मुलांना जाणवल्या स्वर:च्या क्षमता
मविद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखण्यासाठी वर्गामध्ये उपक्रम पुस्तिकेमधील गुणांकन तक्ता बनवून घेतला. त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन केले. मुलांनी मोठ्या उत्साहाने वस्तुनिष्ठ पद्धतीने आपल्या क्षमतेचे मूल्यमापन केले. तुम्ही तुमचे काम किती चांगल्या प्रकारे करू शकता, याचा विचार करण्यास विद्यार्थ्यांना सांगून स्वतःला 0 ते 3 गुण देण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी सदर काम करू शकतो किंवा नाही याचा विचार करून गुणांकन केले व स्वतःच्या क्षमता स्वतः ओळखल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखण्यास मदत झाली. गुणांकन झाल्यानंतर ज्या क्षमतेत त्यांना कमी गुण मिळाले त्या क्षमतेत त्यांनी वाढ करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमानंतर विद्यार्थी स्वतःची कामे स्वतः करण्यावर भर देऊ लागले. विद्यार्थी दररोज केलेल्या कामाचा तपशील वर्गात सांगू लागले. त्यामुळे त्यांच्यातील सभाधीटपणा वाढीस लागला. अधिकच्या क्षमता प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करू लागले. सदरील काम मी करू शकतो असा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागला. याप्रकारे विद्यार्थ्यांचे श्रमप्रतिष्ठा मूल्य वाढीस लागले.
-नागरगोजे जनाबाई केशव
मुलांना जाणवल्या स्वर:च्या क्षमता
-नागरगोजे जनाबाई केशव
हसत खेळत शिक्षण
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या सहाय्याने मुलांचे हसत खेळत शिक्षण सुरू झाले तसेच उपक्रमाच्या माध्यमातून विविध मूल्यांची जोपासना होऊ लागली.
सुरुवातीला पाठ्यपुस्तकांच्या आधारेच मूल्यांची रूजवणूक करावी, परंतु त्याकडे शिक्षकांकडून दुर्लक्ष होत असे. मुलांना मूल्ये समजण्यास कठीणच. परंतु मूल्यशिक्षणामुळे मुले आनंदाने शिकू लागली.
-गौतम घेवांडे
हसत खेळत शिक्षण
-गौतम घेवांडे
मूल्यवर्धनमुळे जाणवतो मुलांमध्ये बदल
मूल्यवर्धन अभ्यासक्रमामुळे मुलांमध्ये आरोग्य, शारीरिक शिक्षण आणि कला या सर्व गुणांचा विकास होण्यास खूप मदत होत आहे. त्याचबरोबर मुलांना समाजामध्ये आई-वडिलांबरोबर नाते, नातेवाईकांमध्ये कसं वागायचं, मुलांचा भावनिक त्याचबरोबर शारीरिक विकास होण्यामध्ये मूल्यवर्धनचा खूप मोठा वाटा आहे.
इयत्ता दुसरीला शिकवत असताना मूल्यवर्धन पुस्तकाचे खेळू, करू आणि शिकू असे तीन टप्प्यांमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये मुलांना कोणकोणते खेळ त्याचबरोबर कृती, आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची माहितीपण यातून होते. त्याबरोबरबर स्नायूचे दमदार खेळ, झिम्मा, लेझीम, टिपरी, लंगडी, चेंडू फेकणे यांचीही आवड निर्माण होते. सूर्यनमस्कारातून मुले व्यायामाकडे हळूहळू वळतात. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा औरंगपूरचे विद्यार्थी सूर्यनमस्कारांचे बरोबर 11 आवर्तने करू लागले. प्रत्येक शनिवारी आम्ही आणि मुले न चुकता सूर्यनमस्कार नित्यनियमाने करतो. आमच्या शाळेत झालेला हा फार मोठा बदल मूल्यवर्धनमुळे झाला असे म्हणावे लागेल. वर्गामध्ये वागताना, समाजामध्ये वागताना याची मदत होते. त्याचबरोबर विविध वस्तू बनविणे सुरु केले. इयत्ता दुसरीच्या मुलांनी खालील वस्तू बनविल्या.
मातीच्या डब्यापासून गाडी तयार केली. वस्तू आपण तयार केल्यानंतर मुलांना जो स्वतः तयार केल्याचा आनंद होतो, तो आम्ही शाळेमध्ये स्वतः पाहिला. त्याचबरोबर बांधकाम, विविध फळांची नावे, निसर्गाबद्दलची आवड निर्माण होण्यासाठी या पुस्तकांचा बराच मोठा वाटा आहे. कारण मुलांना चित्ररूपाने सर्व फुले, फळे पहायला मिळतात, त्यामुळे मुलांना निसर्गाबद्दलची उत्सुकता यामुळे सहज निर्माण होते. मुलांच्या विकासामध्ये मूल्यवर्धनचा मोठा वाटा आहे.
-संतोष महादेव राठोड
मूल्यवर्धनमुळे जाणवतो मुलांमध्ये बदल
-संतोष महादेव राठोड
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती मनोगत
मूल्यवर्धनमुळे तालुक्यातील शाळांमध्ये झालेले बदल
महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात राज्यातील 215 तालुक्यांमध्ये 1 ली ते 4 थी च्या वर्गात मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला, त्यामध्ये दुस-या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, कन्नड व मनपा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्याप्रमाणे आमच्या सोयगाव तालुक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. एकूण 16 प्रेरक व 8 केंद्रप्रमुख यांना तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले व या 16 प्रेरकांनी तालुक्यातील 8 केंद्रातील 234 शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले. यावर्षी देखील मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या कार्यक्रमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्यांची जोपासना होऊन वर्तन बदल झाले आहेत, दैनंदिन जीवनातील वर्ग नियम, स्वयंशिस्त इ. वाढीस लागून आदर्श नागरिक तयार होण्यास नक्कीच मदत होत आहे, याबरोबरच शिक्षकांमध्ये परस्पर संबंध सुधारण्यासाठी मदत होत आहे. मूल्यवर्धन उपक्रमामधून अपेक्षित बदल होऊन विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण झाली आहे. गाणी, गोष्टी, सहयोगी खेळाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणास प्रोत्साहन मिळत आहे. तालुक्यातील किन्ही, देव्हारी, पळाशी तांडा, बनोटी तांडा, नांदगाव, शिंदोल यांसारख्या अनेक शाळांमध्ये आदर्श शिक्षण प्रणाली निर्माण होण्यास मूल्यवर्धन उपक्रमामुळे मदत झाली आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या आठवड्यात तीन तासिका घेण्यात येतात, त्याचा अनुकूल असा परिणाम दिसून आला आहे. मूल्यवर्धन उपक्रमाची वर्गनिहाय विद्यार्थी व शिक्षक उपक्रम पुस्तिका आणि वर्ग उपक्रमाच्या आयोजन पुस्तिका शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या अतिशय मुद्देसूद, सोप्या व घटनात्मक मूल्यांशी सुसंगत आहेत. सदर कार्यक्रम खूप स्तुत्य असून मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा…!!!
-श्री. विजय दोतोंडे (गटशिक्षणाधिकारी, पं. स. सोयगाव, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती मनोगत
-श्री. विजय दोतोंडे (गटशिक्षणाधिकारी, पं. स. सोयगाव, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
सिल्लोड तालुक्यात सुरू असलेल्या मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणी महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथा फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2017-18 पासून राज्यात मूल्यवर्धन उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 4 तालुक्यांत हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात राज्यातील 215 तालुक्यांमध्ये पहिली ते चौथीच्या वर्गात मूल्यवर्धन कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यामध्ये दुस-या टप्प्यात औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, खुलताबाद, कन्नड व मनपा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. त्यात सिल्लोड तालुक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. एकूण 28 प्रेरक व 14 केंद्रप्रमुख यांना तालुकास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांनी 2 महिने आपापल्या शाळेत सदर कार्यक्रम राबविला. नंतर याच प्रेरकांनी तालुक्यातील 14 केंद्रातील साधारणतः 950 शिक्षकांना मूल्यवर्धन प्रशिक्षण दिले. चालू शैक्षणिक वर्षात देखील मूल्यवर्धन कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून या कार्यक्रमाने शालेय विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल झाल्याचे दिसून आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानातील मूल्यांची जोपासना होत आहे. दैनंदिन जीवनातील वर्गनियम, स्वयंशिस्त, शांतता संकेतांचा वापर इत्यादीद्वारे मूल्ये वाढीस लागून भारताचे परिपूर्ण नागरिक तयार होण्यास मदत होत आहे. याबरोबरच शिक्षक-शिक्षक, शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी-विद्यार्थी, शिक्षक-पालक व विद्यार्थी-पालक यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी मदत होत आहे. मूल्यवर्धन उपक्रमामधून अपेक्षित वर्तन बदल होऊन विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची आवड निर्माण झाली आहे. गाणी, गोष्टी, सहयोगी खेळाच्या माध्यमातून आनंददायी शिक्षणास प्रोत्साहन मिळत आहे. आठवड्यात मूल्यवर्धन उपक्रमांच्या तीन तासिका घेण्यात येतात. त्याचा अनुकूल असा परिणाम दिसून आला आहे. मूल्यवर्धन उपक्रमांच्या वर्गनिहाय विद्यार्थी व शिक्षक उपक्रम पुस्तिका आणि वर्गउपक्रमाच्या आयोजन पुस्तिका शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या अतिशय मुद्देसूद, सोप्या व घटनात्मक मूल्यांशी सुसंगत आहेत. याबरोबरच एसएमएफ तालुका समन्वयक दररोज 3 शाळांना भेटी देऊन वर्ग निरीक्षण करतात. त्यामुळे या कार्यक्रमाचा आढावा दर महिन्याला आम्हांला मिळतो. यासोबतच DIECPD औरंगाबादचे मार्गदर्शनही वेळोवेळी मिळत आहे. सदर कार्यक्रम खूप स्तुत्य आहे.
-श्री. दिलीप तुकाराम सिरसाट (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सिल्लोड, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन संकल्पपूर्ती
-श्री. दिलीप तुकाराम सिरसाट (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती सिल्लोड, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन आगळावेगळा कार्यक्रम
सर्वात अगोदर मी मुथ्था फाउंडेशनच्या सर्व मान्यवरांचे मन:पुर्वक आभार मानतो. मागील वर्षी आम्ही शिक्षक प्रेरक म्हणून सिल्लोड येथे प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण देण्यासाठी श्री. कृष्णा वराडे, गीतेताई, अपेक्षाताई, प्रितीताई यांनी जी मेहनत घेतली ती खरंच अवर्णनीय आहे. यात काय नवीन आहे असे सुरुवातीला वाटले. हे तर आपण आपल्या पातळीवर करतोच. मात्र चार दिवस पूर्ण झाल्यावर ख-या अर्थाने वाटले की, ‘नही इसमे कुछ बात जरूर है!’ आणि मग प्रत्यक्ष शाळेवर १ महिना उपक्रम राबविले आणि चमत्कार दिसायला लागला. त्यात कृष्णा सरांच्या शाळाभेटीमुळे आणखी चेतना निर्माण झाली. या अगोदर शाळेचा पट अवघा ४१ वर आला होता. त्यात गैरहजरीचे प्रमाण, अधिका-यांची नाराजी, पालकांची नाराजी हे होतेच. सर्वांनाच वाटत होते की, आता ही शाळा बंद होणार. हे ऐकून मन खूप हळहळायचं. मात्र मूल्यवर्धन रूपी जलामुळे माझ्या शाळेला एक प्रकारची संजीवनी मिळाली. मला आजही आठवते की, मी हे सर्व आमच्या प्रशिक्षण प्रमुख गीते ताईला सांगितले. त्यांनी मला विश्वासाने सांगितले, “सर तुम्ही हे उपक्रम तुमच्या शाळेत राबवा, नक्की बदल घडेल.” आम्ही ते राबविले. माझे सहकारी मित्र श्री. मनवरसर यांनी यासाठी मोलाचे सहकार्य केले. आज शाळेचा पट ५९ झाला असून गैरहजरीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मुलांना स्वयंशिस्त लागली आहे. पालकांचे सहकार्य वाढले आहे. संविधानातील मूल्ये आपसुक मुलांमध्ये रूजली आहेत. शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य दिसून येत आहे. अधिका-यांकडून आमची फार मोठी अपेक्षा असते. ते आपल्याला समजून घेतील, काहीतरी सकारात्मक मार्गदर्शन करतील, पण कधीकधी यापैकी काहीच होत नाही. त्यावेळी सांगायचं कोणाला हा मोठा प्रश्न आमच्यासमोर येतो. योग्य वेळी हा मूल्यवर्धन कार्यक्रम आला आणि तो प्रामाणिकपणे राबवला गेला. त्यामुळे पाहिजे ते बदल घडले. ‘थँक्स फॉर मूल्यवर्धन.’ सर्वात महत्त्वाचे म्हणजे इयत्तावार बनवला गेलेला हा कार्यक्रम पालकांना व विद्यार्थ्यांना फारच आवडला. आपल्या दैनंदिन अध्यापनाबरोबर राबवता येणारा कार्यक्रम आहे. यामुळे माझ्या शाळेत खरंच खूप सकारामत्मक बदल झाले आहेत. त्यामुळे उद्याचे जे भविष्य माझ्या शाळेत घडते, ते निश्चित दर्जेदार घडेल. कोणी डॉक्टर बनेल, कुणी अधिकारी बनेल, कुणी शेतकरी बनेल. ते ज्या क्षेत्रात जातील त्या ठिकाणी आदर्शच होतील यात तीळमात्र शंका नाही. या कार्यक्रमामुळे सुजाण भारत घडणारच. कारण आजपर्यंतच्या कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम आगळा वेगळा सकारात्मक परिणाम करणारा असाच आहे. बोधात्मक, भावात्मक, क्रियात्मक सर्वच पातळीवर उपयुक्त आहे. ‘वन्स अगेन थँक्स फॉर मुथ्था फाउंडेशन टिम.’
-अशोक बाबू काळे (जि. प. प्रा. शा. कोळीवाडी)
मूल्यवर्धन आगळावेगळा कार्यक्रम
-अशोक बाबू काळे (जि. प. प्रा. शा. कोळीवाडी)
मूल्यवर्धन गरजचेच
आज समाजामध्ये वावरत असताना आपणास असे दिसून येते की, पूर्वी असलेल्या संवेदनशील मनाचा, स्वतःच्या जबाबदारीचा –हास होत चाललेला आहे. मुलांमध्ये शालेय जीवनातच घटनात्मक मूल्ये पद्धतशीरपणे रुजविली तर समाजात असे चित्र दिसणार नाही. म्हणून गरज आहे मुलांमध्ये शालेय जीवनातच मूल्ये रूजविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच मूल्य रुजवण्यासाठी पूरक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची. मूल्यवर्धन कार्यक्रम अशाच प्रकारचा कार्यक्रम आहे.
घटनात्मक मूल्यांचा समावेश अभ्यासक्रमात केला असून शाळा ही उद्दिष्टे नियोजितपणे, पद्धतशीर आणि नियमित साध्य करत आहेत. तरी पण आज विभक्त होत चाललेली कुटुंबपध्दती त्याच बरोबर धावपळीचे जीवन यामुळे मुले आई, बाबा, आजी, आजोबा यांच्या प्रेमाला व संस्काराला मुकलेली आहेत. आजी, आजोबा मुलांना गोष्टी सांगत यातून मुलांना नैतिक जबाबदारीची जाणीव होत असे. आज मुलं या पासून वंचित होत आहेत. म्हणून एक पूरक कार्यक्रम म्हणून मूल्यवर्धन कार्यक्रमाची आवश्यकता आहे. मूल्यवर्धनचा हेतू शालेय अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. हा कार्यक्रम राबविल्याने मुलांमध्ये वर्तनबदल दिसून आला आहे. मुलं शालेय पोषण आहार घेताना लहान मुलांना मदत करतात. खेळामध्ये खेळाचे नियम काटेकोर पाळतात. यामुळे भांडणे होत नाहीत. शाळेतील सोयी-सुविधा वापरताना काळजी घेतात. स्वतःचे नियम स्वतः तयार करून त्यांचे काटेकोरपणे पालन करतात. विविधतेचा आदर करतात. इतरांच्या भावना समजून घेतात. याचा मी माझ्या शाळेत प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. म्हणून मूल्यवर्धन कार्यक्रम काळाची गरज आहे असे मला वाटते.
-श्रीकृष्ण पुं. बडक (जि. प. प्रा. शा. टाकावस्ती, केंद्र- के-हाळा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन गरजचेच
-श्रीकृष्ण पुं. बडक (जि. प. प्रा. शा. टाकावस्ती, केंद्र- के-हाळा, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धनचे मुलांना आकर्षण
मूल्यवर्धन पुस्तकातील गाणी, व ठिपके जोडून चित्र पूर्ण करा व रंग भरा हे मुलांना खूप आवडते. त्यामुळे मुलांना सतत मूल्यवर्धन पुस्तकाची ओढ लागली आहे.
माझ्या वर्गातील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी दिपाली अशोक जाधव ही मागच्या वर्षी वारंवार घरी राहत असे. तिच्या हातात मूल्यवर्धन पुस्तक दिले व तिला ठिपके जोडून चित्र पूर्ण करावयास सांगितले. तिला खूपच आनंद झाला. नंतर पुस्तकातील गाणी सांघिक गायल्याने तिचा उत्साह वाढला. पुढे ती नेहमी “सर ते गाण्याचे पुस्तक द्या” म्हणून आग्रह धरू लागली व शाळेत रोज उपस्थित राहू लागली.
-महेश सुभाष गावडे
मूल्यवर्धनचे मुलांना आकर्षण
-महेश सुभाष गावडे
मूल्यवर्धन एक स्तुत्य उपक्रम
मूल्यवर्धन एक स्तुत्य उपक्रम आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘मूल्यवर्धन’ कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी व शिक्षकांसाठी एक ज्ञानाची व अनुभवाची पर्वणी आहे असे वाटते. या उपक्रमांतर्गत वर्गानुसार विद्यार्थी उपक्रम पुस्तिका व शिक्षक उपक्रम पुस्तिका उपलब्ध आहेत. विद्यार्थ्याच्या वयाचा, बुद्धिमत्तेचा विचार करून सहज व सोपे उपक्रम यामध्ये आहेत. मी आणि माझे कुटुंब, मी आणि माझे नातेवाईक, मी आणि माझे जग, माझी कर्तव्ये, माझ्या जबाबदा-या अशा मुख्य उपक्रमांचे पुन्हा सोप्या सोप्या, प्रसंगातून, गोष्टीतून दिलेले अध्ययन अनुभव खूप बोलके व मनाला भिडणारे आहेत. स्वतःच्या भावभावना मांडायला विद्यार्थ्यांना मोकळा वाव मिळतो. गटकार्य करताना हुशार मुलांच्या अनुभवाचा फायदा इतरांना पण होतो. उपक्रमात प्रत्येकाला संधी दिली गेल्यामुळे मला कुठंतरी स्वीकारलं जातंय, ही भावना वाढीस लागण्यास मदत होत आहे. दररोजच्या रटाळवाण्या किंवा कंटाळा आलेल्या अध्ययनातून थोडी मुक्तता, थोडासा विरंगुळा मिळतो. अभ्यासक्रम सोपा असतो ही भावना वाढीस लागते. मुक्तोत्तरी प्रश्न दिल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागतो. एखादा प्रसंग त्यांच्यासमोर ठेऊन त्यांना ‘न्याय करा बरं’ अस म्हटलं की, सहजच जो खरा असेल त्याच्या बाजूने कौल मिळतो. असे अनेक उपक्रम यामध्ये आहेत की ज्यातून अगदी सहज व खेळतखेळत भारतीय राज्यघटनेची जी मूल्ये आहेत, गाभाभूत घटक आहेत, मानवी जीवन समृद्ध आणि सुसंस्कारीत करणारी जी नैतिक मूल्ये आहेत, ही मूल्ये रूजवण्यास व वृद्धिंगत करण्यास या मूल्यवर्धन उपक्रमाचा निश्चितच खूप मोठा उपयोग होत आहे. मूल्यवर्धनचे प्रशिक्षण देणारे सर्व प्रशिक्षक अगदी मनापासून या कार्यात मग्न झालेले जाणवते. आज जगात प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा सुरू असलेली तुम्ही आम्ही पाहत आहोत. मात्र एक क्षेत्र असे आहे, जिथं नाव अमर आणि विशाल करायला खूप मोठा वाव व संधी आहे व ते क्षेत्र म्हणजे ‘माणुसकीचे क्षेत्र’ माणसाने माणसाशी माणसासम वागायला शिकवणारे हे क्षेत्र म्हणजे मूल्यवर्धनचे व्यासपीठ. या व्यासपीठाचे निर्माते कर्मवीर, माणसात खरा संत म्हणून शोभून दिसणारे, सलग तीन वेळा पुण्यभूषण पुरस्कार प्राप्त झालेले, उदारमतवादी, असंख्य अनाथाचे नाथ असलेले आदरणीय श्री. शांतिलाल (भाऊ) मुथ्था व त्यांच्या मूल्यवर्धनच्या सर्व टीमला विनम्र अभिवादन व मानाचा त्रिवार मुजरा. ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती.’
-मोतीराम ना. जोहरे (केंद्रप्रमुख- सोयगांव)
मूल्यवर्धन एक स्तुत्य उपक्रम
-मोतीराम ना. जोहरे (केंद्रप्रमुख- सोयगांव)
मूल्यवर्धन कार्यक्रम सर्व सर्वांना उपयोगी
आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मी मूल्यवर्धन पुस्तिकांचा उपयोग केला. विद्यार्थी आनंदाने अध्ययन करू लागले. त्यांच्यात नितीमूल्ये रुजण्यास सहजता आली. तसेच विद्यार्थी आनंदाने शिकू लागले.
मूल्यवर्धन सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना असावे असे वाटते.
-दीपक राजकिसनराव बोर्डे
मूल्यवर्धन कार्यक्रम सर्व सर्वांना उपयोगी
-दीपक राजकिसनराव बोर्डे
मूल्यवर्धनरूपी नावेतून प्रवास करताना माझ्या शाळेचा झालेला विकास
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणी, केंद्र- नवगाव येथे मूल्यवर्धन उपक्रमाचे नियमित आयोजन केले जाऊ लागले. शिक्षकांना कृतीद्वारे प्रत्यक्ष मार्गदर्शनाचा व विद्यार्थ्यांत मूल्ये रूजवण्यासाठीचा सुलभ मार्ग निर्माण झाला.
१) भूमिका बदल: – या कार्यक्रमामुळे माझी भूमिका नकळत बदलत गेली. विद्यार्थी-शिक्षकांच्या नात्याची वीण घट्ट होण्यास मदत झाली.
२) निर्णयक्षमता वाढ: – समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थी-विद्यार्थी आंतरक्रियेत वाढ, सर्वसमावेशकता, एकत्र विचार, समान संधी, नियोजनाची सवय, परिस्थितीनुसार निर्णय क्षमतेत वाढ या बाबी उपक्रमांचे आयोजन केल्याने झाल्या.
३) बहुवर्ग अध्यापनासाठी उपयुक्त: उपक्रम बहुवर्ग अध्यापन करताना खूप उपयोगी पडत आहेत. वेळेच्या नियोजनासोबत विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकासासाठी पूरक आहेत. वर्गनियम, शाळानियम यामुळे विद्यार्थी समज, शिस्त यातील बदल परिणामकारक झाला. यातील वाचणारा वेळ उपक्रमासाठी लावला
४) प्रत्यक्ष अनुभव: समस्या सोडविण्यासाठी निरीक्षण, उपलब्ध वेळ, साधने, नियोजन, सांघिक कार्य यामुळे प्रत्यक्ष अनुभव मिळू लागले. अनुभवांतून मिळालेले ज्ञान चिरकाल लक्षात राहण्यासाठी उपयोग झाला. या उपक्रमांमुळे मूल्ये रूजली. या अदृश्य बदलाला परिणाम स्वरूप प्रत्यक्ष बदल हेच खरे यश मानावे लागेल.
-अमृता भुमरे
मूल्यवर्धनरूपी नावेतून प्रवास करताना माझ्या शाळेचा झालेला विकास
-अमृता भुमरे
लेकीने वाचवले प्राण
मूल्यवर्धनमधील सुरक्षितता उपक्रमामुळे विजेच्या प्रवाहाच्या तारेपासून वेगळे करून कन्येने पित्याचे प्राण वाचविले.
1 फेब्रुवारी 2019 सायंकाळी 7.०० ची वेळ होती. शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील शिवाजीनगर परिसर नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. अचानक मोठा आवाज आला, “माझ्या पप्पाला वाचवा, माझ्या पप्पाला वाचवा …” लोक तिकडे धावले. बघतात तर घरात डोंगरे नावाचे गृहस्थ जमिनीवर निपचित पडले होते. त्यांच्या तोंडातून फेस गळत होता. त्यांना विजेचा जोरदार झटका लागला होता. टी.व्ही. बंद करताना पिनच्या उघड्या वायरला स्पर्श झाला आणि ते चिकटले. घरात फक्त त्यांची 10 वर्षांची मुलगी प्रतिक्षा आणि लहान भावंडे होती. भल्याभल्यांना घाम फोडणारा हा प्रसंग. कोणत्याही व्यक्तीला विजेचा झटका लागला तर त्याला स्पर्श न करता लाकडाच्या वस्तूने त्या व्यक्तीला विद्युत प्रवाहापासून वेगळे करावे हे आयएसओ मानांकित प्रा. शा. शिवाजीनगर मध्ये शिकणा-या प्रतिक्षाला वर्गात मूल्यवर्धन तासिकेला सांगितलेले त्याक्षणी आठवले. याबद्दलचे प्रात्यक्षिक मॅडमने दाखवले होते. तसे तिने केले. धावतच प्रतिक्षा चुलीजवळ गेली आणि ठेवलेल्या लाकडांमधील एक लाकूड घेऊन वडिलांचा अंतकाळ ठरू पाहणा-या विजेच्या तारेवर प्रहार केला. त्याबरोबर वडील प्रवाहापासून वेगळे झाले आणि जमिनीवर पडले. मग प्रतिक्षाने बाहेर जाऊन लोकांना बोलावले. लोकांनी प्रथमोपचार करून त्यांना औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. 25 दिवसांच्या उपचारानंतर आणि विजेला चिटकलेले बोट काढून टाकल्यानंतर रवींद्र डोंगरे घरी परतले. शाळेत मिळालेल्या मूल्यवर्धनच्या पाठातील ज्ञानाच्या आधारावर एका बेटीने आपल्या वडिलांना जीवदान दिले. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ, तब ओ हमे बचायेगी’ हे सार्थ करून दाखविले.
-गितांजली श्रीरंग बेदरे (वर्गशिक्षिका व मुख्याध्यापक, प्रा. शा. शिवाजीनगर, केंद्र- कुंभेफळ, ता. जि. औरंगाबाद)
लेकीने वाचवले प्राण
-गितांजली श्रीरंग बेदरे (वर्गशिक्षिका व मुख्याध्यापक, प्रा. शा. शिवाजीनगर, केंद्र- कुंभेफळ, ता. जि. औरंगाबाद)
मुले एकत्र आली
मुलांतील मतभेद कमी होऊन ती एकत्र आली व आता प्रत्येक उपक्रमात ती सहभागी होतात. माझ्या शाळेत सुरुवातीला दोन गट होते. ते आर्थिक विषमता व जात यामुळे तयार झालेले होते.
जेवण, खेळणं, उपक्रम असा कोणताही भाग असेल तिथे ही गटबाजी प्रकर्षाने जाणवायची. मनात खूप चलबिचल होत होती. ब-याचवेळा गोडीने सांगून, रागावून, शिक्षा करूनही फारसा बदल दिसून आला नाही. त्यामुळे मनात एक प्रकारची निराशा आली होती. परंतु मूल्यवर्धनमुळे बदल घडण्यास मदत झाली. आता माझी सर्व मुले सोबत जेवतात, खेळतात, अनेक उपक्रमांत सहभागी होतात. त्यांच्यातील हा बदल कौतुकास्पद आहे. आम्हांलाही यातून नवीन दृष्टी मिळाली आहे. मूल्यवर्धनमधील प्रत्येक उपक्रम खूपच विचारपूर्वक, अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक आहे. त्यामुळे यश नक्कीच लाभते.
-श्रीम पाटील अनुराधा अशोकराव (जि. प. प्रा. शा. उचलती वस्ती)
मुले एकत्र आली
-श्रीम पाटील अनुराधा अशोकराव (जि. प. प्रा. शा. उचलती वस्ती)
मूल्यवर्धन उपक्रमांतून मला आलेला अनुभव
एक पौर्वात्य म्हण आहे की, ‘जर वर्षभराचं उद्दिष्ट असेल तर फुले फुलवा. दशकभराची योजना असेल तर झाडे लावा आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचे असेल तर माणसं घडवा.’ माणूस घडविण्याचे कार्य अगदी लहानपणापासूनच सुरू होते. बालकांचे कुटुंब आणि त्याची शाळा हे कार्य सर्वोत्तम करू शकते. उद्याच्या भावी पिढीतील नैतिकता, नीतिमूल्ये यांची जपवणूक करणे अशा जबाबदा-या शिक्षकांवर आहेत. बालकांचे भविष्य उज्ज्वल घडवायचे असेल तर त्यांचा वर्तमान कसा आहे आणि तो कसा घडवायचा हे बघावे लागेल. आज विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत असताना तो योग्य दिशेने जात आहे का हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक शाळेत शैक्षणिक वातावरण सकारात्मक दिसून येते. असे चांगले बदल दिसू लागले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवून आणायचे असतील तर आपल्यालाही आपल्या मानसिकतेत बदल हा करावाच लागणार,हे मनापासून स्वीकारले पाहिजे. आज प्राथमिक शिक्षण बालस्नेही, आंनददायी झाले आहे. त्यातच गेल्या 3 वर्षांपासून शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने इयत्ता पहिली ते चौथीसाठी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उपक्रम पुस्तिका तयार केल्या आहेत. या उपक्रम पुस्तकांतील उपक्रम हे अतिशय चांगले, उपयुक्त आणि आनंददायी आहेत. या उपक्रमांतून शिक्षक आणि विद्यार्थी यांना एक चांगली संधीच मिळाली आहे, असे म्हणायला हरकत नाही. यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतच होत आहे. विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या क्षमता कोणत्या आहेत आणि त्या कशा प्रकारे विकसित करायच्या याविषयी माहिती मिळाली. शाळा, कुटुंब, समाजामध्ये आपला सहभाग कसा आहे, आपल्या जबाबदा-या कोणत्या आहेत हे देखील कळते. माझे नातेसंबंध मग ते माझे घर असेल, माझी शाळा असेल किंवा माझा सभोवतालचा असणारा परिसर असेल या सर्व घटकांतील प्रत्येक व्यक्तीशी माझा संबंध कसा असावा याचीदेखील कळत नकळत जाणीव होते. या उपक्रमांचे आयोजन करत असताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी होऊन त्यांचे नाते अधिक दृढ व घट्ट होण्यास मदत होऊ लागली. वर्गात घेतलेल्या उपक्रमांची घरी विद्यार्थी आपल्या आई, बाबांशी चर्चा करतात. माझ्याकडे इयत्ता पहिली व दुसरीचा वर्ग आहे. मागच्या वर्षी इयत्ता दुसरीच्या वर्गात ‘धन्यवादाचे कार्ड’ हा उपक्रम घेत असताना विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपल्या घरातील जे कुणी तुमची काळजी घेतात त्यांना धन्यवादाचे कार्ड तुम्ही तयार करा, असे सांगितले तेव्हा विद्यार्थ्यांनी आम्ही आमच्या आईसाठी कार्ड तयार करणार आहोत कारण ती दिवसभर काम करत असते, आमचा डबा करून देते, आम्हांला शाळेत आणून सोडते, त्यामुळे आम्ही तिच्यासाठी कार्ड तयार करणार आहोत असे सांगितले. विद्यार्थ्यांनी कार्डदेखील तयार केले. वर्गात त्यावेळी इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ही चर्चा ऐकत होते. त्यांनी आमच्या चर्चेत कधी सहभाग घेतला हे माझ्याही लक्षात आले नाही. इयत्ता पहिलीच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या आईविषयी एक एक वाक्य का होईना पण ते सांगितले. ते बोलते झाले. दुस-या दिवशी पहिलीच्या वर्गातील समर्थ रामेश्वर पवार या विद्यार्थ्याची आई त्याला शाळेत सोडायला आली आणि मला म्हणाली, “मॅडम समर्थ काल घरी आला आणि मला म्हणू लागला की, आई तू दिवसभर काम करते. आज तू भांडी घासू नको, आज मीच भांडे घासतो. मलाही कळले नाही बाई आज हा अचानक असा का म्हणू लागला. तेव्हा मी त्याला विचारले की तू आज का भांडी घासतो? तेव्हा तो मला म्हणाला, तू आमच्यासाठी खूप काम करते ना, म्हणून मी तुला मदत करतो.” हे सांगत असतानाच त्या माऊलीच्या डोळ्यात अश्रू आले. हा अनुभव छोटा आहे, पण त्या छोट्या मुलाला आपली आई दिवसभर काम करून थकते, तिला आपण मदत करावी हे कळाले, हेच खूप महत्त्वाचे आहे. अशाच छोट्या छोट्या कृतीतून विद्यार्थ्यांमध्ये मूल्याची रुजवणूक होत आहे.
-थाले अलका रावसाहेब (जि. प. प्रा. शा. लाडगाव, केंद्र- कुंभेफळ, ता. जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन उपक्रमांतून मला आलेला अनुभव
-थाले अलका रावसाहेब (जि. प. प्रा. शा. लाडगाव, केंद्र- कुंभेफळ, ता. जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन एक नवसंजीवनी
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे ग्रामीण शाळांचा नक्कीच विकास झालेला आहे हे आपल्याला मान्य करावे लागेल. मूल्यवर्धन कार्यक्रमाचे हे फलित आहे, असे मी मानतो. मूल्यवर्धन कार्यक्रमाने एक नवसंजीवनी जिल्हा परिषद शाळांना दिली आहे.
क्षमता विकासाबरोबरच मुलांची कौशल्ये आणि नैतिक मूल्ये जोपासणारा आणि त्यात आवश्यक बदल करणारा मूल्यवर्धन महत्त्वाचा घटक आहे. आज राज्य सरकारला मूल्यवर्धन प्रशिक्षण शिक्षकांना देण्याची गरज का भासते आहे, हा विचार करण्याचा भाग आहे. शाळेमध्ये किंवा अभ्यासक्रमानुसार ही मूल्ये शिक्षणासोबत विकसित व्हायला हवीत. परंतु तसे होताना दिसत नाही. याला जबाबदार कोण? शिक्षक की पालक? कारण मुले सात ते आठ तास शिक्षकांच्या ताब्यात आणि बाकीचे तास पालकांच्या ताब्यात असतात. त्यामुळे शाळेत सर्व बाबतीत उजवा असणारा मुलगा घरी योग्य वागत असेल, असे मला वाटत नाही. कारण पुढे शिक्षक दिसतात म्हणून त्यात तो बदल होत असेल. परंतु बंधने नसतात. शिस्त म्हणावी तशी पाळली जात नाही. त्यामुळे ही मूल्ये मुलांमध्ये रुजण्यासाठी पालक तसेच शिक्षकांनी तत्पर राहून वेळीच मुलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.
आता आपण मूल्यवाढीसाठी कारणीभूत लहानसहान गोष्टी पाहू. तसेच या कार्यक्रमामुळे शिक्षक आणि पालक यांची बदलेली मानसिकता पाहू. आता शिक्षक किती सहजतेने आपल्या समस्या यातून सोडवू लागले आहेत.
१) माझ्या शाळेतील इयत्ता तिसरीत शिकणारा इस्लाम शाळेत येताना दररोज उशिरा येतो. कारणेही वेगवेगळी सांगतो. वेळेत न आल्यास अभ्यास बुडतो. नंतर तो भाग सर शिकवणार नाहीत. बाकी सर्व मुले पुढे जातील. तू मागे राहशील. ते तुझी चेष्टा करतील. वडिलांना कळले तर तुला मार मिळेल. वक्तशीरपणाचे महत्त्व सांगणा-या गोष्टी उदा. आलेक्झांडरच्या विजयाचे वेळेचे गणित इत्यादी.
२) जवेरिया इयत्ता पाहिलीत शिकणारी मुलगी घरी दिलेला अभ्यास एकदाही करत नाही. बहुदा घरी काहीच अभ्यास करत नाही.
केलेले उपाय- पालकभेट घेऊन तिला अभ्यासाची गोडी लागावी म्हणून काही दिवस तिच्याबरोबर बसून तिचा अभ्यास करून घेणे, मोठ्या भावाबरोबर तिलाही अभ्यास करण्यास सक्तीने सांगणे. अभ्यासाने आपल्यापुढील अडचणी कशा प्रकारे दूर होत जातात हे पटवणे. उदा. तुला शाळेत शिकवलेले पैसे समजले नाहीत तर दुकानात तुला किती पैसे द्यायचे समजायचे नाही. ३) साहिल इयत्ता चौथीत शिकणारा हुशार मुलगा आहे, परंतु लवकर अभ्यास दाखवायचा म्हणून हस्ताक्षर खराब काढतो.
उपाय- खराब हस्ताक्षर कोणीही वाचत नाही. सर्वांना नीटनेटकेपणा आवडतो. समजा तुझ्या घरासमोर घाण आहे आणि जमिलचे घर स्वच्छ आहे, तर अल्ला कोणाकडे राहील तूच सांग. असेच आहे. आपल्याला सर्व येते, पण आपण खराब अक्षर काढले तर आपण लिहिलेले वाचणार कोण? अशा अनेक नानाविध प्रकारच्या समस्यांना शिक्षक, पर्यायाने मुले तोंड देत असतात. आपल्याला यातील काही समस्या माहितीसुध्दा होत नाहीत. पुढे त्या मुलांसाठी खूप त्रासदायक होतात. त्यामुळे शिक्षक आणि पालकांनी जागरूक राहून, एकमेकांच्या संपर्कात राहून या समस्या लवकरात लवकर सोडविणे खूप गरजेचे आहे. नाहीतर त्या वेगळेच रूप धारण करतील आणि विद्यार्थी हाताबाहेर जाईल. आज चालू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मूळ हेतूच मूल्यानुरुप शिक्षण असा आहे. मला अभिमान वाटतो की, आमच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये हा कार्यक्रम खूप उत्कृष्ठरित्या आमचे सहकारी शिक्षक राबवत असतात. या कार्यक्रमाने एक नवसंजीवनी शाळांना दिली आहे, यात शंका नाही. यासाठी मूल्यवर्धन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे खूपखूप आभार. त्यांना पुढील कार्यासाठी खूपखूप शुभेच्छा !
-श्री. सुजित फलके (जि. प. प्रा. शा. गोविंदनगर, केंद्र- बनोटी, ता. सोयगाव जि. औरंगाबाद
मूल्यवर्धन एक नवसंजीवनी
-श्री. सुजित फलके (जि. प. प्रा. शा. गोविंदनगर, केंद्र- बनोटी, ता. सोयगाव जि. औरंगाबाद
मूल्यवर्धनातून संस्कार
मुथ्था फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झालेले विद्यार्थ्यांमधील बदल कौतुकास्पद आहेत.
जि. प. प्रा. शा. गेवराई ब्रुक, केंद्र- पंढरपूर, ता. जि. औरंगाबाद याठिकाणी नेहमीच आम्ही विविध उपक्रम घेत असतो. त्यातून मुथ्था फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कौतुकास्पद बदल झाले आहेत. आमच्या शाळेतील एक प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो. सकाळच्या सुंदर वातावरणात नेहमीप्रमाणेच शाळेचा परिपाठ झाला. त्यानंतर सर्व मुले रांगेत वर्गात गेली. दररोजच्या सवयीप्रमाणे प्रत्येक वर्गातील विद्यार्थी आजच्या तारखेप्रमाणे पाढा लिहिण्यात मग्न झाले. आम्ही सर्व आपआपल्या वर्गात जायला निघालो, इतक्यात इयत्ता तिसरीतील शिवानी नावाची चिमुकली ऑफिसमध्ये आली व आपले वर्गशिक्षक श्री. धामणे सरांकडे धावत गेली. हातात वीस रूपयांची नोट असलेली ही गोड मुलगी सरांना म्हणाली, “सर मला हे पैसे सापडले.” आम्हा सर्वांना आश्चर्य वाटलं. “कुठे सापडले?” असं विचारलं असता ती म्हणाली, “आम्ही रांगेत वर्गात गेलो तेव्हा मला माझ्या दप्तराजवळ ही नोट पडलेली दिसली व मी ती घेऊन तुमच्याकडे आले.” चॉकलेट, बिस्किट, गोळया खाण्याचं हे बालमन. पण तरीही मनात कोणताही अविचार न येता तिनं ते पैसे सरांना आणून दिले. याचे कारण मूल्यवर्धनातून विद्यार्थ्यांवर अनुभवातून, गोष्टीरूपाने, गाण्यातून, चर्चेतून होणारे संस्कार हे आहे. शिवानीच्या या प्रामाणिकपणाचे मुख्याध्यापकांनी सर्वांसमोर बक्षीस देऊन कौतुक केले. सर्व शिक्षकांनी तिची पाठ थोपटली. सर्वांनी असेच प्रामाणिकपणे वागावे असा संदेश दिला.
-अविनाश पाटील
मूल्यवर्धनातून संस्कार
-अविनाश पाटील
मूल्यवर्धन उपक्रमामुळे झाले विद्यार्थ्यांमध्ये वर्तनबदल
मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत “आपण झाडे कशी वाचवू शकतो?” हा घटक विद्यार्थ्यांना शिकविला आणि त्या घटकाचा मुलांच्या मनावर इतका परिणाम झाला की ⏩आमच्या वर्गातील नेहमी कागद फाडणारा विद्यार्थी लखन चव्हाण याने वहीचे कागद फाडणे तर बंद केलेच उलट तो इतर वर्गातील विद्यार्थ्यांना ‘कागद फाडू नका’ असे सांगायला लागला. आता आमच्या शाळेतील मुले कागद फाडत नाहीत. वहीचा काटकसरीने उपयोग करतात आणि कागदांचे व झाडांचे महत्त्व इतरांना समजावून सांगतात. या घटकामुळे ‘एक मूल एक झाड’ हा उपक्रम आम्ही राबविला. विद्यार्थ्यांनी झाडांना राखी बांधून त्यांच्या संवर्धनाची शपथ घेतली. मुले आता आपापल्या झाडांना नियमित पाणी टाकून त्यांची काळजी घेतात.
-योगेश नारायण पाटील (प्रा. शा. बनोटीतांडा, ता. सोयगाव.)
मूल्यवर्धन उपक्रमामुळे झाले विद्यार्थ्यांमध्ये वर्तनबदल
-योगेश नारायण पाटील (प्रा. शा. बनोटीतांडा, ता. सोयगाव.)
मूल्यवर्धन उपक्रम व मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास
मूल्यवर्धन कार्यक्रमाने विद्यार्थी व शिक्षक यांना दिशा मिळाली. व्यक्तिमत्त्व विकासाकडे वाटचाल सुरु झाली.
जगाच्या स्पर्धेत तंत्रज्ञानाचा बेसुमार वापर व बदलत जाणारे जग आपण अनुभवतोय, पाहतोय. त्या अनुषंगाने बदलत जाणारी सामाजिक मूल्ये, भावनिक नातेसंबंध गुंतागुंतीचे होताना दिसताहेत. विभक्त कुटुंबे, अर्थार्जनाकरिता दिवसभर घराबाहेर असणारे पालक अशा स्थितीत मूल्यांची रूजवणूक कशी व्हावी हा गहन प्रश्न समोर उभा ठाकला आहे. या बाबीचे गांभीर्य व महत्त्व लक्षात घेऊन शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रमाची रूपरेषा आखून ही जबाबदारी आम्हा शिक्षकांवर मोठ्या विश्वासाने सोपविली. आम्ही शिक्षक म्हणून मागील तीन वर्षांपासून मूल्यवर्धनद्वारे आमच्या विद्यार्थ्यांमध्ये नकळतपणे मूल्ये रूजविण्याचे कार्य करीत आहोत. मूल्यवर्धन पुस्तिकेत वर्गनिहाय उपक्रम दिलेले आहेत. यातील गटचर्चा, सहयोगी खेळ, प्रश्नावली, बुद्धिपूरक उपक्रम, प्रेरणादायक कथा, लेखन, गटकार्य, वर्गातील व वर्गाबाहेरील कृतींची रेलचेल आहे. मूल्यवर्धन राबवताना मला मुलांमध्ये खालील बदल प्रकर्षाने जाणवले.
1) विद्यार्थ्यांमध्ये स्वत्वाची जाणीव झाली. स्वत:ची मते, आवडीनिवडी, छंद, मित्र, कुटुंब इत्यादी विषयी मनमोकळेपणाने ते व्यक्त होऊ लागले. स्वत:ची जबाबदारी ओळखू लागले. आत्मविश्वास वाढीस लागला.
2) सहयोगी खेळांमुळे सहकार्याची भावना वृद्धिंगत झाली. याचा उपयोग अध्ययन-अध्यापनात झाला. आपला मित्र/मैत्रिण अभ्यासात मागे राहू नये यासाठी धडपड सुरु झाली.
3) विद्यार्थी कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा करू लागले. एका मुलीच्या मनात अशी भावना होती की, आपले आजोबा चुलतबहिणीचा लाड आपल्यापेक्षा जास्त करतात. आजोबांना विश्वासात घेऊन हे सांगितले तर त्यांचे नातेसंबंध सुधारले.
4) सुरुवातीला भांडणे, एकमेकांना चिडवणे हे प्रकार खूप होते. ते कमी झाले.
5) किरकोळ समस्या वर्गात किंवा गटात सोडविण्याची सवय लागली.
6) बुद्धिवर्धक खेळांमुळे बौद्धिक पातळी वाढली. मूल्यवर्धन हा आवडीचा विषय बनला.
7) मूल्यवर्धन पुस्तिकेत काही वास्तव जीवनातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची ओळख आहे. त्यामुळे प्रेरणा मिळते.
8) स्वच्छता, स्त्रीपुरुष समानता, बंधुत्व, पर्यावरण जागृती, सहिष्णुता, प्रामाणिकपणा, मोठ्यांविषयीचा आदर, भुतदया, आरोग्याची जाणीव इत्यादी मूल्ये कृतींतून दिसतात. विशेष म्हणजे अगदी नकळतपणे ही रुजली.
-जागृती ढोकले
मूल्यवर्धन उपक्रम व मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास
-जागृती ढोकले
शाळेचे नियम
मूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत मी आमच्या शाळेतील इयत्ता दुसरीच्या वर्गातील ‘शाळेचे नियम’ आणि ‘घरचे नियम’ हा घटक विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक स्वरूपात करून घेतला. त्याचे खालीलप्रमाणे फायदे झाले.
मूल्यवर्धन हा एक मुथ्था फाउंडेशनचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या अंतर्गत मी माझ्या शाळेतील सर्व वर्गांतील सर्व घटक व उपक्रम सर्व मुलांकडून करून घेतले. त्यामुळे माझ्या शाळेतील मुलांच्या वागण्यात, बोलण्यात खूप मोठा फरक पडलेला मला दिसून आला. माझ्या शाळेतील मुलांमध्ये झालेला महत्त्वपूर्ण बदल मी या ठिकाणी नमूद करीत आहे. ‘शाळेचे नियम’ हा घटक जरी दुसरीच्या मुलांसाठी असला, तरी त्याचे फायदे सर्व वर्गातील मुलांना होतील म्हणून मी सर्वांना सोबत घेऊन हा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे आमच्या शाळेतील सर्व मुलांना शिस्त लागली. कारण हे सर्व नियम मुलांनी स्वतः तयार केलेले असल्याने ते सर्व नियम पाळण्याची जबाबदारीही त्यांनीच घेतली आणि मुले स्वतः ते सर्व नियम पळू लागले. त्याचा खूप मोठा फायदा आमच्या शाळेला झाला. कधी शिक्षक आणि एखाद्या विद्यार्थ्याकडून नियमाचे उल्लंघन झाले तर इतर विद्यार्थी त्या नियमांची आवर्जून आठवण करून देऊ लागले. अशाप्रकारे मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्व मूल्ये रूजण्यास मदत झाली. देशाचा सुजाण आणि सुसंकृत नागरिक शाळेतून घडवणे सहज शक्य झाले.
-संदीप आदमाने
शाळेचे नियम
-संदीप आदमाने
मूल्यवर्धन उपक्रमाचे फायदे
आम्हांला 13-12-2018 ते 15-12-2018 दरम्यान मूल्यवर्धनचे प्रशिक्षण मिळाले.
दैनंदिन जीवनाशी संलग्न असलेले इयत्तानुसार उपक्रम अतिशय चांगले व उपयुक्त वाटले. सामाजिक जाणीव, वैयक्तिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, जबाबदारी यांची माहिती प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना मिळते. उपक्रमांमुळे विद्यार्थी आनंदी होऊन शिकतात. हसतखेळत काम पूर्ण करतात. त्यांच्यात एकीची भावना जागृत होते. तासिकेत उत्साहपूर्ण वातावरण असते. चांगला नागरिक घडवण्यासाठी मूल्यवर्धन हातभार लावते, असे मला वाटते. मदतनीस, सुलभक, सल्लागार व मार्गदर्शक म्हणून शिक्षक भूमिका पार पाडतात.
-वैशाली सुरडकर
मूल्यवर्धन उपक्रमाचे फायदे
-वैशाली सुरडकर
आत्मविश्वास
मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. मागे राहणारी मुले पुढे आली.
मुलांना शिस्त लागली. ते वर्गनियम इतरांना सांगू लागले. स्वत:बद्दलची माहिती सांगू लागले. पुस्तकांमुळे दिशा मिळते. आदर्श भावी नागरिक बनण्यासाठी मूल्ये गरजेची आहेत. मुले. स्वत:हून म्हणतात की, टिचर आपण हे आधी ते नंतर घेऊ. म्हणून मी मुलांना प्राधान्य देते.
-सुनिता ढोरमले
आत्मविश्वास
-सुनिता ढोरमले
मूल्यशिक्षण काळाची गरज
आजच्या इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या दुनियेमध्ये संस्कारांपासून वंचित झालेला प्रत्येक बालक आपणास दिसून येतो. संस्कार, आदर, जीवनाची मूलभूत तत्त्वे इत्यादी गुणांपासून पूर्णता मुकलेला दिसतो. याची जबाबदारी माता, पिता, समाज आणि त्याच बरोबर अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे शिक्षकावर आहे. म्हणून मी शिक्षक या नात्याने मूल्यशिक्षणाचे अनुभव कथन करतोय.
विद्यार्थी हा ज्ञान सागरात पोहणारा राजहंस आहे. अहो, ज्ञानसागर म्हणजे संस्कारांचा अंतर्भाव असलेला महासागर आहे. विद्यार्थी सुसंस्कारित करण्याचे पवित्र ज्ञानमंदिर शाळा आहे. मी आमच्या शाळेत परिपाठाच्यावेळी बोधकथा, हरवले ते सापडले हा नाविन्यपूर्ण उपक्रम, जेवणाच्या वेळी श्लोक असे नानाविध उपक्रम घेत असतो. हरवले ते सापडले उपक्रमांतर्गत कोणतीही हरवलेली वस्तू विद्यार्थी प्रामाणिकपणे आणून देतात. अशा विद्यार्थ्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांना शाबासकी म्हणून छोटसं फूल, पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येते. आरोग्य ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांकडून घरी दररोज योगा करून घेणे, परिपाठात योगा घेणे, दररोज सकाळी आंघोळीनंतर वडीलधा-यांचे दर्शन घेणे यासाठी आपल्या मुथ्था फाउंडेशनचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रम पुस्तिकेतून प्राप्त झाले. यापेक्षा सर्वात मोठं भाग्य कोणतं? वर्गातील एखादा विद्यार्थी खोटे बोलला तर इतर मुले शिक्षकांकडे येतात आणि म्हणतात, “सर आपण त्या पुस्तकातून शिकलोय खोटं कधी बोलायचं नाही. हा कसा खोटं बोलतोय बघा ना!” म्हणजे मूल्यवर्धन पुस्तिकेचा उपयोग बालकांना शाळेतच नव्हे तर घरी, समाजात पूर्णपणे होतोय. बुद्धीच्या कॅमे-यात विचारांचा रोल घालून प्रयत्नांचे बटन दाबले असता मूल्यवर्धनचा फोटो आपोआपच निघतो. केवळ मूल्ये शिकवून उपयोग नाही. मूल्यांचे उपयोजन झालेच पाहिजे. आज आमचे विद्यार्थी मूल्यांचे उपयोजन मुथ्था फाउंडेशनच्या अभिनव कार्यक्रमामुळे करत आहेत. यासाठी आमच्यापर्यंत पोहचलेले सन्माननीय श्री. सोनवणे सर यांचे मोलाचे योगदान आणि सहकार्य आम्हांला लाभले, हे विसरून चालणार नाही. पावसाचा थेंब समुद्रात पडला की विरतो. कमळाच्या पानावर पडला की चमकतो. शिंपल्यात पडला की मोती बनतो. फरक फक्त सहवासाचा आहे. मोठे झाल्यावर मूल्ये आत्मसात करायची म्हटल्यावर ‘पी हळद आणि हो गोरी’ या म्हणीप्रमाणे मूल्यांची गोळी घेतल्यावर ती अंगिकारली जात नाहीत. बालपणापासून ज्याचे बीजारोपण झाले, तेच मोठे होऊन छाया देण्याचे कार्य करते. फूल हे फूल असते. ते सुंदरतेचे प्रतीक असते. आपल्या सुगंधाने मात्र ते सतत दरवळत असते. असेच मूल्यशिक्षण घेऊन भविष्यामध्ये ही फुले सदोदित दरवळत राहोत, अशी सदिच्छा. मी मुथ्था फाउंडेशनने दिलेल्या अभिनव प्रकल्पाच्या माध्यमातून व्यक्त करतो. आपल्या या उपक्रमास शतशः प्रणाम.
– अनिल शहाणे
मूल्यशिक्षण काळाची गरज
– अनिल शहाणे
जबाबदार नागरिक घडविण्याकडे मूल्यवर्धन उपक्रमाची वाटचाल.
शाळेत घेत असलेल्या मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल होताना दिसत आहेत.
मूल्यवर्धन हा कार्यक्रम लोकशाहीस पोषक असा आहे. कारण भारतात आदर्श सुसंस्कारीत नागरिक असतील तरच मूल्यांची जपणूक होऊन एक आदर्श प्रगतीशील भारताचे चित्र दिसेल. शांततेच्या मार्गाने वाटचाल केली तर कुठल्याही प्रकारचे आर्थिक, सामाजिक नुकसान न होता भारतात शांतता आबाधित राहील. मूल्ये ही शिकवली जात नाहीत तर ती रूजविली जातात. मग ती गोष्टीतून, कथेतून, चित्रातून, प्रत्यक्ष कृतीतून किंवा सांगितलेल्या अनुभवातून ती रूजविली जातात. लहान मुलांचे मन हे अतिशय संस्कारशील असते. त्यामुळे हे मूल्यांचे बीज त्यांच्यात एकदा का रूजले तर भविष्यात एक आदर्श नागरिकाचे चित्र त्यांच्यात नक्की दिसेल. उपक्रम पुस्तिकेत ज्या कथा, अनुभव सांगितले आहेत त्यातून चांगले वाईट परिणाम नकळत मुलांच्या मनावर बिंबवले जातात. त्यातून चांगल्या वाईट परिणामांची जाणीव मुलांना होते. या उपक्रमांमधून प्रामाणिकपणा, सहकार्य वृत्ती, शांतता, संयम, सर्वधर्म समभाव, जिद्द, चिकाटी हे गुण विकसित व्हायला लागले. महत्त्वाचे म्हणजे दुस-या विषयांचे अध्यापन करतानाही या उपक्रमांची मदत व्हायला लागली. मुलांच्या ठायी असलेला ‘मीपणा’ जाऊन ‘आम्ही’ ही संकल्पना दृढ होत आहे. आतापर्यंत एकमेकांना खेचून पुढे जाण्याचे प्रमाण कमी होऊन सर्वांना सोबत घेऊन उचित ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे साहजिकच आपसातील भेद विसरून ‘आम्ही सर्व एकच’ ही ‘एकतेची भावना’ या उपक्रमांतून वाढीस लागली. या उपक्रमातून मुलांच्या वर्तनात बदल दिसून आले. शाळेविषयीची भीती कमी होऊन सहयोगी खेळांमुळे मुलांना शाळेत येण्याची आवड निर्माण झाली. विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण वाढताना दिसून आले. मुलांची आक्रमक वृत्ती कमी होऊन त्यांच्यामध्ये शांत आणि संयम या गुणांची वाढ झाली.
असाच एक प्रसंग नमूद करावासा वाटतो. माझ्या वर्गात दाखल झालेल्या मुलांना त्यांच्या पालकांनी घरी राहण्याचा आग्रह केला तरी ते घरी राहत नाहीत. त्यांच्या मनात मारण्याची भीती म्हणून नाही, तर शिकवलेला अभ्यास बुडेल, माझे नुकसान होईल याची जाणीव त्यांच्या मनामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे निर्माण झाली.
दुसरा प्रसंग आवर्जून नमूद करावासा वाटतो. एक पालक एका विद्यार्थिनीची तक्रार घेऊन माझ्याकडे आले. कारण होते, नवीन घेतलेल्या खोडरबरचे दोन तुकडे झाले होते. मुलीला विचारणा केली असता ती सांगायला लागली की एका मुलीला खोडरबर नव्हते. माझ्याकडे मोठे खोडरबर होते म्हणून मी त्याचे दोन तुकडे केले आणि तिला दिले. तुम्हीच सांगितले ना मॅडम, एकमेकांना मदत करायची! तिच्याकडे नव्हते, म्हणून मी तिला दिले. माझे मन आनंदाने गहिवरून आले. मी तिला शाबासकी दिली. श्रावणीसारखी मदत सर्वांनी एकमेकांना करायची म्हणून सांगितले. रागात आलेले पालक आता मात्र शांत झाले होते. त्यांनाही त्यांच्या मुलीचा अभिमान वाटत होता. किती समजदार झाली होती आपली मुलगी ! त्यांचा रागीट असणारा चेहरा आता हसरा झाला होता. मूल्यवर्धन उपक्रमामुळे ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भावना वाढीस लागली. छोट्या मुलांच्या कृतीतून चांगल्या घटना घडायला लागल्यामुळे पालकांच्या मनात आपला शेजार, आपले नातेसंबध यांच्यासोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित होताना दिसत आहेत. शाळा, कुटुंब, समाज यामध्ये जर मूल्यांची रूजवण झाली तर जगात एक ‘शांतप्रिय, आदर्श भारत’ हे चित्र लवकरच दिसेल.
-श्रीमती वर्षा देशमुख (जि. प. के. प्रा. शा. सातारा, ता., जि. औरंगाबाद)
जबाबदार नागरिक घडविण्याकडे मूल्यवर्धन उपक्रमाची वाटचाल.
-श्रीमती वर्षा देशमुख (जि. प. के. प्रा. शा. सातारा, ता., जि. औरंगाबाद)
मी व मूल्यवर्धन पुस्तिकेसाठी अनुभव कथन
मूल्यवर्धन प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक गोष्टीचे काटेकोरपणे, नियम तयार करून, वेळापत्रकानुसार शिस्तबद्ध कार्यपद्धतीने वक्तशीरपणा शिकवला. स्वतः सर्व नियम आचरणात आणून विद्यार्थ्यांच्या अंगी रुजविणे खरोखरच अवघड कार्य आहे.
परिपाठाच्यावेळी रोज गोष्टी सांगण्याचा आग्रह मुले धरतात. रोज नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या नाहीत तर परिपाठासाठी विद्यार्थी कमी संख्येने उपस्थित राहतात. अभिनयगीताद्वारे, नाट्यछटा सादर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभिनयाची आवड निर्माण होते. सर्व विद्यार्थी अभिनय मनापासून करतात. सहयोगी खेळामुळे विद्यार्थी एकमेकांच्या जवळ आले. गटांमध्ये जोडीने एकमेकांच्या सहाय्याने खेळ खेळल्याने परस्परांमधील अबोला, कलह विसरून सहकार्याची भावना रुजली. वर्गातील भांडणांचे प्रमाण कमी झाले. स्पष्ट सूचना देणे, सगळ्यांना वय विसरून पळायला लावणे, आपल्याकडे असलेला फुगा फूटण्यापासून वाचवण्यासाठी सर्वजण कसोशीने प्रयत्न करतात. दुस-यांचे फुगे फोडण्याची केलेली धमाल लक्षात राहण्याजोगी होती. साध्या बोलण्यातला विचार करून दिलेल्या सूचना, सूचनांचा अर्थ व्यवस्थित समजून त्याप्रमाणे कृती करणे, यामुळे दिलेल्या सूचना किती महत्त्वाच्या असतात हे समजते. सहकार्याची गोष्ट वाचून त्यावर विचार करावयास लावून विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्ती, कल्पनाशक्तीला चालना देणारे प्रश्न बनवण्यास सांगितल्याने त्यांच्या चौकस बुद्धीला वाव दिला. यामुळे त्यांच्या वैचारिक पातळीचा विकास करण्यास निश्चितच मदत होते.
-सोनाली जोशी
मी व मूल्यवर्धन पुस्तिकेसाठी अनुभव कथन
-सोनाली जोशी
मूल्यवर्धन उपक्रम : विदयार्थी, पालक व शिक्षकांना जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा
मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आदर्श जीवन जगण्याचा ध्यास घेतला. असेच काही अनुभव.
परिपाठ नुकताच संपलेला. मुले वर्गात जाऊन बसलेली. मी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बेधडक वर्गात प्रवेश केला. मुले उभी राहिली, पण गुड मॉर्निग न म्हणता माझ्याकडे डोळे मोठे करुन बघत राहिली. मी नि:शब्द! काय झाले मला कळेना. माझ्याकडे रागाने पाहत तेजस्वीनी कडाडली, “सर बूट वर्गाबाहेर काढा. नियम …” मला माझी चूक उमगली. मी बाहेर जाऊन बूट काढले. पुन्हा वर्गात प्रवेश केला. सर्व मुलांनी आनंदाने स्वागत केले. परवा मूल्यवर्धनच्या तासिकेला मुलांकडून नियम बनवून घेतले. मुलांनी मुलांसाठी बनविलेले नियम. मुलांनी स्वतः बनविलेले नियम असतील तर मुले नियमाचे पालन आनंदाने करतात. कोणी नियम मोडले तर त्याला जाणीवही करून देतात. समीरने सर्व नियमांचे सिंघम स्टाईलने वाचन करून दाखविले. ‘हा माझा वर्ग आहे आणि हे त्याचे नियम. मी शाळेत वेळेवर येईल. मी कोणाशी भाडंणार नाही. मी चप्पल, बूट वर्गाबाहेर काढेन. मी सर्वांना मदत करीन. मी अभ्यास नियमित करीन.’ नियमावर चर्चा होत असताना गायत्रीने माडंलेला मुद्दा मनाला स्पर्शून गेला. “सर, घरीपण असे नियम बनवू का पप्पांसाठी?” ‘मी तंबाखू खाणार नाही. मी मुलांना रागावणार नाही. मी आईशी भाडंणार नाही. मी बाजारातून मुलांना खाऊ आणेन.” मला संकल्पना आवडली. मी सुचवले, “बनवा मुलांनो, पण पप्पांचे नियम पप्पांकडून बनवून घ्या.” मी पुढचा प्रश्न केला. “आईसाठी नियम रे?” तशी काही मुले एका सुरात म्हणाली, “आईसाठी नियम नसतात सर.” मुले खूप काही शिकतात आणि शिकवतातसुद्धा. असे विविध अनुभव मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून मिळाले. मूल्यवर्धन उपक्रमांतील दैनंदिन वेळापत्रक तयार करत असताना असाच अनुभव आला. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी कायकाय करतो. हे वेळेनुसार लिहून काढायचे. नंतर इतर विद्यार्थ्यांबरोबर आपल्या वेळापत्रकाची तुलना करून आपले आदर्श वेळापत्रक तयार करायचे आणि त्यानुसार वागायचे. मी संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनी वेळापत्रक तयार केले. विद्यार्थ्यांच्या वेळापत्रकामध्ये एक गोष्ट दिसून आली. रोज जवळपास दोन ते तीन तास मुलं पालकांच्या मोबाईलचा वापर करतात. हे धक्कादायक होतं. मी विचारलं, “तुम्ही मोबाईलचा वापर कशासाठी करता?” मुलांनी उत्तर दिले, “आम्ही गेम खेळतो.” मैदानी खेळ खेळण्याऐवजी ग्रामीण भागातील मुलेसुद्धा मोबाईलमध्ये रममाण होत असतील तर त्यांच्या बालसुलभ भावना, सुप्त गुण मोबाईलच्या नादापायी लुप्त होत आहेत. मोबाईल गेम व्यसनासारखे असतात. एकेक लेवल पार करताना क्षणिक आनंद मिळत असेलही. परंतु बालकांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा विकास होण्यासाठी हे खेळणे धोकादायक आहे. मी चौथीच्या वर्गातील पालकांची मिटिंग बोलावून त्यांना याची जाणीव करून दिली. मुलांना शैक्षणिक गेम डाउनलोड करून दिले. रोज मोबाईल वापरण्याचा कालावधी अर्ध्या तासापर्यंत ठरवून दिला. उर्वरित वेळापत्रक विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार तयार केले. आदर्श वेळापत्रकानुसार त्यांचा दिनक्रम चालू झाला. वेळेचा सदुपयोग कसा करावा, हे बालवयातच मुलांना समजले. पूर्वी आजी, आजोबा आपल्या नातवाला गोष्ट सांगायचे, परंतु ही परंपरा काळाच्या ओघात लुप्त झाली. मूल्यवर्धन पुस्तिकेतील गोष्टी विद्यार्थ्यांना आकर्षित करतात. विचार करण्यास प्रवृत्त करतात. टी.व्ही., मोबाईलच्या व्यसनांपासून दूर नेण्यासाठी रोज विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगितली. विद्यार्थ्यांना गोष्टीची आवड निर्माण झाली. गोष्ट ऐकताऐकता मुले गोष्ट सांगायला लागली. या गोष्टी सांगण्यासाठी त्यांनी आपल्या आजी, आजोबांकडे हट्ट धरला. त्यांनाही गोष्ट सांगण्यासाठी प्रवृत्त केले. “सर, सांगा ना गोष्ट” हा शब्द रोज कानावर येऊ लागला. न बोलणारी मुले बोलू लागली. सहयोगी खेळांतून मूल्यांचा विकास होऊ लागला. त्यामुळे शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम खूपच उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये परिवर्तन घडून आले. मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी आदर्श जीवन जगण्याचा ध्यास घेतला.
-संदीप ढाकणे ( स. शि. जि. प. प्रा. शा. चिंचखेडा खुर्द, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन उपक्रम : विदयार्थी, पालक व शिक्षकांना जोडणारा महत्त्वपूर्ण दुवा
-संदीप ढाकणे ( स. शि. जि. प. प्रा. शा. चिंचखेडा खुर्द, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन: एक संस्कार
भारतीय राज्यघटनेतील मूल्यांचा इयत्ता पहिलीपासून मूल्यवर्धनच्या उपक्रम पुस्तिकेत समावेश केल्याने शिक्षणाची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होत आहे. वाचन, लेखन, गणन करताकरता बालकांना वागण्याचा संस्कार मिळत आहे आणि ही निश्चितच स्वागतार्ह बाब आहे
कार्तिक धापा टाकतच आला व म्हणाला, “अश्विनी मॅडम, ओ अश्विनी मॅdडम …” मी उत्कंठेने विचारले, “काय रे? काय झालं?” तो म्हणाला, “मॅडम, शाळेच्या हॅण्ड्वॉश स्टेशनवरील चालू असलेला नळ मी बंद केला.” मी कौतुकाने म्हणाले, “अरे वा! हे तर फारच छान केलेस तू! very good कार्तिक.” ही वाक्ये आहेत माझ्या इयत्ता पहिलीच्या वर्गातील मुलांच्या तोंडची. जेमतेम दिडच महिना झाला यांना शाळेत येऊन, परंतु सुसबंधितपणे दिलेल्या संस्काराचाच हा परिणाम म्हणावा लागेल. व्यक्तीच्या जीवनातील अतिशय परिणामकारक, संवेदनशील काळ म्हणजे त्यांचे शालेय जीवन. या काळात आपण त्यांना जे देऊ ते दीर्घकालीन परिणाम करणारे असते. चांगल्या-वाईटाचा जो संस्कार मूल्यवर्धनद्वारे विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे, तो निश्चितच स्तुत्य असा आहे. शाळेत नवीनच प्रवेश झालेल्या माझ्या पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या हाती मी मूल्यवर्धनची पुस्तिका सोपविली आणि नवलच झाले. भेदरलेली, रडणारी मुले यातील पुस्तिकेतील चित्रे पाहून चक्क त्याकडे कुतूहलाने पाहू लागली. यातील ‘पावसामध्ये भिजू चला” हे गाणं तर मुलांना जाम आवडलं. या पुस्तिकेतील चित्रे विद्यार्थांच्या भावविश्वाशी संबंधित आहेत. म्हणूनच की काय यातील चित्रे पाहून मुले मला त्यांच्याशी संबंधित असणारा त्यांचा अनुभव सांगतात. गोष्ट कुठलीही असो, त्यात सक्ती नसली आणि आनंद असला तर ते काम सहजपणे पूर्णत्वास जाते असे मला वाटते. या पुस्तिकेमधील ‘तर काय होईल?’, ‘योग्य की अयोग्य’, ‘नम्र की उध्दट’ या आणि अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थी बोलके होऊन आपोआपच एखाद्या प्रसंगी मी काय करायला हवे या प्रश्नाचे उत्तर शोधून काढतायेत. प्रत्यक्ष मूल्य न शिकवता इतर गोष्टीतून, उपक्रमांतून विद्यार्थी ते आत्मसात करत आहेत. त्यामुळेच विद्यार्थांच्या व्यक्तिमत्त्व विकासास मदत होऊन सुजाण, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक तयार होऊन आपला भारत देश मजबूत होणार आहे.
-अश्विनी सोनवणे
मूल्यवर्धन: एक संस्कार
-अश्विनी सोनवणे
मूल्यर्वधनमधून नाते संबंधात सुसंवाद
मूल्यर्वधन उपक्रमांतर्गत जि. प. सिंदोनच्या विद्यार्थ्यांनी गावासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न
मी आणि मूल्यवर्धन उपक्रम मूल्यवर्धन वैशिष्टयपूर्ण उपक्रम जि. प. प्रा. शा. सिंदान, केंद्र- सातारा, ता., जि. औरंगाबाद. औरंगाबाद
मी आणि मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सामाजिक कर्तव्याची जाणीव व्हावी या करिता एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आमच्या शाळेच्या वतीने घेण्यात आला.
खूप वेळा आपण मुलांमध्ये सामाजिकतेची जाणीव व्हावी या करीता प्रयत्न करतो, पण आमच्या शाळेतील इयत्ता चौथी व पाचवीच्या मुलांमध्ये समाजाबद्दल संवेदनशीलता आपोआप तयार झाली. त्यांच्या लक्षात आले की आपल्या गावातील प्रत्येकाच्या घरात आपले वडील, काका दारू पितात, सिगारेट ओढतात, तंबाखू खातात, गुटखा खातात. एकदा शाळेतून घरी जाताना एका व्यक्तीने गुटखा खाऊन थुंकले हे मुलांनी पाहीले मग त्यांना वाटले की गावातील लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आपण काही केले पाहीजे यातून मुलांनी एक नाटिका तयार केली. पथनाटयाद्वारे गावातील विविध कार्यक्रम जसे सप्ताह,टिळा, लग्न तसेच गावातील विविध ठिकाणी नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.याचा परिणाम असा झाला की गावातील अनेक लोकांनी दारू सोडण्याचा, गुटखा सोडण्याचा संकल्प केला.जे लोक व्यसनाधिन नाहीत त्या लोकांना ही संकल्पना खूप आवडली. मुलांनी नाट्यरूपात दाखविल्यामुळे त्याचा परिणाम अधिक खोल झाला सर्वत्र मुलांचे कौतुक झाले या नाटिकेसाठी शाळेतील श्रीम. चव्हाण मॅडम, सोनटक्के मॅडम्, पाटील मॅडम,ब्याकोडे मॅडम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
-संगिता चव्हाण
मूल्यर्वधनमधून नाते संबंधात सुसंवाद
-संगिता चव्हाण
मूल्यर्वधन : वैशिष्टपूर्ण कार्यक्रम
मी आणि मूल्यर्वधन उपक्रम (जि. प. प्रा. शा. सिंदोन, केंद्र- सातारा. ता., जि. औरंगाबाद)
मी आणि मूल्यर्वधन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सामाजिक कर्तव्याची जाण ठेवत छोटेसे पथनाट्य तयार केले. तुम्हांला नक्कीच आवडेल.
मी आणि मूल्यर्वधन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक कर्तव्याची जाणीव व्हावी याकरीता एक वैशिष्टयपूर्ण उपक्रम आमच्या शाळेच्या वतीने घेण्यात आला. मुलांमध्ये सामाजिकतेची जाणीव व्हावी या करिता आपण खूप वेळा प्रयत्न करतो, पण आमच्या शाळेतील इयत्ता चौथी, पाचवीच्या विद्यार्थ्यांमध्ये समाजाबद्दल संवेदनशीलता निर्माण झाली. त्यांच्या लक्षात आले की आपल्या गावातील प्रत्येकाच्या घरात वडील, काका, मामा दारू, सिगारेट पितात. तंबाखू, गुटखा खातात. एकदा शाळेतून घरी जाताना एक व्यक्ती गुटखा खाऊन रस्त्यात थुंकला हे मुलांनी पाहिले. मग त्यांना वाटले की गावातील लोकांना व्यसनापासून दूर करण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. यातून मुलांनी एक नाटिका तयार केली व पथनाट्याद्वारे गावातील विविध कार्यक्रमात (जसे- लग्न, टिळा, वाढदिवस, सप्ताह) गावात विविध ठिकाणी सादर केले. याचा परिणाम असा झाला की गावातील अनेक लोकांनी दारू, सिगारेट, गुटखा खाणे सोडण्याचा संकल्प केला केला. जे लोक व्यसनाधिन नाहीत त्या लोकांना ही संकल्पना खूप आवडली. मुलांनी नाट्यरूपात दाखवल्यामुळे त्याचा परिणाम खूप चांगला झाला. मुलांचे सर्वत्र कौतुक झाले. या नाटिकेसाठी शाळेतील शिक्षिका संगिता चव्हाण, माहेश्वरी पाटिल, ओमिता ब्याकोडे, सुलभा सोनटक्के यांनी मार्गर्शन केले.
-संगिता चव्हाण (जि. प. प्रा. शा. सिंदोन, केंद्र- सातारा, ता. जि. औरंगाबाद)
मूल्यर्वधन : वैशिष्टपूर्ण कार्यक्रम
-संगिता चव्हाण (जि. प. प्रा. शा. सिंदोन, केंद्र- सातारा, ता. जि. औरंगाबाद)
काळजी घेणारी मुलगी
मी माझ्या वर्गात मूल्यवर्धन अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन केले. शालेय शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षणाचे ज्ञान होणे खूप महत्त्वाचे होते. यासाठी मला मूल्यवर्धन पुस्तिकेचा खूप मोठा फायदा झाला. जी गोष्ट मी अनेक वेळा सांगून देखील शक्य होत नव्हती, ती मूल्यवर्धन अंतर्गत विविध उपक्रमांद्वारे शक्य झाल्याची मला खात्री पटली. इयत्ता पहिलीतील मयुरी नावाची मुलगी अशी होती की ती घरच्यांचे ऐकत नसे. ती खूप हट्टी व खोडकर होती. घरी व शाळेतदेखील कोणतेच काम करत नसे. कोणाबद्दल प्रेम नव्हते. वर्गात सतत खोडया करत असे. मी मूल्यवर्धन अंतर्गत विविध गोष्टी, उपक्रम व खेळ घेत असायचो. त्यामध्ये मयुरी देखील सहभागी व्हायची. ती सुरुवातीला कोणताच प्रतिसाद देत नव्हती, परंतु उपक्रमांच्या गोष्टींच्या माध्यमातून तिच्यात खूप बदल झाला. खोड्या करणे बंद झाले. मुलांशी मिसळून वागायला लागली. वर्गातील वस्तूंची काळजी घेऊ लागली. लहान बाळांची, बहिणींची काळजी घेऊ लागली. आई, वडिलांची व घरातील सर्वांची कामे ऐकू लागली. अभ्यासात लक्ष देऊ लागली. तिच्यामध्ये खूप बदल झालेला पाहून तिच्या घरच्यांना खूप आनंद झाला. आज तिला जबाबदार्या समजायला लागल्या.
-आनंद चौधरी
काळजी घेणारी मुलगी
-आनंद चौधरी
चला खेळूया सहयोगी खेळ
मी आणि मूल्यर्वधन या उपक्रमांतर्गत ‘चला खेळूया सहयोगी खेळ’ या विषयावर एकमेकांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांच्या खेळातून सर्वांगीण विकास घडवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.
मी आणि मूल्यवर्धन या अंतर्गत मुलांमध्ये सहयोगाची भावना रूजविण्याकरीता प्रयत्न करण्यात आले. फक्त बोलून हे साधणार नाही तर कृतीद्वारे हे मुलांमध्ये रुजवावे लागेल यासाठी मूल्यवर्धन उपक्रमांतर्गत ‘माझा सहयोगी खेळ’ अशी कृती घेण्यात आली. शब्दचक्र, अंकचक्र, अक्षरडोंगर, पाढे चक्र वापरून खेळाद्वारे अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी व खेळाचा आनंद मिळण्याकरीता असे खेळ घेण्यात आले. या खेळांचा मुलांनी पुरेपूर आनंद घेतला. ‘एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे या चिमुकल्या मुलांनी एकमेकांना मदत करत जवळ जवळ 360 शब्द तयार केले. तसेच एकमेकांच्या सहाय्याने संख्यावाचन, शब्दांचा अनुक्रम लावला. त्या शब्दापासून विविध वाक्ये तयार केली. नेहमी मुलांना पाढे पाठ करणे कंटाळवाणे वाटते. तसेच लक्षात ठेवणेही कठीण जाते, पण पाढे चक्राच्या मदतीने त्यांनी पाढे तयार केले व एकमेकांना मदत करत पाढ्यांचा सराव घेतला. याचा परिणाम असा झाला की, मुलांचा शब्दसंग्रह वाढला. अवघड़ातील अवघड शब्दसुद्धा सफाईदारपणे लिहू लागले. त्याचप्रमाणे संख्याचक्राचा वापर चांगल्या प्रकारे करू लागले. एकमेकांच्या मदतीने संख्यावाचन, पाढेवाचन, संख्या तयार करणे, पाढे पाठांतर चांगल्या प्रकारे करू लागले. एकमेकांना मदत करून पुढे कसे जावे ही भावना त्यांच्या मनात आपोआप रूजली गेली. यांचा त्यांना भविष्यातही चांगला उपयोग होईल. कोणतीही स्पर्धा असो, यात एकमेकांना मागे न खेचता एकमेकांना मदत करत पुढे कसे जाता येईल हे लक्षात आले. या उपक्रमासाठी श्रीम. चव्हाण मॅडम, सोनटक्के मॅडम, पाटील मॅडम, ब्याकोडे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
-संगिता चव्हाण (जि. प. प्रा. शा. सिंदोन, केंद्र- सातारा, ता. जि. औरंगाबाद)
चला खेळूया सहयोगी खेळ
-संगिता चव्हाण (जि. प. प्रा. शा. सिंदोन, केंद्र- सातारा, ता. जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन एक चळवळ
विविध उपक्रम, कृती व सहयोगी खेळ याद्वारे सुज्ञ भारतीय नागरिक तयार करण्यात मूल्यवर्धन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.
मूल्यवर्धन एक चळवळ आहे. विद्यार्थ्यांना मन मोकळेपणे गप्पा मारण्यास प्रवृत्त करणारा, घटनात्मक मूल्ये, कृती व उपक्रमांतून विद्यार्थांमध्ये रुजविण्याचा सर्वगुणसंपन्न मार्ग म्हणजे मूल्यवर्धन. विद्यार्थ्यांना आपल्या मनाप्रमाणे मोकळे होण्यास प्रवृत्त करते. यामधील विविध उपक्रमांत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो. विद्यार्थांना विविध उपक्रमांत आणि सहयोगी खेळांत सहभागी करून घेण्याची संधी मूल्यवर्धन उपक्रम उपलब्ध करून देत आहे. माझा तक्ता, माझे मित्र, माझे छंद, छंदांचा आपल्या जीवनात होणारा उपयोग गोष्टीच्या व विविध कृतीच्या माध्यमातून उलगडून दाखविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पनाशक्तीला मोठा वाव मूल्यवर्धन उपक्रमांतून मिळत आहे. आपल्या घटनात्मक मूल्यांसोबत आपल्या जबाबदा-या व त्यासोबत येणारी आपल्या कर्तव्याची जाणीव या मूल्यवर्धन उपक्रमांतून विद्यार्थी समजून घेताना दिसत आहे.
एक अनुभव: ‘धन्यवादाचे कार्ड’ या उपक्रमातून मला याची यशस्वीता दिसून आली. वर्गातील एका विद्यार्थ्याने अनुभव सांगितला. तिने आपल्या आईसाठी धन्यवादाचे कार्ड तयार केले व ते कार्ड तिने आईला दिले. कार्ड वाचून आईच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे व ते कार्ड बघून आई खूप खूश झाल्याचे तिने कथन केले. आपले नाते संबंध जपण्यास व एकमेकांमध्ये संवाद घडवून आणण्यास यातील विविध उपक्रम महत्त्वाची कामगिरी बजावताना दिसून येत आहे.
सहयोगी खेळ: मूल्यवर्धन कार्यक्रमात सहयोगी खेळ विद्यार्थ्यांना निखळ मनोरंजन मिळवून देत आहेत. त्याचबरोबर खेळ खेळताना विद्यार्थ्यांना विचारप्रवृत्त करून निर्णय घेण्यासही शिकवतात. स्वत: सहयोगी खेळ घेण्यास प्रवृत्त होतात. यातून अजाणतेपणे विद्यार्थी नेतृत्त्व करण्यास सज्ज होताना दिसत आहेत. सूज्ञ भारतीय नागरीक निर्माण करण्यास मूल्यवर्धन महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसून येत आहे.
-सुमेध प्रेमानंद सरकटे (जि. प. प्रा. शाळा लांडेवस्ती, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)
मूल्यवर्धन एक चळवळ
-सुमेध प्रेमानंद सरकटे (जि. प. प्रा. शाळा लांडेवस्ती, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद)
मुलगा- मुलगी असा नको भेद, दोघांसाठी असो शिक्षण एक
देणाराही परत घेऊ शकत नाही, अशी पवित्र भेट म्हणजे शिक्षण होय. म्हणून दोघांनाही शिकवा, आपल्या संस्कृतीचे मूल्य टिकवा.
चांगल्या विचाराने चांगली कार्य घडतात या संकल्पनेतून मुलगी शिकली पाहिजे, टिकली पाहिजे व उद्याचे भविष्य घडविले पाहिजे हा विचार घेऊन मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर झालेल्या आहेत. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ समाजात तिची प्रतिष्ठा वाढली.
-विक्रम कुरपतवार
मुलगा- मुलगी असा नको भेद, दोघांसाठी असो शिक्षण एक
-विक्रम कुरपतवार