मूल्यवर्धन हा कार्यक्रम मुलांमध्ये घटनात्मक मूल्ये शालेय वयातच रुजावीत, त्यांच्यामधून चांगले लोकशाहीभिमुख नागरिक घडावेत, या उद्देशाने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र व गोवा राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा आणि काही खासगी प्राथमिक शाळांमध्ये राबविला जात आहे.