एकमेकांचा आदर करणे
विद्यार्थी मूल्यशिक्षणातून एकमेकांचा व वडीलधाऱ्या माणसांचा आदर करीत आहेत. इतरांच्या सूचनांचे पालन करीत आहेत.
मूल्यवर्धन कार्यक्रम शाळेत राबविला जात आहे. मूल्यवर्धन पुस्तिकेतील विविध प्रसंग व गोष्टी सांगितल्याने मुले सकारात्मक विचार करीत आहेत. वडीलधाऱ्या व्यक्तींशी उद्धटपणे वागणारी मुले आज्ञा पालन करताना दिसत आहेत. एकमेकांशी समंजसपणे वागताना दिसत आहेत. मूल्यशिक्षणातील हे यश विद्यार्थ्यांमध्ये पाहावयास मिळते. हा कार्यक्रम स्तुत्य आहे. याही वर्षी आम्ही मूल्यवर्धन प्राधान्याने राबवण्याचा संकल्प केला आहे.
-संतोष माने
एकमेकांचा आदर करणे
-संतोष माने
मूल्यवर्धन कृतीशील झाले
विद्यार्थी निरीक्षण करून कृती करतात. उदा. ‘उंटाची चाल, खेकडा चाल’ गाणे आनंदायी पद्धतीने म्हणतात. मुलांमध्ये चांगल्या सवयी रुजविल्याने समाजात वावरताना नैतिक मूल्यांचे जतन करतात.
मूल्यवर्धन हा उपक्रम खूप चांगला उपक्रम आहे. मुलांमध्ये खूप बदल होताना दिसून आले. यावर्षीदेखील नक्की आम्ही हेच उपक्रम करून दाखवू.
-दीपमाला थालकर
मूल्यवर्धन कृतीशील झाले
-दीपमाला थालकर
प्रशिक्षणामुळे अपेक्षित वर्तनबदल झाले
मूल्यांची रूजवणूक विद्यार्थ्यांत होणे अत्यावश्यक आहे. भावी काळात आदर्श व नितीवान मानवाची निर्मिती होण्यासाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण होणे अत्यावश्यक आहे.
मूल्यवर्धनमुळे मुले शाळेतील प्रत्येक कार्यात आदर्शवत वर्तन करतात. शाळेमधील कार्यात सहभाग घेतात. नाटयीकरण, गीतगायन कार्यक्रमात भाग घेतात.
-चंद्रकांत पोतलवाड
प्रशिक्षणामुळे अपेक्षित वर्तनबदल झाले
-चंद्रकांत पोतलवाड
एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ
इतरांच्या अडचणीत मदत करण्याची वृत्ती मुलांमध्ये निर्माण झाली.
अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ती मदत करतात. निरीक्षण, चर्चा करुन प्रश्न सोडवतात. सर्वांना कृती करण्याची संधी देतात. वर्गात तसेच गावात शिस्तीचे पालन करतात. आत्मविश्वासपूर्वक वागतात.
-आशा वानुले
एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ
-आशा वानुले
मी आणि मूल्यवर्धन : अनुभवकथन
शालेय विद्यार्थी भविष्यात लोकशाहीचे जबाबदार, संवेदनशील आणि कर्तबगार नागरिक बनावेत म्हणून मूल्यवर्धनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मूल्ये ही शिकविली जात नसल्याने ती विविध उपक्रमांमधून सहजपणे रुजविली पाहिजेत. राज्यघटनेतील मूल्ये शालेय जीवनात इयत्ता पहिलीपासून रुजविण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भावी पिढी जबाबदार बनेल. म्हणून शासनाने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या मदतीने मूल्यवर्धन कार्यक्रम सुरु केला, ते फार चांगले झाले.
विद्यार्थ्यांना मूल्ये व त्यांचे महत्त्व लहानपणीच कळावे म्हणून मूल्यवर्धन कार्यक्रम अंतर्भूत केला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. गेल्यावर्षी मी मूल्यवर्धनचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण खूपच चांगले झाले. प्रशिक्षणात स्वंयशिस्तीचे दर्शन झाले. प्रत्येक प्रशिक्षणार्थी तन-मन एकाग्र करून प्रशिक्षण घेत होता. त्यातीलच मी ही एक होते. मला प्रशिक्षण खूप आवडले. मी तिथेच मनाशी खूणगाठ बांधली की, यातील सर्वच उपक्रम मी माझ्या शाळेत राबविणार. सर्वात अगोदर मी माझ्या विद्यार्थ्यांना शांतता संकेत शिकविला. तो खूप परिणामकारक ठरला. वर्गात किंवा मधल्यासुट्टीत काही सहयोगी खेळ घेऊ लागले. सर्वच मुले खूप आनंदाने सहभागी होऊ लागली. रोजची उपस्थितीही वाढू लागली. मी दुसरीच्या वर्गाला शिकवीत असल्यामुळे त्या वर्गाची उपक्रम पुस्तिका शिक्षक हस्तपुस्तिकेच्य़ा साहाय्याने सोडवून घेतली. त्यातील मूल्यांवर आधारित गोष्टी मुलांना खूप आवडल्या. त्यामुळे मुले लक्ष केंद्रित करायला शिकली. त्याचा फायदा इतर विषय शिकविताना झाला. हा अभ्यासक्रमच मुळात शाळांच्या गरजा, प्राधान्यक्रम व उपलब्ध असणारी साधनसामुग्री यानुसार आवश्यक वाटतील तेथे बदल करून राबविता येणारा लवचिक असा कार्यक्रम असल्यामुळे स्वातंत्र्य व प्राधान्यक्रम ठरविणे सोपे गेले. यातील कृतियुक्त गीते मुलांच्या गळ्यातील ताईत बनली. न बोलणारी, लाजरीबुजरी मुलंही नाचायला लागली. अशाप्रकारे हा विषय शालेय अभ्यासक्रमाशी निगडीत विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधणारा कार्यक्रम आहे, असे माझे प्रमाणिक मत आहे. प्रत्येक शाळेत हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविला तर निश्चितच आजची ही बालके भावी पिढीची उत्तम उदाहरणे होतील. मूल्यशिक्षणासाठी शाळेत सध्या होणाऱ्या प्रयत्नांना पूरक असाच हा कार्यक्रम होईल. यात तीळमात्र शंका नाही.
-सविता सावंत
मी आणि मूल्यवर्धन : अनुभवकथन
-सविता सावंत
वर्तनबदल
मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक बदल झाला आहे.
विद्यार्थ्यांनी स्वत: शिस्त लावून घेतली आहे. ते घरी, शाळेत आदरपूर्वक वागतात. शाळेमध्ये एकमेकांना मदत करतात. उपक्रमांत आवडीने सहभागी होतात. मूल्यवर्धनमुळे विद्यार्थ्यांच्या शाळेतील वर्तनात सकारात्मक बदल घडून आला. विद्यार्थी स्वतःच्या चपला रांगेत लावतात.
-मनमथ किडे -MANMATH KIDE
वर्तनबदल
-मनमथ किडे -MANMATH KIDE
विद्यार्थ्यांमधील बदल
मूल्यवर्धन उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये बदल होताना दिसतात. हे झालेले बदल त्यांच्या अंगवळणी पडून त्यांचे रूपांतर चांगल्या सवयीमध्ये होत आहे.
मूल्यवर्धनचे उपक्रम घेताना माझ्या वर्गातील मुलांना खूप आनंद होतो. आम्हांला पुस्तके घरी द्या, असे ते म्हणतात. एकमेकांना वर्गनियमांचे पालन करण्याची आठवण करून देऊ लागले. आपल्या चपला रांगेत लावायची सवय त्यांना लागली आहे. रांगेत जाताना एकमेकांना ढकलत नाहीत. दात स्वच्छ घासतात. अंघोळ करून शाळेत येतात. शांतता संकेताचा वापर केला जातो. समाजामध्ये वावरताना इतर लोकांची आपल्याल्या मदत हवी असते, हे त्यांना समजू लागले.
-विजयंता पाठक
विद्यार्थ्यांमधील बदल
-विजयंता पाठक
शाळेत खूप बदल घडवून आणले आहेत.
- शाळेत खूप सुंदर वातावरण निर्माण झाले आहे.
- शाळेची पत दिवसेंदिवस सुधारत आहे.
- विद्यार्थ्यांचा मी आवडता शिक्षक झालो
- मी शिकवायला लागलो की विद्यार्थी खूप उत्साहित होतात.
- शाळेची उपस्थिती दिवसेंदिवस वाढत आहे.
- विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत आहे.
- विद्यार्थ्यांना दिलेले गृहपाठ ते पूर्ण करून आणत आहेत.
- शाळेची गुणवत्ता वाढत आहे.
- आमच्या शाळेत बाहेरगावच्या शाळेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येत आहेत.
- आमच्या शाळेत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
- आमच्या शाळेत रोज सकाळी सामान्यांचे प्रश्न घेतले जातात.
- आमच्या शाळेत रोज प्रार्थना घेतली जाते.
- विद्यार्थ्यांना खेळायला सुट्टी दिली जाते.
- विद्यार्थी रोज शाळेत येतात. एकही दिवस शाळेला दांडी मारत नाहीत
- आमच्या शाळेत दररोज पिटी घेतली जाते.
- आमच्या शाळेत पूर्णपणे स्वच्छता आहे.
- आमचे शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेचे दोन ड्रेस आणि स्पोर्ट ड्रेस दिला जातो.
- विद्यार्थी शाळेचे युनिफॉर्म घालून येतात.
- शाळेची उपस्थिती १००% असते.
- आमच्या शाळेची स्वच्छता विद्यार्थी रोज करतात.
-राहुल कायटे
शाळेत खूप बदल घडवून आणले आहेत.
-राहुल कायटे