मूल्यवर्धनने दिली नवसंजीवनी
मी एक शिक्षक म्हणून प्रामाणिकपणे वर्गात शिकवित होतो. मूल्यवर्धन प्रेरक म्हणून निवड झाली. प्रशिक्षण घेत असतानाच या उपक्रमाची आवड निर्माण झाली. ‘आधी केले मग सांगितले’ या सुत्रानुसार आधी माझ्या वर्गात मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला. मुलांनाही तो आवडला व अभ्यासाची आवड निर्माण झाली. निरनिराळे नाविन्यपूर्ण उपक्रमांनी सज्ज असलेल्या ह्या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांसोबत मलाही नवीन चेतना मिळाली. आत्मविश्वास वाढला. जीवन जगण्यासाठी आवश्यक नवीन गोष्टी शिकता आल्या. केंद्रात इतर शिक्षकांना प्रेरित करण्यात आले. त्यांनीही मूल्यवर्धनचे स्वागत केले. भारताचे सुजाण नागरिक घडविण्यासाठी माझा ही खारीचा वाटा असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
-अमित वसतकर
मूल्यवर्धनने दिली नवसंजीवनी
-अमित वसतकर
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन सर्वात उपयुक्त आणि काळाचे पाऊल ओळखून घेतलेला महत्त्वाचा निर्णय आहे. माणूस शिकतो आहे, पण सुसंस्कारी होत नाही असे दिसून येते. मुथ्था फाउंडेशन यांनी ढासळत चाललेल्या समाजाला वर आणण्याचा एक स्तुत्य उपक्रम म्हणजेच मूल्यवर्धन. समाजामध्ये होत असलेला नैतिक मूल्यांचा ऱ्हास, वाढलेली अराजकता, भय, चिंता, तणाव, चामडी आणि दमडी यालाच महत्त्व देणारा समाज याला दिशा आणि गती देण्यासाठी मूल्यवर्धन हा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे.
मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरब नवले येथील प्रभारी मुख्याध्यापिका. या अगोदर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माना येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होते. मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर मुलांमध्ये मूल्य रुजविण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम स्वच्छता आणि नीटनेटकेपणा या विषयाला हात घातला आणि सुरुवात झाली ती म्हणजे मुले स्वच्छ गणवेशात यायला लागलीत. आपल्या वस्तू जिथल्या तिथे जागेवर ठेवायला लागलेत. चप्पल रांगेत लावायला लागली. स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर ते स्वच्छ राहील याकडे लक्ष देऊ लागले. मुलांना या अगोदर वस्तू चोरून ठेवणे अशा सवयी होत्या, मात्र त्यानंतर मुलांमध्ये बदल घडून आला. आता मुले सापडलेली वस्तू सुद्धा ऑफिसमध्ये किंवा शिक्षकांना आणून द्यायला लागले. सहकार्याची भावना वाढीस लागलेले दिसून आली. अभ्यासात मागे पडलेल्या मुलांना मदत करायला लागली. एकमेकांना चिडविणे बंद झाले. पुस्तकांचा त्यांना लळा लागला. चित्रांद्वारे त्यांच्यामध्ये मूल्यांची रुजवणूक व्हायला लागली. चित्र रंगवणे, योग्य-अयोग्य याद्वारे खेळातून, मनोरंजनातून सहजतेने मूल्ये रुजायला लागली. नाती कळायला लागली. त्यांच्याही आवडीनिवडी असतात, याबद्दल मुलांना माहिती झाली. घरकामांमध्ये मदत करणे, वृद्धांचा आदर करणे इत्यादी गोष्टी ते हळूहळू शिकायला लागले. सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हायला लागली.
-शारदा ढोकणे
मी आणि मूल्यवर्धन
-शारदा ढोकणे
शाळा झाली शिवीमुक्त. . . . .
मूल्यवर्धन हा कार्यक्रम माझ्या शाळेत सुरू झाला, तशा त्यातून अनेक सकारात्मक गोष्टी घडून येत आहेत, याची अनेक उदाहरणे देता येतील. माझ्या शाळेत साहिल नावाचा एक मुलगा होता. तो बिनधास्त, उद्धट, वर्गात कोणाचेच न ऐकणारा, बेशिस्त, अगदी सर्व कुविशेषणे ज्याला लागतील असा मुलगा होता. मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत सुरू झाला आणि इयत्ता पहिली ते चौथीसाठी घेण्यात येणार्या तासिका, कृतियुक्त उपक्रम आणि खेळ हे सर्व पाहून, अनुभवून त्याच्यातही बदल व्हायला लागला. त्याची गणना एक गुणी विद्यार्थी म्हणून व्हायला लागली.
शिव्या देणे चांगले की वाईट, त्याचे परिणाम काय होतात, याविषयावर एके दिवशी मी शाळेत गटचर्चा घडवून आणली. त्या दिवसापासून मुलांचे शाळेत शिव्या देणे बंद झाले आणि पूर्ण शाळाच शिवीमुक्त झाली.
मूल्यवर्धन कार्यक्रम आणि सहशालेय उपक्रम या दोन्हींची सांगड घातली तर आणखी परिणामकारकता साधता येईल असे दिसून आले. आम्ही आमच्या शाळेत दिवाळीच्या सुट्टीच्या आधी दिवाळी साजरी करण्याचे ठरविले होते. आम्ही शिक्षकांनी मुलांसाठी छान फराळाचे आयोजन केले होते.
मुलांनीही शाळेला दिवाळीभेट द्यायची असे ठरविले. सर्वांनी पैसे जमा केले. त्यांनी प्रत्येक वर्गासाठी कचरापेट्या आणल्या. शाळा नेहमीच आपल्यासाठी काहीतरी करीत असते, आता आपणही शाळेसाठी काहीतरी करूयाही भावना त्यांच्या मनात निर्माण होणे, याहून उदात्त दृष्टिकोन काय असू शकतो?
मुलांनी स्वतः वर्गनियम तयार केले. तसेच शाळेचे नियमही तयार केले. आमच्या शाळेत माझ्याकडे आणि एका सरांकडे बीएलओचे काम असल्यामुळे लोक कधीही मतदारयादी पाहायला शाळेत यायचे, पण यावरही आम्ही एक तोडगा काढला. नियमावलीप्रमाणे ४.३० वाजता हे काम करायचे. त्याआधीचा संपूर्ण वेळ केवळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी द्यायचा असे ठरविले. लोक अधेमधे आले की, मुले त्यांना नियम दाखवायची. त्याचा परिणाम असा झाला की हुज्जत घालणारे लोकही हा नियम पाळू लागले.
मुलांना काही खाण्याचे पदार्थ वितरित करीत असताना मुलांना ’ मला… मला…’ असे म्हणून हात पुढे करायची सवय होती. त्यामुळे गोंधळ होत असे. नियमांचा परिणाम असा झाला की मुलांची ही सवय आता नाहीशी झाली आहे. “ शाळेत आणलेला खाऊ, सारे मिळून खाऊ ” असे वातावरण आता तयार झाले आहे. आता पालकांनाही मुलांमध्ये होत असलेले बदल सुखावत आहेत. मुलांच्या तक्रारी, भांडणे घेऊन पालकांचे शिक्षकांशी शाळेत भांडायला येणेच आता बंद झाले आहे.
-सौ. अपर्णा ढोरे
शाळा झाली शिवीमुक्त. . . . .
-सौ. अपर्णा ढोरे
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे
सार्वजनिक स्थळांची देखभाल
मूल्यवर्धन आजच्या काळाची गरज आहे. मूल्यवर्धन या मुथ्था फाउंडेशनने सुरु केलेल्या कार्यक्रमामुळे खरंच एक मोठा बदल होणार आहे. आज आम्ही पाहतो की सार्वजनिक स्थळांकडे कोणी लक्ष देत नाही. मग ते शाळा असो रुग्णालय असो की बस स्थानक असो. मूल्यवर्धनचे पाठ वाचल्यानंतर खरच मूल्यांची ओळख होते.
माझ्या शाळेला सरंक्षण भिंत नाही. शाळा गावाला लागूनच आहे. समोर घरे आहेत. मागच्या वर्षी बाहेरच्या भिंतीला आम्ही रंगरंगोटी केली होती. परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत होता. सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थी तेथे खेळायचे. रात्रीच्या वेळी काही मोठी मुले तिथ मोबाइलवर गेम खेळत बसत होती. गप्पागोष्टी करत बसत होते. गुटखा पुडी, पान खायचे आणि भिंतीवर थुंकत होते. रंग दिल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा होती. पहिले माझे सहकारी शिक्षक गेले आणि भिंती पाहुन विचार केला की आपण रंग यासाठी केला का? तोच मी तेथे पोचलो. विद्यार्थी ही आले होते. सकाळची वेळ असल्यामुळे लोकांची ये-जा सुरु होती.
मी हातात पाणी आणि कापड, ब्रशने भिंती धुण्यास सुरुवात केली. गावातल्या 2-3 लोकांनी पाहिले आणि सर द्या, आम्ही स्वच्छ करुन देतो म्हणाले. मी त्यांना सांगितले की, मीच हे काम करणार. माझ्या स्वत: च्या स्वच्छ करण्याचा हा परिणाम झाला की, ज्या मुलांनी थुंकले होते, तेच शाळा सुटल्यानंतर परिसरामध्ये पडलेले कागद, पाने उचलून फेकत होते.
-रूहुल्लाह खान
केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे
-रूहुल्लाह खान
बालकांचे मूल्यवर्धन आणि शिक्षक
विज्ञानाधिष्ठित मनोवस्था ही सातत्यलक्ष्यी असते. त्याला प्रयत्नसाध्यतेचे प्रगल्भ अलंकरण असते. ती नित्यनूतन प्रज्ञाविष्कारीत जीवनाला संपूर्ण माणूसपणाकडे नेणारी असल्याने तिचे असणे हे मंगलतेचे द्योतक आहे. ते सहज सुलभ जीवन जगता येण्यासाठीची कृतीयुक्त प्रारूपे निर्मित करून संपुर्णतेचे महापर्वत मुलांसमोर उभे करणारे महादान आहे. त्यासाठी काही सहाय्यकारी बाबींचे आधी निर्माण करावे लागेल. त्याचा स्पष्टपणे निचरा मुलांच्या मनात करता यायला पाहिजे. तो करता येणे शक्य आहे का? हा व्यक्ती-स्थळ-काळ-उपलब्धता सापेक्ष प्रश्न आहे.
यातले पाहिले काम आहे, शिक्षकांसाठीची ज्ञानक्षेत्रे निश्चित करणे. हे स्तरीय कार्य आहे. विद्यार्थी, शिक्षक, प्रशासन, समाज यांना ते परस्पर पूरक आहे. ते जाणीव विश्वनिर्मितीचे कार्य असून परस्परांच्या एकत्वदृष्टीच्या विकसनाचा तो प्रगल्भ प्रयास आहे, असे म्हटल्यास ते लवकर लक्षात येईल.
तीन ज्ञान क्षेत्रे (विकसन क्षेत्रे) १. विरेचन क्षेत्र २. अभ्यास क्षेत्र ३. ऊर्जा क्षेत्र
या ज्ञानक्षेत्रांचा विचार करताना या ठिकाणी थोडक्यात विचार करण्यात आला आहे. विरेचन म्हणजे भावनांचे सामान्यीकरण. मनात अडकून पडलेला विचार कोणत्यातरी रुपाने (मौखिक किंवा अमौखिक) व्यक्त झाल्याने त्याचे त्या ठिकाणचे थांबणे संपून तो प्रवाहित होतो. प्रवाहित असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. हे वारंवार घडल्याने प्रवाहितावस्था सतत घडत राहते. हा सातत्यशीलत्वाचा बोध जागा राहतो. अभ्यासक्षेत्र हे सहज समजण्यासारखे आहे. शिक्षकाने काय वाचले हे त्याच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. तो अनुभव त्याचा स्वतंत्र असतो. त्याची अनुभव घेण्याची ढब ही उर्ध्वगामी असेल तर तो समाजाच्या खांद्यावर असलेला दिसतो. तो लोकाचाराचे वहन करतांना आपल्या स्वत्वाला विश्वस्वत्वगाभ्याशी अभिन्नावस्थेत पाहू शकतो. हे त्याचं समतामूलक वर्तन amalgam प्रमाणे असते. काश्यासारख्या धातुतून कोणतेही दोन धातू आता वेगवेगळे करता येत नसतात. ते एकच झालेले असतात. असे ते असते. ही आहे त्याची अभ्यासभुमी. मात्र त्याचे मूर्त अंकन स्वीकारताना त्याचे विकसन झाले किंवा काय हे उपक्रमशील शिक्षकांच्या अभिमतातून सन्मान्य झाले पाहिजे. यातून ज्या जबाबदारीचे संवहन करण्यास शिक्षक प्रेरित होतील त्यासाठीची बुद्धिमत्ताजन्य अवस्था भौतिक स्तरावरही त्याच्या आजूबाजूला उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. ही बाब मूल्यमापन स्तरावरून जबाबदारीपूर्वक मान्य व्हावी. ही जबाबदारी एकदा स्वीकारल्यानंतर त्या अवस्थेपासून त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत कसलाही प्रत्यवाय येणार नाही. हीही बाब मान्य व्हावी. कारण हे शिक्षक आता एक चळवळ घेऊन निघालेले असतात. हे याठिकाणी दृग्गोचर होते.
ऊर्जाक्षेत्र हे, विरेचनाने निर्माण झालेल्या असंस्कारित(कोणत्याही प्रकारचे संस्कार नसलेले, कोरे) भूमीवर कुशलत्वाच्या पेरणीतून मानवी सभ्यता अभिमंडीत करण्यासाठी पुनर्निर्मीत झालेली लक्ष्य असते. कुशलत्वाच्या पेरणीत निसमताजन्य आकाश ह्या संकल्पनेचे अमान्यत्व अनुस्यूत आहे. हा अत्यंत आनंददायी अनुभव आहे. तो वारंवार घेता आला पाहिजे. हा एक अपारंपरिक विचार आहे असे वाटणे प्रारंभी वाटेल. पण तो आमचा भारतीय गुरुशिष्य परंपरेतील विचार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. हे एकंदरीत सगळे काही जाणीवजन्य असे आहे. आणि ते संपूर्ण अनुभवसाध्य आहे. मूल पूर्वप्राथमिक अवस्थेत असतांना ज्या भीतिशून्य अवस्थेत असते ती अवस्था त्याला पुढील आयुष्यात गाठता येण्यासाठीचा हा मूळ प्रयास आहे. प्रशिक्षण हे ऊर्जा क्षेत्र आहे. वर्गात पाठ घेणे हे अभ्यास क्षेत्र आहे. आणि अत्यंत दुःखाची बाब म्हणजे आमच्या शिक्षकांना विरेचनाची संधीच मिळत नाही. एरंडाचं तेल पिऊन एनिमा करावा इतकं ते सोपं नाही. प्लुटो ने ज्याला कॅथॉरसीस म्हटले आहे असे ते भावस्पर्शी आणि उर्जागामी क्षेत्र असल्याचे आपल्या लक्षात येते. असे हे एकंदरीत क्षेत्रीय प्रारूप आहे…. अशी संधी नगण्य शिक्षकांना मिळतांना दिसते. अभ्यासासाठी त्याला जागाच नाही आणि ऊर्जा मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे तो जवळपास void आहे. आपल्या भाषेत ह्या अवस्थेला कामगार मुंग्यांची अवस्था असे म्हटले पाहिजे. ह्या अवस्थेदरम्यान खितपत पडून असणाऱ्या ह्या महाप्रचंड क्षमतेच काय करावं, हा खरा प्रश्न आहे. या प्रसंगी आपल्याला एक उदाहरण जर लक्षात घेतलं तर लक्षात येण्यास मदत होईल. कुणीतरी आंब्याची कोय पेरली. तर त्यापासून उत्पन्न झालेला आम्रवृक्ष ही त्या कोयी पासून निर्मित झालेली वस्तू आहे. ती कोय ज्या आम्रवृक्षापासून झाली आहे त्या आम्रवृक्षाचा आणि ह्या आम्रवृक्षाचा काही संबंध आहे का? हा एक भाग आणि आणखी एक असे की ; हा सध्याचा जो आम्रवृक्ष उत्पन्न झाला आहे तो केवळ त्या कोयीपासून उत्पन्न झाला आहे की त्याला आणखी काही तरी साह्यकारक आहे. निव्वळ कोयीपासून एवढा मोठा आम्रवृक्ष झाला असे कसे म्हणता येईल! म्हणजे एकंदरीत जडण घडणीच्या या अमूर्ता कडून मूर्तावस्थेकडे जाणाऱ्या प्रक्रियेत प्रत्येकाचाच सहभाग आहे या मान्यतेप्रत आल्याशिवाय शिक्षण प्रक्रिया पूर्ण होत नाही असे लक्षात येईल. जे काय मनुष्य प्राप्त करतो ते सर्ववेळी त्याचे इप्सित असेलच असे ठामपणे सांगता येईल का? अध्ययन निष्पत्ती ही संख्यात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन करता येणे शक्य आहे का? असा त्यानंतरचा विचार निर्मित होतो.
-संजय डोंगरे
बालकांचे मूल्यवर्धन आणि शिक्षक
-संजय डोंगरे
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये जाणवत आहे बदल
मूल्यवर्धन आदर्श नागरिक व आदर्श समाज घडविण्यासाठी ठरत आहे मोलाचे.
शाहिद इक्बाल खान सरफराज खान सह शिक्षक जिल्हा परिषद उर्दू शाळा महान पंचायत समिती बार्शीटकली. मूल्यवर्धन शिक्षणामुळे मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवत असल्याने तसे बदल पहावयास मिळत आहेत. विद्यार्थी आता स्वतःहून प्रत्यक गोष्टीसाठी पुढाकार घेत असून मूल्यवर्धनमुळे इतर विषयही विद्यार्थ्यांना शिकविणे सोपे झाले आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थी एकमेकांबद्दल आदाराने वागू लागले आहेत.
मूल्यवर्धन शिक्षणामुळे घटनात्मक मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविली जात असून सदर बदल प्रत्यक्षरित्या पाहावयास मिळत आहेत. मूल्यवर्धन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचे आनंदी वातावरण निर्माण झाले असून याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. मूल्यवर्धनच्या आनंददायी शिक्षणामुळे व ज्ञानरचनावादावर आधारित बालस्नेही विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीचा वापर मूल्यवर्धनमध्ये होत असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थितीसुद्धा वाढत आहे. पूर्वी शाळेत कधीकधी येणारे विद्यार्थी आता दररोज शाळेत येऊ लागले आहेत. विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख होऊन आपल्या क्षमतांबाबत जाणीव होत आहे. तसेच नातेसंबंधाबाबत ते शाळेत व समाजात आदर करीत असल्याचे पाहवयास मिळत आहे.
सहयोगी अध्यापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेतील एकमेकांप्रति आदर निर्माण झाला असून ते आता एकमेकांसोबत रमून जात आहेत. तसेच पूर्वी अनेक विद्यार्थी एक दुसऱ्या विद्यार्थ्यांप्रति भेदभाव करायचे परंतु, सहयोगी खेळपद्धती, सहयोगी अध्यापन पद्धतीने ते एकमेकांसोबत खेळू व शिकू लागले. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विविध उपक्रम आणि खेळाचे महत्त्व पटायला लागले. जेव्हा वर्गात बसलेल्या मुलांना ‘शांत बसा, शांत बसा’ असे म्हणताना घसा बसायचा. तिथे शांतता संकेत वापरून वर्ग शांत करायला काहीच वेळ लागत नाही.
शाळेत व वर्गात ठरवून दिलेल्या नियमांची सर्वच अंमलबजावणी सर्वच विद्यार्थी करीत नव्हते. परंतु मूल्यवर्धनमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः वर्गनियम बनविल्यामुळे ते स्वतः त्या नियमांची अंमलबजावणी करून इतर विद्यार्थ्यांसुध्दा प्रेरित करतात. त्यामुळे शाळेत व वर्गात शिस्तीचे वातावरण पहावयास मिळत आहे.
मुलांचे राहणीमान व स्वच्छतेवरसुध्दा परिणाम जाणवत आहे. मुलांना आता कोणतीही बाब वारंवार सांगावी लागत नाही. शाळेतच नव्हे तर समाजामध्येसुध्दा मुले इतरांसोबत आदराने वागतात. एकमेकांना मदत करतात. हे सर्व शक्य झाले ते फक्त मूल्यवर्धनमुळे.
-शहीद इक़्बाल खान
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांमध्ये जाणवत आहे बदल
-शहीद इक़्बाल खान
मूल्य रुजविणे
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे शाळेत विविध बदल होताना दिसत आहेत. माननीय शांतिलाल मुथ्था यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम व कार्यक्रम शाळेत राबविला जात आहे.
मी श्री. राजेश बाबुराव पंडे जि. प. प्राथमिक शाळा सागद, केंद्र- निंबा, पं. स. बाळापूर, जि. अकोला. माझे अनुभव व्यक्त करतो की मूल्यवर्धन या कार्यक्रमामुळे माझ्या शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शालेय वातावरण तसेच स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून येण्यास मदत झाली. मुले आनंददायी पद्धतीने शाळेत शिकू लागली. या कार्यक्रमांतर्गत शाळेत विविध उपक्रम राबविल्यामुळे मुलांमध्ये बदल झाले. उदा. शाळेची सुट्टी झाल्यानंतर मुले पिण्याचा पाण्याच्या बाटलीमधले पाणी शाळेतील रोपट्यांना न सांगता घालतात. पुस्तिकेत दिलेले उपक्रम ते आनंदाने व हिरीरीने पूर्ण करतात. यामुळे मुलांत अमुलाग्र बदल घडवून येत आहेत. मुलांमध्ये मूल्ये रुजविण्यास मदत होत आहे. मुलांनी या उपक्रमामुळे शाळेत विशिष्ट नियमावली बनवली आहे व सर्व मुले त्या नियमांचे पालन करतात.
-नागेश सोळंके
मूल्य रुजविणे
-नागेश सोळंके
मूल्यवर्धन उपक्रमामुळे समाजाचे लक्ष शाळेकडे वेधले
मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय जीवनात रुजायला हवीत, तसेच भविष्यात त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडायला हवेत. या उद्देशाने तयार केलेला मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे.
मूल्यवर्धनच्या माध्यमातून शाळा व शिक्षक हे उद्दिष्ट नियोजित, पद्धतशीर आणि नियमितरितीने साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूल्यवर्धनमुळे या प्रयत्नांना बळकटी मिळत आहे. मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थी बोलके झाले. दिलेल्या विषयावर त्यांची मते मांडू लागले. ते जबाबदारी व विचारपूर्वक निर्णय घेऊ लागले. ते त्यांच्या स्वतः बद्दलच्या जबाबदाऱ्या ओळखायला लागले. योग्य-अयोग्य वर्तन, खरे बोलण्याचे महत्त्व या उपक्रमामुळे समजत आहेत. विद्यार्थी सर्वांचा आदर करू लागले. पर्यावरण रक्षणाची जाणीव, सामाजिक हिताचा विचार, सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग हे गुण विद्यार्थ्यांत रुजण्यात मदत होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाज व शाळा हे एकमेकांच्या जवळ येत आहे. मूल्यवर्धनच्या उपक्रमामुळे पालकांचा शाळेमध्ये सहभाग वाढला. यामुळे समाजाचे शाळेकडे लक्ष वेधण्यास मदत झाली. पालक उपक्रमाविषयी माहिती घेऊ लागले. पाल्यांत त्यांना सकारात्मक बदल दिसत आहे. इतर विषयांशी मूल्यवर्धन उपक्रमाची सांगड घातल्यामुळे उपक्रमाचे महत्त्व विद्यार्थ्यांना वाटू लागले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यात मदत झाली. सहयोगी अध्यापन पध्दतीमुळे उपक्रमाची वातावरण निर्मिती करण्यास मदत होत आहे. सर्वांनी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केली तर जबाबदार, चारित्र्यसंपन्न, लोकशाहीभिमुख समाज निर्माण होण्यास मदत होईल. उज्ज्वल भविष्यासाठी उपक्रम राबवूया, त्यातून मूल्यवर्धन संकल्पपुर्ती करूया.
-विशाल वैद्य
मूल्यवर्धन उपक्रमामुळे समाजाचे लक्ष शाळेकडे वेधले
-विशाल वैद्य
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये जाणीव
विज्ञानाधिष्ठित मनोवस्था ही सातत्यलक्ष्यी असते. त्याला प्रयत्नसाध्यतेचे प्रगल्भ अलंकरण असते. ती नित्यनुतन प्रज्ञाविष्कारीत जीवनाला संपूर्ण माणूसपणाकडे नेणारी असल्याने तिचे असणे हे मंगलतेचे द्योतक आहे. ते सहजसुलभ जीवन जगता येण्यासाठीची कृतीयुक्त प्रारूपे निर्मित करून संपुर्णतेचे महापर्वते मुलांसमोर उभे करणारे महादान आहे. त्यासाठी काही सहाय्यकारी बाबींचे आधी निर्माण करावे लागेल. त्याचा स्पष्टपणे निचरा मुलांच्या मनात करता यायला पाहिजे. तो करता येणे शक्य आहे का? हा व्यक्ती, स्थळ, काळ, उपलब्धता सापेक्ष प्रश्न आहे.
मुलांची जाणीव, जग आणि शिक्षक
शाळा म्हणजे मुले घडविणारा कारखाना नसतो. त्यामुळे सगळीच मुले सारखीच निपजतील, असे कसे काय समजायचे? मुले आपापल्या हातापायांनी घडत जातात. त्यात अन्य कुणाचा जो काही हातभार लागतो, तो काही स्थूलमानाने नोंदवून ठेवण्यासारखा नसतो. मुले ती आपापली नोंद आपापल्या जवळ ठेवत असतात. विविध प्रयोगांच्या नावावर त्यात उगाच ढवळाढवळ करणे हे, मुलांच्या मनोवस्थेचे विज्ञानाधिष्ठित उन्नयन शाळा करते, या वस्तुस्थितीवर अविश्वास दाखविल्या सारखे आहे.
त्याचे असे आहे की, हा सगळा जाणीव जगताचा विश्वव्याप आहे. जो जाणतो त्याला ते जाणवल्या शिवाय राहत नाही. ज्याला हे जाणवते, तो एखादी गोष्ट मुलांच्या भाषेत मांडण्याचे कष्टाचे काम असले तरी सांगितल्याशिवाय राहत नाही. मूल ते समजून घ्यावयास त्याच्याकडे कोणत्या मनोवस्थेत येते हादेखील अभ्यासविषय आहे. तो समजून घेता येण्यासाठी पालकांच्या दृष्टीचा अभ्यास करावा लागेल. कारण समूह मानसिकता ही वेगाने फैलावते आणि शहानिशा हा प्रकार त्यात अजिबात नसतो. पालकांची अनुकूलता निर्माण करणे हे शिक्षकांचे काम आहे. ते आपल्या शिक्षक बंधूंच्या सशक्तपणाचेही लक्षण असते.
कोणताही शिक्षक आपल्याकडे आलेल्या मुलात स्वतःला उतरविण्याचा जीवतोड प्रयत्न करतो. त्याच्या अंतर्मनात जो बिनचूकपणा जन्म घेतो तो त्याच्या विद्यार्थ्यांमध्ये उतरविणे ही अत्यंत संवेदनशील बाब तो दिवसभर हाताळताना त्याला कोणकोणत्या दिव्यातून जावं लागतं, हे त्या जाणत्याला माहिती असते. हे सर्व विदित आहे. ते जे काही म्हणतात, ते त्या मुलांसाठी काळ्या दगडावरची रेघ असते. त्यामुळे अवस्था अशी येते की, काहीही केलं तरी चालते, ही काही कठीण बाब नाही, असा प्रकार या ठिकाणी उद्भवतच नाही. तरीही ज्यांना एकंदरीत या अवस्थेचं सुलभीकरण करता येतं, त्यांना त्रिवार प्रणाम. कारण तो हाडाचा शिक्षक असतो. अंगभूत शिक्षक असल्याने त्याची ती नैतिक जबाबदारी त्याने अंगीकारून, समजून घेतली आहे. कितीही संकटे आली, विरोध झाला, बदल्या झाल्या, पगार खोळंबले, तरीही न डगमगता त्याचे आपल्या निष्ठेवर टिकून राहणे यावर त्याचा बिनचूकपणा अवलंबून असतो.
त्यासाठी शाळा ही कृतीशाळा झाली पाहिजे. असे केल्यास एका विचाराला आरंभ होऊ शकेल. शासन त्यासाठी किती तरतूद करतेय. याचा विचार केला पाहिजे. काही ठोस तरतुदी प्रत्यक्ष केल्या पाहिजेत.
यातले पाहिले काम आहे, शिक्षकांसाठीची ज्ञानक्षेत्रे निश्चित करणे. हे स्तरीय कार्य आहे. विद्यार्थी, शिक्षक, प्रशासन, समाज यांना ते परस्पर पूरक आहे. ते जाणीवविश्व निर्मितीचे कार्य असून परस्परांच्या एकत्वदृष्टीच्या विकसनाचा तो प्रगल्भ प्रयास आहे, असे म्हटल्यास ते लवकर लक्षात येईल.
या ज्ञानक्षेत्रांना विकसन क्षेत्र असेही म्हणता येऊ शकते. ती तीन असावीत आणि त्याचे काही घटक उपघटक असतील. तज्ज्ञांच्या मदतीने त्याचा विस्तार करून सैद्धांतिक मांडणी करायची आहे.
तीन ज्ञानक्षेत्रे (विकसन क्षेत्रे)
१. विरेचन क्षेत्र
२. अभ्यास क्षेत्र
३. ऊर्जा क्षेत्र
या ज्ञानक्षेत्रांचा विचार करतांना या ठिकाणी थोडक्यात विचार करण्यात आला आहे.
विरेचन म्हणजे भावनांचे सामान्यीकरण. मनात अडकून पडलेला विचार कोणत्यातरी रुपाने (मौखिक किंवा अमौखिक) व्यक्त झाल्याने त्याचे त्या ठिकाणचे थांबणे संपून तो प्रवाहित होतो. प्रवाहित असणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. हे वारंवार घडल्याने प्रवाहितावस्था सतत घडत राहते. हा सातत्यशीलत्वाचा बोध जागा राहतो.
अभ्यासक्षेत्र हे सहज समजण्यासारखे आहे. शिक्षकाने काय वाचले हे त्याच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसलेले पाहणे हा एक रोमांचकारी अनुभव असतो. तो अनुभव त्याचा स्वतंत्र असतो. त्याची अनुभव घेण्याची ढब ही उर्ध्वगामी असेल तर तो समाजाच्या खांद्यावर असलेला दिसतो. तो लोकाचाराचे वहन करताना आपल्या स्वत्वाला विश्वस्वत्वगाभ्याशी अभिन्नावस्थेत पाहू शकतो. हे त्याचं समतामूलक वर्तन amalgam प्रमाणे असते. काश्यासारख्या धातुतून कोणतेही दोन धातू आता वेगवेगळे करता येत नसतात. ते एकच झालेले असतात. असे ते असते. ही आहे त्याची अभ्यासभुमी. मात्र त्याचे मूर्त अंकन स्वीकारताना त्याचे विकसन झाले किंवा काय हे उपक्रमशील शिक्षकांच्या अभिमतातून सन्मान्य झाले पाहिजे. यातून ज्या जबाबदारीचे संवहन करण्यास शिक्षक प्रेरित होतील त्यासाठीची बुद्धिमत्ताजन्य अवस्था भौतिक स्तरावरही त्याच्या आजूबाजूला उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. ही बाब मूल्यमापन स्तरावरून जबाबदारी पूर्वक मान्य व्हावी. ही जबाबदारी एकदा स्वीकारल्यानंतर त्या अवस्थेपासून त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत कसलाही प्रत्यवाय येणार नाही. हीही बाब मान्य व्हावी. कारण हे शिक्षक आता एक चळवळ घेऊन निघालेले असतात. हे याठिकाणी दृग्गोचर होते.
ऊर्जाक्षेत्र हे, विरेचनाने निर्माण झालेल्या असंस्कारित (कोणत्याही प्रकारचे संस्कार नसलेले, कोरे) भूमीवर कुशलत्वाच्या पेरणीतून मानवी सभ्यता अभिमंडीत करण्यासाठी पुनर्निर्मीत झालेली लक्ष्ये, असते. कुशलत्वाच्या पेरणीत निसमताजन्य आकाश ह्या संकल्पनेचे अमान्यत्व अनुस्यूत आहे. स्टिफन हॉकिंग्ज यांचे अलीकडेच प्रकाशित झालेल्या लेखाचे शीर्षक space is the final frontier ह्याचा हवाला डॉ. मा. प. थोरात यांनी दिला आहे. (संदर्भ-रावसाहेब कसबे यांचे भक्ती आणि धम्म : वैज्ञानिक समीक्षा) अवकाशाच्या अभ्यासात स्वतःला झोकून देणे. ही एक अवस्था असते. मानसस्कंधाचा अभ्यास करणारे लोक ऊर्जा क्षेत्र निर्माणाच्या दिशेने निघालेले असतात. शिक्षकांसाठी ते प्रोत्साहन आहे. त्यात विरेचन ह्या अवस्थेचे अस्तित्व असते.
हा अत्यंत आनंददायी अनुभव आहे. तो वारंवार घेता आला पाहिजे. हा एक अपारंपरिक विचार आहे असे वाटणे प्रारंभी वाटेल. पण तो आमचा भारतीय गुरुशिष्य परंपरेतील विचार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
हे एकंदरीत सगळे काही जाणीवजन्य असे आहे. आणि ते संपूर्ण अनुभवसाध्य आहे.
मूल पूर्वप्राथमिक अवस्थेत असताना ज्या भीतिशून्य अवस्थेत असते ती अवस्था त्याला पुढील आयुष्यात गाठता येण्यासाठीचा हा मूळ प्रयास आहे. त्या अवस्थेप्रत नेण्यासाठी शिक्षकाकडून जे काही विशिष्ट प्रयास केले जातात त्याची नोंद घेतली जावी, असे त्या शिक्षकाला कधीच वाटत नसते. ज्याला जिथे ही नोंद घ्यायची आहे त्याने ती घेतलेलीच आहे. पण समाजाने, शासनाने, खरे तर शैक्षणिक धोरणाने त्यासाठी काही विशेष विचार केला तर आणखी एक कंगोरा दृष्टीस पडेल.
प्रशिक्षण हे ऊर्जाक्षेत्र आहे. वर्गात पाठ घेणे हे अभ्यासक्षेत्र आहे. आणि अत्यंत दुःखाची बाब म्हणजे आमच्या शिक्षकांना विरेचनाची संधीच मिळत नाही. एरंडाचं तेल पिऊन एनिमा करावा इतकं ते सोपं नाही. प्लुटोने ज्याला कॅथॉरसीस म्हटले आहे असे ते भावस्पर्शी आणि उर्जागामी क्षेत्र असल्याचे आपल्या लक्षात येते. असे हे एकंदरीत क्षेत्रीय प्रारूप आहे अशी संधी नगण्य शिक्षकांना मिळताना दिसते. अभ्यासासाठी त्याला जागाच नाही आणि ऊर्जा मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. म्हणजे तो जवळपास void आहे. आपल्या भाषेत ह्या अवस्थेला कामगार मुंग्यांची अवस्था असे म्हटले पाहिजे.
या अवस्थेदरम्यान खितपत पडून असणाऱ्या ह्या महाप्रचंड क्षमतेच काय करावं, हा खरा प्रश्न आहे.
या प्रसंगी आपल्याला एक उदाहरण जर लक्षात घेतलं तर लक्षात येण्यास मदत होईल. कुणीतरी आंब्याची कोय पेरली तर त्यापासून उत्पन्न झालेला आम्रवृक्ष ही त्या कोयीपासून निर्मित झालेली वस्तू आहे. ती कोय ज्या आम्रवृक्षापासून झाली आहे, त्या आम्रवृक्षाचा आणि या आम्रवृक्षाचा काही संबंध आहे का? हा एक भाग आणि आणखी एक असे की ; हा सध्याचा जो आम्रवृक्ष उत्पन्न झाला आहे तो केवळ त्या कोयीपासून उत्पन्न झाला आहे की, त्याला आणखी काही तरी साह्यकारक आहे. निव्वळ कोयीपासून एवढा मोठा आम्रवृक्ष झाला, असे कसे म्हणता येईल! म्हणजे एकंदरीत जडणघडणीच्या या अमूर्ताकडून मूर्तावस्थेकडे जाणाऱ्या प्रक्रियेत प्रत्येकाचाच सहभाग आहे. या मान्यतेप्रत आल्याशिवाय शिक्षण प्रक्रिया पूर्ण होत नाही, असे लक्षात येईल.
शिक्षकांचा हवा तसा वापर करता यायला हवा. परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांचा तो वापर करू दयायला समाजाचा रुकारात्मक पुढाकार हवा. समाजाकडून अशा कार्यक्रमाचे निर्माण झाले पाहिजे की, ज्यातून भावनांचे निर्माण, कार्याभिरुची आणि दिशा स्पष्टपणे व्यक्त झाले पाहिजे. म्हणजे असे होईल की, आपण काय प्राप्त केले आणि आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे हे निश्चित करता येईल. हा एक समत्वदर्शी भाव असून तो स्वीकारूनच पुढे जाता येईल. तो कार्यतत्परतेतून आणखी विकसीत होत जाईल. यासाठी शिक्षक आणि समाजाच्या भावनांचे तरल पातळीवर एकत्रीकरण करता येणे हे संसुचन आहे. यासाठी प्रकल्प, कृती आराखडा, सांख्यिकीय विश्लेषण, विश्लेषण क्षेत्रांचे नवनिर्माण, स्वतःच्या मनाप्रमाणे काम करता येणे, विविध प्रकारची संमेलने, इत्यादि बाबींसंदर्भात सामूहिक स्तरावर चर्चायनही करता येईल.
जे काय मनुष्य प्राप्त करतो, ते सर्ववेळी त्याचे इप्सित असेलच असे ठामपणे सांगता येईल का? अध्ययन निष्पत्ती ही संख्यात्मक विश्लेषणाच्या पुढे जाऊन करता येणे शक्य आहे का? असा त्यानंतरचा विचार निर्मित होतो.
हे सकारात्मक अभिवृत्तीचे निर्माणशास्त्र आहे. शक्यतांचे डोंगर उभे करणारे आहे. येणाऱ्या पिढयांच्या ज्ञानदर्शी आगमनाच्या स्वागताचे ते संसूचन आहे. ज्या भवितव्यासाठी शिक्षक रात्रंदिवस काळजीपूर्वक आणि जबाबदारीयुक्त नजरेने राबतो. त्याच्या अपेक्षाविस्तारांचा विचार आता नव्या अतिप्रागतिक जगाला सामोरे जात असतांना, तशाच अतिप्रागतिक मानव्याने केला पाहिजे. या नव्या जगात त्यांच्या माणुसपणाला नख लागणार नाही यासाठी त्यांना जपण्याचं कौशल्य विकसित केलं पाहिजे.
-संजय प्रल्हादराव डोंगरे
मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये जाणीव
-संजय प्रल्हादराव डोंगरे
माझा मूल्यवर्धनचा प्रवास
सर्वप्रथम मूल्यवर्धन कार्यक्रमातील सर्वेसर्वा मा. श्री. शांतिलाल मुथ्था ज्यांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची संकल्पना मांडली व त्यांच्या संकल्पनेला ३५ जिल्हे, १०७ तालुके, १६१८ केंद्रे, १८५७२ शाळा, ५०८८७ शिक्षक व ९३३६७१ विद्यार्थी यांनी यशस्विता प्रदान केली. सर्वांचे अभिनंदन , कौतुक, आभार. ‘मी आणि मूल्यवर्धन’ यामध्ये अनुभवकथन करण्याची संधी म्हणजे सुवर्णसंधीच होय. त्यासाठी मी शतश: आभार मानते. मूल्यवर्धन उपक्रमातील एक घटक म्हणून मी सदैव ऋणी असणार.
प्रशिक्षण कोणतेही असो, त्यामधील समाधान खूप महत्त्वाचे असते. देण्यात आणि घेण्यातही. अतिशय चांगले असे हे प्रशिक्षण (मूल्यवर्धन) लाभले. विद्यार्थ्यांना अपेक्षांचे झाड, शांतता संकेत, वर्गनियम या सर्व बाबी नवीन त्यामुळे उत्साह द्विगुणित आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चार संवैधानिक मूल्यांची रूजवण जी संविधानात समाविष्ट आहेत. विद्यार्थ्यांमध्ये खूप बदल जाणवला. स्वच्छता, सर्व कामे व्यवस्थित वाटून दिल्याने शाळेचे वातावरण शांत व प्रसन्न राहते. शिक्षक-विद्यार्थी जवळीक निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमधील विविध गुण कौशल्ये ओळखण्यासाठी मोठी मदत झाली. शिक्षक म्हणून स्वतःमध्ये झालेला बदल म्हणजे मुलांना खऱ्या अर्थाने ओळखायला लागल्याने त्यांच्या अडचणी समजून योग्य पद्धतीने बदल करता आला. संयम वाढला सुसंवाद घडू लागला. हा पिंप्रीखुर्द शाळेतील अनुभव. मागच्यावर्षी ऑनलाईन बदल्यांमध्ये शाळा बदलली, केंद्र बदलले. नवीन शाळेत मूल्यवर्धन उपक्रम राबविताना अधिक फायदा झाला. चक्क शाळेचा पट वाढला. सुसज्ज इमारत, भौतिक सुविधा पण, शाळेविषयी पालकांची अनास्था जाणवली. मूल्यवर्धनमुळे या अनास्थेचा शोध घेता आला. विविध उपक्रम राबवत असताना पालक शाळेत डोकवायला लागले. शाळेसमोर थांबू लागले. इतर शाळेत जाणारी मुले शाळेभोवती फिरायला लागली. पालकांना शाळेविषयी आस्था निर्माण झाली.
आज एवढे समाधान आहे केवळ मूल्यवर्धनमुळे. मूल्य रूजवून वाढविण्याचे काम मूल्यवर्धन उपक्रमाने केले. आज आमची आंबोडा शाळा मूल्यवर्धन शाळा होऊ पाहते आहे. मूल्यवर्धन उपक्रमातील एक प्रेरक म्हणून संधी मिळाली.
-कु. रेखा साहेबराव गीते.
माझा मूल्यवर्धनचा प्रवास
-कु. रेखा साहेबराव गीते.
मूल्यांची रूजवण
मनुष्याला जीवनात ध्येय गाठायचे असेल तर मुल्यांची शिदोरी त्याच्याजवळ असणे ही काळाची गरज झाली आहे.
मी या शाळेमध्ये दोन वर्षांपूवी आले. मला दुसरीचा वर्ग अध्यापनासाठी मिळाला होता. त्यातील अदनान शहा खूपच खोडकर. मला सांगण्यात आले की, तो वर्गात बसत नाही. बसला तर मुलांना मारतो. आम्ही त्याला बाहेरच ठेवतो. तसा तो खोडकरच. बाहेर राहून त्यांच्या खोड्या फारच वाढल्या. योग्य मूल्यांची रुजवण झाल्यापासून तो आता इतर मुलांमध्ये मिसळू लागला. गणितीक्रिया खूप जलदगतीने करतो. त्याचे आई-वडिलांना भेटून समजून सांगितले. आज तो एकही दिवस घरी राहत नाही. वर्गाच्या बाहेर नसतो. इतरांना मदत करतो. मूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे मला माझे ध्येय गाठता आले.
-मीना भगवंतराव देशमुख
मूल्यांची रूजवण
-मीना भगवंतराव देशमुख
मूल्यवर्धन अनुभवकथन
मूल्यवर्धन अनुभवकथन
शाळेची घंटा वाजली. मुले प्रार्थनेसाठी मैदानावर जमली. गुरुजींनी ‘सावधान’ होण्याचा आदेश दिला. तोच सर्व विद्यार्थी सावधान स्थितीत उभी ठाकलीत. गुरुजींनी राष्ट्रगीत सुरू करण्याचा आदेश दिला. “जन गण मन अधिनायक जय हे. . . ” राष्ट्रगीताचे स्वर निनादू लागले. शाळेच्या शेजारच्या रस्त्यावर ये-जा सुरूच होती. तेवढ्यात इयत्ता पाचवीतील यश शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहचला. राष्ट्रगीत सुरू असल्याचे पाहून तो सावधान स्थितीत उभा ठाकला आणि राष्ट्रगीत म्हणू लागला. यशचे हे वागणे पाहून रस्त्यावरून ये-जा करणारे काही लोकसुद्धा शाळेच्या प्रवेशद्वारापाशी थांबून राष्ट्रगीत म्हणू लागले. वर्दळीचा असणारा रस्ता क्षणभर शांत झाला होता. यशमुळे लोकांना राष्ट्रगीताला कसा सन्मान देतात हे कळले आणि त्यांच्या मनात राष्ट्रगीताबद्दल आदर वाढला.
दुसऱ्या दिवशी यश शाळेत वेळेवर आला. मात्र त्याच्या कालच्या वागण्याने आजही काही लोकांनी राष्ट्रगीताला सन्मान दिला. विद्यार्थ्याच्या राष्ट्रगीताला सन्मान देण्याच्या कृतीतून गावाला राष्ट्रगीताला सन्मान देण्याचे वळण लागले. शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत मूल्यांची रुजवणूक झाल्यास विद्यार्थ्यांच्या वर्तनात इष्ट बदल होतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम म्हणतात, “जेव्हा अध्ययन हेतुपूर्ण होते, तेव्हा सर्जनशिलता बहरते. त्यावेळी विचार फुलतात. जेव्हा असे विचार फुलतात, तेव्हा संपुर्णतः ज्ञान आकार घेते. जेव्हा असे ज्ञान निर्माण होते तेव्हा समाज समृद्धीच्या वाटेवर पोहोचतो.” डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे हे विचार आधुनिक शिक्षण प्रणालीचे द्योतक आहे. ‘ज्ञान निर्माण करणे, माणूस घडवणे, समाज निर्माण करणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे कार्य बनले पाहिजे. हेच कार्य मूल्यवर्धन कार्यक्रमाद्वारे होत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम समाजाला समृद्धीच्या वाटेवर नेत आहे. केवळ माहिती म्हणजे ज्ञान नव्हे. मिळालेल्या ज्ञानाच्या जीवन व्यवहारात वापर करता येणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती हे मूल्य रुजल्यामुळे याचा वापर त्यांनी प्रत्यक्ष जगताना केला आणि गावातील इतरांच्या वर्तनात बदल झाला. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे उद्याचे सुजाण नागरिक घडत आहेत.
-निलेश श्रीकृष्ण कवडे
मूल्यवर्धन अनुभवकथन
-निलेश श्रीकृष्ण कवडे
मूल्यवर्धन लेख
मूल्यवर्धन शिक्षण : एक वरदान
सर्जनशील, कृतिशील, निर्णयक्षमता असणारा, आत्मविश्वासाने वावरणारा , सतत पुढाकार घेणारा सर्वांबरोबर मिळून काम करण्याची ताकद असणारा विद्यार्थी निर्माण करण्यास मूल्यवर्धन शिक्षण एक वरदान ठरत आहे. विविधांगी अनुभव देणारे मूल्यवर्धन शिक्षण आजच्या शैक्षणिक सार्वत्रिकरणाच्या प्रवाहात शैक्षणिक दर्जा तथा आधुनिक समाज निर्मितीचा दर्जा उंचावण्यात निश्चितच सहाय्यभूत ठरत आहे.
मूल्यवर्धन शिक्षणाचा उद्देश
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावे म्हणून संविधानातील मुल्ये व त्यासंबंधी कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे हा मूल्यवर्धन शिक्षणाचा उद्देश आहे.
मूल्यवर्धन शिक्षणाचा फायदा
मूल्यवर्धन शिक्षण आज समग्र शाळा दृष्टिकोन लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीची मूल्ये रुजविण्याचे यशस्वी कार्य करीत आहे. यामध्ये प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारणे, शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विकास करणे, मुलांमध्ये शिक्षणाबद्दल आनंद निर्माण करणे, स्वतःहून कामाची जबाबदारी स्वीकारणे, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीचा वापर करणे या बाबींचा विचार करून मांडणी केलेली आहे.
प्रत्येक विद्यार्थी मूल्यवर्धन उपक्रमात आनंदाने सहभागी होतो व त्यामध्ये रममाण होतो. मूल्यवर्धन पुस्तिकेमध्ये प्रत्येक इयत्तेत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने मांडणी केलेली आहे . प्रत्येकाने शिक्षण घेत असताना आपले ध्येय ठरविले पाहिजे व त्यानुसार पुढील वाटचाल योग्य प्रकारे करता येते. यासाठी इयत्ता तिसरीच्या पुस्तकांमध्ये ‘माझे ध्येय व ते साध्य करताना मला मदत करणारे लोक’ अशी अतिशय सुंदर गुंफण केलेली आहे.
प्राथमिक शिक्षण हे विकासाचे परिवर्तनाचे आणि राष्ट्रीय विकासाचे एक प्रमुख आणि महत्त्वाचे साधन आहे. हे मूल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रवर्तक शांतिलालजी मुथ्था यांनी योग्य प्रकारे हेरले व त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात एक ते पाच या वर्गासाठी केली आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुरुवातीची वर्षे अतिशय महत्त्वाची असतात. बालवयात मिळालेले संस्कार चिरकाल टिकतात. त्यामुळे बालवयात जेवढे चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर कराल तेवढा निकोप , विचारी, संवेदनशील समाज पुढील काळात निर्माण होईल.
आपण ज्या समाजात राहतो, तो समाज आज स्वार्थी बनत चाललेला आहे. घरामध्ये सुद्धा विविध कारणाने फूट पडत आहे व त्यामुळे विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात येत आहे. घरातील लहान मुलांवर संस्कार करणारी वडीलधारी मंडळी, आजी, आजोबा या कुटुंब पद्धतीत दिसत नाहीत. लहान मुलांना दुसऱ्याच्या ताब्यात घेऊन आई, वडील नोकरीसाठी बाहेर पडतात. ज्यांच्यासाठी सर्व आटापिटा करायचा, त्याला आई वडिलांच्या प्रेमाला पारखे व्हावे लागते व तो इतरांच्या संगतीने वेगळ्या मार्गाने जातो, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. या सर्व बाबींचा विचार मूल्यवर्धन कार्यक्रमात केलेला आहे. नेमकी हीच उणीव ओळखून मूल्यवर्धन कार्यक्रमांत विद्यार्थ्यांच्या मूल्यांचा विकास करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे.
थोडक्यात सांगायचे झाल्यास मूल्यवर्धन कार्यक्रम हळूहळू काही आगळ्यावेगळ्या बदलांच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मूल्यवर्धन कार्यक्रम म्हणजे मिळालेल्या संधीचं सोनं करणे आहे.
शिक्षकांसाठी मूल्यवर्धन महत्त्वाकांक्षी कार्यक्रम :
मूल्यवर्धन कार्यक्रमातून आपल्या कल्पनांचा वापर शिक्षकांनी योग्य व कल्पकतेने केल्यामुळे त्यांच्यावरील अध्ययनाचा ताण कमी झाला आहे. विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण पद्धतीने अध्ययन करण्याची संधी मिळाली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाची संधी मिळाली आहे. अध्यापन प्रक्रिया रंजक व आनंददायी होत आहे. कठीण संबोध व संकल्पनांचे आकलन सहजतेने होत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढलेली आहे. त्याबरोबर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढण्यासही मदत झालेली आहे.
प्राथमिक शिक्षणाला नवी दिशा देण्यासाठी हा मूल्यवर्धन कार्यक्रम लाभदायी ठरला आहे. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना जे काही हवे आहे, ते देणे एवढेच शिक्षकांचे काम नाही. खऱ्या शिक्षकांचे काम हे आहे की, त्याने आपल्या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण केली पाहिजे. त्याचप्रमाणे आज शिक्षणाने समाज केवळ सुशिक्षित होऊन चालणार नाही तर तो सुसंस्कृत व्हायला पाहिजे, तरच देश योग्य प्रगतीपथावर मार्गक्रमण करील व आदर्श भारत निर्माण होईल. यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम सुवर्ण मार्गक्रमण करीत आहे.
वैशिष्ट्यपूर्ण प्रशिक्षण व वेळोवेळी आढावा
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले. सर्वप्रथम प्रेरकाला योग्यप्रकारे तयार करण्यात आले. यामध्ये प्रथम विद्यार्थ्यांमध्ये कार्यक्रम कसा रुजवावा याचे रंजक पद्धतीने व प्रत्येकाचा सहभाग घेऊन प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात श्री. संदिप मस्के तालुका समन्वयक यांनी मूल्यवर्धन ॲपबद्दल नोंदणी व वापर कसा करायचा हे सांगितले. शाळेमध्ये घ्यायच्या Activity मूल्यवर्धन अॅपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रभर कशा दाखविता अथवा पाहता येतात, याची माहिती दिली. त्याचबरोबर प्रेरक योग्य प्रकारे कार्य करत आहे की नाही, त्यांना काही अडचण आल्यास त्यांचे निराकरण तालुका समन्वयक श्री. संदिप मस्के यांनी केले. एक वर्ष कार्यक्रम राबविल्यानंतर प्रेरकाला केवळ राबऊन न घेता त्याच्या कार्याची पावती प्रत्येक प्रेरकाला मिळावी, यासाठी प्रेरकांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये प्रेरकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
एकूणच मूल्यवर्धन कार्यक्रम आमच्या तालुक्यात अतिशय प्रभावीपणे राबविण्यात आला व अजूनही राबविला जात आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाची फळे भविष्यकाळात योग्य सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी उपयोगी पडतील यात शंकाच नाही.
-दत्तात्रय रामचंद्र सोनोने
मूल्यवर्धन लेख
-दत्तात्रय रामचंद्र सोनोने
मूल्यवर्धन संकल्पपूर्तीनिमित्त अनुभवावर आधारित लेख
मूल्यवर्धन कार्यक्रमातील विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अकोला जिल्ह्यातील कुंभारीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचा जिल्ह्यात सर्वदूर नावलौकिक वाढला असून कुंभारीची शाळा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी व गुणवत्तापूर्ण शाळा अशी ओळख निर्माण झाली आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक व एकंदरीतच संपूर्ण शाळेमध्ये झालेला बदलाचा आढावा स्वानुभवाच्या आधारे प्रस्तुत लेखात केला आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे उंचावली कुंभारीच्या शाळेची प्रतिमा
दिनांक 26 जून 2016 रोजी नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्याच दिवशी अकोला जिल्ह्यातील शिवर केंद्रात आमच्या कुंभारीच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रमाचा विधिवत शुभारंभ झाला. शाळेतील सर्व शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने हा कार्यक्रम स्विकारला. शाळेतील विद्यार्थीही या उपक्रमात रमू लागले. पालक व ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे समाजात व पंचक्रोशीत ‘एक उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण शाळा’ म्हणून आमच्या शाळेला नावलौकिक प्राप्त झाला व शाळेची प्रतिमा उंचावली आहे. यामुळे दोन वर्षांत खाजगी शाळा व कॉन्व्हेंटमधील 47 विद्यार्थी आमच्या शाळेत दाखल झाले आहेत. ही किमया केवळ मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळेच शक्य झाली.
मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे आमच्या शाळेत खालील सकारात्मक बदल घडवून आलेत.
विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली –
मूल्यवर्धन कार्यक्रमातील विविध प्रकारचे उपक्रम व सहयोगी खेळांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी व शिक्षकांविषयी आवड निर्माण झाली. उपस्थितीचे प्रमाण वाढले. 100 टक्के विद्यार्थी शाळेत नियमित यायला लागले, त्यामुळे त्यांची गुणवत्तादेखील वाढली.
विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली –
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी नियम तयार केले. त्यामुळे ते नियम पाळण्याची जबाबदारी त्यांनी स्वयंप्रेरणेने स्वीकारली. ते एकमेकांचा आदर करू लागले. आपसातील भांडणे संपली. घरकामात आई, वडिलांना मदत करू लागले. मोठ्यांचा आदर करू लागले. त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण होऊन ते स्वावलंबी बनले.
शिक्षकांमधील सांघिक भावना वाढीस लागली –
पूर्वी आमच्या शाळेत शिक्षकांमध्ये काही प्रमाणात मतभेद होते. मात्र मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये होत असलेला बदल पाहून शिक्षकांमध्येही वर्तन बदल झाला. आपसातील मतभेद विसरून सर्वजण कामाला लागले. त्यांच्यामध्ये सांघिक भावना वाढीस लागली. शिक्षक-विद्यार्थी व पालकांमध्ये आंतरक्रिया होऊ लागली. शाळेत पोषक शैक्षणिक वातावरण निर्मिती झाली.
शाळेची पटसंख्या वाढली –
सद्यस्थितीत सरकारी शाळेत शिकणाऱ्या मुलांची संख्या कमी होत असताना मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे समाजात आमच्या शाळेची प्रतिमा उंचावली. खाजगी शाळा व कॉन्व्हेंटमधील 47 विद्यार्थी शाळेत दाखल झाले व आमच्या शाळेची पटसंख्या वाढली आहे.
100 टक्के विद्यार्थी प्रगत झाले –
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली. ते अभ्यास करायला लागले. गटचर्चा व जोडीचर्चा यामुळे त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होऊ लागली. प्रत्येक मुल बोलू लागले. विशेष गरजा असणारी इयत्ता 6 वी मधील अबोल असणारी कु. पायल कैलास अतकरे ही विद्यार्थिनी जोडीचर्चेमुळे बोलायला लागली. तिचा सत्कार देखील मा. शांतिलालजी मुथ्था यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोल्याचे जिल्हाधिकारी मा. श्री. जी. श्रीकांत यांनी केला. मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे आमची शाळा 100% प्रगत झाली.
नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी –
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या समग्र शाळा दृष्टीकोन या उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर विविध नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. त्यामध्ये ‘एक दिवा सैनिकांसाठी’ हा दिवाळी विशेष कार्यक्रम, पर्यावरणपूरक होळी, कौशल्य विकास कार्यक्रमावर आधारित किल्ले बांधणी स्पर्धा, 10 डिसेंबर ते 10 जानेवारी या 30 दिवसांच्या कालावधीत खरी कमाई व सेवा महोत्सव, क्षेत्रभेटी, जागतिक महिला दिन, आनंद मेळा, हरवले- सापडले उपक्रम, प्रामाणिक वस्तू भांडार, वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम व विविध समुदाय विकास कार्यक्रमांचा समावेश होता.
कुंभारी गाव 100% हागणदारी मुक्त झाले-
मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून कुंभारी गावांमध्ये विद्यार्थ्यांनी जि. प. सदस्य श्री. चंद्रशेखर पांडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. शौचालयाचे महत्त्व पथनाट्ये, प्रचारफेरी व प्रत्यक्ष संवादातून पटवून दिले व शौचालय बांधण्यासाठी पालकांकडे आग्रह धरला. बचत गटाच्या माध्यमातून कर्ज काढून आपल्या घरी शौचालय बांधणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबातील महिला सौ. सुमनताई तायडे यांचा शानदार समारंभात जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई वाघोडे व आ. गोपिकीसन बाजोरिया यांच्या शुभहस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. या बाबींची सर्वांना प्रेरणा मिळाली व प्रत्येकाने आपल्या घरी शौचालय बांधले व आमचे गाव 100% हागणदारी मुक्त झाले.
मूल्यवर्धन आढावा कार्यक्रम –
शालेयस्तरावर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची पाहणी करण्यासाठी व केंद्रातील कामाचा आढावा घेण्यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. शांतिलालजी मुथ्था हे दिनांक 21 फेब्रुवारी 2017 रोजी आपल्या टीमसोबत आमच्या शाळेत आले. याच दिवशी अकोला महानगरपालिकेचे मतदान सुरू असताना व निवडणुकीची जबाबदारी असतानादेखील अकोल्याचे जिल्हाधिकारी मा. जी. श्रीकांत या कार्यक्रमास 2 तास आवर्जून उपस्थित होते. या आढावा कार्यक्रमात मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेला बदल पाहून सर्वांनी शाळेची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
जिल्हाधिकारी साहेबांनी विद्यार्थ्यांना बोलावले शासकीय निवासस्थानी –
मूल्यवर्धन आढावा कार्यक्रमप्रसंगी उपस्थित राहून मुलांमध्ये झालेला बदल पाहून प्रभावित झालेले अकोल्याचे जिल्हाधिकारी मा. जी. श्रीकांत यांनी 5 मार्च 2017 रोजी शाळेतील निवडक 55 विद्यार्थ्यांना आपल्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करून त्यांना चांगले व जबाबदार अधिकारी बनून देशसेवा करण्याचे धडे दिले व सहभागी विद्यार्थ्यांनीदेखील असाच संकल्प केला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी निवासस्थान हे आमच्या विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थानच बनले आहे.
अशाप्रकारे मूल्यवर्धन कार्यक्रमांमुळे आमच्या शाळेची प्रतिमा उंचावली आहे. हा कार्यक्रम आता आमच्या शाळेपुरता मर्यादित राहिला नसून तो आता संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येत आहे. आता माझी बदली कुंभारी येथून मोरगाव सादीजन येथे झाली असून तेथेही हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने सुरू करण्यात आला आहे.
-श्रीकृष्ण बालीकराम डांबलकर
मूल्यवर्धन संकल्पपूर्तीनिमित्त अनुभवावर आधारित लेख
-श्रीकृष्ण बालीकराम डांबलकर
मूल्यवर्धन उपक्रमामध्ये सहभागी होऊन वाटले मनस्वी समाधान
मूल्यवर्धन उपक्रमामध्ये सहभागी होऊन मनस्वी समाधान वाटले. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये रममाण होताना निखळ आनंद देता आणि घेता आला. ‘माणूस घडवण्याची प्रक्रिया’ म्हणून आपण शिक्षणाकडे पाहतो. उदात्त जीवनमूल्यांची रुजवणूक मुलांमध्ये त्यांच्या नकळत करण्याची संधी मूल्यवर्धनने दिली. यातून मुलांमध्ये तर अपेक्षित वर्तनबदल दिसलाच, सोबतच एक शिक्षक म्हणून आपलंही व्यक्तित्त्व उजळत असल्याचा प्रत्यय आला. शिक्षक म्हणून काम करीत असताना गेल्या कित्येक वर्षांमध्ये मनाला खूपच भावलेल्या उपक्रमांमध्ये ‘मूल्यवर्धन’ निश्चितच वरच्या क्रमांकावर आहे.
-सौ. दीपाली किशोर बळी
मूल्यवर्धन उपक्रमामध्ये सहभागी होऊन वाटले मनस्वी समाधान
-सौ. दीपाली किशोर बळी
.