्र झाले, बोलू लागले, वाचू लागले. पालकांशी जवळीकता आली.
मूल्यवर्धनाने गावात वेगळीच ओळख करून दिली. सहयोगी खेळांनी तर विद्यार्थी व शिक्षक आंतरक्रिया वृध्दींगत केलेल्या आहेत. मंदबुध्दी व मतीमंद विद्यार्थी सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे शिकू लागला. यामुळे असे वाटते की, शिक्षणाचे अविभाज्य अंग म्हणजे मूल्यवर्धन होय.
-हरिराम येळणे
शिक्षणाचे अविभाज्य अंग- मूल्यवर्धन
-हरिराम येळणे
मूल्यवर्धनची खरंच गरज आहे !
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम म्हणजे मूल्यवर्धन शिक्षणाची सुरूवात. आज जीवन जगत असताना, समाजात वावरत असताना महत्त्वाची गरज म्हणजे मूल्यशिक्षण. नैतिक मूल्य, सामाजिक मूल्यांतूनच व्यक्ती सर्वांगिण विकास साधू शकते. याची सुरूवात करून देणा-या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे मनस्वी आभार!
मूल्यवर्धन शिक्षणाची सुरूवात करताना वर्गात माझे ओळखपत्र तयार करताना मुलांनी स्वतःचे ओळखपत्र स्वतःच तयार केले. पूर्ण वर्षभर त्याचा वापर केला. त्यातुनच स्वनिर्मितीचा आनंद मिळाला. स्वतःच्या क्षमता विद्यार्थी ओळखू शकले. तासिका नसतांनाही “मॅडम, मूल्यवर्धन” असे म्हणणारी मुले विषयाशी एकरूप झाली. त्यातील विश्व त्यांना आपलेसे वाटले.
मागे राहणा-या मुलांना नवसंजीवनी मिळाली. मुलांमध्ये आत्मविश्वास दिसून येऊ लागला. इयत्ता पहिलीतील मुलेसुध्दा सगळ्यांसमोर येऊन माहिती सांगू लागली. इतर विषय शिकविताना मुलांना मदत झाली. धीटपणा वाढला. मूल्यवर्धन काय आहे हे विचारायला पालक येऊ लागले. कारण विद्यार्थ्यांत चांगला फरक जाणवू लागला. चांगल्या, वाईट सवयी मनावर पक्क्या ठसल्यामुळे आपोआपच चांगलेच करायची सवय लागली. शिक्षकांप्रति, आई-वडील, शेजा-यांविषयी आदराची भावना वाढीस लागली.
एक प्रसंग : 26 जानेवारीला सगळया मुलांनी आई वडिलांना शाळेत येण्याचा आग्रह केला. काम तर रोजचेच. गणराज्य दिन वर्षातून एकदाच येतो असे मॅडमनी सांगितले. देशासाठी एक दिवस दिला तर काय होईल? असे काही मुलांनी घरी सांगितले. देशभक्ती वाढली. मुले सगळयांशी प्रेमाने वागतात. नवीन विद्यार्थ्याला मदत करतात. मोठ्यांशी आदराने वागतात. निसर्ग, प्राणी, पशुपक्षी याविषयी प्रेम बाळगतात. स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेवतात.
आई, वडील, आजी, आजोबा, घरातील मंडळींशी एखाद्या विषयावर चर्चा करतात. मुले नियमांचे पालन शाळेत व इतर ठिकाणी करतात. दररोज परिपाठाला बातम्या सांगताना महत्त्वाच्या बातमीचे विश्लेषण करतात व स्वतंत्र विचाराला चालना देतात. संगणक चालवता येणारे विद्यार्थी इतर मुलांना सुध्दा शिकण्यासाठी मदत करतात.
नेहमी खरे बोलावे, आदराने बोलावे, सांगितलेली कामे करणे, गरजूंना मदत करणे इत्यादी नियम मुले पाळताना दिसतात. त्याबरोबरच सर्जनशील विचार करण्याची सवयच जणू विद्यार्थ्यांना लागली. महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करण्याची सवय मुलांना लागली. म्हणूनच असे बदल घडविणा-या मूल्यवर्धन शिक्षणाची खरच गरज आहे, हेही तेवढेच सत्य आहे.
-करूणा उपरकर
मूल्यवर्धनची खरंच गरज आहे !
-करूणा उपरकर
मी शिस्तबद्ध
मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती करण्यासाठी आजचा विद्यार्थी हा मूल्यवर्धित असणे अतिशय आवश्यक आहे. कारण आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे. त्यामुळे निर्माण होणारा समाज हा ज्ञानप्राप्त, स्वावलंबी, कौशल्यप्राप्त आणि सामाजिक दृष्ट्या सर्वसमावेशक असा होईल, त्यासाठी शिक्षण हे मूल्यपूरक करून व्यक्तिमत्त्व विकास साधण्यासाठी मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीचे बीज म्हणजेच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा मूल्यवर्धन कार्यक्रम होय.
देशाचे जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ माणूस जर कुठे तयार होत असेल, तर ते ठिकाण म्हणजे प्राथमिक शाळा होय. या ठिकाणी बालमने अगदी स्वच्छ मनाने येतात. या स्वच्छ मनांवर आपण जसे संस्कार करू तसेच ते चिरकाल टिकून राहतात. या बाबी लक्षात घेऊनच मूल्यवर्धन हा बहुमूल्य उपक्रम राबवित आहे. त्यात गटाने, जोडीने व सामूहिक या विविध प्रकारे उपक्रम राबविले जातात. त्यामुळे मुलांमध्ये आपसात बंधूभाव, प्रेम व आपुलकी वाढीस लागल्याचे लक्षात आले. त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त विकसित झाल्याचे जाणवत आहे. शिस्तीचा विचार केला तर त्यांनी स्वतःला शिस्तबध्द ठेवण्याची जाणीव सर्वांना झाल्याचे दिसते. विद्यार्थी शाळेत जे ज्ञान घेतात, ते कौशल्य प्राप्तीसाठी तसेच जीवन समृद्ध बनविण्यासाठी आहे, हे विद्यार्थ्यांच्या वागणुकीतून लक्षात येते.
संपूर्ण शाळेचा विचार करताना शाळा सुटल्यावर मुले सैरावैरा पळत घरी जायची. त्यामुळे काही मुलांचा अपघात होऊन थोडे नुकसानही झाले. ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि हे सर्व टाळण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाचा फार उपयोग झाला.
शाळेत अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे मुले शाळेत आल्यापासून ते घरी जाईपर्यंत काही नियम तयार करण्यात आले. त्या सर्व नियमांचे पालन मुलांबरोबर सर्व शिक्षकांनी ही पाळायला सुरुवात केली त्यामुळे शाळा सुटल्यावर मुलांना घरापर्यंत रांगेत आणि डाव्या बाजूने जायचे असे ठरवून दिले. त्या दिवसापासून सर्व मुले रांगेत घरी जातात . त्याचप्रमाणे पहिल्या व दुसऱ्या वर्गातील मुलांची आपुलकीने काळजी घेतात व त्यांना त्यांच्या घरापर्यंत रांगेत जाण्यासाठी मदतही करतात. हे बघून त्यांच्या अंगी बंधुता, एकात्मता या मूल्यांमध्ये वाढ झाल्याचे जाणवले. या उपक्रमामुळे मुलांमध्ये एकोपा व सामंजस्य निर्माण झाले. मूल्यवर्धनमुळे मुले सुसंस्कृत आणि सुस्वभावी होतात याची जाणीव मला याप्रसंगामुळे झाली. म्हणून मला असे वाटते की, शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या संस्थेने जे मूल्यवर्धनाचे बीज विद्यार्थ्यांच्या मनात रोवलेले आहे त्याचा अल्पावधीतच वटवृक्ष तयार होणार हे अटळ आहे. हे सर्व घडवून आणणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनला माझा शतशः प्रणाम.
-रजनी मेश्राम
मी शिस्तबद्ध
-रजनी मेश्राम
मूल्यवर्धन अनुभव
मूल्यवर्धन
‘जे जे पाहे रवि, ते ते पाहे कवी’ या उक्तिप्रमाणे सन्मानीय श्री. शांतिलाल मुथ्था यांनी बघितले आहे. या मूल्यवर्धन माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या आकलन क्षमता, आत्मविश्वास आणि स्वची जाणीव यातून निर्माण होण्यास मदत होते. मूल्यवर्धनच्या माध्यमातून राज्यघटनेत जी मूल्ये आहेत त्या मूल्यांमधून विद्यार्थी स्वत:चे नियम स्वतः तयार करतात. स्वतः पाळतात. विद्यार्थी शाळेतच नाहीतर गावात, घरी, आसपाससुद्धा या नियमचे पालन करतात व इतरांनाही समजाऊन सांगतात. आज ही मूल्य खरोखरच बालवयात जर रुजविण्यात आली, तर आजची जी परिस्थिती आहे ती येत्या काही दिवसात बदलायला वेळ नाही लागणार. या मूल्यवर्धनच्या माध्यमातून आजची पिढी भविष्य घडविणार आहे. म्हणूनच मूल्यवर्धन ही काळाची गरज आहे.
-विकास धाटके
मूल्यवर्धन अनुभव
-विकास धाटके
मूल्यवर्धन संकल्प पूर्ति
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन इस स्वयंसेवी संस्था द्वारा मूल्यवर्धन इस विषय को जिला परिषद की शालाओ में चलाने से इन शलाओ के विद्यार्थियों में अप्रत्यक्ष रूप से संविधानात्मक मूल्यों का विकास हो रहा है।
मूल्यवर्धन इस विषय को शालेय अभ्यासक्रम में शामिल करके शांतिलाल मुथ्था फाउंडेशन ने बहुत ही अच्छा कार्य किया है। विद्यार्थियों में मूल्यवर्धन के द्वारा संविधनात्मक मूल्य शालेय जीवन से ही यदि डाले जाए तो भविष्य में एक अच्छे नागरिक का निर्माण हो सकता है। इस उद्देश्य से शालाओं में मूल्यवर्धन उपक्रम शुरू किया गया है।
मूल्यवर्धन द्वारा बच्चों में नैतिक मूल्यों का विकास हुआ है। शालाओं में उपस्थिति का प्रमाण बढ़ा है। चित्रकला के प्रति जिज्ञासा व रुचि बढ़ी है। वह आनन्ददायी पद्धति से भाग लेते है। अपने कार्यों को नियोजित ढंग से करते है। उनमें निरीक्षण क्षमता व एकाग्रता का विकास हुआ है। आपसी सहयोग की भावना बढ़ी है। बड़े बुजुर्गो और जानवरों के प्रति संवेदनशीलता का निर्माण हुआ है। चित्र देख कर वे कहानी बता सकते है। उन्हें अच्छे और बुरे की पहचान हो गई है। मूल्यवर्धन उपक्रम से बच्चों में भारतीय संविधान के स्वतंत्रता, न्याय, समता और बंधुता इन चार मूल्यों की पहचान करके उनमें वे मूल्य डालने का प्रयास किया जा रहा है। विद्यर्थियों में मानवीय प्रतिष्ठा का सम्मान, स्वतंत्रता, स्वयं की जिम्मदारियां, चिकित्सक और सृजनशीलता, दूसरो के प्रति आस्था, सक्रिय योगदान इन मूल्यों को बच्चों में विकसित करने का प्रयत्न किया जा रहा है।
इसमें मूल्यों पर आधारित क्षमता, मूल्यों को आत्मसात करने के लिए कक्षावार विविध उपक्रम लिए जाते हैं। बच्चों में बड़ों के प्रति आदर की भावना, सही निर्णय लेने की क्षमता, स्वयं के वर्तन में नियंत्रण रखना, दूसरो की मदत करना आदि बातों का एहसास विद्यार्थियों को होता हैं। मूल्यवर्धन कार्यक्रम के कारण बच्चों में विविध परिवर्तन आए हैं। कक्षा के नियम में क्या करना व क्या नहीं करना इस बात में अंतर समझते हैं। इन उपक्रमों के माध्यम से उनमें निर्णय लेने की क्षमता, जल्दी काम करने की क्षमता का निर्माण हुआ हैं।
-सुजाता मिश्रा
मूल्यवर्धन संकल्प पूर्ति
-सुजाता मिश्रा
दैनंदिनी
दैनंदिनी विषयी सवयीत बदल झाल्यामुळे आपल्यात शिस्त लागते व रोजचे कार्य वेळेवर होते.
आपले दैनंदिन कार्य कसे ठरवायचे तसेच दिवसभरात कोणकोणते कार्य करायचे, याचे नियोजन मुले करतात. जसे सकाळी उठून सर्वप्रथम शौचास जाणे, साबणाने हात स्वच्छ धुणे, त्यानंतर दात घासणे, अंघोळ करणे, केसांना तेल लावणे, केस करणे, नाश्ता करणे, स्वच्छ कपडे घालणे, शाळेचा गणवेष घालून, दप्तर तपासून, दप्तर घेऊन वेळेवर शाळेत जाणे अशाप्रकारे आपले रोजचे कार्य करण्यासाठी मुलांनी नियम बनवले व ते नियम ते अंमलात आणतात.
-राजेंद्रकुमार पटले
दैनंदिनी
-राजेंद्रकुमार पटले
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांचे वर्तनबदल
माझ्या शाळेत मागील सत्र २०१८-१९ मध्ये एकूण ३३ विद्यार्थी पटावर होते. ग्रामीण भाग असल्यामुळे व पालकांचा अशिक्षितपणा यामुळे विद्यार्थी’ रममाण होण्यासाठी काहीतरी वेगळे करणे हितावह होते. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थी शाळेत रमू लागले. १) अनुपस्थित असणारे विद्यार्थी दररोज शाळेत येऊ लागले. २) विद्यार्थी कृतीमुळे आनंदीत झाले. ३) विद्यार्थी स्वयंशिस्त झाले. ४) विद्यार्थ्यांना एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण होण्यास मदत झाली. ५) एकटेपणा दूर झाल्यामुळे एकत्रित कृती सामुहिकरित्या करू लागले. ६) वक्तशीरपणा हा गुण अंगी बाणवण्यास मदत झाली. ७) विद्यार्थ्यांच्या वर्तनात बदल करण्यात मदत झाली. ८) पालकांचा संपर्क वाढला. शाळेबद्दल आपुलकी निर्माण झाली. ९) स्वयंप्रेरणेने कृतीत सहभागी होण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. १०) विद्यार्थ्यांच्या वर्तन बदलामुळे पालकांमध्ये शाळेबद्दल आत्मियता निर्माण करता येणे शक्य झाले.
-श्री. वामन लिलाधर कुर्वे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांचे वर्तनबदल
-श्री. वामन लिलाधर कुर्वे
मी व मूल्यवर्धन
भारतीय संविधानातील मूल्ये कोवळ्या मनावर रुजविणे.
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये विकसित करण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाशी निगडित विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधणारा मूल्यवर्धन हा सर्वोत्तम कार्यक्रम राबविण्याचा विचार हा खूप मोलाचा वाटतो. मूल्यशिक्षणासाठी शाळेमध्ये होणाऱ्या प्रयत्नांना हा पूरक कार्यक्रम आहे. मूल्य शिकविली जात नाहीत, तर ती आनंददायी पद्धतीने नियोजित रुजविली जातात. पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांमध्ये असलेले नैतिक मूल्य ढासळत असल्याने त्यांच्यामध्ये लोकशाहीभिमुख मूल्ये रुजविणे काळाची गरज आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमातून भारतीय राज्यघटनेची जाणीव सहजरित्या करून देण्याचा प्रयत्न करणारा हा कार्यक्रम आहे.
-दिगंबर लाडे
मी व मूल्यवर्धन
-दिगंबर लाडे
मूल्यवर्धनचे फायदे
आपल्याला नेहमी मूल्यसंवर्धन किंवा मूल्यवर्धन हे शब्द ऐकायला मिळतात. परंतु मूल्यसंवर्धन किंवा मूल्यवर्धन नेमके काय आहे, हे आपण जाणून घेत नाही. वरवर त्या शब्दांचा वापर करत असतो. मूल्यसंवर्धन म्हणजे जी घटनात्मक मूल्ये दिली आहेत, त्यांची जोपासना करणे. परंतु आजची परिस्थिती पाहता ती मूल्ये आपल्याला रुजवायची आहेत, आत्मसात करायची आहेत , म्हणजेच या मूल्यांचे वर्धन करायचे आहे आणि यालाच मूल्यवर्धन असे म्हणतो.
जी घटनात्मक मूल्ये दिली आहेत, ती बालवयातच म्हणजे प्राथमिक शिक्षण घेत असतानाच मुलांमध्ये रुजवली गेली, तर भविष्यात चांगले लोकशाहीभिमुख नागरिक आपल्या देशात घडतील. लोकशाहीभिमुख नागरिक घडविणे हाच उद्देश आपल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रम प्राथमिक शाळेतून राबविणे का आवश्यक आहे? तर आपल्या देशातील शालेय शिक्षणाचे मूलभूत उद्दिष्टच आहे की, मुलांमध्ये घटनात्मक मूल्य रुजविणे आणि हे उद्दिष्ट शालेय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शाळेच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून साध्य करता येते. पुण्यातील शांतिलाल मुथ्था फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मूल्यवर्धन कार्यक्रम विकसित केलेला आहे. हा कार्यक्रम भारतीय संविधानातील मुख्य चार मूल्यांचा समावेश करूनच तयार केलेला आहे. ही चार मुख्य मूल्य म्हणजे १)स्वातंत्र्य २) न्याय ३) समता ४) बंधुता ही आहेत.
राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये घटनात्मक मूल्यांच्या आधारावर आठ मूल्ये शालेय शिक्षणाच्या संदर्भात सुचवलेली आहेत, आणि ही मूल्य मूल्यवर्धनशी संबंधित असून ‘समग्र शाळा दृष्टिकोन’ या संकल्पनेतूनच पुरस्कृत केलेली आहेत. याचाच अर्थ असा की, ही आठही मूल्ये शाळेतील एकंदरीत वातावरण आणि कार्यपद्धती यांच्याशी संलग्न आहेत. ही आठही मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१) मानवी प्रतिष्ठेचा आदर २) स्वायत्तता ३) जबाबदारी ४) चिकित्सक आणि सर्जनशील विचार ५) विविधतेचा आदर ६) सुसंवादी नातेसंबंध ७) इतरांबद्दल आस्था ८) सक्रिय योगदान.
‘मूल्यवर्धन’ हा कार्यक्रम आपल्याला का आवश्यक आहे? तर या कार्यक्रमांतर्गत व्यक्तिमत्त्व विकासातून स्वजाणीव आणि स्वयंव्यवस्थापन कौशल्य विकसित करता येते. स्वतंत्रपणे विचार करता येईल. जबाबदारीने निर्णय घेण्याची क्षमता विकसित करता येईल. संपूर्ण जगामध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत यावर चिकित्सकपणे विचार करून येणाऱ्या समस्यांवर योग्य उपाययोजना करता येतील.
आपण भारत देशात राहतो, भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा असणारे लोक राहतात. मूल्यवर्धन या कार्यक्रमांतर्गत विविधतेतून एकता जोपासून तिचा आदर करता येईल. यामधून मुलांमध्ये नेतृत्व गुण विकसित करता येईल. एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती जोपासता येईल. थोरामोठ्यांचा आदर करणे, सर्वांशी प्रेमाने, आदराने, सकारात्मक वृत्तीने वागणे अशी कौशल्य विकसित करता येतील.
-अरुण वैद्य
मूल्यवर्धनचे फायदे
-अरुण वैद्य
उपस्थिती
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत झालेला बदल
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांत शाळेविषयी आपुलकी वाढीस लागली. उपस्थिती वाढण्यास मदत झाली. शिस्त निर्माण झाली. नियमांचे पालन करू लागले. वर्ग स्वच्छ ठेऊ लागले. मोठ्यांचा आदर करू लागले. प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी हिरीरीने सहभाग घेऊ लागले. एकंदरीत उत्तम नागरिक घडवण्यात मूल्यवर्धन उपक्रमामुळे बरच फायदा झाला.
-प्रियांका गेडाम
उपस्थिती
-प्रियांका गेडाम
सभी के काम का आदर करना
गाव में विभिन्न प्रकार के लोग रहते हैं. उनके विभिन्न काम है उनके व्यवसाय का आदर करना.
हम सब जानते है कि, सभी लोग गाव में होनेवाले किसानों पर निर्भर हैं. किसानों को मदद के लिए गाव मे लोग किसान की मदद के लिए जैसे लोहार, कुंभार ऐसे अनेक प्रकार के लोग एकसाथ काम करते हैं. इस तरह से समाज में लोगों ने सभी को आदर भाव से देखना चाहिए , और उनके साथ आपने हृदय से उनके कामो को आदर करें और अपनी जाति को ही नहीं सभी के साथ उनके काम का आदर समाज में होना चाहिए. बच्चों में अगर हम बचपन से ही अगर आप सभी सही समय पर उनको हर किसी के काम के प्रति आदर करना सिखाते हैं, तो उसे हम भारत का एक अच्छा नागरिक बना सकते हैं.
-उमेश भगत
सभी के काम का आदर करना
-उमेश भगत
जलव्यवस्थापन
आमची शाळा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा शहारवानी येथे नेहमीच विद्यार्थ्यांना रोजच्या परिपाठामध्ये पाण्याचे महत्त्व व त्याचे उपयोजन सांगण्यात येते. तरीसुद्धा काही विद्यार्थी ऐकून न ऐकल्यासारखे करतात. मध्यान्ह भोजनानंतरही विद्यार्थी बरेच पाणी वाया घालवतात. हे सर्व थांबावं म्हणून विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व सांगितले.
एक दिवस अचानक शाळेची वीज गेली. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची चणचण भासू लागली. कारण वीजेअभावी पाण्याची टाकीत पाणी नव्हते . पाण्याअभावी मुले कासावीस झाली. नंतर थोड्याच वेळात वीज आली. मुलांना आनंद झाला. मी सर्व मुलांना बोलावलं आणि विचारलं की, थोडावेळ तुम्हाला पाणी प्यायला मिळालं नाही तर तुम्ही कासावीस झालात! कल्पना करा की, भविष्यात पाणीच मिळणं कठीण झालं तर? सगळी मुले माझ्याकडे बघू लागली. मी मुलांना पाण्याचे महत्त्व काय आणि किती आहे याविषयी मार्गदर्शन केले.
पाण्याचे महत्त्व:- अंतराळात असंख्य असे ग्रह आहेत. या सर्व ग्रहांमध्ये पृथ्वी असा एकमेव ग्रह आहे की, या ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टी आहे. पाणी हे निसर्गाने दिलेला अमूल्य असा स्त्रोत आहे. पाणीच जर नसेल तर. . . . . . . . ? ही कल्पनाच अंगावर शहारे आणते. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या जीवांना पाण्याची गरज आहे. मग ते पिण्यासाठी असो वा कोणत्याही दैनंदिन कामासाठी असो, पाणी नाही तर जीवन नाही. पृथ्वीचा 70% भाग पाण्याखाली आहे. तरीही आज पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेले शहरीकरण, व्यापारीकरण यामुळे पाण्याच्या साठवणुकीला मर्यादा पडत आहेत. रस्ते बांधण्यासाठी नदी नाल्यांची दिशा बदलली जात आहे. त्यामुळे सर्वदूर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
पाण्याचे व्यवस्थापन :- पाण्याचा वापर काटकसरीने करावा, भरपूर झाडे लावावीत, शेतात तलाव करावे, लहान बंधारे बांधावेत, गावातील ओढे, नाले अडवून पाणी जमिनीत मुरु द्यावे, सांडपाणी शेतात जाईल अशी व्यवस्था करावी, water harvesting द्वारे पाणी जमिनीत मुरू द्यावे. अशा अनेक पध्दतीने पाण्याचे व्यवस्थापन करावे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे महत्त्वाचे असते. “जल है तो कल है”. . . . . .. अशाप्रकारे पाण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी मूल्यवर्धन पुस्तकातील उपक्रमांची खूप मदत होत आहे.
-महेश बोरकर
जलव्यवस्थापन
-महेश बोरकर
विद्यार्थीयो में नैतिक मूल्यों का विकास
मूल्यवर्धन द्वारा बच्चों में नैतिक मूल्यों का विकास
मूल्यवर्धन द्वारा बच्चों में नैतिक मूल्यों का विकास हुआ है. बच्चों में उपस्थिति का प्रमाण बढ़ा है. चित्रकला के प्रति बच्चों की जिज्ञासा बढ़ी है. आनंददायी पद्धति से बच्चे मूल्यवर्धन तासिका में भाग लेते है. अपने कार्यो को नियोजित ढंग से करते है. बच्चे एक दूसरे से मित्रवत व्यवहार करते है.
-महेश कोरे
विद्यार्थीयो में नैतिक मूल्यों का विकास
-महेश कोरे
मूल्यवर्धनचा वसा
समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा व अंधश्रद्धा यांना टाळून भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये हसतखेळत, कृतीच्या माध्यमाने, तणावमुक्त व भयमुक्त वातावरणात रुजविण्याचे कार्य जर घडले असेल, तर केवळ मूल्यवर्धन उपक्रमामुळेच. म्हणूनच याचे खरे श्रेय, यश शांतिलाल मुथ्था फाउंडेशनला जाते, यात काही दुमत नाही.
मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच नवनवीन बदल घडून येत आहेत. सहयोगी अध्ययन, सृजनशीलता विचार, कल्पकता आणि कृती करायला लावणारी ही पद्धती खरंच वाखाणण्याजोगी आहे. यामुळे निश्चितच भावी पिढी संस्कारक्षम होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वर्तन बदल घडविण्याचे अलौकिक कार्य शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने केले आहे. शिक्षणातून व्यक्तिमत्व विकास, चारित्र्यवान, सर्जनशील, प्रतिभावंत, कल्पक विद्यार्थी घडविणे आवश्यक आहे. अनौपचारिक दडपण मुक्त वातावरण, स्वतःच्या कल्पकतेने समांतर असे नाविन्यपूर्ण कृतिशील उपक्रम आयोजित करता येतील. मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमाचे नियोजन करून अगदी बालवयातच मूल्य रुजविली गेली, तर त्यांना वेळेचे महत्त्व कळेल, व्यावहारिक ज्ञानदान कळेल, नवी दिशा मिळेल, वक्तशीरपणा, शिस्त, निटनेटकेपणा कर्तव्याची जाणीव होईल. स्वतःमध्ये झालेल्या बदलाने बालके संस्कारक्षम बनतील आणि हे सर्व संस्कार जीवनात चिरकाल टिकले जातील. हे केवळ मूल्यवर्धनमुळेच शक्य आहे.
एक मुख्याध्यापक म्हणून शाळेत जे अनुभवले. विद्यार्थ्यांना पैशाचं महत्त्व किती आहे हे कळले. विद्यार्थी खाऊ न खाता शाळेतील बँकेमध्ये पैसे ठेवतात. शाळेत येणाऱ्या पालकांचा आदर करतात. दिव्यांग व्यक्तीबद्दल आस्था ठेवतात. शाळेत शिस्तीचे पालन करतात. खरे बोलतात. हे सर्व घडले असेल ते शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमुळेच. म्हणून माझा त्यांच्या कार्याला सलाम. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा नंदादीप हा असाच सदैव, निरंतर तेवत राहावा हीच मनस्वी सदिच्छा.
-प्रभाकर मेश्राम
मूल्यवर्धनचा वसा
-प्रभाकर मेश्राम
माझे नाते संबंध
आपल्या कुटुंबात व नातेवाईकांमध्ये कोणकोण राहतात, मोठ्या माणसाचा आदर केला पाहिजे हे समजले.
ऑगस्ट 2018 पासून मूल्यवर्धन आमच्या शाळेत सुरू झाले आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी काही नवीन उपक्रम सुरु केले आहेत. मूल्यवर्धनचा उद्देश शाळेतील विद्यार्थी भविष्यामध्ये जवाबदार, संवेदनशील नागरिक बनतील व कौशल्य संपादन करतील असे मला वाटते.
या उपक्रमामध्ये विभागानुसार विभागणी केली आहे. विभाग 1- ‘मी आणि माझ्या क्षमता’ विभाग 2- ‘माझ्या जबाबदा-या विभाग 3- ‘माझे नातेसंबंध’ माझ्या मते हे उपक्रम आधी ही घेत होते. पण आता मूल्यवर्धनमध्ये थोड्या वेगळ्या रुपात घेतले जात आहे. जसे स्व ची जाणीव करून देणे, दुसऱ्याविषयी पुरेपुर माहिती गोळा करणे, नाते संबंधांबाबत माहिती घेणे. आपल्या कुटुंबाविषयी आपल्या जबाबदाऱ्या स्वत: स्वीकारणे असे मला समजले.
मूल्य रुजल्यानंतर संबंधित क्षमता आत्मसात करण्यासाठी मुलांना मदत झाली आहे. यासाठी वर्गानुसार विविध प्रकारचे उपक्रम राबविले आहेत. हे मूल्यवर्धन उपक्रम घेण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, अशी ग्वाही देतो.
-ओमप्रकाश बिसे
माझे नाते संबंध
-ओमप्रकाश बिसे
मानवी जीवनात मूल्यांचे महत्त्व
मानवी जीवनात मूल्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. मूल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जर मूल्यांची जपणूक झाली नाही, तर आपले जीवन भरकटत गेल्याशिवाय राहणार नाही. बालवयात झालेले संस्कार व रुजलेली मूल्ये ही आयुष्यभर सोबत असतात व समाजात वावरताना समाज मनाचा आरसा बनतात.
आजचे युग हे science & technology चे युग आहे. सर्वच क्षेत्रात विज्ञानाने उत्तुंग भरारी घेऊन जणू आकाशाला गवसणी घातली आहे. घंटों का काम मिन्टोमे” असे झालेले आहे. Technology च्या बळावर जग पुढेपुढे विकासाकडे वाटचाल करीत आहे. अगदी अलिकडेच भारतीय चन्द्रयान आकाशात झेपावले.
विज्ञान हे मानवाला मिळालेले वरदानच आहे. आचार्य विनोबा भावे यांनी म्हटले आहे की, “अध्यात्माला विज्ञानाची जोड मिळाली तर, या धरतीवरच स्वर्ग अवतरेल.” तशी चिन्हे आता दिसू लागली खरी, परंतु मानवी जीवनातील नितिमूल्ये त्याच पटीने ढासळत असल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन जीवनात पदोपदी तसा प्रत्यय येत आहे.
आजची तरुण पिढी भरकटत चालली, समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे. बालगुन्हेगारी वाढू लागली आहे. बालके हट्टी होत चालली आहेत. बालवयातच प्रौढ होत चालली आहेत. हे सर्व का घडावे? कुठेतरी नैतिक मूल्यांचा ऱ्हास होऊ लागला आहे असे वाटते. म्हणूनच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा मूल्यवर्धन कार्यक्रम संजीवनी ठरणार आहे, असे मला वाटते.
परिपक्व झालेल्या घड्याला आकार देता येत नाही. तसेच काहीसे मानवी मनाचेही आहे. म्हणूनच बालवयात मूल्ये रुजविणे या दृष्टिकोणातून मूल्यवर्धन कार्यक्रम एक पर्वणीच ठरत आहे. मूल्य ठरवून रुजविता येत नाही, तर ते रुजत असते प्राथमिक स्तरावरील छोट्याछोट्या गोष्टींद्वारे. उपक्रमांद्वारे हे शक्य आहे असे school visit करीत असताना अनुभवायला मिळाले.
सन 2018-19 पासून मूल्यवर्धन कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्र राज्यात इतर जिल्ह्यांबरोबरच गोंदिया जिल्ह्यात सुरु झाला. जिल्हा परिषद शाळेबरोबरच नगर परिषद शाळांमध्ये हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. ठरल्याप्रमाणे school visit सुरु झाल्या. त्यात विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळे परिवर्तन दिसून आले. विद्यार्थी स्वत: शिक्षकांच्या मदतीने नियम बनवू लागले. त्याचे पालन करु लागले. इतरांना सांगू लागले. वर्गातील गोंगाट शांत करण्याकरिता घसा कोरडा करण्याची गरज भासत नाही. शांतता संकेत विद्यार्थी समजतात. त्यांना नातेसंबंध समजू लागले. काय चांगले, काय वाईट, खरे-खोटे, गरजूंना मदत करणे, भेदाभेद न करणे इ. गोष्टी सहयोगी खेळातून समजू लागल्या आहेत.
एकूणच विद्यार्थी खूप बोलके झाले आहेत. याचे श्रेय मूल्यवर्धन कार्यक्रमास जाते. एखादा उद्देश नजरेसमोर ठेऊन कार्य केले, त्या गोष्टीचा ध्यास घेतला व त्यात सातत्य राखले, तर उत्तमोत्तम परिणाम मिळतात हेच खरे!!
आज नितिमूल्य जोपासणे, मूल्य अंगीकृत करणे काळाची गरज आहे. एक सक्षम, सुदृढ़, सुसंस्कृत पिढी घडविण्याकरिता तसेच निकोप समाज जीवनाकरीता मूल्यवर्धन कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे, असे मला वाटते.
-कु. देवका खोब्रागडे
मानवी जीवनात मूल्यांचे महत्त्व
-कु. देवका खोब्रागडे
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन उपक्रमामुळे वर्गात अपेक्षित बदल घडून आले.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केला. सुरुवातीला जेव्हा मी प्रशिक्षण घेण्यासाठी गेले, तेव्हा वाटलं की प्रशिक्षण रटाळ आहे. फालतू वेळ वाया जात आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रशिक्षण घेण्यासाठी सुरूवात झाली, कृतियुक्त गटपद्धतीने कार्य सुरु झाले, तेव्हा मूल्यवर्धन प्रशिक्षणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले. सहशालेय खेळाचे महत्त्व पटायला लागले.
शाळेत गेल्यावर उपक्रम सुरू केल्याबरोबर विद्यार्थी प्रतिसाद उत्तम मिळायला लागला. उदा. चप्पल सगळ्यांनी रांगेत लावून ठेवणे, आई, बाबांना नमस्कार करून येणे, वर्गात शिस्तीने बसणे, चित्र रंगविणे, रंग भरणे, कथा, कृतीयुक्त गाणी मुले अगदी न घाबरता करू लागले. वर्गसफाई करणे, वर्गाचे सामान नीटनेटके ठेवणे अशाप्रकारे खूप बदल मुलांमध्ये घडून आले. झालेले बदल लोकांच्या लक्षात यायला लागले. त्यामुळे पालक शिक्षकांकडे चौकशी करून माहिती विचारू लागले. शिक्षक-पालक संपर्क वाढला. अशाप्रकारे मूल्यवर्धन उपक्रमांची खूप मदत झाली. शिक्षणाविषयाची भीती मुलांमधून निघाली. त्यामुळे अध्ययन-अध्यापन निकोप होऊन हसतखेळत शिक्षणाचा आनंद मुले घेऊ लागली. जे उपक्रम वर्गात राबविले त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला.
मुलांनी छान चित्रे रंगवून काढली. रोज आम्ही शाळेत जाणार’ हे गीत मुलांचे छान पाठांतर झाले. दररोज शाळेत वेळेवर येणे, चप्पल रांगेत ठेवणे, प्रार्थना म्हणणे, गोष्ट सांगणे, मैत्री करणे या बाबी मूल्यवर्धन उपक्रमामुळे वर्गात घडून आल्या. शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी नितीमूल्य आत्मसात करणे ही गोष्ट मूल्यवर्धन उपक्रमातून मुलांच्या मनावर रुजविली गेली. हसतखेळत शिक्षणाचा आनंद मुले घेऊ लागली.
-मंजू उईके
मी आणि मूल्यवर्धन
-मंजू उईके
विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल
मूल्यशिक्षणातील उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या स्वभाव बादलाला सलाम!
दि. 5/10/2019 ला शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु. श्रद्धा ठाकरे हिला शाळेच्या मैदानावर काही पैसे मिळाले. या मुलीने प्रामाणिकपणे ते पैसे स्वतः जवळ न ठेवता शालेय कार्यालयात जमा केले. ज्या विद्यार्थ्याचे होते त्याला ते मिळवून दिले.
-कु. प्रतिमा उमरकर
विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल
-कु. प्रतिमा उमरकर
मूल्यवर्धन: जीवन घडविण्याचा एक अविभाज्य घटक
नैतिक मूल्ये असलेली निकोप, सुदृढ, कणखर मन असलेली पिढी निर्माण करणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. पण यावर्षापासून मूल्यवर्धन उपक्रमाची जी सुरुवात झाली ती, आमच्यासाठी एक सुवर्णसंधीच ठरली आहे. ज्यावर संपूर्ण समाजाचा पाया अवलंबून आहे, ती नैतिक मूल्ये जर समाजात रुजली नाहीत व ती मुरली नाहीत व वाढीस लागली नाहीत, तर समाजाचे अध: पतन होण्यास जराही वेळ लागणार नाही.
आई वडिलांचे म्हणणे न ऐकणारी मुले, दहावेळा बोलाऊनही प्रतिसाद न देणारी मुले आता इतरांचे व शेजाऱ्यापाजाऱ्यांचीही छोटीमोठी कामे करू लागली आहेत. हे बदल आता मूल्यवर्धनमुळेच होत आहेत. असा माझा विश्वास आहे. झालेला बदल आता इतरांच्याही लक्षात यायला लागलेला आहे. शिक्षक – पालक संपर्क वाढायलासुद्धा मूल्यवर्धनची खूप मदत झाली.
कालपर्यंत शाळेची गोडी नसणारी मुले व पालकमंडळी आंनदाने शाळेत येऊन रमू लागली आहेत. इतर विद्यार्थ्यांसोबत मिसळून राहू लागली आहेत. मुले नियमाने वागू लागली आहेत. स्वतःचे नियम स्वतः तयार करू लागली आहेत. स्वतःत्या नियमांचे पालन करू लागली आहेत. स्वतःस पारखून पाहू लागली आहेत. पण या गोष्टी मुळापर्यंत जाऊन पाहिल्या असता, मुले दुहेरी वागत नव्हती. तर घरी असणारे वातावरण, घरातील मोठ्या व्यक्ती कशा वागतात, त्यांचं अनुकरण करत असतात हे लक्षात आलं. पण ह्या मूल्यवर्धन उपक्रमांची अधिकता व मुलांशी असणारा संवाद वाढत गेला. मुले आपल्या शिक्षकांसमोर आणि ते नसताना सुद्धा एकाच पद्धतीने वागताना वावरताना दिसून आली.
ते योग्य मार्गाने विचार करत आहेत. आपले मत स्पष्टपणे मांडत आहेत. अगदी छोट्याछोट्या गोष्टीत एकमेकांचा विचार करत आहेत. अशा गोष्टी घडणे म्हणजे खऱ्या अर्थाने मूल्यवर्धनची खरी यशस्वीता म्हणता येईल.
महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या जागराचा परिणाम प्रत्यक्ष शाळेत पहायला मिळतो, तेव्हा शिक्षकाला जे समाधान मिळते, ते कुठेही मिळणार नाही.
-कृष्णकुमार बिसे
मूल्यवर्धन: जीवन घडविण्याचा एक अविभाज्य घटक
-कृष्णकुमार बिसे
शिस्तीचे महत्त्व
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने सन 2018 -19 मध्ये जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दांडेगाव मुली या ठिकाणी मूल्यवर्धन उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याची चांगली निष्पत्ती वर्षाच्या शेवटी पाहायला मिळाली. सर्व विद्यार्थिनींमध्ये शिस्तीचे महत्त्व रुजायला लागले आहे.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणीची सुरुवात सन 2018 – 2019 मध्ये सुरुवातीला विद्यार्थिनींसाठी वर्गनियम त्यांच्याच सहकार्याने घेतले. तसेच त्या नियमांचा भंग झाल्यास कायकाय सकारात्मक उपाय करता येतील, याविषयी मुलींसोबत चर्चा करून सर्वसमावेशक नियम व नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावरील उपाय यांची निर्मिती केली
काही दिवसांच्या निरीक्षणानंतर आमच्या लक्षात आले की, सर्व विद्यार्थिनी तयार केलेल्या वर्गनियमांची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करीत आहेत . त्यामुळे आम्ही एखाद्या वेळेस वर्गात उशिरा गेलो किंवा दुसऱ्या कामात व्यस्त असलो तरी मुली वर्गनियमानुसार आपापल्या कार्यात मग्न असतात. त्यामुळे त्यांना शिस्तीचे महत्त्व कळू लागले. त्यांना स्वयं अध्ययन करून वर्गात शांतता तसेच स्वतः इतरांशी सहकार्य करून आपले अध्ययन कार्य पूर्ण करू लागले आहेत. वर्ग नियमांच्या अंमलबजावणीमुळे वर्गात एक चांगली शिस्त लावण्यास मदत झाली. त्यामुळे याचा फायदा इतर वर्गातील मुलींनासुद्धा झाला. त्या आपल्या वर्गशिक्षकांच्या साहाय्याने प्रत्येक वर्गात वर्गनियमांची निर्मिती करून त्याची यशस्वी अंमलबजावणी करीत आहेत. त्यामुळे सर्व शाळेचे वातावरण एकदम प्रफुल्लीत झाले आहे. सर्व वर्गच नाहीत तर सर्व शालेय परिसर स्वच्छ असतो. प्रत्येक विद्यार्थिनी एकमेकींच्या सहकार्याने कामे व्यवस्थित करीत आहेत. खरंच शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन उपक्रमातून शालेय मुलींमध्ये मूल्ये आत्मसात होण्यास मदत झाली.
-सुधाकर लांजे
शिस्तीचे महत्त्व
-सुधाकर लांजे
मूल्यवर्धनमुळे मुलांमधील मला जाणवलेले बदल
मूल्यवर्धन पुस्तिकेद्वारा मुलांमधील मला जाणवलेले बदल
मी आशा महादेव पटले, सहाय्यक शिक्षिका जि प प्राथमिक शाळा एकोडी येथे कार्यरत असून इयत्ता तिसरी वर्गाला अध्यापनाचे कार्य करीत आहे. मानवी प्रगतीचा पहिला टप्पा मूल्यशिक्षणाद्वारे सुरू होतो, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जीवनात मूल्यांचा अभाव असल्यावर आपण कितीही पुढारल्याचा ढोल पिटत बसलो, तरी ते आयुष्य मातीमोल आहे, असे मला वाटते.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मूल्यवर्धनचे जे पवित्र कार्य हाती घेतलेलं आहे , ते कौतुकास्पद आहे. आजमितीस इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांना मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका उपयोगी ठरलेल्या आहेत. गरज आहे ते शिक्षकांनी मुलांत मनापासून राबवून घेण्याची. मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील काही तासिका या कामासाठी राखून ठेवलेल्या आहेत. त्याचा उपयोग मूलांसाठी करून घेते. दप्तराचे ओझे कमी व्हावे यासाठी पुस्तिका शाळेतच ठेवते.
या कार्यक्रमामुळे माझ्या मुलांमध्ये काही सवयीत अमुलाग्र बदल झाल्याचे दिसून आले. जसे- प्रार्थनेच्यावेळी रांगेत उभे राहणे, शांतता पाळणे, रांगेत जाणे, येणे, एकावेळी एकानेच बोलणे, मैत्रभावना पाळणे, वर्गाबाहेर जोडे काढणे, बाहेर जाताना किंवा येताना परवानगी मागणे, गुरूजनांचा व मोठ्यांचा आदर राखणे यासारख्या अनेक सवयी माझ्या मुलांच्या मनात रूजत असल्याचे व कृतितून उतरत असल्याचे अनुभवत आहे. उपक्रम पुस्तिका हाताळण्याची गोडीदेखील मुलांत दिसून येत आहे. त्यामुळे एकंदरीत सदरचे कार्यक्रम उपयोगी आहेत, असे माझे मत आहे. तरी या राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमास माझ्यातर्फे शुभेच्छा!
-आशा पटले
मूल्यवर्धनमुळे मुलांमधील मला जाणवलेले बदल
-आशा पटले
विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल
मूल्यशिक्षण ही प्रचलित शिक्षणपद्धतीतील फार मोठी उणीव आहे. शिक्षणातून ज्ञान प्राप्त होते, कौशल्ये विकसित होतात. अर्थात हेही मर्यादित प्रमाणात! तात्पर्य शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट सुसंस्कार, चारित्र्यवर्धन, आदर्श नागरिक-माणूस यांच्या निर्मितीत ते पूर्णपणे विफल झाले आहे. सुदैवाने या परिस्थितीची जाणीव अनेक विचारवंतांना , शिक्षणतज्ज्ञांना झाली असून शिक्षणात या मूळ व महत्त्वाच्या उद्दिष्टांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता ते प्रतिपादन करू लागले. याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने इयत्ता पहिली ते पाचवी अभ्यासक्रमात मूल्यवर्धन हा विषय अंतर्भूत केलेला आहे. या विषयामुळे माझ्या विद्यार्थ्यांच्या वर्तनात झालेला बदल मी पुढे सादर करीत आहे.
मूल्यांची संख्या व प्रकार कितीतरी आहेत, पण सगळ्याच मूल्यांचे शिक्षण देणे आवाक्याबाहेरचे आहे. म्हणून शासनाने प्रमुख व मूलभूत अशा 10 मूल्यांची निवड करून ती विद्यार्थ्यांवर संस्कारित करण्याचा संकल्प केलेला आहे. अभ्यासक्रमात एखादा घटक अंतर्भूत केला की, त्याच्या कार्यवाहीसाठी प्रत्यक्ष उद्बोधन व प्रशिक्षण जसे आवश्यक असते, तसेच लिखित साहित्य, पुस्तके , हस्तपुस्तिका, मार्गदर्शिका हेही तितकेच आवश्यक असते. याच अनुषंगाने शासनाने इयत्ता पहिली ते पाचवीला मार्गदर्शनपर मूल्यवर्धन पुस्तिका निःशुल्क उपलब्ध करून दिल्या आणि खऱ्या अर्थाने मूल्यवर्धन अभ्यासक्रमाला सुरुवात झाली.
या पुस्तिकांद्वारे विद्यार्थ्यांना खेळीमेळीच्या वातावरणातून मूल्यांचे ज्ञान देणे अगदी सोपे झाले. माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा झाला. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये झालेले अमुलाग्र बदल मी पाहिले.
खूप दिवसांआधीची गोष्ट आहे. शाळेत आल्यानंतर मला विद्यार्थ्यांचे चेहरे विशेषतः मुलांचे स्वभाव, त्यांची वागणूक फार विचित्र वाटायची. मुलींना चिडविणे, त्यांना घालूनपाडून बोलणे, त्यांच्याशी विचित्रपणे वागणे मला फार ओंगळवाणे वाटायचे. नंतर काही दिवसांनी लक्षात आले की, काही विद्यार्थी त्यांच्या घरचे वातावरण फारसे ठीक नसल्याने त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यांवर झालेला होता.
महाराष्ट्र शासनाच्या या मूल्यवर्धन पुस्तिकांशी जसजशी मुलांची ओळख वाढत गेली, तसतसे त्या विद्यार्थ्यांमध्ये बदल जाणवायला लागले. मुलींशी विचित्र वागणे काही प्रमाणात कमी तर झालेच पण तेच विद्यार्थी मुलींसोबत आदराने बोलू लागले, त्यांना वाटेल ती मदत करायला लागले, मिळून मिसळून खेळायला लागले. हा आमूलाग्र बदल माझ्यासाठी फार विलक्षण होता.
शिक्षणात या मूल्यवर्धन विषयामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासालासुद्धा फार मोठी चालना मिळाली. तात्पर्य शिक्षण म्हणजे मूल्यांना धरून माणसाने आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांचा विकास करणे आणि मिळालेल्या ज्ञानाचे उपयोजन करणे! शिक्षणाचा गाभा नीतिमूल्ये आहेत. तेव्हा शिक्षणात मूल्यांवर भर दिला पाहिजे.
-कु. प्रतिमा उमरकर
विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल
-कु. प्रतिमा उमरकर
आनंदयात्री मूल्यवर्धन
मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे संविधानात्मक मूल्ये विद्यार्थ्यांच्या अंगी कृतिशीलपणे रुजविणे अगदी सहज शक्य झाले आहे. मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्याअंगी सामाजिक नैतिक व राष्ट्रीय मूल्ये जोपासली गेल्याचे अनुभव विद्यार्थ्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून सहज जाणवत आहेत. वर्गात वावरताना, समाजात वावरताना विद्यार्थ्यांत झालेला बदल शिक्षकांना व समाजातील मान्यवरांना सुखद अनुभव देणारा ठरलेला आहे. हे सर्व बदल ज्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या उपक्रमांची देणगी आहे, याची प्रचिती आम्हा शिक्षकांना येत आहे. हे सर्व उपक्रम अविरत चालत रहावेत व आदर्श मूल्यांची जाण असलेला समाज निर्माण व्हावा, ही अपेक्षा शिक्षक बांधव करीत आहेत.
मी माझ्या शाळेत इयत्ता सहावी व सातवी या वर्गांना अध्यापन करीत आहे. एके दिवशी इयत्ता सहावीच्या वर्गाला अध्यापन करण्यासाठी गेलो असता, वर्गात इतस्ततः कागदांचे तुकडे पडलेले दिसले. मी विद्यार्थ्यांना वर्गातील सर्व कागदांचे तुकडे जमा करून कचरा पेटीत टाकण्यास सांगितले. या कचरा पेटीत जमा झालेल्या कागद तुकड्यांचे काय करावे? मी विद्यार्थ्यांना सहज विचारले. माझ्या सहज विचारलेल्या प्रश्नावर विद्यार्थी स्तब्ध झाले. क्षणांत रश्मी नावाची मुलगी उभी झाली. तिच्याकडे सारा वर्ग कुतूहलाने पाहु लागला. पाहण्याचा उद्देश होता की, ही बया आणखी काय वेगळे सांगणार? मी विचारले सांग रश्मी काय विचार आहे तुझा?
रश्मी म्हणाली, सर त्या कागदांच्या चिठो-यांना आपण सडवू व त्यापासून लहान – लहान टोपल्या तयार करु. मी म्हटलं, कसं ? त्यावर ती म्हणाली, मी माझ्या आजीला अशा टाकाऊ कागदापासून छान टोपल्या तयार करताना बघितलेलं आहे. मी म्हटलं, तू करशील का या कागदांपासून सुंदर टोपल्या? ती म्हणाली, होय सर, अगदी आनंदाने.
मग रश्मीने संपूर्ण शाळेतील कागदांचे चिटोरे एका बादलीत जमा केले व त्यात आवश्यक पाणी घातले. दुसऱ्या दिवशी कार्यानुभव तासिकेला मी व इयत्ता सहाव्या वर्गातील विद्यार्थी एकत्र जमलो. रश्मीने एका पिशवीत चिकट ओली माती आणली होती. सोबत एक छोटा माठ व राखसुद्धा आणली. रश्मीने कागदांचे भिजू घातलेले चिटोरे पिळून बाहेर काढले. त्यात ओली चिकट माती मिसळली. कागदांचे सडके तुकडे व ओली चिकट माती यांचा एकजिव लगदा तयार केला. माठ पालथा घालुन त्यावर राख पसरली व त्यावर माती व कागदांचा एकजीव केलेला लगदा व्यवस्थित पसरविला. त्यावर बैठक तयार होईल असा आकार दिला व माठ दोन दिवस उन्हात वाळत ठेवला.
दोन दिवसानंतर परत आम्ही एकत्र जमलो रश्मीने पालथ्या माठावरील कागद मातीचा वाळलेला लगदा हळुवारपणे काढला. सरळ केल्यानंतर एक सुंदर टोपली तयार झालेली होती. मी रश्मीला सहज विचारले, हे सर्व तुला कसं काय सुचलं? रश्मी अगदी आत्मविश्वासाने म्हणाली, मूल्यवर्धनमुळे.
-घनश्याम कापगते
आनंदयात्री मूल्यवर्धन
-घनश्याम कापगते
मूल्यांशिवाय शिक्षण घेणे, हे पशुत्वाप्रमाणे ठरेल
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये संस्कारमय व घटनात्मक मूल्ये लहान वयातच म्हणजेच शालेय वयातच रुजतात. भविष्यात समोरच्या भावी पिढीतून सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक घडायला हवेत, या उद्देशाने शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम कृतियुक्तरितीने राबविला जातो.
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा मुरदोली, केंद्र- मुंडीपार, पंचायत समिती- गोरेगाव. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये संस्कारमय व घटनात्मक मूल्ये लहान वयातच म्हणजेच शालेय वयातच रुजतात. भविष्यात समोरच्या भावी पिढीतून सुजाण व कर्तव्यदक्ष नागरिक घडायला हवेत, या उद्देशाने शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम कृतियुक्तरितीने राबविला जातो. मूल्यवर्धनच्या माध्यमातून मुलांमध्ये अमुलाग्र बदल घडून येतो. मुलांमध्ये प्रतिष्ठेचा आदर, इतरांबद्दल आस्था, नातेसंबंध, सुसंवाद इत्यादी उपक्रमांकरिता शिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. शाळांमध्ये आनंददायी वातावरणात समाजोपयोगी मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना सहज देता येते.
इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन उपक्रमातून न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, एकता इत्यादींचे धडे देण्यात येतात. विद्यार्थ्यांना मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिका हाताळताना, त्यातील चित्रे, गोष्टी इत्यादी पाहताना, वाचताना अत्यंत आनंद होतो. यामध्ये गटचर्चा, जोडीचर्चा, सहयोगी खेळ यासारखे अनेक उपक्रम घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी आवड निर्माण होते. मुलांना स्वतःची जाणीव, त्यांच्यातील क्षमता, चांगल्या व वाईट सवयी, घरातील नियम, शाळेतील नियम, चांगले मित्र, सहकार्याची भावना, इतरांची काळजी घेणारी मुले इत्यादी अनेक मूल्यांची रुजवण मुलांमध्ये झालेली आहे.
विद्यार्थी रहदारीचे नियम पाळतात. पाण्याचे महत्त्व समजतात. स्वतःचे छंद बाळगतात. दैनंदिन वेळापत्रक तयार करतात. अशा अनेक चांगल्या सवयी मुलांमध्ये दिसून येतात. माझ्या मते मूल्यवर्धन ही काळाची गरज आहे आणि याद्वारे मुलांमध्ये चांगल्या मूल्यांची रुजवणूक होत असते. जर मूल्यशिक्षण नसेल तर, भविष्यातील पिढी पशुत्वाप्रमाणे वागेल.
– उत्तम पटले
मूल्यांशिवाय शिक्षण घेणे, हे पशुत्वाप्रमाणे ठरेल
– उत्तम पटले
मूल्यवर्धन काळाची गरज
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून, संविधानातील मूल्ये व त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे.
मूल्यवर्धन हा शाळांच्या गरजा , प्राधान्यक्रम, उपलब्ध असणारी साधनसामग्री यानुसार आवश्यक वाटतील असे बदल करून राबवता येणारा लवचिक असा कार्यक्रम आहे. यासाठी शाळेत विविध नियोजित उपक्रमातून आनंदायी पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवली जावू शकतात. भविष्यात मुले चांगली नागरिक व्हावीत यासाठीच मूल्यवर्धन कार्यक्रम आहे. यासाठी त्यांना मदत होईल अशी मूल्ये आणि कौशल्ये या कार्यक्रमातून मुले शिकतात.
-ललिता बिसे
मूल्यवर्धन काळाची गरज
-ललिता बिसे
विद्यार्थ्यांत होणारे बदल
आजचे विद्यार्थी हेच उदयाच्या भारताचे आधारस्तंभ आहेत. बालवयात विद्यार्थ्यांची मने संस्कारक्षम असतात. प्राथमिक अवस्थेत असतानाच त्यांच्यावर योग्य संस्कार करु शकतो. ते जबाबदार नागरिक होतील. आज समाजात मूल्यांचा अभाव दिसून येत आहे. समाजातील या अपप्रवृत्तीवर मात करण्यसाठी मूल्यवर्धन शिक्षणाची गरज भासली आहे. हे महान कार्य शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून मुले इतरांशी आदराने वागत आहेत.
मूल्यवर्धन पालकांना, विद्यार्थ्यांना शिक्षकांना, फार उपयोगी पडत आहे. सुसंवाद करणे, एकमेकांसोबत शांतपणे आणि सहकार्याच्या भावनेने राहणे, इतरांचा मान ठेवणे इत्यादी मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहेत. सहयोगी खेळाच्या माध्यमातून नातेसंबंध सुधारत आहेत. शिक्षकांविषयी भीती मुलांमधून निघाली आहे. त्यामुळे अध्ययन अध्यापन प्रकिया सोपी होत आहे. मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून सुसंस्कृत, मुल्यवान विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न अभिनंदनीय आहे.
-श्री. नुतनसिंग चेतनसिंग नागभीरे
विद्यार्थ्यांत होणारे बदल
-श्री. नुतनसिंग चेतनसिंग नागभीरे
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती अनुभवकथन
मूल्यशिक्षण ही प्रचलित शिक्षणातील एक अत्यंत उणीव आहे. शिक्षणातून ज्ञान प्राप्त होते. कौशल्य विकसित होतात. अर्थात हेही मर्यादित प्रमाणात. या दोन उद्दिष्टांवर भर दिला जातो. कारण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरील निकष म्हणजे त्यांची ज्ञानप्राप्ती. ही ज्ञानप्राप्ती ठरविण्याचा आधार म्हणजे त्याला परीक्षेत प्राप्त झालेले गुण. साहजिकच शिक्षणात संस्कारांना काही महत्त्व राहिले नाही. पालकांना त्याची आवशक्यता वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत.
पूर्वी संयुक्त कुटुंबपद्धती होती. लहानमोठे एकत्र राहायचे. मोठ्या व्यक्तीचा धाक असायचा, भीती असायची. मोठ्यांचे आदर्श त्यांच्यासमोर होते. आज मात्र उलटच झालं आहे. त्यामुळे आज मूल्यवर्धन ही काळाची गरज समजून शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने एक चांगले पाऊल उचलले आहे आणि ते योग्य आहे.
एक सुजाण नागरिक बनविण्याकरिता बालकाचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. प्रचलित अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अन्य उपक्रमाचे नियोजन करून उचित मूल्यसंस्कार करता येणे शक्य आहे.
संस्कार म्हणजे जीवनाला पायाभूत होणाऱ्या मूल्यांची शिकवण. हे शिक्षण बालवयातच दिले गेले तर विद्यार्थ्यांना एक सुजाण नागरिक घडविण्यात मोलाचे योगदान मिळेल. आज देशाला गरज आहे एक आदर्श नागरिक घडविण्याची. शाळेमध्ये परिपाठामध्ये किंवा दैनंदिन उपक्रमामध्ये कळत नकळत मूल्यशिक्षण दिले जाते. पण आज मूल्यवर्धन ही तासिका असल्यामुळे विद्यार्थ्यांना मूल्य म्हणजे काय? चांगले वाईट समजायला लागले आहे.
आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या वागण्यात फरक पडला आहे. विद्यार्थी एकमेकांना सहकार्य करतात. विद्यार्थ्यांना खेळताना दुखापत झाली असल्यास प्रथोमपचार करतात. स्वच्छतेचे महत्त्व जाणून शिस्तीने वागतात. मूल्यवर्धन फक्त पहिली ते पाचवी या वर्गांपुरते मर्यादित न ठेवता बारावीपर्यंत असावे असं माझं वैयक्तिक मत आहे.
-अनिता मोहनलाल वाघमारे
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
-अनिता मोहनलाल वाघमारे
मूल्यमापनामुळे मुलांमध्ये बद्दल
मूल्यमापनामुळे मुलांमध्ये होणारा बद्दल
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला. मी प्रशिक्षण घेऊन शाळेत जाऊन नैतिक मूल्यांवर भर दिला. तेव्हापासून माझ्या लक्षात आले की, विद्यार्थ्यांमध्ये खूपच बदल घडले आहेत. उपक्रम आणि खेळाचे महत्त्व पटू लागले. विद्यार्थ्यांमध्ये सहकार्याची भावना रूजू लागली आहे. शिस्त कळू लागली आहे. कुटुंबातील लोकांबद्दल आदर वाढत आहे. मूल्यवर्धनचे फायदे सर्व गोंदिया जिल्ह्य़ात दिसून आलेले आहेत.
-अलोकराम गोवर्धन बबरीया
मूल्यमापनामुळे मुलांमध्ये बद्दल
-लोकराम गोवर्धन बबरीया
मूल्यवर्धन
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये होणारा बद्दल
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रात सुरू केला. मी प्रशिक्षण घेऊन शाळेत जाऊन नैतिक मूल्यावर भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांना मूल्यमापनाचे महत्त्व समजले. स्वच्छतेच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांच्यावर सोपविण्यात आली. स्वयंशिस्त लागली आहे. कुटुंबातील लोकांबद्दल आदर वाढत आहे. मूल्यवर्धनचे फायदे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना होत आहेत. शाळेत झालेला बदल गावातील लोकांना कळत आहे. शिक्षक, पालक व अधिकारी यांचे संबंध वाढत आहेत. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये आपुलकीची भावना रूजू लागली आहे.
-श्री. तेजराम कुसोबा बावनकर
मूल्यवर्धन
-श्री. तेजराम कुसोबा बावनकर
मूल्यवर्धन एक जीवनसंजिवणी
प्रगतीचक्र हे दिवसागणिक बदलते आणि बदललेली प्रगती ही माणसाला बदलवून टाकते. कुटुंब आणि समाज हरवून बसलेली नवीन पिढी निपजताना पाहून दुःख होतंय. पूर्वी घरून गेलेले लोक फळं घेऊन घरी यायची. हा जिव्हाळा कुठं हरवला ते शोधायला वेळ नाही, थोरांचा मान, शेजारची जाण, हरवलेला विवेक, देशाभिमान, परोपकार , मातृपितृभक्ती शोधण्याची गरज भासत असताना मूल्यवर्धन उपक्रम हा जीवन संजीवनी असल्याची जाणीव होत आहे. देशाभिमान, पर्यावरणाची जाण हे सारं एका कार्यक्रमात असा हा मूल्यवर्धन उपक्रम आहे, असे मला वाटतं.
मूल्यवर्धन हा बालमनावर संस्कार, परोपकार, राष्ट्रधर्म, राष्ट्रहित, मानवधर्म व कुटुंबवत्सलता जपणारा कार्यक्रम आहे, असे मला वाटते. सहा ते दहा वर्षे वयातील मुले, मोठ्या मांणसांना प्रेरणादायी ठरावा असा या कार्यक्रमाचा गाभा आहे. शिक्षण घेताना स्वयंशिस्त, परोपकार, सहानुभूती, विवेकपूर्ण वागणूक, देशभक्ती, देशनिष्ठा, बंधुभाव, पर्यावरणरक्षण, जलसाक्षरता असा बहुआयामी कार्यक्रम इयत्ता पहिली ते पाचवी वर्गातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संक्रमित होतो. त्यात शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे, प्रेरक, पालक, आणि पाल्य असा कार्यक्रम आमच्या हातून राबविताना देशहिताचे ठरल्याची जाणीव होते. म्हणूनच मूल्यवर्धन कार्यक्रम हा एक जीवन संजीवनी आहे असे मला वाटते. जे शाळा, परिसर, शेजार, समाज, कुटुंब, देश, पर्यावरण यांचे सोने करणारा परिस म्हणजे आजचा विद्यार्थी मूल्यवर्धन कार्यक्रमातून घडताना दिसत आहे. हे देशहितवहच वाटते. म्हणून म्हणावेसे वाटते, सातत्याची वाटचाल, सावकाश पण धेयपूर्तीची. शेवटी मी असेच म्हणेन,
ओठावरी थरतरे माझ्या, प्रार्थना एक हिच
व्हावे कधी न भगवान माझ्या हातून, कर्म नीच।।
-माणिक पांडुरंगजी बेंदवार
मूल्यवर्धन एक जीवनसंजिवणी
-माणिक पांडुरंगजी बेंदवार
.