मूल्यवर्धन आणि शाळा
आमच्या शाळेमध्ये मूल्यवर्धनचे छोटेछोटे उपक्रम राबविल्यामुळे मुलांमध्ये शिस्त, सहकार्य, आदरभाव यांसारख्या मूल्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यापूर्वी मुले शाळेत आल्यानंतर आपल्या चपला, बूट कुठेही ठेवत होते. एकमेकांना सहकार्य कमी प्रमाणात करत होते. एकमेकांना शिव्या देत होते. या कार्यक्रमाच्या राबवणुकीनंतर मुलांमध्ये हळूहळू फरक जाणवू लागला. मुले एकमेकांना सहकार्य करू लागली. मुलांमध्ये शिस्त वाढीस लागली. ते एकमेकांशी आदराने बोलू लागली.
-सत्यवान माळी
मूल्यवर्धन आणि शाळा
-सत्यवान माळी
माझे विद्यार्थी व मूल्यवर्धन
आजची पिढी ही 21व्या शतकात वावरणारी तंत्रज्ञानयुक्त पिढी आहे. प्रचंड बुद्धिमत्ता असलेली व वेगवेगळ्या गँझेट्सवर अवलंबून असणारी ही पिढी. टी.व्ही. बंद केला की, आक्रोश करणारी. अशावेळी त्यांच्या ठायी मूल्ये रूजवायची कशी असा प्रश्न उभा असतानाच जसं अंधाऱ्या रात्री छोटीशी मेणबत्तीही खूप प्रकाशमान भासते, तसंच काम मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन कार्यक्रमाने झाले. त्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांमधील मूल्ये नक्कीच वर्धीत झाली आहेत.
सन 2016-17 या वर्षी आमच्या कोरेगाव तालुक्यात मूल्यवर्धन कार्यक्रमास सुरुवात झाली. सुरुवातीला आमचे प्रशिक्षण झाले. त्यावेळी खरी जाणीव झाली की, याचीच आपण आतुरतेने वाट पाहत होतो. आजची पिढी ही देशाचे ‘भावी सुजाण व जबाबदार नागरिक’ कसे बनतील याच विचारात असताना, शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन कार्यक्रमाने मुलांना नवसंजीवनी दिली. शालेय विद्यार्थी लोकशाहीचा जबाबदार व सुजाण नागरिक बनावेत म्हणून त्या संबंधी कौशल्ये विकसित करण्याची नियोजित संधी आम्हांला या निमित्ताने मिळाली. आमच्या शहरी विभागातील शाळेतील मुलांमध्ये खरे तर सगळ्याच गोष्टींचा थोडाफार अभाव असतो.
मूल्ये ही ठरवून शिकवता येत नाहीत, तर ती नियोजित उपक्रमांनी आनंददायी पध्दतीनेच रूजवावी लागतात. माझ्या मुलांमध्ये ही रूजवणूक मूल्यवर्धन उपक्रमांमुळे झाली. मूल्यवर्धनचा तास म्हटले की मुले आनंदाने उड्या मारू लागतात. गाणी, गोष्टी, खेळ यांचा संग्रह करण्याची त्यांना सवय लागली. मुलांमधील चिकित्सक व शोधक जाणीव दिसू लागली. गटचर्चा, प्रश्नकौशल्य यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली. वर्गनियंत्रण सोपे झाले. स्वतः वर्गनियम बनवल्याने ते पाळणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव दिसू लागली. कोणताही घटक शिकवताना मूल्यवर्धन पध्दतीचा अवलंब केल्यास पाठात मुलांना खिळवून ठेवता येते, याची जाणीव झाली. मुलांसाठी शिक्षण रंजक व आनंददायी बनले. मुलांना ‘स्व’ची एक वेगळी ओळख झाली. आपल्यातल्या गुण व दुर्गुणांचा विचार मुले करू लागली. त्यातून स्वयंमूल्यमापन करून स्वतःच्या वागण्यात बदल करत असल्याची जाणीव झाली. ‘स्व’ पासून सुरु होणारा प्रवास हा कुटुंब, कचरा, पाणी यांसारख्या सामाजिक समस्यांपर्यंत घेऊन जातो. त्यात माझा रोल महत्त्वाचा आहे याची जाणीव मुलांना झाली. तसे बदल मुलांमध्ये दिसू लागले. अशाप्रकारे भारताचे भावी सुजाण व जबाबदार नागरिक घडताना पाहून मनाला एक विशेष आत्मिक समाधान वाटू लागले. हा कार्यक्रम आणखी व्यापक होऊन असाच सुरू रहावा ही विद्यार्थ्यांची अपेक्षा या निमित्ताने मी आपणापर्यंत पोहचवू इच्छिते. आपल्या कार्यक्रमास खूपखूप शुभेच्छा व मनस्वी आभार.
-मुस्कान आतार
माझे विद्यार्थी व मूल्यवर्धन
-मुस्कान आतार
विद्यार्थीरुपी कळी उमलली…
मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना विद्यार्थ्यांमध्ये घडणारे अनुकल परिवर्तन कसे झाले, याबद्दल थोडक्यात माहिती अशी-
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाद्वारे शाळेमध्ये राबविण्यात येणारा मूल्यवर्धन कार्यक्रम हा विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणारा व त्यांच्यामध्ये अनुकूल परिवर्तन घडवणारा असा आहे. विशेष म्हणजे त्यांना हवाहवासा वाटणारा हा कार्यक्रम खूपच फायदेशीर ठरला आहे. ‘मूल्ये शिकविली जात नाहीत, तर ती रुजविली जातात’ या वाक्याप्रमाणे मूल्यवर्धनमधील उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजवण्यास मदत करत आहेत. मूल्यवर्धनमधील उपक्रम हे विद्यार्थीकेंद्रित, विद्यार्थीस्नेही आणि वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावणारे, खेळाच्या माध्यमातून, चित्रांच्या माध्यमातून विचारांना चालना देणारे आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण कसे वागू किंवा आपल्याला कसे वागता येईल, अशा परिस्थितीमध्ये कसे वागणे योग्य व कसे वागणे अयोग्य हे समजायला उपक्रम महत्त्वाचे ठरत आहेत. माझ्याकडे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी होते. या वर्गामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवताना मला त्यांच्यामध्ये प्रकर्षाने जाणवणारा बदल दिसला तो म्हणजे एकमेकांचा आदर करणे. ती मुलं वर्गातील आपल्या मित्र-मैत्रिणी यांना दादा किंवा दिदी असे संबोधू लागले. छोट्याछोट्या गोष्टींत एकमेकांना मदत करायला तत्पर राहू लागले. जसे कला, कार्यानुभवाच्या तासाला विद्यार्थी आनंदी व उत्साही असायचे. तसेच ते मूल्यवर्धनच्या तासाला सर्व विद्यार्थी उत्साही राहतात. अध्ययन अक्षम असणारी मुलेही यामध्ये हिरीरीने सहभागी होऊ लागली. प्रत्येक उपक्रमामध्ये असलेले नाविन्य मुलांना भारावून टाकत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी स्वतःबद्दल नव्याने विचार करायला शिकले. आपले कुटुंबीय, त्यांनी घेतलेले कष्ट यांची जाणीव निर्माण होण्यास हे उपक्रम महत्त्वाचे ठरले. संकटकाळी आपण घाबरून न जाता त्यातून मार्ग निघण्यासाठी त्यांच्या बालबुद्धीला पटेल असे उपाय सांगण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचा आवडणारा विषय म्हणजे खेळ. मूल्यवर्धन उपक्रमांत दिलेले खेळ सहज, सोप्यारितीने, उपलब्ध होणाऱ्या साधनसमुग्रीचा वापर करून तयार केले आहेत. विद्यार्थी या खेळांचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे. ‘मूल्यवर्धनचा तास म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचा तास’ हे समीकरणच होऊन गेले आहे. प्रसन्न व आनंदी मन हे कोणतेही कार्य करण्यास सक्षम असते. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव, शिस्त, नियमांचे पालन, योग्य-अयोग्य निर्णय घेण्याची क्षमता, खिलाडू वृत्ती हे सर्व त्यांच्यामध्ये रुजण्यास मदत झाली आहे. मूलवर्धनच्या उपक्रमांमुळे विद्यार्थीरूपी कळी खुलली गेली हे मात्र निश्चित.
-प्रियांका कोळी
विद्यार्थीरुपी कळी उमलली…
-प्रियांका कोळी
विद्यार्थ्यांमधील बदलाचे साधन : मूल्यवर्धन
मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये होणारे सकारात्मक बदल.
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेला मूल्यवर्धन हा कार्यक्रम आम्ही आमच्या जि. प. प्राथ. शाळा खिरखंडी या शाळेत राबविला. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल अनुभवकथन म्हणून लिहित आहे. कोणताही उपक्रम नाविण्यपूर्ण व जलदगतीने राबविण्याच्या शालेय शिक्षण खात्याच्या अलीकडच्या काळातील महत्त्वाकांक्षेला फुटलेला नवा अंकूर म्हणजे मूल्यवर्धन. वर्षाच्या सुरुवातीलाच जेव्हा शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन पुणे यांनी तालुकावार, केंद्रवार शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले, तेव्हापासून मला असे वाटत होते की मूल्यवर्धन वर्गउपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींतून बदल करता येतील. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’ ही संस्कृती आणि त्या संस्कृतीचा वारसा हजारो वर्षांपासून या भूमीमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला मिळाला आहे. दुसऱ्याला निरपेक्ष भावनेने देण्याची वृत्ती हे सुसंस्कृत माणसाचे लक्षण आहे आणि हे काम केले आहे शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी. प्रत्येक शिक्षक हा त्याच्या परीने उत्तम काम करतो. प्रत्येक शिक्षकाच्या मनात शिकविण्याची तळमळ असते. मात्र कधीकधी काय करावे, कसे शिकवावे, आधुनिकतेचा वेग कसा पकडावा यासाठी मूल्यवर्धन उपक्रमाने मार्गदर्शनाचे काम आमच्यासाठी केले. आम्ही आमच्या शाळेत मूल्यवर्धनचे उपक्रम आठवड्यातून दोन ते तीन वेळा घेतो. यासाठी आम्हांला शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनने तयार केलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांची मदत झाली. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुख्यतः विद्यार्थ्यांमध्ये खालील बदल दिसून आले.
विद्यार्थी प्रथमपासूनच उपक्रमांत मन लावून सहभागी होऊ लागले, रस घेऊ लागले. त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागली. जबाबदारीने निर्णय घेऊ लागले. गटांमध्ये वर्गमित्रांशी सर्व घडामोडींवर विचारविनिमय करू लागले. मुलांना सहयोगी अध्ययनाची सवय लागली. अप्रगत मुलांना प्रगत मुले सर्वच उपक्रमांत सामावून घेऊ लागली. वर्गातील मुलांमध्ये एकीचे दर्शन घडून आले. मुलांना प्रश्न विचारण्याचे कौशल्य अवगत झाले. मुले स्वतःची कामे स्वतः करू लागल्याने पालकांचे काम कमी झाले व आनंद वाढला. मुलांनी वर्गनियम स्वतः तयार केले आणि त्याचे पालनही ते काटेकोरपणे करू लागले. मूल्यवर्धन उपक्रमांतून स्वतःचे दैनंदिन वेळापत्रक, ताणाचे व्यवस्थापन, स्वतःचे मत परखडपणे मांडणे, स्वतःची जबाबदारी हे सर्व संस्कार मुलांमध्ये आपोआप होऊ लागले. आरोग्यविषयक सवयी समजू लागल्या. माझ्या शाळेत मुख्याध्यापक व शिक्षकांनी राबविलेल्या उपक्रमांतून मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल दिसून आले. या सुंदर कार्यक्रमासाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन व शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांना पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा.
-सौ.अनिता शशिकांत अडसूळ (मुख्याध्यापक, जि. प. शाळा खिरखंडी, ता. कोरेगाव, जि. सातारा)
विद्यार्थ्यांमधील बदलाचे साधन : मूल्यवर्धन
-सौ.अनिता शशिकांत अडसूळ (मुख्याध्यापक, जि. प. शाळा खिरखंडी, ता. कोरेगाव, जि. सातारा)
रुजवणूक मूल्यांची
मना घडवी संस्कार, मना भूषवी संस्कार, मना आकारी संस्कार, मना उद्धरी संस्कार”
संस्कारांचा लळा लावणारी आपली शाळा.
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण पुणे व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेला मूल्यवर्धन हा उपक्रम आम्ही आमच्या जि. प. प्राथ. शाळा अमृतवाडी या शाळेत राबविला. विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव लिहीत आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांनी तालुकावार, केंद्रवार शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित केले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बऱ्याच गोष्टींतून सकारात्मक बदल करणे शक्य झाले. तसे पाहता आमच्या अमृतवाडी शाळेत खाणकामगार, गोसावी, परप्रांतीय, स्थलांतरीत घटकांचे 70% विद्यार्थी शिकतात. अशा वातावरणात त्यांच्याकडून शिस्त, संस्कार, मूल्ये यांचा संबंध साधणे शक्य होत नाही. ‘शाळेतच घडतात मुलांवर संस्कार, जगण्यासाठी मुलांना करतात तयार’ यासाठी मोलाचे योगदान लाभले ते शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी राबविलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे.
प्रत्येक शिक्षक हा त्याच्या परीने उत्तम काम करतो. प्रत्येक शिक्षकाच्या मनात शिकविण्याची तळमळ असते. मात्र कधीकधी काय करावे, कसे शिकवावे, आधुनिकतेचा वेग कसा पकडावा हे कळत नाही. यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाने हे काम सोपे केले. आम्ही आमच्या शाळेत मूल्यवर्धन उपक्रम आठवड्यातून तीन वेळा घेतो. यासाठी आम्हांला शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने तयार केलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांची मदत झाली. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये खूपच बदल दिसून आले. विद्यार्थी प्रथम उपक्रमांत मनापासून सहभागी होऊ लागले. त्यांना स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागली. गटामध्ये वर्गमित्रांशी सर्व घडामोडींवर चर्चा करू लागले. मुलांमध्ये शिस्त वाढू लागली. आदर, विनयशीलता जाणवू लागली. वर्गातील मुलांमध्ये एकीचे दर्शन घडून आले. मुलांना प्रश्न विचारण्याचे कौशल्य अवगत झाले. मुले स्वतःची कामे स्वतः करू लागल्याने पालकांचे काम कमी झाले. त्यांना आनंद वाटू लागला. मुलांनी वर्गनियम स्वतः तयार केले आणि त्याचे पालनही ते काटेकोरपणे करू लागले. आमच्या शाळेत शिक्षक व मुख्याध्यापक यांनी राबविलेल्या उपक्रमांतून
पमुलांमध्ये खूप सकारात्मक बदल दिसून आले.
एक दिवा ज्ञानाचा अज्ञानाशी लढण्याचा,
पएक दिवा आनंदाचा दुःख दूर सारण्याचा,
पएक दिवा प्रकाशाचा काळोख मिटवण्याचा,
पएक दिवा समतेचा भेदाभेद दूर करण्याचा,
पदिवा दिवा घेऊन हाती प्रकाश देऊ अवतीभवती
पया सुंदर उपक्रमासाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन व शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांना पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा.
-श्रीमती ज्योती सतिशराव कदम (जि. प. प्राथ. शाळा अमृतवाडी, ता. वाई, जि. सातारा)
रुजवणूक मूल्यांची
-श्रीमती ज्योती सतिशराव कदम (जि. प. प्राथ. शाळा अमृतवाडी, ता. वाई, जि. सातारा)
चिऊ आणि मूल्यवर्धन
माझ्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम राबवित असताना मला त्याची जाणवलेली गरज आणि झालेला फायदा मला येथे नमूद करावासा वाटतो.
गेल्या वर्षी माझ्याकडे इयत्ता पहिलीला एक मुलगी आली. सगळेजण तिला चिऊ म्हणायचे. अत्यंत चलाख आणि हुशार. लवकरच जोडाक्षरांसह वाचन, लेखन, संख्यावाचन, इंग्रजी शब्दवाचन करू लागली. इतक्या छान मुलीचं मला कौतुकच होतं; पण या हुशारीबरोबरच इतर मुलांना विशेषतः वरच्या वर्गातल्या सहाध्यायांना चिडवणे, अभ्यासावरून स्वतःचं कौतुक सांगतानाच इतरांना कमी लेखणे, असे काही गुणही (अर्थात दोष) हळूहळू जास्त प्रमाणात बाहेर यायला सुरूवात झाली. त्यावरून सतत तिच्याविरुद्ध तक्रारी येऊ लागल्या. तिचे पालकदेखील तक्रार करू लागले. मग या समस्येचं निराकरण काही एका दिवसात होणारं नव्हतं. शिक्षा हा यावरचा उपाय नव्हता. यासाठी मला मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकांचं मोलाचं सहकार्य मिळालं.
विशेषतः माझ्या जबाबदाऱ्या आणि माझे नातेसंबंध या विभागातील उपक्रमांनी तिच्यात बहुमोल बदल घडवण्यास सुरुवात केली. इतरांकडून आपण स्वीकारले जावे या भावनेपोटी तिच्यात आता हळूहळू बदल झाला आहे. अजून बदल होत आहेत. तिच्या वाढ आणि विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यात मूल्यवर्धनने खूप महत्त्वाची भूमिका निभावली आहे. लहानाची मोठी होत असताना मुलांकडून चुका या होतच राहतात. पण चूक झाली म्हणून तिथेच न थांबता तिची योग्य मार्गाने दुरूस्ती करणे ही फार महत्त्वाची आणि आवश्यक बाब आहे. अनेकदा योग्य मार्गदर्शनाअभावी या चुकांनाच चुकीचे वळण मिळत जाते आणि मग विकासाचे सारे गणितच बिघडते. मुलांच्या चुकांचे निरसन योग्य पद्धतीने करण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रमाने पहाडासारखा आधार दिला आहे.
मानसिक व भावनिक सुरक्षिततेची हमी मिळाल्याने मुले चुका लपवण्याऐवजी धीटपणे मान्य करुन त्यांत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतात. स्वतःच्या साहित्याची तसेच शालेय साहित्याची हाताळणी करताना काळजी घेतात. मनातील भीती नाहीशी झाल्याने जबाबदारी स्विकारण्यास कचरत नाहीत. हार, जीत यांची पर्वा न करता खेळांचा मनसोक्त आनंद लुटतात. सहाध्यायांची तक्रार करण्याऐवजी एकमेकांना सांभाळून घेतात अन् मदत करतात. मूल्यांची रुजवणूक व संवर्धन त्यांच्या छोटयाछोटया कृतीतून होते. हे माझे, ते तुझे असे न करता सर्वकाही सर्वांसाठी या भावनेने वागतात. विद्यार्थ्यांत होणारे हे मूल्यवर्धन चिरकाल टिकण्यासाठी सर्वांना सदिच्छा !
-श्रीमती गानबावले स्नेहल वसंतराव (जि. प. प्रा. शाळा भुयाचीवाडी जुनी, ता. कराड, जि. सातारा)
चिऊ आणि मूल्यवर्धन
-श्रीमती गानबावले स्नेहल वसंतराव (जि. प. प्रा. शाळा भुयाचीवाडी जुनी, ता. कराड, जि. सातारा)
मूल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडून आले
गेल्या चार वर्षांपासून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमात विद्यार्थी केंद्रस्थानी असले तरी शिक्षक व पालक यांचा सक्रीय सहभाग असणे आवश्यक आहे. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकासाबरोबरच भावनिक व शारीरिक विकास होण्यास मदत होईल.
मी श्री. अमोल मानसिंग खामकर (उपशिक्षक जि. प. शाळा मुळीकवाडी, ता. कोरेगाव जि. सातारा) मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल माझे अनुभव मांडत आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमधील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये श्री. शांतिलाल मुथ्या फाउंडेशन व विद्या परिषद पुणे यांच्यातील करारानुसार मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. या मार्गदर्शनानुसार आम्ही शाळेत उपक्रम राबवित आहोत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तनबदल झाले आहेत. यापूर्वी शाळेमध्ये मूल्यशिक्षण हा विषय घेतला जात होता, परंतु या कार्यक्रमामुळे मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजून त्यांना आणखी बळकटी मिळाली व त्यांची व्याप्ती वाढू लागली आहे. या कार्यक्रमाचा इतर विषयांशी समन्वय साधल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रिया सुकर वाटू लागली आहे. अध्ययनात कृतियुक्त सहभाग असल्यामुळे शिक्षण मनोरंजक वाटू लागले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेचे, वर्गाचे, खेळाचे नियम केल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली. विद्यार्थ्यांना नियम लादल्यासारखे वाटत नाहीत. स्वतः नियम तयार केल्यामुळे वर्गनियंत्रणास मदत होत आहे. मूल्यवर्धनमुळे मराठी, गणित, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयांतील अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात स्पष्ट करता येऊ लागल्या. विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली. सहयोगी खेळांमुळे आपापसात सहकार्य करण्याची वृत्ती लहान वयातच मुलांमध्ये निर्माण झाली. कारण काळानुसार सहकार्याची भावना लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांवर लहान वयातच संस्कार केल्यामुळे त्यांना चांगले काय व वाईट काय हे समजू लागले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शालेय व्यवस्थापन, शिक्षक यांच्या क्षमता समृद्ध करण्यासाठी उपक्रम चांगले आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रस्थानी असले तरी यामुळे सामाजिक विकास होण्यास मदत झाली. सहयोगी उपक्रम व खेळ यांमुळे मुलांना शाळेबद्दल अधिक गोडी वाटू लागली. अशाप्रकारे गेल्या तीन वर्षांपासून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन राबवित असलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी उपयुक्त आहे.
-अमोल खामकर
मूल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात अपेक्षित बदल घडून आले
-अमोल खामकर
मूल्यवर्धन वर्गउपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळाली नवसंजीवनी
लहान मूल आकार घेत असताना घटनात्मक मूल्ये शालेय वयात रुजायला हवीत. भविष्यात लोकाभिमूख नागरिक घडायला हवेत, या उद्देशाने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने तयार केलेला मूल्यवर्धन कार्यक्रम मुलांमध्ये प्राथमिक स्तरावर आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याची संधी मिळाली. कार्यकमात राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा समावेश असल्याचे आढळून आले, तसेच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 मध्ये सुचवलेली मूल्ये ही मूल्यवर्धनाच्या आठ मूल्यांवर आधारलेली दिसली. प्रामुख्याने श्रमप्रतिष्ठा, स्वायत्तता, जबाबदारी, चिकित्सक विचार, विविधतेचा आदर, सुसंवादी नातेसंबंध, आस्था, योगदान, शिक्षण हक्क कायद्यानुसार अध्ययन अध्यापन हे विद्यार्थी केंद्रित असले पाहिजे व शालेय वातावरण विद्यार्थीस्नेही असणे आवश्यक आहे. यामुळे सुलभकाची भूमिका पार पाडण्याची संधी या कार्यक्रमातून मला मिळाली. वर्गपातळी, शाळापातळी व शालेय अभ्यासक्रमाचा संबंध जोडून उपक्रम आयोजित करणे यावर भर दिला. वर्गस्तरीय उपक्रम राबवित असताना अध्ययन निष्पत्तीचा आधार घेण्यात आला. व्यक्तिगत विकासासाठी व प्रभावी व्यक्तिमत्त्वासाठी स्वजाणिव व स्वव्यवस्थापन करणे, स्वतंत्रपणे विचार करणे, जबाबदारीने निर्णय घेणे, विविधता ओळखणे, इतरांविषयी आस्था बाळगणे, कुटुंब, शाळा आणि स्थानिक परिसर सदस्यांच्या कल्याणासाठी योगदान देणे यासाठी वर्गात, शाळेत, सभागृहात आठवड्यातून दोन ते तीन वेळा उपक्रमांचे आयोजन केले. स्वत:ची बलस्थाने, सुरक्षितता, आदर, सामाजिकता यासाठी समावेश केलेले सहयोगी खेळ विद्यार्थ्यांना खूपच भावले. वर्ग उपक्रमातील गोष्टी, गाणी, प्रश्नकौशल्य, शांतता संकेत, मी कोण?, कुटुंबीय, शेजारी, शाळेभोवतीचे सेवाप्रकल्प, छोटेछोटे उपक्रम, गैरसमज, भांडणाऱ्याचे वेगळेपण जाणवले. तालुका स्तरावर प्रेरक म्हणून कार्य करण्याची संधी, वर्गपातळीवर सुलभक म्हणून कार्य करण्याची संधी मिळाली. विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून दिलेली प्रशिक्षण पुस्तिका, वर्गउपक्रम पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी उतरवण्यास मदत झाली. शिक्षण विभाग कराड व शालेय व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
-सुनील खंडाईत
मूल्यवर्धन वर्गउपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मिळाली नवसंजीवनी
-सुनील खंडाईत
मूल्यवर्धन काळाची गरज
मी राजीव नामदेव हत्तीकर. उपशिक्षक जि.प.प्राथ.केंद्रशाळा वडजल. ता.माण.जि.सातारा.
आजही एक सुविचार आठवतो. “If health is lost, something is lost. If wealth is lost, nothing is lost. But Charactor is lost, everything is lost.” जीवनात सगळ्या गोष्टी गमावल्या तरी त्या पुन्हा कमवता येतील, पण एकदा का चारित्र्य गमावलं तर ते पुन्हा कधीच कामावू शकणार नाही. चारित्र्याचा विकास करायचा असेल तर मूल्यशिक्षण काळाची गरज आहे.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद पुणे यांच्यातील करारानुसार मूल्यवर्धन कार्यकम आज गेल्या तीन वर्षांपासून जि. प. शाळेत सुरु आहे. भाषा, गणित, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण हे विषय आजपर्यंत आम्ही शिकवित आलो आहोत. शालेय परिपाठ किंवा अन्य उपक्रमांतून आपण मूल्यशिक्षणाचे धडे मुलांना देत असतो, पण प्रत्यक्षात ज्यावेळी मूल्यवर्धन पुस्तिका शाळेत आल्या, शिक्षकांचे याबाबत प्रशिक्षण झाले त्यावेळी खरे मूल्यशिक्षण आणि मूल्यवर्धन मुलांपर्यंत जाऊन पोहचले. विद्यार्थ्यांमध्ये आपोआप अपेक्षित वर्तनबदल घडतानाचे चित्र दिसू लागले.
मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये वर्गउपक्रम हे भाषा, पर्यावरण, कला आणि शारीरिक शिक्षण या विषयांच्या अध्ययन निष्पत्तींशी संबंधित आहेत. प्रत्येक वर्गासाठी मूल्यवर्धन पुस्तिकेत चार विभाग आहेत.
१) मी आणि माझ्या क्षमता २) माझ्या जबाबदा-या ३) माझे नातेसंबंध ४) मी आणि जग याचबरोबर सहयोगी खेळही आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे चारही विभाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज प्रत्येक मूल स्वत:च्या क्षमता ओळखून स्वअभिव्यक्त होताना दिसत आहे. स्वत:चा अभ्यास स्वत: करतात. स्वत:चे, आपल्या वर्गाचे आणि शाळेचे नियम स्वत: करून त्यांचे पालनही करतात. यापेक्षा अजून काय हवे आहे मूल्यशिक्षणामधून? मूल्यवर्धन कार्यक्रम ज्या दिवसापासून माझ्या शाळेत सुरु झाला, त्या दिवशीच भारताचा सुजाण, संस्कारशील नागरिक घडवण्याचे प्रयत्न माझ्या शाळेत सुरु झाले. अगदी हसतखेळत, रमतगमत, गप्पागोष्टी करत मुले गटागटाने एकमेकांच्या सहकार्याने मूल्यवर्धन उपक्रम पूर्ण करतात. यामुळे शाळेचे वातवरणच पूर्ण बदलून गेले आहे. शालेय परिसर स्वच्छता असेल किंवा वर्गस्वच्छता असेल, मुले न सांगता करत आहेत. शाळा हे माझे घर आहे आणि माझ्या घराची काळजी माझी आहे, अशी भावना निर्माण करण्याचे काम आज मुथ्था फाउंडेशनने मूल्यवर्धन कार्यक्रमातून केले आहे. सहयोगी खेळांच्या माध्यमांतून आज मुलांमध्ये सहकार्याची भावना दिसून येत आहे. मित्रांना मदत करणे, आपुलकीने बोलणे यामुळे शाळेत मुलांमध्ये भांडणे होणे हा प्रकारच बंद झाला आहे. एकंदरीत पाहता शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने सुरु केलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय अध्यापनाबरोबर ‘स्व’ची जाणीव, स्वत:ची कर्तव्ये आणि जबाबदा-या या गोष्टी शिकताशिकता समाजात मुलांनी आपली एक ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त केली आहे.
“माणसे जन्माला येतात पण माणुसकी निर्माण करावी लागते.” हीच माणुसकीची पाहिली पायरी आज प्राथमिक स्तरावर शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद पुणे यांनी मूल्यवर्धन कार्यक्रम हाती घेऊन एक आदर्श कार्य केले आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमास व त्यांच्या सर्व टीमला माझ्या शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक यांच्याकडून मन:पुर्वक शुभेच्छा.
-श्री. रा. ना. हत्तीकर (जि. प. प्रा. केंद्रशाळा वडजल ता. माण, जि. सातारा)
मूल्यवर्धन काळाची गरज
-श्री. रा. ना. हत्तीकर (जि. प. प्रा. केंद्रशाळा वडजल ता. माण, जि. सातारा)
मूल्यवर्धन पुस्तिकेमुळे झालेले बदल
शाळेतील अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तक यातून चांगले नागरिक तयार होण्यासाठी प्रयत्न केले जातात, पण काही गोष्टी मुलांना पटत नसल्याने ते उपदेश एकत नाहीत. या मूल्यवर्धन उपक्रम पुस्तिकेतून महत्त्वपूर्ण बदल विद्यार्थ्यांत झालेला दिसेल.
इयत्ता तिसरीच्या वर्गाचे मूल्यवर्धन पुस्तक हे मनमोहक, चांगले, उपदेशपर गोष्टीरूप आहे. चित्रे काढण्याचा समावेश असल्यामुळे मुले चित्रे काढण्यात गुंतली जातात. गोष्टीचे वाचन करण्याचा मोह मुलांना आवरत नाही. त्यात समावेश असलेले गुण व दुर्गुण यांची पारख मुलांना व्हायला मदत होते. रिकाम्या वेळेत करायचे उपक्रम, नकाशा भरणे, आकार काढणे व रंगविणे, घराचे चित्र पाहून गोष्ट तयार करणे, दिनदर्शिका पाहणे, वजाबाकी, बेरीज, पुढील, मागील संख्या, गणितीय उदाहरणे, रांगोळी, नक्षीकाम, कोडी सोडवूया अशा विविध रंजक गोष्टींचा समावेश केल्याने विद्यार्थी तन्मयतेने सोडवताना दिसतात. आनंदने सहभागी होऊन काम करताना दिसतात. मुलांना हे पुस्तक फार आवडले. शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधणारा कार्यक्रम आहे हे निश्चितच. खात्री आहे की मुले भविष्यातही जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनताना दिसतील.
-सौ. जयश्री श. क्षीरसागर (न.पा.शाळा क्र.5 वाई, ता. सातारा)
मूल्यवर्धन पुस्तिकेमुळे झालेले बदल
-सौ. जयश्री श. क्षीरसागर (न.पा.शाळा क्र.5 वाई, ता. सातारा)
लक्षात राहणारा श्रावण..
आमच्या शाळांमध्ये परिपाठाअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये आम्ही मूल्ये रुजवत असतोच, पण मूल्यवर्धनमधील स्वतंत्र उपक्रमांमुळे आणि त्याच्या आखीव-रेखीव नियोजन आणि शिस्तबद्धतेमुळे विद्यार्थ्यांबरोबरच आम्हा शिक्षकामध्येही चांगले दिशादर्शक बदल घडले. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांचा हा एक खूपच सुंदर आणि आजच्या काळाच्या गरजेनुसार सर्वोत्कृष्ट कार्यक्रम आहे.
मागील वर्ष सन २०१८-१९ मध्ये आमच्या वाई तालुक्यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमाअंतर्गत माझी मूल्यवर्धन प्रेरक म्हणून तालुक्याच्या टिममधून निवड झाली. त्या अनुषंगाने आम्हा सर्व टिमला दिशादर्शक आणि खूपच छान प्रशिक्षण मिळाले. यानंतर आम्हांला प्रत्यक्ष आमच्या शाळेत काम करावयाचे होते. शाळेत या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे खूप छान अनुभव अनुभवता आले व योग्य ते बदल करता आले. मागील वर्षी माझ्याकडे इयत्ता पहिली, तिसरी आणि चौथी असे तीन वर्ग आणि ३३ विद्यार्थी होते. उपक्रम राबवित असताना मी सुरुवातीलाच शाळा व वर्गाचे नियम विद्यार्थ्यांकडून बनवून घेतले. नंतरच्या काळात अंमलबजावणीवर काम केले. मग विद्यार्थी स्वयंप्रेरणेने नियम पाळायला लागले. उदा. शाळेमध्ये शिस्त पाळणे यामध्ये वर्ग सफाई, परिसर स्वच्छता, मध्यान्ह भोजन करताना इयत्ता पाहिलीच्या वर्गाला पहिले प्राधान्य, जेवताना खरकटे न सांडवणे, सर्व अन्न खाणे, आपल्या मित्रांना अभ्यासात व खेळात सहभागी करुन घेणे अशा चांगल्या गोष्टी घडू लागल्या. याचा परिणाम अभ्यासातही शिस्त, स्वयंप्रेरणा आली.
मागील वर्षी माझ्या वर्गात श्रावण नावाचा एक विद्यार्थी इयत्ता चौथीमध्ये होता. तो अभ्यासात चांगला, परंतु खोडी काढण्यात पुढे. त्याला रागही एवढा यायचा की, तो ७ वी पर्यंतची मुले, मुली यांनाही मारायचा. सर्व मुले घाबरून असायची. माझी बदली त्याच वर्षी झालेली. शाळा सुरु व्हायच्या आधी आम्हांला वर्ग सफाई, शाळा पूर्वतयारी करावी लागते. तेव्हा तर त्याने मला चक्क खून्नस दिली होती. आणि योगायोगाने त्याचा वर्ग माझ्याकडेच आला. वर्ग सुरु झाल्यावर त्याला हँडल करताना मला त्रास झाला. इतर मुलांनाही त्रास झाला. अगदी पालकांपर्यंत तक्रार अशा गोष्टी झाल्या. बरं तो अभ्यासात चांगला होता. रागाने त्याला एक-दोनदा मारलेसुद्धा.
मी माझे प्रयत्न ब-यापैकी केले होते, पण यश मिळाले नव्हते. दरम्यान मूल्यवर्धन अंतर्गत तालुका पातळीवर प्रेरक म्हणून प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर ख-या अर्थाने माझा श्रावणकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मी वेगळ्या अँगलने विचार करायला लागलो. तो असा का वागतो याचा शोध घेतला. अगोदरच्या शिक्षकांशी चर्चा, त्याच्या कुटुंबाशी चर्चा झाली. मला ब-याच बाबी समजल्या. पहिली गोष्ट त्याचे वडील त्याच्या सुरुवातीच्या काळातच देवाघरी गेले होते. घरी काळजी घेणारे चुलते किंवा जाणते कोणीच नव्हते. फक्त आई, आजी आणि दोन मोठ्या बहिणी असे छोटे कुटुंब होते. समजवणारे कोणी नाही.
मूल्यवर्धन उपक्रमांच्या माध्यमातून त्याची जबाबदारी, चांगल्या-वाईट सवयी याची जाणीव करून दिली. त्याला स्वतःची ओळख करून दिली. ओळख स्वतःची, माझ्या जबाबदा-या, सर्वात चांगला पर्याय कोणता? अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्याचे समुपदेशन केले. याकामी मला इतर शिक्षक, त्याची आई, इतर विद्यार्थी यांची मदत मिळाली. महत्त्वाचे म्हणजे त्यानेही स्वतःमध्ये बदल केले. इतर विद्यार्थ्यांनीही त्याला समजून घेतले. हे सर्व घडत असताना त्याच्या डोळ्यांतील अश्रू मला खूप काही सांगून जायचे. नंतर तो खूपच बदलला. त्याच्या आईने, शिक्षकांनी, पालकांनी तसे मला आवर्जून सांगितले.
आज श्रावण पाचवीत आहे. माझ्याकडेच आहे. अभ्यासातही बरीच सुधारणा झाली आहे. तो चांगला आणि आवडता विद्यार्थी, आज्ञाधारक विद्यार्थी झाला आहे. हे यश नक्कीच मूल्यवर्धन कार्यक्रमाचे आहे. हा कार्यक्रम राबवित असताना असे खूप छान अनुभव आले. यातील खेळ विद्यार्थीप्रिय झाले.
शेवटी एवढेच सांगेन, धन्यवाद शांतिलाल मुथ्था फाउंडेशन आणि धन्यवाद महाराष्ट्र शासन. कारण अशा चांगल्या बाबींचा मी साक्षीदार आहे. मूल्यवर्धनचे चौधरीसर आणि तालुका समन्वयक यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले हे ही विशेषत्त्वाने सांगावेसे वाटते.
-श्री. धर्मेंद्र विष्णू दिक्षीत (जि.प.प्रा. शाळा खावली)
लक्षात राहणारा श्रावण..
-श्री. धर्मेंद्र विष्णू दिक्षीत (जि.प.प्रा. शाळा खावली)
मी आणि मूल्यवर्धन
मुले म्हणजे फुले असे आपण मानतो. या फुलांचा सुगंध सतत दरवळत राहायला हवा यासाठी पालक, शिक्षक, समाज यांनी मुलांचे निरागस मन ओळखायला हवे, जपायला हवे. शिक्षणाच्या माध्यमातून हे सहज शक्य आहे. ही जाणीवजागृती करण्याचे काम मूल्यवर्धनने केले आहे.
मी सौ. शम्मा आलमगीर मुल्ला, उपशिक्षक- जि. प. शाळा, भांडेवाडी, ता. खटाव, जि. सातारा; मूल्यवर्धन या कार्यक्रमाबाबत माझे अनुभव कथन करू इच्छिते.
आजचे युग विज्ञानाचे युग असल्याने यशस्वीकडे नेणारे विविध बदल घडत आहेत. हे बदल ज्यांना स्वीकारता आले, पचवता आले तेच जीवनात यशस्वी झाले. शिक्षिका म्हणून काम करत असताना माझ्याकडे असणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी मला मूल्यवर्धन पुस्तिकेतील उपक्रमांचा खूप फायदा झाला. मला भाषा, कार्यानुभव, कला, शारीरिक शिक्षण या विषयांची सांगड घालून अभ्यासक्रमाबरोबरच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची 10 मूल्ये शिकविणे सोपे गेले. हा अभ्यास विद्यार्थीकेंद्रित कसा करता येईल याची दिशा मला मूल्यवर्धनमुळे मिळाली. ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रगत महाराष्ट्र’ या कार्यक्रमातून अभ्यासक्रमात नमूद केलेल्या अध्ययन-निष्पत्तींच्या आधारावरचे उपक्रम शिक्षक उपक्रम पुस्तिकेत दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर उंचावण्यासाठी या कार्यक्रमाधारे मूल्ये विकसित होण्यास मदत झाली.
इयत्ता दुसरीच्या वर्गातील सर्व मुले प्रगत झाली. रोजगाराच्या निमित्ताने आलेली कन्नड कुटुंबातील दोन मुले होती. हे उपक्रम अमराठी विद्यार्थ्यांनाही पूरक असल्याने त्यांनीही मराठी भाषा अवगत केली. ते आज मराठी भाषा वापरून अभ्यास पूर्ण करत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी या उपक्रमाचा फायदा झाला. तसेच मुथ्था फाउंडेशनने शिक्षक उपक्रम पुस्तिकेबरोबर विद्यार्थी उपक्रम पुस्तिका तयार केल्याने विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाला. विद्यार्थ्यांच्या अनुभविश्वाला अनुरूप उपक्रम असल्याने शिक्षणपातळी आपोआप वाढली. मूल्यवर्धन उपक्रम समग्र शाळा दृष्टिकोनावर आधारित असल्याने प्रभावी झाले. शेवटी शिक्षण म्हणजे काय तर दृष्टी, जीवन समृद्ध करण्याचा विचार. प्रेम, मदत, आदर यांच्या साथीने आनंदाने जगायला शिकवते तेच खरे शिक्षण होय.
शिक्षणाकडून पालक, शिक्षक, समाज यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे एकमेव तंत्र मूल्यवर्धनच्या माध्यमातून मुथ्था फाउंडेशनने आम्हा सर्वांना दिले. या कार्यक्रमाचा विशेष फायदा मिळाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षणाच्या माध्यमातून मुलांचे जगणे समृद्ध करण्यासाठी धडपडणाऱ्या व मुलांना माणूस म्हणून उभे राहण्यासाठी ताकद देणाऱ्या शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे शतशः आभार !
-शम्मा मुल्ला
मी आणि मूल्यवर्धन
-शम्मा मुल्ला
वर्तनबदल
आपल्या वागण्या-बोलण्यातून आपण कसे आहोत हे इतरांना समजते. शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून संविधानातील मूल्ये व त्यासंबंधीत कौशल्ये विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी देणे हा खरा मूल्यवर्धन कार्यक्रमाचा हेतू आहे. विद्यार्थ्याला त्याच्या मूळवर्तनातून शिस्तवर्तनात आणण्यासाठी मूल्यांची गरज आहे असे मला वाटते. मुले शिस्तप्रिय, नम्र नाहीत असे नाही, परंतु न ऐकणे कामचुकारपणा करणे, वडीलधा-यांचे न ऐकणे, आपले ते खरे करणे यामुळे विद्यार्थी वेगळीकडे जात असल्याचे चित्र दिसून येते.
नियम तयार करणे हा उपक्रम वरील बाबींना आळा घालू शकतो. स्वतः नियम बनवायचे आणि ते पाळायचे यामुळे विद्यार्थ्यांना आपल्यावर नियमांची जबरदस्ती झाली असे वाटणार नाही. तयार केलेल्या नियमांचा काळजीपूर्वक वापर करतील. या कार्यक्रमामुळे चांगले मित्र, नातेवाईक, कुटुंब या सर्वांशी प्रेमाने वागत असल्याचे दिसून आले. मूल्यवर्धन उपक्रमामुळे शिस्त व प्रामाणिकपणा वाढल्याचे दिसून आले. हरवलेली वस्तू शिक्षकांना नेऊन देणे, रांगेत जाणे, शिस्तीत आहार घेणे, दंगा, गोंधळ न करणे मूल्यवर्धन उपक्रमांतून अशा अनेकविध गोष्टींत बदल झालेला दिसून आला. मूल्यवर्धन तासिका दर दिवशी असावी. नाविन्यपूर्ण प्रशिक्षणे दिली जावीत. विद्यार्थी वर्तनशील होण्यासाठी मूल्य संवर्धन होणे ही काळाची गरज आहे.
-शालन साठे
वर्तनबदल
-शालन साठे
मूल्यवर्धन आणि मी
असं म्हणतात की आजची पिढी ही फास्ट फोरवर्ड आहे. प्रचंड बुद्धिमान असणारी ही मुलं तंत्रज्ञानाच्या जगात अगदी सहज वावरत आहेत. कुठेतरी एक नागरिक म्हणून यांचे व्यक्तिमत्त्व घडत असताना मूल्यांशी थोडीफार फारकत होत असल्याचे जाणवते. सोशल मिडियाचा सार्वत्रिक वापर आणि विभक्त कुटुंबपद्धती याचा हा परिणाम असावा. साहजिकच मुलांची मूल्यांशी ओळख करून देण्याची जबाबदारी शिक्षकावर येते. एक शिक्षक म्हणून काम करताना अशावेळी आमच्या मदतीला शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा मूल्यवर्धन कार्यक्रम धावून आला. या कार्यक्रमामुळे फक्त विद्यार्थीच नाही तर शिक्षक म्हणून माझ्याही व्यक्तिमत्त्वात बदल झाला.
जानेवारी 2019 हा महिना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला. कारण याचवेळी माझी ओळख शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या मूल्यवर्धन कार्यक्रमाशी झाली. शालेय विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार नागरिक बनावेत म्हणून त्यासंबंधीची कौशल्ये विकसित करण्याची नियोजित संधी या निमित्ताने आम्हा शिक्षकांना मिळाली. खरं तर मूल्ये ही ठरवून शिकवता येत नाहीत, तर ती नियोजित उपक्रमांतून आनंददायी पद्धतीने रुजविली जातात. हेच आनंददायी उपक्रम शोधण्याची शोधकवृत्ती माझ्यात निर्माण झाली. मूल्यवर्धनचा प्रत्येक तास रंजक करता यावा म्हणून प्रत्येक घटकांशी संबंधित गाणी,गोष्टी, खेळ यांचा संग्रह करण्याची एक सवयच लागली. अनायासे आम्हा शिक्षकांकडे प्रत्येकाचा एक अनमोल संग्रह तयार झाला. गटचर्चा, प्रश्नकौशल्य यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मुलांमध्ये स्वयंशिस्त तर निर्माण करता आलीच, त्याचबरोबर वर्गनियंत्रणाचा एक अनोखा मार्गही सापडला. स्वतःच वर्गाचे नियम बनविल्यामुळे त्यांचे पालन स्वतः करणे, शिवाय इतरांना त्यासाठी प्रवृत्त करणे या बाबी विद्यार्थ्यांमध्ये दिसून येऊ लागल्या. जबाबदारीची जाणीव त्यांच्यात निर्माण करता आल्याचे समाधान मला लाभले. हे उपक्रम अतिशय रंजक पद्धतीने घेतले जातात. ही रंजकता केवळ याच उपक्रमांपुरतीच मर्यादित न राहता इतर विषयांच्या अध्यापन प्रक्रियेशी त्याची सांगड घालता आल्यामुळे माझे स्वतःचे अध्यापन रंजक आणि सर्वसमावेशक बनले. अध्ययन निष्पत्ती आणि ज्ञानरचनावाद यांचा सुरेख मेळ मूल्यवर्धनच्या तासिकांमुळे घालता येत असल्याचे जाणवले. स्वतःच्या, कुटुंबाच्या ओळखीपासून सुरू होणारा हा प्रवास कचरा, पाणीप्रश्न यांसारख्या सामाजिक समस्यांपर्यंत घेऊन जातो. त्यामुळे स्व जाणिवेपासून माझा देश आणि त्याच्या समस्या, माझे योगदान इतका व्यापक विचार करण्याचे कौशल्य माझ्या विद्यार्थ्यांमध्ये उपक्रमामुळे मला निर्माण करता आले, याचे खरोखर समाधान वाटते.
वर्गाची नियमित उपस्थिती, स्वच्छतेच्या आणि आरोग्यदायी सवयी, बचतीची सवय मुलांमध्ये रुजू लागली. अशाप्रकारे भारताचे भावी नागरिक सुजाण आणि जबाबदार बनविण्याच्या प्रयत्नांत मला खारीचा वाटा उचलता आला, तो मूल्यवर्धन कार्यक्रमामुळेच. हा कार्यक्रम फक्त चालूच राहावा असे नाही तर अधिक व्यापक व्हावा आणि त्याचे शिलेदार म्हणून अधिक काम करता यावे, हीच अपेक्षा.
-स्वाती माने
मूल्यवर्धन आणि मी
-स्वाती माने
वर्तनबदल
अध्यापन करताना केवळ पाठ्यपुस्तक शिकवीत होते. मूल्यवर्धन पुस्तकामुळे मुले अधिक कृतिशील झाली.
मूल्यवर्धन पुस्तकामध्ये विविध उपक्रम व कृतींचा सामावेश केलेला आहे. मुलांच्या आवडीच्या कला, चित्रकला, संवाद छ़ोटेछोटे खेळ आहेत. त्यामुळे मुले स्वतः पुस्तक उघडून सांगितलेली कृती करतात. स्वत:चे नियम स्वतःच केल्यामुळे त्यांचे काटेकोरपणे पालन करताना आढळतात. त्यामुळे आपोआपच वर्गनियत्रंण होण्यास मदत झाली. काही कृती गटाने कराव्या लागतात. परिणामी मुले एकमेकांना सहकार्य करतात. चित्र रंगविणे, ठिपके जोडून चित्र तयार करणे इत्यादी कृतींमुळे मुलांची बैठक तयार झाली. मूल्यवर्धन पुस्तकातील उपक्रम इतर विषयाला समांतर असल्याने अध्ययन प्रक्रिया आनंददायी व सुलभ झाली. पुस्तकातील कृती घेताना विविध सूचना द्याव्या लागतात. त्यामुळे सूचना समजून कृती करण्याची सवय लागली. थोर नेते, खेळाडू, शास्रज्ञ यांचे लेख, गोष्टी मुलांना खूप प्रेरणादायी वाटल्या. जोड्या लावा, फरक ओळखा या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षण क्षमता वाढली. छोटे पण उद्दिष्टपू्र्ण खेळ मुलांची एकाग्रता वाढवतात. कोलाजकाम, मुद्राचित्र, चिकटकाम या कृतीमुळे त्यांच्यात शाळेविषयी आवड निर्माण झाली आहे.
-साधना जाधव
वर्तनबदल
-साधना जाधव
विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल
आपण नेहमीच बरोबरच असतो असे सर्वांना वाटते. मी केलेलेच बरोबर आहे, ही भावना प्रत्येक माणसाच्या मनात असते. अगदी लहान मुलांमध्येही अशी भावना असणे अगदी स्वाभाविक आहे. हा विचार बदलणे गरजेचे असते. हा एकच विचार नाही, तर अशा अनेक गोष्टींवर शिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे असते. शिक्षकांना हे काम सोपे करून दिले ते मूल्यवर्धन या कार्यक्रमाने.
शैक्षणिक सत्र 2018-19 मध्ये मी माझ्या शाळेत शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने तयार केलेला मूल्यवर्धन हा कार्यक्रम सुरू केला. या कार्यक्रमांतर्गत सर्व मुलांना उपक्रम पुस्तिकांचे वाटप करण्यात आले होते. उपक्रम पुस्तिका आणि त्याला साजेसे उपक्रम यांच्या मदतीने शाळेमध्ये तासिका घ्यायला सुरुवात केली. या उपक्रमांच्या मदतीने मुलांमध्ये हळूहळू परिवर्तन दिसू लागले.
मुलांना आपल्या कुटुंबातील लोक आवडतच असतात, आता त्यांना आदर वाटू लागला, त्यांचे महत्त्व समजू लागले. त्याचप्रमाणे आपले शेजारी असणारे लोकही आपल्याला विविध कामांसाठी मदत करत असतात याची जाणीव निर्माण झाली, आपल्यापेक्षा मोठे, वडीलधारी मंडळी यांचा आदर करणे आणि त्यांचे ऐकणे हे ही मुलांना समजू लागले आहे. मुलामुलांमध्ये विविध कारणांमुळे भांडणे होत असतात, त्यावेळी आपण पाहतो की, कोणतीच मुले आपली चूक मान्य करत नाहीत. त्यांना वाटतं की आपणच बरोबर आहोत. समोरच्या मुलाचं कसं चुकलं हे ते सांगतात. मूल्यवर्धन उपक्रमांच्या मदतीने ही भांडणं बरीच कमी आली आणि मुलांना आपली स्वतःची चूक मान्य करण्याची सवय लागली. परिणामी चुकाही आता कमी होऊ लागल्या. आपले गुण आणि दोषसुद्धा मुलांना समजू लागले. दोष दूर व्हायला मदत झाली. तसेच त्यांच्यामध्ये जिद्द, चिकाटी, प्रचंड मेहनत घेण्याची सवय, प्रसंगी दुसऱ्याला मदत करण्याची सवय वृद्धिंगत होण्यास मदत झाली. ‘तुम्ही काय कराल?’ अशा उपक्रमातून प्रसंगानुरूप कसे वागावे याचीही मुलांना जाणीव झाली. आपल्यातील अनेक भांडणे गैरसमजाने होत असतात. आपण एकमेकांशी बोलून तसेच घाईत न बोलता जरा थांबून विचाराने बोलणे गरजेचे आहे, हे ही मुलांना कळू लागले आहे. आपल्या चांगल्या, निरोगी आयुष्यासाठी वृक्षांचे महत्त्व समजून त्यांची जास्तीत जास्त लागवड करून त्यांची जोपासना करण्याचे काम अनेक मुलांनी केले. या पावसाळ्यात त्यांनी आपल्या शेतात झाडे लावली आहेत.
-नितीन कर्पे
विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल
-नितीन कर्पे
मूल्यवर्धन : विद्यार्थ्यांसाठी एक वरदान
आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर, वाठार स्टेशन शाळेमधील इयत्ता पहिली ते चौथी या चार वर्गांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय प्राभावीपणे राबवला जातो. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये छान संस्कार घडत असल्याचे आम्हांला जाणवत आहे. विविध मूल्ये त्यांच्या अंगी रुजण्यास मदत होताना दिसत आहे. आम्ही आमच्या शाळेत दैनंदिन अध्यापन करत असताना मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत घेत असतो. वर्गानुसार विद्यार्थी उपक्रम पुस्तिका अतिशय उपयुक्त ठरत आहेत. वर्गानुसार त्यांच्या वयोगटाचा विचार करून अतिशय छान उपक्रम तयार केलेले आहेत.
उपक्रम राबवित असताना आमच्या व विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव मिळत आहे. विद्यार्थी कृतिशील बनण्यास मदत होताना दिसत आहे. परिसर अभ्यासासारखा विषय शिकत असताना विद्यार्थी सर्वप्रथम त्यांच्या कुटुंबापासून शिकत असतो. त्यांच्या भावविश्वाशी निगडित गोष्टी मूल्यवर्धन कार्यक्रमात सामाविष्ट असल्याने विद्यार्थी हे उपक्रम शिकण्यात रस दाखवित आहेत. त्यामुळे त्यांच्यात विविध मूल्ये रुजण्यास मदत होत आहे. विद्यार्थी त्यांच्या जीवनात नातेसंबंध, मित्र, नातेवाईक या गोष्टी अतिशय छानप्रकारे समजू लागले आहेत. जीवनात समाजाप्रती आपली भूमिका क़ाय असायला हवी याची जाणीव विद्यार्थ्यांना होण्यास मदत मिळत आहे. असे अनेक उपक्रम आमच्या शाळेत राबवले जातात.
यावेळी आम्ही प्रशिक्षणात शिकल्याप्रमाणे वर्तुळाकार वर्गरचना करू लागलो आहोत. अशा रचनेमुळे सर्वांना सर्व विद्यार्थी दिसण्यास मदत होत आहे. तसेच जोड़ीचर्चा पद्धती, गटचर्चा पद्धती अतिशय उपयुक्त पडत आहेत. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे विद्यार्थी जोडीचर्चा पद्धती समजू लागले. गटात चर्चा करू लागले. त्यांच्यात सभाधीटपणा वाढू लागला. याचाच फायदा म्हणजे आमच्या शाळेत विविध समाजसुधारकांच्या जयंती, पुण्यतिथि कार्यक्रमाच्यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने भाषण करू लागले. शिक्षक उपक्रम पुस्तिका देखील आम्हांस मार्गदर्शक ठरत आहेत. या उपक्रमाच्या प्रशिक्षणाचा आम्हांला खूप फायदा होत आहे. आमचे मार्गदर्शक श्री. लावंडसर, कांबळेसर वेळोवेळी शाळेला भेट देत असतात. आम्हांला मार्गदर्शन करत असतात. प्रसंगी शाळेत येऊन विविध तासिका घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. या सर्व घटकांमुळे आमच्या शाळेत मूल्यवर्धन कार्यक्रम प्रभावी होण्यास मदत होत आहे.
शालेय अभ्यासक्रम व मूल्यवर्धन एकच असून दोन्हींद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा हेतू पूर्णत्वास जाण्यास मूल्यवर्धन कार्यक्रम दिशादर्शक ठरत आहे. सर्वांनी हा कार्यक्रम आपापल्या शाळेत प्राभावी राबवावा. मूल्यवर्धन उपक्रमासाठी आणि राबवणाऱ्या सर्वांना मनापासून शुभेच्छा.
-रणजित निंबाळकर
मूल्यवर्धन : विद्यार्थ्यांसाठी एक वरदान
-रणजित निंबाळकर
माझ्या जबाबदाऱ्या
मी चेतन तोडकर. आमची शाळा कास पठरालगतची दुर्गम शाळा आहे. त्यामुळे उपेक्षित, दुर्लक्षित शाळा अशी आहे. मुलांना शिक्षणाची आवड नाही व शालेय जीवन बाह्य जगापासून अलिप्त असल्यामुळे मुलं शाळेत जरी आली, तरी कोणतंही काम जबाबदारीने करण्याची मानसिकता नसायची. मी व माझे सहकारी शिक्षक श्री. बोबडे सर पालकसभा घेऊन मुलांना शाळा कशी आवडेल, त्यांना शिक्षणात रुची कशी निर्माण होईल, कोणतंही काम जबाबदारीनं कसं करतील याविषयी चर्चा केली. त्यानुसार मूल्यवर्धन पुस्तिकेतील नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.
शांतता संकेत मुलं पाळतात. त्यामुळे वर्गनियंत्रण आपोआप होते. त्याचबरोबर वर्गनियम, शाळेचे नियम मुलांनीच बनवल्यामुळे सर्व लोकशाही पद्धतीने मुले शाळेविषयी जबाबदारी व कर्तव्ये पार पाडताना दिसतात. हा फार मोठा बदल विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला. तसेच स्वतःच्या वस्तूंची जबाबदारीने काळजी घेणे, शाळेतील सार्वजनिक मालमत्तेचा योग्य वापर सोयी-सुविधांचा वापर जबाबदारीने करणे, त्यांची काळजी घेणे इत्यादी बदल मुलांमध्ये घडून आणण्यासाठी त्यांच्या वयोगटाप्रमाणे विविध नाविन्यपूर्ण व मनोरंजक पद्धतीने रचना विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेत केलेली दिसते. त्यानुसार मूल्यवर्धन पुस्तिकेतील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली.
परिणाम असा झाला की आमची मुलं सर्व उपक्रम आवडीने व मनापासून करू लागली. परिणामी मुलांची उपस्थिती वाढली. शाळेविषयी आवड निर्माण झाली. त्यामुळे साहजिकच मुलांची गुणवत्ता वाढली. त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होऊन भारताचे जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास येत आहे. हे सर्व मूल्यवर्धन पुस्तिकेतील विविध उपक्रमांमुळे झाले. त्यामुळे मी व माझे सर्व सहकारी, पालक या कार्यक्रमाला धन्यवाद देतो. त्यातील उपक्रम लोकशाही मूल्ये नक्कीच रुजवतील यात शंका नाही. हा कार्यक्रम असाच विस्तारत जावो. जबाबदार, विविध लोकशाही मूल्ये रुजलेली व घटनात्मक मूल्ये आत्मसात केलेली भारताची भावी पिढी यामुळे तयार होईल.
-चेतन तोडकर
माझ्या जबाबदाऱ्या
-चेतन तोडकर
मूल्यवर्धन : काळाची गरज
सन २०१८-१९ मध्ये मी शाळेत हा उपक्रम राबविला. त्यावेळी मुलांमध्ये विविध बदल झाले.
विद्या प्राधिकरण व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविता आले. यामुळे विद्यार्थी स्वत: व्यक्त होतात. आपल्या कल्पनांची चर्चा गटामध्ये करताना दिसले. उपक्रमांचे विषय त्यांच्या आवडीचे असल्याने छान सहभागी झाले. विद्यार्थी स्वत: नियम बनवतात व त्यांचे काटेकोरपणे पालन करतात. मुलांना फार बोलायची सवय असते. या कार्यक्रमात जोडीचर्चा, गटचर्चा आहेत. यात मुले छान चर्चा करतात व पुढे येऊन सांगतात. इयत्ता पहिलीमध्ये झुझू बाहुलीशी मैत्री करण्याचा एक उपक्रम आहे. आमच्या शाळेत अशीच एक छान झुझू आली. मुलांनी तिच्याशी छान मैत्री केली. तिला ते नेहमी अभ्यास करताना, जेवताना, खेळताना बरोबर घेत. पालकदेखील या झुझूविषयी विचारणा करू लागले.
विविध प्रसंगी योग्य निर्णय कसा घ्यावा हेदेखील मुले छान शिकली. इतरांच्या मतांचा आदर करायला, शेजारी जाऊन त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याविषयी जाणून घेऊ लागली. विद्यार्थी पुस्तिकेतील उपक्रम आवडीने करू लागली. छोट्याछोट्या उपक्रमांतून मुलांमध्ये मूल्ये हसतखेळत रुजवताना छान वाटले. चालूवर्षी अजून चांगला प्रयत्न करून हा कार्यक्रम राबविण्याचा संकल्प आहे.
-रोहिणी सपकाळ
मूल्यवर्धन : काळाची गरज
-रोहिणी सपकाळ
मूल्यवर्धन काळाची गरज
“या कोवळ्या कळ्यांमाजी। लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी।।
विकसता प्रकटतील समाजी । शेकडो महापुरुष।।
मूल्यवर्धनने वाढवा निश्चय। जीवनी जय करावया।।”
मूल्यवर्धन ही आजच्या काळाची खरी गरज आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांच्या सहकार्याने मूल्यवर्धन हा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये सुरू आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या संविधानातील चार मूल्यांवर हा कार्यक्रम आधारित आहे. विद्यार्थ्यांमधून उद्याचे सुसंस्कारी, चारित्र्यसंपन्न नागरिक घडविणे हे मूल्यवर्धन कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्तीबरोबर आचार, विचाराने सुयोग्य संस्कारित होऊन आपले चारित्र्यसंवर्धन करावे, या हेतूने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या ‘स्व’ पासून व कुटुंबापासून सुरू होतात. याचा अर्थ शाळेतील सुसंस्कृत वातावरणाचे पडसाद घराघरातील कौटुंबिक जीवनामध्ये उमटले पाहिजे आणि घरातील सुशील वर्तनाचे प्रतिबिंब शाळेच्या दैनंदिन व्यवहारात आढळले पाहिजे. तरच नवीन पिढी संस्कार संपन्न व आदर्श बनू शकेल. पूज्य विनोबाजींनी म्हटलेच आहे, “शाळा घरात व घर शाळेत घुसले पाहिजे.” शाळेचे नियम, वर्गनियम विद्यार्थ्यांनी स्वतः बनविले व त्यांचे पालन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाला शिस्त लागली आहे. नैतिकतेवर आधारित हे नियम नागरिक घडवतीलच.
उपक्रम पुस्तिकेतील विविध संस्कारक्षम कथा, महान व्यक्तींची चारित्र्ये ज्ञानरचनावादाला प्रेरित करतात. त्यातून सुसंस्कारी आचार, विचार यांचा समतोल साधला जात आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानात्मक, कार्यात्मक, भावनात्मक कौशल्ये निर्माण होत आहेत. मूल्यवर्धन पुस्तिकेतील उपक्रम हे गटपद्धतीने घ्यायचे असल्याने विद्यार्थ्यांच्या परस्परातील विचारांच्या देवाणघेवाणीला व सामाजिक व सामूहिक विकासाला प्रोत्साहन मिळत आहे. सहकार्य, बंधुता, आपुलकी या भावना वाढीस लागत आहेत. विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव विकसित होत आहे. मूल्यवर्धन उपक्रमांचा उद्देश केवळ मूल्ये शिकवणे असा नसून त्यांचा संस्कार करणे हा आहे. ‘स्व’विषयक, समाजविषयक, राष्ट्रविषयक, विश्वविषक आणि वर्तमान संस्कृतीविषयक सर्व मूल्यांची जोपासना शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम कार्यक्षमतेने करीत आहे. यातील विविध संस्कारक्षम उपक्रमांमुळे हे साध्य होत आहे. यासाठी व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्र या पायऱ्यांनी सर्व स्तरांशी विद्यार्थ्यांचा संबंध येत आहे. त्यांच्या जाणीवांचा विकास साधून ते जाणते होण्यास मदत होत आहे.
मूल्यवर्धन उपक्रम हे संस्कार आनंददायी पद्धतीने रूजवितात. भारतीय शिक्षण तज्ज्ञांचे असे मत आहे की शिक्षण जर आनंदी नसेल तर अध्ययन, अध्यापन परिणामकारक होत नाही. या विचाराचा प्रसंगी अनुभवही येतो. यातील रिकाम्या वेळेतील उपक्रम हे आनंददायी असेच आहेत. अशाप्रकारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संविधानातील मूल्यांवर आधारित हा मूल्यवर्धन कार्यक्रम म्हणजे शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांची शिक्षण क्षेत्राला मोठी देणगी आहे.
या बालकांमध्ये विकास व्हावा मूल्यांचा। या बालकांमधून जन्म व्हावा महापुरुषांचा।
या बालकांमध्ये निर्माण व्हावा सद्गुणांचा। हाच निश्चय मूल्यवर्धनचा।”
-ज्योती कदम
मूल्यवर्धन काळाची गरज
-ज्योती कदम
मी व सवयी
सांगताना मला खूप आनंद होत आहे, की मूल्यवर्धनमुळे मी मैत्रीचा ठेवा जपू शकले. खूपखूप धन्यवाद.
मला माझ्यात खूप बदल करण्यात यश आले. माझ्या जीवलग मैत्रीणीबरोबर खेळामध्ये वाद झाला होता. एक वर्षभर आम्ही दोघी एकमेकींशी बोलत नव्हतो, पण मूल्यवर्धनमुळे मी तिला सॉरी म्हणू शकले.
-दिपाली चव्हाण
मी व सवयी
-दिपाली चव्हाण
मी आणि माझ्या क्षमता
मी शितल डफळ. गेली नऊ वर्षे सातारा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या न. पा. शाळा क्र. 23 गोडोली, सातारा येथे कार्यरत आहे. सर्वप्रथम मी मूल्यवर्धन कार्यक्रमास शुभेच्छा देते. वास्तविक पाहता मूल्यवर्धन प्रशिक्षणावेळीच या कार्यक्रमाचे वेगळेपण व उपयुक्तता लक्षात आली होती. जसजशी पुस्तिकांची ओळख होत गेली, तसतसे या कार्यक्रमाची सखोलता लक्षात आली. सर्व बारकावे लक्षात घेऊन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आजवरच्या अनुभवात एखादा विषय शिकण्यासाठी विद्यार्थी एवढ्या जास्त प्रमाणात उत्सुक असल्याचे प्रथमच जाणवले. आमच्यासारख्या शाळांना हा कार्यक्रम खूपच उपयुक्त आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे आम्ही शतशः आभार मानतो.
वास्तविक पाहता मूल्यवर्धन हे कार्यक्रमाचे नावच आपल्याला खूप काही सांगून जाते. आमची शाळा गोडोली, सातारा येथे आहे. या शाळेत कोल्हाटी वस्ती, जोशीवाडा, साईमंदिर परिसरातील झोपडपट्टी, परिसरातील कामगारांची मुले हे सर्व विद्यार्थी असतात. विषय अध्यापनाहूनही त्यांना चांगल्या सवयी लावणे, त्यांच्यामध्ये मूल्यांची रुजवणूक करणे हे आम्हा शिक्षकांसमोरील एक मोठे आव्हानच असते.
गेल्यावर्षी मूल्यवर्धन कार्यक्रम दाखल झाला आणि हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये होणारा बदल जाणवू लागला. पुस्तिकेतील उपक्रम राबवण्यासाठी मुले नेहमीच उत्सुक असतात. मूल्यवर्धन तासिकेची ती आतुरतेने वाट पाहत असतात. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतःला ओळखण्याची, स्वतःच्या क्षमता जाणून घेण्याची आणि ते सर्वांसमोर व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली. जेव्हा इतरांनी आपल्या मताचा आदर करावा असे आपल्याला वाटते, तेव्हा आपणही इतरांच्या मताचा आदर करण्यास शिकले पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. जेव्हा विद्यार्थ्यांनी स्वतःविषयीचा तक्ता व निबंध तयार केला आणि त्याचे वाचन सर्वासमोर केले, तेव्हा त्यांना स्वतःची नव्याने ओळख झाली. मी हे देखील करू शकतो / शकते या जाणीवेने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले. कधी कोणत्याही गोष्टीसाठी समोर न येणारी मुले बालसभेमध्ये भाषण करू लागली, इतर स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ लागली. आपले वागणे सर्वांमध्ये आदर्श कसे ठरेल यासाठी प्रयत्नशील राहू लागली. त्यांनी सुचवलेले मुद्दे, कल्पना याची वर्गासमोर नोंद घेतली जाते ही गोष्ट त्यांना खूप सुखावते. त्यामुळे एखाद्या मुद्द्यावर सखोल विचा करून त्याबाबत बोलण्यासाठी ते प्रयत्न करू लागले. हा कार्यक्रम खरोखच अभ्यासक्रमास उपकारक ठरला आहे. विद्यार्थी क्षमता आणखी विकसित होतील, यात कोणतीही शंका नाही.
-शीतल डफळ
मी आणि माझ्या क्षमता
-शीतल डफळ
माझ्या जबाबदाऱ्या
मी उपशिक्षक मीना परामणे, शाळा- बोरखळ, ता. सातारा.
इयत्ता पहिली व दुसरी या वयोगटातील विद्यार्थी म्हणजे खूप pampered असतात. त्यांना शाळेची ओढ लागणे म्हणचे महाकठीण काम. या कार्यक्रमाने मात्र हे काम सोपे केले.
इयत्ता दुसरीसाठी माझ्या क्षमता या घटकामुळे मुलांमध्ये गुणांकन करताना आपण अजूनही कायकाय करत नाही, आपली वैयक्तीक कामे आपण केली पाहिजेत, याची जाणीव गुण देताना मुलांना झाली. काही मुलांनी तर २-३ दिवसांनी आम्ही आता स्वतःची कामे स्वतः करतो असे सांगितले. पालकांनीही चांगला प्रतिसाद दिला. भेटून त्यांनी मुलांमधील चांगले बदल मला कथन केले. त्याचप्रमाणे शाळेचे काही नियम स्वतः तयार करून ते पालन करण्याचा जणू काही संकल्प केला. चपला stand वर ठेवणे, मित्र-मैत्रिणीला मदत करणे इत्यादी. घरी कोणते नियम आपण पाळले पाहिजे याची देखील त्यांना जाणीव झाली. खूप सोप्यासोप्या पद्धतीने या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे मला ही सोपे झाले.
पूर्वी मी हे सर्व तोंडी सांगायचे, पण ते क्वचितच सांगावे लागते. आता मुलांना इथे स्वतः activity करायची असल्याने मुले स्वतः यात सहभागी होऊ लागली आणि कमी वेळात परिणाम दिसून येऊ लागले. असाच बदल प्रत्येक वर्गात दिसू लागला आहे. आमची शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. या पुस्तिकेतील काही गोष्टी तर सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयोगी आहेत. त्या आम्ही परिपाठात सांगतो. सर्वच विद्यार्थ्यांना आपल्या घरातील व शाळेतील जबाबदाऱ्या यांची नव्यानेच ओळख झाली.
-मीना परामने
माझ्या जबाबदाऱ्या
-मीना परामने
विद्यार्थी वर्तनबदल
विद्यार्थी सामोपचाराने प्रश्न सोडवतात.
विद्यार्थी एकमेकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासतात. गैरसमजाची कारणे शोधतात. गैरसमज दूर करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधतात. न रागावता, न चिडता शांतपणे इतर मुलांना सांगतात. मुले ज्याची चूक आहे त्याला समजावून सांगतात. चूक झालेली मुले माफी मागतात. अशाप्रकारे चांगल्या सवयी मुलांना लागत आहेत. तसेच एकमेकांविषयी चांगले मत व्यक्त करतात. एखाद्या मुलाला शैक्षणिक साहित्य कमी असेल तर एकमेकांना समजून घेऊन मदत करतात. एकमेकांना चिडवणे बंद झाले आहे. आपण कोणालाही चिडवायचे नाही असे ठरवले आहे. मोठ्या मुलांना आदराने वागवत आहेत. चांगल्या गोष्टी वर्गात सांगतात. वर्गात लावलेले नियम पाळतात. नियम पिळले नाहीत तर माफी मागतात. एकमेकांच्या सहकार्याने कामे पूर्ण करतात. एखादी समस्या दूर करतात. समस्या दूर झाल्यानंतर आनंद व्यक्त करतात.
झाडांचे उपयोग सांगतात. त्यासाठी मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण केले आहे. फळभाज्या, पालेभाज्यांची लागवड केली आहे. त्यांचा आहारात समावेश करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या सुदृढ झाले आहेत. झाडे तोडू नयेत, झाडे वाचवली पाहिजेत हे त्यांना समजते. मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नये, त्यांना पाणी, अन्न ठेवावे. त्यांचा अधिवास झाडावर असतो त्यामुळे झाडे लावली पाहिजेत हे त्यांना समजते. पाणी वाया घालवत नाहीत. सांडपाण्यावर परसबाग तयार केली आहे. परिसर स्वच्छ करतात. वैयक्तिक तसेच परिसर स्वच्छ राखतात. सहयोगी खेळ गटात खेळताना एकमेकांना मदत करतात. खेळातून आनंद मिळवतात. पुन्हापुन्हा खेळ घेण्याची इच्छा व्यक्त करतात. मूल्यवर्धन तासिकेची वाट पाहतात. स्वतः चे वेगळेपण सिद्ध करतात. त्यांच्यात खूप बदल झालेला दिसून येत आहे. ते जबाबदारीने वागत आहेत. प्रामाणिकपणे कृती करत आहेत. कृती समजून घेऊन आनंदाने करत आहेत. त्याचा दैनंदिन जीवनात वापर करत आहेत. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये निर्णय घेत आहेत. अशाप्रकारे विद्यार्थ्यांमध्ये वर्तनबदल दिसत आहेत.
-नूतन भोईटे
विद्यार्थी वर्तनबदल
-नूतन भोईटे
मूल्यवर्धन आणि माझे मूल्यमापन
मूल्यवर्धन उपक्रमामुळे माझ्यात झालेले बदल.
मी अतुल कुलकर्णी. माझ्या पिंपळवाडी शाळेत मूल्यवर्धन प्रशिक्षणानंतर जेव्हा पहिले पाऊल ठेवले, त्याच वेळी मी स्वतः चे मूल्यमापन केले. शिक्षक उपक्रम पुस्तिकेतील पाच विभागांपैकी पहिल्या चार विभागाद्वारे मी माझे मूल्यमापन खरेपणाने लिहून काढले. ‘मी आणि माझ्या क्षमता’ या विभागामुळे तर मी मलाच नव्याने ओळखायला लागलो आहे. क्षमतांवर काम सुरु करुन त्या वृद्धिंगत करण्याचा मँप तयार करुन ठेवला. माझ्या जबाबदाऱ्या नेहमीच मी पूर्ण करीत असलो तरी विचारपूर्वक, विधायकतेची जाणीवजागृती यांची उजळणी झाली.
माझ्या नातेसंबंधांना सुसंवाद, संवेदना, सामोपचाराचे, सहकार्याचे धडे मिळून एक नवी झळाळी मूल्यवर्धन उपक्रमातून मिळाली आहे. मी आणि आपले जग यातून बंधुतेच्या कक्षा रुंदावणे, स्त्रीया, श्रमिक, पर्यावरण यांचे मूल्य नव्याने उमगणे या गोष्टी साध्य झाल्या. माझ्या व्यक्तिमत्त्वला परिपूर्ण करण्यासाठी साह्यभूत ठरणाऱ्या मूल्यवर्धनास खूपखूप शुभेच्छा. माझ्या स्वतःतील बदलामुळे निश्चितच माझे विद्यार्थीही सकारात्मक, समृध्दतेच्या मार्गावरचे वाटसरू बनतील.
-अतुल कुलकर्णी
मूल्यवर्धन आणि माझे मूल्यमापन
-अतुल कुलकर्णी
आम्ही कसे घडलो
सन 2018- 19 या शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेत शांतिलाल मुथ्था फाउंडेशन निर्मित मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला. सदर कार्यक्रमाचा फायदा पाहिलीच्या वर्गातील मुलांना कशाप्रकारे झाला याविषयी मी लिहित आहे.
उपक्रम पुस्तिकेची सुरुवातच स्व ची जाणीवेपासून झालेली आहे. मुलांना स्व-जाणीव अनेक उपक्रमांद्वारे हसतखेळत करून देता आली. मुले स्वतः अभिव्यक्त झाली. त्यांच्यातील विविध सुप्तगुण, क्षमता विकसित झाल्या. इतरांचा आदर करू लागली. कुटुंबातील मोठया माणसांच्या पाया पडू लागली. शांतता संकेताद्वारे वर्गनियंत्रण करणे सुलभ गेले. वर्गातील नियम स्वतःच तयार करून त्याचे काटेकोरपणे पालन करु लागले. त्याद्वारे आपोआपच सार्वजनिक ठिकाणचे नियम पाळले जाऊ लागले. या सोबतच मोठयांबद्दल, इतरांबद्दल आदर बाळगू लागली. कुटुंबातील तसेच आपल्या आजूबाजूच्या माणसांची काळजी घेऊ लागले.
काय चांगले, काय वाईट हे मुलांना समजू लागले. मित्रांमध्ये राहताना सर्वधर्म-समभाव या दृष्टीने वर्गातील मुले राहू लागली. सर्व सण-समारंभ यातून मुलांना मराठी संस्कृतीची ओळख झाली. या कार्यक्रमातील बोधात्मक कथेतून नकळत मुलांमध्ये सकारात्मक बदल घडून आले. पर्यावरणाचा ऱ्हास होतोय याची व आपल्या जबाबदारीची त्यांना जाणीव झाली. उदा. झाडे लावणे, जगवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे विद्यार्थी आत्मविश्वासपूर्वक आपला विषय मांडू लागले. अशाप्रकारे मुलांमध्ये नकळत, हसतखेळत संस्कारक्षम बदल घडून आले.
-हेमलता यादव
आम्ही कसे घडलो
-हेमलता यादव
अनुभवकथन
आम्ही प्रशिक्षण घेतल्यापासून कार्यक्रम राबवित आहोत. कार्यानुभव विषयाची १ तासिका यासाठी दिली आहे.
मुलांमध्ये संस्काराची रूजवणूक झाली. मनोरंजनातून अध्यापन झाले. उपस्थितीचे प्रमाण वाढले. विद्यार्थी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनात करू लागले. विविध छंद जोपासू लागले. वेळेचे नियोजन करू लागले. स्वतःबद्दल सुरक्षितेची जाणीव झाली.
-सचिन अभंग
अनुभवकथन
-सचिन अभंग
मी आणि मूल्यवर्धन
जि. प. शाळा शाहूपुरी येथे मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात आला.
जि. प. शाळा शाहूपुरी येथे विविध उपक्रम राबवल्यावर विद्यार्थी वर्तनात बदल झाला. निरीक्षण भावनिकता, संवेदनशीलता यात भर पडली. नियोजित उपक्रमांतून आनंददायी पद्धतीने मूल्ये रूजविण्याचा प्रयत्न या मूल्यवर्धन कार्यक्रमातून केला.
-कमल फाळके
मी आणि मूल्यवर्धन
-कमल फाळके
मूल्यशिक्षण : काळाची गरज
सदर कार्यक्रम हा विद्यार्थ्यांत मूल्यांची जोपासना करणे आणि भविष्यात एक जबाबदार संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून सर्व शाळांमध्ये तो राबविण्यात येत आहे.
शालेय अभ्यासक्रमाशी निगडित विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधणारा कार्यक्रम आहे. आनंददायी खेळ, मूल्ये, विद्यार्थीकेंद्रित शिक्षणपूरक असे उपक्रम आहेत. तसेच प्रत्येक इयत्तेसाठी उपयुक्त गाणी, गोष्टी, खेळ आहेत. रिकाम्या वेळेत उपक्रम राबविले तर आनंददायी शिक्षण मिळण्यास उत्तमरित्या मदत होईल.
-संगिता ढेंबरे
मूल्यशिक्षण : काळाची गरज
-संगिता ढेंबरे
मूल्यज्योत एक आशा
मूल्यवर्धनच्या एका ज्योतीने आशा निर्माण केली व अंधारात चाललेल्या मूल्य विरहित पिढीस एक दिशा दाखवली. अशा या मूल्यवर्धनविषयी थोडेसे …
नमस्कार, मी श्री. उदय मधुकर मोहिते (शाळा -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरकडे वस्ती अंबवडे ), ता. खटाव, जि. सातारा)
आमच्या तालुक्यात शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. या दोन वर्षांत कार्यक्रमाचे फलित म्हणून पाहताना ज्या बाबी प्रकर्षाने जाणवल्या, त्या शब्दबद्ध करणे हे शिक्षक म्हणून माझे कर्तव्य समजतो. राज्यघटनेतील मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडवताना मूल्यवर्धनने जो सिंहाचा वाटा उचलला तो अभिमानास्पद असाच आहे. मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडवण्यासाठी उपक्रम पुस्तिका तयार केल्या आहेत, त्या आदर्शवतच आहेत. क्रमाक्रमाने उंचावत जाणाऱ्या उपक्रमांच्या मांडणीमुळे भावी पिढी आदर्श नागरिक घडेल व देशाच्या प्रगतीत एक मोलाचा वाटा उचलतील यात शंकाच नाही. गेल्या दोन वर्षात मिळालेल्या वेळेत विविध उपक्रम राबविल्यानंतर माझ्या विद्यार्थ्यांत बदल झाले हे निश्चित. सुरुवातीला स्वतःमध्ये काही बदल घडवून आणले (जसे की चिडचिड, रागीटपणा, क्रोध, संयम इ. बाबतीत). ते बदल झाल्यानंतरच आपण विद्यार्थ्यांकडून अपेक्षा ठेवू शकतो. ते अपेक्षित बदल साध्यही झाले.
विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःविषयी, शाळेविषयी, कुटुंबाविषयी, आवडी-निवडींबद्दल आत्मविश्वासाने बोलू लागले. तसेच चांगल्या-वाईट गोष्टीतील फरक ओळखून जबाबदारीने वागू लागले. घरातील लहान-मोठयांची काळजी घेऊ लागले. एकमेकांविषयी आदर बाळगू लागले. सहयोगी खेळांच्या माध्यमातून परस्पर सहकार्य भावना वाढीस लागली. हे बदल घडवून आणताना पालकांचाही सहभाग होता. अशाप्रकारे हा मूल्यांचा ज्ञानकलश भावी पिढीकडे सोपवायचा असेल तर प्रत्येक प्रसंगातून, आपण आपल्या वर्तनातून विद्यार्थ्यांसमोर आदर्श पाठ ठेवला पाहिजे असे मला वाटते. मूल्यवर्धनच्या या प्रवासात प्रेरक म्हणून सहभागी होण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, शासन व मूल्यवर्धन टीमचा फारफार ऋणी आहे. मूल्यवर्धनच्या पुढील कार्यास खूपखूप शुभेच्छा !
-उदय मोहिते
मूल्यज्योत एक आशा
-उदय मोहिते
पत्रलेखन उपक्रम
मूल्यवर्धनमधील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये जीवनमूल्ये रुजण्यास मदत होत आहे. माझ्यामते, विदयार्थ्यांना शिक्षण देणे म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणे नव्हे तर एक चांगला माणूस म्हणून जगता येणे आवश्यक आहे. यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम फायदेशीर ठरत आहे. गतवर्षापासून मूल्यवर्धन या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सकारात्मक वर्तन बदल दिसून आले.
मी प्रियांका रामचंद्र सावंत जि. प. प्राथमिक शाळा, नुने गावठाण, ता. जि. सातारा या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे, लोकांच्या हातात मोबाईल, इंटरनेट या सारख्या गोष्टी सातत्याने असल्याने जग जवळ आले आहे, पण इंटरनेटच्या आभासी जगात लोकांमधील संवाद संपत चालल्याचे व लोकांमध्ये एकटेपणा वाढल्याचे आपण नाकारू शकत नाही. इयत्ता चौथीच्या वर्गाला मूल्यवर्धनचे विविध उपक्रम राबवताना ‘पत्रलेखन’ हा उपक्रम राबवला. आताच्या मुलांना पत्र म्हणजे काय हेच माहीत नव्हते हे निदर्शनास आले. यावेळी चौथीच्या मूल्यवर्धन पुस्तकात दिलेल्या पत्राचा मायना विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतः पत्र लेखनाचा अनुभव दिला. प्रथमतः गावातील पोस्ट ऑफिसला सर्व विद्यार्थ्यांनी भेट दिली व माहिती घेतली. त्यांनतर विद्यार्थ्यांनी स्वतःच्या घरी, नातलग, शिक्षक, शाळेला मदत करणाऱ्या विविध व्यक्ती यांना पत्रे लिहिली. जेव्हा त्यांना ही पत्रे मिळाली तेव्हा सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला. मूल्यवर्धनमधील अशा विविध उपक्रमांमुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तनबदल होत असल्याचे दिसून येत आहे.
-प्रियांका सावंत
पत्रलेखन उपक्रम
-प्रियांका सावंत
मूल्यवर्धन एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम
मूल्यवर्धन कार्यक्रम हा विद्यार्थी विकासासाठी एक देणगी होईल.
शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत राबवलेले उपक्रम विद्यार्थ्यांच्या व शाळेच्या विकासासाठी खूप उपयुक्त आहेत. विविध जाती, धर्मातील विद्यार्थी शाळेमध्ये शिकत असतात. त्यांच्या धर्माची, घरातील, समाजातील शिकवण वेगवेगळी असते. परंतु शाळेमध्ये असे कोणतेही वेगळेपण होईल असे उपक्रम राबविले जात नाहीत. त्यामुळे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द अशा जाती, धर्मातील विद्यार्थी यामध्ये भेदभाव राहत नाही. जेवतानासुद्धा एकत्र बसणे, भाजी वाटून घेणे इत्यादीमुळे समानता निर्माण होते. अगदी नव्या असणा-या धर्माबद्दल जाणीव करून घेण्याची उत्सुकता वाढलेली दिसते. वेगवेगळे सण, समारंभ, परंपरा, साजरी करण्याची पद्धती विद्यार्थ्यांना समजून येते. स्वच्छतेसारख्या विषयाचा पाठ्यपुस्तकात पाठांमध्ये सामाविष्ट केल्यामुळे स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांमध्ये दिसून येते. वर्ग, परिसर स्वत:च्या वस्तू व स्वत: स्वच्छ राखण्यात या उपक्रमांचा उपयोग झालेला दिसतो.
आमचा शाळेत ख्रिश्चन व बौद्ध या धर्मातील दोन विद्यार्थीची मैत्री सर्वश्रृत आहे. त्यांची मैत्री पाहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धर्मभेद दिसून येत नाही. परसबाग स्वच्छता, साहित्याची आवराआवर इत्यादीमधून विद्यार्थ्यांची श्रम करण्याची वॄती वाढीस लागते. या श्रमातून शाळेत परसबाग, कुंड्यांतील लागवड, वृक्षारोपण, वर्गसजावट इत्यादी विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने केलेले दिसून येते. सहकार्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागलेली दिसून येते. पेन्सिल, पेन, पुस्तक, वही, खाऊ इत्यादी विद्यार्थी आपापसात गरजेप्रमाणे एकमेकांना देतात व घेतात. शाळेतील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रमामध्ये स्वत:ची कल्पना वापरून कार्यक्रम यशस्वी करतात. विद्यार्थी एकमेकांबरोबर सहकार्याने, बंधुभावाने, आपुलकीने राहतात. शाळा म्हणजे स्वत:चे घर वाटते. विद्यार्थी शाळेत रमतात. अभ्यासात प्रगती झालेली दिसून येते. अध्ययनामध्ये सहकार्याची भावना दिसून येते. शाळेचे वातावरण उत्साही आनंदी ठेवण्यासही मूल्यवर्धन कार्यक्रमाची मदत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या कार्यक्रमाचा उपयोग झालेला दिसून येतो.
-कमलाकर पवार
मूल्यवर्धन एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम
-कमलाकर पवार
माझ्या जबाबदाऱ्या
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटखळ ही शाळा सातारा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर आहे. पालकांचा ओढा शहराकडे असल्यामुळे मुलांना शहरातील अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतला जातो. ज्या पालकांची परिस्थिती गरीब आहे असेच पालक फक्त आपली मुले जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पाठवतात. शाळेचा पट 32 आहे. पालकांची परिस्थिती गरीब तर आहेच, परंतु त्यांच्या कुटुंबामध्ये शैक्षणिक वातावरण नाही. पालकांची मिटिंग घेऊन मूल्यवर्धनचे महत्त्व त्यांना पटवून दिले.
आमच्या शाळेतील मुलांच्या कुटुंबातील वातावरण शैक्षणिक नसल्याने घरचा अभ्यास मुलांचा पूर्ण होत नव्हता. तसेच घरातील अशैक्षणिक वातावरणाचा परिणाम मुलांवर होत असल्यामुळे त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव नव्हती. स्वतःचा टापटीपपणा, भावनांचे नियंत्रण नसल्यामुळे मुलांना शिस्त लावणे शिक्षकांना अवघड जात होते. त्यामुळे सन 2018-19 या शैक्षणिक वर्षांमध्ये मूल्यवर्धन हा नवीन उपक्रमशील कार्यक्रम आल्यामुळे व प्रत्यक्ष इयत्तावार विद्यार्थी पुस्तिका उपलब्ध झाल्यामुळे वेगवेगळे उपक्रम व त्यांचे प्रात्यक्षिक घेणे सोपे झाले. पालकसभा घेऊन पालकांना मूल्यवर्धन विषयांचे महत्त्व पटवून देता आले. त्यामध्ये असणारे नावीन्यपूर्ण गुण, आदर, नम्रता, लवचिकता, सर्वांशी आदराने बोलणे, कुटुंबामध्ये आदराने वागणे व कुटुंबातील व्यक्तींना मदत करणे, कोणतेही काम कमी प्रतीचे नसते याची जाणीव झाली. प्रत्येक काम करणे हे आपले कर्तव्य असते याची जाणीव झाली. मूल्यवर्धन समाविष्ट केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन झालेले आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास झालेला आहे. मुले शांतता संकेत पाळतात. त्यामुळे वर्गनियंत्रण आपोआप, स्वयंशिस्तीत होते. त्याचबरोबर वर्गनियम, शाळेचे नियम मुलांनीच बनवल्यामुळे सर्व लोकशाही पद्धतीने शिस्तीचे पालन करतात. मुले शाळेविषयी जबाबदारी व कर्तव्य पार पडताना दिसतात. हा फार मोठा बदल विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला.
आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटखळ शाळेतील मुले मूल्यवर्धनमुळे जबाबदारीने वागायला लागली. पालकांमध्ये परिवर्तन झाले. पालक विद्यार्थ्यांचा घरचा अभ्यास घेऊ लागले आहेत. तसेच पालकांनाही आपल्या पाल्यामध्ये बदल झाल्याचे दिसून आले आहे. पालक सभेमध्ये आपल्या पाल्यामध्ये झालेले बदल सांगतात. शिक्षक, पालक, विद्यार्थी यांचा समन्वय राखण्यासाठी मूल्यवर्धन योग्य आहे. मूल्यवर्धनमुळे मुलांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचा विकास होण्यास मदत झाली आहे.
-सुशीला पाटील
माझ्या जबाबदाऱ्या
-सुशीला पाटील
माझे नातेसंबंधांचे महत्त्व
‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे आपण म्हणतो. मग या फुलांना आपण जपले पाहिजे. त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. म्हणजे ते आपुलकी जपतील. इतरांविषयी आदर व आपले नातेसंबंध जोपासतील. मुलांच्या माध्यमातून पालकांनाही नात्याचे महत्त्व कळेल. नातेसंबंध दृढ होण्यास मदत होईल. असाच अनुभव मला मूल्यवर्धन कार्यक्रम अंतर्गत ‘माझे नातेसंबंध’ या विभागातील उपक्रम प्रत्यक्ष वर्गामध्ये घेतल्यानंतर आला.
सण 2017-2018 पासून आमच्या तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत मी माझ्या शाळेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मूल्यशिक्षण मुलांना शिकवले जायचे. त्यामध्ये मुलांना बोधकथा सांगितल्या जायच्या थोर महात्म्यांच्या कथा, गोष्टी, प्रसंग सांगितले जायचे. पण यामध्ये फक्त गोष्टी सांगितल्या जायच्या. मुलांच्या कृतीला व विचारांना चालना मिळत नव्हती. पण मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये मुलांच्या विचारांना चालना, कृतीला वाव व आपले मत व्यक्त होण्यासाठी जणू व्यासपीठच प्राप्त झाले.
मूल्यवर्धन उपक्रमांमध्ये गटचर्चा, जोडीचर्चा, सामुदायिक वर्तुळ या वर्गरचनामुळे मुले आपल्या मित्रांबरोबर चर्चा करू लागली, व्यक्त होऊ लागली. एकमेकांबद्दल माहिती मिळवू लागली. इतरवेळी कमी बोलणारी मुले व्यक्त होऊ लागली. त्यामुळे मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र व अपेक्षित वर्तनबदल झालेला दिसून येत आहेत. अध्ययन व अध्यापन प्रक्रिया आनंददायी व सकारात्मक झाली आहे. मुलांना शिस्त लागावी, वर्गात गोंधळ करू नये यासाठी आम्ही मी आणि माझ्या जबाबदाऱ्यामधील उपक्रम शांतता संकेत, आमचे वर्गनियम असे उपक्रम सर्व वर्गांवर दोन्ही शिक्षकांनी घेऊन वर्गनियम तक्ते मुलांच्या माध्यमातून वर्गात लावले. वर्गात सकारात्मक शिस्तीचे उपक्रम घेतले. मुले गोंधळ करत असतील किंवा मुलांचे आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे असल्यास आता मुलांना शांत बसा, गोंधळ करू नका, दंगा करू नका, असे ओरडावे लागत नाही. मुलांना मी एक हात वर करून शांतता संकेत दिला की मुलेही हात वर करतात व माझ्याकडे लक्ष देतात.
आमचे वर्गनियम हा उपक्रम घेतला. या उपक्रमांतर्गत मुलांनी वर्गात स्वतः शिस्त पाळण्याविषयीचे काही नियम बनवले. त्यानियमांप्रमाणे मीही ते नियम पाळतो. त्यामुळे मुलेही आपोआप नियम पाळू लागली. उदाहरण द्यायचं झालं तर मुलांनी एक नियम बनवला की ‘चपला व बूट वर्गाबाहेर रांगेत काढूया’. आता सर्व मुले वर्गाबाहेर एका रांगेत चपला, बूट काढतात. हा नियम प्रत्येक वर्गातील मुले नियमितपणे पाळतात. मी बऱ्याचदा मुलांची याबाबत परीक्षा घेतली. मी जाणीवपूर्वक चप्पल वर्गात घालून गेलो. तर मुलं एकत्रितपणे सांगतात. सर कृपया चप्पल बाहेर काढा. तुम्ही आपल्या वर्गाचे नियम मोडत आहात. एवढेच नव्हे तर कोणी अधिकारी, ग्रामस्थ, पालक जरी शाळेमध्ये आले आणि त्यांनी आपली चप्पल किंवा बूट वर्गाबाहेर, ऑफिसबाहेर काढली नाही तर मुले विनंतीपूर्वक सांगतात की सर कृपया चप्पल बाहेर काढा. स्वच्छता राखा. हा माझ्या शाळेतील मुलांमध्ये मूल्यवर्धन उपक्रमामुळे झालेला आमूलाग्र व सकारात्मक वर्तनबदल आहे.
मुलांनी या उपक्रमामुळे आपल्या जबाबदाऱ्या ओळखून वर्गात व शाळेमध्ये वर्गनियम व शाळेचे नियम स्वतः बनवून त्या नियमांचा तक्ता ही वर्गात लावून त्याचे पालन करतात. इतरांनाही पाळावयास सांगतात. तसेच मी कधी शासकीय माहिती ऑफिसमध्ये भरत बसलो असेल व वर्गात नसेन तेव्हा मुले आपली जबाबदारी ओळखून स्वतः अभ्यास करत बसतात. एकमेकांना अभ्यास करताना मदत करतात. मुले आपल्या क्षमता व जबाबदारी ओळखून आनंददायी शिक्षण घेऊ लागली. त्यामुळे मी व माझे विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंधही आपुलकीचे झाले आहेत. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे मुलांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या घटनात्मक मूल्यांची रुजवणूक होऊ लागली.
प्रसंग :- मागील वर्षी मी इयत्ता दुसरीच्या वर्गावर मूल्यवर्धन कार्यक्रम अंतर्गत ‘चांगले मित्र कोण?’ व ‘मैत्रीचे नातेसंबंध’ हे उपक्रम घेतले. त्यामुळे मुलांना आपले चांगले मित्र कसे असावेत व त्यांच्या चांगल्या सवयी कोणत्या? हे समजले. माझा एक विद्यार्थी शंभु मिलन निंबाळकर याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे घरी सांभाळ करण्यासाठी कोणी नसल्यामुळे शंभुचे ऍडमिशन त्याच्या मावशीच्या गावी फडतरवाडी या शाळेत घेण्यात आले. शंभु मात्र नाराज होता. कारण त्याला आता आपले जुने मित्र, जुनी शाळा, शाळेचा परिसर सर्व काही सोडावे लागणार होते. यामुळे तो रडत बसायचा. मला माझ्या जुन्याच शाळेमध्ये जायचं आहे. असा हट्ट करून बसला होता. तो दुसऱ्या शाळेत जाण्यासाठी काही केल्या तयार होत न्हवता. 15 दिवस कसाबसा मावशी रागावते म्हणून रडतरडत दुसऱ्या शाळेत जाऊ लागला. पण जुनी शाळा आणि जुने मित्र व जुने शिक्षक यांची आठवणी त्याला सतावत होती. तो खूप रडायचा. ही बातमी त्याच्या मित्रांनी मला येऊन सांगितली.
मी व माझे सहकारी श्री. मारुती वसंत लावंड सर यांनी शंभूच्या वडिलांची व काकांची भेट घेतली. शंभूला आपल्या शाळेची ओढ, त्याचे मित्र, आमच्याशी असलेले नातेसंबंध, प्रेम, आदर, कुटुंबातील ओलावा, एकरूपता, ओढ यासंबंधीची जाणीव मूल्यवर्धन पुस्तिकेतील ‘माझे नातेसंबंध’ या घटकानुसार केली.
परिणाम :- शंभूच्या काकांनी त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे ऍडमिशन पुन्हा फक्त 15 दिवसांतच माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडी येथे झाले. तो आता इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत असून शाळेत तसेच घरी, मित्र, इतर नातेवाईक यांच्याशी अतिशय नम्रपणे, प्रेमाने वागतो. हे माझ्या शाळेतील सर्वात मोठे यश मूल्यवर्धन उपक्रमामुळेच प्राप्त झाले असून शाळेतील सर्वच मुले एकमेकांचा आदर करतात. त्यांची शाळेबद्दल आपुलकी, प्रेम, गोडी वाढू लागली. त्याबरोबरच शाळेची पटसंख्या ही वाढू लागली. हाही खूप मोठा फायदा मला व माझ्या शाळेला होऊ लागला. शिक्षक -विद्यार्थी, विद्यार्थी-विद्यार्थी, विद्यार्थी-पालक, शिक्षक-शिक्षक, शिक्षक-पालक यांच्यातील नातेसंबंध वाढू लागले, सुधारू लागले, आपुलकीचे होऊ लागले. हे सर्व मूल्यवर्धन कार्यक्रमातील उपक्रम व त्यांच्या आनंददायी अध्यापन पद्धतीमुळे शक्य झाले. मला खात्री आहे की मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक विकास होण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धन उपक्रम अतिशय पूरक आहेत. या उपक्रमांमुळे आजचा विद्यार्थी हा उद्या या भारत देशाचा एक संवेदनशील जबाबदार व कर्तबगार नागरिक नक्कीच घडेल यात शंका नाही.
-गोरख तात्याबा जाधव
माझे नातेसंबंधांचे महत्त्व
-गोरख तात्याबा जाधव
माझा उपक्रम
मूल्यवर्धन कार्यक्रम खूप संस्कारक्षम आनंददायी व महत्त्वपूर्ण आहे. मी सन 2017-18 मध्ये मूल्यवर्धन प्रशिक्षण घेऊन प्रेरक म्हणून काम केले आहे. सुरुवातीला मी माझ्या शाळेत इयत्ता पाहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डांभेवाडी येथे उपक्रम राबविले. त्यातील एक उपक्रम व त्यातून आलेला अनुभव सादर करत आहे.
उपक्रमाचे नाव आहे वर्गनियम. या उपक्रमामध्ये वर्गनियम तयार झाले, पण एक समस्या राहून गेली. ती समस्या म्हणजे वर्गकोपरा व त्यातील कचरा. प्रामुख्याने वह्यांची फाडली जाणारी पाने व त्यामुळे होणारा कचरा. रोजच साधारणपणे 15-20 पाने लिहून थोडीशी चूक झाली की फाड पान. तसेच चित्रकला वहीतील खूप पाने वाया जात होती. वहीचे एक पान तसेच फाडल्याने नंतर त्यांच्या विरुद्ध बाजूचे पानही वाया जात असे. मग विद्यार्थ्यांना फाडलेलेली पाने मोजून दाखवली. असता महिन्याभरात किमान 200 पानी 2 वह्या एवढी पाने वाया जात होती. त्यावर उपाय म्हणून मी त्यांना ‘भाकरीची गोष्ट’ या गोष्टीची आठवण करून दिली. तशीच वहीच्या एका पानाची गोष्ट सांगितली. अगदी कागद निर्मितीपासून त्याला लागणारे परिश्रम व त्याचा उपयोग व कागदाचे महत्त्व सांगितले. सर्व मुलांना माहिती पटली. या समस्येवर उपाययोजना करण्यात आली.
जर लिहिताना चूक झाली किंवा पान खराब झाले तर न फाडता तसेच ठेऊन द्यायचे. त्यामुळे विरुद्ध पानसुद्धा व्यवस्थित राहील. सर्वांना पटले व कार्यक्रम सुरु झाला. वर्गनिहाय स्पर्धा सुरु झाली. दिवसभर शाळा वाचलेल्या पानांचा हिशोब केला असता तब्बल 200 पानी 30 ते 35 वह्या खराब होण्यापासून वाचल्या. तो उपक्रम अजूनही चालू आहे. असा हा मूल्यवर्धन कार्यक्रम मी माझ्या शाळेमध्ये राबविल्यामुळे मुलांच्या वर्तनात सकारात्मक बदल झालेला दिसून आला. मुलांमध्ये स्वजाणीव होऊन आपल्या जबाबदाऱ्या समजू लागल्या.
-नामदेव सोमा पवार
माझा उपक्रम
-नामदेव सोमा पवार
मूल्यवर्धन राबविताना आलेले अनुभव
सन 2018-2019 मध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्याप्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने मूल्यवर्धन प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणातून प्रशिक्षण घेऊन मूल्यवर्धन कार्यक्रम माझ्या शाळेत राबविण्यास सुरुवात केली. मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यापूर्वी मी शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेचे नियम पाळण्यासंदर्भात सतत सूचना देत होते. मी सकाळी शाळेत आल्याबरोबर विद्यार्थी पळत येऊन एकमेकांच्या तक्रारी सांगायचे. एकमेकांना मारणे, ढकलाढकली करणे, लहानशा दुखापती अशा पद्धतीच्या तक्रारी ऐकायला मिळायच्या. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच बराचसा वेळ विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवणे, सूचना देणे यामध्ये जायचा.
मूल्यवर्धन उपक्रमामध्ये विभाग 2 मी आणी माझ्या जबाबदाऱ्यामढील उपक्रम, आमचे वर्गनियम यामध्ये नियम कसे असावेत व कोणी तयार करावेत याबद्दल मार्गदर्शन मिळाले. मी मूल्यवर्धन तासिकेला विद्यार्थ्यांना सकाळी शाळेत आल्यापासून ते शाळेतून घरी जाईपर्यंत ज्या चांगल्या व वाईट कृती करतो ते सांगायला सांगितले. मग काही चांगल्या, वाईट बाबी सांगायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, शाळेत शिक्षक आल्याबरोबर धावत जाऊन एकमेकांच्या तक्रारी सांगणे, परिपाठाला रांगा करताना ढकलाढकली करणे, लहान व मोठ्या सुट्टीत खडू खाणे, कचरा कचरापेटीतच टाकणे, वेळेवर येणे इत्यादी. त्यानंतर विद्यार्थ्यांना चांगल्या व वाईट सवयीचे वर्गीकरण करण्यास सांगितले. आपण प्रामाणिकपणे कोणती चांगली व वाईट कृती करतो याबद्दल चर्चा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपण काहीतरी चुकीचे वर्तन करत असल्याची जाणीव झाली. काय करावे व काय करू नये याबद्दल मुलांकडून वर्गासाठीचे नियम बनवून घेतले. उपक्रमादरम्यान शिक्षक म्हणून फक्त सुलभकाची भूमिका निभावून मुलांनी सांगितलेले नियम सकारात्मक भाषेमध्ये तयार करून घेतले. त्यांचा तक्ता तयार करून लावला. विद्यार्थ्यांनी स्वतःसाठी चांगल्या सवयी लिहिल्या. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेचे नियम बनवले.
इयत्ता दुसरीतील एक अतिशय खोडकर विद्यार्थी कार्तिक साठे याने शाळेचे नियम पाळण्याचे सर्वांसमोर मान्य केले. दुसऱ्या दिवशी असा अनुभव आला की मी शाळेत आल्याबरोबर एकही विद्यार्थी माझ्या गाडीकडे धावत आला नाही. आज प्रथम मला शाळेत काहीतरी वेगळी घटना घडल्यासारखे वाटले. शाळेचा परिसर स्वच्छ दिसत होता. एकही कागद न्हवता आणि विद्यार्थ्यांनी परिपाठासाठी स्वतः इतरांना न ढकलता रांगा केल्या होत्या. मला असे वाटले की आज मलाच शाळेत यायला वेळ झाला. मी घड्याळ पाहिले. पण मी तर नेहमीच्या वेळेत आले होते.
अशाप्रकारे मूल्यवर्धन उपक्रमातून, कृतीतून, विद्यार्थ्यांच्या विचारांना चालना देत हसतखेळत शिक्षण दिल्याने विद्यार्थी शाळेचे नियम पाळू लागले. यातून मी फक्त एकच अनुभव शेअर करू शकले. परंतु मूल्यवर्धन पुस्तिकेतील प्रत्येक उपक्रम हा विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागण्यासाठी व आदर्श नागरिक घडविण्यासाठी फायदेशीर आहे. मी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे मनापासून खूपखूप आभार मानते की त्यांनी मूल्यवर्धनसारखा कार्यक्रम आमच्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी बनवला.
-नीता गोरख करणे
मूल्यवर्धन राबविताना आलेले अनुभव
-नीता गोरख करणे
मी आणि मूल्यवर्धन
शैक्षणिक वर्ष 2017-2018 पासून आमच्या तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्तविद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. प्रशिक्षणामध्येच समजले की, आपल्याला प्रत्यक्ष शाळेत गेल्यानंतर मुलांमध्ये बदल घडवून आणायचा आहे. पहिल्यांदा मी स्वतःमध्ये बदल केला. तो असा की मी मुलांना म्हणायची, तुम्ही कचरा कचराकुंडीतच टाका. आता असं न म्हणता आता आपण सर्वजण कचरा हा कचराकुंडीतच टाकूया, आपण सर्वजण वर्गामध्ये शांतता पाळूया, एका वेळेस एकानेच बोलूया असे म्हणू लागले. म्हणजे फक्त मुलांनाच हे नियम फक्त लागू न करता हा नियम आपल्या सर्वांसाठी आहे असे ठरवून ते नियम पाळू लागले. मुले आनंदित झाली. आपापसात बोलू लागली की, आता हे नियम मॅडमपण पाळणार. इथेच मुलांमध्ये सकारात्मक भावना मी निर्माण करू शकले ते मूल्यवर्धन कार्यक्रमामुळेच. मूल्यवर्धनमध्ये मुलांना मूल्ये शिकवायची न्हवती, तर ती प्रत्यक्षात विविध कृतीतून, विविध मनोरंजक खेळांतून, अध्यापन पद्धतीचा वापर करून मग त्यामध्ये जोडीचर्चा, गटचर्चा, सामुदायिक वर्तुळ पद्धत असेल या सर्वांचा वापर करून मुलांना आनंददायी पद्धतीने शिक्षण दिले जाईल हे मुख्य उद्दिष्ट मूल्यवर्धन कार्यक्रमातून खरंच साध्य झाले.
विशेष सांगायचं म्हणजे मूल्यवर्धन उपक्रमांचा संबंध इतर विषयांशीसुद्धा जोडला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, परिसर अभ्यास, इयत्ता तिसरी : घटक :आपल्या गरजा कोण पुरवितात? हा पाठ्यपुस्तकातील घटकांचा संबंध इयत्ता : तिसरी मूल्यवर्धन शिक्षक उपक्रम पुस्तिकेमधील विभाग : 4 ‘मी आणि आपले जग’ या विभागातील उपक्रम क्रमांक : 4 घर बांधणे.
उपक्रम क्रमांक : 5 झाडांचे उपयोग. या दोन्ही उपक्रमावरून पाठ्यपुस्तकातील घटक हा दिलेल्या उपक्रमातील कृतीच्या साहाय्याने खूप छान पद्धतीने मला घेता आला. आणि सर्व कृती या विद्यार्थीकेंद्रित असल्यामुळे अध्ययन प्रक्रिया आनंददायी तर झालीच तसेच मुलांमध्ये बदल घडून आला. विद्यार्थी चांगलं काय आणि वाईट काय हे मूल्यवर्धन उपक्रमातून सांगू लागला. इतरांनासुद्धा तो स्वतःचे अनुभव सांगू लागला.
झाडांचे उपयोग हा उपक्रम घेतल्यानंतर, घरी जेव्हा इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी सई दीपक कुंभार ही आपल्या बाबांना सांगते की बाबा, आपली वीटभट्टी आहे. तुम्ही विटा भाजण्यासाठी झाडाच्या लाकडांचा उपयोग करता ठीक आहे, पण दरवर्षी आपण 20 झाडे आपल्या शेताच्या बांधावर लावूया. हे वाक्य जेव्हा तिच्या बाबांनी मला शाळेमध्ये येऊन सांगितले तेव्हा खरंच असं वाटलं की मूल्यवर्धन कार्यक्रम हा 10-15 वर्षांपूर्वी यायला हवा होता. मुलांमध्ये, पालकांमध्ये, समाजामध्ये हा जो बदल झाला आहे तो खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. विद्यार्थी हा एकमेकांसोबत आदराने, प्रेमाने वागतात. सहकार्याची वृत्ती वाढली आहे. मनोरंजनात्मक खेळामुळे मुले स्वतःच्या भावना व्यक्त करू लागली. कल्पना, विचार मांडू लागली. सर्वात महत्त्वाचे विद्यार्थ्यांना चांगलं काय, वाईट काय हे स्वतः जाणवायला लागले. हे सर्व शक्य झाले ते मूल्यवर्धन उपक्रमांमुळे.
मी शाळेत सर्वांच्या मदतीने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला. अनेकवेळा तालुका समन्वयक शाळेला भेट देत असताना मार्गदर्शन आणि कौतुक करायचे. प्रत्यक्ष पुण्यावरून शांतिलाल मुथ्था फाउंडेशनची टीम मागील वर्षी शाळेत आली. प्रत्येक कृतीचा व्हिडीओ त्यांनी शूट केला. आज मी आणि माझ्या शाळेतील मुले मूल्यवर्धन उपक्रमाच्या माध्यमातून कॅमेऱ्यासमोर आलो. त्यामुळे मुलांचा उत्साह, आनंद द्विगुणित झाला. एकंदरीत या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांमध्ये शिक्षकांमध्ये, पालकांमध्ये स्वतः ची जाणीव निर्माण होऊ लागली. आवड, निवड, बलस्थान, गुण आणि कौशल्ये अचूकपणे ओळखता येऊ लागले.
भारतीय राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चारही मूल्यांचा समावेश तो आपल्या जीवनात वापर करणार आहे. 21 व्या शतकातील सृजन व संवेदनशील, जबाबदार व कर्तबगार नागरिक घडवायचा असेल तर मूल्यवर्धन कार्यक्रम हा अतिशय प्रभावी व गरजेचा कार्यक्रम आहे यात तीळमात्र शंका नाही. मी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनची मनःपूर्वक आभार मानते की, त्यांनी मला प्रेरक शिक्षक म्हणून निवड करून जीवंत आत्म्यांना घडविण्याची संधी दिली. त्यामुळे माझा प्रत्येक विद्यार्थी हा उद्याचा या भारत देशाचा जबाबदार, कर्तबगार व संवेदनशील नागरिक नक्कीच घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन.
-मेघा दिपक यादव
मी आणि मूल्यवर्धन
-मेघा दिपक यादव
मूल्यवर्धन
सन २०१८-१९ मध्ये आमच्या शाळेत राबविण्यात आलेल्या मूल्यवर्धन उपक्रमाबद्दल माझा अनुभव.
शैक्षणिक वर्ष २०१८ – १९ ची सुरुवात मूल्यवर्धन नावाचे नवीन प्रशिक्षण होणार आहे, अशा बातमीने झाली. नेहमीप्रमाणे प्रशिक्षण असणार अशी कल्पना होती. परंतु प्रत्यक्षात मात्र मूल्यवर्धन प्रशिक्षणाची रचना वेगळी असल्याचे अनुभवास आले.
मला तालुका स्तरावर प्रशिक्षण घेऊन केंद्रस्तरावर इतर सर्व शिक्षकांना प्रशिक्षण द्यायचे होते. त्यामुळे मूल्यवर्धन कार्यक्रम अधिक सविस्तर अनुभवता आला.
आम्हाला प्रशिक्षण देणारे शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक अतिशय अभ्यासू व सखोल मार्गदर्शन करणारे होते. न रागावता विविध शंकांचे त्यांनी वेळोवेळी समाधान केले. अतिशय आनंददायी पद्धतीने प्रशिक्षण मिळाले.
मूल्यवर्धन कार्यक्रमाचे वेगळेपण प्रशिक्षणपद्धती बरोबरच शिक्षक – विद्यार्थी उपक्रम पुस्तिकांतून दिसून आले. शिक्षकांच्या पुस्तिका नेमकेपणाने मार्गदर्शन करणाऱ्या आहेत. तर विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार, आशयसंपन्न व भावविश्वानुकूल अशी पुस्तिकांची रचना आहे.
त्यामुळे विद्यार्थी आवडीने मूल्यवर्धन उपक्रमात सहभागी झाले व होत आहेत. खेळण्यासाठी मुले जेवढी उत्सुक असतात त्याही पेक्षा जास्त उत्सुकता मूल्यवर्धन उपक्रमासाठी दिसून आली. एवढेच नाही तर मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून येत आहेत.
-समीर शामराव चौगुले
मूल्यवर्धन
-समीर शामराव चौगुले
मी आणि मूल्यवर्धन
विद्यार्थी भविष्यात लोकशीचे जबाबदार संवेदनशील नागरिक बनावेत यासाठी मूल्य विकसित करण्याची संधी सातत्याने मिळावी.
यामुळे मुले संस्कारक्षम होत आहेत. स्वतःच्या क्षमता तपासता येत असल्याने स्वतःला काय काय आणखीन करायचे आहे हे कळते. चांगल्या व वाईट सवयी समजतात. शाळेतील व घरातील नियम समजतात. निसर्गाविषयी प्रेम निर्माण होते. स्वतःचे वाईट गुण कळतात. नैसर्गिक संपत्तीचा वापर कसा करावा हे कळते.
-जगताप शशिकला चंद्रकांत
मी आणि मूल्यवर्धन
-जगताप शशिकला चंद्रकांत
मूल्यवर्धन : काळाची गरज
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक विकासाबरोबर चांगल्या मूल्यांची जोपासना होण्यासाठी मूल्यवर्धन काळाची गरज आहे.
मूल्यवर्धन उपक्रमांमुळे स्व-अभिव्यक्ती, गोष्टी, नाटिका, गाणी, कला, भूमिका अभिनय इत्यादी बाबींमधून मुले व्यक्त होतात. सकारात्मक विचार रुजविण्यासाठी मदत होते. मुले स्वयंमूल्यमापन करतात. यामुळे मुलांमध्ये अपेक्षित वर्तन बदल घडून आला आहे.
विद्यार्थ्यांना समाजासाठी उपयुक्त आणि विधायक गोष्टी करण्यासाठी उर्मी मिळाली. संविधानात असलेली स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता ही मूल्ये रुजविण्यासाठी विविध उपक्रम असल्याने ही मूल्ये रुजवणे सोपे झाले आहे.
विविध सहयोगी खेळामुळे सहकार्य वृत्ती वाढते. मी आणि माझ्या क्षमता, माझ्या जबाबदाऱ्या, माझे नातेसंबंध, मी आणि आपले जग या चार टप्प्यांत विद्यार्थ्यांचा विकास घडून येतो. तसेच चित्रकला, घडिकाम, रंगकाम, सहयोगी खेळ यांच्या माध्यमातून मनोरंजन आणि कृतीला वाव मिळतो. कृतीतून शिक्षण असल्याने अधिक परिणामकारक घडून येते.
-बागडे सोनल दिपक
मूल्यवर्धन : काळाची गरज
-बागडे सोनल दिपक
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे झालेला बदल
इयत्ता पाहिली ते पाचवी या वयोगटासाठी मूल्यवर्धन ह्या कार्यक्रमाअंतर्गत वयोगटानुसार विविध उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडून आला आहे. विद्यार्थी वर्गाचे नियम स्वतः बनवतात व स्वतःच नियम बनवलेले असल्याने त्या नियमांचे पालनही जाणीवपूर्वक करतात. गटचर्चेत हसतखेळत सहभाग घेतात. .
-म्हेत्रे मनीषा नितीन
मी आणि मूल्यवर्धन
-म्हेत्रे मनीषा नितीन
मी आणि मूल्यवर्धन
शाळा हे संस्काराचे महत्त्वाचे केंद्र आहे!
महाराष्ट्र विद्या प्राधिकरण, पुणे व शांतिलाल मुथ्था फाउंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने प्राथमिक शाळांमध्ये मूल्यसंवर्धनाचा एक आदर्श, कृतिपूरक कार्यक्रम सादर झाला. हा कार्यक्रम राबविताना, शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकच समाज परिवर्तनाचा पाया मूल्यवर्धन कार्यक्रमांद्वारे घालून देऊ शकतो म्हणूनच की काय विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, इंग्रजी इत्यादी शालेय विषयाबरोबरच मूल्यांचे शिक्षण मिळण्याची नितांत गरज आहे. चांगला विद्यार्थी चांगला माणूसही असायला हवा. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता जोपासणारा, सामाजिक जाणीव असणारा, संवेदनशील, सहकार्याची वृत्ती असणारा जबाबदार नागरिक शिक्षणातून घडला पाहिजे या दृष्टीने,
सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशन च्या सहकार्याने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविण्यात येऊन दि. ७, ८, ९ जानेवारी २०१९ रोजी मा. केंद्रप्रमुख श्री. सुरेश भुरकुंडे साहेब यांचे अधिपत्याखाली आरळे आणि लिंब केंद्रातील सर्व शिक्षकांना ज्ञानरचनावादावर आधारित बालस्नेही, आनंददायी, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीचा वापरानुसार मूल्ये शिकवावी लागत नाहीत, ती रूजवावी लागतात, हे रूजविण्यासाठी गोष्टी सांगणे, सहयोगी खेळ, प्रश्न विचारणे, अभिनय गीते इत्यादी उपक्रम घेतले गेले.
मूल्यवर्धन कशासाठी?
राज्यघटनेतील मूल्ये ही शालेय वयातच अधिक प्रकर्षाने बिंबवली जावीत. आदर्श नागरिकत्त्वाची सुरूवात आदर्श विद्यार्थी घडविण्यातूनच व्हावी यासाठी हा कार्यक्रम असल्याचे प्रशिक्षणामुळे जाणवले. प्रशिक्षणात शिक्षकांनी या उपक्रमाची गरज लक्षात घेऊन त्याचे स्वागत तर केलेच आणि मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारे संपूर्ण वर्ष अंमलबजावणीसाठी आपल्यापुढे उभे आहे तद् नुसार मूल्यशिक्षण ही काळाची गरज लक्षात घेऊन आम्ही सर्व शिक्षकांनी वार्षिक नियोजन केले.
मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यघटनेतील स्वातंत्र्य, न्याय, समता, व बंधुता या चार मुख्य मूल्यावर आधारित आहे. त्याला राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील मानवी प्रतिष्ठेविषयी आदर, स्वायत्तता, जबाबदारी, चिकित्सक व सर्जनशील विचार, विविधतेचा आदर, सुसंवादी नातेसंबंध, इतरांबद्दल आस्था, सक्रिय योगदान या मूल्यांचीही जोड आहे. क्रमिक अभ्यासक्रमातून ही मूल्ये जाणीवपूर्वक रूजविण्याचा प्रयत्न होणार आहे.
मूल्यवर्धन अभ्यासक्रमाची रचना ही स्वतःपासून वैश्विकतेकडे नेणारी आहे. उपक्रमाची सुरूवातच मुळात विद्यार्थाला स्वतःची खरी ओळख व स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारी आहे. स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सुसंस्कृत नागरिक घडविण्याचे पहिले पाऊल पडले आहे.
माझे कुटुंब व नातेसंबंधांमधून सहसंवेदना, सुसंवाद, अयोग्य दडपणांना विरोध, सामोपचाराने विवाद सोडविणे, दुसऱ्यास गरज असेल तेव्हा सहकार्य करणे हे उपक्रम प्रत्यक्ष कृतींमधून साध्य करण्याचा प्रयत्न या उपक्रमांमध्ये झाला आहे.
मी आणि माझे जग या घटकामधून पर्यावरण रक्षणाची जाणीव, सामाजिक हिताचा विचार व सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग या गुणांची वृद्धी करणारे उपक्रम दिलेले आहेत. पाचवा घटक सहयाेगी खेळामध्ये खेळता खेळता मूल्यांची रूजवणूक करण्याचा प्रयत्न होतो. रिकाम्या वेळेतील उपक्रम हे बुद्धीला चालना देत सामाजिक जाणीव निर्माण करणारे आहेत.
उपक्रमासाठी इयत्ता पहिली ते चौथी च्या
विद्यार्थी उपक्रम पुस्तिका अगदी रंगीत व आकर्षक छपाईच्या असल्याने विद्यार्थी त्याकडे आकर्षित होत आहेत. कृतीला वाव देणाऱ्या उपक्रम पुस्तिकेची आणि शिक्षकांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक उपक्रम पुस्तिकेची रचनाही सुलभ पद्धतीने केलेली आहे. उपक्रम घेताना अपेक्षित वर्गरचना ही जोडीचर्चा, गटचर्चा व सामुदायिक वर्तुळ अशी ठेवल्याने विद्यार्थी-विद्यार्थी व शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया सहज होते.
सर्व कार्यक्रम राबविताना मूल्यांची रूजवणूक मी म्हणण्यापेक्षा सर्व शिक्षकांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे. कुटुंबातील चित्र रेखाटताना आजी-आजोबांची छाया पुसट का झाली ? तसेच माझे ध्येय ठरविताना रूंदावलेल्या कक्षा, क्रिकेट पटू सचिन तेंडुलकर यांच्या निरोपाच्या भाषणाने मदत करणाऱ्या माणसांबद्लची कृतज्ञता, शाळेतील विद्यार्थ्यांत झालेला वाद मिटविण्यास सुसंवाद कसा कारणीभूत असतो याचा अनुभव मला आला. वर्गात स्वतः केलेले नियम वर्गनियम स्वतःच पाळले पाहिजेत हे विद्यार्थी सहजच शिकत होते. असे अनेक अनुभव मी आणि माझ्या सारखे शिक्षक आपआपल्या शाळांमधून घेत आहेत. तेव्हा हे सर्व असेच घडत राहिले तर आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतून घडणारी प्रत्येक विद्यार्थी हा गुणवान,
चारित्र्यवान असेल यात शंका नाही
-केंजळे जागृती रामचंद्र.
मी आणि मूल्यवर्धन
-केंजळे जागृती रामचंद्र.
मी आणि मूल्यवर्धन
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून, संविधनातील मूल्ये व त्या संबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे हा हेतू आहे.
प्रथमतः मी शालेय अभ्यासक्रमातील इतर विषयांशी निगडित व जवळचा संबंध असणारा मूल्यवर्धन हा नवीन कार्यक्रम आणला, त्याबद्दल मुथ्था फाउंडेशनचे मनस्वी अभिनंदन व आभार मानते.
मूल्यवर्धन या नावातच संपूर्ण पुस्तकाचे सार लपलेले आहे. मूल्यवर्धन म्हणजे मूल्यांची योग्य प्रकारे होणारी रुजवणूक. हा कार्यक्रम राबविण्याची गरज का येऊन ठेपली याचा विचार प्रथमतः करणे आवश्यक आहे. पूर्वीपासूनच राज्यघटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये मूल्ये शालेय शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. मग पुन्हा हा कार्यक्रम का राबवावा? तर त्याला कारण आहे. बदलते युग, संगणकाचे, स्पर्धेचे युग, माणसांच्या विचारसरणीत होत गेलेले बदल यासारख्या अनेक गोष्टी याला जबाबदार आहेत. पूर्वी हे ‘विश्वची माझे घर’ असे म्हणणारे ज्ञानदेव. त्यांना कोणत्या गुरुजींनी मूल्ये शिकवली होती? त्यांच्यात ही मूल्ये रुजण्यासाठी आजूबाजूला प्रेरणा देणारी महान व्यक्तिमत्त्व होती. मग आता तसे नाही का? आतासुद्धा तशी व्यक्तिमत्त्वे आपल्या अवतीभोवती आहेत. फक्त त्यांच्याकडे डोळसपणे उघड्या डोळ्यांनी पाहायला कुणालाही वेळ नाही. फक्त मी व माझे एवढीच कूपमंडूक प्रवृत्ती निर्माण झाली आहे.
एकमेकांबद्दल असणारा आदर, माया, प्रेम, बंधुता मित्रत्व या सर्व गोष्टी कामापुरत्या मर्यादित राहिल्या. म्हणूनच या सर्व गोष्टींपासून अलिप्त राहून स्वार्थ भावना दूर लोटून या नव्या पिढीमध्ये मूल्यांची पुन्हा एकदा जोमाने रुजवणूक व्हावी, मूल्यांच्या सुकलेल्या फांद्यांना पुन्हा नवीन पालवी फुटावी हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी हा शाळास्तरावर राबविलेला कार्यक्रम अतिशय स्तुत्य व प्रेरणादायी असा ठरणारा आहे असे मला वाटते.
या शाळेत राबवल्या जाणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाद्वारे एक आदर्श, राष्ट्रभक्ती असणारा, शिस्तप्रिय, बंधुभाव जोपासणारा इतरांचा आदर करणारा इतरांच्या भावनांची कदर करणारा नागरिक तयार होईल. या कार्यक्रमाद्वारे मीसुद्धा एक आदर्श मूल, एक आदर्श नागरिक घडवीत आहे याचा मला अभिमान वाटतो.
मूल्यांच्या सुकलेल्या फ़ांद्या पुन्हा पल्लवित करण्यात शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे खरोखरच मोलाचे योगदान आहे.
-संगिता शामराव भातमारे
मी आणि मूल्यवर्धन
-संगिता शामराव भातमारे
मी आणि मूल्यवर्धन
मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयात रुजण्यासाठी हा एक चांगला कार्यक्रम आहे.
मुलांमध्ये मूल्ये रुजण्यास मदत होते. विद्यार्थी उपक्रम मुलांच्या वयोगटानुसार योग्य ते उपक्रम दिले आहेत. शांतता संकेतामुळे वर्गात कितीही गोंधळ असला तरी वर्ग काही क्षणातच शांत करण्यास मदत होते. मुले इतरांचे म्हणणे ऐकून घेतात. दुसऱ्यांचे मत जाणतात. इतरांच्या मताचा आदर करायला शिकतात. मनोरंजनातून शिक्षण घडते.
-सारिका वैभव डांगे
मी आणि मूल्यवर्धन
-सारिका वैभव डांगे
मूल्यवर्धन
मूल्यवर्धन कार्यक्रम राबवताना आलेले अनुभव खूप छान होते. विद्यार्थ्यांतील सकारात्मक बदलाने मनास समाधान मिळाले आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रमाबद्दल माझे अनुभव मांडत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये श्री. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन तर्फे मूल्यवर्धन कार्यक्रम राबवला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल झाले आहेत. यापूर्वी शाळेमध्ये मूल्यशिक्षण हा विषय घेतला जात होता. परंतु मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मुलांच्या कृतीला वाव मिळत आहे व विचारांना चालनाही मिळत आहे. मुले आपल्या क्षमता व जबाबदाऱ्या ओळखू लागली असून त्याचे विकसन सुरू आहे. मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये रुजविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अतिशय पूरक व गरजेचा आहे. या उपक्रमांचा इतर विषयाच्या अभ्यासक्रमाशी समन्वय साधल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्ययन प्रक्रिया सुकर वाटू लागली आहे. अध्ययनात कृतियुक्त सहभाग असल्यामुळे शिक्षण मनोरंजक वाटू लागले आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतः शाळेचे, वर्गाचे, खेळाचे नियम केल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली. विद्यार्थ्यांना नियम लादल्यासारखे वाटत नाहीत. कारण हे नियम स्वतः विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून तयार केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त निर्माण झाली. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे मराठी, गणित, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या विषयातील अमूर्त संकल्पना मूर्त स्वरूपात स्पष्ट करता येऊ लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागली.
सहयोगी खेळांमुळे आपापसात सहकार्य करण्याची वृत्ती मुलांमध्ये लहान वयातच निर्माण व्हायला लागली. कारण काळानुसार अशी सहकार्याची भावना लोप पावत चालली आहे. विद्यार्थ्यांवर लहान वयातच संस्कार केल्यामुळे त्यांना चांगले काय व वाईट काय हे समजू लागले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच शालेय व्यवस्थापन, शिक्षक यांच्या क्षमता समृद्ध करण्यासाठी हा कार्यक्रम चांगला आहे.
या प्रक्रियेत विद्यार्थी केंद्रस्थानी असला तरी यामुळे सामाजिक विकास होण्यास मदत झाली. सहयोगी उपक्रम व खेळ यांमुळे मुलांना शाळेबद्दल अधिक गोडी वाटू लागली. अशाप्रकारे गेल्या तीन वर्षांपासून माझ्या शाळेत शांतिलाल मुथ्था फाउंडेशनतर्फे सुरु असलेला मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय उपयुक्त व काळाची गरज ठरणारा आहे असे मला वाटते
-सौ. आपटे मनिषा विलासराव
मूल्यवर्धन
-सौ. आपटे मनिषा विलासराव
मूल्यवर्धन
श्री. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद पुणे यांच्यातील करारानुसार मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थी कृती व स्वविचार, स्वकृतीला वाव देणारा कार्यक्रम आहे. शाळा व समाज यांना जोडणारा मूल्यवर्धन कार्यक्रम आहे.
मी सौ. रंजना श्रीमंत सानप, उपशिक्षक जि. प. शाळा सुर्याचीवाडी, केंद्र-धोंडेवाडी, ता. खटाव, जि. सातारा मूल्यवर्धन या कार्यक्रमाबद्दल माझे अनुभव मांडत आहे.
श्री. शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन व विदया परिषद पुणे यांच्यातील करारानुसार मूल्यवर्धन कार्यक्रम सन २०१७-१८ पासून आमच्या तालुक्यात राबिवला जात आहे. बालमनाचा, बालतनाचा संस्कार अन मूल्यांच्या भक्कम पाया!
मूल्यवर्धन कार्यक्रम आला प्रगत राष्ट्राची उभारणी कराया!!
या कार्यक्रमानुसार मी माझ्या शाळेत मूल्यवर्धन उपक्रम घेण्यास सुरुवात केली. मूल्यशिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये अनेक मूल्यांची रुजवणूक होत होती, पण विद्यार्थी कृती व स्वविचारांना, स्वनिर्णयाला फारशी चालना मिळत नव्हती. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे त्यांना स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
मूल्ये शिकवली जात नाहीत तर ती नियोजित उपक्रमातून आनंददायी पद्धतीने रुजविली जातात. या तत्वानुसार चौथीच्या विद्यार्थी उपक्रम पुस्तकेतील विभाग- १ मी आणि माझ्या क्षमता अंतर्गत रस्ता ओलांडताना हे करावे या वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेतली. सुर्याचीवाडी शाळेच्या समोरून पिंपरी, गोरेगाव या गावाला जाणारा रस्ता असल्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असायची. अनेकदा अपघात व्हायचे. कधीकधी शालेय विद्यार्थ्यांनादेखील अपघाताला सामोरे जावे लागले होते. पण रस्ता ओलांडताना हे करावे, हे कळल्यामुळे चौथीतील मुले लहान वर्गांतील मुलांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्यास सांगू लागली. अपघात होणे थांबले. गावकऱ्यांनीसुद्धा मुलांचे कौतुक केले. मुलांना स्व-जबाबदारीची जाणीव झाली. समता, बंधुता या घटनात्मक मूल्यांची रुजवणूक होऊ लागली.
चौथीतील विभाग १ अंतर्गत मी आणि माझ्या क्षमता उपक्रम- माझा छंद यामध्ये छंद म्हणजे काय हे आधी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. फावल्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे. त्यामध्ये वाचन, चित्ररेखाटन, खेळ, कविता, गोष्टी लेखन, बागकाम यासारखे. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एक छंद जोपासला. या उपक्रमाचा असा फायदा झाला की, शाळेला न येणारा विराज नियमित शाळेत येऊ लागला. त्याच्या आवडीचा छंद बागकामात तो लक्ष देऊ लागला. इतर मुलांना रोपाच्या वाढीच्या काळात होणारे बदल सांगू लागला. इयत्ता तिसरीमधील प्रतीक्षा निकम कविता करू लागली. बोलायला घाबरणारी प्रतीक्षा इतरांसमोर आपले विचार मांडू लागली.
मुलांनी अब्राहम लिंकन, अमेरिका देश यांची माहिती पुस्तके व संगणकातून मिळवली. असे अनेक अनुभव आहेत की जे मूल्यवर्धन कार्यक्रमातून आले आहेत. या उपक्रमामुळे मुलांना शाळेची गोडी वाटू लागली. शाळेची पटसंख्या वाढली. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यातील नातेसंबंध सुधारले. मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, भावनिक विकास होण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे. या कार्यक्रमामुळे शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनतील यात शंका नाही.
-सौ. रंजना श्रीमंत सानप
मूल्यवर्धन
-सौ. रंजना श्रीमंत सानप
मूल्यवर्धनविषयी अनुभव
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची रुजवणूक करण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धन हा कार्यक्रम खूप योग्य व पूरक आहे. मी माझ्या शाळेमध्ये कार्यक्रम राबविल्यानंतर मला जो अनुभव आला तो कथन करीत आहे.
मूल्यशिक्षण आपण विद्यार्थ्यांना देतच होतो. परंतु आता मूल्यवर्धन हा कार्यक्रम शांतिलाल मुथ्था फाउंडेशनमार्फत राबविण्यात येत आहे. मूल्यवर्धन या शब्दाचा आपण विस्तार केला तर लक्षात येईल. मूल्यांचे वर्धन = मूल्यांची वाढ. विद्यार्थ्यांत व्यक्तीमध्ये मूल्ये असतातच, परंतु त्यांची गती काही कारणाने खुंटलेली असते किंवा त्याबद्दल विचारच केला जात नाही. या कार्यक्रमामुळे व्यक्तिशः लक्ष दिले जाते. सर्व विषयांना अनुसरून विविध उपक्रम राबविले जातात. मूल्ये व अभ्यास यांची सांगड घालून विविध उपक्रमांचे आयोजन मूल्यवर्धन तासिकेमुळे आपण करू लागलो. माझ्या क्षमता हा घटक आपण शिकविला तर मुलांना आपले आई -वडील आपल्यासाठी काय करतात? आपण काय करावे? हे समजते. दुसऱ्याचा आदर करावा हे समजते.
मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय चांगला आहे. विद्यार्थ्यांना नकळत हसतखेळत, त्यांच्या मर्जीने आपण मूल्यांची रुजवणूक करतो. इयत्ता पाहिली ते चौथीच्या सर्व उपक्रम पुस्तिका योग्य, वयोगटानुसार आहेत. मुले जेव्हा वर्गनियम बनवितात. मतदानाने वर्गमंत्री निवडतात. त्याबद्दल त्यांना आत्मियता वाटते. आपण शांत बसा म्हणण्यापेक्षा शांतता संकेताचा वापर प्रभावी ठरतो हे मी अनेकवेळा अनुभवले आहे. माझ्या वर्गात /शाळेत काय बदल झाला असा प्रश्न मला कोणी विचारला तर मी नक्कीच अभिमानाने सांगेन, होय मूल्यवर्धन उपक्रमांमुळे माझ्या शाळेतील मुलांना आरोग्यविषयक चांगल्या सवयी लागल्या.
इयत्ता पाहिलीमध्ये गीत आहे ‘असे घासतो दात आम्ही, असे घासतो दात’, ‘शाळेला जातो आम्ही शिकायला जातो’ हे गीत गुणगुणतच मुले घरी जातात. ‘हात धुवा साबणाने, मगच जेवा आरामाने’ या नियमाचा शाळेत घरी काटेकोरपणे अंमलबजावणी करताना दिसतात. हात धुण्याचे फायदे विद्यार्थ्यांनी चांगलेच आत्मसात झालेले दिसून येतात. हा बदल ‘असे धुतो हात, आम्ही असे धुतो हात’ या गाण्यामुळे झालेला दिसून येतो. असे बरेच प्रसंग किंवा अनुभव आहेत.
-श्रीमती राजश्री विक्रमसिंह देशमुख
मूल्यवर्धनविषयी अनुभव
-श्रीमती राजश्री विक्रमसिंह देशमुख
मी आणि मूल्यवर्धन
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्याप्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या खटाव तालुक्यामध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम गेली तीन वर्षे सुरु आहे. या कार्यक्रमातील उपक्रमांमुळे मुलांमध्ये मूल्यांची रुजवणूक प्रभावीपणे करता येते असा मला खूप चांगला अनुभव आला. तोच अनुभव मी आज कथन करत आहे.
-श्री. कृष्णात दशरथ फडतरे
मी आणि मूल्यवर्धन
-श्री. कृष्णात दशरथ फडतरे
मी आणि मूल्यवर्धन
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्याप्राधिकरण यांच्या संयुक्तविद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम सन 2017-2018 पासून आमच्या तालुक्यात राबविला जात आहे. त्याप्रमाणे प्रशिक्षणही मिळाले. मूल्ये ही शिकवली जात नाहीत तर ती रुजवली जातात. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव व विचारांना चालना मिळण्याच्या दृष्टीने खूप छान अनुभव या उपक्रमांमधून आला.
-सौ. कविता विष्णू देशमुख.
मी आणि मूल्यवर्धन
-सौ. कविता विष्णू देशमुख.
मी आणि मूल्यवर्धन
श्री. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद पुणे यांच्या विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम राबिवला जात आहे. विद्यार्थ्यांना स्वनिर्णयाला, स्वमताला, मूल्यांना कृतीची जोड देणारा उपक्रम आहे.
श्री. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या परिषद पुणे यांच्यातील करारानुसार मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थी कृती व स्वविचार, स्वकृतीला वाव देणारा कार्यक्रम आहे. शाळा व समाज यांना जोडणारा मूल्यवर्धन कार्यक्रम आहे.
मी सौ. रंजना श्रीमंत सानप, उपशिक्षक जि. प. शाळा सुर्याचीवाडी, केंद्र-धोंडेवाडी, ता. खटाव, जि. सातारा मूल्यवर्धन या कार्यक्रमाबद्दल माझे अनुभव मांडत आहे.
श्री. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विदया परिषद पुणे यांच्यातील करारानुसार मूल्यवर्धन कार्यक्रम सन २०१७-१८पासून आमच्या तालुक्यात राबिवला जात आहे. बालमनाचा, बालतनाचा संस्कार अन मूल्यांच्या भक्कम पाया!
मूल्यवर्धन कार्यक्रम आला प्रगत राष्ट्राची उभारणी कराया!!
या कार्यक्रमानुसार मी माझ्या शाळेत मूल्यवर्धन उपक्रम घेण्यास सुरुवात केली. मूल्यशिक्षण कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना अनेक मूल्यांची रुजवणूक होत होती, पण विद्यार्थी कृती व स्वविचारांना, स्वनिर्णयाला फारशी चालना मिळत नव्हती. मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे त्यांना स्वतःचे मत व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.
मूल्ये शिकवली जात नाहीत तर ती नियोजित उपक्रमातून आनंददायी पद्धतीने रुजविली जातात. या तत्वानुसार चौथीच्या विद्यार्थी उपक्रम पुस्तकेतील विभाग- १ मी आणि माझ्या क्षमता अंतर्गत रस्ता ओलांडताना हे करावे या वाहतुकीच्या नियमांची माहिती विद्यार्थ्यांनी करून घेतली. सुर्याचीवाडी शाळेच्या समोरून पिंपरी, गोरेगाव या गावाला जाणारा रस्ता असल्यामुळे वाहनांची सतत वर्दळ असायची. अनेकदा अपघात व्हायचे. कधीकधी शालेय विद्यार्थ्यांनादेखील अपघाताला सामोरे जावे लागले होते. पण रस्ता ओलांडताना हे करावे, हे कळल्यामुळे चौथीतील मुले लहान वर्गांतील मुलांना वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्यास सांगू लागली. अपघात होणे थांबले. गावकऱ्यांनीसुद्धा मुलांचे कौतुक केले. मुलांना स्व-जबाबदारीची जाणीव झाली. समता, बंधुता या घटनात्मक मूल्यांची रुजवणूक होऊ लागली.
चौथीतील विभाग १ अंतर्गत मी आणि माझ्या क्षमता उपक्रम- माझा छंद यामध्ये छंद म्हणजे काय हे आधी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. फावल्या वेळेत आपल्या आवडीचे काम करणे. त्यामध्ये वाचन, चित्ररेखाटन, खेळ, कविता, गोष्टी लेखन, बागकाम यासारखे. प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार एक छंद जोपासला. या उपक्रमाचा असा फायदा झाला की, शाळेला न येणारा विराज नियमित शाळेत येऊ लागला. त्याच्या आवडीचा छंद बागकामात तो लक्ष देऊ लागला. इतर मुलांना रोपाच्या वाढीच्या काळात होणारे बदल सांगू लागला. इयत्ता तिसरीमधील प्रतीक्षा निकम कविता करू लागली. बोलायला घाबरणारी प्रतीक्षा इतरांसमोर आपले विचार मांडू लागली.
मुलांनी अब्राहम लिंकन, अमेरिका देश यांची माहिती पुस्तके व संगणकातून मिळवली. असे अनेक अनुभव आहेत की जे मूल्यवर्धन कार्यक्रमातून आले आहेत. या उपक्रमामुळे मुलांना शाळेची गोडी वाटू लागली. शाळेची पटसंख्या वाढली. शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यातील नातेसंबंध सुधारले. मूल्यवर्धन उपक्रमामुळे मुलांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक, भावनिक विकास होण्याच्या दृष्टीने मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे. या कार्यक्रमामुळे शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनतील यात शंका नाही
-सौ. रंजना श्रीमंत सानप
मी आणि मूल्यवर्धन
-सौ. रंजना श्रीमंत सानप
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन कार्यक्रम हा विद्यार्थी, शाळा व स्वतःमध्ये बदल घडवून आणणारा आनंददायी असा कार्यक्रम आहे. SMF व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्र भर याची अंमलबजावणी जोरदार सुरु आहे. याच कार्यक्रम व उपक्रमातून मला आलेले अनुभव
-सौ. वर्षा प्रवीणचंद कदम
मी आणि मूल्यवर्धन
-सौ. वर्षा प्रवीणचंद कदम
मूल्यवर्धनमधून समाज प्रबोधन
मूल्यवर्धन हे शिक्षण फक्त शालेय अभ्यासक्रमाशी निगडित नसून समाजाचा एक अविभाज्य घटक आहे. आज वाढत असलेले व्यसनांचे प्रमाण कमी होण्यासाठी हेच मूल्यवर्धन पालक व समाजापर्यंत पोहोचले तर मूल्यवर्धन समाजात एक तंबाखूमुक्त आदर्श ठरू शकते.
-सौ. स्वाती सचिन शिंदे
मूल्यवर्धनमधून समाज प्रबोधन
-सौ. स्वाती सचिन शिंदे
मी आणि मूल्यवर्धन
मला मूल्यवर्धन कार्यक्रम खूप छान वाटतो. विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळतो. मूल्यवर्धन पुस्तिका मुलांना फार आवडतात.
आताच मूल्यवर्धन पुस्तिका शाळेत आल्या आहेत. मुले खूप आनंदी झाली. त्यांना असे झाले होते की, कधी एकदा त्यांना ती पुस्तके मिळतात. मागच्या वर्षाची पुस्तके आमच्या मुलांनी खूप छान सोडवली आहेत.
-मेघा दिलीप इथापे
मी आणि मूल्यवर्धन
-मेघा दिलीप इथापे
विदयार्थ्यांना देऊ मूल्यवर्धनचे वरदान
मन असो वा शेत, पेरल्याशिवाय, काहीच उगवत नाही. जसे पेरले जाते तसेच उगवते हा साधा नियम आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू होतो. प्रत्येक आचार, उच्चार आणि कर्म यांच्या मुळाशी विचार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कोणत्याही निर्मितीला आपले विचारच कारणीभूत असतात. द्वेष करायचा, त्याच्यावर प्रेम करायच यासाठी विचारांची गरज आहे. हेच संस्कारक्षम विचार योग्य वयात रुजविण्यासाठी आम्हाला प्राथमिक स्तरावर मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमांचे वरदान लाभले.
संस्कारक्षम विचार योग्य वयात रुजविण्यासाठी आम्हांला प्राथमिक स्तरावर मूल्यवर्धनच्या विविध उपक्रमांचे वरदान लाभले.
मनाशी मनाचा संवादच तुटत चालला आहे. भूतकाळातील ओझी आणि भविष्यातल्या चिंता यामुळे वर्तमानातल्या आनंदाला आपण पारखे होत चाललो आहोत. वर्तमानातला हा आनंद आपल्याला मिळवायचा असेल आणि उत्तमरित्या आनंदी जीवन जगायचे असेल तर मूल्यवर्धनचे उपक्रम संस्कारक्षम वयात म्हणजेच प्राथमिक स्तरावर रूजविल्याने आदर्श नागरिक घडवू शकणार आहेत. समाजात दडलेल्या सकारात्मकतेच्या ऊर्जेची जाणीव समाजाला करून देण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम वरदान ठरत आहे.
एखाद्या अंधाऱ्या खोलीतला अंधार घालविण्यासाठी नुसती कल्पना करुन अंधार जात नाही. जोपर्यंत प्रकाश तिथे येत नाही तोपर्यंत अंधार जात नाही. तसेच संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी मूल्यवर्धनचे इयत्तावार विविध उपक्रम अंधारात दिव्याचे कार्य करताना दिसून येत आहेत. बदलत्या काळानुसार सर्वांगीण विकासासाठी २१ व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार आम्हा शिक्षकांना करावा लागेल आणि त्यानुसार वर्गात घडणाऱ्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत ही नवनवीन बदल करताना मूल्यवर्धनची जोड अचूक मार्ग दाखवत आहे.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीचा वेग अफाट वाढला आहे. त्याचप्रमाणे मुलांची बौद्धीक क्षमताही वाढली आहे. काळानुसार दररोज बदलणारे अध्यापन आनंददायी होत आहे. ते क्षमता विकासास पोषक ठरते. म्हणून आम्हा गुरुजनांना २१ व्या शतकातील मुलांना शिकविताना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त नवीन कौशल्ये विकसित करावी लागत आहेत. ती कौशल्ये रुजविण्यासाठी मूल्यवर्धन कार्यक्रम माझ्या शिक्षक बंधू भगिनींसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
जि. प. शाळा, सोनगाव, ता. जावली या माझ्या शाळेत उपस्थिती सुधारण्यासाठी व प्रामाणिकपणा ह्या गोष्टीसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी माझ्या शाळेत विद्यार्थ्यांच्या मदतीने वर्गनियम व शाळानियम ही नियमावली शाळेत बनविली. त्यामध्ये मी रोज शाळेत वेळेत हजर राहीन, मी दररोजचा अभ्यास प्रामाणिकपणे पूर्ण करीन असे नियम बनविले. त्यांचे पालन करताना शाळेची गुणवत्ता सुधारली.
सूर्याचा एक किरण आपल्याला विनयशीलता हे मूल्य शिकवतो. वाऱ्याप्रमाणे तो आपल्या घरात आगंतुकपणे घुसत नाही. दरवाज्याशी तासन तास वाट पाहत उभा असतो. आपल्याकडून घराचे दार थोडेसे जरी किलकिले झाले तर मग मात्र आपल्या घराचा अंधार क्षणात नाहीसा करतो. याचप्रमाणे, मुलांना सूर्याच्या किरणाची विनयशीलता मूल्य रुजवून इतरांच्या मनाचा गाभारा प्रेरित करण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रमाची मालिका महत्त्वपूर्ण ठरते. म्हणूनच शेवटी एवढेच सांगावेसे वाटते.
शतसूर्याच्या दिव्यप्रभेने अवघी सृष्टी झळाळते,
सृष्टीवरच्या सूर्यफूलांची हीच प्रेरणा असते,
प्रेरक कृती आणि वृत्ती नवसूत्र घडवते,
त्या घडण्यासाठी मूल्यवर्धन उपक्रमा तुझी गरज असते.
-सौ. पूनम प्रसाद वालेकर
विदयार्थ्यांना देऊ मूल्यवर्धनचे वरदान
-सौ. पूनम प्रसाद वालेकर
मराठी/h4>
मुलांना, संवाद, गाणी, गोष्ट सादरीकरण करताना खूप उपयोगी आहे
मुले पुस्तक वाचताना खूप आनंद घेतात. गाणी ऐकून ती सुंदर सादर करतात. गोष्ट ऐकून तिचे सादरीकरण करतात. शाळेचे नियम स्वत तयार करून ते पाळतात. तसेच घरी कोणते नियम पाळावेत ते सांगतात. रिकाम्या वेळी करावयाच्या कृ ती खूपच सुंदर करतात. रंग भरताना खूपच छान रंग भरतात. गोष्ट ऐकून दुसरी गोष्ट सांगतात. सर्व कृ ती खूपच छान करतात.
-कांचन धनाजी खाडे
मराठी
-कांचन धनाजी खाडे
मी आणि मूल्यवर्धन
शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासून आमच्या फलटण तालुक्यामध्ये सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व विद्या प्राधिकरण, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे.
या कार्यक्रमाचे प्रथम प्रशिक्षण झाल्यावरच मला या कार्यक्रमाचे गांभीर्य कळून आले. म्हणूनच या कार्यक्रमांतर्गत मी माझ्या संस्थेमध्ये मूल्यवर्धन कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांना पुस्तके हातात मिळतात त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. १९९७ पासून मूल्यशिक्षण हा कार्यक्रम शालेय स्तरावर राबवला जात होता, पण काहीतरी कुठे तरी अडचण असल्यासारखं वाटत होतं. कारण का तर विद्यार्थी कृती, विचारांना, स्वनिर्णयांना फारशी त्यामध्ये चालना मिळत नव्हती किंवा नियोजन पद्धतीने त्यांच्यामध्ये आनंद त्यांना मिळत नव्हता. मूल्यवर्धन उपक्रमामुळे अनेक कार्यक्रम यामध्ये शाळा स्तरावरील समाविष्ट असल्यामुळे विद्यार्थी कृती आणि त्यांच्या सर्व विचारांना चालना, अध्ययन-अध्यापन पद्धतीतून ज्ञाननिर्मिती म्हणजे विद्यार्थी हाच ज्ञानाचा निर्माता आहे. त्यामुळे मूल्यवर्धन उपक्रमांतून त्याला ज्ञाननिर्मितीपर्यंत नेऊन सोडले जाते आणि तो त्या ज्ञानाच्या सागरामध्ये डुंबून तृप्त होतो.
आज एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत असताना आपला विद्यार्थी संस्कारक्षम, आनंदमय आणि ज्ञानाचा निर्माता असावा असे जर वाटत असेल तर मूल्यवर्धन ही काळाची गरज आहे. मी माझ्या शाळेमध्ये इयत्ता पाहिली ते पाचवी या वर्गासाठी मूल्यवर्धन विभागानुसार मी आणि माझ्या क्षमता अंतर्गत अनेक उपक्रम घेतले. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम त्यांना समजून सांगितले. ते माहिती झाल्यामुळे रस्ता ओलांडताना त्याचा उपयोग करू लागले. संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य विचार यांची रुजवण या कार्यक्रमातून नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये घडून आली.
माझा आवडता छंद- विद्यार्थी कल्पकतेने आपले काम करतो म्हणजेच छंद ! विद्यार्थी आपले काम शंभर टक्के मन लावून करू लागले. कोणतेही काम करताना त्यास १००% आपलं योगदान द्यावं असं प्रत्येक विद्यार्थ्यांला वाटू लागलं. उदाहरणार्थ, वाचन, चित्र काढणे, रांगोळी काढणे, खेळ, कविता, गोष्टी गाणी, लेखन काम, ओला कचरा व सुका कचरा, गांडूळ खत निर्मिती, कंपोस्ट खत निर्मिती अशी अनेक उदा. देता येतील. हाच मूल्यशिक्षणाचा ठेवा होता असे मला वाटते.
अंकिता म्हणते की, मला मूल्यवर्धन शिक्षणानेच म्हणजे शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. म्हणूनच मी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी झाले. आमचा हर्षद म्हणतो की, छोट्यामोठ्या कविता करणे फारच अवघड वाटायचे. मात्र मूल्यवर्धनने मला छोट्यामोठ्या कविता करणे शिकवले. अनेक झाडांचे, वृक्षांचे, परिसरातील बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण करून बदल सांगणे, फुलपाखरू कसे तयार होते याविषयी मुलांना कुतूहल होते. त्याचबरोबर त्यांना या कार्यक्रमामुळे आपली वैयक्तिक स्वच्छता, राहणीमान तसेच शाळेची गोडी लागून विद्यार्थी उपस्थिती निश्चितच वाढण्यासाठी या मूल्यवर्धन कार्यक्रमाचा मला, माझ्या शाळेला खूप उपयोग झाला.
आमच्या ग्रामशिक्षण समितीने या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे खूपच कौतुक केले आहे. हा कार्यक्रम उत्कृष्ट असून सातत्याने राज्य स्तरावर सर्व शाळांमध्ये राबवायला काही हरकत नाही असेही त्यांचे मत आहे. तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांचेही या कार्यक्रमामुळे नातेसंबंध सुधारले.
आमच्या केंद्रात मूल्यवर्धन कार्यक्रम अतिशय उत्साहाने राबवला जात आहे. मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास होण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम खूपच पूरक असा आहे. मुलांमध्ये सकारात्मक भावना निर्माण करणे, विविध मनोरंजनातून खेळातून अध्यापन पद्धतीचा वापरही आपण या मूल्यवर्धनातू करू शकतो. उदा.जोडीचर्चा, सामुदायिक खेळ पद्धती, वर्गातील विद्यार्थ्यांची वर्गरचना या सर्वांचा कसा वापर करून मुलांना आनंददायी पद्धतीने शिक्षण देणे हे मुख्य उद्दिष्ट मला या मूल्यवर्धन उपक्रमाचे फलित वाटते. मूल्यवर्धन कार्यक्रमाचा शाळेतील प्रत्येक विषयाशी संबंध जोडला गेला आहे. एकात्मिक पद्धतीने हा कार्यक्रम ही आपल्या विद्यार्थ्यांना निश्चितच शिकवता येईल. आवड-निवड, न्याय, समता, स्वातंत्र्य बंधुता ही मूल्ये त्यातून साध्य होतातच, मात्र उद्या जर विद्यार्थी कर्तबगार, संवेदनशील, जबाबदार नागरिक घडवायचा असेल तर या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मी पासून सुरुवात करून सर्व जग बदलण्याची ताकद या मूल्यवर्धन कार्यक्रमांमध्ये दिसून येते. हा कार्यक्रम असाच पुढे सुरू राहावा हीच सदिच्छा !
-धन्यकुमार प्रल्हाद तारळकर
मी आणि मूल्यवर्धन
-धन्यकुमार प्रल्हाद तारळकर
मूल्यवर्धन
मूल्यवर्धन विषयाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश व त्याची उपयोगिता
मूल्यवर्धन पुस्तिकेतील अनेक कथा, उपक्रम मुलांच्या भावनिक विकासाला मदत करतात. मुलांना चांगले व वाईट याची समज यायला मदत होते. सध्याच्या पिढीतील हरवलेले संस्कार, मूल्ये पुन्हा रुजवण्यासाठी मदत होते.
-प्राजक्ता जगदीश सुपेकर
मूल्यवर्धन
-प्राजक्ता जगदीश सुपेकर
मूल्यवर्धन
मूल्यवर्धन हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना मानवता व मूल्य जागृतीसाठी खूप सुंदर असा आहे.
मूल्यवर्धन हा शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचा अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात शिक्षकांना मूल्यवर्धन उपक्रमाची ओळख, खेळ, कृती व चर्चा या माध्यमातून करून देण्यात आली. शिक्षक हस्तपुस्तिका व विद्यार्थी उपक्रम पुस्तिकेच्या समन्वयातून उपक्रम कसे घ्यायचे हे समजले. हा उपक्रम राबवताना विद्यार्थी प्रतिसाद खूप छान मिळाला. यातील अनुभव पुढीलप्रमाणे:
शांतता संकेत:- शांतता संकेत यामुळे फक्त हात वर करताच शांतता पसरते. मुलांना शिस्तीचे मूल्य अंगी बाणवले जाते.
सहयोगी खेळ : यातून मुलांमध्ये एकी, बंधुता, दुसऱ्याबद्द्ल आदर, प्रेम, दुसऱ्याला संधी देणे गरजेचे आहे हे लक्षात येते.
माझ्या जबाबदाऱ्या : यातून शाळा, घर, समाज याबद्दलची कर्तव्ये याची जाणीव मुलांना होते. तसेच यातून सामाजिक बांधिलकी जपली जाते.
मी आणि माझ्या क्षमता : यातून स्वतः ची ओळख, स्वतःची जबाबदारी, कामे, वाईट वागण्याचे परिणाम, चांगले करण्याची भावना निर्माण होते. स्वातंत्र्य या मूल्याची रुजवणूक केली जाते.
माझे नातेसंबंध : या सत्रातून मैत्री, चांगला मित्र निवडणे, मित्राची काळजी घेणे, बंधुता मूल्याची रुजवणूक होते.
सामाजिक बांधिलकी, सहकार्य, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती यासारखी मूल्ये नकळत मुलांच्यात रुजवली जातात नवनवीन शोध, धावती जीवनशैली यामुळे तसेच साचेबद्ध अभ्यासक्रम, मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थीदशेत संस्कार, मूल्य यांची रुजवणूक होत नव्हती. मूल्यवर्धन या उपक्रमात स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांची रुजवणूक चर्चेतून, खेळातून, आनंदी वातावरणातून होते.
-सौ. मोहिनी सतीश घाडगे
मूल्यवर्धन
-सौ. मोहिनी सतीश घाडगे
मूल्यवर्धन कार्यक्रम
माझ्या वर्गात मी मूल्यवर्धन कार्यक्रम राबवत आहे, त्याचे हे दुसरे वर्ष आहे. सदर पुस्तिकेतील उपक्रम नाविन्यपूर्ण आहेत. ते राबवताना असे जाणवते की या उपक्रमांनी विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील एका विशिष्ट अंगाची कमी भरून काढली आहे.
-विक्रम रामचंद्र शेंडगे
मूल्यवर्धन कार्यक्रम
-विक्रम रामचंद्र शेंडगे
मी व माझ्या क्षमता
मी शितल डफळ. गेली नऊ वर्षे सातारा नगरपालिका शिक्षण मंडळाच्या न. पा. शाळा क्र.23 गोडोली सातारा येथे कार्यरत आहे. सर्वप्रथम मी मूल्यवर्धन उपक्रमास शुभेच्छा देते. वास्तविक पाहता मूल्यवर्धन प्रशिक्षणावेळीच या उपक्रमाचे वेगळेपण व उपयुक्तता लक्षात आली होती.
जसजशी पुस्तिकांची ओळख होत गेली, तसतसे या उपक्रमाची सखोलता लक्षात आली. सर्व बारकावे लक्षात घेऊन हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आजवरच्या अनुभवात एखादा विषय शिकण्यासाठी विद्यार्थी एवढ्या जास्त प्रमाणात उत्सुक असल्याचे प्रथमच जाणवले. आमच्यासारख्या शाळांना हा कार्यक्रम खूपच उपयुक्त आहे.
शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे आमची शाळा शतशः आभार मानतो.
वास्तविक पाहता मूल्यवर्धन हे उपक्रमाचे नावच आपल्याला खूप काही सांगून जाते. आमची शाळा गोडोली, सातारा येथे आहे. या शाळेत कोल्हाटी वस्ती,जोशीवाडा, साई मंदिर परिसरातील झोपडपट्टी,परिसरातील कामगारांची मुले हे सर्व विद्यार्थी असतात. अध्यापनाहूनही त्यांना चांगल्या सवयी लावणे, त्यांच्यामध्ये मूल्यांची रुजवणूक करणे हे आम्हा शिक्षकांसमोरील एक मोठे आव्हान असते. परंतु गेल्यावर्षी मूल्यवर्धन कार्यक्रम अभ्यासक्रमात दाखल झाला आणि हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये होणारा बदल जाणवू लागला. पुस्तिकेतील उपक्रम राबवण्यासाठी मुले नेहमीच उत्सुक असतात. मूल्यवर्धन तासिकेची ती आतुरतेने वाट पाहत असतात. या उपक्रमात प्रत्येक विद्यार्थ्यांला स्वतःला ओळखण्याची, स्वतःच्या क्षमता जाणून घेण्याची आणि ते सर्वासमोर व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली.
जेव्हा इतरांनी आपल्या मताचा आदर करावा असे आपल्याला वाटते, तेव्हा आपणही इतरांच्या मताचा आदर करण्यास शिकले पाहिजे याची त्यांना जाणीव झाली. जेव्हा विद्यार्थ्यांनी स्वतःविषयी तक्ता व निबंध तयार केला आणि त्याचे वाचन सर्वांसमोर केले, त्यावेळी त्यांना स्वतःची नव्याने ओळख झाली. मी हे देखील करू शकतो /शकते या जाणीवेने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढल्याचे जाणवले. कधीच कोणत्या गोष्टीसाठी समोर न येणारी मुले बालसभेमध्ये भाषण करू लागली. इतर स्पर्धामध्ये सहभाग घेऊ लागली. आपले वागणे सर्वांमध्ये आदर्श कसे ठरेल यासाठी प्रयत्नशील राहू लागली.
त्यांनी सुचवलेले मुद्दे, कल्पना यांची वर्गासमोर नोंद घेतली जाते ही गोष्ट त्यांना खूप सुखावते. त्यामुळे एखाद्या मुद्द्यावर सखोल विचा करून त्याबाबत बोलण्यासाठी ते प्रयत्न करू लागले.
हा कार्यक्रम खरोखरच अभ्यासक्रमास उपकारक ठरला आहे. विद्यार्थी क्षमता आणखी विकसित होतील, यात कोणतीही शंका नाही.
-शितल विठ्ठल डफळ
मी व माझ्या क्षमता
-शितल विठ्ठल डफळ
मी आणि मूल्यवर्धन
मूल्यवर्धन कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये राबविला जातो. त्यामुळे मुलांच्या पुढील काळात त्यांना आत्मविश्वास, शिस्त, समजूतदार, नम्रता, प्रामाणिकपणा, दुसऱ्यांना मदत करणे अशा अनेक गुणांची साठवणूक करता येईल. हा कार्यक्रम शांतिलाल मुथ्था फाउंडेशन यांनी मला राबविण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा शतश: आभारी आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रम राबविताना माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना त्यांच्यामध्ये चांगले बदल घडून येत आहेत. त्याच्यातील एक अनुभव असा की, माझ्या वर्गात शिकणारा आयुष हा मुलगा नेहमी शाळेत येतो. शाळा कधीही बुडवत नाही. पण त्याला कोणी जर बोलले तर त्याला खूप राग येत होता. त्यावेळी तो दुसऱ्याच्या अंगावर धावून जात असे. आता त्याचा स्वभावही बदलला आहे आणि त्याचा रागही गेला आहे. याचे सगळे श्रेय जाते ते मूल्यवर्धनला.
आज आयुष सर्व मुलांच्यामध्ये मिळूनमिसळून वागतो. तसेच खेळताना जर कोणी पडले तर सर्वांच्या आगोदर धावत जाऊन फस्ट-एड बॉक्स घेऊन येतो. शाळेची परिसर स्वच्छता करायची आहे असे नुसती म्हणायची खोटी, की आयुष सर्वांच्या आगोदर धावत जाऊन सफाई करायला सुरू करतो. हे मूल्यवर्धन कार्यक्रम राबविल्यामुळे शक्य झाले आहे असे मला वाटते.
मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे विद्यार्थी भविष्यात कर्तबगार, चांगले, विचारी नागरिक बनतील असे मला वाटते.
-संजय आत्माराम भोसले
मी आणि मूल्यवर्धन
-संजय आत्माराम भोसले
स्वतः मधील बदल (मूल्यवर्धन जाणीव. माझ्या जबाबदारीची)
शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व SCERT यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या मूल्यवर्धन कार्यक्रमामुळे दैनंदिन जीवन व स्वतः मध्ये बऱ्याच अंशी बदल घडून आले त्यासाठी आज मी लक्ष्मी हिम्मत भंडलकर माझे अनुभव मांडत आहे.
-लक्ष्मी हिम्मत भंडलकर
स्वतः मधील बदल (मूल्यवर्धन जाणीव. माझ्या जबाबदारीची)
-लक्ष्मी हिम्मत भंडलकर
मूल्यवर्धन उपक्रम/h4>
मूल्यवर्धन एक उपयुक्त या अत्यावश्यक कार्यक्रम
मूल्यवर्धन उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास मदत होत आहे.मुले आवडीने उपक्रमात सहभागी होत आहेत. त्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल होत आहेत. त्याच्या क्रियशक्तीला वाव मिळत आहे असे वाटते. – नवनाथ तुकाराम पवार
-नवनाथ तुकाराम पवार
मूल्यवर्धन उपक्रम
-नवनाथ तुकाराम पवार
मी आणि मूल्यवर्धन पुस्तिकेसाठी अनुभवकथन
श्री. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने राबवलेल्या मूल्यवर्धन उपक्रमाबाबत मी सौ. वृंदा जीवन शिंदे, उपशिक्षका रानगेघर शाळा.
‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयांचे’ या साने गुरुजींच्या ओळींची आठवण करून देतात ते म्हणजे मूल्यवर्धन उपक्रम. मनोरंजनाबरोबरच आनंददायी कृतींतून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची रुजवणूक करतात, ते म्हणजे मूल्यवर्धनचे विविध आणि आकर्षक असे उपक्रम.
दऱ्याखोऱ्यात असणारी आमची रानगेघर शाळा. पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग असणारी. या सर्वच वर्गांवर मूल्यवर्धचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
सर्वच विद्यार्थी या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या वर्गनियमांचे पालन करतात. यामुळे शाळेत शिस्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर शांतता संदेशाचे ही योग्य ठिकाणी वापर करत असल्याने शाळेतील वातावरण शांततामय आणि प्रसन्न झाले आहे.
माझ्या वर्गात हा कार्यक्रम राबवत असताना मला असे दिसून आले की, सर्वच विद्यार्थी या उपक्रमात अगदी आवडीने आणि हिरहिरीने सहभागी होतात. सर्व उपक्रम यशस्वीपणे, आनंदाने पूर्ण करतात. मूल्यवर्धनची विद्यार्थी उपक्रम पुस्तिका तर त्यांना हवीहवीशी वाटते. त्यातील आकर्षक रंगीत चित्रे, छानछान गोष्टी, नाविन्यपूर्ण उपक्रम हे सर्व पाहताना, वाचताना, उपक्रम पूर्ण करताना ती अगदी हरखून, रमून जातात. त्यांच्यातील उत्साह दुथडी भरून वाहत असतो.
राज्यघटनेतील मूल्ये पहिलीपासूनच विद्यार्थ्यांच्या बालमनावर रुजविण्यासाठीच हा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित वर्तन बदल झालेला दिसून येतो. बालस्नेही, आनंददायी, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, ज्ञानरचनावदवर आधारित पद्धतीने बनवला असल्याने अधिक प्रभावी ठरत आहे.
कला, हस्तकला, भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान, पर्यावरण, खेळ याचेही ज्ञान देणारा आहे. वैविध्यपूर्ण उपक्रमांतून नैतिक मूल्यांची रुजवणूक करणारा असाच हा कार्यक्रम आहे.
माणसाच्या आयुष्यात दोनच गोष्टी बदल घडवू शकतात. एक म्हणजे त्याने वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे त्याला भेटलेली माणसे. या विचाराप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात मूल्यवर्धन पुस्तिका अमुलाग्र बदल घडवून आणणारी अशीच आहे. हेच विद्यार्थी आपल्या भावी आयुष्यात आपल्या देशाचे सुजाण, संवेदनशील, सुसंस्कारित, सुसंस्कृत, जबाबदार नागरिक नक्कीच होतील.
प्रामाणिकपणा हे मूल्य आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजले असून खरे बोलणे, एखादी वस्तू सापडली तर परत आणून देणे, चुकले तर माफी मागणे, त्याचबरोबर बंधुता, समता या मूल्यांची रुजवणूक झालेली दिसते. एकमेकांना आनंदाच्या प्रसंगी, दु:खाच्या प्रसंगी मदत करतात. मित्र आजारी असताना मदत तर करतातच आणि त्यांचे वाढदिवसदेखील साजरे करतात.
घरी आणि समाजात वावरताना आमच्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडून आलेले दिसले ते या उपक्रमामुळेच. अपंगांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, वाहतुकीचे नियम पालन, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, एकमेकांशी समजुतीने वागणे, झाडे लावून त्यांची निगा राखणे, प्राण्यांची काळजी घेणे, घरातील कामे करणे, वृद्धांची सेवा करणे, लहान भावंडांची काळजी घेणे या सर्वच गोष्टी विद्यार्थी करताना दिसतात. हे सर्व या मूल्यवर्धन उपक्रमाचेच फलित आहे.
मूल्यवर्धन कार्यक्रम नावाप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांचे वर्धन करणारा प्रभावी कार्यक्रम आहे.
-सौ वृंदा जीवन शिंदे
मी आणि मूल्यवर्धन पुस्तिकेसाठी अनुभवकथन
-सौ वृंदा जीवन शिंदे
मूल्यवर्धन काळाची गरज
या कोवळ्या कळ्यांमाजी । लपले ज्ञानेश्वर, रवींद्र, शिवाजी ।।
विकसता प्रकटतील समाजी । शेकडो महापुरुष ।।
मूल्यवर्धनाने वाढवा निश्चय । जीवन जय करावया ।।
मूल्यवर्धन ही आजच्या काळाची खरी गरज आहे. शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण यांच्या सहकार्याने मूल्यवर्धन हा कार्यक्रम सर्व शाळांमध्ये सुरू आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या संविधानातील चार मूल्यांवर हा कार्यक्रम आधारित आहे. विद्यार्थ्यांमधून उद्याचे सुसंस्कारी, चारित्र्यसंपन्न नागरिक बनविणे हे या मूल्यवर्धन कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे.
विद्यार्थ्यांनी ज्ञानप्राप्तीबरोबर आचार विचाराने सुयोग्य संस्कारित होऊन आपले चारित्र्य संवर्धन करावे या हेतूने मूल्यवर्धन कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमातील उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या ‘स्व’ पासून व कुटुंबापासून सुरू होतात. याचा अर्थ शाळेतील सुसंस्कृत वातावरणाचे पडसाद घराघरामधील कौटुंबिक जीवनामध्ये उमटले पाहिजे आणि घरातील सुशील वर्तनाचे प्रतिबिंब शाळेच्या दैनंदिन व्यवहारात आढळले पाहिजे. तरच नवीन पिढी संस्कार संपन्न व आदर्श बनू शकेल. पूज्य विनोबाजींनी म्हटलेच आहे, शाळा घरात व घर शाळेत घुसले पाहिजे.
शाळेचे नियम, वर्गनियम विद्यार्थ्यांनी स्वतः बनविणे व त्यांचे पालन करणे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाला शिस्त लागली आहे. नैतिकतेवर आधारित हे नियम नागरिक घडवतीलच.
उपक्रम पुस्तिकेतील विविध संस्कारक्षम कथा ,महान व्यक्तींची चारित्र्ये ज्ञानरचनावादाला प्रेरित तर करतातच, पण त्यातून सुसंस्कारी आचार विचार यांचा समतोल साधला जात आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानात्मक, कार्यात्मक, भावात्मक कौशल्ये निर्माण होत आहेत.
मूल्यवर्धन पुस्तिकेतील उपक्रम हे गटपद्धतीने घ्यायचे असलेने विद्यार्थ्यांच्या परस्परातील विचारांच्या देवाणघेवाणीला व सामाजिक व सामूहिक विकासाला प्रोत्साहन मिळत आहे. सहकारिता, बंधुता, आपुलकी या भावना वाढीस लागत आहेत. विद्यार्थ्यांची सामाजिक जाणीव विकसित होत आहे.
मूल्यवर्धन उपक्रमांचा उद्देश मूल्ये केवळ शिकवणे नसून त्यांचा संस्कार करणे आहे. ‘स्व’विषयक, समाजविषयक,राष्ट्रविषयक, विश्वविषक आणि वर्तमान संस्कृतीविषयक सर्व मूल्यांची जोपासना शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये हा मूल्यवर्धन कार्यक्रम कार्यक्षमतेने करीत आहे. यातील विविध संस्कारक्षम उपक्रमांमुळे हे साध्य होत आहे. यासाठी व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्र या पायऱ्यांनी सर्व स्तरांशी विद्यार्थ्यांचा संबंध येत आहे आणि त्यांच्या जाणीवांचा विकास साधून ते जाणते होण्यास मदत होत आहे.
मूल्यवर्धन उपक्रम हे संस्कार तर करतातच पण ते आनंददायी पद्धतीने करतात. भारतीय शिक्षण तज्ज्ञाचे मत आहे की, शिक्षण जर आनंदी नसेल तर अध्ययन अध्यापन परिणामकारक होत नाही. या विचाराचा प्रसंगी अनुभव ही येतो. यातील रिकाम्या वेळेतील उपक्रम हे आनंददायी असेच आहेत.
अशाप्रकारे स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संविधानातील मूल्यांवर आधारित हा मूल्यवर्धन कार्यक्रम म्हणजे शांतिलाल मुथ्था फाउंडेशन व महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाची शिक्षण क्षेत्राला मोठी देणगी आहे.
या बालकांमध्ये विकास व्हावा मूल्यांचा ।
या बालकांमधून जन्म व्हावा महापुरुषांचा ।
या बालकांमध्ये निर्माण व्हावा सद्गुणांचा ।
हाच निश्चय मूल्यवर्धनचा ।
-श्रीम.कदम ज्योती बाबुराव
मूल्यवर्धन काळाची गरज
-श्रीम.कदम ज्योती बाबुराव